Skip to main content

वीररस

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/01/2012 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
आर्मी कमांड्स
(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा.
काव्यरस

जखम

लेखक अमोल मेंढे यांनी शनिवार, 05/11/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आयुष्यातली सर्वात मोठी चुक... मी तुझ्यावर निस्सीम प्रेम केलं... पण तरीही दगा दिलास तु.... माझं आयुष्यंच, उध्वस्त झालं.... तु केलं ते चांगलं केलंस... पण मला ते पचवणं कठिण गेलं... शांतपणे चालणार्‍या माझ्या आयुष्यात... एक विनाशकारी वादळ निर्माण झालं... खुप प्रयत्न केला तुला विसरण्याचा... पण तुला विसरणं कठीण आहे... कारण तु दिलेली विश्वासघाताची जखम... ह्रुदयात ताजी अजुन आहे... पण मी मरणार नाही तुझ्यावाचुन... नवी स्वप्ने मला सुध्दा पाहता येतात... कारण लक्षात ठेव... काळाच्या ओघात...सगळ्या जखमा भरुन येतात... सगळ्या जखमा भरुन येतात...
काव्यरस

चपराक

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 01/11/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः माझी एक कविता एका महाभागाने चोरुन चक्क आपल्याच नावाने चेपुवर प्रकाशित केली आणि ती नेमकी माझ्या मित्राने पाहीली आणि मला कळवले. ते बघुन असा संताप आला आणि ही कविता सुचली. जरा अतिशियोक्तीच झाली आहे, पण भावनेच्या भरात......... ;) चोरून चोरून तुम्ही चोरणार किती आहे अस्सल हिरा इथे माझिया हाती चोरून काय साधले तुम्ही शब्द माझे ? उजळल्याविना राहील का प्रारब्ध माझे ? आहे अजूनही लेखणीला माझ्याही धार येतो सरसावूनी शब्दांना अजूनच खुमार चोरलेल्या शब्दांचीच तुम्हा बसेल चपराक सणसणीत अस्खलित नाणे माझे वाजेल नेहमीच खणखणीत |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/१२/२०१०)
काव्यरस

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

देवळातला शंकर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/09/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शंकर देवळात कान उघडुन बसला भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन खुदकन मनात हसला भं...भोले..ही अरोळी खरोखरच छप्परतोड कुणाच्या मनाची जखम तर कुणाचा नुसताच फोड माझ्याकडे येणारे असेच कुणी शांत,कुणी भेदरलेले आयुष्याच्या कलहात कुणी मिटलेले,कुणी विटलेले होते काहो ती अरोळी.. जीवनरोगाचे औषध? का थोड्या वेळाचं मलम नी शेवटी नुसतीच खदखद तुंम्ही म्हणाल या खेरीज दुसरा जालीम उपाय काय? का तुंम्हीही अमच्यासारखेच..? समस्या आली...की बाय बाय मी तुम्हाला सांगेन...की मीही तुमच्यातलाच आहे फार पूर्वी माणुस होतो अता मात्र 'देव' आहे मोडुन टाका ते देऊळ अणी मुक्त करा मला माझा आधार..कशाला? एकमेकांचा घेऊ...चला..! पुरे झालं म

श्लील अश्लील

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 23/08/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा कशी झाली देशाची गती, कुंठली मती लाचखोरीचे पीक आले भ्रष्ट पुढारी नेते झाले नोकरशाहीची मस्ती चाले भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥ एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे बॅंकेला गहाण सातबारा अवदसा होती घरादारा मग तो सत्तेमध्ये गेला पाहता मालामाल झाला कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥ एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी मांडीवर उभी फाटलेली चप्पल पायात तुटलेली मग तो नोकरीत गेला घरी पैशाचा पूर आला सांगा कुठून पैसा आला? रं जी जी ....
काव्यरस

पुरुष!

लेखक अभिजीत राजवाडे यांनी गुरुवार, 18/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझी कविता माझ्या आवाजात....मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते? पुरुष हवे आहेत... या देशाला हवे आहेत पुरुष, मानसिक पुरुषत्व असलेले पुरुष, शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात, वीजेसारखे आसमंत उजळवणारे पुरुष, निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी, स्मशानात पोहचवणारे पुरुष समरांगणात मारिता मारिता, तलवार वाकवणारे पुरुष सहानुभुतीवर थुंकणारे पुरुष, वादळांना फुंकणारे पुरुष, शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारे पुरुष, राष्ट्रासाठी हसत हसत म
काव्यरस