मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुट्टी

माहितगार ·
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

क्षितिजाचे कुंपण

कर्नलतपस्वी ·
बालपण...... साखर झोपेच्या वळणावर अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर बांग कुणाची येता कानी विरून गेली सारी कहाणी तरूणपण...... विझल्या साऱ्या चांदणठिणग्या बघा बघा ती पहाटफुटणी छोट्या टीचभर खळगीसाठी धरावी आता वाट ही कुठली दगड मातीच्या रस्त्यामधूनी दिसेल काही अमोघ अद्भूत धावत होतो उर फुटोस्तर हाती आले मृगजळ सुंदर म्हातारपण...... झाली आता चांदणसंध्या चक्क कळाले भ्रमनिरास होणे ओलांडून क्षितिजाचे कुंपण उरले फक्त मार्गस्थ होणे

दोन ओळींची कविता,......

कर्नलतपस्वी ·

म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल. बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)

मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच. मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.

चित्रगुप्त 24/09/2023 - 22:42
आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही. समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?

म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल. बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)

मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच. मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.

चित्रगुप्त 24/09/2023 - 22:42
आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही. समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?
इच्छापत्र लिहून, संपत्तीची वाटणी केली वाचून बघ म्हंटल तर, दोन टिपे गाळून, तीने पावती दिली बघता बघता ढग भरून आले मधेच विज कडाडून गेली काय कमावले,किती कमावले, "ती", दोन टिपे खुप काही सांगून गेली तुमचं आपलं काहीतरीच बाबा,...... कागदावरची अक्षरे धुसर झाली दोन ओळीची कविता, बरेच काही सांगून गेली तीची दोन टिपे ,माझी दोन टिपे, जेव्हां एकत्र झाली.... वाटले, हरिद्वारची गंगाच दारी आली

पावसाचं वय....

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 17/08/2023 - 03:46
मजेशीर मस्त कविता. यमकं बिमकं पण छान जुळत आहेत. अवघ्या सहा कडव्यात 'तोंडात अंगठा' पासून 'डोळ्यावर चष्मा' पर्यंतचा 'वर्षा-प्रवास' हळुवार समर्थतेने मांडणे थोरच. फक्त - स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? --- --- या कडव्यात चाराऐवजी पाच ओळी आल्याने जरा विचित्र वाटते आहे. हे बघा कसे वाटते: व्हिस्कीची बाटली, चकण्याची ताटली मित्राची संगत, त्याविना नाय गंमत खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? (या शिवाय आणखी एक) "घेतां ना चहा !" शब्द कानी आले सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!

In reply to by चित्रगुप्त

शैशव ते वार्धक्य हा प्रवास उत्तम रितीने मांडला आहे. रच्याकने---आजुन कसा आला नाही (मित्र),खड्डय़ात पडला का काय! ही एकच ओळ धरल्यास म्हणताना खटकत नाहीये.

चित्रगुप्त 17/08/2023 - 04:07
डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर हातात पुस्तक,मनात हुरहूर .... अश्या 'संध्याछाये'नंतर - "सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!" असा शेवट कमालीची हुरहुर लावून जातो. कोटि कोटि प्रणाम.

In reply to by चित्रगुप्त

कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय. नमस्कार.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 17/08/2023 - 07:25
कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय.
-- हे तर फारच र्‍हदयस्पर्शी आहे. पूर्ण कविता यामुळे एका वेगळ्याच आयामात पहुचली आहे. अशा अर्थाचा 'कान वाजणे' असा खास वाक्प्रचार आहे का ?

भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. वैवैद्यकशास्त्रात या त्रासाला इंग्रजीत 'टिनिटस' असे म्हणतात. कानात येणारा आवाज दोन प्रकारचा असतो- सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह आवाज म्हणजे जो केवळ रुग्णाला ऐकू येतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कानातील दुसऱ्या व्यक्तीलाही ऐकू येणारा आवाज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 17/08/2023 - 14:36
भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.
हे वाचून आठवले, की माझ्या एका मित्राची पत्नी निवर्तल्यावर तो एकटाच रहायचा, अणि दिवंगत पत्नीशी बोलत रहायचा. ती त्याला अमूक करावे तमूक करावे सांगायची, त्याप्रमाणे तो करायचा, असे खुद्द त्यानेच सांगितले होते. -- मला स्वतःला एका प्रसंगी असे काही शब्द अगदी स्पष्ट खणखणीत रूपात कानावर पडलेले असल्याचे आठवते. (तो प्रसंग फार वेगळा, एकमेवाद्वितीय असा होता) मात्र 'टिनिटस' हा प्रकार वेगळा असतो. ही व्याधि मला अनेक वर्षांपासून आहे. अगदी आत्ता हे लिहीताना सुद्धा विशिष्ट आवाज कानात गुंजत आहेत.

शेखरमोघे 18/08/2023 - 08:09
कविता आवडली. प्रत्येक कडव्याचा "सांग ना रे पावसा काय तुझं वय?"ने होणारा शेवट, पण कवितेचा शेवट मात्र "सांग ना रे पावसा अजून किती राहिले!" हे चटका लावणारे वास्तव छानच.

प्रतीसादक आणी वाचकांचे आभार. शेखर भौं नी कायप्पावर हांक(काॅल) मारून कवीता आवडल्याबद्दल सांगीतले. आनंद द्विगुणित झाला. त्यांचे विशेष आभार. क लो आ

बाजीगर 18/08/2023 - 15:45
वेगळी आणि आयुष्याचे सर्व टप्पे कव्हर करणारी 'पाऊस-कविता'. यमकं खूप सुंदर घेतली आहेत. खूप आवडली हि कविता कर्नलजी.

एका हातात किरण्याच्या पिशव्या दुसरा हात पकडून रडणारे कारटे तुझ्याच धुंदीत कधीतरी जूळले तिचाशी नाते आठव रे पावसा ते साल कोणते होते? पैजारबुवा,

चित्रगुप्त 17/08/2023 - 03:46
मजेशीर मस्त कविता. यमकं बिमकं पण छान जुळत आहेत. अवघ्या सहा कडव्यात 'तोंडात अंगठा' पासून 'डोळ्यावर चष्मा' पर्यंतचा 'वर्षा-प्रवास' हळुवार समर्थतेने मांडणे थोरच. फक्त - स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? --- --- या कडव्यात चाराऐवजी पाच ओळी आल्याने जरा विचित्र वाटते आहे. हे बघा कसे वाटते: व्हिस्कीची बाटली, चकण्याची ताटली मित्राची संगत, त्याविना नाय गंमत खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा, तुझं वय काय? (या शिवाय आणखी एक) "घेतां ना चहा !" शब्द कानी आले सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!

In reply to by चित्रगुप्त

शैशव ते वार्धक्य हा प्रवास उत्तम रितीने मांडला आहे. रच्याकने---आजुन कसा आला नाही (मित्र),खड्डय़ात पडला का काय! ही एकच ओळ धरल्यास म्हणताना खटकत नाहीये.

चित्रगुप्त 17/08/2023 - 04:07
डोळ्यावर चश्मा,नजर दूरदूर हातात पुस्तक,मनात हुरहूर .... अश्या 'संध्याछाये'नंतर - "सांग ना रे पावसा, अजून किती राहिले!" असा शेवट कमालीची हुरहुर लावून जातो. कोटि कोटि प्रणाम.

In reply to by चित्रगुप्त

कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय. नमस्कार.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 17/08/2023 - 07:25
कान वाजणे हा वाक्प्रचार एकट्या बसलेल्या वृद्ध व्यक्तीची मनस्थिती दर्शवते. साथीदार पुढे निघून गेलायं पण मनाने अजुन बरोबर असल्याचा भास होतोय. बाकी कुणालाच वेळ नाही , आभाळातून येणाऱ्या पावसासोबत तो आपली एकटे पणाची खंत व्यक्त करतोय.
-- हे तर फारच र्‍हदयस्पर्शी आहे. पूर्ण कविता यामुळे एका वेगळ्याच आयामात पहुचली आहे. अशा अर्थाचा 'कान वाजणे' असा खास वाक्प्रचार आहे का ?

भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. वैवैद्यकशास्त्रात या त्रासाला इंग्रजीत 'टिनिटस' असे म्हणतात. कानात येणारा आवाज दोन प्रकारचा असतो- सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह आवाज म्हणजे जो केवळ रुग्णाला ऐकू येतो. तर एखाद्या व्यक्तीच्या कानातील दुसऱ्या व्यक्तीलाही ऐकू येणारा आवाज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 17/08/2023 - 14:36
भावनिक गुंतवणूक असेल तीथे या प्रकारचे आवाज येणे हा या भावनेचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.
हे वाचून आठवले, की माझ्या एका मित्राची पत्नी निवर्तल्यावर तो एकटाच रहायचा, अणि दिवंगत पत्नीशी बोलत रहायचा. ती त्याला अमूक करावे तमूक करावे सांगायची, त्याप्रमाणे तो करायचा, असे खुद्द त्यानेच सांगितले होते. -- मला स्वतःला एका प्रसंगी असे काही शब्द अगदी स्पष्ट खणखणीत रूपात कानावर पडलेले असल्याचे आठवते. (तो प्रसंग फार वेगळा, एकमेवाद्वितीय असा होता) मात्र 'टिनिटस' हा प्रकार वेगळा असतो. ही व्याधि मला अनेक वर्षांपासून आहे. अगदी आत्ता हे लिहीताना सुद्धा विशिष्ट आवाज कानात गुंजत आहेत.

शेखरमोघे 18/08/2023 - 08:09
कविता आवडली. प्रत्येक कडव्याचा "सांग ना रे पावसा काय तुझं वय?"ने होणारा शेवट, पण कवितेचा शेवट मात्र "सांग ना रे पावसा अजून किती राहिले!" हे चटका लावणारे वास्तव छानच.

प्रतीसादक आणी वाचकांचे आभार. शेखर भौं नी कायप्पावर हांक(काॅल) मारून कवीता आवडल्याबद्दल सांगीतले. आनंद द्विगुणित झाला. त्यांचे विशेष आभार. क लो आ

बाजीगर 18/08/2023 - 15:45
वेगळी आणि आयुष्याचे सर्व टप्पे कव्हर करणारी 'पाऊस-कविता'. यमकं खूप सुंदर घेतली आहेत. खूप आवडली हि कविता कर्नलजी.

एका हातात किरण्याच्या पिशव्या दुसरा हात पकडून रडणारे कारटे तुझ्याच धुंदीत कधीतरी जूळले तिचाशी नाते आठव रे पावसा ते साल कोणते होते? पैजारबुवा,
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत तड तड ताशा,मोत्याच्या माळा सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? भिरभीर डोळे, संतत धार रस्त्यातले डबके,आईचा मार भिजलेलं डोकं,कागदी होड्या सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर मातीला गंध,हिरवळ दूरदूर छत्रीतलं भिजणं,भेटीची सय सांग ना रे पावसा काय तुझं वय? उरात उर्मी,अंगात गर्मी सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय सांग ना रे पावसा तुझं काय वयं? स्टिलचे पेले,सीलबंद बाटली पाण्याशी गाठ,चकण्याची ताटली आजुन कसा आला नाही (मित्र) खड्डय़ात पडला का काय! सांग ना रे पावसा तुझं वय काय? डोळ्यावर चश्मा,नजर दू

दिस सरतो असा...

Deepak Pawar ·

चित्रगुप्त 25/12/2022 - 22:26
वा वा वा. अतिशय सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना. आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचे सरून चालले आहे, ही अस्वस्थ करणारी जाणीव ओळीओळीतून झिरपते आहे. सुबह होती है शाम होती है .. उम्र यूंही तमाम होती है.... (मुन्शी अमीरुल्लाह तस्लीम) हे आठवले.

भागो 26/12/2022 - 20:04
चित्रगुप्त +१ मला चित्रगुप्त ह्यांच्या प्रमाणे लिहिता येत नाही. पण त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत. मनातले भाव शब्दात व्यक्त करण्याची दैवी देणगी मिळाली आहे तुम्हाला.

चित्रगुप्त 25/12/2022 - 22:26
वा वा वा. अतिशय सुंदर, अर्थघन, व्याकुळ आर्ततेचे अस्तर असलेली रचना. आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचे सरून चालले आहे, ही अस्वस्थ करणारी जाणीव ओळीओळीतून झिरपते आहे. सुबह होती है शाम होती है .. उम्र यूंही तमाम होती है.... (मुन्शी अमीरुल्लाह तस्लीम) हे आठवले.

भागो 26/12/2022 - 20:04
चित्रगुप्त +१ मला चित्रगुप्त ह्यांच्या प्रमाणे लिहिता येत नाही. पण त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत. मनातले भाव शब्दात व्यक्त करण्याची दैवी देणगी मिळाली आहे तुम्हाला.
दिस सरतो असा, आठवांचा ठसा, मिटून चालला दिस सरतो असा, पाखरांचा थवा, उडून चालला. दिस मेघापरी झरुन चालले दिस वाळूपरी सुटून चालले दिस सरतो असा, स्वप्नांचा दिवा, विझून चालला. दिस गंधापरी विरून चालले दिस रंगापरी पुसून चालले दिस सरतो असा, या फुलांचा पसा, लुटून चालला. दिस आले कधी सोबती घेउनी दिस गेले कधी एकटा सोडुनी दिस सरतो असा, ओळखीचा जसा, निघून चालला. दीपक पवार.

जगणे

सागरसाथी ·

Bhakti 02/11/2022 - 11:09
करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही

Bhakti 02/11/2022 - 11:09
करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही
आला दिवस पुढे ढकलणे, जगणे नाही मरणा आधी जगत राहणे, जगणे नाही. जीवन म्हणजे ऊन सावल्यांचा खेळ सारा सावलीसाठी उन्हात पोळणे, जगणे नाही. करार मदार सजावट कागदावरची जूने शब्द उगाळत बसणे, जगणे नाही. होते ताटातूट किनारा आणि लाटांची इथे पुळणीवरची नक्षी जपणे, जगणे नाही हातावच्या रेघांना अर्थ नसतो प्रत्येक वेळी नेहमी नशीबाला बोल लावणे, जगणे नाही. ----- अभय बापट ३१/१०/२०२२

आज्जी गेलीय सोडून

चांदणे संदीप ·

आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

गवि 15/06/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड 15/06/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त 15/06/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा 25/06/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा

आज्जी आजोबा सगळ्यात जवळचे नाते. पेरू पासून ते मेरू पर्यंत सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर शेअर करू शकतो. कवीता आवडली.

ओह ! शीर्षक वाचून मला मिपावरील आजी या आय डी ने मिसळपाव सोडले की काय अशी शंका आली.

गवि 15/06/2022 - 10:02
आवडली. कवितेचा आकार म्हणावा तर फार सुंदर आहे. हुरहूर लावणारा. पण अर्थ कळाला नाहीये. अर्थात अगदी टोकदार स्पष्ट अर्थ असलाच पाहिजे हे काही कविता या प्रकाराचं सौंदर्यस्थळ नव्हे. कवीला नेहमीच्या उघड इंटरप्रिटेशनपेक्षा (आजी या नातेवाईकाची मरणोत्तर आठवण) यापेक्षा वेगळंच काहीतरी सुचवायचं आहे असं वाटतं. भावंडांच्या उल्लेखाने हे अधिकच वाटते. आजीला परलोकात आधीच गेलेली भावंडे भेटून विचारतील, किंवा सर्वजण आहेत आणि दादाच गेलाय असे काहीसे विचित्र वाटले अधेमधे. पण हे न कळल्याने विचार चालू होतो. हेच कवितेचे यश.

आंबट गोड 15/06/2022 - 11:43
तर असे वाटतेय की हा दादा च परलोकात गेला..आजी आणि लहान भावंडांना सोडून!

चित्रगुप्त 15/06/2022 - 16:53
तीन-चारदा कविता वाचली. अतिशय आवडली. वाचकांनी वेगवेगळ्या कल्पना केल्या आहेत त्याही मननीय आहेत. कविता चुटपुट लावणारी आहे, हेच तिचे सौंदर्य, असेही म्हणता येईल. ज्या आजीने आजवर काबाडकष्ट करून (ज्यांचे आई-वडील देवाघरी गेलेले आहेत अश्या -) आपल्या लहान लहान नातवंडांना पाळले -पोसलेले आहे, तिचा सर्वात मोठा नातू आता कमावण्यालायक झालेला आहे, म्हणुन त्याला शहरात नेऊन, कुठेतरी कामावर लावून , किंवा नुस्तेच गर्दीच्या गाडीत बसवून ती निघून गेलेली आहे .... अशा त्या मोठ्या नातवाचे मनोगत या कवितेत व्यक्त झालेले आहे, असे मला वाटते. "मला सांगशील का ग ?" ... आणि पुन्हा भेटशील का ग ?" या दोन ठिकाणी "ग" वापरला आहे, पण "कुठे दादा आमुचा 'गे' ? हे वाचून भलतीच कल्पना मनाला शिवून गेली, आणि कवितेचा आणखीही 'तसला' एक अर्थ लावता येईल, असे वाटून गेले.

हुरहुर लावणारी कविता!! खाणारी तोंडे आणि कमाई यांचा मेळ बसत नसल्याने आजीने नातवाला कुठेतरी सोडुन दिले असेच प्रथम वाटले. पण ईतर प्रतिक्रिया बघुन असेही वेगवेगळे अर्थ निघु शकतात हे समजले.

गणेशा 25/06/2022 - 14:18
हळवे लिखान.. ---- उसवले मायधागे फाटले आकाश माझे.. तू निघून गेल्यावर विरले सुखाचे अस्तर --- गणेशा
उशीराने आले ध्यानी एकटे गर्दीत बसून मला अनोळख्या देशी आज्जी गेलीय सोडून घरातून निघताना का बोलली ती नाही? तुला लेकरा घरात जागा उरलीच नाही आई बाबा गेल्यावर आज्जी तूच उरलेली कुणाकुणा पोसशील तूही आता थकलेली माझ्या इवल्या बहिणी आणि भाऊ लहानगे तुला आज्जी, म्हणतील कुठे दादा आमुचा गे? काय सांगशील त्यांना मला सांगशील का ग? आज्जी एवढ्याचसाठी पुन्हा भेटशील का ग? - संदीप चांदणे

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

कर्नलतपस्वी ·

पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त. धन्यवाद.

पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त. धन्यवाद.
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.

मुखवटे

पाषाणभेद ·

गॉडजिला 21/09/2021 - 09:28
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे संपूर्ण जग जिथं मुखवटा पांघरून जगते तिथे खरा चेहरा ठेऊन वागायला सुरुवात केली तर तुम्हाला वेड लागलं आहे असे ठरवायला देखील जग हटणार नाही... त्यापेक्षा आपल्यातील केमिकल लोच्या लोकांपासुन लपवून मी फलाना फलाना मानसशास्त्रातील पुस्तकात ढीमका अमुक तमुक गोष्ट सांगतो अशा पुड्या सोडत जगा अनेक लोक नुसती वाहवाच करतील असे न्हवे तर तुमच्याकडे राहूनही जातील.

गॉडजिला 21/09/2021 - 09:28
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे संपूर्ण जग जिथं मुखवटा पांघरून जगते तिथे खरा चेहरा ठेऊन वागायला सुरुवात केली तर तुम्हाला वेड लागलं आहे असे ठरवायला देखील जग हटणार नाही... त्यापेक्षा आपल्यातील केमिकल लोच्या लोकांपासुन लपवून मी फलाना फलाना मानसशास्त्रातील पुस्तकात ढीमका अमुक तमुक गोष्ट सांगतो अशा पुड्या सोडत जगा अनेक लोक नुसती वाहवाच करतील असे न्हवे तर तुमच्याकडे राहूनही जातील.
खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१|| मनात कटूता असूनी वाहवा करती हसूनी खोटे वार करती पाठीवरती ||२|| तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई पाठ वळता निंदा करण्याची करती घाई ||३|| स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी ||४|| खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे? मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५|| - पाषाणभेद २१/०९/२०२१