मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांत समय अन्...

Pradip kale ·
लेखनविषय:
काव्यरस
शांत समय अन् एकांत किनारा, हेच माझे सोबती न लगे मग दुजे कुणी, न प्रेयसी न कुठली नाती धीर गंभीर स्वरांमधुनी तो, गुज सांगे मज कानी अन् प्रत्युत्तरामधे घेऊन जाई, माझ्या कविता आणिक गाणी शांततेच्या गुढ उदरी दिसे, निशब्द मनाची वाट उलगडी ती मज समोरी, गत आठवणींचा पट ध्यानस्त बैसले मन, ध्यानस्त तो काळ पण कळले नाही मजला, कशी गेली अत्तरासम वेळ दिस सरला, वेळ सरली ; सुर्य अस्तासी निघाला अस्त त्याचा तो इथला, पण जन्म असे तो पलिकडला असेच सारे विचार छळती, आज का हे मज एकांती बुडुन जातो सुर्यासह मी, पुन्हा उगवण्या नवीन जगती -प्रदिप काळे. माझा ब्लॉग:

अष्टावधानी

भटकीभिंगरी ·
लेखनविषय:
काव्यरस
लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन ! स्त्री हे खरोखर अजब रसायन ! ! दुर राहिलेल्या आपल्या घरात! भुकेने रडणार्‍या पिलाची आठवण येउन , कड्यावरुन स्वत:ला झोकुन देते ! तीचे मातृप्रेम खरेच अनुपम !! स्वत:च्या बाळास बांधुन पाठीवर ! खंबीरपणे स्वार होते घोड्यावर !! पराक्रम करते युध्दभूमीवर !!! तीची विरश्री करते चकीत ! ! ! ! परदेशातील कडाक्याच्या थंडीत ! ज्ञानसाधनेची उपासना करीत ! ! भारतातील पहीली डॉक्टर होते ! ! ! तीचा निश्चय करतो अचंबित ! ! ! ! ! कधी ऑलिंपिक मेडल आणते! कधी अवकाशी भरारी घेते ! ! सायंटीस्ट, पोलिस ऑर्मीमध्धे, तीचा पराक्रम अचंबित करतो ! ! ! ! लोण्याहुन मुलायम कठोर वज्राहुन !

विमान

संदीप-लेले ·
लेखनविषय:
काव्यरस
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सु

राउळी या मनाच्या

वेल्लाभट ·

चतुरंग 02/03/2017 - 21:45
किंचित छिद्रान्वेष .... तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या दुसर्‍या ओळीत किंचित लय जाते आहे.. तिला काढता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या असे काही जमेल का?

In reply to by स्रुजा

वेल्लाभट 03/03/2017 - 11:25
हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)

तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P

चतुरंग 02/03/2017 - 21:45
किंचित छिद्रान्वेष .... तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहताती रुपे चांदण्यांच्या दुसर्‍या ओळीत किंचित लय जाते आहे.. तिला काढता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या असे काही जमेल का?

In reply to by स्रुजा

वेल्लाभट 03/03/2017 - 11:25
हो म्हणजे झालं असं की, कुणीतरी मला छंदबद्ध रचना आणि मुक्तछंद याबाबत विचारलं. मग तो किडा डोक्यात दोन एक दिवस वळवळत होता. आणि मग असं काहीतरी सुचायला लागल्यावर मी म्हटलं, चला वृत्तातच बांधू. म्हणून ते आवर्जून नमूद केलं. :)

तरी खिन्नता पौर्णिमेला अपूर्व... नाव मागे सोडायची स्टाईल आवडली आपल्याला :) वृत्त दिले आहे खरे, पण शाळेत असताना बाईंनी या वृत्ताची शिकवलेली चाल काही आठवेना :P
लेखनविषय:
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोड

ती एक वेडी

निओ ·
ती एक वेडी जुन्या आठवणींचा कोष मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी एक दिवस तिच्याही नकळत हा कोष जाणिवेत आला बघता बघता त्यातनं एक सुंदर फुलपाखरू निघालं तिच्या तळहातावर अलगद बसलं अगदी विश्वासानं ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली त्याची ओळख पटवू पाहू लागली हळूच त्याने पंख मिचकावले तिला वाटलं ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे ओळख पटली ती हसली तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं त्याच्या रूपानं हरखून गेली जुन्या आठवणीत हरवून गेली एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली तीच तरुणपणातील धडधड तीच हुरहूर तीच ओढ़ तिचा विश्वास बसेना स्वतःवर पण ती तिच्या भावनांशी प्रामाणि

मुळांनी धरू नये अबोला

चांदणे संदीप ·

मस्त लिहिले आहे. फक्त एवढेच वाटते की, उपेक्षा मुळांची कुठेही नसावी फुलांची मुळांशी गोड गट्टी असावी घनदाट फांद्या नको गर्व त्यांना मुळांचे स्मरण असो डहाळ्यांना

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्या रसिकांचे सर्वात आधी आभार. नवीन प्रतिसाद आले आणि 'अबोला' विषयाशी संबंधित दोन काव्यपुष्प मेनबोर्डावर आले म्हणून हा प्रतिसाद. अबोला खरंतर वाईट. शरीराने जवळ असलेले दोन जीव मनाने खूप दूर जातात आणि त्यातील अंतर अजून वाढवण्याचे काम हा अबोला 'शांत'पणे करत राहतो. कवितेत त्याला उतरवताना ज्या कविला तो जसा दिसेल तसाच उतरेल. उदाहरणादाखल हीच कविता माझ्या एका जवळच्या मित्राच्या वैवाहिक आयुष्याला पाहून मी त्याला समजावण्यासाठी लिहिली आहे. मला जे कदाचित जवळ बसून परखडपणे किंवा योग्य भाव आणि शब्द जुळवून सांगता आलं नसतं ते मला कवितेतून लिहिता आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी हे केलं त्याला ते उमजलं. अजून, दुसऱ्या एका जवळच्या मित्राच्या आयुष्यातही असंच काहीसं घडत होतं तेव्हाही 'अबोला' नावाची कविता लिहिली आणि त्याला वाचून दाखवली. सुदैवाने, घटस्फोटापर्यंत गेलेलं ते प्रकरण आता निवळून सुरळीत सुरू आहे. माझ्या कवितेचे त्यात योगदान नाही पण माझे दोन शब्द मी मला वाटले तसे लिहिले आणि पोचवले. नवा कवितेचा धागा नको वाटतोय म्हणून ती कविता खाली देत आहे. तुझे शब्द ना माझ्या कानावर ना माझे शब्द तुझ्या कानावर होतील अशाने भावना अनावर राहील कुणी कसे मग भानावर? शब्द तुझ्याजवळ नाहीत शब्द माझेही संपले नव्या ओळी रचण्याची सांग जबाबदारी कोणावर? पूर्वी अनोळखी होत्या वाटा ज्या जुळाल्या अजूनही रस्ता पुढेच आहे नजर खिळली का मग फाट्यावर? कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्वेता२४ 23/09/2022 - 17:26
कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! हे विशेष आवडले.

मस्त लिहिले आहे. फक्त एवढेच वाटते की, उपेक्षा मुळांची कुठेही नसावी फुलांची मुळांशी गोड गट्टी असावी घनदाट फांद्या नको गर्व त्यांना मुळांचे स्मरण असो डहाळ्यांना

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्या रसिकांचे सर्वात आधी आभार. नवीन प्रतिसाद आले आणि 'अबोला' विषयाशी संबंधित दोन काव्यपुष्प मेनबोर्डावर आले म्हणून हा प्रतिसाद. अबोला खरंतर वाईट. शरीराने जवळ असलेले दोन जीव मनाने खूप दूर जातात आणि त्यातील अंतर अजून वाढवण्याचे काम हा अबोला 'शांत'पणे करत राहतो. कवितेत त्याला उतरवताना ज्या कविला तो जसा दिसेल तसाच उतरेल. उदाहरणादाखल हीच कविता माझ्या एका जवळच्या मित्राच्या वैवाहिक आयुष्याला पाहून मी त्याला समजावण्यासाठी लिहिली आहे. मला जे कदाचित जवळ बसून परखडपणे किंवा योग्य भाव आणि शब्द जुळवून सांगता आलं नसतं ते मला कवितेतून लिहिता आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी हे केलं त्याला ते उमजलं. अजून, दुसऱ्या एका जवळच्या मित्राच्या आयुष्यातही असंच काहीसं घडत होतं तेव्हाही 'अबोला' नावाची कविता लिहिली आणि त्याला वाचून दाखवली. सुदैवाने, घटस्फोटापर्यंत गेलेलं ते प्रकरण आता निवळून सुरळीत सुरू आहे. माझ्या कवितेचे त्यात योगदान नाही पण माझे दोन शब्द मी मला वाटले तसे लिहिले आणि पोचवले. नवा कवितेचा धागा नको वाटतोय म्हणून ती कविता खाली देत आहे. तुझे शब्द ना माझ्या कानावर ना माझे शब्द तुझ्या कानावर होतील अशाने भावना अनावर राहील कुणी कसे मग भानावर? शब्द तुझ्याजवळ नाहीत शब्द माझेही संपले नव्या ओळी रचण्याची सांग जबाबदारी कोणावर? पूर्वी अनोळखी होत्या वाटा ज्या जुळाल्या अजूनही रस्ता पुढेच आहे नजर खिळली का मग फाट्यावर? कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

श्वेता२४ 23/09/2022 - 17:26
कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! हे विशेष आवडले.
लेखनविषय:
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे? - संदीप चांदणे

गोंधळ

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड नाशिबाचा फेरा कोणा चुकला कर्माची फळं जीवाच्या पदरा तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड पैशाचा भुकेला मनुष्य जाहला नात्याच्या भुकेला शोष पडला वेळेअभावि एकटा पडला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड तुझ्या दारी कोणी वेगळा नाही चरणी तुझ्या जीव धन्यच होई बये घे पदरी...

वास्तव

विशाल कुलकर्णी ·

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!

भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

+ १ . टू बापू. @आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!

भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच. पैजारबुवा,
लेखनविषय:
काव्यरस
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...

!! रात्र जिवलग सखी जाहली !!

कवि मानव ·
लेखनविषय:
काव्यरस
शांत गूढ रात्र उशाशी, नील व्याप्त गगन छताशी, नेत्र टिपत असे नक्षत्रे तेव्हा, झुळूक देत असे त्रास जराशी !! रातराणीचा स्वैर विहार, सुगंध दरवळे मज श्वासाशी, मोहक वारे बिलगून अंगी, खळी पडत असे मज गालाशी !! राहिले बरेच तसेच तिथेच, येऊन थांबले बहू ओठांशी, माझ्या मनातले अबोल गाणे, थेट भिडत असे उंच नभाशी !! रात्र जिवलग सखी जाहली, दडून बसली माझ्या उराशी, उजेड मारी सुरुंग प्रभाती, ------(सकाळचा प्रहार) पण त्यासही मिळे ना ती तळाशी !! ---- ( ती म्हणजे रात्र , मनाच्या तळाशी)

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

शिव कन्या ·
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या