कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...
जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं
आता मी स्वत:ला सावरतो आहे
अडवून पापण्याआड चिंब आसवाना
मी भावनांचा पसारा आवरतो आहे
कोण जाणे काय झालं होतं मला
एका स्वप्नाने गात्रं भारली होती
उद्याच्या उजेडावर विसंबून मी
अंधारात एक उडी मारली होती
कशावर तरी आदळलो, आणि
जाणवलं, फसलीच आपली उडी
कुठेच दिसत नाही इथे किनारा
भरकटली आहे आपली होडी
भरून आले पाण्याने डोळे, पण
म्हटलं अस खचून जायचं नाही
आयुष्यात अस होतंच राहणार
निराशेचा गुलाम व्हायचं नाही
खेळवीत चेहर्यावर निरागस हसू
मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे
पायात बेड्या पराभवाच्या अन्
नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे
कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या
असंख्य तुफानाना टक्कर देईन मी
असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी
वाचने
3803
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
छान आहे..
सुंदर...
दुर्दम्य आशावाद
खूप छान काव्य सतीश.
सुंदर कविता
In reply to सुंदर कविता by विकास
आवडती..