मुळांनी धरू नये अबोला
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये
त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात
आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये
जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात
घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये
मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात
जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये
वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात
इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये
उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे?
- संदीप चांदणे
वाह!!! संदीपभौ जीयो.. खूप
कविता छानच आहे. अनेकांचे
+१
नेहमीप्रमाणेच सुरेख
सुंदर आशय आहे !
अनुमोदन
चांगलीय
चांगली
सुरेख!
छान.
धन्यवाद प्रा. डॉ.
मस्त . .
अरे वा! आवडली.
टाळ्या.......
आभार!
वाह! क्या बात!