मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( ओळखलत का साहेब मला?)

अमोल केळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ओळखलत का साहेब मला?’ परत आला कोणी, कपडे होते फाटलेले पण, मधाळ त्याची वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘पक्षामध्ये फुट पडली, आलो तिकडे राहुन’. कार्यकर्त्यांसह आम्हाला, चार आश्वासने भेटली, स्वबळावर सत्ता येता, आमची वाट लावली . पक्ष सोडला, चूक झाली, होते नव्हते ते गेले, निवडणूक होईपर्यंत त्यांनी, फक्त राबवून घेतले कार्यकर्त्यांना घेउन संगे, साहेब आता लढतो आहे राहिलेली कामे पुर्ण करून, मतदारसंघ घडवत आहे खुर्चीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘पद नको साहेब ’, जरा एकटेपणा वाटला. आलेल्या लाटेत खुर्ची गेली, तरी मोडला नाही कणा, पक्षात परत घेउन तुम्ही, फक्‍त लढ म्हणा (लढाऊ ) सैनीक ७/११/१४

वाचने 3288 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by आयुर्हित

दिनेश सायगल Fri, 11/07/2014 - 23:05
उठता बसता कुणालाही श्रेय न देता कॉपी पेस्ट करणार्‍यांनी श्रेय देण्याची आठवण करावी हे पाहून डोळे पानावले.

विवेकपटाईत Fri, 11/07/2014 - 20:08
कोकणी आंब्याची परिस्थिती सध्या लाजिरवाणी आहे, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले, आता कुर्सी ही गेली. परतीची वाट धरतील का?

धर्मराजमुटके Fri, 11/07/2014 - 20:19
असे कार्यकर्ते आहे म्हणूनच नेते आहेत. यात कोणत्याही प्रकारे लाचारीचे समर्थन नाहिये. "अहो महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती." माणसाने कसे लवचिक असले पाहिजे. कार्यकर्त्याने चार दिवस वाघाचे जीवन जगण्यापेक्षा हजार वर्षे शेळीचे जीवन जगले पाहिजे. शेवटी चार दिवसात काय रिझल्ट मिळणार हो ? शेवटी क्वांटिटी महत्त्वाची. क्वालीटीच काय घेऊन बसलात भाऊ ? मोडेन पण वाकणार नाही इ. इ. सुविचार फळ्यावर आणि पुस्तकात लिहायला चांगले असतात.