आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी
बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी???
प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा?
मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा.
मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे?
पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे???
तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू.
शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू!
सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का?
जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का?
मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको..
निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको.
अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता?
तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता.
मी म्