मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या...
दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उरकल्यावरसुद्धा.... रोज तासभरतरी जिममध्ये जाणारी मी २० मिनिटात परत आले...मग थोड्या वेळाने एक फळ खाल्लं तेव्हा कुठे जरा बरं वाटलं....मग तुमच काय मत आहे? म्हणजे आपण जे खातो तशीच आपली वृत्ती बनते यावर...
****************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
16 May 2010 - 9:17 pm | अरुंधती
शिल्पा, अगं मला एक वचन आठवले : पिंडे पिंडे मतिर्भिनः | म्हणजे प्रत्येकाची मती त्याचा जसा पिंड असतो त्याप्रमाणे बनत जाते. त्यात अन्नाचा भाग महत्त्वाचा व मोठा असावा असे मला तरी वाटते. पण त्याचबरोबर तुमची संगत, सवयी, आचार-विचार, वातावरण यांचाही बराच मोठा वाटा आहे. चांगल्या माणसांच्या संगतीत आपल्यालाही छान वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात प्रसन्न वाटते. खूप झोपा काढल्या किंवा अति जागरणे झाली की मलूल झाल्यासारखे वाटते. तसेच हलका, पाचक व सत्त्वयुक्त आहार घेतला की दिवसभर एक प्रकारचा ताजेपणा राहातो. ज्या अन्नात प्राण ऊर्जा अधिक ते अन्न उचित प्रमाणात ग्रहण केले असताना चांगलेच वाटते.
आयुर्वेदात अन्न कोठे, कसे, कोणी बनवलेले, कशा प्रकारचे, कोणत्या भांड्यात बनवलेले खावे इ.इ. गोष्टींवर भरपूर विचार केलेला दिसतो. आता आधुनिक पाश्चात्य जगतातही त्या प्रकारचे विचार रुजू लागले आहेत.
ह्यावर अजून संशोधन होण्याची, खास करून मॉडर्न सायन्सेसच्या निकषांवर, गरज मात्र आहे असे वाटते. ई- सकाळ मध्ये बालाजी तांबे यांनी ह्या विषयावर भरपूर लिहिले आहे. ''अन्नयोग'' सदराखाली त्यांचे बरेच लेख आहेत. अवश्य वाच.
अजून एक विचार : अन्न कोणी बनवले आहे ह्याबरोबरच ते कोणत्या विचारांनी, भावनांनी बनवले आहे त्याचाही सूक्ष्म पातळीवर शरीरावर परिणाम हा होतच असतो.
उदा : सणावाराला, पूजेला देवासाठी जो नैवेद्य बनवला जातो त्याची चव इतर अन्नापेक्षा फार वेगळी व उत्तम असते, असे का? तर ते जेवण/ प्रसाद देवासाठी बनवत आहोत ही भावना त्या फरकास कारण ठरते, असे मला माझी आई सांगते. आईने मुलांसाठी बनवलेले अन्न म्हणूनच रुचकर होते. आणि तेच जेवण तुम्ही चिडचिड, आदळआपट, वैताग करत बनवलेत तर ते खाणार्याला समाधान लाभत नाही.
म्हणूनच आई, मावशी वगैरे स्वयंपाक करताना अन्नपूर्णेचा श्लोक म्हणत करतात : खास करून सणासुदीचा स्वयंपाक : जेणेकरून मन त्या मंत्रोच्चारात मग्न राहते व इकड-तिकडचे विचार मनात येत नाहीत.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
16 May 2010 - 10:02 pm | पंगा
आम्ही सांगू? प्लासिबो इफ़ेक्ट!
फिरून तोच प्लासिबो इफ़ेक्ट!
रेस्तराँचा बावर्ची नेमके काय विचार करत आणि कोणचे श्लोक म्हणत रसोई करतो, किस ने देखा है?
किसी ने सही फ़रमाया है: दोज़ हू लव सासेज ऐंड रिस्पेक्ट दी ला, शुड नाट सी ईदर वन बीइंग मेड़|
(सुना है कि साइलंट मूवी के ज़माने में कुछ बुज़ुर्ग हिंदुस्तानी ऐक्टर लोग डाइलाग की जगह खालिस हिंदुस्तानी-पंजाबी-उर्दू गालियों की कांपिटिशन मनाते थे| वैसे भी आवाज रिकार्ड होती तो थी नहीं, और इन बंदो को और भी जोश आते हुए इन की ऐक्टिंग और भी बढ़िया बनती थी|)
- पंडित गागाभट्ट
16 May 2010 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पंगांशी सहमत!
अगदी लहानपणपासूनच सत्यनारायणाचा शिरा डालडात बनवलेला असला तर चिमूटभर खाऊन चव घेऊन मी आई-बाबांच्या हातात देऊन टाकायचे! घरी बनवलेला शिरा मात्र अजिबात भूक लागलेली नसतानाही दिसला तरी अर्धी वाटीतरी खायचेच... आणि त्याचा प्रचंड आनंद व्हायचा.
आजही मला आवडतं आणि पचतं अशा चवीचं जेवण बसल्या जागी खायला मिळालं तर मला लगेच छान वाटतं! स्वतःला एकटीसाठीच जेवण बनवायचं असेल तर पौष्टीक आणि कमीतकमी वेळात जेवण उरकून, नव्हे उडवून टाकून, इतर आवडीच्या गोष्टी करण्यात जास्त मजा वाटते.
(भडक डोक्याची शाकाहारी आणि तेल-मिरच्या-मसालेद्वेष्टी) अदिती
17 May 2010 - 10:10 am | अश्फाक
माझे स्पश्ट मत आह "होय "
पण थोडे समजुन घ्यावे लागेल.
आपण अन्न खातो ते कोठुन येते त्यावर सर्व अवलंबुन असते,कोठुन म्हनजे
कुठ्ल्या प्रकारच्या कमाइतुन.मेहनतीच्या , कामाच्या मोबदल्याच्या (हलाल) पैश्यांचा अन्न घेतल्यास माणसाला सात्विक विचार येतात.आनि कुनाला फसवुन हक्क हिसकावुन चोरिच्या पैश्यांचे ( हराम ) अन्न असल्यास त्याने बननारा व्यक्ति चांगले क्रुत्य कसे करु शकतो.
आता यात शाकाहार मांसाहार पिझ्झा फळ याने काही फरक पडत नाही.
ता.क.= अती तेथे माती . कुठलिही गोश्ट प्रमाणात जेवल्यास उत्तम.
17 May 2010 - 11:58 am | मी ऋचा
आमच्याकडे आई जेवण झाल्यावर ताटाला नमस्कार करुन
" अन्नदाता पाककर्ता तथा भोक्ता सुखी भव। "
असे म्हणायला लावते, म्हणजे वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाचा अन्नाच्या दर्जावर परिणाम होत असणार हे नक्की! मग फक्त अन्नाचा कस किंवा शाकाहार की मांसाहार यावरुन आपल्या घडणीवर त्याचा कसा प्रभाव पडतो हे सांगणे कठिण आहे...यासगळ्यांचा combined effect लक्षात घेणे इष्ट!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
17 May 2010 - 12:00 pm | वेताळ
त्यामुळे सध्या तुरुंगात राहण्याची फॅशन आली आहे.
वेताळ
17 May 2010 - 12:13 pm | शिल्पा ब
तुमचं कैचा कैच !!! =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
17 May 2010 - 12:15 pm | शैलेन्द्र
लय भारी.
18 May 2010 - 8:55 pm | टिउ
आपण अन्न खातो तसेच बनतो का??
तुम्ही काय खाताय दोन दिवसापासुन?
18 May 2010 - 11:21 pm | शिल्पा ब
या प्रत्युत्तराआधीचे प्रतिसाद वाचा...कदाचित काही कळेलसुद्धा ...बाकी एवढा वेळ हाताशी असताना हेच बरं सुचलं
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/