मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'खास' पुस्तकलेखकांचे अंतरंग

हेमंतकुमार ·

टर्मीनेटर 10/01/2023 - 17:58
लेख आवडला! मराठी-वाङ्मयाच्या इतिहासात असा प्रयोग सर्वप्रथम माझे 'ऑल टाईम फेवरीट' लेखक कै. सुहास शिरवळकर ह्यांनी, साल नक्की नाही आठवत पण मला वाटतं २००० साली दिलीपराज प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकातून केला होता. फलश्रुती. -------------------------------------- लोकप्रिय लेखनाने लोकप्रिय लेखानासंदार्भातली निर्मिती-प्रक्रिया उलगडून दाखवणारं मराठी-वाङ्मयाच्या इतिहासातील पाहिलं पुस्तक --------------------------------------- ह्या पुस्तकातून सुहास शिरवळकरांनी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची/पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया अतिशय सुरेखपणे मांडली आहे.
गेल्या काही वर्षात मला एकाच लेखकाच्या मोठ्या आकाराच्या पुस्तकापेक्षा या प्रकारची पुस्तके अधिक आवडतात.
जेब्बात! मग तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावे अशी आग्रही शिफारस मी करतो. जाता जाता त्यांनी पुस्तकात व्यक्त केलेल्या मनोगतातील एक आणि 'जाई' ह्या त्यांच्या कादंबरी संबंधित त्यांनी मांडलेल्या विचारांबाद्दलचा एक असे दोन उतारे खाली देऊन माझे दोन शब्द संपवतो 😀
फलश्रुती आपल्या हातात एक कादंबरी पडते. ती नवीकोरी आहे, वा जुनी आहे, यापेक्षा, ती वाचलेली नसेल तर आपण आनंदित होतो. आता, आपल्याला नवं काहीतरी वाचायला मिळणार, या उत्साहात आपण ती वाचायला घेतो. वाचत असतानाच, आपलं मन जागोजागी आपली मतं मेंदूकडे नोंदवत असतं. काही ठिकाणी आनंद व्यक्त होतो... काही जागा चकित करणाऱ्या असतात... काही जागांना उत्स्फूर्तपणे दाद दिली जाते... काही वेळा नाराजी व्यक्त होते निषेध, वा संतापही - नोंदवला जातो. आणि या सगळ्या प्रतिक्रियांचं योग्य ते मूल्यमापन करून, कादंबरीच्या अखेरीस, आपला मेंदू निष्कर्ष काढून देतो, तोच आपला अभिप्राय म्हणून आपण जाहीर करतो ! दिनक्रमातले काही तास वेचून, वाचक जेव्हा कादंबरी वाचतो, त्यावेळी, त्यावरील भला / बुरा अभिप्राय नोंदवण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो. परंतु, काही तास वाचनासाठी देऊन, ज्या कादंबरीला आपण एका शब्दात डोक्यावर घेतो, किंवा तिला पायदळी तुडवतो, तिच्या निर्मितीसाठी लेखकाच्याही आयुष्यातला एक कालखंड कायमसाठी भूतकाळात जमा झालेला असतो! आपल्या अभिप्रायाने हा कालखंड सार्थ ठरतो, किंवा निरर्थ ठरतो ! या अर्थाने, प्रतिक्रिया या भावी लेखनासाठी निर्णायक महत्त्वाच्या असतात. मात्र, या विवक्षित कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेत त्या हस्तक्षेप करू शकत नाहीत ! कादंबरी काय, लघुकथा काय, किंवा कविता काय ... कलाकृतीच्या पूर्णत्वामागे, विचाराचं / कल्पनेचं बीज पडणं-ते रुजणं— त्या संदर्भातल्या विस्कळीत विचार-मंथनातूनच एक दिशा सापडणं- या दिशेने ठामपणे विचारांचा प्रवास सुरू होणं- या प्रवासात आकृति- बंधाचे सांगाडे उभे राहाणं... हे सगळं अनिवार्यपणे येतं....
जाई या कादंबरीच्या निमित्ताने मला वाचकांची जी पत्रं आली; आजही येतात, त्यातून काही मुद्दे निश्चितपणे स्पष्ट होतात. एक म्हणजे, आत्मनिवेदन पद्धतीचा मी केलेला अवलंब अतिशय योग्य होता. कारण, 'जाई'च्या शोकांताने व्यथित झालेल्या बऱ्याच सहृदय वाचकांनी ‘जाईला फसवून तुम्ही काय मिळवलं?' असा खडा सवाल मला केला आहे. त्याहीपुढे जाऊन, काहींनी 'परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही ! आयुष्यात तुम्ही कधी सुखी होणार नाही!' असा तळतळून शापही दिला आहे! दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या जीवनातही एक 'जाई' कशी आली होती, याची कबुली काहींनी दिली आहे, तर 'अशी' जाई जीवनात आली, तर तिच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची मानसिक तयारी अनेकांनी मला दाखवली आहे! - हे मी, मला वाचकांची पत्रं कशी येतात, आणि ते माझ्या लेखनावर कसं प्रेम करतात, हे दाखविण्यासाठी सांगत नाहीये. हे वाचक जर समाजाचं काही अंशी प्रतिनिधित्व करीत असतील, तर यातली सर्वांत महत्त्वाची बाब माझ्या मते ही आहे, की 'विवाहबाह्य' संबंधातल्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा जो कलुषित दृष्टिकोण असतो, तो ‘जाई’च्या वाट्याला आलेला नाहीये! 'जाई'ला सर्वांचं प्रेम आणि सहानुभूती प्राप्त आहे; शेखरला फक्त न्याय मिळाला आहे ! हे खूपच आशावादी आहे. एखाद्या अवघड विषयाला हात घालण्यामागचा हेतू लक्षात घेऊन, वाचक त्या लेखनाचं स्वागत करतात, हेच यात सिद्ध झाले आहे. - सुहास शिरवळकर

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 10/01/2023 - 19:06
फलश्रुती.
केवळ सुरेख ! त्या पुस्तकाबद्दल कुतूहल चाळवणारा तुमचा प्रतिसाद खूप आवडला.

Nitin Palkar 10/01/2023 - 19:24
एका वेगळ्याच प्रकारच्या पुस्तकाबद्दल खूप छान माहीती. टर्मिनेटर यांनी लिहिलेला सविस्तर प्रतिसाद देखील खासच.

In reply to by Nitin Palkar

पुर्वी सैन्यात ऐज्युकेशन कोअर हा एक स्वतंत्र विभाग होता,आता नाही.यांची भरती डायरेक्ट हवालदार पदावर होत असे व ते सैनीकांना हिन्दी,मॅप रीडिंग व इंग्रजी शिकवत. याच बरोबर युनिट मधे वाचनालय हा एक अविभाज्य घटक असे.सर्व भाषेतील पुस्तके तीथे मिळणार्‍या एज्युकेशन ग्रांट मधून घेतली जात. इथेच सैन्य इतीहासा बरोबरच प्रेमचंद, श्रीलाल शुक्ल,रामधारी सिह दिनकर अशा अनेक दिग्गज हिन्दी साहीत्यीक, राणू, गुलशन नंदा प्रेम कथाकार,हेराल्ड राॅबिन्स,कुक,अगाथा ख्रिस्ती,वुडहाऊस इत्यादी वाचायला मिळाले. १९८४ हे गाजलेले जाॅर्ज ओवरवेल यांचे पुस्तक इथेच वाचले. मातृभाषेतील पुस्तके काही प्रमाणात होमसिकनेस कमी करण्यास मदत करायची. जुनी पुस्तके रद्दीत परावर्तित करत. त्यातली काही मी ठेवून घ्यायचो. ब्रह्मलिखीत हे हस्तसामुद्रिक विषयावर १९५० मधे लिहीलेले पुस्तक आजही माझ्या संग्रहात आहे. सांगायचा उद्देश, १९४९ साली व्यंकटेश माडगूळकर यांचे गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक ऐंशी मधे वाचनात आले होते. ते मागच्याच वर्षी माझ्या संग्रही दाखल झाले. माडगूळकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपले मनोगत माझ्या लिखाणा मागची कळसुत्रे या शीर्षकात लिहीले ते आता वाचले. जे लिहीलय ते आजही तितकेच लागू पडते. काही खास लेखक,पुस्तके मनात छाप सोडून जातात यात शंकाच नाही.

हेमंतकुमार 11/01/2023 - 11:54
खास अभिप्रायांबद्दल सर्वांना धन्यवाद.!
काही खास लेखक,पुस्तके मनात छाप सोडून जातात
अगदीच. मी कोसला वयाच्या विशीत वाचली तेव्हा अगदी म्हणजे अगदीच भारावून गेलो होतो. पुढे पन्नाशीत दुसऱ्यांदा वाचली तेव्हा 'ठीक आहे' इतपत मत झाले होते. तरीसुद्धा मुळात त्या पुस्तकाने जी छाप मनात सोडली होती ती कायम आहे.

एखादा लेखक गोष्ट लिहिताना किवा कवी कविता लिहिताना, त्याच्या मनात काय काय कल्लोळ उठत असतील आणि ते कागदावर ओतण्यासाठी त्याची कशी धांदल होत असेल असे काय काय मनात येउन गेले. हे पुस्तक मिळवुन वाचले पाहीजे. अवांतर- नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही. कदाचित त्या वातावरणात वाढलेले लोक ते जास्त रिलेट करु शकत असतील. रंगनाथ पठारेंची सातपाटील कुलवृत्तांत उत्सुकतेने विकत घेउन वाचली. पण काही ठिकाणी चर्‍हाट तर काही ठिकाणी रस भरीत अशी काहीतरी भेळ वाटली. वेळ मिळाल्यास लिहिन त्यावर.

हेमंतकुमार 12/01/2023 - 17:50
नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही.
>> अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
“कोसलामुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रातली जीव लावून केलेली महत्त्वाची कामे दुय्यम-तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली. मलाच ती सांगावी लागताहेत हे त्याहून वाईट. कोसलाचे हेही मला डाचते. एवढी शिरजोरी ?”

हेमंतकुमार 12/01/2023 - 17:50
नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही.
>> अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
“कोसलामुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रातली जीव लावून केलेली महत्त्वाची कामे दुय्यम-तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली. मलाच ती सांगावी लागताहेत हे त्याहून वाईट. कोसलाचे हेही मला डाचते. एवढी शिरजोरी ?”

मित्रहो 12/01/2023 - 20:21
तुमच्या लेखाने पुस्तक वाचण्यातली उत्सुकता वाढली. आशा बगे यांच्या कथा वृत्तपत्रात यायच्या तसे वाचत होतो. आता फारसे आठवत नाही. कोसला विशिष्ट हेतुने लिहिली होती असेच वाटते. तरुणपणी वाचली तर त्यातला निराशावाद ती जगण्यातली निरर्थकता भावते. नंतर ते तितके भावत नाही. एक काळ असा होता ज्यात निराशावादी लिखाणाचा ट्रेंड होता.

प्रतिसादाला फारच उशीर झाला. कारण अशाच प्रकारच्या एका पुस्तकाचा उल्लेख मला करायचा होता. पण त्या पुस्तकाचे तपशीलच आठवत नाहीत. गेल्या शतकातील उल्लेखनीय पुस्तकांचा परामर्ष त्यात होता. गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, अरुण साधू, रविंद्र पिंगे असे कुणीतरी मान्यवर त्या पुस्तकाचे संकलक होते. कुणाला आठवत असल्यास लिहितील. असो! एका छान लेखाबद्दल धन्यवाद.

हेमंतकुमार 20/01/2023 - 10:31
१.
एक काळ असा होता ज्यात निराशावादी लिखाणाचा ट्रेंड होता.
खरंय. अगदी १९४५ मधील The Catcher in the Rye या सारखी पाश्चात्य उदा. पण आहेत. .. २.
गेल्या शतकातील उल्लेखनीय पुस्तकांचा परामर्ष
रोचक असावा. बघूया शोधून

हेमंतकुमार 20/01/2023 - 10:35
मूळ लेख लांबलचक होऊ नये म्हणून मी त्यातील काही निवडक लेखांबद्दलच लिहिले. पुस्तकातील अन्य लेखनातले काही वेचक-वेधक: १. लक्ष्मण माने(उपरा) : त्यांनी हे आत्मकथनात्मक पुस्तक अनिल अवचट यांच्या प्रोत्साहनाने व आग्रहामुळे लिहिले. पुस्तक गाजल्यानंतर मानेंवर अशी जाहीर टीका झाली, की “एक कैकाडी इतकं चांगलं पुस्तक कसं लिहू शकतो आणि त्याला एवढे यश कसं काय मिळू शकतं? त्याला ते नक्कीच अनिल अवचट यांनी लिहून दिले असेल”. अर्थात दोन्ही लेखकांनी त्याचे खंडन केले. २. ‘पांगिरा’बद्दल विश्वास पाटील : “या पुस्तकावरून याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. तो मूळ आशयापासून दूर गेलेला आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन्ही माध्यमे बरीच परावलंबी असतात. कादंबरी ही एका आईच्या मांडीवर सानाची थोर होते. मात्र, चित्रपट उद्योगात बाळाला अनेक आयांच्या आणि दायांच्याही अंगाखांद्यावरून प्रवास करावा लागतो”.

हेमंतकुमार 31/01/2023 - 09:11
धन्यवाद. ...... नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. अभिनंदन !

हेमंतकुमार 05/02/2023 - 20:57
ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. त्यांच्यावरील लेख : रंगनाथ पठारे : हा स्वतःसह वाचकांशीही कठोरपणे वागणारा लेखक आहे, तरी वाचकांना तो आवडतो, यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे

टर्मीनेटर 10/01/2023 - 17:58
लेख आवडला! मराठी-वाङ्मयाच्या इतिहासात असा प्रयोग सर्वप्रथम माझे 'ऑल टाईम फेवरीट' लेखक कै. सुहास शिरवळकर ह्यांनी, साल नक्की नाही आठवत पण मला वाटतं २००० साली दिलीपराज प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकातून केला होता. फलश्रुती. -------------------------------------- लोकप्रिय लेखनाने लोकप्रिय लेखानासंदार्भातली निर्मिती-प्रक्रिया उलगडून दाखवणारं मराठी-वाङ्मयाच्या इतिहासातील पाहिलं पुस्तक --------------------------------------- ह्या पुस्तकातून सुहास शिरवळकरांनी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची/पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया अतिशय सुरेखपणे मांडली आहे.
गेल्या काही वर्षात मला एकाच लेखकाच्या मोठ्या आकाराच्या पुस्तकापेक्षा या प्रकारची पुस्तके अधिक आवडतात.
जेब्बात! मग तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावे अशी आग्रही शिफारस मी करतो. जाता जाता त्यांनी पुस्तकात व्यक्त केलेल्या मनोगतातील एक आणि 'जाई' ह्या त्यांच्या कादंबरी संबंधित त्यांनी मांडलेल्या विचारांबाद्दलचा एक असे दोन उतारे खाली देऊन माझे दोन शब्द संपवतो 😀
फलश्रुती आपल्या हातात एक कादंबरी पडते. ती नवीकोरी आहे, वा जुनी आहे, यापेक्षा, ती वाचलेली नसेल तर आपण आनंदित होतो. आता, आपल्याला नवं काहीतरी वाचायला मिळणार, या उत्साहात आपण ती वाचायला घेतो. वाचत असतानाच, आपलं मन जागोजागी आपली मतं मेंदूकडे नोंदवत असतं. काही ठिकाणी आनंद व्यक्त होतो... काही जागा चकित करणाऱ्या असतात... काही जागांना उत्स्फूर्तपणे दाद दिली जाते... काही वेळा नाराजी व्यक्त होते निषेध, वा संतापही - नोंदवला जातो. आणि या सगळ्या प्रतिक्रियांचं योग्य ते मूल्यमापन करून, कादंबरीच्या अखेरीस, आपला मेंदू निष्कर्ष काढून देतो, तोच आपला अभिप्राय म्हणून आपण जाहीर करतो ! दिनक्रमातले काही तास वेचून, वाचक जेव्हा कादंबरी वाचतो, त्यावेळी, त्यावरील भला / बुरा अभिप्राय नोंदवण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो. परंतु, काही तास वाचनासाठी देऊन, ज्या कादंबरीला आपण एका शब्दात डोक्यावर घेतो, किंवा तिला पायदळी तुडवतो, तिच्या निर्मितीसाठी लेखकाच्याही आयुष्यातला एक कालखंड कायमसाठी भूतकाळात जमा झालेला असतो! आपल्या अभिप्रायाने हा कालखंड सार्थ ठरतो, किंवा निरर्थ ठरतो ! या अर्थाने, प्रतिक्रिया या भावी लेखनासाठी निर्णायक महत्त्वाच्या असतात. मात्र, या विवक्षित कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेत त्या हस्तक्षेप करू शकत नाहीत ! कादंबरी काय, लघुकथा काय, किंवा कविता काय ... कलाकृतीच्या पूर्णत्वामागे, विचाराचं / कल्पनेचं बीज पडणं-ते रुजणं— त्या संदर्भातल्या विस्कळीत विचार-मंथनातूनच एक दिशा सापडणं- या दिशेने ठामपणे विचारांचा प्रवास सुरू होणं- या प्रवासात आकृति- बंधाचे सांगाडे उभे राहाणं... हे सगळं अनिवार्यपणे येतं....
जाई या कादंबरीच्या निमित्ताने मला वाचकांची जी पत्रं आली; आजही येतात, त्यातून काही मुद्दे निश्चितपणे स्पष्ट होतात. एक म्हणजे, आत्मनिवेदन पद्धतीचा मी केलेला अवलंब अतिशय योग्य होता. कारण, 'जाई'च्या शोकांताने व्यथित झालेल्या बऱ्याच सहृदय वाचकांनी ‘जाईला फसवून तुम्ही काय मिळवलं?' असा खडा सवाल मला केला आहे. त्याहीपुढे जाऊन, काहींनी 'परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही ! आयुष्यात तुम्ही कधी सुखी होणार नाही!' असा तळतळून शापही दिला आहे! दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या जीवनातही एक 'जाई' कशी आली होती, याची कबुली काहींनी दिली आहे, तर 'अशी' जाई जीवनात आली, तर तिच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची मानसिक तयारी अनेकांनी मला दाखवली आहे! - हे मी, मला वाचकांची पत्रं कशी येतात, आणि ते माझ्या लेखनावर कसं प्रेम करतात, हे दाखविण्यासाठी सांगत नाहीये. हे वाचक जर समाजाचं काही अंशी प्रतिनिधित्व करीत असतील, तर यातली सर्वांत महत्त्वाची बाब माझ्या मते ही आहे, की 'विवाहबाह्य' संबंधातल्या स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा जो कलुषित दृष्टिकोण असतो, तो ‘जाई’च्या वाट्याला आलेला नाहीये! 'जाई'ला सर्वांचं प्रेम आणि सहानुभूती प्राप्त आहे; शेखरला फक्त न्याय मिळाला आहे ! हे खूपच आशावादी आहे. एखाद्या अवघड विषयाला हात घालण्यामागचा हेतू लक्षात घेऊन, वाचक त्या लेखनाचं स्वागत करतात, हेच यात सिद्ध झाले आहे. - सुहास शिरवळकर

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 10/01/2023 - 19:06
फलश्रुती.
केवळ सुरेख ! त्या पुस्तकाबद्दल कुतूहल चाळवणारा तुमचा प्रतिसाद खूप आवडला.

Nitin Palkar 10/01/2023 - 19:24
एका वेगळ्याच प्रकारच्या पुस्तकाबद्दल खूप छान माहीती. टर्मिनेटर यांनी लिहिलेला सविस्तर प्रतिसाद देखील खासच.

In reply to by Nitin Palkar

पुर्वी सैन्यात ऐज्युकेशन कोअर हा एक स्वतंत्र विभाग होता,आता नाही.यांची भरती डायरेक्ट हवालदार पदावर होत असे व ते सैनीकांना हिन्दी,मॅप रीडिंग व इंग्रजी शिकवत. याच बरोबर युनिट मधे वाचनालय हा एक अविभाज्य घटक असे.सर्व भाषेतील पुस्तके तीथे मिळणार्‍या एज्युकेशन ग्रांट मधून घेतली जात. इथेच सैन्य इतीहासा बरोबरच प्रेमचंद, श्रीलाल शुक्ल,रामधारी सिह दिनकर अशा अनेक दिग्गज हिन्दी साहीत्यीक, राणू, गुलशन नंदा प्रेम कथाकार,हेराल्ड राॅबिन्स,कुक,अगाथा ख्रिस्ती,वुडहाऊस इत्यादी वाचायला मिळाले. १९८४ हे गाजलेले जाॅर्ज ओवरवेल यांचे पुस्तक इथेच वाचले. मातृभाषेतील पुस्तके काही प्रमाणात होमसिकनेस कमी करण्यास मदत करायची. जुनी पुस्तके रद्दीत परावर्तित करत. त्यातली काही मी ठेवून घ्यायचो. ब्रह्मलिखीत हे हस्तसामुद्रिक विषयावर १९५० मधे लिहीलेले पुस्तक आजही माझ्या संग्रहात आहे. सांगायचा उद्देश, १९४९ साली व्यंकटेश माडगूळकर यांचे गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक ऐंशी मधे वाचनात आले होते. ते मागच्याच वर्षी माझ्या संग्रही दाखल झाले. माडगूळकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपले मनोगत माझ्या लिखाणा मागची कळसुत्रे या शीर्षकात लिहीले ते आता वाचले. जे लिहीलय ते आजही तितकेच लागू पडते. काही खास लेखक,पुस्तके मनात छाप सोडून जातात यात शंकाच नाही.

हेमंतकुमार 11/01/2023 - 11:54
खास अभिप्रायांबद्दल सर्वांना धन्यवाद.!
काही खास लेखक,पुस्तके मनात छाप सोडून जातात
अगदीच. मी कोसला वयाच्या विशीत वाचली तेव्हा अगदी म्हणजे अगदीच भारावून गेलो होतो. पुढे पन्नाशीत दुसऱ्यांदा वाचली तेव्हा 'ठीक आहे' इतपत मत झाले होते. तरीसुद्धा मुळात त्या पुस्तकाने जी छाप मनात सोडली होती ती कायम आहे.

एखादा लेखक गोष्ट लिहिताना किवा कवी कविता लिहिताना, त्याच्या मनात काय काय कल्लोळ उठत असतील आणि ते कागदावर ओतण्यासाठी त्याची कशी धांदल होत असेल असे काय काय मनात येउन गेले. हे पुस्तक मिळवुन वाचले पाहीजे. अवांतर- नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही. कदाचित त्या वातावरणात वाढलेले लोक ते जास्त रिलेट करु शकत असतील. रंगनाथ पठारेंची सातपाटील कुलवृत्तांत उत्सुकतेने विकत घेउन वाचली. पण काही ठिकाणी चर्‍हाट तर काही ठिकाणी रस भरीत अशी काहीतरी भेळ वाटली. वेळ मिळाल्यास लिहिन त्यावर.

हेमंतकुमार 12/01/2023 - 17:50
नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही.
>> अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
“कोसलामुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रातली जीव लावून केलेली महत्त्वाची कामे दुय्यम-तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली. मलाच ती सांगावी लागताहेत हे त्याहून वाईट. कोसलाचे हेही मला डाचते. एवढी शिरजोरी ?”

हेमंतकुमार 12/01/2023 - 17:50
नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही.
>> अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
“कोसलामुळे माझी दुसरी कितीएक क्षेत्रातली जीव लावून केलेली महत्त्वाची कामे दुय्यम-तिय्यम आणि काही तर किरकोळ समजली गेली. मलाच ती सांगावी लागताहेत हे त्याहून वाईट. कोसलाचे हेही मला डाचते. एवढी शिरजोरी ?”

मित्रहो 12/01/2023 - 20:21
तुमच्या लेखाने पुस्तक वाचण्यातली उत्सुकता वाढली. आशा बगे यांच्या कथा वृत्तपत्रात यायच्या तसे वाचत होतो. आता फारसे आठवत नाही. कोसला विशिष्ट हेतुने लिहिली होती असेच वाटते. तरुणपणी वाचली तर त्यातला निराशावाद ती जगण्यातली निरर्थकता भावते. नंतर ते तितके भावत नाही. एक काळ असा होता ज्यात निराशावादी लिखाणाचा ट्रेंड होता.

प्रतिसादाला फारच उशीर झाला. कारण अशाच प्रकारच्या एका पुस्तकाचा उल्लेख मला करायचा होता. पण त्या पुस्तकाचे तपशीलच आठवत नाहीत. गेल्या शतकातील उल्लेखनीय पुस्तकांचा परामर्ष त्यात होता. गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, अरुण साधू, रविंद्र पिंगे असे कुणीतरी मान्यवर त्या पुस्तकाचे संकलक होते. कुणाला आठवत असल्यास लिहितील. असो! एका छान लेखाबद्दल धन्यवाद.

हेमंतकुमार 20/01/2023 - 10:31
१.
एक काळ असा होता ज्यात निराशावादी लिखाणाचा ट्रेंड होता.
खरंय. अगदी १९४५ मधील The Catcher in the Rye या सारखी पाश्चात्य उदा. पण आहेत. .. २.
गेल्या शतकातील उल्लेखनीय पुस्तकांचा परामर्ष
रोचक असावा. बघूया शोधून

हेमंतकुमार 20/01/2023 - 10:35
मूळ लेख लांबलचक होऊ नये म्हणून मी त्यातील काही निवडक लेखांबद्दलच लिहिले. पुस्तकातील अन्य लेखनातले काही वेचक-वेधक: १. लक्ष्मण माने(उपरा) : त्यांनी हे आत्मकथनात्मक पुस्तक अनिल अवचट यांच्या प्रोत्साहनाने व आग्रहामुळे लिहिले. पुस्तक गाजल्यानंतर मानेंवर अशी जाहीर टीका झाली, की “एक कैकाडी इतकं चांगलं पुस्तक कसं लिहू शकतो आणि त्याला एवढे यश कसं काय मिळू शकतं? त्याला ते नक्कीच अनिल अवचट यांनी लिहून दिले असेल”. अर्थात दोन्ही लेखकांनी त्याचे खंडन केले. २. ‘पांगिरा’बद्दल विश्वास पाटील : “या पुस्तकावरून याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. तो मूळ आशयापासून दूर गेलेला आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन्ही माध्यमे बरीच परावलंबी असतात. कादंबरी ही एका आईच्या मांडीवर सानाची थोर होते. मात्र, चित्रपट उद्योगात बाळाला अनेक आयांच्या आणि दायांच्याही अंगाखांद्यावरून प्रवास करावा लागतो”.

हेमंतकुमार 31/01/2023 - 09:11
धन्यवाद. ...... नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. अभिनंदन !

हेमंतकुमार 05/02/2023 - 20:57
ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. त्यांच्यावरील लेख : रंगनाथ पठारे : हा स्वतःसह वाचकांशीही कठोरपणे वागणारा लेखक आहे, तरी वाचकांना तो आवडतो, यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे
गेल्या साठ वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे आणि संकीर्ण अशा साहित्यप्रकारांचा समावेश आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके काही वाचकांना आवडली व भावली. त्यातली काही खऱ्या अर्थाने गाजली, काही गाजवली गेली तर अन्य काही दुर्लक्षित राहिली. या कालखंडात अनेक लेखकांनी सातत्याने लेखन केले. त्यापैकी काही लेखक खरोखर वाचकप्रिय झाले. अशा लेखकांच्या काही पुस्तकांनी एक साहित्यिक मानदंड निर्माण केला.

पुस्तक परिचय: कोल्हाट्याचं पोर - लेखक: किशोर काळे

सुजित जाधव ·

Bhakti 10/01/2023 - 08:26
छान परिचय! मराठी भाषेतील एक गाजलेले पुस्तक आहे.अनेकदा यांचा परिचय वाचला आहे. दुर्दैवाने लेखक किशोर काळे अपघाती मृत्यू झाला हे जेव्हा वाचलं,वाईट वाटलं.

सुबोध खरे 10/01/2023 - 10:48
हे पुस्तक मी खूप अगोदर वाचलेले आहे.( माझ्या संग्रही आहे). यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कनिष्ठ आर्थिक वर्गात जेंव्हा जेंव्हा बाप कुटुंबाला आधार देत नाही तेथे मुलांचे आयुष्य अत्यंत कष्टाचे जाते. डॉ किशोर काळे यांनी लिहिलेले आहे त्या कोल्हाटी समाजात तर पुरुष ऐदी स्वार्थी आणि अत्यंत नालायक असेच आढळतात. स्वतःच्या ऐदीपणासाठी आपल्या बायकोला मुलीला धंद्याला लावायला त्यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही. त्यातून बायकोला मुलगी झाली तर आपल्या म्हातारपणाची सोय झाली असेच ते समजतात. याउलट मुलगा जन्माला आला तर त्याच्यावर पैसे खर्च करायला लागतो म्हणून ते मुलांचा दुःस्वासच करताना आढळतात. या समाजातून स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईटच आहे. देहाच्या आड मन असेल हा विचार सुद्धा त्यांच्या पुरुषांच्या मनात येत नाही. बहुसंख्य अनुसूचित/ भटक्या जमातीत जात पंचायतीत सुद्धा पुरुष दारू आणि मटणासाठी सहज विकले जातात असेच बहुतेक साहित्यात आढळते. त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळतच नाही. जितका समाज गरीब आणि अज्ञानी तितकी त्यातील स्त्रियांची स्थिती हलाखीची अशी स्थिती आहे. गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर. डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या स्वतःच्या लेखनातून जाणवते. दुर्दैवाने त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर सुद्धा त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वादंग झाले असे वाचल्याचे आठवते.

In reply to by सुबोध खरे

Trump 10/01/2023 - 12:41
गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.
पुर्णपणे चुकीचे. गरीबीतुन पुढे आलेली कितीतरी लोक स्वतःच्या पायावर उभे राहुन कणखर असतात. -- मुर्दाडचा अर्थ येथे दिलेला आहे. : https://मराठी.भारत/मराठी/शब्द/मुर्दाड/

पुस्तक परीचय आवडला असे कसे म्हणु? माणुस स्वर्थापोटी काय काय करेल याचा नेम नाही. परंतु परीचय वाचुन पुस्तक वाचायची उत्सुकता चळवली गेली आहे ईतके मात्र म्हणेन.

Bhakti 10/01/2023 - 08:26
छान परिचय! मराठी भाषेतील एक गाजलेले पुस्तक आहे.अनेकदा यांचा परिचय वाचला आहे. दुर्दैवाने लेखक किशोर काळे अपघाती मृत्यू झाला हे जेव्हा वाचलं,वाईट वाटलं.

सुबोध खरे 10/01/2023 - 10:48
हे पुस्तक मी खूप अगोदर वाचलेले आहे.( माझ्या संग्रही आहे). यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे कनिष्ठ आर्थिक वर्गात जेंव्हा जेंव्हा बाप कुटुंबाला आधार देत नाही तेथे मुलांचे आयुष्य अत्यंत कष्टाचे जाते. डॉ किशोर काळे यांनी लिहिलेले आहे त्या कोल्हाटी समाजात तर पुरुष ऐदी स्वार्थी आणि अत्यंत नालायक असेच आढळतात. स्वतःच्या ऐदीपणासाठी आपल्या बायकोला मुलीला धंद्याला लावायला त्यांना जरा सुद्धा लाज वाटत नाही. त्यातून बायकोला मुलगी झाली तर आपल्या म्हातारपणाची सोय झाली असेच ते समजतात. याउलट मुलगा जन्माला आला तर त्याच्यावर पैसे खर्च करायला लागतो म्हणून ते मुलांचा दुःस्वासच करताना आढळतात. या समाजातून स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईटच आहे. देहाच्या आड मन असेल हा विचार सुद्धा त्यांच्या पुरुषांच्या मनात येत नाही. बहुसंख्य अनुसूचित/ भटक्या जमातीत जात पंचायतीत सुद्धा पुरुष दारू आणि मटणासाठी सहज विकले जातात असेच बहुतेक साहित्यात आढळते. त्यामुळे स्त्रियांना न्याय मिळतच नाही. जितका समाज गरीब आणि अज्ञानी तितकी त्यातील स्त्रियांची स्थिती हलाखीची अशी स्थिती आहे. गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर. डॉ किशोर काळे हे अत्यंत लाचार आणि कशालाही विरोध न करू शकणारे असे व्यक्तिमत्व होते हे त्यांच्या स्वतःच्या लेखनातून जाणवते. दुर्दैवाने त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर सुद्धा त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत वादंग झाले असे वाचल्याचे आठवते.

In reply to by सुबोध खरे

Trump 10/01/2023 - 12:41
गरिबीमुळे माणूस एकतर लाचार होतो किंवा मुर्दाड _ श्री व्यंकटेश माडगूळकर.
पुर्णपणे चुकीचे. गरीबीतुन पुढे आलेली कितीतरी लोक स्वतःच्या पायावर उभे राहुन कणखर असतात. -- मुर्दाडचा अर्थ येथे दिलेला आहे. : https://मराठी.भारत/मराठी/शब्द/मुर्दाड/

पुस्तक परीचय आवडला असे कसे म्हणु? माणुस स्वर्थापोटी काय काय करेल याचा नेम नाही. परंतु परीचय वाचुन पुस्तक वाचायची उत्सुकता चळवली गेली आहे ईतके मात्र म्हणेन.
मागच्या वर्षी वाचनालयात पुस्तक शोधत असताना माझ्या हाती किशोर शांताबाईं काळे यांचं कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक लागलं. पुस्तकाच्या मलपृष्टावरील ओळी वाचल्यानंतर दुःख झालं आणि किशोर काळे व त्यांच्या आईबद्दल मनात उत्सुकता निर्माण झाली. त्याच दिवशी हे पुस्तक मी घरी नेलं आणि एका बैठकीत मी ते वाचून काढलं होत.. काही दिवसांपूर्वी मी ते दुसऱ्यांदा वाचलं आणि त्याबद्दल लिहण्याचा मोह आवरला नाही… कथेची सुरुवात होते जिजीपासून.. जिजींच खर नाव ताराबाई, त्यांचा जन्म साळी समाजात होतो. जिजींची आई लक्ष्मीबाई व वडील महादेव सोलापूरला राहत असतात. महादेव हा थोडा वेडसर असतो.

पुस्तक परिचय: लॉक ग्रिफिन --लेखक -वसंत वसंत लिमये

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 01/12/2022 - 18:44
भारीच, पुस्तक आणि लेखक अर्थातच माहिती आहेत पण अजुन वाचायचा योग आला नाही. वसंत वसंत लिमये यांचे 'विश्वस्त' हेसुद्धा प्रसिद्ध आणि रंजक पुस्तक आहे. त्यांची लिहायची धाटणी बरीच पाश्चात्य लेखकांप्रमाणे आहे. मोठे मुख्य कथानक, त्यात उपकथानके, हे सर्व बर्याच शहरात, देशात वगैरे आणि जोडीला सस्पेन्स, थ्रीलर. मला अशी पुस्तके खूपच आवडतात. तुमच्या सुंदर परिक्षणाने आता उत्सुकता चाळवली आहे. लवकरच हे पुस्तक वाचेन.

मनो 04/12/2022 - 00:20
२०२० डिसेंबर महिन्यात माझ्या पुस्तक प्रकाशन समारंभात लिमये भेटले होते, नाव अर्थातच लक्षात राहणारे असल्याने माझ्या आठवणीत राहिले आहे. ते पुण्यातच असतात.

प्रचेतस 09/12/2022 - 12:44
उत्तम परीचय. हे पुस्तक वाचायला हवे. लिमये यांचे विश्वस्त वाचले होते, संग्रही आहेच पण अत्यंत रटाळ पुस्तक वाटले. बाकी ग्रीफिन म्हणजे सिंहाचे शरीर आणि गरुडाचे डोके आणि पंख असलेला काल्पनिक ग्रीक पशू. नाशिक लेण्यात ग्रीफिन शिल्पे आढळतात.

MipaPremiYogesh 12/12/2022 - 14:57
मस्तच परिचय लिहिला आहे राजेंद्र. मला पण वाचायचे आहे हे पुस्तक. विश्वस्त पण वाचायचे आहे..

सौंदाळा 01/12/2022 - 18:44
भारीच, पुस्तक आणि लेखक अर्थातच माहिती आहेत पण अजुन वाचायचा योग आला नाही. वसंत वसंत लिमये यांचे 'विश्वस्त' हेसुद्धा प्रसिद्ध आणि रंजक पुस्तक आहे. त्यांची लिहायची धाटणी बरीच पाश्चात्य लेखकांप्रमाणे आहे. मोठे मुख्य कथानक, त्यात उपकथानके, हे सर्व बर्याच शहरात, देशात वगैरे आणि जोडीला सस्पेन्स, थ्रीलर. मला अशी पुस्तके खूपच आवडतात. तुमच्या सुंदर परिक्षणाने आता उत्सुकता चाळवली आहे. लवकरच हे पुस्तक वाचेन.

मनो 04/12/2022 - 00:20
२०२० डिसेंबर महिन्यात माझ्या पुस्तक प्रकाशन समारंभात लिमये भेटले होते, नाव अर्थातच लक्षात राहणारे असल्याने माझ्या आठवणीत राहिले आहे. ते पुण्यातच असतात.

प्रचेतस 09/12/2022 - 12:44
उत्तम परीचय. हे पुस्तक वाचायला हवे. लिमये यांचे विश्वस्त वाचले होते, संग्रही आहेच पण अत्यंत रटाळ पुस्तक वाटले. बाकी ग्रीफिन म्हणजे सिंहाचे शरीर आणि गरुडाचे डोके आणि पंख असलेला काल्पनिक ग्रीक पशू. नाशिक लेण्यात ग्रीफिन शिल्पे आढळतात.

MipaPremiYogesh 12/12/2022 - 14:57
मस्तच परिचय लिहिला आहे राजेंद्र. मला पण वाचायचे आहे हे पुस्तक. विश्वस्त पण वाचायचे आहे..
नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक हाती आले आणि अतिशय रंजक असल्याने आठवड्याभरात वाचूनही झाले. त्याचीच ही ओळख. पुस्तकाचे लेखक वसंत लिमये हे माझ्यामते काही पेशाने लेखक नव्हेत. ते आय आय टी मुंबईचे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत आणि पुण्यात हाय प्लेसेस नावाची ट्रेकिंग संदर्भातील एक कंपनी चालवतात. ताम्हिणी घाटात गरुड माची नावाची कॅम्प साईटही त्यांनी बनवली आहे जिथे कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे दिली जातात.

शरत्काल

नूतन ·

प्रचेतस 18/11/2022 - 17:27
काय सुरेख लिहिलंय. वाल्मिकी रामायणातही शरद ऋतूचे सुरेख वर्णन आले आहे. जलं प्रसन्नं कुमुदं प्रभासं क्रौञ्चस्वनः शालिवनं विपक्वम् । मदुश्च वायुर्विमलश्च चंद्रः शंसंति वर्षव्यपनीतकालम् ॥ सगळीकडे जलाने प्रसन्न झाले आहे, कमळे फुलली आहेत, क्रौंच पक्षी बोलू लागतात , फळे, फुले पक्व झाली आहेत, वायु मंदगतीने वाहू लागला असून चंद्र अत्यंत स्वच्छ दिसत आहे. वर्षाकाल समाप्त झाला असून शरत्कालाचे आगमन होत आहे. बालेंद्रगोपांतरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन । गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥ लहान लहान इंद्रगोपांनी चित्रित झालेल्या आणि गवतरुपी हिरवी चादर पांघरलेली ही भूमी मध्ये मध्ये लाखेच्या रंगाने रंगवलेल्या स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त करत आहे. तर ऋतुसंहारात कालिदास म्हणतो, प्रभिन्नवैदूर्यनिमंस्तृणाङत्कुरः समाचिता प्रोत्थितकन्दलीदलैः । विभाति शुक्लेतररत्नभूषिता वराङ्गनेव क्षितिरिन्द्रगोपकः || वैदूर्यासारख्या तृणाना फुटलेल्या अंकुरांनी ही भूमी भरून गेली आहे, कर्दळीला पाने फुटू लागली आहेत, इंद्रागोपांनी भरलेली ही भूमी जणू रत्नांनी विभूषित झालेल्या सुंदरीसारखी शोभून दिसत आहे. पहा तरी किती समानता आहे ह्या दोन्ही श्लोकांत, साहजिकच कालिदासावर वाल्मिकी रामायणाचा प्रभाव होता हे उघड दिसते. अर्थात कालिदासाच्या काव्यात उपमांचा पुरेपुर वापर आढळतो तर वाल्मीकीरामायणातील वर्णन अधिक प्रासादिक आणि सुमधूर भासते.

In reply to by प्रचेतस

नूतन 19/11/2022 - 10:53
माझ्या अभ्यासाप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा आहे.... हिरव्यागार, ताज्या (नवीन) गवत कुरणावरती, लालबुंद अशा इंद्रगोप अर्थात कुंकवाच्या किड्यांनी सुंदर नक्षी काढली आहे. गात्रा म्हणजे पृथ्वीचे हे रूप जणू पोपटांच्या हिरव्या-लाल रंगसंगतीशी साधर्म्य असणारी,लाखेसारख्या लाल ठिपक्यांनी भूषित अशी हिरवीगार साडी परिधान केलेली कुणी ललनाच!

In reply to by नूतन

प्रचेतस 19/11/2022 - 11:04
बालेन्द्रगोपांतरचित्रितेन म्हणजे इंद्रगोप किड्यांनी काढलेली नक्षी असा न घेता लाल इंद्रगोप किडे हेच हिरव्या तृणांवर नक्षीसारखे दिसत आहेत असा अर्थ घेता येतो असे वाटते. अर्थात अर्थ भिन्न असू शकतो.

नूतन 18/11/2022 - 18:06
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशा प्रतिसादाबद्दल विशेष धन्यवाद. खूप सुंदर वाटलं वाचताना.

Bhakti 18/11/2022 - 18:10
सुंदर वर्णन! यानिमित्ताने हा लेख आठवला.त्यातही संदर्भासाठी वापरलेला लेख सुंदर आहे.

प्रचेतस 18/11/2022 - 18:41
महाभारत हा महाग्रंथ ऋतूंच्या वर्णनासाठी विख्यात नाही मात्र हरिवंशात शरद ऋतूचे अतिशय रसाळ वर्णन आले आहे. तं शरत्‍कुसुमापीडा: परिवार्य प्रदक्षिणम्। गावो गिरिवरं सर्वास्‍ततो यान्‍तु पुनर्व्रजम्।। प्राप्‍ता किलेयं हि गवां स्‍वादुतोयतृणा गुणै:। शरत् प्रमुदिता रम्‍या गतमेघजलाशया:।। प्रियकै: पुष्पितैर्गौरं श्‍यामं बाणासनै: क्‍वचित्। कठोरतृणमाभाति निर्मयूररुतं वनम्।। विजला विमला व्‍योम्नि विबलाका विविद्युत:। विवर्धन्‍ते जलधरा विदन्‍ता इव कुंजरा:।। पटुना मेघवातेन नवतोयानुकर्षिणा। पर्णोत्‍करघना: सर्वे प्रसादं यान्ति पादपा:।। सितवर्णाम्‍बुदोष्‍णीषं हंसचामर‍वीजितम्। पूर्णचन्‍द्रामलच्‍छत्रं साभिषेकमिवाम्‍बरम्।। हंसै: प्रहसितानीव समुत्‍कृष्‍टानि सारसै:। सर्वाणि तनुतां यान्ति जलानि जलदक्षये।। चक्रवाकस्‍तनतटा: पुलिनश्रोणिमण्‍डला:। हंसलक्षण‍हासिन्‍य: पतिं यान्ति समुद्रगा:।। शरद ऋतूंत फुलणाऱ्या पुष्पांच्या माला घालून, सर्व गाईकडून या पर्वतश्रेष्ठाभोवती प्रदक्षिणा करवून पुनः त्यांस व्रजामध्यें परत आणा. गाईंना मधुर तृण व जल देणारा रमणीय व प्रमुदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे. हा ऋतु लागला म्हणजे मेघ कमी होत जाऊन जलाशयांतील पाणी आटू लागते. सध्या हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुष्पांनी गौरवर्ण दिसत आहे. परंतु त्यांत कोठें कोठें बाणासनाच्या पुष्पांमुळे कृष्ण वर्णाची छटा दिसत आहे. आता या वनांतील गवत जून झाले असून, मोरांचा शब्द देखील कोठें ऐकू येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशेषच दिसत आहे. भग्नदंत कुंजरांप्रमाणे आकाशांतील मेघ विद्युतरहित व जलशून्य झाल्याने स्वच्छ दिसत आहेत व नवीन उदक आकर्षण करून घेणारे मेघ गडगडत आहेत. सर्व वृक्षांना नवी व घनदाट पालवी आलेली असल्यामुळे ते प्रसन्न दिसत आहेत. शुभ्रवर्ण मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामरें व पूर्णचंद्ररूपी निर्मळ छत्र, यांनीं हें अंबर सुशोभित झालेले असल्याकारणाने, ते नूतन अभिषिक्त राजाप्रमाणें शोभत आहे. पाऊसकाळ संपत आला असल्यामुळे, त्याबरोबर तळीं वगैरे जलाशय देखील रोडावत चालले आहेत असें वाटते. हे कृश होत चाललेले जलाशय पाहून हंस व सारस हे देखील नाके मुरडीत आहेत. चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडल व हंसरूपी हास्य यांनी युक्त असलेल्या नद्या आपल्या समुद्ररूपी पतीच्या भेटीस चालल्या आहेत असा भास होत आहे.

संस्कृती आणी माझा छत्तीस चा आकडा असल्याने काही गोष्टी वाचायच्या आहेत पण हिम्मत होत नाही. असे अनुवाद वाचले म्हणजे कळते की शाळेत असताना आभ्यास केला असता तर आपल्यालाही या सर्वांचा अस्वाद घेता आला असता. प्रचेतस यांचे प्रतिसाद व स्पष्टीकरण म्हणजे "सोने पे सुहागा ". लिहीत रहा नक्कीच वाचू.

प्रचेतस 18/11/2022 - 17:27
काय सुरेख लिहिलंय. वाल्मिकी रामायणातही शरद ऋतूचे सुरेख वर्णन आले आहे. जलं प्रसन्नं कुमुदं प्रभासं क्रौञ्चस्वनः शालिवनं विपक्वम् । मदुश्च वायुर्विमलश्च चंद्रः शंसंति वर्षव्यपनीतकालम् ॥ सगळीकडे जलाने प्रसन्न झाले आहे, कमळे फुलली आहेत, क्रौंच पक्षी बोलू लागतात , फळे, फुले पक्व झाली आहेत, वायु मंदगतीने वाहू लागला असून चंद्र अत्यंत स्वच्छ दिसत आहे. वर्षाकाल समाप्त झाला असून शरत्कालाचे आगमन होत आहे. बालेंद्रगोपांतरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन । गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥ लहान लहान इंद्रगोपांनी चित्रित झालेल्या आणि गवतरुपी हिरवी चादर पांघरलेली ही भूमी मध्ये मध्ये लाखेच्या रंगाने रंगवलेल्या स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त करत आहे. तर ऋतुसंहारात कालिदास म्हणतो, प्रभिन्नवैदूर्यनिमंस्तृणाङत्कुरः समाचिता प्रोत्थितकन्दलीदलैः । विभाति शुक्लेतररत्नभूषिता वराङ्गनेव क्षितिरिन्द्रगोपकः || वैदूर्यासारख्या तृणाना फुटलेल्या अंकुरांनी ही भूमी भरून गेली आहे, कर्दळीला पाने फुटू लागली आहेत, इंद्रागोपांनी भरलेली ही भूमी जणू रत्नांनी विभूषित झालेल्या सुंदरीसारखी शोभून दिसत आहे. पहा तरी किती समानता आहे ह्या दोन्ही श्लोकांत, साहजिकच कालिदासावर वाल्मिकी रामायणाचा प्रभाव होता हे उघड दिसते. अर्थात कालिदासाच्या काव्यात उपमांचा पुरेपुर वापर आढळतो तर वाल्मीकीरामायणातील वर्णन अधिक प्रासादिक आणि सुमधूर भासते.

In reply to by प्रचेतस

नूतन 19/11/2022 - 10:53
माझ्या अभ्यासाप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा आहे.... हिरव्यागार, ताज्या (नवीन) गवत कुरणावरती, लालबुंद अशा इंद्रगोप अर्थात कुंकवाच्या किड्यांनी सुंदर नक्षी काढली आहे. गात्रा म्हणजे पृथ्वीचे हे रूप जणू पोपटांच्या हिरव्या-लाल रंगसंगतीशी साधर्म्य असणारी,लाखेसारख्या लाल ठिपक्यांनी भूषित अशी हिरवीगार साडी परिधान केलेली कुणी ललनाच!

In reply to by नूतन

प्रचेतस 19/11/2022 - 11:04
बालेन्द्रगोपांतरचित्रितेन म्हणजे इंद्रगोप किड्यांनी काढलेली नक्षी असा न घेता लाल इंद्रगोप किडे हेच हिरव्या तृणांवर नक्षीसारखे दिसत आहेत असा अर्थ घेता येतो असे वाटते. अर्थात अर्थ भिन्न असू शकतो.

नूतन 18/11/2022 - 18:06
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशा प्रतिसादाबद्दल विशेष धन्यवाद. खूप सुंदर वाटलं वाचताना.

Bhakti 18/11/2022 - 18:10
सुंदर वर्णन! यानिमित्ताने हा लेख आठवला.त्यातही संदर्भासाठी वापरलेला लेख सुंदर आहे.

प्रचेतस 18/11/2022 - 18:41
महाभारत हा महाग्रंथ ऋतूंच्या वर्णनासाठी विख्यात नाही मात्र हरिवंशात शरद ऋतूचे अतिशय रसाळ वर्णन आले आहे. तं शरत्‍कुसुमापीडा: परिवार्य प्रदक्षिणम्। गावो गिरिवरं सर्वास्‍ततो यान्‍तु पुनर्व्रजम्।। प्राप्‍ता किलेयं हि गवां स्‍वादुतोयतृणा गुणै:। शरत् प्रमुदिता रम्‍या गतमेघजलाशया:।। प्रियकै: पुष्पितैर्गौरं श्‍यामं बाणासनै: क्‍वचित्। कठोरतृणमाभाति निर्मयूररुतं वनम्।। विजला विमला व्‍योम्नि विबलाका विविद्युत:। विवर्धन्‍ते जलधरा विदन्‍ता इव कुंजरा:।। पटुना मेघवातेन नवतोयानुकर्षिणा। पर्णोत्‍करघना: सर्वे प्रसादं यान्ति पादपा:।। सितवर्णाम्‍बुदोष्‍णीषं हंसचामर‍वीजितम्। पूर्णचन्‍द्रामलच्‍छत्रं साभिषेकमिवाम्‍बरम्।। हंसै: प्रहसितानीव समुत्‍कृष्‍टानि सारसै:। सर्वाणि तनुतां यान्ति जलानि जलदक्षये।। चक्रवाकस्‍तनतटा: पुलिनश्रोणिमण्‍डला:। हंसलक्षण‍हासिन्‍य: पतिं यान्ति समुद्रगा:।। शरद ऋतूंत फुलणाऱ्या पुष्पांच्या माला घालून, सर्व गाईकडून या पर्वतश्रेष्ठाभोवती प्रदक्षिणा करवून पुनः त्यांस व्रजामध्यें परत आणा. गाईंना मधुर तृण व जल देणारा रमणीय व प्रमुदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे. हा ऋतु लागला म्हणजे मेघ कमी होत जाऊन जलाशयांतील पाणी आटू लागते. सध्या हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुष्पांनी गौरवर्ण दिसत आहे. परंतु त्यांत कोठें कोठें बाणासनाच्या पुष्पांमुळे कृष्ण वर्णाची छटा दिसत आहे. आता या वनांतील गवत जून झाले असून, मोरांचा शब्द देखील कोठें ऐकू येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशेषच दिसत आहे. भग्नदंत कुंजरांप्रमाणे आकाशांतील मेघ विद्युतरहित व जलशून्य झाल्याने स्वच्छ दिसत आहेत व नवीन उदक आकर्षण करून घेणारे मेघ गडगडत आहेत. सर्व वृक्षांना नवी व घनदाट पालवी आलेली असल्यामुळे ते प्रसन्न दिसत आहेत. शुभ्रवर्ण मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामरें व पूर्णचंद्ररूपी निर्मळ छत्र, यांनीं हें अंबर सुशोभित झालेले असल्याकारणाने, ते नूतन अभिषिक्त राजाप्रमाणें शोभत आहे. पाऊसकाळ संपत आला असल्यामुळे, त्याबरोबर तळीं वगैरे जलाशय देखील रोडावत चालले आहेत असें वाटते. हे कृश होत चाललेले जलाशय पाहून हंस व सारस हे देखील नाके मुरडीत आहेत. चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडल व हंसरूपी हास्य यांनी युक्त असलेल्या नद्या आपल्या समुद्ररूपी पतीच्या भेटीस चालल्या आहेत असा भास होत आहे.

संस्कृती आणी माझा छत्तीस चा आकडा असल्याने काही गोष्टी वाचायच्या आहेत पण हिम्मत होत नाही. असे अनुवाद वाचले म्हणजे कळते की शाळेत असताना आभ्यास केला असता तर आपल्यालाही या सर्वांचा अस्वाद घेता आला असता. प्रचेतस यांचे प्रतिसाद व स्पष्टीकरण म्हणजे "सोने पे सुहागा ". लिहीत रहा नक्कीच वाचू.
शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध नाचतो गोपी जनवृंद, वाजवी पावा गोविंद माणिक वर्माच्या गोड आवाजात हे गाणं ऐकताना मन हरवून गेलं पण पुन्हा पुन्हा शरदाचं चांदणं शब्दाशी घुटमळत राहिलं. 'शरदाचं चांदणं' हा वाक्प्रचार आपण सहसा विशेष गोष्टींसाठीच वापरतो. त्याच्या उच्चारानेदेखील मन आनंदात न्हाऊन निघतं. अशा या शरद ऋतू विषयी मला उत्सुकता वाटली आणि त्या अनुषंगाने काही काही वाचत गेले.

मुक्त चिंतन

अन्या बुद्धे ·

खूप दिवसांनी, काही तरी वेगळे वाचले ... अनियंत्रित पण सैरभर नसलेले मन, असेच मोकळे सोडावे... दर शनिवारी संध्याकाळी, मी हेच करतो ....

ईंजिनीयरिंगला असताना एका मित्राला स्मिथि, कार्पेंटरी अशी सहसा रटाळ वाटणारी प्रॅक्टीकल्स फार आवडायची. कारण हातांना काम करायला सोडुन देउन डोक्याला विचारांचा खुराक देता यायचा. अर्थात तो त्यात एक्सपर्ट होता म्हणुन, कारण तेच जॉब करताना आमच्या नाकी नउ यायचे :) या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.

खूप दिवसांनी, काही तरी वेगळे वाचले ... अनियंत्रित पण सैरभर नसलेले मन, असेच मोकळे सोडावे... दर शनिवारी संध्याकाळी, मी हेच करतो ....

ईंजिनीयरिंगला असताना एका मित्राला स्मिथि, कार्पेंटरी अशी सहसा रटाळ वाटणारी प्रॅक्टीकल्स फार आवडायची. कारण हातांना काम करायला सोडुन देउन डोक्याला विचारांचा खुराक देता यायचा. अर्थात तो त्यात एक्सपर्ट होता म्हणुन, कारण तेच जॉब करताना आमच्या नाकी नउ यायचे :) या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.
मुक्त चिंतन काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात.

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

vaibhav deshmukh ·

बोलघेवडा 13/09/2022 - 12:32
फारच छान. एकदम अनपेक्षित शेवट. "..फोन गळून पडला" या वाक्यानंतर गोष्ट संपवली असती कदाचित अजून भारी परिणाम झाला असता. पुढचं स्पष्टीकरण न देता वाचकांवर सोडली असती तरी चालेल असतं. असो. अजून येऊ देत साहेब अश्या कथा

सौन्दर्य 13/09/2022 - 22:46
गोष्ट छानच. अनेकदा अशा भयकथांमध्ये दरवाजे, भिंतीचे वगैरे अडथळे वर्णिले जातात. जर असे अतृप्त आत्मे घरात एखाद्या व्यक्तीपर्यंत येऊ इच्छित असतील तर त्यांना हे अडथळे पार करण्यासाठी ते उघडण्याची गरजच भासता कामा नये असं मला नेहेमीच वाटत आले आहे.

बर्‍याच दिवसांच्या गॅप नंतर लिहिलेत? पण मजा आली वाचताना, तुमची गोष्ट म्हणुन मुद्दाम निवांत वेळीच वाचायची असे ठरवले होते. छान आहे आवडली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 14/09/2022 - 14:23
मध्यंतरी कामाचा व्याप जरा वाढला होता.त्यामुळे लिखाण कमी झालं होतं.पण आता लिहीत आहे. तुमचा लोभ असाच कायम ठेवा.हुरूप येतो लिहिण्याचा.

बोलघेवडा 13/09/2022 - 12:32
फारच छान. एकदम अनपेक्षित शेवट. "..फोन गळून पडला" या वाक्यानंतर गोष्ट संपवली असती कदाचित अजून भारी परिणाम झाला असता. पुढचं स्पष्टीकरण न देता वाचकांवर सोडली असती तरी चालेल असतं. असो. अजून येऊ देत साहेब अश्या कथा

सौन्दर्य 13/09/2022 - 22:46
गोष्ट छानच. अनेकदा अशा भयकथांमध्ये दरवाजे, भिंतीचे वगैरे अडथळे वर्णिले जातात. जर असे अतृप्त आत्मे घरात एखाद्या व्यक्तीपर्यंत येऊ इच्छित असतील तर त्यांना हे अडथळे पार करण्यासाठी ते उघडण्याची गरजच भासता कामा नये असं मला नेहेमीच वाटत आले आहे.

बर्‍याच दिवसांच्या गॅप नंतर लिहिलेत? पण मजा आली वाचताना, तुमची गोष्ट म्हणुन मुद्दाम निवांत वेळीच वाचायची असे ठरवले होते. छान आहे आवडली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 14/09/2022 - 14:23
मध्यंतरी कामाचा व्याप जरा वाढला होता.त्यामुळे लिखाण कमी झालं होतं.पण आता लिहीत आहे. तुमचा लोभ असाच कायम ठेवा.हुरूप येतो लिहिण्याचा.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:24
आपल्या अभिप्रायातून आपले साहित्यावरचे प्रेम दिसत आहे, आणि त्या बद्दल धन्यवाद. पण मुद्दा हा आहे कि १९७० मध्ये धारपांनी ज्या कथा लिहिल्या त्या धर्तीचे चित्रपट अफाट लोकप्रिय आता होताना दिसत आहेत. अमेरिकेतली एक गोष्ट जगभर जाते आणि भारतात त्या आधी ३० वर्षे लिहिलेली तशाच धर्तीची कथा सूर्यप्रकाशही पाहू शकत नाही. आणि धारपांच्या कथा - भयकथा किंवा संदेहकथा नव्हे प्युअर सायन्स फिक्शन - कुठलीही काढून पहा. त्यातली भाषाशैली, कथेची मांडणी, त्यातून दिसणारे तंत्रज्ञानाचे मोजक्या शब्दात वर्णन - फाफट पसारा टाळून केलेली नेटकी मांडणी - हे सर्वच काळाच्या पुढचं होतं. वानगीदाखल अगदी मोजक्या कथांची नावं देतोय. कुठलीही पुस्तक काढून पहा. वाचून पूर्ण केल्याखेरीज खाली ठेववत नाही. Hugo Gernsback या लेखकाने मांडलेल्या निकषांवर ह्या कथा तंतोतंत उतरतात. Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण... १. युगपुरुष २. कंताचा मनोरा ३. चक्रावळ ४. जिद्द ५. अनोळखी दिशा (कथा संग्रह) पुस्तक हाताशी नसेल तर वर उल्लेख केलेल्या यू ट्यूब चॅनेल वर चाळुन पहा. अनुनाद

In reply to by अनुनाद

सस्नेह 05/09/2022 - 20:00
ऐसी रत्ने मेळवीन फायकसची अखेर अबक या आणखी काही विज्ञान कादंबर्या धारपांच्या विज्ञान कथा कादंबर्यांची पंखी -- स्नेहा

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 11:51
आवडलंय - खरंतर त्यांच्या झाडून सगळ्या कथा वाचल्या आहेत. बऱ्याचश्या संग्रही आहेत. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

In reply to by अनुनाद

भागो 06/09/2022 - 09:26
Wells, Jules Verne, Arthur Clarke, असिमोव या लेखकांच्या तोडीसतोड लिखाण...>>> हे किंचित अति झाले. ते लेखक ओरिजिनल होते. हा कळीचा मुद्दा आहे. जास्त लिहित नाही. माझ्या मते नारळीकर, बाळ फोंडके, लक्षमण लोंढे, सुबोध जावडेकर हे खरे विज्ञान कथा लेखक! आणि रत्नाकर मतकरी हे खरे भयकथा लेखक.

In reply to by भागो

जेम्स वांड 06/09/2022 - 10:33
मर्यादित वाचल्यात, पण ज्या वाचल्या आहेत त्यात नारळीकर फारच जास्त आवडले. १. वामन परत न आला - आज एलोन मस्क म्हणतो "AI is more dangerous than nuclear weapons" तेच नारळीकर सर सुलभ कथा लेखनातून सांगून जातात वामन मध्ये. २. यक्षांची देणगी - ही तर माझी फेवरेट विज्ञानकथा कलेक्शन म्हणावीत असली चोपडी. Inter Dimensional travelling वर आधारित असलेली "गंगाधरपंतांचे पानिपत" आणि Time Travelling + Mobius Strip + teleportation वर आधारित "उजव्या सोंडेचा गणपती" ह्या विशेष आठवतात.

In reply to by जेम्स वांड

भागो 06/09/2022 - 12:11
यक्षांची देणगी अबब! आमेझान वर दहावी आवृत्ति आहे! "उजव्या सोंडेचा गणपती" हि कथा http://repository.iucaa.in:8080/jspui/bitstream/11007/3098/1/Ujavya%20sondecha%20Ganapati,Marathi%20Katha%20%20Visave%20Shatak,%20415.pdf इथे आहे. Technical Error by Arthur C. Clarke ही पण अशीच कथा आहे. पण Arthur C. Clarke अजून खोलात गेला आहे.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:23
अतिशय आवडलेली गोष्ट - मला बहुधा तुम्ही आता नारळीकरांच्या सर्व कथा परत वाचायला लावणार. :)) envelop आणि inversion वरची आकाशात तरंगणारा डोळा नामक कथा आठवत आहे. - गंगाधर पंतांचे पानिपत आणि काळाला तिरका छेद हे खूप साम्य असणारे कथानक. आर्थर क्लार्क ची nine billion names of god नावाची कथा होती - तिचा अनुवाद कालच त्या चॅनेल वर ऐकला - हिमाल मठाचे गूढ या नावाने. ते कथानक लैच भारी होतं . पण एकूण हे discussion मला खूप समृद्ध करतंय . मनापासून धन्यवाद.

In reply to by भागो

सस्नेह 06/09/2022 - 11:54
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये बराच फरक आहे. धारपांच्या कथा फिक्शन या सदरात मोडतात. त्यात कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते. काय अफाट कल्पना असायच्या धारपांच्या !!

In reply to by सस्नेह

अनुनाद 06/09/2022 - 12:13
येस, कळीचा मुद्दा तोच आहे. त्यांच्या युगपुरुष या कथेत - Clifford Simac च्या time is the simplest thing या कथेवर आधारित असलेली असा उल्लेख आहे, पण मूळ कथा वाचून पाहिल्यावर जाणवले कि धारपांनी फक्त ५-१०% मूळ कथेचा आधार, कल्पना म्हणून वापरला आहे. बाकी सर्व त्यांचा कल्पना विलास.. हे खरंच थोर होतं. जिद्द हि कथा - space prison या पुस्तकाचा सही सही अनुवाद आहे. पण आधारित किंवा अनुवादित साहित्यात भाषेचं जे अवघडलेपण दिसतं त्याचा कुठेही मागमूस नाही. एक रिफ्रेशेर म्हणून खरंच ती यक्ष नामक कथा ऐकून पहा.

In reply to by भागो

अनुनाद 06/09/2022 - 12:03
हा हा, खरंय काही वेळा असं होतं कि उत्साहात काही तरी अति होऊन जातं सो क्षमस्व - नारळीकरांच्या आणि बाळ फोंडकेंच्याही सर्व - झाडून सर्व कथा वाचल्या - त्यातल्या फोंडकेंच्या एका कथेत एका astronaut च्या शरीरातून तो अवकाशातून परत आल्या नंतर एक रेडिओ frequency सतत उत्सर्जित होत असते आणि हि कल्पना नंतर काही पक्षी आणि whales ट्रॅकिंग करण्यासाठी वापरली जात आहे - अजूनही - हे भारी होतं. डाव्या सोंडेचा गणपती, वामन आठवतात. हे खरंच थोर होतं... बाकी आधारित असूनही अस्सल मराठी मातीतली वाटणारी कथा हि मला वाटतं - धारपांची ताकद होती. एक छोटा refresher हवा असेल तर लेखांती उल्लेख केलेली यक्ष हि कथा youtube वर ऐकून पहा.

जेम्स वांड 04/09/2022 - 22:08
तुमचे विज्ञानकथा ह्या लेखन पद्धती आणि कथा प्रकारातील लिखाणावर असलेले प्रेम नीट पोचले तुमच्या लेखनातून. @मुटकेजी, मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.

In reply to by जेम्स वांड

मला वाटतं लेखक धारपांच्या एकंदरीत प्रसिद्धी बद्दल बोलत नसून धारपांच्या विज्ञानकथा लेखक म्हणून (पुरेसे) प्रसिद्ध न वाटण्याबद्दल बोलत असावेत. धारप विज्ञानकथा लेखक होते हे मला प्रामाणिकपणे माहिती नव्हते , अर्थात मी काही अखिल महाराष्ट्रीय मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य लोकांना धारप विज्ञानकथा लेखक असलेलं ठाऊक असेल असे वाटत नाही मला तरी.
घाईत प्रतिसाद देण्यात माझी चूकच झाली. पण मला देखील ते विज्ञानकथा आहेत असे त्या काळी वाटत नव्हते. एकापेक्षा जास्त कथांचे संदर्भ आले तर कदाचित अनुमान काढता येईल. शिवाय ते भयकथा लेखक आहेत असे देखील मला कधी वाटले नाही. ते माझ्यामते गुढकथालेखक जास्त होते. भय हे त्यांच्या कथेचे उपउत्पादन म्हणता येईल कदाचित. अर्थात मला माझेच विचार तपासावे लागतील कारण धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल.

In reply to by धर्मराजमुटके

अनुनाद 05/09/2022 - 00:46
धारप वाचून पुष्कळ काळ लोटला आहे. आता माळ्यावरुन सुटकेस काढून साठे फायकस आणि अजून काही खजिना असेल तो परत एकदा चाळावा लागेल. खरंय - आणि तुम्हाला त्यात नक्की मजा येईल

In reply to by जेम्स वांड

अनुनाद 05/09/2022 - 00:52
हा हा.. तुम्हाला माझ्या लिहिण्याचं reading between the lines नक्कीच कळलंय. वरील उत्तरातील काही पुस्तकं नक्की चाळून पहा - मजा येईल

तर्कवादी 05/09/2022 - 00:22
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर, X-Men चित्रपट मालिका ही जगभरात आठव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी चित्रपट मालिका ठरली, या चित्रपटांनी 6 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. अशा गोष्टी पाहण्या / वाचण्याकरता आता कुठे भारतातील प्रेक्षक mature होत आहेत.
काहीसा असहमत म्हणजे नारायण धारप यांच्या कथा कदाचित चांगल्या असतीलही आणि त्या तितक्याशा प्रसिध्द न पावण्याबाबत सहमती. X-Men बद्दल माहित नाही. पण हॉलीवूड मध्ये वैज्ञानिक कथानक असलेले अनेक चित्रपट निघतात. पण बहुतेककरुन ते उगाच पांचट असतात .. त्यातली तांत्रिक करामतींसाठीची मेहनत कौतुकास्पद असते पण चित्रपट अनेकदा फसलेले असतात. अलिकडेच replicas आणि anti matter हे दोन फसलेले चित्रपट पाहिलेत. त्यातल्या त्यात replicas बरा. anti matter पुर्णतः गंडलेला. आणखी अनेक चित्रपट आठवता येतील. आणि हिंदीत/मराठीत असे चित्रपट काढल्यास त्यांना प्रेक्षक डोक्यावर घेणार नसतील तर प्रेक्षकांना मी अपरिपक्व म्हणणार् नाही

अनुनाद 05/09/2022 - 00:44
तुमचे म्हणणे बरोबर, आताचे काही हॉलिवूड चित्रपट अति तांत्रिक आहेत पाहवत नाहीत किंवा अंगावर येतात. पण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही... ६० ते ९० च्या काळातले काही चित्रपट आजही क्लासिक मानले जातात. २००१ a space odyssey किंवा स्टारवॉर्स, स्टारट्रेक - DC कॉमिक्स वगैरे संपूर्ण २-३ पिढ्या समृद्ध करून गेल्या - MIB या चित्रपटात शेवटच्या सीन मध्ये माणूस म्हणून आपल्या खुजेपणाची जाणीव होते. या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही - मी या चर्चेत पडत नाही पण काही पुस्तकं (वाचली नसतील तर) निदान चाळून पहा खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव - पहिल्या comment ला दिलेल्या उत्तरात काही पुस्तकांची नावे दिली आहेत.

In reply to by अनुनाद

तर्कवादी 05/09/2022 - 00:58
या प्रत्येक चित्रपटातून काही तरी विचाराला चालना मिळते. काही वेगळी दिशा सापडते - तसं काही आपल्याकडे घडताना दिसत नाही
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते. अमेरिकन लोकांना सायन्स फिक्शन मधून वैचारिक /आशयघन सापडत असेल. आपल्याकडे इतर प्रकारच्या चित्रपटांतून
ण आपल्याकडे जसा हिंदी चित्रपटांचा golden era येऊन गेला तसाच तिकडेही.
बरोबर आहे आणि आपल्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळात अनेक आशयघन चित्रपट आलेत. व्यावसायिक चित्रपटांतही दिवार सारख्या चित्रपटांतून काही विचार (भावना/ कर्तव्य यातले द्वंद ई) व्यक्त झालेत तर कलात्मक चित्रटांची मोठी यादी देता येईल. आपल्याकडे सायन्स निर्मात्यांनी फिक्शनला फारसा हात घातला नाही आणि त्यामुळे तो प्रकार लोकप्रिय झाला नाही. आता वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे...चांगल्या पुस्तकांवर चित्रपट बनलेत व ते योग्य पद्धतीने बनवले गेलेत तर लोकप्रिय होवू शकतील. आता मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ आलाय असे म्हणता येइल. मराठी निर्मात्यांनी पुढे येत नवीन प्रयोग करायला हवेत.

लहानपणी नारायण धारप,बाबूराव अर्नाळकर सगळ्यात जास्त आवडते लेखक होते. अनुक्रमे समर्थ व काळापहाड ह्या व्यक्तिरेखा खुपच भारी वाटायच्या. चित्रपट तंत्रज्ञान विकसित न झाल्या मुळे व लोकांची आवड ,कल या विषयाकडे कमी असणे हे सुद्धा एक कारण असू शकेल. साठे व फायकस आणी त्याचा थरार अजुनही डोक्यातून जात नाही. बाकी पुष्कळ रहस्यकथा वाचल्या पण विस्मृतीत गेल्या. आमचं बालपणी अंगावर काटे आणून थरारक भन्नाट करण्यासाठी दोघाही दिग्गजांना मानाचा मुजरा.

शाम भागवत 05/09/2022 - 08:12
६-७ वीत असताना वाचायचो. रात्री झोप लागायची नाही. एकदा गोष्ट वाचायला सुरवात केली की, थांबताच यायचं नाही. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटायचे. आता पुन्हा या पुस्तकाला हात लावायचा नाही व पुढची गोष्ट वाचायची नाही असं ठरवायचो. पण ८-१० तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी पुढची गोष्ट वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही. समर्थ ही व्यक्तिरेखा खूप भुरळ घालायची. असं वाटायचं की, ते कुठून तरी येतील व मला वाचवतील. त्या एका भरवशावर वाचायचे धाडस करत असे.

In reply to by शाम भागवत

अनुनाद 06/09/2022 - 12:30
exactly समर्थ आणि कृष्णचंद्र ह्या व्यक्तिरेखा म्हणजे एक वेगळेच जग होते - तुम्ही वर्णन केलेला फील मीही अनुभवला आहे. :)) उंबरठा हि कथा आठवते दोन मित्र.. एक नॉर्मल एक सायकिक त्या चॅनेल वर ती हि कथा ऐकली आणि अफाट आवडली होती ...

विजुभाऊ 05/09/2022 - 09:51
मला स्वतःला धारपांच्या भयकथा आवडतातच पण विज्ञानकथा त्याहून जास्त आवडतात. नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी या पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

अनुनाद 06/09/2022 - 12:38
नेनचिम आवडली असेल तर "कंताचा मनोरा" (वाचली नसेल तर) जरूर निदान चाळून पहा - गोग्रामचा चितार मला आठवतंय - बहुधा ती माझी SciFi वाचनाची सुरुवात असावी. खरंतर भा. रा. भागवत यांच्या चंद्रावर स्वारी, धूमकेतूचे रहस्य इ कथा वाचताना रमून जायला व्हायचं - नंतर कळलं ती Jules Verne ची पुस्तकं होती, पण भागवतांनी खरंच गोडी लावली . नेनचिम म्हणजे अक्षरशः world class documentary होती... Mission to Mars ह्या चित्रपटात तीच कल्पना वापरली आहे.

भागो 05/09/2022 - 17:39
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही. आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत. आताच "दोबारा" नावाचा चित्रपट येऊन "गेला." कुणी बघितला? कित्येक थेटरात शो कॅंसल झाले. अप्रतिम पिक्चर !

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 18:04
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.
आपल्याला फेकाफेकी जास्त पसंत
हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!

In reply to by भागो

तर्कवादी 05/09/2022 - 19:17
भारतात विज्ञान आधारित काहीही खपत नाही
"एक डॉक्टरकी मौत" हा आशयघन चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने कमाई किती केली ते माहित नाही पण हा चित्रपट अनेकांना माहित आहे इतकं नक्की (चर्चेत राहिला)

भागो 05/09/2022 - 19:02
असं नाहीये.. कोई मिल गया, क्रिश, रा वन आणि फार पुर्वी मिस्टर इंडिया हे चित्रपट चालले होते.>>> व्वा. कळलंं. हाताला पाच बोट आहेत. अजून एक पिक्चरचे नाव टाका. रोबो? हॉलिवूडच्या सायन्स फिक्शनमध्येही फेकाफेकीच असते की !!>> चालायचेच.

nutanm 06/09/2022 - 06:59
मी बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार व काळापहाड कथा खूपच वाचल्या. 68--70 साली. धारप त्यानंतर आले तोवर माझा रहस्यकथेतला interest संपला होता . व मला तेव्हा त्यांची पुस्तके म्हणजे सायन्स फिक्शन ई० माहित नव्हते कळण्यासही कठीण व भितीदायक वाटल्या . त्याचवेळी मला ऐतिहासिक पुस्तकांचे वेड लागत होते म्हणून नारायण धारप तितकेसे आवडले नाहीत व डोक्यावरूनही गेले. झुंजार व काळापहाड खूप म्हणजे खूप आवडायची. काळापहाडचे चोरांची दुनिया अजूनही चांगले लक्षांत आहे खूप मस्त पुस्तक व वेगळीच चोरांची दुनिया जी काळापहाडने समाजात उघडकीस आणली व पोलिसांच्या ताब्यात बहुतेक चोर दिले, खूपच मजा आलेली वयाच्या 12/13 व्यवर्षी वाचताना व मस्त घाबरण्याचा थरार घेत रहस्यकथा वाचत असे. नविनच जगाची / पुस्तकांच्या थरारक व़िश्र्वाची ओळख होत होती.

nutanm 06/09/2022 - 07:14
झुंजार तर माझा खूपच आवडता हिरो व हे व्यक्त करणे मला जमायचे नाही व भिती व लाजही खूप वाटे त्या अर्धवट वयात. पण काळापहाड व झुंजार अजूनही खूप आवडतात. पण आता ही पुस्तके मिळत नाही वसमाज, काळ पुढे गेल्याने वाचणार्यांना थरारही वाटणार नाही, शस्त्रास्त्रेही खूप आधुनिक होऊन झुंजारचे ठोसे मारून ठगाला लोळविणे हे सर्वच शब्दासकट खूप बाळबोध वाटते व आहे हल्लीच्या काळात

In reply to by nutanm

भागो 06/09/2022 - 09:16
झुंझार माझा पण अगदी आवडता हिरो. त्या काळी माझा एक मित्र लायब्ररीतून बाबुराव अर्नाळकर गुपचूप उचलून आणून मला देत असे. त्यांची पुस्तके अजूनही मिळतात. आमेझान वर आहेत. बुधवार पेठेत मिळतात मला काही रद्दीच्या दुकानात मिळाली. शोध म्हणजे सापडेल. आता मी मुलाबरोबर/मुलीबरोबर इंग्लिश वाचायला शिकलो. मग काय खजिनाच खुला झाला. खूप खूप वाचले. पण अजूनही मला "गुजबंप्स"अतिशय आवडतात. अचाट भीतिकथा. लहान मुलांसाठी आहेत. पण ओपन आवडीने वाचतो बुवा.

Bhakti 06/09/2022 - 11:11
धारप यांचं कोणतं पुस्तक पहिल्यांदा वाचावं? तिकडची आवडती सायन्स फिक्शन फिल्म Lucy कन्सेप्ट जाम आवडतो, आणि मानवाच्या आवाक्यातला विषय आहे. इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत ;) बाकी केवळ फिक्शनमध्ये अनेक मराठी छान सिनेमा जे आवडतात आहेत .पण धागा भरकटेल नंतर कधीतरी सांगते :)

अनुनाद 06/09/2022 - 11:47
मी त्या धाग्या च्या प्रथम लेखात उल्लेख केलेली यक्ष हि कथा sansovoice या you tube चॅनेल वर पहिली - खरंतर त्यातूनच हे लिहावंसं वाटलं - ऐकून पहा

स्वधर्म 06/09/2022 - 15:33
अगदी १४-१५ वर्षांचा असल्यापासून धारप वाचायची गोडी लागली. इथे त्यांचे इतके चाहते आहेत, हे पाहून खूप आनंद झालेला आहे. शब्द किती म्हणून काटेकोर वापरावेत? त्यांच्या ‘दस्त’ या कादंबरीचे फक्त पहिले पान, पहिला परिच्छेद वाचून गार पडलो होतो. एका परिच्छेदात व्यक्तिरेखा मूर्तीमंत समोर उभी करावी, ती धारपांनीच! त्यांच्या बर्याच कथा या विशिष्ट भारित घरांवर, बखळींवर, जागांवर आहेत. त्यात काही अघोरी, अमूर्त आपल्या त्रिमित विश्वापलिकडचं असं असायचं. सर्व कथांचा शेवट सुष्टाचा दुष्टावर विजय छापाच्या असल्या तरी, धारप प्लॉट असा काही फुलवतात, की माणूस अडकून पडलाच पाहिजे. त्यांच्या विज्ञानकथांपैकी दोन्ही फायकस केवळ अप्रतिम! झाडे एकमेकांशी संपर्कात असणे, त्यांची काही स्ट्रॅटेजी असणे, ही कल्पनाच अफलातून! नंतर नंतर थोडा साचेबध्दपणा आला, तरी धारप हे ‘न सुचता’ लिहीणारे लेखक नव्हते, म्हणून थोर वाटतात. तुलना कदाचित अप्रस्तुत ठरेल, पण हल्लीचे अनेक लेखक कथाबीजच नसताना पुस्तके ‘पाडतात’ असे वाटते. म्हणजे केवळ मुख्य पात्राच्या मनातील भणभणते विचार हीच कादंबरी, ज्यात काहीही ‘घडत’ नाही. आणि अशा पुस्तकांना पारितोषिकेही मिळतात. अनेक उदाहरणे देता येतील. धारप हे खास मध्यमवर्गीय कुटुंबात, घरात घडणार्या कथा लिहायचे, पण रोमहर्षक! असा लेखक पुन्हा होणे मुश्किल!

In reply to by स्वधर्म

अनुनाद 07/09/2022 - 12:36
अगदी सुरेख लिहीलंयत. वाचकाला गळा दाबून धरणं ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अझाथोथ वगैरेसारख्या कथांमधून आलेले काही प्राचिन विधींचे उल्लेख आणि वर्णने पाहीली की असं वाटतं की त्यांचा काही सिक्रेट सोसायटीजशी नक्की संबंध असावा... :))
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

इलाज नसलेला फीव्हर

भागो ·
इलाज नसलेला फीव्हर मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा, अस आग्रहाचे निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन उचलला. “हॅलो, वहिनी कांदा पोहे...” मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या, “अहो बंड्या भावोजी, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं वेड्यासारखे करताहेत.

पुस्तक परिचय -पार्टनर: लेखक व. पु. काळे

सुजित जाधव ·

भागो 01/06/2022 - 17:46
सुंदर परिचय. सुंदर लेख. धागड धिंगाण्यात थोडी हिरवळ! पण मला "पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर" ह्याची लिक मिळत नाहीये. कृपया मदत करा. No backlinks found. असा संदेश येतो आहे.

Bhakti 01/06/2022 - 20:44
पार्टनर वाचून १३-१४ वर्ष झाली.थोड थोडं आठवतंय शेवट शेवट वाचताना पुस्तक बाजूला टाकल होतं,एवढा श्रीचा राग आला होता. रच्याकने काय तर पार्टनर म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या.... मित्र ,तत्वज्ञ , वाटाड्या म्हणजे मितवा ना :) नक्की कोण ओरिजनल.

In reply to by Bhakti

सुजित जाधव 01/06/2022 - 22:18
धन्यवाद...! मित्र, त्तत्वज्ञ, वाटाड्या याचे संक्षिप्त रूप म्हणजे मितवा. या कथेतील पार्टनर ला ही तिन्ही विशेषणे लागू होतात.. पण खरंच छान पुस्तक आहे..वेळ मिळाला की नक्की वाचा...माझ्याकडे Ebook पण आहे. हवे असल्यास सांगा..

व पु,मिरासदार,जयवंत दळवी,शंकर पाटील,चिं वी इ. लेखकांची पुस्तके मध्यमवर्गीयांच्या जीवनातील हिरवळ. "तुच माझी वहिदा, तीशी"या कथा तप्तपदी,वपुर्झा, दोस्त,इटींमेट,वपुर्वाई" माझी आवडती पुस्तके. कधीच कंटाळवाणी होत नाहीत. "वपुर्झा",तर जिथून सुरूवात कराल तीच त्याची सुरुवात. बरीच पुस्तके संग्रही आहेत. व पु लखनौ येथील मराठी समाजाने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमात,आले होते तेव्हा अध्यक्षांच्या घरी आयोजित केलेल्या भोजनाच्या प्रसंगी झालेल्या दिलखुलास गप्पा आजही आठवतात. त्याच वेळेस सभांषणातील एक वाक्य त्यांच्या बद्दल बरेच काही सांगुन गेले. "लेखक कधीच मोठा नसतो तर वाचक त्याला मोठे बनवतात". समीक्षा आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:17
धन्यवाद सर...! त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत... आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:19
धन्यवाद सर...! त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत... आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

श्रीगुरुजी 03/06/2022 - 14:22
पार्टनर कादंबरीवर आधारीत एक दूरचित्रवाणी मालिका सुमारे ३ दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारीत होत होती. त्यात प्रमुख भूमिकेत अश्विनी भावे आणि विजय कदम ही अगदीच विसंगत जोडी होती.

चौथा कोनाडा 15/06/2022 - 22:38
अगदी. विशेषत: विजय कदम हे ह्या धाटणीच्या (जॉनर) सिनेमासाठी योग्य नव्हते ! ७-८ वर्षांपुर्वी याच कादंबरीवर "श्री पार्टनर " हा सिनेमा आला होता, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता असं वाचण्यात आलं होतं.

भागो 01/06/2022 - 17:46
सुंदर परिचय. सुंदर लेख. धागड धिंगाण्यात थोडी हिरवळ! पण मला "पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर" ह्याची लिक मिळत नाहीये. कृपया मदत करा. No backlinks found. असा संदेश येतो आहे.

Bhakti 01/06/2022 - 20:44
पार्टनर वाचून १३-१४ वर्ष झाली.थोड थोडं आठवतंय शेवट शेवट वाचताना पुस्तक बाजूला टाकल होतं,एवढा श्रीचा राग आला होता. रच्याकने काय तर पार्टनर म्हणजे मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या.... मित्र ,तत्वज्ञ , वाटाड्या म्हणजे मितवा ना :) नक्की कोण ओरिजनल.

In reply to by Bhakti

सुजित जाधव 01/06/2022 - 22:18
धन्यवाद...! मित्र, त्तत्वज्ञ, वाटाड्या याचे संक्षिप्त रूप म्हणजे मितवा. या कथेतील पार्टनर ला ही तिन्ही विशेषणे लागू होतात.. पण खरंच छान पुस्तक आहे..वेळ मिळाला की नक्की वाचा...माझ्याकडे Ebook पण आहे. हवे असल्यास सांगा..

व पु,मिरासदार,जयवंत दळवी,शंकर पाटील,चिं वी इ. लेखकांची पुस्तके मध्यमवर्गीयांच्या जीवनातील हिरवळ. "तुच माझी वहिदा, तीशी"या कथा तप्तपदी,वपुर्झा, दोस्त,इटींमेट,वपुर्वाई" माझी आवडती पुस्तके. कधीच कंटाळवाणी होत नाहीत. "वपुर्झा",तर जिथून सुरूवात कराल तीच त्याची सुरुवात. बरीच पुस्तके संग्रही आहेत. व पु लखनौ येथील मराठी समाजाने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमात,आले होते तेव्हा अध्यक्षांच्या घरी आयोजित केलेल्या भोजनाच्या प्रसंगी झालेल्या दिलखुलास गप्पा आजही आठवतात. त्याच वेळेस सभांषणातील एक वाक्य त्यांच्या बद्दल बरेच काही सांगुन गेले. "लेखक कधीच मोठा नसतो तर वाचक त्याला मोठे बनवतात". समीक्षा आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:17
धन्यवाद सर...! त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत... आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

In reply to by कर्नलतपस्वी

सुजित जाधव 02/06/2022 - 20:19
धन्यवाद सर...! त्यांची ही वाट एकटीची, मी माणूस शोधतोय आणि पार्टनर ही माझी आवडती पुस्तके...जेव्हा कधी त्यांचे कोणतेही पुस्तक हाती घेतो तेव्हा ते खाली ठेवूच नये असं वाटत... आणि वपुंची भेट म्हणजे एक पर्वणीच!

श्रीगुरुजी 03/06/2022 - 14:22
पार्टनर कादंबरीवर आधारीत एक दूरचित्रवाणी मालिका सुमारे ३ दशकांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारीत होत होती. त्यात प्रमुख भूमिकेत अश्विनी भावे आणि विजय कदम ही अगदीच विसंगत जोडी होती.

चौथा कोनाडा 15/06/2022 - 22:38
अगदी. विशेषत: विजय कदम हे ह्या धाटणीच्या (जॉनर) सिनेमासाठी योग्य नव्हते ! ७-८ वर्षांपुर्वी याच कादंबरीवर "श्री पार्टनर " हा सिनेमा आला होता, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता असं वाचण्यात आलं होतं.
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक 'पार्टनर' असतो..ज्याच्यासोबत/जिच्यासोबत आपण आपले सुख-दुःख Share करतो... ती व्यक्ती आपल्याला संकटसमयी मार्गदर्शन करते, आपल्या सुखदुःखाचा भागीदार बनते…वपुंची 'पार्टनर' ही कथा पण आपल्याला अश्याच एका पार्टनरची ओळख करून देते…तशी पार्टनर ही एक प्रेमकथाच आहे पण ती वपुंनी लिहली आहे हे तिचं वैशिष्ट्य…

हे वाचा: शेष प्रश्न

अनुस्वार ·

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.

In reply to by अर्धवटराव

अनुस्वार 19/03/2022 - 15:19
तुम्हाला सव्यसाची अगोदरच भेटला असेल. नसल्यास तो 'पथेर दाबी' मध्ये भेटेल. पुस्तक मराठीत नाही सापडले परंतु पुष्कळ हिंदी आवृत्त्या 'पथ के दावेदार' या नावाने इ-व्यापार संकेतस्थळांवर अगदी शंभर रूपयांत उपलब्ध आहेत. https://www.amazon.in/Path-Davedar-Hindi-Saratchandra-Chattopadhyay/dp/9389567157/ref=mp_s_a_1_4?qid=1647682831&refinements=p_27%3ASaratchandra+Chattopadhyay&s=books&sr=1-4 https://www.loksatta.com/chaturang/streetvache-rupbandh/article-about-shrchandra-chattopadhyay-novel-pather-dabi-1790827/

In reply to by अनुस्वार

अर्धवटराव 22/03/2022 - 22:05
सव्यसाची नव्हता सापडला. आता हिंदी आवृत्ती बघतो. सव्यसाची शोधताना एका बंगाली डॉन ची कादंबरी हाती लागली होती. प्रत्यक्ष हा डॉन त्या कथेत वावरत नाहि, पण सगळी पात्र त्याच्या भोवती गुंफली होती.. डोन ची मुलगी आणि जावई, मुलीचा बॉयफ्रेण्ड, पोलीस अधिकारी.. भन्नाट होती कथा.

कथा,कवीता,कादंबरी यांचे विषय असतात. मुन्शी प्रेमचंद याचे लेखन गोदान,एक चादर मैलीसी इ. पण त्या वेळच्या कुप्रथांवरच आधारित होते कुठल्याही काळात शेष प्रश्न हा अनुत्तरीतच राहातो फक्त काळा प्रमाणे त्याचे रूप बदलते. छान लिहिलय.

भागो 15/03/2022 - 08:27
शरच्चंद्र ह्यांच्या सर्व लिखाणाचे मराठी भाषांतर श्री मामा वरेरकर यांनी करले होते/आहे. तो संपूर्ण सेट माझ्या बहिणींनी विकत घेतला होता. मला त्यातून विप्रदास आणि श्रीकांत ह्या अत्यंत आवडलेल्या. पणते दिवस गेले. आता खुद्द बंगाल मध्ये कोणी शरच्चंद्र वाचत नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांंवर अनेक हिंदी चित्रपट झाले. नोबल प्राईज च्या वेळी रवींद्रनाथंच्या बरोबर शरच्चंद्रांचे नावही चर्चेत होते.

अनिंद्य 16/03/2022 - 13:44
समग्र शरदचंद्र वाचलेय - इंग्रजी आणि हिंदी भाषांतर. मराठीत त्यांची काही पुस्तके नक्कीच भाषांतरित झाली आहेत. पण कुणी वाचत असेल असे वाटत नाही. पुढच्या पिढीत शरदचंद्र आणि रवींद्रनाथ वाचणारे कुणी उरेल याची खात्री नाही. 'शेष प्रश्न' चे म्हणाल तर जितके जुने तितकेच प्रासंगिक. सध्या काळाचे चक्र उलटे फिरतेय की काय असे वाटायचे दिवस आहेत.

कंजूस 16/03/2022 - 15:34
कर्नाटकात भैरप्पांचा विषय काय असतो? सध्या मराठी मालिकांत सासू सांगते सुनेला शिक्षण घाल चुलीत. पुन्हा काळ मागे चालला.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.