( ओळखलत का साहेब मला?)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
7 Nov 2014 - 10:58 am

ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी,
कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’.

कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली,
स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली .

पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले,
निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले

कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे
राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे

खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला
‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला.

आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा,
पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा

(लढाऊ ) सैनीक
७/११/१४

विडंबन

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

7 Nov 2014 - 11:03 am | मराठी_माणूस

फुटीरतीचे (फीतुरतीचे?) उदातीकरण

विजुभाऊ's picture

7 Nov 2014 - 11:47 am | विजुभाऊ

लाचारीचे समर्थन.
याला शुद्ध मराठीत म्हणायचे झाले तर :-
ढुं**** चार लाथा हाणा पण आपला म्हणा.........

पाषाणभेद's picture

7 Nov 2014 - 11:56 am | पाषाणभेद

वरील दोन्ही प्रतिसाद योग्य आहेत.

चुकलामाकला's picture

7 Nov 2014 - 1:04 pm | चुकलामाकला

झक्कास !

अमोल केळकर's picture

7 Nov 2014 - 2:04 pm | अमोल केळकर

आभार ..

मुक्त विहारि's picture

7 Nov 2014 - 3:00 pm | मुक्त विहारि

सध्याच्या स्थितीवर एकदम योग्य....

आयुर्हित's picture

7 Nov 2014 - 8:00 pm | आयुर्हित

कविता जमली खरी पण
तेवढी कुसुमाग्रजांची कणा आठवण ठेवा राव!

दिनेश सायगल's picture

7 Nov 2014 - 11:05 pm | दिनेश सायगल

उठता बसता कुणालाही श्रेय न देता कॉपी पेस्ट करणार्‍यांनी श्रेय देण्याची आठवण करावी हे पाहून डोळे पानावले.

विवेकपटाईत's picture

7 Nov 2014 - 8:08 pm | विवेकपटाईत

कोकणी आंब्याची परिस्थिती सध्या लाजिरवाणी आहे, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आता कुर्सी ही गेली. परतीची वाट धरतील का?

स्वप्नज's picture

8 Nov 2014 - 1:30 am | स्वप्नज

आंबा संपलाच आता जवळपास विवेकजी.
पण १ छोटी कैरी आहे की त्याच आंब्याची...

धर्मराजमुटके's picture

7 Nov 2014 - 8:19 pm | धर्मराजमुटके

असे कार्यकर्ते आहे म्हणूनच नेते आहेत. यात कोणत्याही प्रकारे लाचारीचे समर्थन नाहिये. "अहो महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती." माणसाने कसे लवचिक असले पाहिजे. कार्यकर्त्याने चार दिवस वाघाचे जीवन जगण्यापेक्षा हजार वर्षे शेळीचे जीवन जगले पाहिजे. शेवटी चार दिवसात काय रिझल्ट मिळणार हो ? शेवटी क्वांटिटी महत्त्वाची. क्वालीटीच काय घेऊन बसलात भाऊ ?
मोडेन पण वाकणार नाही इ. इ. सुविचार फळ्यावर आणि पुस्तकात लिहायला चांगले असतात.

मारवा's picture

8 Nov 2014 - 3:02 pm | मारवा

अतिशय कण/णा खर कविता
कणा पेक्षा हि काकण भर सरस कविता !

गणेशा's picture

10 Nov 2014 - 2:54 pm | गणेशा

आवडेश