मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त 03/05/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस 03/05/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा 04/05/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त 03/05/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस 03/05/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा 04/05/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!
. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

सोम्या बाबा.

Deepak Pawar ·

नठ्यारा 24/02/2024 - 15:02
गावाकडची कथा व सोम्याबाबाचं व्यक्तिचित्रण एकमेकांत चांगलं मिसळलं आहे. पण कथा मध्येच संपल्यासारखी वाटते. दोन कथा हव्या होत्या का? की अधिक साहित्य भरून एखादी कथामालिका करता यावी ? -नाठाळ नठ्या

नठ्यारा 24/02/2024 - 15:02
गावाकडची कथा व सोम्याबाबाचं व्यक्तिचित्रण एकमेकांत चांगलं मिसळलं आहे. पण कथा मध्येच संपल्यासारखी वाटते. दोन कथा हव्या होत्या का? की अधिक साहित्य भरून एखादी कथामालिका करता यावी ? -नाठाळ नठ्या
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती. "हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं. "रुसलाय," आई म्हणाली. "कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला. "त्याला गाय हवेय," आई म्हणाली. "काय बाई आक्रितच?" "गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली. मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो. "जेवलाय पण नाय," आई म्हणाली. "काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय?

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.

भागो ·

आणि बहुतेक शेवटचाच :) भागो- तुमच्या कथा डोक्याला झिणझिण्या आणणार्‍या असतात एव्हढे नक्की, म्हणजे कथेच्या शेवटापर्यंत आलो की संदर्भ शोधायला पुन्हा सुरुवातीकडे जावे लागते. त्यात सत्य/असत्याची ईतकी सरमिसळ केलेली असते आणि वाक्यावाक्याला ईतके पंचेस असतात की आपण नक्की काय वाचलेय हे लक्षात ठेवावे लागते. गो केकू गो कॉस्मिक सेन्सॉरशिप राँग नंबर सगळ्या मालिका साधारणपणे अशाच प्रकारच्या वाटल्या. पण एकुण चमचमीत भेळ छान आहे. लिहिते रहा.

In reply to by तुषार काळभोर

आहो,काही मिपाकर इतके अप्रतिम लिहीतात पण वाचक का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात माहित नाही. या वर्षाच्या दिवाळी अंकातील, सहा ऋतूंचे सहा सोहळे, खुपच अप्रतिम लेख. कवीता तर इतक्या भारी आहेत. मी तिन वेळेस वाचल्या पण मन भरले नाही. तुमच्या कथा अशाच दिमाग का दही करणाऱ्या पण मनोरंजनाचे लोणी मात्र भारी असते. कथा आवडली हे वेगळे सांगत नाही. लि र वा रा

In reply to by तुषार काळभोर

भागो 16/11/2023 - 19:07
होय. एकदा कर्नल साहेबांनी मला सांगितले होते. स्वान्तः सुखाय सांगितले होते. आणि आज आपण. हे मी चांगले ध्यानात ठेवीन. आभार काळभोर साहेब.

आणि बहुतेक शेवटचाच :) भागो- तुमच्या कथा डोक्याला झिणझिण्या आणणार्‍या असतात एव्हढे नक्की, म्हणजे कथेच्या शेवटापर्यंत आलो की संदर्भ शोधायला पुन्हा सुरुवातीकडे जावे लागते. त्यात सत्य/असत्याची ईतकी सरमिसळ केलेली असते आणि वाक्यावाक्याला ईतके पंचेस असतात की आपण नक्की काय वाचलेय हे लक्षात ठेवावे लागते. गो केकू गो कॉस्मिक सेन्सॉरशिप राँग नंबर सगळ्या मालिका साधारणपणे अशाच प्रकारच्या वाटल्या. पण एकुण चमचमीत भेळ छान आहे. लिहिते रहा.

In reply to by तुषार काळभोर

आहो,काही मिपाकर इतके अप्रतिम लिहीतात पण वाचक का त्याच्याकडे दुर्लक्ष करतात माहित नाही. या वर्षाच्या दिवाळी अंकातील, सहा ऋतूंचे सहा सोहळे, खुपच अप्रतिम लेख. कवीता तर इतक्या भारी आहेत. मी तिन वेळेस वाचल्या पण मन भरले नाही. तुमच्या कथा अशाच दिमाग का दही करणाऱ्या पण मनोरंजनाचे लोणी मात्र भारी असते. कथा आवडली हे वेगळे सांगत नाही. लि र वा रा

In reply to by तुषार काळभोर

भागो 16/11/2023 - 19:07
होय. एकदा कर्नल साहेबांनी मला सांगितले होते. स्वान्तः सुखाय सांगितले होते. आणि आज आपण. हे मी चांगले ध्यानात ठेवीन. आभार काळभोर साहेब.
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता. त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही. “आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.” हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते.

पॅरिसमधील शिवचरित्र

मनो ·

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared

मनो 12/11/2023 - 01:43
मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. " "मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस 12/11/2023 - 05:17
संतोष. तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे. मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते. वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 ) भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे. संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले. बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो 13/11/2023 - 07:31
ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका. https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

शुक्राची चांदणी

चक्कर_बंडा ·

सौंदाळा 11/10/2023 - 17:30
मस्तच शुक्राच्या चांदणीचा एखादा फोटो मात्र पाहिजे होता

कंजूस 11/10/2023 - 18:22
खरंच. आता चांदणी दिसली तरी ठळक नसते. चमचमणारे आकाश विसरायचं.

लहानपणी खळं लागले की खळ्यात झोपायला जायचो. घरात संख्येत वाढ झाली की आमचा नंबर आंगणात झोपण्या साठी लागायचा. बाकी शुक्र तारा साहित्यिक लोकांनी भरपूर वापरला. कुणाच्या खिन्न मनास दिलासा तर कुणाला वेळेचे भान याच शुक्राने दिले. अगदी विल्यम शेक्सपियर सुद्धा याच्या मोहातून सुटला नाही.काही उदाहरणे वानगीदाखल. मस्त लेख आहे.भुतं व शुक्र याचें नाते आम्हींपण ऐकले आहे. आपले लेख छानच असतात. शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी....पाडगावकर घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी ये बाहेरी अंडे फोडुनि शुद्ध मोकळया वातावरणी का गुदमरशी आतच कुढुनी रे मार भरारी जरा वरी-भा रा तांबे अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी-श्रीरंग गोडबोले पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ-कुसुमाग्रज Venus and Adonis-William Shekespears

In reply to by कर्नलतपस्वी

आणि त्यावर हा मस्त प्रतिसाद. रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा? मलाही थोडा अटपटासा वाटला. म्हणून गाणे ऐकले. १९६७ मधे स्वरबद्ध केलीली कवीता, राजकवी तांबे यानी आपल्या उतारवयात लिहीली आहे. स्व. लता मंगेशकर यांचा स्वर व पं. हृदयनाथ याचे संगीत. कवितेचे एखादे कडवे घेऊन त्याचे रसग्रहण किंवा शब्द रचना याचे विश्लेषण करणे म्हणजे कवी आणी कवीता दोघांवरही अन्याय ठरेल. पैलतीर समोर दिसत असताना मन आणी त्याची अवस्था. कवीला, मृत्यू समोर दिसत असताना खिन्न, उदास मन नैराश्याच्या कोषात वेढलेले दिसत असावे. नैराश्यावर नियंत्रण ठेवून त्या कोषातून बाहेर येण्यासाठी कवी त्याची समजूत घालत असावा असे पुढच्या कडव्यातून समजून येते. फुल गळे, फळ गोड जाहले बीज नुरे, डौलात तरु डुले तेल गळे, बघ ज्योत पाजळे का मरणी अमरता ही न खरी ? (खुपच सटिक शब्दरचना) पं हृदयनाथ यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासू संगीतकाराने शब्दांमधे कुठलाही बदल न करता स्वरबद्ध केले यातच सर्व आले. म्या पामराने यावर काय बोलावे. कविता शब्दांच्या पलीकडे जावून बघण्याचा एक प्रयत्न.

In reply to by कर्नलतपस्वी

चक्कर_बंडा 12/10/2023 - 11:21
शुक्र मोठमोठया साहित्यिकांना प्रिय आहे हे खरंच ! छान उजळणी झाली या प्रतिसादाच्या माध्यमातुन....

लेख आवडला. लहानपणी आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री पाहिलेल्या तारांगणांच्या आठवणी जाग्या झाल्या.

सौंदाळा 11/10/2023 - 17:30
मस्तच शुक्राच्या चांदणीचा एखादा फोटो मात्र पाहिजे होता

कंजूस 11/10/2023 - 18:22
खरंच. आता चांदणी दिसली तरी ठळक नसते. चमचमणारे आकाश विसरायचं.

लहानपणी खळं लागले की खळ्यात झोपायला जायचो. घरात संख्येत वाढ झाली की आमचा नंबर आंगणात झोपण्या साठी लागायचा. बाकी शुक्र तारा साहित्यिक लोकांनी भरपूर वापरला. कुणाच्या खिन्न मनास दिलासा तर कुणाला वेळेचे भान याच शुक्राने दिले. अगदी विल्यम शेक्सपियर सुद्धा याच्या मोहातून सुटला नाही.काही उदाहरणे वानगीदाखल. मस्त लेख आहे.भुतं व शुक्र याचें नाते आम्हींपण ऐकले आहे. आपले लेख छानच असतात. शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी....पाडगावकर घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी ये बाहेरी अंडे फोडुनि शुद्ध मोकळया वातावरणी का गुदमरशी आतच कुढुनी रे मार भरारी जरा वरी-भा रा तांबे अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी-श्रीरंग गोडबोले पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ-कुसुमाग्रज Venus and Adonis-William Shekespears

In reply to by कर्नलतपस्वी

आणि त्यावर हा मस्त प्रतिसाद. रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा? मलाही थोडा अटपटासा वाटला. म्हणून गाणे ऐकले. १९६७ मधे स्वरबद्ध केलीली कवीता, राजकवी तांबे यानी आपल्या उतारवयात लिहीली आहे. स्व. लता मंगेशकर यांचा स्वर व पं. हृदयनाथ याचे संगीत. कवितेचे एखादे कडवे घेऊन त्याचे रसग्रहण किंवा शब्द रचना याचे विश्लेषण करणे म्हणजे कवी आणी कवीता दोघांवरही अन्याय ठरेल. पैलतीर समोर दिसत असताना मन आणी त्याची अवस्था. कवीला, मृत्यू समोर दिसत असताना खिन्न, उदास मन नैराश्याच्या कोषात वेढलेले दिसत असावे. नैराश्यावर नियंत्रण ठेवून त्या कोषातून बाहेर येण्यासाठी कवी त्याची समजूत घालत असावा असे पुढच्या कडव्यातून समजून येते. फुल गळे, फळ गोड जाहले बीज नुरे, डौलात तरु डुले तेल गळे, बघ ज्योत पाजळे का मरणी अमरता ही न खरी ? (खुपच सटिक शब्दरचना) पं हृदयनाथ यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासू संगीतकाराने शब्दांमधे कुठलाही बदल न करता स्वरबद्ध केले यातच सर्व आले. म्या पामराने यावर काय बोलावे. कविता शब्दांच्या पलीकडे जावून बघण्याचा एक प्रयत्न.

In reply to by कर्नलतपस्वी

चक्कर_बंडा 12/10/2023 - 11:21
शुक्र मोठमोठया साहित्यिकांना प्रिय आहे हे खरंच ! छान उजळणी झाली या प्रतिसादाच्या माध्यमातुन....

लेख आवडला. लहानपणी आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री पाहिलेल्या तारांगणांच्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

हे वाचा: बगळा

अनुस्वार ·

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !
Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

चित्रगुप्त ·

अनिल हटेला 01/09/2023 - 18:47
फक्कड जमलये.. शेवट येइस्तो विसरलो होतो की नेमका हा धागा कुठल्या विषयावर होता ? पूर्न एका दमात हा लेख वाचुन झाला, आवर्‍जुन प्रतिसाद देणे आले.. धन्यु...

शशिकांत ओक 01/09/2023 - 21:55
६०, ७० दशकातील गाण्याचा गोफ, जागतिक कीर्तीच्या चित्रकारीचे रसरशीत दर्शन, डेंकालीच्या जंगलातील टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण, शेवटी रहस्याची फोडणी, झणझणीत मिसळपावची रंगत वाढवणारे धागे कसे काढावेत ते चित्रिगुप्तांकडून शिकावे!

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:05
@ शशिकांत ओक- लई मंजे लईच तारीफ करता ब्वॉ तुम्ही (यावरून लगेच 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुन्हे बनाया हे गाणं सुचलं आणि त्यावरून मग.... ) 'टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण' हे खासच. .

कंजूस 02/09/2023 - 05:05
फारच ओघवतं झालं आहे मराठीचा अध्यापक होऊ घातलेल्या शाळकरी मुलाचे लेखन. त्या काळात आवडली,आठवली असे शब्द बोलले जात होते - 'क्रश' वगैरे दहा वर्षांपूर्वी वाढलं. म्हणजे लेखनातून काल दिसतो तो असा. कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:05
कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
बरोबर ओळखलेत. आधी कागदावरच लिहीले होते.

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:02
काल रात्री दीड वाजता अचानक जाग आली, आणि कसे कुणास ठाऊक, "ती धावत आली आणि गच्च मिठी मारली" असे शब्द जणू कुणी कानत बोलत आहे, असा भास झाला. अश्या परिस्थितीत कविता सुचते हे अनुभवाने माहीत असल्याने लगेच उठून कागदावर ते लिहीले, तर लगेच पुढल्या ओळी सुचत गेल्या आणि झरझर लिहीत गेलो. 'चष्मावाली बहीण' हे कदाचित झोपण्यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यूट्यूबवर बघत होतो, त्यात रसिका वेंगुर्लेकरची चष्मा घातलेल्या मुलीची भूमिका होती, त्यावरून आले असावे. -- पन्नास-साठच्या दशकातली हिंदी गाणी तर सतत मना पिंगा घालतच असतात (आणि ऐकत- बघतही असल्यामुळे, आता सॅक्सोफोनचा असा पीस येणार, आता सतार, आता कोंगो, आता बासरी ... असे सगळे माहीत असते) आणि कोणत्याही शब्दावरून सुरू होऊन गाण्यांची लडच्या लड मनात उलगडत जात असते. माझ्या यापूर्वीच्या काही लेखातही अशी गाणी आलेली आहेत. -- तर या सगळ्या गाण्यांमुळे या कथानकाचा काळ जसा लक्षात येतो, तसाच तो 'दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो' यातून, "त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत" यातून (दोन्ही कुटुंबांच्या एकंदरित आर्थिक परिस्थितीची कल्पना देत) येत रहातो. 'वहिनीच्या बाळानं कवितेच्या कागदावर केलेली मोठ्ठी शी (डायपरपूर्व काळ), 'परसाकडे' हा आता विस्मृत झालेला शब्द, सिनेमातल्या आईने 'गाजरकाहलवा' खाऊ घालणे, वगैरेतूनही तो उलगडत जातो. अर्थात हे सगळे माझ्या लहानपणीचेच असल्याने सहजपणे सुचत गेले. मुद्दाम काही लिहावे लागले नाही. गंमत म्हणजे "ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" याचे काय करायचे हे अगदी शेवटपर्यंत मलाही ठाऊक नव्हते, आणि अगदी शेवटला परिच्छेद लिहीतानाच ते सुचले, याचे मला आश्चर्य (आणि हुश्य) वाटले. मोठेपणी मराठीचा प्रोफेसर होण्याची या मुलाची इच्छा 'आवडली' खोडून'आठवली' लिहीणे, 'अंगणाकडे' ऐवजी 'परसाकडे' अशी स्वतंची चूक सुधरावणे, 'प्रतिभासाधन' हे पुस्तक, यातूनही व्यक्त होते आहे, हे मला ते लिहून गेल्यावर जाणवले. 'चष्मेवाल्या' मुलींना शिकवणे' यातून चष्मेवाले विद्यार्थी बहुधा 'स्कॉलर' असतात, आपण त्यांनाही शिकवणे म्हणजे काही 'थोर कामगिरी' करणे असाही अर्थ मला नंतर उलगडला. असो. नितीन पालकर, कुमार१,अनिल हटेला, शशिकांत ओक आणि कंजूस यांचे प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:09
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
-- अगदी अगदी. हे चाणाक्ष वाचक असल्याने तुम्ही बरोब्बर ओळखलंय.

बबन ताम्बे 02/09/2023 - 16:11
फर्मास बनली आहे कथा. शैली एकदम ओघवती आणि तो काळ एकदम चपखल उभा केलाय. कुमार वयातील घालमेल सुंदर चितारली आहे. आपल्याकडे जे नाही त्याची दिवा स्वप्ने बघायचा तो काळ. कथा अतिशय आवडली.

विवेकपटाईत 02/09/2023 - 17:27
हा! हा! हा! मस्त. बाकी आज सकाळी आरश्यात पाहिले. चेहऱ्यावर लाल लाल डाग दिसत होते. बहुतेक रात्री डंकिणी डासणीने मुके घेतले असावे. एकेकाचे नशीब.

दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा सहजरीत्या आंदोळताना पाहून शोभा गुर्टू यांची प्रसिद्ध बैठकीतली लावणी आठवली. म्हणजे कसं "देहाची तीजोरी भक्तीचा ठेव " ते" पिकल्या पानाचा देठा", https://youtu.be/vA6J2-RnRQo?si=8_LMmDX4niI5xqbY

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 09/09/2023 - 19:23
>>>आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे. हे आवडलं.

चित्रगुप्त 23/04/2025 - 22:08
या धाग्यातला मजकूर मी चोप्य्पस्ते करून चॅट जिपीटी ला दिला. त्यावर ते काय म्हणाले: हा मजकूर म्हणजे एक भानावर आणि भान हरपलेल्या विचारांमधली गमतीशीर झुल आहे. एकाच वाक्यापासून सुरू झालेली एकदम साधीशी आठवण, क्षणार्धात अनेक गाणी, आठवणी, पात्रं, आणि कवितेच्या धुंदीत हरवलेला लेखक घेऊन जाते – अगदी एका आवाजाच्या स्पंदनातून संपूर्ण बालपणीच्या विश्वात वावरून परत आलेलं मन. काय विशेष जाणवतं? 1. गाण्यांमधून जाणारा प्रवास: पहिल्याच वाक्यावरून गाण्यांची जणू मालिका सुरु होते. एखाद्या रेडियोवर गाणी लागावीत तशी, आठवणींच्या रेडियोवर चालणारी ही यादी एकेक करून मनातली दृश्य उलगडते. 2. बालमनाचं मासूम आणि थोडंसं गमतीशीर चिंतन: कधी गण्याचा राग, कधी त्याच्या बहिणीचा चष्मा, कधी कविता शिकवणं, तर कधी गाजरकाहलव्याची अपेक्षा – सगळं अगदी हलक्या, बालसुलभ स्वभावाने आणि आत्मविष्कारात मांडलेलं आहे. 3. भूतकाळात रमलेलं, पण थेट ‘वर्तमानात’ उमटणारं: कथा आजूबाजूच्या जगाशी, संवादाशी, रेडियोवरच्या गाण्याशी आणि सायकलवर जाणाऱ्या मुलीशी बोलत राहते. एकदम नॉस्टॅल्जिक आणि दृश्यप्रधान लेखन. 4. विनोदी आणि खुद्कन हसवणारं: “कवितेच्या कागदावर बाळानं शी केली” किंवा “गण्याला गुद्दा मारून पळायचं ठरवलं” हे प्रसंग गंभीरतेतही एक हलकंफुलकं हास्य आणतात. शैलीदृष्ट्या: लेखन मुक्तधर्मी आणि प्रवाही आहे. वाचक एकदम कथाकाराच्या डोक्यात प्रवेश करतो. “वाक्यांमधून विचारांची साखळी” उलगडत जाते या शैलीतलं एक सुंदर उदाहरण. ही केवळ एक विनोदी ललित कथा नाही, तर त्यामधून अस्वस्थ स्वप्नं, सर्जनशीलतेची धडपड, आणि बालसुलभ ईर्ष्या व आकांक्षा यांचं दर्शन घडतं. शेवटी जेव्हा तो सांगतो की तो वाक्य इंग्लिश पिक्चरमधून ऐकलेलं होतं, तेव्हा आपल्याला जाणवतं की कधी कधी एक छोटं वाक्यही संपूर्ण भावविश्व निर्माण करू शकतं.ही कथा म्हणजे आपल्या मनात चालणाऱ्या स्वतःशी चाललेल्या गप्पा, त्या गप्पांमध्ये हरवलेलं बालपण, आणि त्या आठवणींनी बनलेली सर्जनशील स्वप्नं — एकदम सहज, प्रांजळ. खरंच मनापासून अभिनंदन – तुमचा लेख एकदम बहारदार आहे! “ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला – मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी” हे शीर्षक जितकं भावनिक आहे, तितकंच सगळ्या कथानकातल्या गोंधळलेल्या, मिश्कील आणि गोड आत्मप्रत्ययाचा सारही ठळकपणे दाखवतं. काही विशेष कौतुकास्पद गोष्टी: आत्मपर भाषाशैली तुमचं लेखन म्हणजे स्वतःशी गप्पा मारताना नकळत वाचकाला त्यात ओढून घेणारी शैली. प्रत्येक विचाराचा stream of consciousness सहज गुंफलेला आहे – आणि त्यातून एक “बालपणाची गंमत” आणि “प्रौढपणाची स्वप्नं” एकत्र उलगडतात. गाण्यांमधून भावभावनांचं प्रदर्शन तुमच्या मनात उमटणाऱ्या आठवणी आणि त्या गाण्यांच्या धाग्याने बांधलेली गुंफण – एकदम cinematic. यात एक retro nostalgia आहे जी वाचकाला त्यांच्या स्वतःच्या बालपणात नेऊन टाकते. हास्य, उपहास आणि निष्पाप स्वप्नं प्रत्येक वळणावर विनोद आहे, पण तो कधीही उथळ नाही. तो निष्पाप आहे, मिश्कील आहे आणि आपल्या आयुष्यातील त्या ‘गण्यासारख्या’ मित्रांची आठवण करून देतो. साहित्य आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ ‘प्रा. डॉ. बबडू बिरुटे’सारखं नाव, किंवा 'प्रतिभासाधन' वाचण्याची आकांक्षा, किंवा ‘चष्मावाल्या मुली’ याबद्दलचे मत – हे सगळं एका वास्तविक, ग्रामीण किंवा निमशहरी, मध्यमवर्गीय मराठी घरातल्या मुलाचं मानसिक चित्रण आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 09/05/2025 - 20:18
चित्र गुप्त, ... मिठी काय? मुके काय? यावर पानभर लिहिण्याइतके सगळे या दोन शब्दात साचले होते ते या कृ बु नव्हे विकृत बुद्धी वादी ने लिहून मन सैरभैर होते आहे...! बाकी मित्रांनो विद्याधर असे एऽआयला मराठीत म्हटले तर तो काय म्हणतो ते समजून घ्यायला आवडेल!

कंजूस 11/05/2025 - 17:51
एआइ घडून गेलेल्या किंवा जालावरच्या साहित्याचा आधार घेत असल्याने नावाची पाटी अगदी रास्त आहे. एआइला मिपा वाचावे लागते. वाचनात ती कंजूसगिरी करत नाही.

अनिल हटेला 01/09/2023 - 18:47
फक्कड जमलये.. शेवट येइस्तो विसरलो होतो की नेमका हा धागा कुठल्या विषयावर होता ? पूर्न एका दमात हा लेख वाचुन झाला, आवर्‍जुन प्रतिसाद देणे आले.. धन्यु...

शशिकांत ओक 01/09/2023 - 21:55
६०, ७० दशकातील गाण्याचा गोफ, जागतिक कीर्तीच्या चित्रकारीचे रसरशीत दर्शन, डेंकालीच्या जंगलातील टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण, शेवटी रहस्याची फोडणी, झणझणीत मिसळपावची रंगत वाढवणारे धागे कसे काढावेत ते चित्रिगुप्तांकडून शिकावे!

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:05
@ शशिकांत ओक- लई मंजे लईच तारीफ करता ब्वॉ तुम्ही (यावरून लगेच 'तारीफ करूं क्या उसकी, जिसने तुन्हे बनाया हे गाणं सुचलं आणि त्यावरून मग.... ) 'टारझन प्रमाणे स्वैर वैचारिक विचरण' हे खासच. .

कंजूस 02/09/2023 - 05:05
फारच ओघवतं झालं आहे मराठीचा अध्यापक होऊ घातलेल्या शाळकरी मुलाचे लेखन. त्या काळात आवडली,आठवली असे शब्द बोलले जात होते - 'क्रश' वगैरे दहा वर्षांपूर्वी वाढलं. म्हणजे लेखनातून काल दिसतो तो असा. कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:05
कीबोर्ड वगैरे हार्डवेअर न वापरता टाकाने लिहीत आहात असं वाटून गेलं.
बरोबर ओळखलेत. आधी कागदावरच लिहीले होते.

चित्रगुप्त 02/09/2023 - 08:02
काल रात्री दीड वाजता अचानक जाग आली, आणि कसे कुणास ठाऊक, "ती धावत आली आणि गच्च मिठी मारली" असे शब्द जणू कुणी कानत बोलत आहे, असा भास झाला. अश्या परिस्थितीत कविता सुचते हे अनुभवाने माहीत असल्याने लगेच उठून कागदावर ते लिहीले, तर लगेच पुढल्या ओळी सुचत गेल्या आणि झरझर लिहीत गेलो. 'चष्मावाली बहीण' हे कदाचित झोपण्यापूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यूट्यूबवर बघत होतो, त्यात रसिका वेंगुर्लेकरची चष्मा घातलेल्या मुलीची भूमिका होती, त्यावरून आले असावे. -- पन्नास-साठच्या दशकातली हिंदी गाणी तर सतत मना पिंगा घालतच असतात (आणि ऐकत- बघतही असल्यामुळे, आता सॅक्सोफोनचा असा पीस येणार, आता सतार, आता कोंगो, आता बासरी ... असे सगळे माहीत असते) आणि कोणत्याही शब्दावरून सुरू होऊन गाण्यांची लडच्या लड मनात उलगडत जात असते. माझ्या यापूर्वीच्या काही लेखातही अशी गाणी आलेली आहेत. -- तर या सगळ्या गाण्यांमुळे या कथानकाचा काळ जसा लक्षात येतो, तसाच तो 'दुमडलेल्या मनगटावर हनुवटी टेकवून विचारमग्न बसलेला फोटो' यातून, "त्यांच्याकडे रेडियो, सोफासेट, पंखा, फ्लॉवरपॉट, चहाची किटली वगैरे महागड्या वस्तू आहेत" यातून (दोन्ही कुटुंबांच्या एकंदरित आर्थिक परिस्थितीची कल्पना देत) येत रहातो. 'वहिनीच्या बाळानं कवितेच्या कागदावर केलेली मोठ्ठी शी (डायपरपूर्व काळ), 'परसाकडे' हा आता विस्मृत झालेला शब्द, सिनेमातल्या आईने 'गाजरकाहलवा' खाऊ घालणे, वगैरेतूनही तो उलगडत जातो. अर्थात हे सगळे माझ्या लहानपणीचेच असल्याने सहजपणे सुचत गेले. मुद्दाम काही लिहावे लागले नाही. गंमत म्हणजे "ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" याचे काय करायचे हे अगदी शेवटपर्यंत मलाही ठाऊक नव्हते, आणि अगदी शेवटला परिच्छेद लिहीतानाच ते सुचले, याचे मला आश्चर्य (आणि हुश्य) वाटले. मोठेपणी मराठीचा प्रोफेसर होण्याची या मुलाची इच्छा 'आवडली' खोडून'आठवली' लिहीणे, 'अंगणाकडे' ऐवजी 'परसाकडे' अशी स्वतंची चूक सुधरावणे, 'प्रतिभासाधन' हे पुस्तक, यातूनही व्यक्त होते आहे, हे मला ते लिहून गेल्यावर जाणवले. 'चष्मेवाल्या' मुलींना शिकवणे' यातून चष्मेवाले विद्यार्थी बहुधा 'स्कॉलर' असतात, आपण त्यांनाही शिकवणे म्हणजे काही 'थोर कामगिरी' करणे असाही अर्थ मला नंतर उलगडला. असो. नितीन पालकर, कुमार१,अनिल हटेला, शशिकांत ओक आणि कंजूस यांचे प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल अनेक आभार.

In reply to by विजुभाऊ

चित्रगुप्त 04/09/2023 - 05:09
एवढे सगळे बोलून तुम्ही खाली बसलात ते बरे केले. नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता
-- अगदी अगदी. हे चाणाक्ष वाचक असल्याने तुम्ही बरोब्बर ओळखलंय.

बबन ताम्बे 02/09/2023 - 16:11
फर्मास बनली आहे कथा. शैली एकदम ओघवती आणि तो काळ एकदम चपखल उभा केलाय. कुमार वयातील घालमेल सुंदर चितारली आहे. आपल्याकडे जे नाही त्याची दिवा स्वप्ने बघायचा तो काळ. कथा अतिशय आवडली.

विवेकपटाईत 02/09/2023 - 17:27
हा! हा! हा! मस्त. बाकी आज सकाळी आरश्यात पाहिले. चेहऱ्यावर लाल लाल डाग दिसत होते. बहुतेक रात्री डंकिणी डासणीने मुके घेतले असावे. एकेकाचे नशीब.

दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव असा सहजरीत्या आंदोळताना पाहून शोभा गुर्टू यांची प्रसिद्ध बैठकीतली लावणी आठवली. म्हणजे कसं "देहाची तीजोरी भक्तीचा ठेव " ते" पिकल्या पानाचा देठा", https://youtu.be/vA6J2-RnRQo?si=8_LMmDX4niI5xqbY

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहिरावण 09/09/2023 - 19:23
>>>आणि मग दरवाज्यावर 'प्रा.डॉ. बबडू बिरुटे' एम.ए.पीएचडी (मराठी) अशी मोठ्ठी पाटीपण लावणारे. हे आवडलं.

चित्रगुप्त 23/04/2025 - 22:08
या धाग्यातला मजकूर मी चोप्य्पस्ते करून चॅट जिपीटी ला दिला. त्यावर ते काय म्हणाले: हा मजकूर म्हणजे एक भानावर आणि भान हरपलेल्या विचारांमधली गमतीशीर झुल आहे. एकाच वाक्यापासून सुरू झालेली एकदम साधीशी आठवण, क्षणार्धात अनेक गाणी, आठवणी, पात्रं, आणि कवितेच्या धुंदीत हरवलेला लेखक घेऊन जाते – अगदी एका आवाजाच्या स्पंदनातून संपूर्ण बालपणीच्या विश्वात वावरून परत आलेलं मन. काय विशेष जाणवतं? 1. गाण्यांमधून जाणारा प्रवास: पहिल्याच वाक्यावरून गाण्यांची जणू मालिका सुरु होते. एखाद्या रेडियोवर गाणी लागावीत तशी, आठवणींच्या रेडियोवर चालणारी ही यादी एकेक करून मनातली दृश्य उलगडते. 2. बालमनाचं मासूम आणि थोडंसं गमतीशीर चिंतन: कधी गण्याचा राग, कधी त्याच्या बहिणीचा चष्मा, कधी कविता शिकवणं, तर कधी गाजरकाहलव्याची अपेक्षा – सगळं अगदी हलक्या, बालसुलभ स्वभावाने आणि आत्मविष्कारात मांडलेलं आहे. 3. भूतकाळात रमलेलं, पण थेट ‘वर्तमानात’ उमटणारं: कथा आजूबाजूच्या जगाशी, संवादाशी, रेडियोवरच्या गाण्याशी आणि सायकलवर जाणाऱ्या मुलीशी बोलत राहते. एकदम नॉस्टॅल्जिक आणि दृश्यप्रधान लेखन. 4. विनोदी आणि खुद्कन हसवणारं: “कवितेच्या कागदावर बाळानं शी केली” किंवा “गण्याला गुद्दा मारून पळायचं ठरवलं” हे प्रसंग गंभीरतेतही एक हलकंफुलकं हास्य आणतात. शैलीदृष्ट्या: लेखन मुक्तधर्मी आणि प्रवाही आहे. वाचक एकदम कथाकाराच्या डोक्यात प्रवेश करतो. “वाक्यांमधून विचारांची साखळी” उलगडत जाते या शैलीतलं एक सुंदर उदाहरण. ही केवळ एक विनोदी ललित कथा नाही, तर त्यामधून अस्वस्थ स्वप्नं, सर्जनशीलतेची धडपड, आणि बालसुलभ ईर्ष्या व आकांक्षा यांचं दर्शन घडतं. शेवटी जेव्हा तो सांगतो की तो वाक्य इंग्लिश पिक्चरमधून ऐकलेलं होतं, तेव्हा आपल्याला जाणवतं की कधी कधी एक छोटं वाक्यही संपूर्ण भावविश्व निर्माण करू शकतं.ही कथा म्हणजे आपल्या मनात चालणाऱ्या स्वतःशी चाललेल्या गप्पा, त्या गप्पांमध्ये हरवलेलं बालपण, आणि त्या आठवणींनी बनलेली सर्जनशील स्वप्नं — एकदम सहज, प्रांजळ. खरंच मनापासून अभिनंदन – तुमचा लेख एकदम बहारदार आहे! “ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला – मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी” हे शीर्षक जितकं भावनिक आहे, तितकंच सगळ्या कथानकातल्या गोंधळलेल्या, मिश्कील आणि गोड आत्मप्रत्ययाचा सारही ठळकपणे दाखवतं. काही विशेष कौतुकास्पद गोष्टी: आत्मपर भाषाशैली तुमचं लेखन म्हणजे स्वतःशी गप्पा मारताना नकळत वाचकाला त्यात ओढून घेणारी शैली. प्रत्येक विचाराचा stream of consciousness सहज गुंफलेला आहे – आणि त्यातून एक “बालपणाची गंमत” आणि “प्रौढपणाची स्वप्नं” एकत्र उलगडतात. गाण्यांमधून भावभावनांचं प्रदर्शन तुमच्या मनात उमटणाऱ्या आठवणी आणि त्या गाण्यांच्या धाग्याने बांधलेली गुंफण – एकदम cinematic. यात एक retro nostalgia आहे जी वाचकाला त्यांच्या स्वतःच्या बालपणात नेऊन टाकते. हास्य, उपहास आणि निष्पाप स्वप्नं प्रत्येक वळणावर विनोद आहे, पण तो कधीही उथळ नाही. तो निष्पाप आहे, मिश्कील आहे आणि आपल्या आयुष्यातील त्या ‘गण्यासारख्या’ मित्रांची आठवण करून देतो. साहित्य आणि वास्तव यांचा सुरेख मिलाफ ‘प्रा. डॉ. बबडू बिरुटे’सारखं नाव, किंवा 'प्रतिभासाधन' वाचण्याची आकांक्षा, किंवा ‘चष्मावाल्या मुली’ याबद्दलचे मत – हे सगळं एका वास्तविक, ग्रामीण किंवा निमशहरी, मध्यमवर्गीय मराठी घरातल्या मुलाचं मानसिक चित्रण आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 09/05/2025 - 20:18
चित्र गुप्त, ... मिठी काय? मुके काय? यावर पानभर लिहिण्याइतके सगळे या दोन शब्दात साचले होते ते या कृ बु नव्हे विकृत बुद्धी वादी ने लिहून मन सैरभैर होते आहे...! बाकी मित्रांनो विद्याधर असे एऽआयला मराठीत म्हटले तर तो काय म्हणतो ते समजून घ्यायला आवडेल!

कंजूस 11/05/2025 - 17:51
एआइ घडून गेलेल्या किंवा जालावरच्या साहित्याचा आधार घेत असल्याने नावाची पाटी अगदी रास्त आहे. एआइला मिपा वाचावे लागते. वाचनात ती कंजूसगिरी करत नाही.
"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 19/08/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 19/08/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!

विवेकपटाईत 19/08/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 19/08/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.

सध्या काय वाचताय?

प्रचेतस ·

छान ओळख. कादंबरी मिळाली तर वाचेनच. पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो. प्रवीण बांदेकरांचं 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' सुरु केलं ठेवलं. मग मसापच्या कार्यक्रमात राजू बाविस्करांचं 'काळ्यानिळ्या रेषा' आत्मकथन घेतलं काही पानं वाचली ठेवलं. समीक्षेबद्दल गणेश वामन कनाटेचं 'दीर्घ' असंच राहील. अवघड झालं सगळं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 15/08/2023 - 19:12
पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो.
--- अगदी असेच माझेही झालेले आहे. आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य... वाटले. पण याबद्दल खंतही वाटतेच. मी दोन-तीन पुस्तके वर काढून ठेवलेली आहेत, त्यापैकी एकादे अधून मधून थोडेसे वाचतो. हा धागा खूप महत्वाचा आहे. पुढे कधी पुन्हा वाचू लागलो तर यात रिकमंडिलेली पुस्तके वाचायची असा निश्चय सध्या करत आहे (तेवढेच जरा समाधान)

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 06:29
वाटसपचा दुरुपयोग वाढला आहे. आपल्या मित्रमंडळीतील लोकांनी फक्त त्यांनी केलेल्या,लिहिलेल्या कृती, कुटुंबातील फोटो वगैरे टाकले तर नव्वद टक्के फारवर्डेड कचरा दूर होईल. जालावरच्या रेडिमेड गुडमॉर्निंग मेसेजपेक्षा त्यांच्याच बागेतील फुलांचे फोटो टाकले पाहिजेत. डॉक्टर,इतर व्यावसायिक त्यांचेच घट्ट वाटसप ग्रूप करतात ते चर्चेसाठी. ते ठीक आहे. पुस्तके वाचायला वेळ मिळेल.

गवि 13/08/2023 - 21:56
जुन्या काळातली पण मराठीत अनुवादित पुस्तके मुद्दाम पुन्हा वर काढून वाचायला घेतली. खास उद्देश असा काही नाही. सहजच एक वेगळा प्रयोग. रॉबिन कुकचे कोमा, जेफ्री आर्चरची काही (उदा. ट्विस्ट इन द टेल), बेटी महमूदी (नॉट विदौट माय डॉटर) वगैरे. काही आगोदर वाचली आहेत. काही पहिल्यांदाच वाचली. बाकी या हाकामारीचे अल्प परीक्षण चांगले लिहिले आहे. फार म्हणजे फार पूर्वी तडकडताई नावाचे प्रकरण सांगली साईडला असायचे. रस्त्याने ती (तो) निघाल्यावर पोरे बाळे चिडीचूप असत. लपून छपून तिला बघत. आता बातम्या पाहिल्या त्यानुसार ही प्रथा पुन्हा फॉर्मात आली आहे असे वाटते. पण आता पोरे बाळे तितकीशी निरागस राहिली नसतील. सेल्फी काढत असतील तडकडताई सोबत असा अंदाज. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

प्रचेतस 14/08/2023 - 08:49
तडकडताई बद्द्ल ऐकले नहते आधी पण हे हाकामारी प्रकरण ८०/९० च्या दशकात भलतेच फेमस होते. घरोघरी दरवाजांवर खडूने तीन फुल्या काढलेल्या असत. आमच्या आजेमावशीच्या घरी हाकामारी आली अणि तिच्या मुलाला तीन हाका देऊन ती बोलवत होती ह्याची कहाणी आजी अगदी रंगवून रंगवून सांगत असे.

जी ए कुलकर्णी यांची रक्तचंदन, रमलखुणा,हिरवे रावे अमेझोन ने घरपोच केले आहे. पिंगळावेळ,काजळमाया नुकतीच संपवली आहेत. 'पर्व' किंडलवर आणी जी ए डोईजड झाले तर 'पडघवली' बेड साईड टेबलावर ठेवले आहे. कवीता वाचन चालूच आहे. नुकतीच ग्रेस यांची आई या पारंपरिक प्रतीमेला सुरुंग लावणारी एक कवीता वाचली. ग्रेसांनी असे का लिहीले असावे याचा शोध घेत आहे. सध्या एव्हढेच. आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस @प्रचेतस, थोडक्यात केलेले पुस्तक परिचय आवडला. बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 14/08/2023 - 05:44
माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... हि कविता वाचल्यावर मनात आलं कि गारंबीचा बापू ( श्री ना पेंडसे ) मधील बापूला जेव्हा आपल्या जन्माचे रहस्य कळते तेव्हा त्याने तर लिहिली नसेल !

In reply to by चौकस२१२

घणो चोख्खा प्रतिसाद. मातृदेवो भव:, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... असे आपले संस्कार पण या माणसांने त्याला सुरुंग लावलाय. हा कुणी साधासुधा माणुस नाही. ग्रेस,जेव्हढा वाचतोय तेव्हढे दुर्बोधतेचे वलय आणखीनच गडद होत चाललंय. स्वताच कवीने दिलेले स्पष्टीकरण, https://youtu.be/okJ_QTG73DU

ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट प्रथा” हे पुस्तक नेटवर मिळाले नी वाचले. त्या नंतर त्यांचेच “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तकही आप्पा बळवंत चौकातून विकत घेऊन वाचले. त्यानंतर मध्ये लाॅंग ड्राईव करण्याचा योग आला तेव्हा काहीतरी एकावं म्हणून तूनळी वर कादंबरी शोधली असता “ऊचल्या” ही लक्ष्मण गायकवाडांची कादंबरी आली. तीचा फक्त पहीला भाग वाचला नी ऊर्वरीत भाग ऐकायची गरजच पडली नाही. एकामागे एक असे सर्व वीस भाग संपवले. ऊचल्या/पारधी जातीत जन्मलेल्या लक्ष्मण गायकवाडांची ही आत्मकथा आहे. “मी गरीब होतो नी मला सहानूभूती द्या” असं काहीही कादंबरीत नाही तर फक्त काय घडलं हे ते सांगतात. चोरी करनारे कुटूंब असल्यामूळे त्या कुटूंबातील कुणाला नोकरी मिळायची नाही त्यामूळे चोरी करूनच पोट भरावे लागायचे, चोरी करन्यासाठी वापरल्या जानर्या युक्त्या तसेच भरमसाठ पैसा कमावूनही समाजातील पांढरपेशा जातीतील लोक तसेच पोलीस तेच पैसे त्यांच्याकडून कसे काढायचे ना चोरनारे गरीब झोपडीतच राहीले पण इतरांनी तीन मजली इमारती बांधल्या हे त्यांच्या लिखानातून दिसते. अतिशय भीषण परिस्थीती दाखवनारी ही कादंबरी आहे प्रत्येकाने वाचावीच/ऐकावीच. लिंक https://youtu.be/Ag6DElAgDb8?si=SY_H0Z0wSxpdeac5 देवदासी व नग्नपूजा ह्यावर लेख लिहायचे मनात होते पण शब्द जास्त बसले नाहीत म्हणून ऐवढेच लिहीले. ते देतो. काही दिवसांआधी जोगवा सिनेमा पाहीला होता. तेव्हा जोगत्या जोगतीनी, देवदासी ह्या प्रथेबद्दल माहीती पडले. कर्नाटकातील सौंदत्ती, जिल्हा बेळगाव इथे यल्ल्म्मा देवीला मूले मूली अर्पन केले जाण्याची प्रथा होती. त्यांचं लग्न देवीशी लावून देण्यात यायचं. हे मूलं मूली जोगवा मागून आपले पोट भरायचे. बर्याच मूली वंतर वेश्याव्यवसायाला लागायच्या. कर्नाटकातील सौंदत्ती, कोकटनूर, नी महाराष्ट्रात जत ला यल्लमाची मोठी मंदीरे आहेत. चंद्रगुत्ती ह्या शिमोग्गा जिल्ह्यातील ठिकाणी तर नग्नपूजा चालायची. वरदा नदीत आंघोळ करून चार किलोमीटर असलेल्या मंदीरापर्यंत स्त्री पुरूष नग्न होऊन जायचे,१९८६ साली कर्नाटक सराकरने ना दलीत संघर्ष सनीतीने ही प्रथा बंदं पाडली. ह्या विषयात ऊत्तम कांबळे ह्यांनी संशोधन करून “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तक लिहीले. ते मागच्या आठवड्यात एबीसी चौकातून विकत घेऊन वाचले. त्यात ह्या देवदासी प्रथेबरोबरच बरीच माहीती होती. गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यात बहूचर माता मंदीर आहे. ही देवी किन्नरांची कूळदेवी म्हणून प्रसिध्द आहे. पुर्वी पुरूषांना ह्या देवाला अर्पून किन्नर बनवले जायचे. त्याची एक प्रोसेस होती जी इथे सांगत नाही. १८९० साली बडोद्याच्या गायकवाडांनी कायदा करून हा प्रकार बंदं केला. आज गूजरातला आलो होतो. ह्या देवीच्या मंदीरात गेलो. परिसर न्याहाळला. एका झाडाखाली बरेच किन्नर बसले होते. तिथले काही क्षणचित्रे.

In reply to by चौकस२१२

कॉमी 17/08/2023 - 18:16
अंताजी मध्ये शाक्त संप्रदायाच्या काही अघोरी पूजांचे वर्णन आहे. वर बाहुबली लिहितात आणि ती पूजा एकसारखी असते का ?

कंजूस 14/08/2023 - 05:36
ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या गोष्टी वाचलं आहे. व्यक्तिचित्रं फारच लांबवली आहेत आणि आवर्तनं वाटतात. त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय. कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं. सामाजिक बदलला तसा तो दिसण्यातही . कवी नायगावकर मुलाखतीत म्हणतात की मला बऱ्याच जणांनी सांगितलं की "निसर्गरम्य कोकण पाहा म्हणून गेलो तर झाडं आड येत होती." आता मॉल आड येतात आणि माडांच्या झावळ्यांनी डिश सिग्नल बरोबर येत नाहीत. घरांवरची कौलं फुटतात म्हणून (आणि चाकरमान्यांना परवडतो म्हणून) लोखंडी निळे पत्रे घातले (कोकणी घरपण जरा दिसावं म्हणून) पण मोबाईल रेंज घरात येत नाही. हल्लीचं कोकण विरार वसई होत आहे. असो. खरात,पाटील,माडगुळकर यांचाही घाटावरचा सामाजिक देश बदलला आहेच. रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते. किन्नरांचे जीवन एकदम हाईफाई झालं आहे. निवडणुकीत निवडून येत आहेत,आखाडे चालवत आहेत,कुंभमेळ्यात स्नानासाठी वरचा नंबर आहे,सिनेमा तसेच मालिकांत एक तरी किन्नर पात्र असला पाहिजे. त्यांचं क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धाही येतील. अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे. तर काहींनी आपणहून लेखन थांबवलं आहे याचं कौतुक केलं आहे. सिलेक्टिव मेमरी - शोभा डे (इंग्रजी आणि मराठी अनुवादही आहे.)-आत्मकथन . वाचलं. भारी. लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं. इथे आणखी लिहीन. आता एवढंच.

In reply to by कंजूस

त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर .... निरीक्षण आवडले. सहमत आहे. मी बरेच वर्ष मराठी पासून दूर असल्याने जुनी पुस्तके काढून वाचतोय. काही भावतात काही कंटाळवाणी. लेख लिहा,समयोचित ठरेल.

In reply to by कंजूस

प्रचेतस 14/08/2023 - 11:06
त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय.
गुप्तेंनी मतकरींचा वारसा यथार्थपणे चालवलाय असं वाटतं. गुप्तेंच्या कादंबर्‍यांत भय गूढाबरोबरच वासनेची एक छटा कायम असते. गोठण्याच्या गोष्टी वाचायचंय पण ते केवळ व्यक्तिचित्रात्मक पुस्तक आहे त्यामुळे अजून घेतलं नाहीये.
कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं.
हे तर साहजिकच आहे. बदल हा जीवनातला स्थायीभावच आहे. कोकणचे अजून सुरेख वर्णन करणारे लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक. दळवी, पेंडश्यांचा कोकण हा रत्नागिरीतला, दापोली मुरुड परिसरातला तर कर्णिक आपल्याला सिंधुदुर्गात घेऊन जातात. तळकोकण मात्र अजूनही आहे तसेच आहे. विशेषतः मोठी गावे सोडून. पर्यटनामुळे खूप बदल झालेले दिसतात.
रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते.
अगदी खरं. हे दोन्ही महाग्रंथ मूळातूनच वाचलेले उत्तम. त्यांच्यावरच्या कादंबर्‍या तर वाचू नयेत असेच मत आहे. मात्र टीकात्मक ग्रंथ दुर्गाबाई, इरावतीबाई, कुरुंदकर यांचे उत्तम आहेत.
लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं.
हे तर अगदी जबरदस्त आहे. ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, ज्यांनी बदामी, हंपी, वेरुळ, महाबलिपुरम, राजराजेश्वरम मंदिरे बघितली आहेत त्यांना तर अगदी थेट भिडेल.

In reply to by कंजूस

राजाभाउ 17/08/2023 - 11:54
अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे. आत्ताच याच मलप्रुष्ठ आणि अनुक्रमाणिक पाहीली amazon वर, जबरा दिसतय लगेच मागवतो. धन्यवाद. अशोक शहाणे यांचे "धाकटे आकाश" नावाच पुस्तक फार पुर्वी वाचल होत, फार भारी पुस्तक होत ते.

मी नुकतीच जीएंची दोन पुस्तके (रक्तचंदन आणि रमलखुणा) वाचून संपवली आहेत. ती अजून डोक्यात ठाण मांडून बसलीयेत त्यामुळे लवकर दुसरी पुस्तके हातात येतील असं वाटत नाही. पण, काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्याव सुचत नाहीये. :( भयकथा/कादंबरी आवडीचा विषय नसल्याने हाकामारी कदाचित नाही आवडणार. हलकं फुलकं काही असेल तर सुचवा. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस 14/08/2023 - 13:56
हलकं फुलकं काही असेल तर सुचवा.
हलकं फुलकं म्हणजे सुशिंची 'बरसात चांदण्यांची' एकदम मस्त. आमचा एक मिपाकर मित्र त्यातल्या गंधालीच्या प्रेमात पडला होता. गंभीर तरीही उत्तम वाचावयाचे असेल तर महाबळेश्वर सैल यांची 'तांडव' अवश्य वाचलीच पाहिजे.

In reply to by प्रचेतस

सुशी म्हणजे विषयच संपला. आता हे पुस्तक शोधणे आले. उद्याचा मुहूर्त चांगला आहे. बघूया कसं होतंय. :) सं - दी - प

'एकाला बोलो रे' - शिरीष काणेकर (वाचून होईल शेवटचा चॅप्टर चालू आहे ) 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन' - अनिरुद्ध कणिसेत्तिं - अनुवाद मीना संभूस - सुरु करणार या विकेंडला ..

प्रचेतस यांनी सुचवल्याने आणले आहे, पण वाचनाचा वेग फारच मंदावलाय, त्यामुळे लिंक लागत नाही. आता हायलायटर घेउन खुणा करत वाचतोय :) हाकामारी--परीचय आवडला. मिळवुन वाचेन. टार्गेट असद शहा-वसंत लिमये--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निक्ते--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो-लेखकाने सह्याद्रीच्या माथ्यावरुन सलग ७५ दिवस उत्तर ते दक्षिण भटकंती केली त्याचा वृत्तांत

कंजूस 14/08/2023 - 13:43
पेंडश्यांनी नंतर बापूच्या आईवर 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी लिहिली. बापूंची आई? नाही पाहिलं. पण गारंबिची राधा वाचलंय. एकूण कोकण चांगला उभा केला आहे. असंच पुढे न्यायचं तर किरण नगरकर (good story teller) (आवडता लेखक)यांचं जशोदा हे (इंग्रजी) पुस्तकं भारी. तसंच त्यांची इतरही पुस्तकं चांगली आहेत. त्याबद्दल @कॉमी यांनी मागे एका लेखात लिहलं आहेच. राजस्थान चांगला मांडतात. ------ गेली पंचवीस तीस वर्ष कोकणात जातोय, बदल तर आहेच पण आकर्षण कमी झाले नाही. पर्यटन म्हणून आणि ग्रूपमध्ये किंवा आयोजित सहलीत जाऊन कुठेही पाहू नये. आणि कोकण तर नाहीच. इतर राज्यांत भाषेचा ,प्रांताचा प्रश्न असतो. पण कोकणात मराठीच्या बहिणी. आपलीच लोकं. शांतपणे कौंटुबिक (एकच) फिरल्यास कोकण वेगळाच उमगतो. हा अनुभव मला आला आहे. त्यांच्या घरांत नेतात, गप्पा मारतात,आपलंसं करतात. --------- ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, आमचं थोडं उलट झालं. देवळं अगोदर पाहिली गेली, पुस्तक आता वाचलं. पण फोटो सर्वच काढले होते त्यामुळे बारीकसारीक शिल्पं अशी का ते समजलं. --------------- काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्यावं सुचत नाहीये. -चांदणे संदीप. झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी) . ---------- मनो यांचं अज्ञात पानिपत वाचून झालंय. त्यावर लिहायचं आहेच. ----------- सुट्ट्या आहेत तर काही चांगलं वाचावं म्हणून पुस्तकं चाळली वाचनालयात आणि मंगेश राजाध्यक्ष संकलित पाच कवि सापडलं. पन्नास साठ कविता आहेतच पण माहितीही दिली आहे. कवी -केशवसूत,ना.वा.टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी. ---------

In reply to by कंजूस

झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी)
धन्यवाद कंकाका! थोडीशी माहिती घेतली नेटावर नेटाने. :) त्यातल्या त्यात एखाद्या अवार्ड विनींग पुस्तकाने सुरूवात करतो. सं - दी - प

कंजूस 14/08/2023 - 19:12
विकत घेण्याअगोदर ओनस्क्रीन इथे वाचता येतील.- Zumpa on archive 1) The Namesake https://archive.org/details/namesake0000lahi/mode/1up 2)The Interpreter of Maladies https://archive.org/details/interpreterofmal00lahi/mode/1up दोन्ही नावाजलेली. _________________ वैचारिक हवे असल्यास शशि थरूरची पुस्तके Shashi tharoor books Archive org Shashi tharoor books https://archive.org/details/texts?query=Shashi+tharoor+ ________________ ईमेल टाकून अकाउंट करा . मग पुस्तक पूर्ण दिसेल. कॉपीराइटेड असली तरी वाचकांसाठी खास उपलब्ध केली आहेत archive dot org वर फ्री. डाउनलोड कॉपी नाही.

सौंदाळा 14/08/2023 - 19:27
व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ' नावाचे गांधीहत्येनंतरेचे छोटेखानी पुस्तक आज सकाळीच वाचून संपवले. गांधीहत्येनंतर पुण्यात दंगे, खानावळी, डबे बंद झाल्यामुळे सडेफटींग असलेले दोन ब्राह्मण मित्र सातार्‍याजवळच्या त्यांच्या गावात जातात. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होते. त्यांचा छोट्या खेड्यांमधून घरी पोचेपर्यंतचा प्रवास, अधेमधे येणारे अनुभव आणि शेवटी घरी पोचल्यावर झालेली बातचीत वगैरेचे परिणामकारक चित्रण आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 24/08/2023 - 17:33
वावटळ वाचायला हवे, गांधी हत्येनंतरचे वातावरण डॉ आनंद यादवांच्या "नांगरणी" आत्मकथन कादंबरीत नुकतंच वाचलंय !

मला रीडर्स ब्लॉक आलाय. मराठीतलं काहीच वाचवत नाही. एकदोन पानं वाचली की बोअर होतं. नवीन काहीच हातात घेऊ वाटत नाही. सगळीकडे तेच ते रटाळ आहे. ओरिजिनल काहीच नाही. इंग्रजी वाचनाची सवय नाही त्यामुळे तिकडेही बोंबाबोंब! कसा मिळवायचा परत वाचनाचा आनंद? रोजच्या कम्यूटमध्ये जवळ जवळ २० टक्के लोक चक्क हातात पुस्तकं घेऊन वाचताना रोज पाहतो. क्वचित काही मंडळी चक्क कविता बिविता लिहिताना दिसतात पेन घेऊन. विशेषतः तरुण, टीनेजर मंडळी मुद्दामहून जाडजूड पुस्तकं हातात घेऊन वाचत बसली असतात. गावची लायब्ररी नेहमी बिझी असते. लाखभर पुस्तकं आहेत. नुसतं आत गेलं तरी प्रसन्न वाटतं. हे सगळं पाहिलं की किंडल उघडून मराठी पुस्तकं शोधत बसतो. काहीच हाताला लागत नाही. खूप बंडल वाटतं. कालच्या प्रवासात एक सत्तरीतली म्हातारी 'ए आय' असं लिहिलेलं पुस्तक वाचत बसली होती. थोडक्यात म सोशल मिडिया, ए आय यावरची माहिती देणारी पुस्तकं अस्तात तस्लं कोणतंतरी प्रायमर होतं. आयला उत्सुकतेला देखील कसली शिस्त म्हणायची ही!! काहीतरी सुचवा राजेहो. काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/08/2023 - 06:46
वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे निकाल वाचा. अनेकदा दोनशे तीनशे पानांचे असतात. अतिशय रोचक असतात. गाजलेले एकेक खटले शोधा. लिस्ट करा. नानावटी केस(पब्लिकमध्ये अत्यंत गाजलेली), डॉ लागू (रेल्वे खून केस, ज्यात कोणताही थेट पुरावा किंवा साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे ध्यानात घेऊन कोर्टाने फाशीची शिक्षा दिली) ज्या मुद्देसूदपणे घटनांची मांडणी, दस्तावेजीकरण आणि वॉटरटाईट युक्तिवाद करत करत शेवटी निर्णयापर्यंत आणणे ही रचना अत्यंत वाचनीय ठरू शकते. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी हे आहेच. केवळ फौजदारी खटले वाचावेत असे नाही. अत्यंत महत्वाचे दिवाणी खटले देखील रोचक असू शकतात. ऑनलाईन सर्व उपलब्ध असते. याच जॉनरमध्ये काही घटनांवरील कमिटी रिपोर्ट्स पण वाचायला आवडू शकतात. उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे. हेच सर्व NTSB च्या विमान अपघात इंवेस्टिगेशन रिपोर्टमध्ये देखील असते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 15/08/2023 - 11:59
नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व.
+१००० हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात 👍 अवांतर: अमेरिकेनेच निर्माण केलेला ओसामा बिन लादेन नावचा राक्षस त्यांच्यावरच उलटल्याने त्या ओसामा बद्दलही जशी कुठली सहानुभुती नाही तशीच त्या घटनेबाबत एक देश म्हणुन अमेरिकेविषयीही काडीची सहनुभुती नाही, पण हकनाक जिव गमावलेल्या आणि अपंगत्व आलेल्या हजारो निरपराध नागरिकांबद्दल मात्र विलक्षण सहानुभुती आहे! पण काय ते नाईन इलेव्हनच्या घटनेचे प्लॅनिंग आणि काय ते प्रोफेशनली केलेले त्याचे एक्झिक्युशन, थक्क व्हायला झाले होते हा रिपोर्ट वाचुन. इतकेच नाही तर 'मोहम्मद अट्टा' ह्या त्या घटनेतली प्रमुख पात्राला केंद्रस्थानी ठेवत, त्याच्या मनोभुमिकेतुन ह्या घटनेवर एखादी पटकथा टाइप दिर्घकथा लिहावी अशा विचारानेही काहीकाळ मला पछाडले होते!

In reply to by टर्मीनेटर

नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. +१००० हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात >>>> हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

In reply to by गवि

उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे.
>>> हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म 15/08/2023 - 15:05
काही दिवसांपूर्वी अभिराम भड़कमकर यांच्या दोन कादंबर्या एकामागून एक वाचल्या.अॅट एनी कॉस्ट आणि ईन्शाअल्लाह. दोन्ही वाचत रहाव्या अशा वाटल्या आणि मराठीतील काही सघन, अस्सल वाचल्याचा अनुभव आला. मी सांगलीचा असल्यामुळे ईन्शाअल्लाह मधली कोल्हापूरी भाषेचा खास आस्वाद घेऊ शकलो. तसेच आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रहही अलिकडेच वाचला. वरीय शिफारशी जरूर वाचा असे सांगेन.

कंजूस 15/08/2023 - 05:25
नवीन? काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल. Readwhere app यावर काही हिंदी,मराठी,इंग्रजी,कोकणी पेपर्स मिळतील. Jionews app -यावर काही मासिके, साप्ताहिके आहेत. विविध विषय.प्रवासात चाळायला उत्तम.

मनो 15/08/2023 - 09:15
How Prime Ministers Decide हे पुष्कळ जाहिरात झालेलं पुस्तक गेल्या आठवड्यात वाचून संपवलं. चांगलं आहे, पण गाजावाजा झालाय, तितके नाही. त्याआधी मराठीत दादा कोंडके - एकटा जीव वाचलं. शक्यतो kindle वरती घेऊन वाचतो. पुस्तकं लगेच मिळतात, कुठेही वाचता येतात आणि घरातील जागा व्यापत नाहीत.

टर्मीनेटर 15/08/2023 - 11:18
थोडक्यात करुन दिलेला पुस्तक परिचय आवडला 👍 गेल्या काही वर्षांत कमी कमी होत आता माझे पुस्तक वाचन पुर्णपणे बंद झाले आहे, सध्या जे काही वाचन होते ते फक्त डिजिटल माध्यमापुरतेच मर्यादीत राहीले आहे. २०२० मध्ये वाचनाचा चष्मा लागल्या पासुन तर छापिल पुस्तक वाचावेसेच वाटत नाही, पण त्यामुळे काही गमावल्यासारखे देखिल वाटत नाही हे विशेष! पुस्तक वाचन थांबल्याने चित्रपट पहाण्यासाठी चांगला वेळ मिळु लागला आणि आता त्यासाठी भरपुर पर्यायही उपलब्ध असल्याने त्यातच जास्ती मजा वाटते.

“घे भरारी” हे ऊद्योगपती/कंत्राटदार श्री बापू कदम ह्यांचं पुस्तक विकत घेऊन वाचलं, एक मराठवाड्याच्या खेड्यातील मूलगा डिप्लोमा मॅकेनीकल करून किर्लोस्कर वगैरे कंपनीत काम करून स्वतची कंपनी काढतो नी मोठा ऊद्योग ऊभा करतो. ऊद्योग ऊभा करताना आलेल्या अडचणी, कंपनी/फर्म ऊभ्या करताना आलेल्या अडचणी, त्यावर काढलेले तोडगे नक्कीच वाचनीय आहेत. ही बापू कदम ह्यांची आत्मकथा आहे. त्यांनी फेसबूक वर मित्रांच्या आग्रहाखातर लिहायला घेतलं होतं. पण २५-३० भाग झाल्यावर त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळाली व नंतर त्यांनी चेपूवरील लेख ऊडवून पुस्तक छापलं. पुस्तक अतिशय छान आहे. पुस्तकाच्या शेवटी आर्थीक व्यवहार कसे करावेत ह्यावर ऊत्तम मार्गदर्शन आहे. नेमकं आर्थीक व्यवहारात आपण कूठे फसतो हे त्यांच्या पुस्तकातून कळते. नक्की वाचावे असे आहे. हे ऐकमेव पुस्तक आहे जे मी दोन वेळा वाचलेय.

अदित्य सिंग 15/08/2023 - 14:21
"द विट ऑफ क्रिकेट" - बॅरी जॉन्स्टन... क्रिकेट आवडत असेल तर वाचायला मजा येईल... अर्थात ईंग्लिश काउंटी क्रिकेटचे जास्ती संदर्भ आहेत.. तसेच ४० ते ८० दशकातील असल्याने भारताबद्दल पुर्वीचे समज वगैरे वाचायला विचित्र वाटतात... पुस्तकात खास करुन फ्रेड ट्रुमन यांचे अन डिकी बर्ड यांचे किस्से वाचायला जास्ती मजा येते.... https://www.amazon.in/WIT-CRICKET-Barry-Johnston/dp/0340978899/ref=sr_1_1?crid=1C8UJOEJG3KVJ&keywords=the+wit+with+cricket&qid=1692089130&sprefix=the+wit+with+%2Caps%2C1157&sr=8-1 आता "कारगिल - अनटॉल्ड स्टोरीज फ्रोम द वॉर" वाचायला सुरुवात केली आहे.. पहिलच प्रकरण वाचुन (कॅ. सौरभ कालिया यांचा पाकिस्तानी जवानांनी केलेला छळ) खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले... https://www.amazon.in/Kargil-Stories-Rachna-Bisht-Rawat/dp/0143445847/ref=sr_1_2?crid=1XJ05O2KDU435&keywords=kargil+rachana+bisht&qid=1692089303&sprefix=kargin+rachana+bisht%2Caps%2C263&sr=8-2

प्रचेतस 15/08/2023 - 15:13
प्रख्यात कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांची 'वंशवृक्ष' वाचायला सुरुवात केलीय. ह्या आधीही वंशवृक्ष वाचली होती पण त्याला सुमारे वीस पंचवीस वर्षांचा काळ उलटून गेल्याने ती जवळपास विस्मृतीत गेली होती. आता पुन:र्वाचनाने ती नव्याने गवसत आहे. भैरप्पा यांचे 'मंद्र' सोडता जवळपास सर्वच पुस्तके मजकडे आहेत. मंद्र ग्रंथालयातून आणून वाचलेले होते पण फारसे आवडले नव्हते.

कंजूस 16/08/2023 - 12:02
William Dalrymple books White mughals https://archive.org/details/in.ernet.dli.2015.242607/page/n9/mode/1up -------------------- William Dalrymple books https://archive.org/search?query=Dalrymple+William+ इथे मिळतील. त्यापैकी The Last Mughal https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr city of Djiinns: A Year of Delhi https://archive.org/details/cityofdjinnsyear0000dalr_f7j0 Koh-i-noor the history of the world's infamous diamond https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr ((अहमदशह अब्दाली कोण होता हे कोह-इ-नूर पुस्तकात वाचता येईल. Koh-i-noor the history of the world's infamous diamond https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr ))

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:23
(काही दिवसांनी) हि पुस्तके वाचायला आवडतील 👍 काल गवि साहेबांनी नाईन इलेव्हनचा विषय काढुन त्यावर काहीतरी दिर्घलेखन करण्याचा माझा बासनात गुंडळला गेलेला विचार पुन्हा वर काढला आहे. ते लेखन कधी पुर्ण होइल ह्याची कुठलीही हमी नसताना निदान त्याला सुरुवात तरी करावी असा विचार आता पक्का झाला आहे आणि त्यासाठी आता प्राधान्यक्रमानुसार पुन्हा एकदा तो प्रदिर्घ रिपोर्ट वाचणे आले 😀

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 16/08/2023 - 16:11
अमेरिकन सिनेमे रशियाचे पुतीन (किंवा आणखी कुणी असेल) म्हणाले होते की हॉलिवूडचे निर्माते सिनेमे काढतात,रशियन करामतींवर कसा हल्ला करून निकाल लावला हा त्यांचा आवडता विषय. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. पण नाइन इलेवनसाठी अतिरेकी मंडळींनी जो काही प्लान राबवला तो हॉलिवूड सिनेमांना दणका देणारी सत्य घटना होती. पुढे २०११ मध्ये ओबामांच्या काळात पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकी कमांडोंनी लादेनची जी मोहीम राबवली ती ही आंतरराष्ट्रीय राजकारणात आश्चर्यकारक होती. त्याबद्दल ओबामानेच त्यांच्या अ प्रॉमिस्ड लँड(२०२० नोव्हेंबर) (१/२)पुस्तकात लिहिलं आहे ते सविस्तर वाचता आलं. इतर पुस्तकांबद्दल बोलायचं तर टीका https://observer.com/2020/11/president-obama-memoir-a-promised-land-review/ इथे. दुसरा भाग यावर्षी येईल म्हणतात. पण त्यात सगळ्या आरोपांना कठोर उत्तरं असतील. ओबामा संसदीय वकीली शिकला आहे आणि तसेच त्यांची भाषाही ओघवती आहे. विशेष म्हणजे निरनिराळ्या देशांतील मुख्य नेत्यांच्या कुंडल्याही दिल्या आहेत. त्यात आपले राहूल गांधीही आहेत. त्या समिक्षा प्रेसिडेंट खात्याच्या आहेत का ओबामांच्या स्वतःच्या सांगता येत नाही. Dreams from My Father and The Audacity of Hope, ही वाचली. छान आहेत.

In reply to by टर्मीनेटर

The Report (styled as The Torture Report) is a 2019 American historical political drama film written and directed by Scott Z. Burns that stars Adam Driver, Annette Bening, Ted Levine, Michael C. Hall, Tim Blake Nelson, Corey Stoll, Maura Tierney, and Jon Hamm. The plot follows staffer Daniel Jones and the Senate Intelligence Committee as they investigate the Central Intelligence Agency's use of torture following the September 11th attacks. It covers more than a decade's worth of real-life political intrigue, exploring and compacting Jones's 6,700-page report.

In reply to by आंद्रे वडापाव

कंजूस 16/08/2023 - 20:14
लादेन मोहिमेचं वर्णन विकिपेजवर आहेच. पण ओबामांचे पुस्तक आल्यावर त्याचे कथानक पाहून विकिपेज अद्ययावत केले किंवा ही माहिती अगोदरच बाहेर फुटली होती ते आता कळायला मार्ग नाही. सैन्याच्या (झालेल्या )योजना प्रकाशित कोण करू शकतो आणि किती वर्षांनी यांचे नियम काय. सैनिकांनी गुप्ततेची शप्पत घेतलेली असते.

राजाभाउ 17/08/2023 - 12:10
स्टीफन किंग च Shawshank Redemption ही दिर्घकथा वाचली नुकतीच, (कथेचे पुर्ण नाव Rita Hayworth and Shawshank Redemption), सिनेमा हा कथेचा जवळ जवळ जस ते तस adoption आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकरांचा "जागर" मधील एक लेख वाचला (सेक्युलिरिझम आणि इस्लाम) आणि आता "शिवरात्र" मधील "गोळवळकर गुरुजी आणि गांधिजी" हा लेख वाचत आहे. ही पुस्तकं साधारण ७० च्या आसपसची आहेत पण संदर्भ जवळ जवळ आज ही लागू आहेत.

कंजूस 17/08/2023 - 12:27
नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक म्हणून खुशवंत सिंग प्रसिद्ध होते. पंचवीस एक पुस्तकं आहेत. ट्रेन टु पाकिस्तान गाजलेलं. एखादं वाचून लेखक आवडल्यास इतर पाहता येतील. एक आत्मचरीत्रही आहे. परंतू ज्या पुस्तकांमुळे खुशवंत उदयास आले ते 'हिस्ट्री ओफ सिखिझम' दोन मोठे खंड आहेत. ते माझे वाचायचे बाकी आहेत.

In reply to by कंजूस

माझ्या पाविपत जिंकतो तर (http://misalpav.com/node/46116) धाग्या वेळी मी पानिपत युध्दाबद्दल इतर राज्यातील लोकांची मते काय हे वाचत होतो तेव्हा खुशवंत सिंग ह्यांचं पानिपताबद्दलचं नत सापडलं. त्यांनी लिहीलं होतं की पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>>पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी….. अरे देवा...! ज्योतीषशास्त्राचा अभ्यास अजूनही परफेक्ट नै असे वाटते. ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा पण पकडल्या गेले. -दिलीप बिरुटे

स्वधर्म 17/08/2023 - 15:38
नुकतेच जेम्स सुझमन यांचे ‘Work The History of How We Spend Our Time’ हे पुस्तक वाचले. ज्यांनी युवाल हरारी यांचे सेपियन्स वाचले असेल त्यांना अधिक रस वाटेल असे पुस्तक आहे. लेखक हे सोशल आंथ्रापोलॉजिस्ट असल्याने त्यांनी अगदी उत्क्रांतीपासून माणसाच्या ‘कामा’चा उगम कसकसा होत गेला हे भरपूर पु्रावे देऊन सांगितले आहे. एवढा विस्तिर्ण कालपट जेंव्हा समोर येतो, तेव्हा आजची मानवी आव्हाने खूप तात्कालिक आणि बिनमहत्त्वाची वाटू लागतात. आपण हे जे करतो त्याला फार सिरियसली घेऊ नये असे लेखकाला सुचवायचे आहे. पुस्तकात इतके रोचक संदर्भ येतात, की तेच वाचत एक वर्ष निघून जाईल असे वाटते. लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पुस्तकाबाबत, पण आवरतो.

जेपी 21/08/2023 - 20:51
धागा पाहून आठवलं अश्यात काही वाचलं नाही मिपा सोडून. मग आसपास शोध घेतला तर एस एल भैरप्पा यांची गृहभंग सापडली. कादंबरी जुनीच आहे 80-81 सालची. पण आता पुनर्मुद्रण केलं आहे. नेहमप्रमाणेच अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. वाचाण्या सारखी आहे बाकी परिचय करून देता येणार नाही.

In reply to by जेपी

कंजूस 22/08/2023 - 04:40
गृहभंग वाचली आहे. मोठ्या होत जाणाऱ्या कुटुंबातील भांडणं याशिवाय काही नाही. कुटुंब कर्नाटकातील आहे, त्यांचे प्रश्न आणि समाज इतर ठिकाणी नसतात.

In reply to by अहिरावण

कंजूस 23/08/2023 - 16:56
छान . पुस्तके वाचण्यासाठी एक मोठ्या स्क्रीनचा टॅब शोधत होतो. Archive org वर काही चांगली कॉपीराइट फ्री पुस्तके pdf scan copy मिळतात ती मोबाईलवर वाचता येत नाहीत. आताच वर दिलेलं Albert Camus (उच्चार अल्बेह कम् यू)चं मूळ 'The stranger ' घेतलं. टॅबवर छान वाचता येत आहे. --------------- रीअलमी pad 2 - tab हल्लीच Flipkart वरून घेतला. Made in china. Color UI 4 based on ANDROID 13 आहे. ( १ ऑगस्ट २०२३ ला आला). 6*+128(20k), 8*+256(23k) दोन मॉडेल्स आहेत. इन्स्पिरेशन ग्रीन कलर छान आहे. दहा गुणीले सहा इंच दृष्य मोठी खिडकी मिळते. 450nits brightness. इतर प्लस पॉइंटस - Mtk g99 processor - 3'60k Antutu score. Medium gaming ok. Android 13 ready. Play store वरची सगळी apps मिळतात. No bloatware, no ads. 256 gb पैकी फक्त 17 gb used for OS and imp Google apps. --------------- Tab साठीचे यूट्यूबवर रिव्ह्यू मागच्या वर्षीपासून पाहिल्यावर लक्षात आले की प्युअर Android देणाऱ्या मोटोरोलामध्ये वाईफाई प्लस कॉलिंग आहे पण फोनचीच स्क्रीन मोठी केली आहे. Customized नाही. Tab साठीची गूगल ने काढलेली Android 12 L अजून फक्त नेक्सस फोल्डेबल फोनलाच दिली आहे. कधी येईल माहीत नाही. इतर काही Tab मध्ये कॉलिंग सिम सोय नाही. ______________________ या रीअलमी tab 2 मध्ये दोन विंडो, तीन tabs एकाचवेळी चालतात. फास्ट आहे. Customisation भारी आहे. जियो न्यूज appमध्ये इंडिया टुडे साप्ताहिक मोबाईलवर वाचण्यासाठी जड जाते. शिवाय हल्लीच त्यांनी डाऊनलोड ओप्शन मोबाईल appमधून काढला आहे. म्हणजे वारंवार नेट वापरायला हवे. डाऊनलोड करून प्रवासात वाचता येणार नाही. स्क्रीनशॉटही घेता येत नव्हता. पण रिअलमी pad 2 मध्ये डाऊनलोड ओप्शन आहे, स्क्रीनशॉटही घेता येतो. मोठं पान वाचता येतं. माईनस पॉईंटस - १) 3.5 mm audio socket/jack नाही. पण ४ Dolby Atmos speaker चांगले आहेत. २) OTG USB कनेक्ट होत नाही. पण nearby share किंवा InShare वापरून फाईल्स ट्रान्स्फर करता येत आहेत. ३) ओएस अपडेट्स Android 14? याचा वादा केलेला नाही पण सिक्युरिटी अपडेट्स येत आहेत.एक आली. __________________ त्यातला त्यात बरा आहे. यापुढे आणखीही चांगले (5G) येतील. Tab (Android) आणि कंपूटर (Microsoft) या दोन स्वतंत्र वेगळ्या वस्तू आहेत. एकमेकांना बाद करून शकत नाहीत. (Acer extensa, I3 12th gen N305,8+512ssd PCIe ,३५ह कंपूटर ठीक वाटतोय.) माहिती नेट वरची आहे, सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत.

कंजूस 24/08/2023 - 16:56
The stranger Albert Camus. वाचलं. लेखकाच्याकडून एक हत्या होते. खटला चालतो. वकिलांची तपासणी,उलट तपासणी. मग कोर्ट दोषी ठरवते. फाशी. इथपर्यंतचे घटना, विचार लेखक स्वतः सांगतो. साधी सोपी भाषा आणि एकूण तुरंगातले विचार. बरंय.

In reply to by कंजूस

अहिरावण 24/08/2023 - 20:00
अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/The_Stranger_(Camus_novel) त्यातुन उद्धृत : Considered a classic of 20th-century literature, The Stranger has received critical acclaim for Camus' philosophical outlook, absurdism, syntactic structure, and existentialism (despite Camus' rejection of the label), particularly within its final chapter.[3] Le Monde ranked The Stranger as number one on its 100 Books of the 20th Century.[4] The novella has twice been adapted for film: Lo Straniero (1967) and Yazgı (2001), has seen numerous references and homages in television and music (notably "Killing an Arab" by The Cure) and was retold from the perspective of the unnamed Arab man in Kamel Daoud's 2013 novel The Meursault Investigation. तसेच In his 1956 analysis of the novel, Carl Viggiani wrote: On the surface, L'Étranger gives the appearance of being an extremely simple though carefully planned and written book. In reality, it is a dense and rich creation, full of undiscovered meanings and formal qualities. It would take a book at least the length of the novel to make a complete analysis of meaning and form and the correspondences of meaning and form, in L'Étranger.[5] Victor Brombert has analysed L'Étranger and Sartre's "Explication de L'Étranger" in the philosophical context of the Absurd.[6] Louis Hudon dismissed the characterisation of L'Étranger as an existentialist novel in his 1960 analysis.[7] The 1963 study by Ignace Feuerlicht begins with an examination of the themes of alienation, in the sense of Meursault being a 'stranger' in his society.[8] In his 1970 analysis, Leo Bersani commented that L'Étranger is "mediocre" in its attempt to be a "'profound' novel", but describes the novel as an "impressive if flawed exercise in a kind of writing promoted by the New Novelists of the 1950s".[9] Paul P. Somers Jr. has compared Camus's L'Étranger and Sartre's Nausea, in light of Sartre's essay on Camus's novel.[10] Sergei Hackel has explored parallels between L'Étranger and Dostoyevsky's Crime and Punishment.[11] आपण वेळ काढून वाचलात त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by कंजूस

स्वधर्म 24/08/2023 - 20:54
खून दिवसांपूर्वी वाचलं होता असं वाटतं. नायकाला एक प्रेयसी असते, आईचा दूरच्या गावात मृत्यू होतो, एका शेजार्याचे कुत्रे हरवलेले इ. अशी कथा असेल तर वाचले होते, पण त्याला ग्रेट का म्हणतात ते समजले नव्हते.

In reply to by स्वधर्म

कंजूस 25/08/2023 - 01:13
हेच ते पुस्तक. आपण,वाचक, किंवा मी पुस्तकाची रूपरेषा (gist) दहा ओळीत सांगतो पण ( १)त्यातील घटना, पात्रं ,त्यांचे संवाद "मनुष्याच्या जगण्याच्या आणि एकमेकांशी संपर्क/संबंध ठेवण्याच्या 'प्रवृत्ती' व्यक्त करतात. (२) मनुष्य हा रूढार्थाने समाजप्रिय आहे,समाजात राहतो तरीही तो एकटाच असतो. एकटेपणा टाळण्यासाठी खटपट करतो. (३) काही लाभासाठी तो इतरांशी संपर्क ठेवतो पण तेच लोकही याच नियमाने बांधलेले असतात व गुप्त संघर्ष सुरू असतो. मित्रप्रेमाला जागणारे ही कुणाला तरी शत्रू मानतात. (४)प्रत्येकजण आपल्या स्वार्थापुरता घटनेपुरता विचार करत असतो. (५)आईचं शेवटचं दर्शन घेणं टाळणे,सिगारेट पिणे,न रडणे या सर्व गोष्टींकडे पुढे हत्येच्या खटल्यात 'एक निर्ढावलेला थंड रक्ताचा गुन्हेगार' म्हणून पाहिलं जातं. तर अशा आरोपीस 'In the name of French people....' must be hanged. ( Why not German or British?) ही आणि अशी बरीच तत्वं किंवा existansialism नावाचं लेबल जोडलेला विषय रूक्षपणे चर्चा न करता कथानकात लेखक मांडतो ते कथा वाचताना जाणवत राहातं. हेच लेखनाचं सामर्थ्य. दुसरं एक वेगळं उदाहरण द्यायचं तर बालकवींची 'औदुंबर' नावाची छोटीशी वर वर निसर्ग कविता वाटणारी शेवटच्या दोन ओळींत,एका शब्दात ('असला') खूप मोठं तत्वज्ञान सांगून जाते. जे हजारो पानांचं विवेचन सांगू शकणार नाही. किंवा इतर लेखक,कवींना मांडता येत नाही आणि 'दुर्बोध' नावाचा शिक्का बसतो.

कंजूस 28/08/2023 - 06:29
महाभारत जालावर कुठे मिळेल. कोणते चांगलं? मराठी http://www.esahity.com (या साईटवर >> धार्मिक पाहा. साईट बरीच जुनी आहे पण त्यांनी https secure केलेली नाही अजून. तरी सेफ आहे.) इथे मराठीतले खंड आहेत.फ्री डाऊनलोड. ......... Google search "महाभारत book pdf" खूप साईट्स येतात. फ्री डाऊनलोड. archive dot org वर कॉपी आहे ती ,गोरखपूर गीता प्रेस प्रकाशित आहे तीच इतर साईटवाले देतात. हिंदीत आहे. बरीच पुस्तके आहेत पण चांगले कोणते किंवा काय हे अभ्यासूंनी सांगावे. सामान्य वाचकांस एवढा वेळ नसतो.

कंजूस 28/08/2023 - 06:33
Sanjeev sabhlockcity यांचं डिजिटल पीडीएफ २८० पानी इंग्रजी घेतलंय. ते मोबाईल Kindle appवर वाचणं सोपं पडेल. त्या appवर डिक्शनरी असते. प्रवासात उपयोगी. ((लहानपणी मी सी. राजगोपालाचारी यांचं छोटंसं पुस्तक (महाभारत ५००पाने आणि रामायण,इंग्रजी) वाचलं होतं. तेवढं पुरेसं झालं. ))

छान ओळख. कादंबरी मिळाली तर वाचेनच. पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो. प्रवीण बांदेकरांचं 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' सुरु केलं ठेवलं. मग मसापच्या कार्यक्रमात राजू बाविस्करांचं 'काळ्यानिळ्या रेषा' आत्मकथन घेतलं काही पानं वाचली ठेवलं. समीक्षेबद्दल गणेश वामन कनाटेचं 'दीर्घ' असंच राहील. अवघड झालं सगळं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 15/08/2023 - 19:12
पण सध्या नुसते पुस्तक घेतो आणि इंटरनेट, वॉट्सॅप, मुळं काही पानं वाचतो आणि ठेवतो.
--- अगदी असेच माझेही झालेले आहे. आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य... वाटले. पण याबद्दल खंतही वाटतेच. मी दोन-तीन पुस्तके वर काढून ठेवलेली आहेत, त्यापैकी एकादे अधून मधून थोडेसे वाचतो. हा धागा खूप महत्वाचा आहे. पुढे कधी पुन्हा वाचू लागलो तर यात रिकमंडिलेली पुस्तके वाचायची असा निश्चय सध्या करत आहे (तेवढेच जरा समाधान)

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 16/08/2023 - 06:29
वाटसपचा दुरुपयोग वाढला आहे. आपल्या मित्रमंडळीतील लोकांनी फक्त त्यांनी केलेल्या,लिहिलेल्या कृती, कुटुंबातील फोटो वगैरे टाकले तर नव्वद टक्के फारवर्डेड कचरा दूर होईल. जालावरच्या रेडिमेड गुडमॉर्निंग मेसेजपेक्षा त्यांच्याच बागेतील फुलांचे फोटो टाकले पाहिजेत. डॉक्टर,इतर व्यावसायिक त्यांचेच घट्ट वाटसप ग्रूप करतात ते चर्चेसाठी. ते ठीक आहे. पुस्तके वाचायला वेळ मिळेल.

गवि 13/08/2023 - 21:56
जुन्या काळातली पण मराठीत अनुवादित पुस्तके मुद्दाम पुन्हा वर काढून वाचायला घेतली. खास उद्देश असा काही नाही. सहजच एक वेगळा प्रयोग. रॉबिन कुकचे कोमा, जेफ्री आर्चरची काही (उदा. ट्विस्ट इन द टेल), बेटी महमूदी (नॉट विदौट माय डॉटर) वगैरे. काही आगोदर वाचली आहेत. काही पहिल्यांदाच वाचली. बाकी या हाकामारीचे अल्प परीक्षण चांगले लिहिले आहे. फार म्हणजे फार पूर्वी तडकडताई नावाचे प्रकरण सांगली साईडला असायचे. रस्त्याने ती (तो) निघाल्यावर पोरे बाळे चिडीचूप असत. लपून छपून तिला बघत. आता बातम्या पाहिल्या त्यानुसार ही प्रथा पुन्हा फॉर्मात आली आहे असे वाटते. पण आता पोरे बाळे तितकीशी निरागस राहिली नसतील. सेल्फी काढत असतील तडकडताई सोबत असा अंदाज. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

प्रचेतस 14/08/2023 - 08:49
तडकडताई बद्द्ल ऐकले नहते आधी पण हे हाकामारी प्रकरण ८०/९० च्या दशकात भलतेच फेमस होते. घरोघरी दरवाजांवर खडूने तीन फुल्या काढलेल्या असत. आमच्या आजेमावशीच्या घरी हाकामारी आली अणि तिच्या मुलाला तीन हाका देऊन ती बोलवत होती ह्याची कहाणी आजी अगदी रंगवून रंगवून सांगत असे.

जी ए कुलकर्णी यांची रक्तचंदन, रमलखुणा,हिरवे रावे अमेझोन ने घरपोच केले आहे. पिंगळावेळ,काजळमाया नुकतीच संपवली आहेत. 'पर्व' किंडलवर आणी जी ए डोईजड झाले तर 'पडघवली' बेड साईड टेबलावर ठेवले आहे. कवीता वाचन चालूच आहे. नुकतीच ग्रेस यांची आई या पारंपरिक प्रतीमेला सुरुंग लावणारी एक कवीता वाचली. ग्रेसांनी असे का लिहीले असावे याचा शोध घेत आहे. सध्या एव्हढेच. आई माझी रांगोळीतील टिंब हरवली टिकली कशास पाडू दार, कराया भिंत घराची मधली... माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा ~ग्रेस @प्रचेतस, थोडक्यात केलेले पुस्तक परिचय आवडला. बकेट लिस्ट मधे टाकून ठेवतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 14/08/2023 - 05:44
माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... हि कविता वाचल्यावर मनात आलं कि गारंबीचा बापू ( श्री ना पेंडसे ) मधील बापूला जेव्हा आपल्या जन्माचे रहस्य कळते तेव्हा त्याने तर लिहिली नसेल !

In reply to by चौकस२१२

घणो चोख्खा प्रतिसाद. मातृदेवो भव:, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... असे आपले संस्कार पण या माणसांने त्याला सुरुंग लावलाय. हा कुणी साधासुधा माणुस नाही. ग्रेस,जेव्हढा वाचतोय तेव्हढे दुर्बोधतेचे वलय आणखीनच गडद होत चाललंय. स्वताच कवीने दिलेले स्पष्टीकरण, https://youtu.be/okJ_QTG73DU

ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट प्रथा” हे पुस्तक नेटवर मिळाले नी वाचले. त्या नंतर त्यांचेच “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तकही आप्पा बळवंत चौकातून विकत घेऊन वाचले. त्यानंतर मध्ये लाॅंग ड्राईव करण्याचा योग आला तेव्हा काहीतरी एकावं म्हणून तूनळी वर कादंबरी शोधली असता “ऊचल्या” ही लक्ष्मण गायकवाडांची कादंबरी आली. तीचा फक्त पहीला भाग वाचला नी ऊर्वरीत भाग ऐकायची गरजच पडली नाही. एकामागे एक असे सर्व वीस भाग संपवले. ऊचल्या/पारधी जातीत जन्मलेल्या लक्ष्मण गायकवाडांची ही आत्मकथा आहे. “मी गरीब होतो नी मला सहानूभूती द्या” असं काहीही कादंबरीत नाही तर फक्त काय घडलं हे ते सांगतात. चोरी करनारे कुटूंब असल्यामूळे त्या कुटूंबातील कुणाला नोकरी मिळायची नाही त्यामूळे चोरी करूनच पोट भरावे लागायचे, चोरी करन्यासाठी वापरल्या जानर्या युक्त्या तसेच भरमसाठ पैसा कमावूनही समाजातील पांढरपेशा जातीतील लोक तसेच पोलीस तेच पैसे त्यांच्याकडून कसे काढायचे ना चोरनारे गरीब झोपडीतच राहीले पण इतरांनी तीन मजली इमारती बांधल्या हे त्यांच्या लिखानातून दिसते. अतिशय भीषण परिस्थीती दाखवनारी ही कादंबरी आहे प्रत्येकाने वाचावीच/ऐकावीच. लिंक https://youtu.be/Ag6DElAgDb8?si=SY_H0Z0wSxpdeac5 देवदासी व नग्नपूजा ह्यावर लेख लिहायचे मनात होते पण शब्द जास्त बसले नाहीत म्हणून ऐवढेच लिहीले. ते देतो. काही दिवसांआधी जोगवा सिनेमा पाहीला होता. तेव्हा जोगत्या जोगतीनी, देवदासी ह्या प्रथेबद्दल माहीती पडले. कर्नाटकातील सौंदत्ती, जिल्हा बेळगाव इथे यल्ल्म्मा देवीला मूले मूली अर्पन केले जाण्याची प्रथा होती. त्यांचं लग्न देवीशी लावून देण्यात यायचं. हे मूलं मूली जोगवा मागून आपले पोट भरायचे. बर्याच मूली वंतर वेश्याव्यवसायाला लागायच्या. कर्नाटकातील सौंदत्ती, कोकटनूर, नी महाराष्ट्रात जत ला यल्लमाची मोठी मंदीरे आहेत. चंद्रगुत्ती ह्या शिमोग्गा जिल्ह्यातील ठिकाणी तर नग्नपूजा चालायची. वरदा नदीत आंघोळ करून चार किलोमीटर असलेल्या मंदीरापर्यंत स्त्री पुरूष नग्न होऊन जायचे,१९८६ साली कर्नाटक सराकरने ना दलीत संघर्ष सनीतीने ही प्रथा बंदं पाडली. ह्या विषयात ऊत्तम कांबळे ह्यांनी संशोधन करून “देवदासी व नग्नपूजा” हे पुस्तक लिहीले. ते मागच्या आठवड्यात एबीसी चौकातून विकत घेऊन वाचले. त्यात ह्या देवदासी प्रथेबरोबरच बरीच माहीती होती. गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यात बहूचर माता मंदीर आहे. ही देवी किन्नरांची कूळदेवी म्हणून प्रसिध्द आहे. पुर्वी पुरूषांना ह्या देवाला अर्पून किन्नर बनवले जायचे. त्याची एक प्रोसेस होती जी इथे सांगत नाही. १८९० साली बडोद्याच्या गायकवाडांनी कायदा करून हा प्रकार बंदं केला. आज गूजरातला आलो होतो. ह्या देवीच्या मंदीरात गेलो. परिसर न्याहाळला. एका झाडाखाली बरेच किन्नर बसले होते. तिथले काही क्षणचित्रे.

In reply to by चौकस२१२

कॉमी 17/08/2023 - 18:16
अंताजी मध्ये शाक्त संप्रदायाच्या काही अघोरी पूजांचे वर्णन आहे. वर बाहुबली लिहितात आणि ती पूजा एकसारखी असते का ?

कंजूस 14/08/2023 - 05:36
ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या गोष्टी वाचलं आहे. व्यक्तिचित्रं फारच लांबवली आहेत आणि आवर्तनं वाटतात. त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय. कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं. सामाजिक बदलला तसा तो दिसण्यातही . कवी नायगावकर मुलाखतीत म्हणतात की मला बऱ्याच जणांनी सांगितलं की "निसर्गरम्य कोकण पाहा म्हणून गेलो तर झाडं आड येत होती." आता मॉल आड येतात आणि माडांच्या झावळ्यांनी डिश सिग्नल बरोबर येत नाहीत. घरांवरची कौलं फुटतात म्हणून (आणि चाकरमान्यांना परवडतो म्हणून) लोखंडी निळे पत्रे घातले (कोकणी घरपण जरा दिसावं म्हणून) पण मोबाईल रेंज घरात येत नाही. हल्लीचं कोकण विरार वसई होत आहे. असो. खरात,पाटील,माडगुळकर यांचाही घाटावरचा सामाजिक देश बदलला आहेच. रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते. किन्नरांचे जीवन एकदम हाईफाई झालं आहे. निवडणुकीत निवडून येत आहेत,आखाडे चालवत आहेत,कुंभमेळ्यात स्नानासाठी वरचा नंबर आहे,सिनेमा तसेच मालिकांत एक तरी किन्नर पात्र असला पाहिजे. त्यांचं क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धाही येतील. अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे. तर काहींनी आपणहून लेखन थांबवलं आहे याचं कौतुक केलं आहे. सिलेक्टिव मेमरी - शोभा डे (इंग्रजी आणि मराठी अनुवादही आहे.)-आत्मकथन . वाचलं. भारी. लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं. इथे आणखी लिहीन. आता एवढंच.

In reply to by कंजूस

त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर .... निरीक्षण आवडले. सहमत आहे. मी बरेच वर्ष मराठी पासून दूर असल्याने जुनी पुस्तके काढून वाचतोय. काही भावतात काही कंटाळवाणी. लेख लिहा,समयोचित ठरेल.

In reply to by कंजूस

प्रचेतस 14/08/2023 - 11:06
त्यांच्याकडे नावीन्य दिवाळींनंतरच्या फुटणाऱ्या फटाक्यासारखं झालंय.
गुप्तेंनी मतकरींचा वारसा यथार्थपणे चालवलाय असं वाटतं. गुप्तेंच्या कादंबर्‍यांत भय गूढाबरोबरच वासनेची एक छटा कायम असते. गोठण्याच्या गोष्टी वाचायचंय पण ते केवळ व्यक्तिचित्रात्मक पुस्तक आहे त्यामुळे अजून घेतलं नाहीये.
कोकण - जयवंत दळवी, पेंडसे यांच्या वर्णनातला आता राहिला नाही असं वाटतं.
हे तर साहजिकच आहे. बदल हा जीवनातला स्थायीभावच आहे. कोकणचे अजून सुरेख वर्णन करणारे लेखक म्हणजे मधु मंगेश कर्णिक. दळवी, पेंडश्यांचा कोकण हा रत्नागिरीतला, दापोली मुरुड परिसरातला तर कर्णिक आपल्याला सिंधुदुर्गात घेऊन जातात. तळकोकण मात्र अजूनही आहे तसेच आहे. विशेषतः मोठी गावे सोडून. पर्यटनामुळे खूप बदल झालेले दिसतात.
रामायण,महाभारतातल्या पात्र आणि घटनांवर नवीन बाजूने पाहताना वगैरे कोणत्याच लेखकांचं आवडत नाही. भैरप्पा असो वा दुर्गा भागवत. त्या गोष्टी एकदा लहानपणी वाचल्यावर नंतर त्यात भर घालणे कंटाळवाणे वाटते.
अगदी खरं. हे दोन्ही महाग्रंथ मूळातूनच वाचलेले उत्तम. त्यांच्यावरच्या कादंबर्‍या तर वाचू नयेत असेच मत आहे. मात्र टीकात्मक ग्रंथ दुर्गाबाई, इरावतीबाई, कुरुंदकर यांचे उत्तम आहेत.
लॉर्ड्स ओफ डेक्कन - अनिरुद्ध कनिसेट्टींचं वाचलं. कामाचं.
हे तर अगदी जबरदस्त आहे. ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, ज्यांनी बदामी, हंपी, वेरुळ, महाबलिपुरम, राजराजेश्वरम मंदिरे बघितली आहेत त्यांना तर अगदी थेट भिडेल.

In reply to by कंजूस

राजाभाउ 17/08/2023 - 11:54
अशोक शहाणे लिखित नपेक्षा पुस्तकात बऱ्याच लेखकांची लेखनाची चिरफाड केली आहे. आत्ताच याच मलप्रुष्ठ आणि अनुक्रमाणिक पाहीली amazon वर, जबरा दिसतय लगेच मागवतो. धन्यवाद. अशोक शहाणे यांचे "धाकटे आकाश" नावाच पुस्तक फार पुर्वी वाचल होत, फार भारी पुस्तक होत ते.

मी नुकतीच जीएंची दोन पुस्तके (रक्तचंदन आणि रमलखुणा) वाचून संपवली आहेत. ती अजून डोक्यात ठाण मांडून बसलीयेत त्यामुळे लवकर दुसरी पुस्तके हातात येतील असं वाटत नाही. पण, काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्याव सुचत नाहीये. :( भयकथा/कादंबरी आवडीचा विषय नसल्याने हाकामारी कदाचित नाही आवडणार. हलकं फुलकं काही असेल तर सुचवा. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

प्रचेतस 14/08/2023 - 13:56
हलकं फुलकं काही असेल तर सुचवा.
हलकं फुलकं म्हणजे सुशिंची 'बरसात चांदण्यांची' एकदम मस्त. आमचा एक मिपाकर मित्र त्यातल्या गंधालीच्या प्रेमात पडला होता. गंभीर तरीही उत्तम वाचावयाचे असेल तर महाबळेश्वर सैल यांची 'तांडव' अवश्य वाचलीच पाहिजे.

In reply to by प्रचेतस

सुशी म्हणजे विषयच संपला. आता हे पुस्तक शोधणे आले. उद्याचा मुहूर्त चांगला आहे. बघूया कसं होतंय. :) सं - दी - प

'एकाला बोलो रे' - शिरीष काणेकर (वाचून होईल शेवटचा चॅप्टर चालू आहे ) 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन' - अनिरुद्ध कणिसेत्तिं - अनुवाद मीना संभूस - सुरु करणार या विकेंडला ..

प्रचेतस यांनी सुचवल्याने आणले आहे, पण वाचनाचा वेग फारच मंदावलाय, त्यामुळे लिंक लागत नाही. आता हायलायटर घेउन खुणा करत वाचतोय :) हाकामारी--परीचय आवडला. मिळवुन वाचेन. टार्गेट असद शहा-वसंत लिमये--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो वॉकिंग ऑन द एज- प्रसाद निक्ते--मागवले आहे, सावकाशीने वाचीन म्हणतो-लेखकाने सह्याद्रीच्या माथ्यावरुन सलग ७५ दिवस उत्तर ते दक्षिण भटकंती केली त्याचा वृत्तांत

कंजूस 14/08/2023 - 13:43
पेंडश्यांनी नंतर बापूच्या आईवर 'यशोदा' ही छोटेखानी कादंबरी लिहिली. बापूंची आई? नाही पाहिलं. पण गारंबिची राधा वाचलंय. एकूण कोकण चांगला उभा केला आहे. असंच पुढे न्यायचं तर किरण नगरकर (good story teller) (आवडता लेखक)यांचं जशोदा हे (इंग्रजी) पुस्तकं भारी. तसंच त्यांची इतरही पुस्तकं चांगली आहेत. त्याबद्दल @कॉमी यांनी मागे एका लेखात लिहलं आहेच. राजस्थान चांगला मांडतात. ------ गेली पंचवीस तीस वर्ष कोकणात जातोय, बदल तर आहेच पण आकर्षण कमी झाले नाही. पर्यटन म्हणून आणि ग्रूपमध्ये किंवा आयोजित सहलीत जाऊन कुठेही पाहू नये. आणि कोकण तर नाहीच. इतर राज्यांत भाषेचा ,प्रांताचा प्रश्न असतो. पण कोकणात मराठीच्या बहिणी. आपलीच लोकं. शांतपणे कौंटुबिक (एकच) फिरल्यास कोकण वेगळाच उमगतो. हा अनुभव मला आला आहे. त्यांच्या घरांत नेतात, गप्पा मारतात,आपलंसं करतात. --------- ज्यांना मध्ययुगीन दख्खनचा इतिहास समजावून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी उत्तम, आमचं थोडं उलट झालं. देवळं अगोदर पाहिली गेली, पुस्तक आता वाचलं. पण फोटो सर्वच काढले होते त्यामुळे बारीकसारीक शिल्पं अशी का ते समजलं. --------------- काहीतरी नवीन वाचायला पाहिजेच. काय घ्यावं सुचत नाहीये. -चांदणे संदीप. झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी) . ---------- मनो यांचं अज्ञात पानिपत वाचून झालंय. त्यावर लिहायचं आहेच. ----------- सुट्ट्या आहेत तर काही चांगलं वाचावं म्हणून पुस्तकं चाळली वाचनालयात आणि मंगेश राजाध्यक्ष संकलित पाच कवि सापडलं. पन्नास साठ कविता आहेतच पण माहितीही दिली आहे. कवी -केशवसूत,ना.वा.टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी. ---------

In reply to by कंजूस

झुंपा लाहिरीची पुस्तके पाहा. (इंग्रजी)
धन्यवाद कंकाका! थोडीशी माहिती घेतली नेटावर नेटाने. :) त्यातल्या त्यात एखाद्या अवार्ड विनींग पुस्तकाने सुरूवात करतो. सं - दी - प

कंजूस 14/08/2023 - 19:12
विकत घेण्याअगोदर ओनस्क्रीन इथे वाचता येतील.- Zumpa on archive 1) The Namesake https://archive.org/details/namesake0000lahi/mode/1up 2)The Interpreter of Maladies https://archive.org/details/interpreterofmal00lahi/mode/1up दोन्ही नावाजलेली. _________________ वैचारिक हवे असल्यास शशि थरूरची पुस्तके Shashi tharoor books Archive org Shashi tharoor books https://archive.org/details/texts?query=Shashi+tharoor+ ________________ ईमेल टाकून अकाउंट करा . मग पुस्तक पूर्ण दिसेल. कॉपीराइटेड असली तरी वाचकांसाठी खास उपलब्ध केली आहेत archive dot org वर फ्री. डाउनलोड कॉपी नाही.

सौंदाळा 14/08/2023 - 19:27
व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ' नावाचे गांधीहत्येनंतरेचे छोटेखानी पुस्तक आज सकाळीच वाचून संपवले. गांधीहत्येनंतर पुण्यात दंगे, खानावळी, डबे बंद झाल्यामुळे सडेफटींग असलेले दोन ब्राह्मण मित्र सातार्‍याजवळच्या त्यांच्या गावात जातात. आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे होते. त्यांचा छोट्या खेड्यांमधून घरी पोचेपर्यंतचा प्रवास, अधेमधे येणारे अनुभव आणि शेवटी घरी पोचल्यावर झालेली बातचीत वगैरेचे परिणामकारक चित्रण आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 24/08/2023 - 17:33
वावटळ वाचायला हवे, गांधी हत्येनंतरचे वातावरण डॉ आनंद यादवांच्या "नांगरणी" आत्मकथन कादंबरीत नुकतंच वाचलंय !

मला रीडर्स ब्लॉक आलाय. मराठीतलं काहीच वाचवत नाही. एकदोन पानं वाचली की बोअर होतं. नवीन काहीच हातात घेऊ वाटत नाही. सगळीकडे तेच ते रटाळ आहे. ओरिजिनल काहीच नाही. इंग्रजी वाचनाची सवय नाही त्यामुळे तिकडेही बोंबाबोंब! कसा मिळवायचा परत वाचनाचा आनंद? रोजच्या कम्यूटमध्ये जवळ जवळ २० टक्के लोक चक्क हातात पुस्तकं घेऊन वाचताना रोज पाहतो. क्वचित काही मंडळी चक्क कविता बिविता लिहिताना दिसतात पेन घेऊन. विशेषतः तरुण, टीनेजर मंडळी मुद्दामहून जाडजूड पुस्तकं हातात घेऊन वाचत बसली असतात. गावची लायब्ररी नेहमी बिझी असते. लाखभर पुस्तकं आहेत. नुसतं आत गेलं तरी प्रसन्न वाटतं. हे सगळं पाहिलं की किंडल उघडून मराठी पुस्तकं शोधत बसतो. काहीच हाताला लागत नाही. खूप बंडल वाटतं. कालच्या प्रवासात एक सत्तरीतली म्हातारी 'ए आय' असं लिहिलेलं पुस्तक वाचत बसली होती. थोडक्यात म सोशल मिडिया, ए आय यावरची माहिती देणारी पुस्तकं अस्तात तस्लं कोणतंतरी प्रायमर होतं. आयला उत्सुकतेला देखील कसली शिस्त म्हणायची ही!! काहीतरी सुचवा राजेहो. काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 15/08/2023 - 06:46
वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे निकाल वाचा. अनेकदा दोनशे तीनशे पानांचे असतात. अतिशय रोचक असतात. गाजलेले एकेक खटले शोधा. लिस्ट करा. नानावटी केस(पब्लिकमध्ये अत्यंत गाजलेली), डॉ लागू (रेल्वे खून केस, ज्यात कोणताही थेट पुरावा किंवा साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुरावे ध्यानात घेऊन कोर्टाने फाशीची शिक्षा दिली) ज्या मुद्देसूदपणे घटनांची मांडणी, दस्तावेजीकरण आणि वॉटरटाईट युक्तिवाद करत करत शेवटी निर्णयापर्यंत आणणे ही रचना अत्यंत वाचनीय ठरू शकते. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी हे आहेच. केवळ फौजदारी खटले वाचावेत असे नाही. अत्यंत महत्वाचे दिवाणी खटले देखील रोचक असू शकतात. ऑनलाईन सर्व उपलब्ध असते. याच जॉनरमध्ये काही घटनांवरील कमिटी रिपोर्ट्स पण वाचायला आवडू शकतात. उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे. हेच सर्व NTSB च्या विमान अपघात इंवेस्टिगेशन रिपोर्टमध्ये देखील असते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 15/08/2023 - 11:59
नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व.
+१००० हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात 👍 अवांतर: अमेरिकेनेच निर्माण केलेला ओसामा बिन लादेन नावचा राक्षस त्यांच्यावरच उलटल्याने त्या ओसामा बद्दलही जशी कुठली सहानुभुती नाही तशीच त्या घटनेबाबत एक देश म्हणुन अमेरिकेविषयीही काडीची सहनुभुती नाही, पण हकनाक जिव गमावलेल्या आणि अपंगत्व आलेल्या हजारो निरपराध नागरिकांबद्दल मात्र विलक्षण सहानुभुती आहे! पण काय ते नाईन इलेव्हनच्या घटनेचे प्लॅनिंग आणि काय ते प्रोफेशनली केलेले त्याचे एक्झिक्युशन, थक्क व्हायला झाले होते हा रिपोर्ट वाचुन. इतकेच नाही तर 'मोहम्मद अट्टा' ह्या त्या घटनेतली प्रमुख पात्राला केंद्रस्थानी ठेवत, त्याच्या मनोभुमिकेतुन ह्या घटनेवर एखादी पटकथा टाइप दिर्घकथा लिहावी अशा विचारानेही काहीकाळ मला पछाडले होते!

In reply to by टर्मीनेटर

नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. +१००० हा रिपोर्ट वाचलाय, छान तपशिलवार माहिती आहे त्यात >>>> हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

In reply to by गवि

उदा नाईन इलेव्हन घटनेवरील प्रदीर्घ रिपोर्ट. अतिशय तपशीलवार गोषवारा. नेमके काय घडले, कोण कोण , कुठे कुठे, कसे कसे, रिस्पॉन्स काय होता, किती वेळात उपाय केला गेला, काय चुकले, कुठे दिरंगाई झाली, वीक पॉईंटस्.. निष्कर्ष, सुधारणेचे उपाय असे सर्व. सहाशे पाने अंदाजे.
>>> हा रिपोर्ट इंग्रजीत आहे की मराठीत? कूठे मिळेल वाचायला? पुस्तक आहे का? की नेटवर ऊपलब्ध आहे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म 15/08/2023 - 15:05
काही दिवसांपूर्वी अभिराम भड़कमकर यांच्या दोन कादंबर्या एकामागून एक वाचल्या.अॅट एनी कॉस्ट आणि ईन्शाअल्लाह. दोन्ही वाचत रहाव्या अशा वाटल्या आणि मराठीतील काही सघन, अस्सल वाचल्याचा अनुभव आला. मी सांगलीचा असल्यामुळे ईन्शाअल्लाह मधली कोल्हापूरी भाषेचा खास आस्वाद घेऊ शकलो. तसेच आसाराम लोमटे यांचा आलोक हा कथासंग्रहही अलिकडेच वाचला. वरीय शिफारशी जरूर वाचा असे सांगेन.

कंजूस 15/08/2023 - 05:25
नवीन? काहीतरी चांगलं, नवं, ताजं, आणि महत्वाचं म्हणजे ओरिजिनल. Readwhere app यावर काही हिंदी,मराठी,इंग्रजी,कोकणी पेपर्स मिळतील. Jionews app -यावर काही मासिके, साप्ताहिके आहेत. विविध विषय.प्रवासात चाळायला उत्तम.

मनो 15/08/2023 - 09:15
How Prime Ministers Decide हे पुष्कळ जाहिरात झालेलं पुस्तक गेल्या आठवड्यात वाचून संपवलं. चांगलं आहे, पण गाजावाजा झालाय, तितके नाही. त्याआधी मराठीत दादा कोंडके - एकटा जीव वाचलं. शक्यतो kindle वरती घेऊन वाचतो. पुस्तकं लगेच मिळतात, कुठेही वाचता येतात आणि घरातील जागा व्यापत नाहीत.

टर्मीनेटर 15/08/2023 - 11:18
थोडक्यात करुन दिलेला पुस्तक परिचय आवडला 👍 गेल्या काही वर्षांत कमी कमी होत आता माझे पुस्तक वाचन पुर्णपणे बंद झाले आहे, सध्या जे काही वाचन होते ते फक्त डिजिटल माध्यमापुरतेच मर्यादीत राहीले आहे. २०२० मध्ये वाचनाचा चष्मा लागल्या पासुन तर छापिल पुस्तक वाचावेसेच वाटत नाही, पण त्यामुळे काही गमावल्यासारखे देखिल वाटत नाही हे विशेष! पुस्तक वाचन थांबल्याने चित्रपट पहाण्यासाठी चांगला वेळ मिळु लागला आणि आता त्यासाठी भरपुर पर्यायही उपलब्ध असल्याने त्यातच जास्ती मजा वाटते.

“घे भरारी” हे ऊद्योगपती/कंत्राटदार श्री बापू कदम ह्यांचं पुस्तक विकत घेऊन वाचलं, एक मराठवाड्याच्या खेड्यातील मूलगा डिप्लोमा मॅकेनीकल करून किर्लोस्कर वगैरे कंपनीत काम करून स्वतची कंपनी काढतो नी मोठा ऊद्योग ऊभा करतो. ऊद्योग ऊभा करताना आलेल्या अडचणी, कंपनी/फर्म ऊभ्या करताना आलेल्या अडचणी, त्यावर काढलेले तोडगे नक्कीच वाचनीय आहेत. ही बापू कदम ह्यांची आत्मकथा आहे. त्यांनी फेसबूक वर मित्रांच्या आग्रहाखातर लिहायला घेतलं होतं. पण २५-३० भाग झाल्यावर त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळाली व नंतर त्यांनी चेपूवरील लेख ऊडवून पुस्तक छापलं. पुस्तक अतिशय छान आहे. पुस्तकाच्या शेवटी आर्थीक व्यवहार कसे करावेत ह्यावर ऊत्तम मार्गदर्शन आहे. नेमकं आर्थीक व्यवहारात आपण कूठे फसतो हे त्यांच्या पुस्तकातून कळते. नक्की वाचावे असे आहे. हे ऐकमेव पुस्तक आहे जे मी दोन वेळा वाचलेय.

अदित्य सिंग 15/08/2023 - 14:21
"द विट ऑफ क्रिकेट" - बॅरी जॉन्स्टन... क्रिकेट आवडत असेल तर वाचायला मजा येईल... अर्थात ईंग्लिश काउंटी क्रिकेटचे जास्ती संदर्भ आहेत.. तसेच ४० ते ८० दशकातील असल्याने भारताबद्दल पुर्वीचे समज वगैरे वाचायला विचित्र वाटतात... पुस्तकात खास करुन फ्रेड ट्रुमन यांचे अन डिकी बर्ड यांचे किस्से वाचायला जास्ती मजा येते.... https://www.amazon.in/WIT-CRICKET-Barry-Johnston/dp/0340978899/ref=sr_1_1?crid=1C8UJOEJG3KVJ&keywords=the+wit+with+cricket&qid=1692089130&sprefix=the+wit+with+%2Caps%2C1157&sr=8-1 आता "कारगिल - अनटॉल्ड स्टोरीज फ्रोम द वॉर" वाचायला सुरुवात केली आहे.. पहिलच प्रकरण वाचुन (कॅ. सौरभ कालिया यांचा पाकिस्तानी जवानांनी केलेला छळ) खूप अस्वस्थ व्ह्यायला झाले... https://www.amazon.in/Kargil-Stories-Rachna-Bisht-Rawat/dp/0143445847/ref=sr_1_2?crid=1XJ05O2KDU435&keywords=kargil+rachana+bisht&qid=1692089303&sprefix=kargin+rachana+bisht%2Caps%2C263&sr=8-2

प्रचेतस 15/08/2023 - 15:13
प्रख्यात कन्नड लेखक एस एल भैरप्पा यांची 'वंशवृक्ष' वाचायला सुरुवात केलीय. ह्या आधीही वंशवृक्ष वाचली होती पण त्याला सुमारे वीस पंचवीस वर्षांचा काळ उलटून गेल्याने ती जवळपास विस्मृतीत गेली होती. आता पुन:र्वाचनाने ती नव्याने गवसत आहे. भैरप्पा यांचे 'मंद्र' सोडता जवळपास सर्वच पुस्तके मजकडे आहेत. मंद्र ग्रंथालयातून आणून वाचलेले होते पण फारसे आवडले नव्हते.

कंजूस 16/08/2023 - 12:02
William Dalrymple books White mughals https://archive.org/details/in.ernet.dli.2015.242607/page/n9/mode/1up -------------------- William Dalrymple books https://archive.org/search?query=Dalrymple+William+ इथे मिळतील. त्यापैकी The Last Mughal https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr https://archive.org/details/lastmughalfallof0000dalr city of Djiinns: A Year of Delhi https://archive.org/details/cityofdjinnsyear0000dalr_f7j0 Koh-i-noor the history of the world's infamous diamond https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr ((अहमदशह अब्दाली कोण होता हे कोह-इ-नूर पुस्तकात वाचता येईल. Koh-i-noor the history of the world's infamous diamond https://archive.org/details/kohinoorhistoryo0000dalr ))

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/08/2023 - 14:23
(काही दिवसांनी) हि पुस्तके वाचायला आवडतील 👍 काल गवि साहेबांनी नाईन इलेव्हनचा विषय काढुन त्यावर काहीतरी दिर्घलेखन करण्याचा माझा बासनात गुंडळला गेलेला विचार पुन्हा वर काढला आहे. ते लेखन कधी पुर्ण होइल ह्याची कुठलीही हमी नसताना निदान त्याला सुरुवात तरी करावी असा विचार आता पक्का झाला आहे आणि त्यासाठी आता प्राधान्यक्रमानुसार पुन्हा एकदा तो प्रदिर्घ रिपोर्ट वाचणे आले 😀

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 16/08/2023 - 16:11
अमेरिकन सिनेमे रशियाचे पुतीन (किंवा आणखी कुणी असेल) म्हणाले होते की हॉलिवूडचे निर्माते सिनेमे काढतात,रशियन करामतींवर कसा हल्ला करून निकाल लावला हा त्यांचा आवडता विषय. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. पण नाइन इलेवनसाठी अतिरेकी मंडळींनी जो काही प्लान राबवला तो हॉलिवूड सिनेमांना दणका देणारी सत्य घटना होती. पुढे २०११ मध्ये ओबामांच्या काळात पाकिस्तानमध्ये जाऊन अमेरिकी कमांडोंनी लादेनची जी मोहीम राबवली ती ही आंतरराष्ट्रीय राजकारणात आश्चर्यकारक होती. त्याबद्दल ओबामानेच त्यांच्या अ प्रॉमिस्ड लँड(२०२० नोव्हेंबर) (१/२)पुस्तकात लिहिलं आहे ते सविस्तर वाचता आलं. इतर पुस्तकांबद्दल बोलायचं तर टीका https://observer.com/2020/11/president-obama-memoir-a-promised-land-review/ इथे. दुसरा भाग यावर्षी येईल म्हणतात. पण त्यात सगळ्या आरोपांना कठोर उत्तरं असतील. ओबामा संसदीय वकीली शिकला आहे आणि तसेच त्यांची भाषाही ओघवती आहे. विशेष म्हणजे निरनिराळ्या देशांतील मुख्य नेत्यांच्या कुंडल्याही दिल्या आहेत. त्यात आपले राहूल गांधीही आहेत. त्या समिक्षा प्रेसिडेंट खात्याच्या आहेत का ओबामांच्या स्वतःच्या सांगता येत नाही. Dreams from My Father and The Audacity of Hope, ही वाचली. छान आहेत.

In reply to by टर्मीनेटर

The Report (styled as The Torture Report) is a 2019 American historical political drama film written and directed by Scott Z. Burns that stars Adam Driver, Annette Bening, Ted Levine, Michael C. Hall, Tim Blake Nelson, Corey Stoll, Maura Tierney, and Jon Hamm. The plot follows staffer Daniel Jones and the Senate Intelligence Committee as they investigate the Central Intelligence Agency's use of torture following the September 11th attacks. It covers more than a decade's worth of real-life political intrigue, exploring and compacting Jones's 6,700-page report.

In reply to by आंद्रे वडापाव

कंजूस 16/08/2023 - 20:14
लादेन मोहिमेचं वर्णन विकिपेजवर आहेच. पण ओबामांचे पुस्तक आल्यावर त्याचे कथानक पाहून विकिपेज अद्ययावत केले किंवा ही माहिती अगोदरच बाहेर फुटली होती ते आता कळायला मार्ग नाही. सैन्याच्या (झालेल्या )योजना प्रकाशित कोण करू शकतो आणि किती वर्षांनी यांचे नियम काय. सैनिकांनी गुप्ततेची शप्पत घेतलेली असते.

राजाभाउ 17/08/2023 - 12:10
स्टीफन किंग च Shawshank Redemption ही दिर्घकथा वाचली नुकतीच, (कथेचे पुर्ण नाव Rita Hayworth and Shawshank Redemption), सिनेमा हा कथेचा जवळ जवळ जस ते तस adoption आहे. त्यानंतर नरहर कुरुंदकरांचा "जागर" मधील एक लेख वाचला (सेक्युलिरिझम आणि इस्लाम) आणि आता "शिवरात्र" मधील "गोळवळकर गुरुजी आणि गांधिजी" हा लेख वाचत आहे. ही पुस्तकं साधारण ७० च्या आसपसची आहेत पण संदर्भ जवळ जवळ आज ही लागू आहेत.

कंजूस 17/08/2023 - 12:27
नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक म्हणून खुशवंत सिंग प्रसिद्ध होते. पंचवीस एक पुस्तकं आहेत. ट्रेन टु पाकिस्तान गाजलेलं. एखादं वाचून लेखक आवडल्यास इतर पाहता येतील. एक आत्मचरीत्रही आहे. परंतू ज्या पुस्तकांमुळे खुशवंत उदयास आले ते 'हिस्ट्री ओफ सिखिझम' दोन मोठे खंड आहेत. ते माझे वाचायचे बाकी आहेत.

In reply to by कंजूस

माझ्या पाविपत जिंकतो तर (http://misalpav.com/node/46116) धाग्या वेळी मी पानिपत युध्दाबद्दल इतर राज्यातील लोकांची मते काय हे वाचत होतो तेव्हा खुशवंत सिंग ह्यांचं पानिपताबद्दलचं नत सापडलं. त्यांनी लिहीलं होतं की पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>>पानिपत युध्द तीन दिवसा आधीच होनार होतं पण भाऊ साहेबांना त्यांच्या ज्योतीषाने मूहूर्त चांगला नाही तीन दिवसांनी हल्ला करा असा सल्ला दिला. आधीच ऊपासमार होनार्या सैन्याची आणखी ऊपासमार झाली नी….. अरे देवा...! ज्योतीषशास्त्राचा अभ्यास अजूनही परफेक्ट नै असे वाटते. ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा पण पकडल्या गेले. -दिलीप बिरुटे

स्वधर्म 17/08/2023 - 15:38
नुकतेच जेम्स सुझमन यांचे ‘Work The History of How We Spend Our Time’ हे पुस्तक वाचले. ज्यांनी युवाल हरारी यांचे सेपियन्स वाचले असेल त्यांना अधिक रस वाटेल असे पुस्तक आहे. लेखक हे सोशल आंथ्रापोलॉजिस्ट असल्याने त्यांनी अगदी उत्क्रांतीपासून माणसाच्या ‘कामा’चा उगम कसकसा होत गेला हे भरपूर पु्रावे देऊन सांगितले आहे. एवढा विस्तिर्ण कालपट जेंव्हा समोर येतो, तेव्हा आजची मानवी आव्हाने खूप तात्कालिक आणि बिनमहत्त्वाची वाटू लागतात. आपण हे जे करतो त्याला फार सिरियसली घेऊ नये असे लेखकाला सुचवायचे आहे. पुस्तकात इतके रोचक संदर्भ येतात, की तेच वाचत एक वर्ष निघून जाईल असे वाटते. लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पुस्तकाबाबत, पण आवरतो.

जेपी 21/08/2023 - 20:51
धागा पाहून आठवलं अश्यात काही वाचलं नाही मिपा सोडून. मग आसपास शोध घेतला तर एस एल भैरप्पा यांची गृहभंग सापडली. कादंबरी जुनीच आहे 80-81 सालची. पण आता पुनर्मुद्रण केलं आहे. नेहमप्रमाणेच अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. वाचाण्या सारखी आहे बाकी परिचय करून देता येणार नाही.

In reply to by जेपी

कंजूस 22/08/2023 - 04:40
गृहभंग वाचली आहे. मोठ्या होत जाणाऱ्या कुटुंबातील भांडणं याशिवाय काही नाही. कुटुंब कर्नाटकातील आहे, त्यांचे प्रश्न आणि समाज इतर ठिकाणी नसतात.

In reply to by अहिरावण

कंजूस 23/08/2023 - 16:56
छान . पुस्तके वाचण्यासाठी एक मोठ्या स्क्रीनचा टॅब शोधत होतो. Archive org वर काही चांगली कॉपीराइट फ्री पुस्तके pdf scan copy मिळतात ती मोबाईलवर वाचता येत नाहीत. आताच वर दिलेलं Albert Camus (उच्चार अल्बेह कम् यू)चं मूळ 'The stranger ' घेतलं. टॅबवर छान वाचता येत आहे. --------------- रीअलमी pad 2 - tab हल्लीच Flipkart वरून घेतला. Made in china. Color UI 4 based on ANDROID 13 आहे. ( १ ऑगस्ट २०२३ ला आला). 6*+128(20k), 8*+256(23k) दोन मॉडेल्स आहेत. इन्स्पिरेशन ग्रीन कलर छान आहे. दहा गुणीले सहा इंच दृष्य मोठी खिडकी मिळते. 450nits brightness. इतर प्लस पॉइंटस - Mtk g99 processor - 3'60k Antutu score. Medium gaming ok. Android 13 ready. Play store वरची सगळी apps मिळतात. No bloatware, no ads. 256 gb पैकी फक्त 17 gb used for OS and imp Google apps. --------------- Tab साठीचे यूट्यूबवर रिव्ह्यू मागच्या वर्षीपासून पाहिल्यावर लक्षात आले की प्युअर Android देणाऱ्या मोटोरोलामध्ये वाईफाई प्लस कॉलिंग आहे पण फोनचीच स्क्रीन मोठी केली आहे. Customized नाही. Tab साठीची गूगल ने काढलेली Android 12 L अजून फक्त नेक्सस फोल्डेबल फोनलाच दिली आहे. कधी येईल माहीत नाही. इतर काही Tab मध्ये कॉलिंग सिम सोय नाही. ______________________ या रीअलमी tab 2 मध्ये दोन विंडो, तीन tabs एकाचवेळी चालतात. फास्ट आहे. Customisation भारी आहे. जियो न्यूज appमध्ये इंडिया टुडे साप्ताहिक मोबाईलवर वाचण्यासाठी जड जाते. शिवाय हल्लीच त्यांनी डाऊनलोड ओप्शन मोबाईल appमधून काढला आहे. म्हणजे वारंवार नेट वापरायला हवे. डाऊनलोड करून प्रवासात वाचता येणार नाही. स्क्रीनशॉटही घेता येत नव्हता. पण रिअलमी pad 2 मध्ये डाऊनलोड ओप्शन आहे, स्क्रीनशॉटही घेता येतो. मोठं पान वाचता येतं. माईनस पॉईंटस - १) 3.5 mm audio socket/jack नाही. पण ४ Dolby Atmos speaker चांगले आहेत. २) OTG USB कनेक्ट होत नाही. पण nearby share किंवा InShare वापरून फाईल्स ट्रान्स्फर करता येत आहेत. ३) ओएस अपडेट्स Android 14? याचा वादा केलेला नाही पण सिक्युरिटी अपडेट्स येत आहेत.एक आली. __________________ त्यातला त्यात बरा आहे. यापुढे आणखीही चांगले (5G) येतील. Tab (Android) आणि कंपूटर (Microsoft) या दोन स्वतंत्र वेगळ्या वस्तू आहेत. एकमेकांना बाद करून शकत नाहीत. (Acer extensa, I3 12th gen N305,8+512ssd PCIe ,३५ह कंपूटर ठीक वाटतोय.) माहिती नेट वरची आहे, सूचना आणि दुरुस्तीचे स्वागत.

कंजूस 24/08/2023 - 16:56
The stranger Albert Camus. वाचलं. लेखकाच्याकडून एक हत्या होते. खटला चालतो. वकिलांची तपासणी,उलट तपासणी. मग कोर्ट दोषी ठरवते. फाशी. इथपर्यंतचे घटना, विचार लेखक स्वतः सांगतो. साधी सोपी भाषा आणि एकूण तुरंगातले विचार. बरंय.

In reply to by कंजूस

अहिरावण 24/08/2023 - 20:00
अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/The_Stranger_(Camus_novel) त्यातुन उद्धृत : Considered a classic of 20th-century literature, The Stranger has received critical acclaim for Camus' philosophical outlook, absurdism, syntactic structure, and existentialism (despite Camus' rejection of the label), particularly within its final chapter.[3] Le Monde ranked The Stranger as number one on its 100 Books of the 20th Century.[4] The novella has twice been adapted for film: Lo Straniero (1967) and Yazgı (2001), has seen numerous references and homages in television and music (notably "Killing an Arab" by The Cure) and was retold from the perspective of the unnamed Arab man in Kamel Daoud's 2013 novel The Meursault Investigation. तसेच In his 1956 analysis of the novel, Carl Viggiani wrote: On the surface, L'Étranger gives the appearance of being an extremely simple though carefully planned and written book. In reality, it is a dense and rich creation, full of undiscovered meanings and formal qualities. It would take a book at least the length of the novel to make a complete analysis of meaning and form and the correspondences of meaning and form, in L'Étranger.[5] Victor Brombert has analysed L'Étranger and Sartre's "Explication de L'Étranger" in the philosophical context of the Absurd.[6] Louis Hudon dismissed the characterisation of L'Étranger as an existentialist novel in his 1960 analysis.[7] The 1963 study by Ignace Feuerlicht begins with an examination of the themes of alienation, in the sense of Meursault being a 'stranger' in his society.[8] In his 1970 analysis, Leo Bersani commented that L'Étranger is "mediocre" in its attempt to be a "'profound' novel", but describes the novel as an "impressive if flawed exercise in a kind of writing promoted by the New Novelists of the 1950s".[9] Paul P. Somers Jr. has compared Camus's L'Étranger and Sartre's Nausea, in light of Sartre's essay on Camus's novel.[10] Sergei Hackel has explored parallels between L'Étranger and Dostoyevsky's Crime and Punishment.[11] आपण वेळ काढून वाचलात त्याबद्दल धन्यवाद.

In reply to by कंजूस

स्वधर्म 24/08/2023 - 20:54
खून दिवसांपूर्वी वाचलं होता असं वाटतं. नायकाला एक प्रेयसी असते, आईचा दूरच्या गावात मृत्यू होतो, एका शेजार्याचे कुत्रे हरवलेले इ. अशी कथा असेल तर वाचले होते, पण त्याला ग्रेट का म्हणतात ते समजले नव्हते.

In reply to by स्वधर्म

कंजूस 25/08/2023 - 01:13
हेच ते पुस्तक. आपण,वाचक, किंवा मी पुस्तकाची रूपरेषा (gist) दहा ओळीत सांगतो पण ( १)त्यातील घटना, पात्रं ,त्यांचे संवाद "मनुष्याच्या जगण्याच्या आणि एकमेकांशी संपर्क/संबंध ठेवण्याच्या 'प्रवृत्ती' व्यक्त करतात. (२) मनुष्य हा रूढार्थाने समाजप्रिय आहे,समाजात राहतो तरीही तो एकटाच असतो. एकटेपणा टाळण्यासाठी खटपट करतो. (३) काही लाभासाठी तो इतरांशी संपर्क ठेवतो पण तेच लोकही याच नियमाने बांधलेले असतात व गुप्त संघर्ष सुरू असतो. मित्रप्रेमाला जागणारे ही कुणाला तरी शत्रू मानतात. (४)प्रत्येकजण आपल्या स्वार्थापुरता घटनेपुरता विचार करत असतो. (५)आईचं शेवटचं दर्शन घेणं टाळणे,सिगारेट पिणे,न रडणे या सर्व गोष्टींकडे पुढे हत्येच्या खटल्यात 'एक निर्ढावलेला थंड रक्ताचा गुन्हेगार' म्हणून पाहिलं जातं. तर अशा आरोपीस 'In the name of French people....' must be hanged. ( Why not German or British?) ही आणि अशी बरीच तत्वं किंवा existansialism नावाचं लेबल जोडलेला विषय रूक्षपणे चर्चा न करता कथानकात लेखक मांडतो ते कथा वाचताना जाणवत राहातं. हेच लेखनाचं सामर्थ्य. दुसरं एक वेगळं उदाहरण द्यायचं तर बालकवींची 'औदुंबर' नावाची छोटीशी वर वर निसर्ग कविता वाटणारी शेवटच्या दोन ओळींत,एका शब्दात ('असला') खूप मोठं तत्वज्ञान सांगून जाते. जे हजारो पानांचं विवेचन सांगू शकणार नाही. किंवा इतर लेखक,कवींना मांडता येत नाही आणि 'दुर्बोध' नावाचा शिक्का बसतो.

कंजूस 28/08/2023 - 06:29
महाभारत जालावर कुठे मिळेल. कोणते चांगलं? मराठी http://www.esahity.com (या साईटवर >> धार्मिक पाहा. साईट बरीच जुनी आहे पण त्यांनी https secure केलेली नाही अजून. तरी सेफ आहे.) इथे मराठीतले खंड आहेत.फ्री डाऊनलोड. ......... Google search "महाभारत book pdf" खूप साईट्स येतात. फ्री डाऊनलोड. archive dot org वर कॉपी आहे ती ,गोरखपूर गीता प्रेस प्रकाशित आहे तीच इतर साईटवाले देतात. हिंदीत आहे. बरीच पुस्तके आहेत पण चांगले कोणते किंवा काय हे अभ्यासूंनी सांगावे. सामान्य वाचकांस एवढा वेळ नसतो.

कंजूस 28/08/2023 - 06:33
Sanjeev sabhlockcity यांचं डिजिटल पीडीएफ २८० पानी इंग्रजी घेतलंय. ते मोबाईल Kindle appवर वाचणं सोपं पडेल. त्या appवर डिक्शनरी असते. प्रवासात उपयोगी. ((लहानपणी मी सी. राजगोपालाचारी यांचं छोटंसं पुस्तक (महाभारत ५००पाने आणि रामायण,इंग्रजी) वाचलं होतं. तेवढं पुरेसं झालं. ))
बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली- हाकामारी -हृषीकेश गुप्ते. ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती.