मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

चंद्रकांत ·

सोत्रि 02/10/2021 - 05:34
ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही.
औषध म्हणजे फक्त ‘वैद्यकिय उपचार’ ह्या परिघातच बघितलं तर हे विधान ठीक असेल पण औषध म्हणजे जनरल उपाय असं पाहिल्या हे विधान तितकसं खर नाही! अहंमान्य मानसिकता बदलायचे बरेच मार्ग (उपाय) उपलब्ध आहेत. खुद्द लेखातच शेवटच्या परिच्छेदात एक मार्ग दाखविण्याचा प्रयत्न दिसतोय. लेख बराचसा विस्कळीत झालाय आणि एक चांगली थीम शब्दबंबाळ करण्याच्या नादात हरवून गेली असं वाटलं. - (फॅाल्स इगो असलेलो) सोकाजी

Bhakti 02/10/2021 - 06:07
रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. तसं अशा लोकांपासून लांबच राहावं,इगोवर काळाची ठोकर हेच औषध लागू होऊ शकते.

गॉडजिला 02/10/2021 - 11:57
भौतिक जगात मी पणाचे वर्तुळ नसेल तर तुमचं हाल कुत्रं खाणार नाही. तत्वज्ञान म्हणून ठीक असते अहंकार नको वगैरे वगैरे वगैरे बोलायला पणं प्रत्यक्षात तुम्ही तुमचा अहंकार लपवून सहकार्याचा मुखवटा घालने हाच एक उपयोगी उपाय आहे. आज कसलेही वलय नसलेला एखादा खरेच अहंकार विरहीत व्यक्ती सामान्य लोकांच्या संपर्कात आला तर त्याचे आचार विचार ऐकून लोक त्याला वाळीत तरी टाकतील अथवा स्मशानात तरी पोचवतील कारणं अहंकार विरहीत असणे म्हणजे सत्वगुणाचा पुतळा असणे असा गैरसमज मोठया प्रमाणावर आहे. हा गैरसमज अहंकार झटकून न टाकता येणाऱ्या पण मोठेपणाहव्या असणाऱ्या सर्वांनी त्यांचा अहंकार लपवायला व्यवस्थित मार्केटिंग केला आहे

सोत्रि 02/10/2021 - 05:34
ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही.
औषध म्हणजे फक्त ‘वैद्यकिय उपचार’ ह्या परिघातच बघितलं तर हे विधान ठीक असेल पण औषध म्हणजे जनरल उपाय असं पाहिल्या हे विधान तितकसं खर नाही! अहंमान्य मानसिकता बदलायचे बरेच मार्ग (उपाय) उपलब्ध आहेत. खुद्द लेखातच शेवटच्या परिच्छेदात एक मार्ग दाखविण्याचा प्रयत्न दिसतोय. लेख बराचसा विस्कळीत झालाय आणि एक चांगली थीम शब्दबंबाळ करण्याच्या नादात हरवून गेली असं वाटलं. - (फॅाल्स इगो असलेलो) सोकाजी

Bhakti 02/10/2021 - 06:07
रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. तसं अशा लोकांपासून लांबच राहावं,इगोवर काळाची ठोकर हेच औषध लागू होऊ शकते.

गॉडजिला 02/10/2021 - 11:57
भौतिक जगात मी पणाचे वर्तुळ नसेल तर तुमचं हाल कुत्रं खाणार नाही. तत्वज्ञान म्हणून ठीक असते अहंकार नको वगैरे वगैरे वगैरे बोलायला पणं प्रत्यक्षात तुम्ही तुमचा अहंकार लपवून सहकार्याचा मुखवटा घालने हाच एक उपयोगी उपाय आहे. आज कसलेही वलय नसलेला एखादा खरेच अहंकार विरहीत व्यक्ती सामान्य लोकांच्या संपर्कात आला तर त्याचे आचार विचार ऐकून लोक त्याला वाळीत तरी टाकतील अथवा स्मशानात तरी पोचवतील कारणं अहंकार विरहीत असणे म्हणजे सत्वगुणाचा पुतळा असणे असा गैरसमज मोठया प्रमाणावर आहे. हा गैरसमज अहंकार झटकून न टाकता येणाऱ्या पण मोठेपणाहव्या असणाऱ्या सर्वांनी त्यांचा अहंकार लपवायला व्यवस्थित मार्केटिंग केला आहे
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत.

डोळ्यांनी फळे खावित का?

स्वधर्म ·

चौथा कोनाडा 30/09/2021 - 13:03
एकदम भारी !
झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत. म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.
अगदी खरंय !

In reply to by कर्नलतपस्वी

गॉडजिला 01/10/2021 - 11:21
नेमक धोरण परस्थितीवरच अवलंबुन आहे पणं या धाग्याने आपल्या सर्वांसाठीच एक महत्वाचा दृष्टिकोन अधोरेखित केला याबद्दल धागाकेखकाचे आभार

अमर विश्वास 30/09/2021 - 14:04
एक चवीने खाणारा .. म्हणून ही प्रतिक्रिया ... खाताना पंचेंद्रियांना समाधान मिळालेच पाहिजे. त्यामुळे नुसती चवच नाही .. तर दृश्य (appearance), वास, पोत (texture) हे सुध्दा महत्वाचे .. कृत्रिम रंग किंवा रंगीत दिवे यांना फसू नये हे खरच पण योग्य पारखून पूर्ण समाधान देणाऱ्या फळे / भाज्या यांनाच प्राधान्य एकच उदाहरण देतो .. आमच्या इथे चौकात एक पेरूची गाडी (सायकल) असते. त्याच्याकडे गेल्यावर साधारणतः मध्यम आकाराचा तजेलदार, थोडा हिरवा पण पिवळसर पणा कडे झुकणारा, खूप कडक नाही पण अगदी मऊ पडलेला पण नको .. असा पेरू नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेतला कि जो काही सुवास प्रसन्न करून जातो कि .. एक पेरू तिथेच कापून खावासा वाटतो (खातोच) ...

In reply to by अमर विश्वास

स्वधर्म 30/09/2021 - 16:43
रंग आणि गंध फळांच्या ताजेपणाशी आणि गुणवत्तेशी संबंधित आहेच, पण तो नैसर्गिक पध्दतीने आला असेल तर. त्याला महत्व द्यावे, पण तेच सर्वकाही नव्हे. वॉशिंग्टन सफरचंदावर म्हणे चकाकी येण्यासाठी मेणाचा थर (स्प्रे) देतात. सध्याच्या रासायनिक खते, किटकनाशके यांच्या जमान्यात, खूप काळजीपूर्वक निवड करणे महत्वाचे आहे. खाद्यपदार्थांचे रूप हे फार महत्वाचे होऊन बसले आहे. टीव्हीवर जे खवय्येगिरीचे कार्यक्रम लागतात, त्यात तर पदार्थ दिसतो कसा याला इतके आफाट महत्व दिले जाते, की त्याला फूड पोर्नोग्राफी असेच म्हणावे लागेल. पण असा पदार्थ बनविणे अगर खाणे हे आरोग्यदायी असेलच असे नाही.

In reply to by स्वधर्म

सुक्या 01/10/2021 - 02:54
नैसर्गीक ताजेपणा हा केव्हाही चांगला परंतु त्याला बंधने आहेत. एखादे फळ किंवा भाजी नैसर्गीक रुपात जास्तीत जास्त २ /३ दिवस चांगली राहु शकते. फळे त्यामानाने जास्त दिवस टिकतात. परंतु तसे लवकर खराब ही होतात. आजच्या काळात जिथे लोकांना केव्हाही ताजे फळ फळ्बागेपासुन शेकडो किलोमीटर दुर असताना हवे असते. म्हणुन त्याचे शेल्फ लाईफ वाढावे म्हणुन काही प्रक्रीया कराव्या लागतात. सफरचंदावर लावलेला मेणाचा थर हा त्यातलाच प्रकार. फळे पिकवणे हा प्रकार नैसर्गीक होण्यासाठी पुर्वी कोठया असायच्या. आता तेच काम केमीकल वापरुन केले जाते. एकाच प्रकारची पिके घेउन किंवा भरमसाठ पाणी वापरुन पिके घेतली की जमीनीचा पोत खराब होतो. त्याला ठीक करायला एकतर आलटुन पालटुन पिके घेणे , जमीण पडीक ठेवणे किंवा रासायनीक किंवा नैसर्गीक खते (शेण) वापरावी लागतात. त्यामुळे रासायनीक खते वगेरे आज काळाची निकड आहेत. फक्त त्यांचा अतीरेक नको. सेंद्रीय शेती उत्तम पर्याय आहे. परंतु त्यात लिमीटेशन आहेत. जे आपण खातो ते सारेच सेंद्रीय हवे मग प्रोसेस्ड फूड टाळावे. सध्याच्या काळात तरी मला ते शक्य वाटत नाही . .

एक जूनी म्हण आहे "कळकट मळकट कामाला बळकट" सध्या कोणाला असे कळकट मळकट आवडत नाही, पण आकर्षक असेल तर त्या वस्तुला जास्त किम्मत येते (उदा बर्‍याचशा चीनी बनावटीच्या वस्तु) शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते, मक्याच्या लाह्यांना कॉर्नफ्लेक्स म्हटले की त्यांची किम्मत दुप्पट तिप्पट होते, अशी अनेक उदाहरणे देता येतील. भाज्यांचे आणि फळांचे पण तसेच होत आहे. आता तर मॉल संस्कृती मधे भाज्या सुध्दा फॉइल पॅक मिळायला लागल्या आहेत. एकदा रामदेव बाबांनी सांगितले होते की असेच (ताजे) अन्न खा जे जास्तिजास्त तीन दिवसात खराब होते. शेवट अतिशय आवडला पण सध्या जमानाच "काय भुललासी वरलिया रंगा चा आहे." पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चौकस२१२ 01/10/2021 - 04:34
शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते, अर्रे हे असे जे कोणी करीत असतील त्यानं खाणे समजले नाही असेच म्हणावे लागेल दोन्ही पदार्थ खाण्यात मज्जा आहे ... खमंग वाटतं वाड्यबरोबर दाण्याची चटणीचा पाहिजे आणि साटे सॉस करण्यासाठी पीनट बटर पाहिजे

सोत्रि 30/09/2021 - 19:02
म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे
अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे! अपनी अकल लगाओ दिखावे पे मत जाओ. - (डोळे उघडलेला) सोकाजी

दृष्टीआड सृष्टी. आमच्या गावी डाळींबाचे भरपूर बाग आहेत. एकदा ८-१० दिवस गावी राहणे झाले आणि नातेवाईकांबरोबर डाळींबाची शेती पाहिली. दर दिवसाआड कसला ना कसला फवारा / औषध मारावे लागते. डाळींबा इतके दुसरे रासायनिक फळ नसेल. न खालेले जास्त चांगले.

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 30/09/2021 - 22:28
डाळिंब आणि द्राक्षे ही दोन पिके सध्या महाराष्ट्रात अत्यंतिक फवारणी केली जाणारी पिके आहेत. एक प्रयोग करून अवश्य पाहण्यासारखा आहे. बाजारात सर्वसामान्यपणे मिळणारा एक द्राक्ष घ्या. दोन मिनिटे तो फक्त तोंडात ठेवा; चावू नका. नुसता घोळवायचा. आणि मग बाहेर काढा. तोंडात कसली चव जाणवते आहे पहा. ९९% अप्रिय तुरट चव जाणवेल. ती तशी जाणवली नाही, तर नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली द्राक्षे आहेत, हे लक्षात येईल. चावल्यानंतर प्राधान्याने गोड चव लागत असल्याने फवारणी केल्याने बदललेली चव, जी बहुधा सालीवरच असते, ती सहसा लक्षात येत नाही. त्यामुळे तुंम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ही दोन फळे जवळजवळ ९९% भरपूर फवारणी करूनच पिकवली जातात, आणि शक्य असेल तर ती टाळलेली बरी.

सुबोध खरे 30/09/2021 - 20:20
मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" हा एकांगी विचार होऊ शकतो. ज्या झाडाला कीड लागली त्या झाडाची फळे नीट वाढू शकली नसल्यामुळे त्यांना भाव येत नाही असेही होऊ शकते. दुसरे -- कीटकनाशके मानवी शरीराला अपायकारकच असतात हा सुद्धा एकांगी विचार झाला. कारण पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके( डासांना मारण्यासाठी वापरत असलेले गुड नाईट इ ( अलेथ्रीन, डेल्टा मेथ्रीन इ) हि केवळ कणा हीन प्राण्यांवर ( invertebrates) परिणाम करतात. पक्षी प्राणी आणि मानवावर नाही. हि पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके सुद्धा crysanthemum या शेवंती गटातील झाडापासूनच तयार होतात. https://en.wikipedia.org/wiki/Pyrethrin कडूलिंब हे झाड सुद्धा आपल्याला कीटकांनी खाऊ नये म्हणूनच कीटकनाशक द्रव्ये तयार करत असते. https://en.wikipedia.org/wiki/Azadirachtin https://en.wikipedia.org/wiki/Azadirachta_indica असे जैविक युद्ध निसर्गात अनंत काळापासून चालू आहे. तेंव्हा केवळ त्यावर अळ्या किंवा किडे दिसले म्हणून ते सुरक्षित आहे हे समजणे चूक ठरेल. जर निंबोळ्यांचा अर्क फवारला असेल तर त्यावर किडे दिसणार नाहीत. बाकी फळ वरून चांगले दिसत नसेल तर लोक आतून चांगले असेल याची खात्री कशी बाळगणार? जर फळ खराब निघाले तर पूर्ण पैसे परत मिळतील हि खात्री असेल तरच लोक विकत घेतील. जाता जाता -- काय भुललासी वरलीया सोंगा? हे अभंगापुरते ठीक आहे. लग्नाच्या बाजारात सुंदर मुलगी आणि कमाऊ मुलगाच लवकर खपतो. स्वभावाने दिलदार असलेल्या गरीब मुलाशी किंवा स्वभावाने चांगली कुरूप मुलगी कोण पत्करून घेतंय?

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 30/09/2021 - 23:08
>> मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" हा एकांगी विचार होऊ शकतो. हे मान्य, पण ज्यावर किडा मुंगी फिरली ते फळ शहरी माणसे घेत नाहीत; दिसायला चांगले नसलेले फळ स्वाभाविकपणे कमी दर्जाचे समजतात. हा अधिक एकांगी विचार झाला. आणि लेखाचा तोच मुद्दा आहे. अपवाद काढून कोणतीही गोष्ट सिध्द किंवा असिध्द होत नसते, तर सर्वसामान्यपणे काय घडते ते महत्वाचे असते. फळे घेताना निर्जीव वस्तूप्रमाणे स्टराईल फळे भाजी म्हणजे चांगली असे समजू नये. परदेशात यांत्रिक सौंदर्यदृष्टी लावण्याचे सवय लोकांत इतकी बोकाळली आहे, की सुपर मार्केटमध्ये वाकड्या काकड्या रिजेक्ट केल्या जातात. हे पहा: https://www.forbes.com/sites/briankateman/2020/03/02/the-time-is-ripe-for-ugly-fruits-and-vegetables/?sh=b4d95184a851 ****** डॉ. अनिल अवचट यांच्या मुलाखतीमधून लहानपणी ते खेड्यात वाढले आणि शेतकर्यांच्या मुलांबरोबर खेळत मजा करत शेतातून फिरत असत. असेच एकदा त्यांच्या मित्राबरोबर शेतावर राखणीला गेले आणि पाखरं हाकलण्यासाठी गोफण फिरवू लागले. पाहता पाहता ते मोठ्या जोशात येऊन गोफण फिरवू लागले, इतकी, की जवळपास पाखरं अजिबात ठरेनात. हे पाहून त्यांचा शेतकरी मित्र म्हणाला, ‘अन्या, आरं इतका जोर लावू नको, त्यांचा बी वाटा असतोय!’ अवचट यांना हा प्रसंग वयाच्या ऐंशींव्या वर्षी लक्षात राहण्याइतका महत्वाचा वाटला! Food waste exists across the food supply chain, thanks to pests and mold, poor climate control and household waste. “Imperfect” produce is often turned away by grocery stores for not meeting strict cosmetic standards – making up around 40% of total food waste.

Rajesh188 30/09/2021 - 23:56
आणि पटला सुद्धा लेखकाच्या मता शी पूर्ण सहमत आहे. फळ,भाज्या नैसर्गिक रुपात जास्त चकमक करत नाहीत.त्या मुळे जास्त चमकणारी फळ विकत घेवूच नयेत..कीटकनाशक ही उपद्रवी कीटकांना नष्ट करण्याच्या हेतू नी जरी वापरली जात असली तरी त्या मुळे सहयोगी,उपयुक्त सूक्ष्म जीव सुद्धा मारले जातात. आणि नैसर्गिक चक्रात त्यांचे स्थान खूप महत्वाचे असते.

चौकस२१२ 01/10/2021 - 05:12
डॉक्तरांनी दिलेली माहिती उपयुक्त आहे परत एकदा असे म्हणावेसे वाटते कि कुठेतरी समतोल गाठला पाहिजे .. टोकाला जाऊन काय होणार? त्यातल्या त्यात कमी खते घातलेले पदार्थ घेता येतील का? कधी कधी जे मिळतंय ते आपल्या आर्थिक कुवती मध्ये दोन्ही बसवावे .. अर्थात हे सगळे करणे तिथे शक्य आहे जिथे फूड लेबलिंग म्हणजे विकले जाणारे पदार्थासंबंधीची माहिती चे नियम काटेकोर आहेत ( त्यात काय आहे , कोणते अनैसर्गिक पदार्थ आहेत इत्यादी ची माहिती देणे) मिठाई च बघ मुददमून रंग घालू नका... इत्यादी

Rajesh188 01/10/2021 - 08:21
कोणत्या फळांना ,आणि भाज्यांना कीटक नाशकाची जास्त गरज लागते त्याचे वर्गीकरण करू शकतो. द्राक्षे, सफरचंद ,डाळिंब, स्ट्रॉबेरी, चेरी, ह्यांच्या वर कीटक नशकांचा जोरदार मारा केलेला असतो. भाज्या मध्ये. वाटाणा,टोमॅटो,पालक, पावटा, फुलकोबी, ह्यांच्या वर कीटक नशकाचा मारा केलेला असतो. आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 10:42
आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात. संपूर्णपणे गैरसमजुतीवर आधारित बेलाशकपणे ठोकून दिलेले विधान https://vikaspedia.in/agriculture/crop-production/integrated-pest-managment/ipm-strategies-for-coconut/diseases-and-symptoms https://www.agrifarming.in/sapota-pests-diseases-chiku-sapodilla-control-methods https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/15538362.2019.1608889

एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पूर्वी गेलो असताना त्यांनी द्राक्षे अजिबात न खाण्याचा सल्ला दिला होता. द्राक्षे म्हणजे विषाची कुपी असते असं ते म्हणाले होते, त्याची आठवण झाली. बाकी बाजारात pesticide removers उपलब्ध आहेत त्याबद्दल काय मत आहे: https://www.amazon.in/dp/B089KQ3W4D/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_68GY1GQ18JAVDC156EXB?_encoding=UTF8&psc=1

Rajesh188 01/10/2021 - 12:11
कोकणातील जग प्रसिद्ध हापूस आंब्याची चव चाखायला लोकांना मिळतच नाही .झाडावर पूर्ण वाढ झालेले आणि नैसर्गिक रीत्या पिकविलेला आंबा लोकांपर्यंत पोचतच नाही. आंब्याला फळा चा राजा का म्हणतात ते तेव्हाच समजेल. आता जी बाजारात असतात ते कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव.

In reply to by Rajesh188

आंब्याच्या बाबतीत इतका गोंधळ आहे, की अगदी भरवश्याच्या माणसाकडून म्हणून डायरेक्ट मागवलेले आंबे पण बेचव निघालेले पाहिलेत. अशाने आंब्यांची मागणी अक्षरशः कमी झाली आहे.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 12:40
कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव. याला काही शास्त्राधार आहे का? कि हे पण असंच बेलाशक ठोकून दिलेलं

Rajesh188 01/10/2021 - 12:52
शास्त्रीय कारण तुम्ही डॉक्टर आहात तुम्हीच ध्या. सर्व सामान्य लोकांना हे चांगले माहीत आहे. १) झाडावर फळाला पाड लागल्या शिवाय त्या झाडावरची फळ काढायची नसतात. म्हणजे झाडावर च फळ पिकण्यास सुरुवात झाल्यावर. २) भात्यान मध्ये ती फळ झाकून ठेवली जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया झाली. दुसरी कृत्रिम पाड लागण्या अगोदरच फळ झाडावरून काढली जातात आणि केमिकल वापरून त्यांचा रंग बदलला जातो ती पिकल्यासारखी फक्त वाटतात. आणि ह्या दोन्ही पद्धती मधील फळांच्या चवी मध्ये खूप मोठे अंतर असते. हे अनुभवाने सर्वांस माहीत आहे. येथील सर्व ह्या वर सहमत होतील. आता शास्त्रीय कारण काय आहेत ते तुम्ही गूगल वर shodha. गूगल वरची माहिती सत्य च असते असे नाही. अनुभव हा सत्य च असतो.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 13:32
आंबा चिकू फणस इ अनेक फळे झाडावर पिकण्याच्या अगोदरच काढून अधिक ठेवली जातात पिकण्यासाठी आणि हे शतकानुशतके चालू आहे. सीताफळे चिकू पिकण्यासाठी तांदुळात ठेवले जातात. त्यात पिकण्याची प्रक्रिया काय आणि कशी होते ते समजून घ्या कृत्रिम प्रक्रिया कशी होते तेही समजून घ्या.त्यात साम्य काय आहे. इथिलिन काय ऍसिटिलीन काय आहे कोणत्या नैसर्गिक प्रक्रियेत कोणता वायू निघतो हे समजून घ्या मग ठोकाठोकी करा अनुभव हा सत्य च असतो. लोकांना भुताचा अनुभव येतो म्हणजेच भुते आहेत का? थापाथापी कार्याला किमान बुद्धिमत्ता असावी लागते अन्यथा उघडे पडले जाते हे लक्षात ठेवा

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 01/10/2021 - 14:05
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो. रसायनाचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास पेप्टिक अल्सर होऊ शकतो. मानवांमध्ये, tyसिटिलीन अनुमत पातळीपेक्षा कमी असल्यास तीव्र विषारी नाही तर जर मर्यादा ओलांडली तर त्याचे इनहेलेशन बेशुद्ध होऊ शकते आणि दीर्घकाळापर्यंत हायपोक्सिया म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता निर्माण करून न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम करू शकते. कॅल्शियम कार्बाइड हे एक संक्षारक आणि धोकादायक रसायन आहे ज्यात अशुद्धी म्हणून आर्सेनिक आणि फॉस्फरस हायड्राइडचे ट्रेस आहेत. आर्सेनिक आणि फॉस्फरस विषबाधाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अतिसार (रक्तासह किंवा त्याशिवाय), उलट्या, तहान, अशक्तपणा, ओटीपोटात आणि छातीत जळजळ, गिळण्यात अडचण, डोळे/त्वचेमध्ये जळजळ/जळजळ होणे, घसा खवखवणे, खोकला, दम लागणे यांचा समावेश होतो. श्वास घेणे आणि त्वचेवर व्रण इ. कॅल्शियम कार्बाइडमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आहेत. Dr खरे वरील माहिती १०० वेळा तरी वाचा.नैसर्गिक पने पिकवलेली फळे आणि कृत्रिम पने पिकवली गेलेली फळ ह्या मध्ये काय फरक आहे ते समजेल. फळ पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने ही शरीरासाठी अत्यंत घातक आहे.. तुम्ही dr असून हेकेखोर आहात मी च शहाणा अशी वृत्ती आहे. दुसऱ्याची बुध्दी काढायची तुमची सवय आहे.जगात जे काही घडतं ते मला सर्व कळत असा फालतू आत्मविश्वास आहे विद्या विनयने शोभते. हे साधे तत्व तुम्हाला माहित नाही. रासायनिक खत,रासायनिक कीटक नाशक,रासायनिक रिपिंग हे सर्व मानवासाठी अत्यंत घातक आहे हे उच्च दर्जा असलेली संशोधक लोक सांगत आहेत. मी नाही

In reply to by Rajesh188

Rajesh188 01/10/2021 - 14:14
रसायने फळ पिकवण्यासाठी भारत सर्रास वापरली जातात.ठराविक प्रमाण पेक्षा जास्त वापरली जातात. दुधी भोपळा,भोपळा किंवा बाकी फळ भाज्या आकारणे लगेच वाढव्या म्हणून नको ती रसायने वापरली जातात. नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 06/10/2021 - 18:36
नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा असं तुम्हाला कुठे दिसलं? हरित क्रांती च्या अगोदर भारतात केवळ नैसर्गिक शेतीच होत होती पण अन्नधान्याचा तुटवडा का होत होता? याचे समर्पक उत्तर देता येत असेल तर चर्चा करता येईल अन्यथा जे फ़ुकायचे आहे ते फुका आपण काहीही बेलाशक टंकायचं एवढंच ठरवलंय म्हणून आपल्याला उत्तर द्यावं असं अजिबात वाटत नाही.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 06/10/2021 - 18:39
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो. हायला तुम्ही साला सकटच आंबे किंवा केळी खाता कि काय? तसे नसेल आणि आंबे चोखून खात असाल तर निदान ते स्वच्छ पाण्याने धुवून खावे एवढं किमान ज्ञान आल्याला शाळेत शिकवलेलं होतं त्याचा विसर पडलेला दिसतोय

स्वधर्म 01/10/2021 - 13:12
चौथा कोनाडा, कर्नलतपस्वी, गॉडजिला, रंगीला रतन, सुक्या, ज्ञानोबाचे पैजार, चौकस२१२, अमरेंद्र बाहुबली, सोत्रि, धर्मराजमुटके, सुबोध खरे, Rajesh188, रावसाहेब चिंगभूतकर,  सुरिया, मराठी_माणूस तसेच इतर प्रतिसादकांचे आभार! बरीचशी चर्चा ‘फळे, भाजी खरेदीसाठी’ एक नवा दृष्टीकोन यावर झाली आहे, पण… बहुसंख्य लोकांचा हळूहळू बदललेला सौंदर्यविषयक दृष्टीकोन हा शेतकर्यांसाठी कसा (चुकीची) दिशा देत आहे, हा ही एक मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयोगात काही गोष्टी आंम्हाला जरूर साध्य झाल्या. उदा. काहीही खत न टाकता, किटकनाशके न मारता, डाळिंबाचं पीक घेता येतच नाही असा ठाम समज आजूबाजूच्या शेतकर्यांचा होता. आंम्ही ते करू शकलो. पण तरीही अगदी फळे तोडणार्यांपासून विक्रेत्यांपर्यंत असा काही सौंदर्य-नकार मिळत गेला, की बस्स! कदाचित काही सेंद्रीय खते घालून, फवारण्या करून फळांना रंग आणणे, ती मोठी करणे या गोष्टींबाबत प्रयत्न करता येईल, पण अशी सगळी फळे एकदम न येणे पण व्यापार्यांना ती सगळी एकदम हवी असणे इत्यादि लॉजिस्टीक समस्या आहेतच. या लेखाने निदान काही लोकांच्या दृष्टीकोनात जरी बदल झाला, तरी धाग्याचे सार्थक झाले असे वाटेल.

बापूसाहेब 01/10/2021 - 15:12
डाळिंब शेतीचा वयक्तिक अनुभव नसला तरी अनेक मित्र आणि नातेवाईक यांच्या फळबागा मी नेहमीच खुप जवळून पहात आलोय. डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे स्वधर्म यांनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे.. डाळिंबाच्या झाडांवर दर दोन ते तीन दिवसांनी कसल्या ना कसल्या औषधाची फवारणी शेतकरी करतात. कीड घालवनारे, कलर आणणारे, गोडी आणणारे, झाडांची वाढ थांबवून फळे आणी फुल आणणारे, फुल आणि फळ गळणे थांबवणारे इ कितीतरी प्रकारचे स्प्रे झाडांवर दर आठवड्याला केले जातात. आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत. फवारण्या करण्यात खंड पडला तर संपूर्ण सिजन सोडुन द्यावा लागतो. हीच बाब पेरू, सीताफळ या फळांना सुध्दा लागू आहे. आमच्या इथे फवारणी न केल्यामुळे संपूर्ण पेरूची बाग सोडुन द्यावी लागली. जे काही पेरू आत्ता आहेत ते सर्वच्या सर्व किडलेले निघतात. तर सारांश असा की कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या वापराशिवाय आजच्या काळात शेती कारणे ( विशेषतः फळांची ) अशक्यप्राय गोष्ट आहे. सेंद्रिय शेती हा विषय सर्वांचा आवडीचा आणि पर्यावरण पूरक असला तरी हा प्रकार वाटतो तितका सोपा आणि फायदेशीर तर नक्कीच नाही. याला अनेक कारणे आहेत पण ती नंतर कधीतरी सविस्तर.. बाजारातून आणलेली फळ स्वच्छ धुवून खाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे जेणेकरून रसायने आपल्या श रीरात कमीतकमी जातिल..त्याचसोबत शेतकऱ्यांनी देखील रसायने फवराताना ती योग्य मात्रेमध्ये फावरणे आवश्यक आहे. आता लेखातील दुसऱ्या उदाहरणाकडे येऊ. ज्या भाजीवर किडे आहेत ती चांगली असा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कीटक/किडे/अळ्या असलेल्या भाज्या खाणे कधीही आरोग्यासाठी चांगले असू शकत नाही. आम्ही शेतात स्वतः पिकवून खात आसलो तरी कीड लागलेली भ भाजी व फळे वापरत नाही...आणि हाच न्याय लावायचा असेल तर मग मी असेही म्हणू शकतो की माश्या बसलेले खाद्यपदार्थ खाणे हे कधीही चांगले. कारण त्यावर माश्या बसतायेत, खतायेत आणि तरीही जिवंत आहेत याचाच अर्थ खाद्यपदार्थ चांगल्या क्वालिटी चा आहे.. च कोणत्याही गोष्टीचे जनरलायजेशन नको. काही गोष्टी स्वानुभवाने शेअर कराव्यात म्हणून सांगतो. - १) फळ कधीही स्वच्छ धुवून खावीत २) सीजन च्या खुप आधी येणारी किंवा सीजन संपून गेला तरी शिल्लक असणारी फळे घेऊ नयेत ( उदा..जानेवारी मध्ये येणारा आंबा किंवा मे महिन्यातील द्राक्षे ) ३) फळे घेताना त्यांच्या देठाकडे लक्ष द्या. देठ काळा झालेली किँवा देठ वाळलेली फळे ही कीतीही टवटवीत दिसत असली तरी घेऊ नयेत. ( सफरचंद , द्राक्षे, इ.) ४) टरबूज , कलिंगड इ फळे शक्यतो हातगाडीवर किंवा स्टॉल वर घेऊ नयेत. अश्या ठिकाणीं फळांना विषेश इंजेक्शन देउन गोड आणि आतून कलरफुल बनवुन विकले जाते. शक्यतो डायरेक्ट मार्केट मधून किंवा विश्वासू व्यक्तीकडून खरेदी करावी. ५) १०० टक्के सेंद्रिय ( ऑरगॅनिक ) म्हणून मार्केटिंग करणार्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवून मार्केट रेट पेक्षा जास्त दर देउन खरेदी करू नये.

स्वधर्म 02/10/2021 - 15:11
बापूसाहेब, सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल आणि आपला अनुभव सांगितल्याबद्दल आभार! >>  रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे..  हे एकदम मान्य. >> आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत.  हा समजही शेतकर्यांमध्ये अत्यंत सार्वत्रिक आहे. आमचा प्रयोग नेमका हे न करता डाळिंब पिकवता येतात का? हे पाहण्याचाच होता. तो आर्थिकदृष्ट्या नसला, तरी नैसर्गिकदृष्ट्या यशस्वी झाला हेच सांगायचे होते. केवळ दिसायला चांगली फळे नसल्यामुळे शेतकर्यापुढे कोणत्या समस्या उभ्या राहतात आणि नाईलाजाने बाग काढून टाकण्यासारखे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक निर्णय घ्यावे लागतात, हे सुजाण ग्राहकांपुढे मांडणे हा धाग्याचा उद्देश होता. मी वर म्हटल्याप्रमाणे, बरीचशी चर्चा ही दोन मुद्द्यांच्या मधे आलेल्या बोधकथेवरच झाली आहे. ‘निवडून निवडून कीड असलेली भाजीच खा’ असे सांगण्याचा उद्देश नक्कीच नाही. कदाचित मुद्दा अधिक स्पष्टपणे वेगळ्या प्रकारे मांडता येईल. जसे की… आपल्यासाठी कोणते हितकारक आहे? अत्यंत, मोठी, रंगीत, अधिक गोड आकर्षक फळे ज्याला भरपूर खते (रासायनिक) दिली असण्याची आणि भरपूर फवारणी केली असण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या ढीगावर आजिबात कोणत्याही जीवजंतूचे अस्तित्व दिसून येत नाही. की थोडी लहान, पाण्याचे प्रमाण कमी असलेली, कमी आकर्षक रंगाची फळे? ज्यावर सहज नैसर्गिकपणे जीवजंतू आकर्षित झाले आहेत? अशा ढीगातून तुंम्ही निवडून चांगली फळे नक्कीच घेऊ शकता. तरीही एखादे फळ किड लागलेले आढळले, तर बाजूला खाढू शकता. माझ्या पिकाचा एक दाणा किंवा एका फळावरही कोणतीच किडामुंगी असता कामा नये, हा शेतकर्यांचा अट्टाहास किती योग्य आहे? आपण आपल्यासाठीच पिकवतो पण वर अवचट यांच्या गोष्टीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही वाटा मान्य करायला काय हरकत आहे? किडीचा समूळ नाश करणारी औषधे अत्यंत आक्रमकपणे मारून आपण जे पिकवणार ते खरोखरच मानवाला दीर्घकाळ खात राहण्यासाठी योग्य आहे का? हा मुद्दा आहे सर! कीड किंवा अळ्या असलेले फळ खाल्यास मानवाला किती अपाय होऊ शकतो याचा सहज धांडोळा घेतला असता, अनेक संदर्भ मिळाले. अनेक ठिकाणी अगदी प्रत्यक्ष अळी खाल्ली गेल्यासही गंभीर काही त्रास व आजार होत नाही असेच समोर आले. त्यातला एक दुवा खाली देत आहे. जाता जाता, आतमध्ये विशिष्ट जातीची माशी जाऊन तिने अंडी घातल्याशिवाय अंजीर किंवा उंबर हे तयारच होत नाही, हे आपणास माहित असेलच. https://askinglot.com/are-fruit-worms-harmful Are fruit worms harmful? There are worms in them. Tiny white worms, almost transparent, that will ultimately blossom into fruit flies -- unless you eat them first. Scientists know them as Drosophila suzukii. Before we go on, we should tell you to stop gagging, because they are safe to eat. बाकी तुंम्ही सांगितलेल्या पाचही मुद्द्यांशी सहमत. खूप सोप्या भाषेत साधक बाधक गोष्टी तुंम्ही सांगितल्या.

वामन देशमुख 02/10/2021 - 16:47
माझं स्वतःचं काहीसं असंच मत आणि अनुभव आहे. उदा. बाजारात वांगी घेताना ज्या विक्रेत्याची वांगी अजिबात किडलेली नाहीत ती वांगी घेण्यापेक्षा, ज्या विक्रेत्याच्या वांग्यांपैकी काही वांगी किडलेली आहेत त्यांतील न किडलेली वांगी निवडून घ्यावीत. अश्या वांग्यांवर कीटकनाशकांचा मारा कमी प्रमाणात झालेला असण्याची शक्यता जास्त असते. बाकी मूळ लेख आणि त्याखालील काही प्रतिक्रिया माहितीपूर्ण, विचारप्रवर्तक वाटल्या.

Rajesh188 02/10/2021 - 18:47
निसर्ग चक्रात सर्व जीव स्वतःचे रक्षण करतात तशा वनस्पती स्वतःचे रोगापासून रक्षण करण्याचे प्रयत्न नक्कीच करत असतील. माझा ह्या वर्षी चे निरीक्षण सांगतो.मी काही जमीन फक स्वतः साठी ठेवलेली आहे जी घरा जवळ ,घराच्या पाठी मागेच.करणार कोणी नसल्या मुळे बाकी करायला दिली आहे. तर घरा पाठी जे शेत आहे त्या मध्येच कधीच रासायनिक खत वापरले नाही,कधीच कीटक नाशक वापरली नाहीत. त्या मध्ये घरात लागते त्या डाळी,भुईमूग वैगेरे असतो ह्या वर्षी पावसामुळे खुरपणी फक्त एकदाच केली गेली आता मागल्या महिन्यात गावी गेलो तर पूर्ण शेतात फक्त आणि फक्त गवत च दिसत होते अगदी विविध जातीचे उंच वाढणारे .पीक कुठेच दिसत नव्हते. फक्त गवत... ह्या वर्षी काहीच पीक आले नाही सर्व गेले हातातून असे वाटले. आणि आत मध्ये शेतात गेलो आणि बघतो तर भुईमूग किंवा बाकी सर्व पीक मस्त होती चांगली फुलली,होती.,भुईमूग ला मदत खूप शेंगा लागलेल्या होत्या . ह्या चवळी,मग, वाटाणा ,घेवडा नेहमी पेक्षा जास्त झाला .. सांगायचं पॉइंट हा आहे इतके गवत असून सुद्धा पिकानी स्वतःचा बचाव केला होता आणि स्वतःची व्यवस्थित वाढ पण केली होती ..कोणता रोग नाही,कोणती कीड नाही.. . कीटक नाशक न वापरता सुद्धा निरोगी. आणि असा अनुभव आहे.त्या शेतात किती ही हवामान प्रतिकूल असले तरी पीक जात नाही. जंगलात विविध झाडे ,फळझाड असतात त्यांच्या कोणते कीटकनाशक,रासायनिक खत वापरली जातात तरी ती झाड,त्यांची फळ निरोगी असतात ना.उलट जोमात वाढलेली असतात.

In reply to by Rajesh188

स्वधर्म 03/10/2021 - 16:31
राजेशजी, तुमच्या अनुभवाशी मला जोडून घेता आले. मला पण वाढलेल्या तणांमुळे खूप ताण आला होता. डाळिंबाच्या मध्ये भुईमूग लावला होता, त्यात मोठेच तण आले होते. आजूबाजूचे शेतकरी ते लवकरात लवकर काढून टाका असे सांगत होते. तणाला फुले येईपर्यंत थांबलात तर ती पुन्हा पुन्हा अत्यंत जोमाने येतच राहतात, असे म्हणत होते. रान ‘स्वच्छ’(?) ठेवले पाहिजे असे त्यांचे मत. त्यामुळे एकदा भांगलण करून घेतली. त्याचा बराच म्हणजे रु. ५७०० इतका खर्च आला. तुमची सगळी पोषक द्रव्ये तणच खाते, मग पिकाला काय मिळणार? असे सगळ्यांचे मत. नंतरच्या ट्रीपला गेलो तेंव्हा पुन्हा तण वाढले होतेच आणि पाऊस सुध्दा चालला होता. एका बाजूच्या शेतकर्याने आता भांगलण पुन्हा करू नका असा फायद्याचा सल्ला दिला. मग तण तसेच ठेवले. काढणीच्या वेळेला, काही प्रमाणात तण होते आणि भुईमुगाचे वेल आयुष्य संपल्यामुळे त्यात दिसूनही येत नव्हते. पण काढणी केल्यावर आमच्या शेंगा आजूबाजूच्या खते टाकलेल्या शेतकर्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे भरलेल्या आढळून आल्या. आमच्याकडे तण खूप वाढू दिले तर नंतर काढणीच्या वेळेला माणसे (बायका) आत जात नाहीत, सापांची वगैरे भीती वाटते असे म्हणतात. म्हणून भांगलण करावीच लागेल की काय असे वाटते. तणनाशके मारून भांगलणीपेक्षा खूपच कमी खर्च येतो, पण जमिनीचे दीर्घकालीन नुकसान होते. आमच्या शेतात भुईमूग काढताना आंम्हाला बर्याच ठिकाणी भरपूर मुंग्या चावल्या. वैताग आला, तरी आपली जमीन विषारी बनलेली नाही याचे समाधान वाटले. एका डाळिंबाच्या झाडावर तर मधमाशांचे मोहोळ लागलेले पाहिले. खूप बरे वाटले. पण हे सगळे असले तरी या वर्षी डाळिंब काढण्याचाच विचार करत आहे. कारण पुण्यात राहून फळबाग नैसर्गिक पध्दतीने करणे जमेल असे वाटत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

स्वधर्म 07/10/2021 - 18:41
खरंच गुंतागुंतीचे आहे. मी नविन शेतकरी असल्याने मला तर खूप शिकायला मिळत आहे. उदा. एकाच क्षेत्रावर मला भांगलण करण्यासाठी ५७०० खर्च आला आणि शेजार्यांनी तणनाशक मारले, त्यांना १३०० + ४०० मजूरी असा खर्च आला. पण माझे पैसे तिथल्या स्थानिक बायकांकडे गेले तर त्यांचे पैसे तणनाशक कंपनी, विक्रेते यांच्याकडे गेले. जमिनीचे प्रदूषण, उत्पादनाचे विषारीकरण, सूक्ष्मजीवांवरील परिणाम या तर आर्थिकतेपलिकडच्या गोष्टी आहेत.

नेत्रेश 03/10/2021 - 05:32
झाड लहान असेल, कींवा खतपाणी कमी पडत असेल, कींवा माती चांगली सुपिक नसेल तर फळे तुम्ही दीलेल्या फोटोत आहेत तशी येउ शकतात. काही वर्षांनी झाड आणखी मोठे झाल्यावर, कींवा खतात सुधारणा / बदल केल्यावर आणखी चांगली फळे येउ शकतील. आमची शेती नसली तरी सर्व प्रकारची फळझाडे भरपुर आहेत. डाळिंबे, आंबे चीक्कु, नारळी, रामफळा, काजु, फणस, केळी, आवळा, जाम, कोकम, इत्यादी. कोणतीही रासायनीक फवारणी न करताही उत्तम दर्जाची फळे येतात. बरीचशी झाडे कोंकण कृषी विद्यापिठातुन आणल्याचे आठवते. वर खरे डॉक्टरनी लिहील्याप्रमाणे आंबा फणस चिक्कु वगैरे बरीचशी फळे पुर्ण पिकायचा आधी काढली जातात. त्याचे एक कारण म्हाणजे झाडावर पुर्ण पिकेपर्यंत फळ रहात नाही. ते ठेवले तर वार्‍याने पडते, पक्षी व खारी अर्धवट खातात, अगदी जास्त पिकलेला फणसही कावळे चोची मारुन फोडतात. तसेच झाडावर पुर्ण पिकलेले फळ अगदी अलगद काढावे लागते, नाहीतर खाली पडुन फुटते. आणी अशी जास्त पिकलेली फळे दुकानात विकायला पाठवता येत नाहीत. फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो. जर तुमची स्वतःची बाग असेल तर ते तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही. मी गावी येणार असेल तर आई बरीचशी फळे झाडावर ठेउन देते. त्यातली २५% पण खायला मिळत नाहीत. पडुन फुकट जातात, कींवा पाखरे खातात. आता तर वानरही यायला लागलेत. पण जी मिळतात त्यांची गोडी अविट असते. खाली पडलेली फळे तीथेच कुजुन चांगली माती होते. त्यात होणारे कीडे जमीन आणखी सुपिक करतात. तर सांगायचे हे की स्वतःची झाडे असतील तर (स्वतःला खाण्यासाठी) रासायनीक खते न वापरतापण उत्कृष्ठ फळे येउ शकतात. झाडावर पुर्ण पिकलेले फळ थोडे जास्त चवदार असते. (अती पिकलेले नव्हे - त्यात कीड पण असु शकते). फळ शेतीचा अनुभव नसल्याने नो कॉमेंट.

In reply to by नेत्रेश

स्वधर्म 03/10/2021 - 16:38
तुमचे बरोबर आहे. झाडे जोमदार असली तर चांगली फळे येतात. आणि जमीन निरोगी असेल, वाण मुळात चांगला असेल, तरच झाडे चांगली येतात. दुसरे असे की, तुमचे घर कोकणात असावे असे वाटते. मला अशी माहिती मिळाली, की घराच्या परड्यात चार झाडे नैसर्गिक पध्दतीने लावणे वेगळे आणि शेतात बाग लावणे वेगळे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by नेत्रेश

वामन देशमुख 03/10/2021 - 17:11
फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो... पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही.
बरोबर आहे.

In reply to by वामन देशमुख

Rajesh188 03/10/2021 - 17:34
फळ ही कच्या अवस्थेत म्हणजे कैऱ्या असलेल्या अवस्थेत झाडावरून सर्व काढल्या आणि असे प्रतेक वर्षी करत गेलो तर त्या झाडाची फळधारणा क्षमता कमी होते हे पारंपरिक ज्ञाना वर आधारित गृहितक आहे. आणि practically खरे पण आहे. वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री ची प्रजनन क्षमता कमी होते का? ह्याच्या शी हा प्रश्न पण निगडित आहे माहिती गार लोकांनी मत व्यक्त करावे.

In reply to by Rajesh188

धनावडे 11/10/2021 - 16:06
काहीही आमचा एक आंब्याच झाड तीन पिढ्या जगल, आणि एक फणसाचं झाड कमीत कमी १५० वर्ष तरी जुने असेल, आणि अशी गावात जुणी झाडे खूप मिळतील तुम्हाला.

प्रामाणिक म्हणून हनतीचं नुकसान होताना पाहून वाईट वाटलं. ती डाळिंब विकता नाही का येणार? ग्राहक संघटना वगैरेंच्या कुणाशी बोलता येईल का?

In reply to by प्राची अश्विनी

स्वधर्म 06/10/2021 - 13:59
धन्यवाद. या वर्षीचा हंगाम संपला आहे. मुख्य प्रश्न थोडी थोडी तोडणी करून ती शहरात पाठवण्याचा. इथे इकॉनॉमी ओफ स्केल चा प्रॉब्लेम आला. फळ बाग ही खूप लक्ष देऊन करण्याची गोष्ट आहे. खरं तर मला स्वत:ला आमच्या मेहनतीपेक्षा झाडांचा मृत्यू जास्त दु:खदायक वाटला. पण नैसर्गिक पध्दतीने हंगामी पिके करण्याचे सुरूच ठेवणार आहे.

In reply to by स्वधर्म

Rajesh188 06/10/2021 - 14:14
नैसर्गिक पद्धतीने फळ झाडे,फुल झाडे किंवा कोणतेही पीक हे जोरदार येणारच .तो निसर्गाचा नियम च आहे. म्हणून तर पृथ्वी विविध वनस्पती,प्राणी ह्यांनी समृद्ध आहे. फक्त ह्याला वेळ लागतो.आज नैसर्गिक शेती केली की लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत काही वर्ष जावी लागतात. तुम्ही नक्की यशस्वी होणार.

In reply to by Rajesh188

स्वधर्म 06/10/2021 - 17:40
राजेशजी. प्रयत्न नक्कीच सुरू ठेवणार आहे. रासायनिक खते घालून बेसुमार कीटकनाशके वापरून बर्याच शेतकर्यांना तात्कालिक फायदा दिसत असला तरी जमिनीचे लवकर न भरून येणारे नुकसान होते, हे मनोमन पटले आहे.

Rajesh188 07/10/2021 - 00:29
हरित क्रांती भारतात यशस्वी करून दाखवण्यात त्या वेळचे सरकार, संशोधक - c Subramanian,b.p.pal,. A.b जोशी, m.s. Swaminathan , ह्यांनी प्रचंड कष्ट. घेतले. सरकार,संशोधक,शेतकरी सनदी अधिकारी ह्यांच्या अपार कष्टाने ,आणि रॉकफेलर फौडेशन नी अफाट कष्ट घेतले . आणि जगाला त्याच बरोबर भारताला अन्न धान्य मध्ये स्वयंपूर्ण बनविले. त्या वेळच्या सरकार नी विविध सिंचन योजना,संकरित बियाणे शोध आणि निर्मिती. बियाणे चे शेतकऱ्या पर्यंत पोचवण्यासाठी वितरण व्यवस्था ही सर्व काम अतिशय उत्तम रित्या केली. Noman borlog ह्या आधुनिक काळातील ऋषी नी जगाला भूकबळी पासून मुक्त केले. 1970 चा नोबल पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकार नी सुद्धा त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या नावाची institude चंदीगड येथे स्थापन केली. धन्य ती लोक आणि धन्य त्या वेळचे भारत सरकार.

Rajesh188 07/10/2021 - 09:52
हो हे सत्य आहे म्हणून तर भारतीय जातीच्या पिकांचे दुसऱ्या जाती शी संकर करून निर्माण होणारी नवीन जात भारतासाठी उत्तम असते.येथील हवामानात तग राखून राहते. हरित क्रांती झाली तेव्हा ह्याचे व्यवस्थित भान ठेवले गेले. अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण संकरित बियाणे निर्माण केली गेली. सरकार नी महाबीज म्हणून संस्था स्थापन केली होती बियांच दर्जा उत्तम राहण्यासाठी.नवीन संशोधन केंद्र निर्माण केली होती. आता त्याच्या कडे दुर्लक्ष होत आहे. हे राजकीय वाक्य नाही. संकरित बियाणे आणि जनुकीय बदल करून निर्माण केलेले बियाणे ह्या मध्ये खूप मोठा फरक आहे. जनुकीय बदल करून निर्माण केलेल्या नवीन प्रकारच्या जाती मुळे निर्माण होणारा भाजी पाला, धान्य,फळ ह्यांचा मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होईल ह्या विषयी ठाम निष्कर्ष अजुन तरी निघाला नाही.समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजू नी युक्तिवाद चालू असतो. जनुकीय बदल केल्या मुले कीटक,पक्षी,सुष्म जंतू,उपयोगी बॅक्टरिया आणि एकंदरीत च पर्यावरण ह्यांच्या वर अनिष्ट परिणाम होईल अशी पण शक्यता आहे परागीकरण साठी कीटक आवश्यक असतात.त्यांचे अस्तित्व असणे गरजेचे असते.

एक अतिशय बाळबोध प्रश्न विचारतो. खते रासायनिक असतील तर काय फरक पडतो? म्हणजे NPK खतांमध्ये पण तेच घटक असणार जे गांडूळ खतांमध्ये असणार. Pesticides बद्दल समजू शकतो, पण रासायनिक खते वाईट का?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

स्वधर्म 11/10/2021 - 12:38
रावसाहेब, रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक आहेत. त्यांचा परिणाम तात्काळ म्हणजे चालू पिकावरच दिसून येतो, त्याउलट जरी कितीही जैविक खते घातली तरी ती तात्काळ त्याच पिकाला मिळतील असे नाही. याचे कारण रासायनिक खते पाण्यात अत्यंत विद्राव्य असतात त्यामुळे अत्यंत वेगाने पीकात शोषली जातात. पण त्याचमुळे बराचसा अंश खोल जमिनीत मुरत जातो, याउलट जैविक खते अधिक वेळ जमिनीच्या वरच्या थरात राहतात व हळूहळू पिकाला मिळत राहतात. परिणामी शेतकर्यांना रासायनिक खतांचा फायदा लगेच दिसून येतो व दूरगामी तोट्याकडे दुर्लक्ष होते. रासायनिक खतांचे तोटे बरेच आहेत, जे राजेश यांनी वर सांगितलेच आहेत. मुख्य तोटा म्हणजे जमिनीचे आणि परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान. पण मी फक्त एक दीर्घकालीन तोटा वानगीदाखल सांगतो. आमच्या शेताच्या आजूबाजूला अनेक शेतकर्यांच्या विहीरी आहेत. पण कोणीही त्यांचे पाणी पिऊ शकत नाही. कुकरमध्ये त्या पाण्यावर डाळ शिजत नाही. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. आता हा तोटा रासायनिक खतांमुळे झाला हे कळत असूनही ते लोक तो विचारात घेत नाहीत, कारण लघुमुदतीचा पीकाच्या उत्पादनवाढीचा फायदा! याचे मूळ कारण म्हणजे लघुकालीन फायद्याचा विचार दीर्घकालीन तोट्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरतो. ते सर्व समाजात आहेच. आपण नाही का, मुलांना चांगले ज्ञान देणार्या शाळेपेक्षा परिक्षेत अधिक गुण मिळवून देणार्या शाळेत घालत? यावर बरेच लिहीले गेले आहे. तसेच ‘माझा’ फायदा झाला ना, मग परिसरातील इतरांचा तोटा झाला तरी मला काय फरक पडतो, ही स्वार्थी वृत्तीही येथे काम करते. ती कशी याचा तुंम्हीच विचार करा.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 11/10/2021 - 13:04
वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. हे अर्धसत्य आहे. बऱ्याच ठिकाणी उसाच्या शेतीसाठी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे आणि अधिक अधिक खोलवर बोअर वेल खणत गेल्यामुळे येणाऱ्या पाण्यात जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अविद्राव्य क्षार येतात. यामुळे पाणी जास्त जड होते. रासायनिक खते जर ठिबक सिंचनाद्वारे दिली तर आपण म्हणता तसे खताचे विहिरीच्या पाण्यात उतरणे बहुतांश प्रमाणात कमी होते शिवाय खताची बचत होते आणि पिकाला जास्तीत जास्त मात्रा मिळू शकते. केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. आपण आम्ही ऊसच पिकवणार आणि त्याला भारंभार रासायनिक खतेच घालणार हा खतांचा दोष नाही. सुरीशिवाय जीवन अशक्य आहे. तेंव्हा सुरीने हात कापतो किंवा खून होऊ शकतो म्हणून सुरीला दोष देण्यात अर्थ नाही. लक्षात ठेवा-- भारतात हरित क्रांती होण्यासाठी संकरित बियाणे आणि रासायनिक खते हि मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.(सिंचन, शेतीचे यांत्रिकीकरण आणि कीटकनाशके हे इतर घटक आहेत.) त्याशिवाय भारत उपाशीच राहिला असता. वर्षानुवर्षं पडणारा दुष्काळ आणि उपासमारी हाच भारताचा इतिहास होता हे विसरून चालणार नाही

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 11/10/2021 - 15:36
डॉक्टर साहेब, एखाद्या गोष्टीला ‘अर्धसत्य’ म्हटल्यामुळे तिच्याबाबत संशय तयार होतो. यात निम्मे असत्य आहे का, दिशाभूल केलीय का, अशी शंका निर्माण होते. आता खालील गोष्टीत काय असत्य आहे, यातील काय विज्ञानाशी विसंगत आहे, ते कृपया सप्रमाण दाखवून द्यावे, ही विनंती. रासानिक खते - अत्यंत विद्राव्य असतात - त्यातील अंश जमिनीत झिरपतो - त्यामुळे भूजल प्रदूषित होते कारण सर्व मात्रा काही पीक शोषून घेऊ शकत नाही. जमिनीचे प्रदूषण अनेक मार्गांनी होत आहे आणि आपण मांडलेले ऊस, बेसुमार पाणी हे मुद्दे मला अमान्य नाहीत; पण इथे रासायनिक खतावरच चर्चा चालू होती. रासायनिक खते ही contributing factor च नाहीत, असे आपल्याला म्हणायचे आहे का? >> केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. मी केवळ शब्द बापरलेलाच नाही. उलट रासायनिक खतांचे फायदे आहेतच असेच मी म्हटले होते. शेत ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिसंस्था असून तिच्यात अनेक चल (varialbes) काम करत असतात. आपण जे करतो, त्याच्या परिणाम दिसायला वेळ लागतो. तिचे संतुलन हे एकच एका गोष्टीवर अवलंबून नसते. याची जाणिव आहे. रासायनिक खते ही मी वर सांगितल्याप्रमाणे परिणाम करतात की नाही इतकाच मुद्दा घ्या. हरितक्रांती हा जरा मोठा मुद्दा आहे आणि त्याविषयी मी काहीच टिप्पणी केली नव्हती. कोणतीही गोष्ट सर्वकाळ बरोबर आणि फक्त फायदाच देणारी नसते, पण आपल्या प्रतिसादाच्या शैलीमुळे वाचणार्यांना मूळ मुद्दाच चुकीचा आहे, दिशाभूल करणारा आहे, असे वाटू शकते म्हणून हा खुलासा.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 11/10/2021 - 19:56
अर्धसत्यचा दुसरा भाग मी लिहिलेलाच आहे कि अतिरिक्त पाणी लागणारी पिके (उदा ऊस) लावल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत जाते आणि बोअर विहिरी अधिकाधिक खोल होत जातात ज्यामुळे खोल जमिनीतील अतिरिक्त क्षार पाण्यात उतरतात. लक्षात ठेवा-- सर्वात स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे पावसाचे असते ज्यात सर्वात कमी क्षार असतात गंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात येणाऱ्या पुराबरोबर हिमालयातील गाळाची माती (आणि त्यातील खनिजे) सर्वत्र शेतात पसरते म्हणून गंगेच्या मैदानात जमीन अत्यंत सुपीक आहे. आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती यात क्षाराचे प्रमाण सर्वात कमी आहे. रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 12/10/2021 - 12:24
आपण ‘अर्धसत्या’मध्ये सत्यच आहे, हे स्पष्ट केले, त्याबद्दल धन्यवाद. रावसाहेब यांनी विचारलेला मूळ प्रश्न: रासायनिक खते वाईट का? हा होता. तसेच आपण म्हटले आहे: >> रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. मला वाटते की जैविक खतांच्या तुलनेत रासायनिक खते ही अत्यंत विद्राव्य असतात, त्यामुळे ती अगदी योग्य प्रमाणात वापरली तरी वर्षानुवर्षे वापरत राहिल्यामुळे दरवर्षी त्यांचा थोडा थोडा अंश हा भूजलात खाली जातच राहतो. परिणामी विहीरींचे पाणी आणि एकूण अनेक वर्षांनी का असेना, पण परिसंस्था प्रदूषित होतेच होते. हा धोका जैविक खतांमध्ये असल्याचे दिसत नाही. कारण ती तेवढी विद्राव्य नसतात आणि दीर्घ कालावधीत पण जास्तीत जास्त भाग पिकांना मिळतो व कमीत कमी भाग भूजलात जातो. गेली शतकानुशतके जैविक खते वापरात असूनही जमिनी शेतीयोग्य राहिल्या आहेत. रासायनिक खते वापरायला हरित क्रांतीनंतर फार अलिकडे सुरूवात झाली. त्यानंतर जो विदा मिळाला आहे त्यानुसार रासायनिक खतांमुळे लगेच नाही तरी काही वर्षांनी तरी जमिनीचे नुकसान हे होणारच असे म्हणायला जागा राहते. म्हणून रासायनिक खते वाईट आणि शक्यतो ती औषधाप्रमाणेच वापरावी असे वाटते. त्यामुळे तुमच्या प्रतिसादातील रासायनिक खते वापरत राहावीत, फक्त प्रमाणात. खतांमध्ये काहीही समस्या नसून सगळा दोष हा शेतकर्यांचा आहे, हा मुद्दा का मान्य करण्यासारखा का नाही हे स्पष्ट झाले असावे. बाकी जमिन प्रदूषणाची इतर कारणे, शेतकरी अन्नदाता नसून अन्न उत्पादक वगैरे गोष्टीबाबत आपले म्हणणे रास्त आहे.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 11/10/2021 - 19:26
डॉक्टर री भाषेत च सांगून बघतो काय नाहीत कदाचित त्यांना आमचा पॉइंट समजेल. डॉक्टर्स व्हिटॅमिन च्या गोळ्या घेण्याचे कधी सुचवतात.आणि कोणाला सुचवतात. ह्याचे जे उत्तर आहे तेच उत्तर रासायनिक खतांची गरज कितपत असते. ह्या प्रश्नाचं आहे. वनस्पती ना योग्य वाढ होण्यासाठी पोषक द्रव्यांची गरज असते काही त्या हवेतून मिळवतात,काही पाण्यातून मिळवतात तर काही जमिनीतून च मिळवतात. जमिनीत एकाधे पोषक द्रव्य कमी असेल तर वनस्पती वाढ योग्य रिती नी होत नाही.तेव्हा ते ओळखून तेच. कमी असणारे पोषक द्रव्य खता मधून दिले जाते. सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. जसे विनाकारण व्हिटॅमिन च्या गोळ्या डॉक्टर नी खूप दिवस घेण्यास सांगितल्या तर रोगी देवाघरी लवकर जाईल तसाच प्रकार आहे हा. खत निर्माण करण्याची कला खूप जुनी आहे. खूप वर्षांपासून माणूस खत वापरत आहे. रासायनिक खत आता आली. दारू पिली की तात्पुरते कसे ताकत आल्या सारखे वाटते energy वाटते. तसाच प्रकार आहे. कंपोस्ट खत,शेन खत,पक्षांच्या विष्टेपासून मिळणारी खते, मलमुत्र अशा अनेक प्रकार च्या खतापासून पिकांस सर्व पोषक द्रव्य मिळतात. पिकांची रोग प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.जमिनीत असणाऱ्या असंख्य bacteria, उपयोगी बुरशी, आणि अनेक सुष्म जीव ह्यांची नीट वाढ होते. रासायनिक खता ने हे सर्व होत नाही. कीटक नाशक सारखी वापरल्या मुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते.जसे माणसाच्या शरीर बाबत घडत तसेच वनस्पती बाबत घडते. गवत किंवा माणूस पिकवत नसलेल्या अनेक वनस्पती जोमात वाढतात.पण माणूस ज्याची शेती करतो त्यांची वाढ jomat होत नाही.त्यांच्या वर च जास्त रोग पडतात. त्यांना खत वैगेरे द्यावी लागतात. का? ह्या वर विचार करा.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 11/10/2021 - 20:06
सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. हा दोष रासायनिक खतांचा नसून शेतकऱ्यांचा आहे. पण कोणी शेतकऱ्यांना काही बोलायचे नाही कारण तो "बळीराजा" आहे आणि स्वतःला "अन्नदाता" म्हणवतो. SOIL HEALTH CARD किंवा मृदा आरोग्य आलेख काय आहे जमीन आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा Soil & Water Testing Laboratoryकाय आहे हे एकदा वाचून पहा. आपल्या जमिनीत आणि पाण्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि कोणती अन्नद्रव्ये अतिरिक्त आहेत याचे विश्लेषण करून कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि कोणत्या तर्हेची खते द्यायची याचा शास्त्रीय अभ्यास आहे. पण शेती तज्ज्ञांना शेतीत काय कळते? त्यांनी कधी हात काळे केले आहेत? असा सूर लावणारे बहुसंख्य शेतकरी सर्वत्र आढळतात ( अगदी मिपावर सुद्धा). बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 11/10/2021 - 21:32
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही. जेव्हा रासायनिक खत आली तेव्हा ती कशी द्यायचे ह्याचे मार्गदर्शन सरकार नी केले होते. काही खत ही झाडाच्या मुळाशी च चिमुटभर दिली जायची तीच पद्धत होती. हरित क्रांती च्या वेळी सरकार नी उत्तम यंत्रणा राबवल्या होत्या. खरे साहेबाना शेतकऱ्या विषयी प्रचंड तिरस्कार आहे असे त्यांच्या अनेक कॉमेंट मधून दिसून येतो. सर्वसामान्य व्यक्ती आहे हो शेतकरी त्याचा तिरस्कार करू नका.. पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मला तरी वाटत नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा नदी किनारी पावसाळी काळात तीन तीन महिने जमीन पाण्याखाली असते पण ती नापीक झालेली मी तरी अजुन पहिली नाही. लावणीचे भात किती शतके जमिनीत घेतले जाते . लावणीच्या भातच्या शेती मध्ये जमीन पाण्याखाली असते ती नापीक झालेली मी तरी बघितली नाही. उसाला जास्त पाणी लागते त्याची बचत करण्यासाठी ठीपक सिंचन वापरावे ही सूचना योग्य आहे लोक वापरू पण लागली आहेत. खतांचा योग्य वापर,कीटक नाशकांचा योग्य वापर ह्या विषयी सरकारी पातळीवर प्रचार करावा माहिती द्यावी..

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 12/10/2021 - 10:59
आपण डोकं वापरायचाच नाही आणि बेफाट काही तरी बडबड करायची असा पणच घेतलाय का आपण? मी शेतकऱ्यांचा तिरस्कार करतो असे आपले पूर्वग्रहदूषित मत आहे त्याला माझा नाईलाज आहे. शेतकरी हा

अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक

आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.

( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )

पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 12/10/2021 - 11:02
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.

कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?

Rajesh188 11/10/2021 - 10:13
जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जम‌िनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद््भवलेली समस्या आहे. डिटेल मध्ये सांगायचे झाले तर खूप मोठी पोस्ट होईल.

In reply to by Rajesh188

मला अजूनही कळलं नाही. जमिनीतले NPK सततच्या वापराने नष्ट होतात म्हणून ते बाहेरून (उदाहरणार्थ युरिया) दिले जातात. रासायनिक खते जमिनीला सुपीक बनवतात आणि म्हणून तर पिके भरघोस येतात. "रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात" म्हणजे?

सुरिया 11/10/2021 - 19:23
दाळिंबाचे काही बायप्रॉडक्ट वाले मिळू शकतील का? अनारज्यूस वगैरे वाले. त्यांना दाळिंब कसे दिसते पेक्षा कसे लागते हे महत्त्वाचे असते. काही वर्षापूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलीने दाळिंबाची वाईन तिच्या कॉलेज प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलि होती. पोमोग्रॅनेटा नावाने. त्याचे खूप कौतुक झालेले होते. एका यशस्वी व धनाढ्य दाळींब उत्पादकाने तो प्रोजेक्ट अभ्यासायला मागितला होता पण पुढे काही प्रगती झाली नाही त्याची. त्याची पैसे द्यायची तयारी नव्हती आणि मुलीला फुकट प्रोजेक्ट द्यायचा नव्हता. तसे कूणी उत्पादन करणारे आहेत का बघू शकता.

In reply to by सुरिया

स्वधर्म 12/10/2021 - 12:50
धन्यवाद. आता आंम्ही नाईलाजाने डाळिंबाची बाग काढली आहे. बरेच निर्णय चुकीचे झालेत पण ती शिकण्याची किंमत आहे. सध्या तरी खर्च निघून कुटुंबाला खायला विषमुक्त अन्न मिळावे इतकाच उद्देश आहे. सर्व अन्न नव्हे, तर मुख्य धान्ये, कडधान्ये व तेलबीया, इतकेच आळीपाळीने करायचा विचार आहे. शेती हा धंदा म्हणून फार अवघड गोष्ट आहे, हे समजलेले आहे. मात्र जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे.

टर्मीनेटर 12/10/2021 - 13:06
छोटेखानी लेख आवडला 👍 मी पण गेली तीन-चार वर्षे आवड म्हणून सैन्द्रीय पद्धतीने फळझाडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण १६ पैकी ४ नारळ (प्रताप), एक पेरू (लखनौ) आणि एक पपई (तैवान) सोडली तर आवळा, जांभूळ, बोर, जाम (लाल आणि सफेद), लिंबू आणि डाळिंब ह्यांची) वाढ फार काही समाधान कारक वाटत नाहीये. अर्थात हौस म्हणून वेळ मिळेल तसे तिकडे लक्ष देता येते. पण असमाधानकारक वाढ बघून आता त्यांना रासायनिक खत देण्याचे विचार डोक्यात यायला लागलेत, जे खरतर मला पटत नाहीये.

In reply to by टर्मीनेटर

Rajesh188 12/10/2021 - 13:13
आवळा आणि जांभूळ तर असेच चांगले फुलते आणि फळते पण .तुम्ही कोणत्या जाती निवडल्या आहेत त्याची एकदा समीक्षा करा. माझ्या दारात लिंबाचे झाड आहे खत ,कीटक नाशक ह्यांचा कधीच वापर केला नाही. मदत झाड जोमाने डुलत असते आणि वर्ष भर लिंब असतात. जांभळी ची मोठ मोठी झाड आमच्या गावात आहेत. बाह्य सपोर्ट ची त्यांना बिलकुल गरज नाही. चिंच खूप मोठमोठी झाड आहेत दर वर्षी फुलतात आणि फळतात पण.

In reply to by Rajesh188

टर्मीनेटर 12/10/2021 - 13:51
थोडे दिवस वाट बघा
ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो, नाही काही प्रगती दिसली तर मात्र नाईलाजाने रासायनिक खाते वापरावी लागतील. धन्यवाद.

चौथा कोनाडा 30/09/2021 - 13:03
एकदम भारी !
झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत. म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.
अगदी खरंय !

In reply to by कर्नलतपस्वी

गॉडजिला 01/10/2021 - 11:21
नेमक धोरण परस्थितीवरच अवलंबुन आहे पणं या धाग्याने आपल्या सर्वांसाठीच एक महत्वाचा दृष्टिकोन अधोरेखित केला याबद्दल धागाकेखकाचे आभार

अमर विश्वास 30/09/2021 - 14:04
एक चवीने खाणारा .. म्हणून ही प्रतिक्रिया ... खाताना पंचेंद्रियांना समाधान मिळालेच पाहिजे. त्यामुळे नुसती चवच नाही .. तर दृश्य (appearance), वास, पोत (texture) हे सुध्दा महत्वाचे .. कृत्रिम रंग किंवा रंगीत दिवे यांना फसू नये हे खरच पण योग्य पारखून पूर्ण समाधान देणाऱ्या फळे / भाज्या यांनाच प्राधान्य एकच उदाहरण देतो .. आमच्या इथे चौकात एक पेरूची गाडी (सायकल) असते. त्याच्याकडे गेल्यावर साधारणतः मध्यम आकाराचा तजेलदार, थोडा हिरवा पण पिवळसर पणा कडे झुकणारा, खूप कडक नाही पण अगदी मऊ पडलेला पण नको .. असा पेरू नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेतला कि जो काही सुवास प्रसन्न करून जातो कि .. एक पेरू तिथेच कापून खावासा वाटतो (खातोच) ...

In reply to by अमर विश्वास

स्वधर्म 30/09/2021 - 16:43
रंग आणि गंध फळांच्या ताजेपणाशी आणि गुणवत्तेशी संबंधित आहेच, पण तो नैसर्गिक पध्दतीने आला असेल तर. त्याला महत्व द्यावे, पण तेच सर्वकाही नव्हे. वॉशिंग्टन सफरचंदावर म्हणे चकाकी येण्यासाठी मेणाचा थर (स्प्रे) देतात. सध्याच्या रासायनिक खते, किटकनाशके यांच्या जमान्यात, खूप काळजीपूर्वक निवड करणे महत्वाचे आहे. खाद्यपदार्थांचे रूप हे फार महत्वाचे होऊन बसले आहे. टीव्हीवर जे खवय्येगिरीचे कार्यक्रम लागतात, त्यात तर पदार्थ दिसतो कसा याला इतके आफाट महत्व दिले जाते, की त्याला फूड पोर्नोग्राफी असेच म्हणावे लागेल. पण असा पदार्थ बनविणे अगर खाणे हे आरोग्यदायी असेलच असे नाही.

In reply to by स्वधर्म

सुक्या 01/10/2021 - 02:54
नैसर्गीक ताजेपणा हा केव्हाही चांगला परंतु त्याला बंधने आहेत. एखादे फळ किंवा भाजी नैसर्गीक रुपात जास्तीत जास्त २ /३ दिवस चांगली राहु शकते. फळे त्यामानाने जास्त दिवस टिकतात. परंतु तसे लवकर खराब ही होतात. आजच्या काळात जिथे लोकांना केव्हाही ताजे फळ फळ्बागेपासुन शेकडो किलोमीटर दुर असताना हवे असते. म्हणुन त्याचे शेल्फ लाईफ वाढावे म्हणुन काही प्रक्रीया कराव्या लागतात. सफरचंदावर लावलेला मेणाचा थर हा त्यातलाच प्रकार. फळे पिकवणे हा प्रकार नैसर्गीक होण्यासाठी पुर्वी कोठया असायच्या. आता तेच काम केमीकल वापरुन केले जाते. एकाच प्रकारची पिके घेउन किंवा भरमसाठ पाणी वापरुन पिके घेतली की जमीनीचा पोत खराब होतो. त्याला ठीक करायला एकतर आलटुन पालटुन पिके घेणे , जमीण पडीक ठेवणे किंवा रासायनीक किंवा नैसर्गीक खते (शेण) वापरावी लागतात. त्यामुळे रासायनीक खते वगेरे आज काळाची निकड आहेत. फक्त त्यांचा अतीरेक नको. सेंद्रीय शेती उत्तम पर्याय आहे. परंतु त्यात लिमीटेशन आहेत. जे आपण खातो ते सारेच सेंद्रीय हवे मग प्रोसेस्ड फूड टाळावे. सध्याच्या काळात तरी मला ते शक्य वाटत नाही . .

एक जूनी म्हण आहे "कळकट मळकट कामाला बळकट" सध्या कोणाला असे कळकट मळकट आवडत नाही, पण आकर्षक असेल तर त्या वस्तुला जास्त किम्मत येते (उदा बर्‍याचशा चीनी बनावटीच्या वस्तु) शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते, मक्याच्या लाह्यांना कॉर्नफ्लेक्स म्हटले की त्यांची किम्मत दुप्पट तिप्पट होते, अशी अनेक उदाहरणे देता येतील. भाज्यांचे आणि फळांचे पण तसेच होत आहे. आता तर मॉल संस्कृती मधे भाज्या सुध्दा फॉइल पॅक मिळायला लागल्या आहेत. एकदा रामदेव बाबांनी सांगितले होते की असेच (ताजे) अन्न खा जे जास्तिजास्त तीन दिवसात खराब होते. शेवट अतिशय आवडला पण सध्या जमानाच "काय भुललासी वरलिया रंगा चा आहे." पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चौकस२१२ 01/10/2021 - 04:34
शेंगदाण्याची चटणी म्हटले की नाक मुरडले जाते पण त्या ऐवजी पिनट बटर मात्र आवडीने खाल्ले जाते, अर्रे हे असे जे कोणी करीत असतील त्यानं खाणे समजले नाही असेच म्हणावे लागेल दोन्ही पदार्थ खाण्यात मज्जा आहे ... खमंग वाटतं वाड्यबरोबर दाण्याची चटणीचा पाहिजे आणि साटे सॉस करण्यासाठी पीनट बटर पाहिजे

सोत्रि 30/09/2021 - 19:02
म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे
अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे! अपनी अकल लगाओ दिखावे पे मत जाओ. - (डोळे उघडलेला) सोकाजी

दृष्टीआड सृष्टी. आमच्या गावी डाळींबाचे भरपूर बाग आहेत. एकदा ८-१० दिवस गावी राहणे झाले आणि नातेवाईकांबरोबर डाळींबाची शेती पाहिली. दर दिवसाआड कसला ना कसला फवारा / औषध मारावे लागते. डाळींबा इतके दुसरे रासायनिक फळ नसेल. न खालेले जास्त चांगले.

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 30/09/2021 - 22:28
डाळिंब आणि द्राक्षे ही दोन पिके सध्या महाराष्ट्रात अत्यंतिक फवारणी केली जाणारी पिके आहेत. एक प्रयोग करून अवश्य पाहण्यासारखा आहे. बाजारात सर्वसामान्यपणे मिळणारा एक द्राक्ष घ्या. दोन मिनिटे तो फक्त तोंडात ठेवा; चावू नका. नुसता घोळवायचा. आणि मग बाहेर काढा. तोंडात कसली चव जाणवते आहे पहा. ९९% अप्रिय तुरट चव जाणवेल. ती तशी जाणवली नाही, तर नैसर्गिक पध्दतीने पिकवलेली द्राक्षे आहेत, हे लक्षात येईल. चावल्यानंतर प्राधान्याने गोड चव लागत असल्याने फवारणी केल्याने बदललेली चव, जी बहुधा सालीवरच असते, ती सहसा लक्षात येत नाही. त्यामुळे तुंम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. ही दोन फळे जवळजवळ ९९% भरपूर फवारणी करूनच पिकवली जातात, आणि शक्य असेल तर ती टाळलेली बरी.

सुबोध खरे 30/09/2021 - 20:20
मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" हा एकांगी विचार होऊ शकतो. ज्या झाडाला कीड लागली त्या झाडाची फळे नीट वाढू शकली नसल्यामुळे त्यांना भाव येत नाही असेही होऊ शकते. दुसरे -- कीटकनाशके मानवी शरीराला अपायकारकच असतात हा सुद्धा एकांगी विचार झाला. कारण पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके( डासांना मारण्यासाठी वापरत असलेले गुड नाईट इ ( अलेथ्रीन, डेल्टा मेथ्रीन इ) हि केवळ कणा हीन प्राण्यांवर ( invertebrates) परिणाम करतात. पक्षी प्राणी आणि मानवावर नाही. हि पायरेथ्रीन गटातील कीटक नाशके सुद्धा crysanthemum या शेवंती गटातील झाडापासूनच तयार होतात. https://en.wikipedia.org/wiki/Pyrethrin कडूलिंब हे झाड सुद्धा आपल्याला कीटकांनी खाऊ नये म्हणूनच कीटकनाशक द्रव्ये तयार करत असते. https://en.wikipedia.org/wiki/Azadirachtin https://en.wikipedia.org/wiki/Azadirachta_indica असे जैविक युद्ध निसर्गात अनंत काळापासून चालू आहे. तेंव्हा केवळ त्यावर अळ्या किंवा किडे दिसले म्हणून ते सुरक्षित आहे हे समजणे चूक ठरेल. जर निंबोळ्यांचा अर्क फवारला असेल तर त्यावर किडे दिसणार नाहीत. बाकी फळ वरून चांगले दिसत नसेल तर लोक आतून चांगले असेल याची खात्री कशी बाळगणार? जर फळ खराब निघाले तर पूर्ण पैसे परत मिळतील हि खात्री असेल तरच लोक विकत घेतील. जाता जाता -- काय भुललासी वरलीया सोंगा? हे अभंगापुरते ठीक आहे. लग्नाच्या बाजारात सुंदर मुलगी आणि कमाऊ मुलगाच लवकर खपतो. स्वभावाने दिलदार असलेल्या गरीब मुलाशी किंवा स्वभावाने चांगली कुरूप मुलगी कोण पत्करून घेतंय?

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 30/09/2021 - 23:08
>> मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" हा एकांगी विचार होऊ शकतो. हे मान्य, पण ज्यावर किडा मुंगी फिरली ते फळ शहरी माणसे घेत नाहीत; दिसायला चांगले नसलेले फळ स्वाभाविकपणे कमी दर्जाचे समजतात. हा अधिक एकांगी विचार झाला. आणि लेखाचा तोच मुद्दा आहे. अपवाद काढून कोणतीही गोष्ट सिध्द किंवा असिध्द होत नसते, तर सर्वसामान्यपणे काय घडते ते महत्वाचे असते. फळे घेताना निर्जीव वस्तूप्रमाणे स्टराईल फळे भाजी म्हणजे चांगली असे समजू नये. परदेशात यांत्रिक सौंदर्यदृष्टी लावण्याचे सवय लोकांत इतकी बोकाळली आहे, की सुपर मार्केटमध्ये वाकड्या काकड्या रिजेक्ट केल्या जातात. हे पहा: https://www.forbes.com/sites/briankateman/2020/03/02/the-time-is-ripe-for-ugly-fruits-and-vegetables/?sh=b4d95184a851 ****** डॉ. अनिल अवचट यांच्या मुलाखतीमधून लहानपणी ते खेड्यात वाढले आणि शेतकर्यांच्या मुलांबरोबर खेळत मजा करत शेतातून फिरत असत. असेच एकदा त्यांच्या मित्राबरोबर शेतावर राखणीला गेले आणि पाखरं हाकलण्यासाठी गोफण फिरवू लागले. पाहता पाहता ते मोठ्या जोशात येऊन गोफण फिरवू लागले, इतकी, की जवळपास पाखरं अजिबात ठरेनात. हे पाहून त्यांचा शेतकरी मित्र म्हणाला, ‘अन्या, आरं इतका जोर लावू नको, त्यांचा बी वाटा असतोय!’ अवचट यांना हा प्रसंग वयाच्या ऐंशींव्या वर्षी लक्षात राहण्याइतका महत्वाचा वाटला! Food waste exists across the food supply chain, thanks to pests and mold, poor climate control and household waste. “Imperfect” produce is often turned away by grocery stores for not meeting strict cosmetic standards – making up around 40% of total food waste.

Rajesh188 30/09/2021 - 23:56
आणि पटला सुद्धा लेखकाच्या मता शी पूर्ण सहमत आहे. फळ,भाज्या नैसर्गिक रुपात जास्त चकमक करत नाहीत.त्या मुळे जास्त चमकणारी फळ विकत घेवूच नयेत..कीटकनाशक ही उपद्रवी कीटकांना नष्ट करण्याच्या हेतू नी जरी वापरली जात असली तरी त्या मुळे सहयोगी,उपयुक्त सूक्ष्म जीव सुद्धा मारले जातात. आणि नैसर्गिक चक्रात त्यांचे स्थान खूप महत्वाचे असते.

चौकस२१२ 01/10/2021 - 05:12
डॉक्तरांनी दिलेली माहिती उपयुक्त आहे परत एकदा असे म्हणावेसे वाटते कि कुठेतरी समतोल गाठला पाहिजे .. टोकाला जाऊन काय होणार? त्यातल्या त्यात कमी खते घातलेले पदार्थ घेता येतील का? कधी कधी जे मिळतंय ते आपल्या आर्थिक कुवती मध्ये दोन्ही बसवावे .. अर्थात हे सगळे करणे तिथे शक्य आहे जिथे फूड लेबलिंग म्हणजे विकले जाणारे पदार्थासंबंधीची माहिती चे नियम काटेकोर आहेत ( त्यात काय आहे , कोणते अनैसर्गिक पदार्थ आहेत इत्यादी ची माहिती देणे) मिठाई च बघ मुददमून रंग घालू नका... इत्यादी

Rajesh188 01/10/2021 - 08:21
कोणत्या फळांना ,आणि भाज्यांना कीटक नाशकाची जास्त गरज लागते त्याचे वर्गीकरण करू शकतो. द्राक्षे, सफरचंद ,डाळिंब, स्ट्रॉबेरी, चेरी, ह्यांच्या वर कीटक नशकांचा जोरदार मारा केलेला असतो. भाज्या मध्ये. वाटाणा,टोमॅटो,पालक, पावटा, फुलकोबी, ह्यांच्या वर कीटक नशकाचा मारा केलेला असतो. आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 10:42
आवळा, जांबुळ,चिक्कू, पपई ,नारळ ह्यांना कीटक नाशकांची गरज पडत नाही ते स्वतः रोगाचा प्रतिकार करण्यास खंबीर असतात. संपूर्णपणे गैरसमजुतीवर आधारित बेलाशकपणे ठोकून दिलेले विधान https://vikaspedia.in/agriculture/crop-production/integrated-pest-managment/ipm-strategies-for-coconut/diseases-and-symptoms https://www.agrifarming.in/sapota-pests-diseases-chiku-sapodilla-control-methods https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/15538362.2019.1608889

एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पूर्वी गेलो असताना त्यांनी द्राक्षे अजिबात न खाण्याचा सल्ला दिला होता. द्राक्षे म्हणजे विषाची कुपी असते असं ते म्हणाले होते, त्याची आठवण झाली. बाकी बाजारात pesticide removers उपलब्ध आहेत त्याबद्दल काय मत आहे: https://www.amazon.in/dp/B089KQ3W4D/ref=cm_sw_r_cp_apa_glt_fabc_68GY1GQ18JAVDC156EXB?_encoding=UTF8&psc=1

Rajesh188 01/10/2021 - 12:11
कोकणातील जग प्रसिद्ध हापूस आंब्याची चव चाखायला लोकांना मिळतच नाही .झाडावर पूर्ण वाढ झालेले आणि नैसर्गिक रीत्या पिकविलेला आंबा लोकांपर्यंत पोचतच नाही. आंब्याला फळा चा राजा का म्हणतात ते तेव्हाच समजेल. आता जी बाजारात असतात ते कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव.

In reply to by Rajesh188

आंब्याच्या बाबतीत इतका गोंधळ आहे, की अगदी भरवश्याच्या माणसाकडून म्हणून डायरेक्ट मागवलेले आंबे पण बेचव निघालेले पाहिलेत. अशाने आंब्यांची मागणी अक्षरशः कमी झाली आहे.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 12:40
कृत्रिम रित्या पिकवली जाणारी फळ बेचव. याला काही शास्त्राधार आहे का? कि हे पण असंच बेलाशक ठोकून दिलेलं

Rajesh188 01/10/2021 - 12:52
शास्त्रीय कारण तुम्ही डॉक्टर आहात तुम्हीच ध्या. सर्व सामान्य लोकांना हे चांगले माहीत आहे. १) झाडावर फळाला पाड लागल्या शिवाय त्या झाडावरची फळ काढायची नसतात. म्हणजे झाडावर च फळ पिकण्यास सुरुवात झाल्यावर. २) भात्यान मध्ये ती फळ झाकून ठेवली जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया झाली. दुसरी कृत्रिम पाड लागण्या अगोदरच फळ झाडावरून काढली जातात आणि केमिकल वापरून त्यांचा रंग बदलला जातो ती पिकल्यासारखी फक्त वाटतात. आणि ह्या दोन्ही पद्धती मधील फळांच्या चवी मध्ये खूप मोठे अंतर असते. हे अनुभवाने सर्वांस माहीत आहे. येथील सर्व ह्या वर सहमत होतील. आता शास्त्रीय कारण काय आहेत ते तुम्ही गूगल वर shodha. गूगल वरची माहिती सत्य च असते असे नाही. अनुभव हा सत्य च असतो.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 01/10/2021 - 13:32
आंबा चिकू फणस इ अनेक फळे झाडावर पिकण्याच्या अगोदरच काढून अधिक ठेवली जातात पिकण्यासाठी आणि हे शतकानुशतके चालू आहे. सीताफळे चिकू पिकण्यासाठी तांदुळात ठेवले जातात. त्यात पिकण्याची प्रक्रिया काय आणि कशी होते ते समजून घ्या कृत्रिम प्रक्रिया कशी होते तेही समजून घ्या.त्यात साम्य काय आहे. इथिलिन काय ऍसिटिलीन काय आहे कोणत्या नैसर्गिक प्रक्रियेत कोणता वायू निघतो हे समजून घ्या मग ठोकाठोकी करा अनुभव हा सत्य च असतो. लोकांना भुताचा अनुभव येतो म्हणजेच भुते आहेत का? थापाथापी कार्याला किमान बुद्धिमत्ता असावी लागते अन्यथा उघडे पडले जाते हे लक्षात ठेवा

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 01/10/2021 - 14:05
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो. रसायनाचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास पेप्टिक अल्सर होऊ शकतो. मानवांमध्ये, tyसिटिलीन अनुमत पातळीपेक्षा कमी असल्यास तीव्र विषारी नाही तर जर मर्यादा ओलांडली तर त्याचे इनहेलेशन बेशुद्ध होऊ शकते आणि दीर्घकाळापर्यंत हायपोक्सिया म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता निर्माण करून न्यूरोलॉजिकल सिस्टमवर परिणाम करू शकते. कॅल्शियम कार्बाइड हे एक संक्षारक आणि धोकादायक रसायन आहे ज्यात अशुद्धी म्हणून आर्सेनिक आणि फॉस्फरस हायड्राइडचे ट्रेस आहेत. आर्सेनिक आणि फॉस्फरस विषबाधाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अतिसार (रक्तासह किंवा त्याशिवाय), उलट्या, तहान, अशक्तपणा, ओटीपोटात आणि छातीत जळजळ, गिळण्यात अडचण, डोळे/त्वचेमध्ये जळजळ/जळजळ होणे, घसा खवखवणे, खोकला, दम लागणे यांचा समावेश होतो. श्वास घेणे आणि त्वचेवर व्रण इ. कॅल्शियम कार्बाइडमध्ये कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील आहेत. Dr खरे वरील माहिती १०० वेळा तरी वाचा.नैसर्गिक पने पिकवलेली फळे आणि कृत्रिम पने पिकवली गेलेली फळ ह्या मध्ये काय फरक आहे ते समजेल. फळ पिकवण्यासाठी वापरली जाणारी रसायने ही शरीरासाठी अत्यंत घातक आहे.. तुम्ही dr असून हेकेखोर आहात मी च शहाणा अशी वृत्ती आहे. दुसऱ्याची बुध्दी काढायची तुमची सवय आहे.जगात जे काही घडतं ते मला सर्व कळत असा फालतू आत्मविश्वास आहे विद्या विनयने शोभते. हे साधे तत्व तुम्हाला माहित नाही. रासायनिक खत,रासायनिक कीटक नाशक,रासायनिक रिपिंग हे सर्व मानवासाठी अत्यंत घातक आहे हे उच्च दर्जा असलेली संशोधक लोक सांगत आहेत. मी नाही

In reply to by Rajesh188

Rajesh188 01/10/2021 - 14:14
रसायने फळ पिकवण्यासाठी भारत सर्रास वापरली जातात.ठराविक प्रमाण पेक्षा जास्त वापरली जातात. दुधी भोपळा,भोपळा किंवा बाकी फळ भाज्या आकारणे लगेच वाढव्या म्हणून नको ती रसायने वापरली जातात. नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 06/10/2021 - 18:36
नैसर्गिक शेती चा विरोध काय करताय .डॉक्टर असून सुद्धा असं तुम्हाला कुठे दिसलं? हरित क्रांती च्या अगोदर भारतात केवळ नैसर्गिक शेतीच होत होती पण अन्नधान्याचा तुटवडा का होत होता? याचे समर्पक उत्तर देता येत असेल तर चर्चा करता येईल अन्यथा जे फ़ुकायचे आहे ते फुका आपण काहीही बेलाशक टंकायचं एवढंच ठरवलंय म्हणून आपल्याला उत्तर द्यावं असं अजिबात वाटत नाही.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 06/10/2021 - 18:39
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोट अस्वस्थ होते कारण अल्कधर्मी पदार्थ हा एक चिडखोर आहे जो पोटातील श्लेष्मल ऊतक नष्ट करतो आणि आतड्यांचे कार्य व्यत्यय आणतो. हायला तुम्ही साला सकटच आंबे किंवा केळी खाता कि काय? तसे नसेल आणि आंबे चोखून खात असाल तर निदान ते स्वच्छ पाण्याने धुवून खावे एवढं किमान ज्ञान आल्याला शाळेत शिकवलेलं होतं त्याचा विसर पडलेला दिसतोय

स्वधर्म 01/10/2021 - 13:12
चौथा कोनाडा, कर्नलतपस्वी, गॉडजिला, रंगीला रतन, सुक्या, ज्ञानोबाचे पैजार, चौकस२१२, अमरेंद्र बाहुबली, सोत्रि, धर्मराजमुटके, सुबोध खरे, Rajesh188, रावसाहेब चिंगभूतकर,  सुरिया, मराठी_माणूस तसेच इतर प्रतिसादकांचे आभार! बरीचशी चर्चा ‘फळे, भाजी खरेदीसाठी’ एक नवा दृष्टीकोन यावर झाली आहे, पण… बहुसंख्य लोकांचा हळूहळू बदललेला सौंदर्यविषयक दृष्टीकोन हा शेतकर्यांसाठी कसा (चुकीची) दिशा देत आहे, हा ही एक मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयोगात काही गोष्टी आंम्हाला जरूर साध्य झाल्या. उदा. काहीही खत न टाकता, किटकनाशके न मारता, डाळिंबाचं पीक घेता येतच नाही असा ठाम समज आजूबाजूच्या शेतकर्यांचा होता. आंम्ही ते करू शकलो. पण तरीही अगदी फळे तोडणार्यांपासून विक्रेत्यांपर्यंत असा काही सौंदर्य-नकार मिळत गेला, की बस्स! कदाचित काही सेंद्रीय खते घालून, फवारण्या करून फळांना रंग आणणे, ती मोठी करणे या गोष्टींबाबत प्रयत्न करता येईल, पण अशी सगळी फळे एकदम न येणे पण व्यापार्यांना ती सगळी एकदम हवी असणे इत्यादि लॉजिस्टीक समस्या आहेतच. या लेखाने निदान काही लोकांच्या दृष्टीकोनात जरी बदल झाला, तरी धाग्याचे सार्थक झाले असे वाटेल.

बापूसाहेब 01/10/2021 - 15:12
डाळिंब शेतीचा वयक्तिक अनुभव नसला तरी अनेक मित्र आणि नातेवाईक यांच्या फळबागा मी नेहमीच खुप जवळून पहात आलोय. डाळिंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे स्वधर्म यांनी धाग्यात लिहिल्याप्रमाणे रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे.. डाळिंबाच्या झाडांवर दर दोन ते तीन दिवसांनी कसल्या ना कसल्या औषधाची फवारणी शेतकरी करतात. कीड घालवनारे, कलर आणणारे, गोडी आणणारे, झाडांची वाढ थांबवून फळे आणी फुल आणणारे, फुल आणि फळ गळणे थांबवणारे इ कितीतरी प्रकारचे स्प्रे झाडांवर दर आठवड्याला केले जातात. आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत. फवारण्या करण्यात खंड पडला तर संपूर्ण सिजन सोडुन द्यावा लागतो. हीच बाब पेरू, सीताफळ या फळांना सुध्दा लागू आहे. आमच्या इथे फवारणी न केल्यामुळे संपूर्ण पेरूची बाग सोडुन द्यावी लागली. जे काही पेरू आत्ता आहेत ते सर्वच्या सर्व किडलेले निघतात. तर सारांश असा की कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या वापराशिवाय आजच्या काळात शेती कारणे ( विशेषतः फळांची ) अशक्यप्राय गोष्ट आहे. सेंद्रिय शेती हा विषय सर्वांचा आवडीचा आणि पर्यावरण पूरक असला तरी हा प्रकार वाटतो तितका सोपा आणि फायदेशीर तर नक्कीच नाही. याला अनेक कारणे आहेत पण ती नंतर कधीतरी सविस्तर.. बाजारातून आणलेली फळ स्वच्छ धुवून खाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे जेणेकरून रसायने आपल्या श रीरात कमीतकमी जातिल..त्याचसोबत शेतकऱ्यांनी देखील रसायने फवराताना ती योग्य मात्रेमध्ये फावरणे आवश्यक आहे. आता लेखातील दुसऱ्या उदाहरणाकडे येऊ. ज्या भाजीवर किडे आहेत ती चांगली असा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कीटक/किडे/अळ्या असलेल्या भाज्या खाणे कधीही आरोग्यासाठी चांगले असू शकत नाही. आम्ही शेतात स्वतः पिकवून खात आसलो तरी कीड लागलेली भ भाजी व फळे वापरत नाही...आणि हाच न्याय लावायचा असेल तर मग मी असेही म्हणू शकतो की माश्या बसलेले खाद्यपदार्थ खाणे हे कधीही चांगले. कारण त्यावर माश्या बसतायेत, खतायेत आणि तरीही जिवंत आहेत याचाच अर्थ खाद्यपदार्थ चांगल्या क्वालिटी चा आहे.. च कोणत्याही गोष्टीचे जनरलायजेशन नको. काही गोष्टी स्वानुभवाने शेअर कराव्यात म्हणून सांगतो. - १) फळ कधीही स्वच्छ धुवून खावीत २) सीजन च्या खुप आधी येणारी किंवा सीजन संपून गेला तरी शिल्लक असणारी फळे घेऊ नयेत ( उदा..जानेवारी मध्ये येणारा आंबा किंवा मे महिन्यातील द्राक्षे ) ३) फळे घेताना त्यांच्या देठाकडे लक्ष द्या. देठ काळा झालेली किँवा देठ वाळलेली फळे ही कीतीही टवटवीत दिसत असली तरी घेऊ नयेत. ( सफरचंद , द्राक्षे, इ.) ४) टरबूज , कलिंगड इ फळे शक्यतो हातगाडीवर किंवा स्टॉल वर घेऊ नयेत. अश्या ठिकाणीं फळांना विषेश इंजेक्शन देउन गोड आणि आतून कलरफुल बनवुन विकले जाते. शक्यतो डायरेक्ट मार्केट मधून किंवा विश्वासू व्यक्तीकडून खरेदी करावी. ५) १०० टक्के सेंद्रिय ( ऑरगॅनिक ) म्हणून मार्केटिंग करणार्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवून मार्केट रेट पेक्षा जास्त दर देउन खरेदी करू नये.

स्वधर्म 02/10/2021 - 15:11
बापूसाहेब, सर्वप्रथम आपल्या प्रतिसादाबद्दल आणि आपला अनुभव सांगितल्याबद्दल आभार! >>  रासायनिक औषधांचा वापर केल्याशिवाय सुंदर, लालबुंद आणि गोड डाळिंब शेती करणे अशक्य आहे..  हे एकदम मान्य. >> आणि आत्ता हे सर्व इतक नॉर्मल झालंय कि असं नाही केल्यास डाळिंब येतच नाहीत.  हा समजही शेतकर्यांमध्ये अत्यंत सार्वत्रिक आहे. आमचा प्रयोग नेमका हे न करता डाळिंब पिकवता येतात का? हे पाहण्याचाच होता. तो आर्थिकदृष्ट्या नसला, तरी नैसर्गिकदृष्ट्या यशस्वी झाला हेच सांगायचे होते. केवळ दिसायला चांगली फळे नसल्यामुळे शेतकर्यापुढे कोणत्या समस्या उभ्या राहतात आणि नाईलाजाने बाग काढून टाकण्यासारखे आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक निर्णय घ्यावे लागतात, हे सुजाण ग्राहकांपुढे मांडणे हा धाग्याचा उद्देश होता. मी वर म्हटल्याप्रमाणे, बरीचशी चर्चा ही दोन मुद्द्यांच्या मधे आलेल्या बोधकथेवरच झाली आहे. ‘निवडून निवडून कीड असलेली भाजीच खा’ असे सांगण्याचा उद्देश नक्कीच नाही. कदाचित मुद्दा अधिक स्पष्टपणे वेगळ्या प्रकारे मांडता येईल. जसे की… आपल्यासाठी कोणते हितकारक आहे? अत्यंत, मोठी, रंगीत, अधिक गोड आकर्षक फळे ज्याला भरपूर खते (रासायनिक) दिली असण्याची आणि भरपूर फवारणी केली असण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या ढीगावर आजिबात कोणत्याही जीवजंतूचे अस्तित्व दिसून येत नाही. की थोडी लहान, पाण्याचे प्रमाण कमी असलेली, कमी आकर्षक रंगाची फळे? ज्यावर सहज नैसर्गिकपणे जीवजंतू आकर्षित झाले आहेत? अशा ढीगातून तुंम्ही निवडून चांगली फळे नक्कीच घेऊ शकता. तरीही एखादे फळ किड लागलेले आढळले, तर बाजूला खाढू शकता. माझ्या पिकाचा एक दाणा किंवा एका फळावरही कोणतीच किडामुंगी असता कामा नये, हा शेतकर्यांचा अट्टाहास किती योग्य आहे? आपण आपल्यासाठीच पिकवतो पण वर अवचट यांच्या गोष्टीत म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही वाटा मान्य करायला काय हरकत आहे? किडीचा समूळ नाश करणारी औषधे अत्यंत आक्रमकपणे मारून आपण जे पिकवणार ते खरोखरच मानवाला दीर्घकाळ खात राहण्यासाठी योग्य आहे का? हा मुद्दा आहे सर! कीड किंवा अळ्या असलेले फळ खाल्यास मानवाला किती अपाय होऊ शकतो याचा सहज धांडोळा घेतला असता, अनेक संदर्भ मिळाले. अनेक ठिकाणी अगदी प्रत्यक्ष अळी खाल्ली गेल्यासही गंभीर काही त्रास व आजार होत नाही असेच समोर आले. त्यातला एक दुवा खाली देत आहे. जाता जाता, आतमध्ये विशिष्ट जातीची माशी जाऊन तिने अंडी घातल्याशिवाय अंजीर किंवा उंबर हे तयारच होत नाही, हे आपणास माहित असेलच. https://askinglot.com/are-fruit-worms-harmful Are fruit worms harmful? There are worms in them. Tiny white worms, almost transparent, that will ultimately blossom into fruit flies -- unless you eat them first. Scientists know them as Drosophila suzukii. Before we go on, we should tell you to stop gagging, because they are safe to eat. बाकी तुंम्ही सांगितलेल्या पाचही मुद्द्यांशी सहमत. खूप सोप्या भाषेत साधक बाधक गोष्टी तुंम्ही सांगितल्या.

वामन देशमुख 02/10/2021 - 16:47
माझं स्वतःचं काहीसं असंच मत आणि अनुभव आहे. उदा. बाजारात वांगी घेताना ज्या विक्रेत्याची वांगी अजिबात किडलेली नाहीत ती वांगी घेण्यापेक्षा, ज्या विक्रेत्याच्या वांग्यांपैकी काही वांगी किडलेली आहेत त्यांतील न किडलेली वांगी निवडून घ्यावीत. अश्या वांग्यांवर कीटकनाशकांचा मारा कमी प्रमाणात झालेला असण्याची शक्यता जास्त असते. बाकी मूळ लेख आणि त्याखालील काही प्रतिक्रिया माहितीपूर्ण, विचारप्रवर्तक वाटल्या.

Rajesh188 02/10/2021 - 18:47
निसर्ग चक्रात सर्व जीव स्वतःचे रक्षण करतात तशा वनस्पती स्वतःचे रोगापासून रक्षण करण्याचे प्रयत्न नक्कीच करत असतील. माझा ह्या वर्षी चे निरीक्षण सांगतो.मी काही जमीन फक स्वतः साठी ठेवलेली आहे जी घरा जवळ ,घराच्या पाठी मागेच.करणार कोणी नसल्या मुळे बाकी करायला दिली आहे. तर घरा पाठी जे शेत आहे त्या मध्येच कधीच रासायनिक खत वापरले नाही,कधीच कीटक नाशक वापरली नाहीत. त्या मध्ये घरात लागते त्या डाळी,भुईमूग वैगेरे असतो ह्या वर्षी पावसामुळे खुरपणी फक्त एकदाच केली गेली आता मागल्या महिन्यात गावी गेलो तर पूर्ण शेतात फक्त आणि फक्त गवत च दिसत होते अगदी विविध जातीचे उंच वाढणारे .पीक कुठेच दिसत नव्हते. फक्त गवत... ह्या वर्षी काहीच पीक आले नाही सर्व गेले हातातून असे वाटले. आणि आत मध्ये शेतात गेलो आणि बघतो तर भुईमूग किंवा बाकी सर्व पीक मस्त होती चांगली फुलली,होती.,भुईमूग ला मदत खूप शेंगा लागलेल्या होत्या . ह्या चवळी,मग, वाटाणा ,घेवडा नेहमी पेक्षा जास्त झाला .. सांगायचं पॉइंट हा आहे इतके गवत असून सुद्धा पिकानी स्वतःचा बचाव केला होता आणि स्वतःची व्यवस्थित वाढ पण केली होती ..कोणता रोग नाही,कोणती कीड नाही.. . कीटक नाशक न वापरता सुद्धा निरोगी. आणि असा अनुभव आहे.त्या शेतात किती ही हवामान प्रतिकूल असले तरी पीक जात नाही. जंगलात विविध झाडे ,फळझाड असतात त्यांच्या कोणते कीटकनाशक,रासायनिक खत वापरली जातात तरी ती झाड,त्यांची फळ निरोगी असतात ना.उलट जोमात वाढलेली असतात.

In reply to by Rajesh188

स्वधर्म 03/10/2021 - 16:31
राजेशजी, तुमच्या अनुभवाशी मला जोडून घेता आले. मला पण वाढलेल्या तणांमुळे खूप ताण आला होता. डाळिंबाच्या मध्ये भुईमूग लावला होता, त्यात मोठेच तण आले होते. आजूबाजूचे शेतकरी ते लवकरात लवकर काढून टाका असे सांगत होते. तणाला फुले येईपर्यंत थांबलात तर ती पुन्हा पुन्हा अत्यंत जोमाने येतच राहतात, असे म्हणत होते. रान ‘स्वच्छ’(?) ठेवले पाहिजे असे त्यांचे मत. त्यामुळे एकदा भांगलण करून घेतली. त्याचा बराच म्हणजे रु. ५७०० इतका खर्च आला. तुमची सगळी पोषक द्रव्ये तणच खाते, मग पिकाला काय मिळणार? असे सगळ्यांचे मत. नंतरच्या ट्रीपला गेलो तेंव्हा पुन्हा तण वाढले होतेच आणि पाऊस सुध्दा चालला होता. एका बाजूच्या शेतकर्याने आता भांगलण पुन्हा करू नका असा फायद्याचा सल्ला दिला. मग तण तसेच ठेवले. काढणीच्या वेळेला, काही प्रमाणात तण होते आणि भुईमुगाचे वेल आयुष्य संपल्यामुळे त्यात दिसूनही येत नव्हते. पण काढणी केल्यावर आमच्या शेंगा आजूबाजूच्या खते टाकलेल्या शेतकर्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे भरलेल्या आढळून आल्या. आमच्याकडे तण खूप वाढू दिले तर नंतर काढणीच्या वेळेला माणसे (बायका) आत जात नाहीत, सापांची वगैरे भीती वाटते असे म्हणतात. म्हणून भांगलण करावीच लागेल की काय असे वाटते. तणनाशके मारून भांगलणीपेक्षा खूपच कमी खर्च येतो, पण जमिनीचे दीर्घकालीन नुकसान होते. आमच्या शेतात भुईमूग काढताना आंम्हाला बर्याच ठिकाणी भरपूर मुंग्या चावल्या. वैताग आला, तरी आपली जमीन विषारी बनलेली नाही याचे समाधान वाटले. एका डाळिंबाच्या झाडावर तर मधमाशांचे मोहोळ लागलेले पाहिले. खूप बरे वाटले. पण हे सगळे असले तरी या वर्षी डाळिंब काढण्याचाच विचार करत आहे. कारण पुण्यात राहून फळबाग नैसर्गिक पध्दतीने करणे जमेल असे वाटत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

स्वधर्म 07/10/2021 - 18:41
खरंच गुंतागुंतीचे आहे. मी नविन शेतकरी असल्याने मला तर खूप शिकायला मिळत आहे. उदा. एकाच क्षेत्रावर मला भांगलण करण्यासाठी ५७०० खर्च आला आणि शेजार्यांनी तणनाशक मारले, त्यांना १३०० + ४०० मजूरी असा खर्च आला. पण माझे पैसे तिथल्या स्थानिक बायकांकडे गेले तर त्यांचे पैसे तणनाशक कंपनी, विक्रेते यांच्याकडे गेले. जमिनीचे प्रदूषण, उत्पादनाचे विषारीकरण, सूक्ष्मजीवांवरील परिणाम या तर आर्थिकतेपलिकडच्या गोष्टी आहेत.

नेत्रेश 03/10/2021 - 05:32
झाड लहान असेल, कींवा खतपाणी कमी पडत असेल, कींवा माती चांगली सुपिक नसेल तर फळे तुम्ही दीलेल्या फोटोत आहेत तशी येउ शकतात. काही वर्षांनी झाड आणखी मोठे झाल्यावर, कींवा खतात सुधारणा / बदल केल्यावर आणखी चांगली फळे येउ शकतील. आमची शेती नसली तरी सर्व प्रकारची फळझाडे भरपुर आहेत. डाळिंबे, आंबे चीक्कु, नारळी, रामफळा, काजु, फणस, केळी, आवळा, जाम, कोकम, इत्यादी. कोणतीही रासायनीक फवारणी न करताही उत्तम दर्जाची फळे येतात. बरीचशी झाडे कोंकण कृषी विद्यापिठातुन आणल्याचे आठवते. वर खरे डॉक्टरनी लिहील्याप्रमाणे आंबा फणस चिक्कु वगैरे बरीचशी फळे पुर्ण पिकायचा आधी काढली जातात. त्याचे एक कारण म्हाणजे झाडावर पुर्ण पिकेपर्यंत फळ रहात नाही. ते ठेवले तर वार्‍याने पडते, पक्षी व खारी अर्धवट खातात, अगदी जास्त पिकलेला फणसही कावळे चोची मारुन फोडतात. तसेच झाडावर पुर्ण पिकलेले फळ अगदी अलगद काढावे लागते, नाहीतर खाली पडुन फुटते. आणी अशी जास्त पिकलेली फळे दुकानात विकायला पाठवता येत नाहीत. फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो. जर तुमची स्वतःची बाग असेल तर ते तुम्ही नक्कीच अनुभवले असेल. पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही. मी गावी येणार असेल तर आई बरीचशी फळे झाडावर ठेउन देते. त्यातली २५% पण खायला मिळत नाहीत. पडुन फुकट जातात, कींवा पाखरे खातात. आता तर वानरही यायला लागलेत. पण जी मिळतात त्यांची गोडी अविट असते. खाली पडलेली फळे तीथेच कुजुन चांगली माती होते. त्यात होणारे कीडे जमीन आणखी सुपिक करतात. तर सांगायचे हे की स्वतःची झाडे असतील तर (स्वतःला खाण्यासाठी) रासायनीक खते न वापरतापण उत्कृष्ठ फळे येउ शकतात. झाडावर पुर्ण पिकलेले फळ थोडे जास्त चवदार असते. (अती पिकलेले नव्हे - त्यात कीड पण असु शकते). फळ शेतीचा अनुभव नसल्याने नो कॉमेंट.

In reply to by नेत्रेश

स्वधर्म 03/10/2021 - 16:38
तुमचे बरोबर आहे. झाडे जोमदार असली तर चांगली फळे येतात. आणि जमीन निरोगी असेल, वाण मुळात चांगला असेल, तरच झाडे चांगली येतात. दुसरे असे की, तुमचे घर कोकणात असावे असे वाटते. मला अशी माहिती मिळाली, की घराच्या परड्यात चार झाडे नैसर्गिक पध्दतीने लावणे वेगळे आणि शेतात बाग लावणे वेगळे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by नेत्रेश

वामन देशमुख 03/10/2021 - 17:11
फळ झाडावर पुर्ण पिकु दिले तर त्याचा गोडवा आधी काढलेल्या फळांपेक्षा निश्चीतच अधीक असतो... पण झाडावर पिकलेले फळ बाजारात आणुन विकता येत नाही.
बरोबर आहे.

In reply to by वामन देशमुख

Rajesh188 03/10/2021 - 17:34
फळ ही कच्या अवस्थेत म्हणजे कैऱ्या असलेल्या अवस्थेत झाडावरून सर्व काढल्या आणि असे प्रतेक वर्षी करत गेलो तर त्या झाडाची फळधारणा क्षमता कमी होते हे पारंपरिक ज्ञाना वर आधारित गृहितक आहे. आणि practically खरे पण आहे. वारंवार गर्भपात केल्या मुळे स्त्री ची प्रजनन क्षमता कमी होते का? ह्याच्या शी हा प्रश्न पण निगडित आहे माहिती गार लोकांनी मत व्यक्त करावे.

In reply to by Rajesh188

धनावडे 11/10/2021 - 16:06
काहीही आमचा एक आंब्याच झाड तीन पिढ्या जगल, आणि एक फणसाचं झाड कमीत कमी १५० वर्ष तरी जुने असेल, आणि अशी गावात जुणी झाडे खूप मिळतील तुम्हाला.

प्रामाणिक म्हणून हनतीचं नुकसान होताना पाहून वाईट वाटलं. ती डाळिंब विकता नाही का येणार? ग्राहक संघटना वगैरेंच्या कुणाशी बोलता येईल का?

In reply to by प्राची अश्विनी

स्वधर्म 06/10/2021 - 13:59
धन्यवाद. या वर्षीचा हंगाम संपला आहे. मुख्य प्रश्न थोडी थोडी तोडणी करून ती शहरात पाठवण्याचा. इथे इकॉनॉमी ओफ स्केल चा प्रॉब्लेम आला. फळ बाग ही खूप लक्ष देऊन करण्याची गोष्ट आहे. खरं तर मला स्वत:ला आमच्या मेहनतीपेक्षा झाडांचा मृत्यू जास्त दु:खदायक वाटला. पण नैसर्गिक पध्दतीने हंगामी पिके करण्याचे सुरूच ठेवणार आहे.

In reply to by स्वधर्म

Rajesh188 06/10/2021 - 14:14
नैसर्गिक पद्धतीने फळ झाडे,फुल झाडे किंवा कोणतेही पीक हे जोरदार येणारच .तो निसर्गाचा नियम च आहे. म्हणून तर पृथ्वी विविध वनस्पती,प्राणी ह्यांनी समृद्ध आहे. फक्त ह्याला वेळ लागतो.आज नैसर्गिक शेती केली की लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत काही वर्ष जावी लागतात. तुम्ही नक्की यशस्वी होणार.

In reply to by Rajesh188

स्वधर्म 06/10/2021 - 17:40
राजेशजी. प्रयत्न नक्कीच सुरू ठेवणार आहे. रासायनिक खते घालून बेसुमार कीटकनाशके वापरून बर्याच शेतकर्यांना तात्कालिक फायदा दिसत असला तरी जमिनीचे लवकर न भरून येणारे नुकसान होते, हे मनोमन पटले आहे.

Rajesh188 07/10/2021 - 00:29
हरित क्रांती भारतात यशस्वी करून दाखवण्यात त्या वेळचे सरकार, संशोधक - c Subramanian,b.p.pal,. A.b जोशी, m.s. Swaminathan , ह्यांनी प्रचंड कष्ट. घेतले. सरकार,संशोधक,शेतकरी सनदी अधिकारी ह्यांच्या अपार कष्टाने ,आणि रॉकफेलर फौडेशन नी अफाट कष्ट घेतले . आणि जगाला त्याच बरोबर भारताला अन्न धान्य मध्ये स्वयंपूर्ण बनविले. त्या वेळच्या सरकार नी विविध सिंचन योजना,संकरित बियाणे शोध आणि निर्मिती. बियाणे चे शेतकऱ्या पर्यंत पोचवण्यासाठी वितरण व्यवस्था ही सर्व काम अतिशय उत्तम रित्या केली. Noman borlog ह्या आधुनिक काळातील ऋषी नी जगाला भूकबळी पासून मुक्त केले. 1970 चा नोबल पुरस्कार त्यांना देण्यात आला. भारत सरकार नी सुद्धा त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. त्यांच्या नावाची institude चंदीगड येथे स्थापन केली. धन्य ती लोक आणि धन्य त्या वेळचे भारत सरकार.

Rajesh188 07/10/2021 - 09:52
हो हे सत्य आहे म्हणून तर भारतीय जातीच्या पिकांचे दुसऱ्या जाती शी संकर करून निर्माण होणारी नवीन जात भारतासाठी उत्तम असते.येथील हवामानात तग राखून राहते. हरित क्रांती झाली तेव्हा ह्याचे व्यवस्थित भान ठेवले गेले. अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण संकरित बियाणे निर्माण केली गेली. सरकार नी महाबीज म्हणून संस्था स्थापन केली होती बियांच दर्जा उत्तम राहण्यासाठी.नवीन संशोधन केंद्र निर्माण केली होती. आता त्याच्या कडे दुर्लक्ष होत आहे. हे राजकीय वाक्य नाही. संकरित बियाणे आणि जनुकीय बदल करून निर्माण केलेले बियाणे ह्या मध्ये खूप मोठा फरक आहे. जनुकीय बदल करून निर्माण केलेल्या नवीन प्रकारच्या जाती मुळे निर्माण होणारा भाजी पाला, धान्य,फळ ह्यांचा मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होईल ह्या विषयी ठाम निष्कर्ष अजुन तरी निघाला नाही.समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजू नी युक्तिवाद चालू असतो. जनुकीय बदल केल्या मुले कीटक,पक्षी,सुष्म जंतू,उपयोगी बॅक्टरिया आणि एकंदरीत च पर्यावरण ह्यांच्या वर अनिष्ट परिणाम होईल अशी पण शक्यता आहे परागीकरण साठी कीटक आवश्यक असतात.त्यांचे अस्तित्व असणे गरजेचे असते.

एक अतिशय बाळबोध प्रश्न विचारतो. खते रासायनिक असतील तर काय फरक पडतो? म्हणजे NPK खतांमध्ये पण तेच घटक असणार जे गांडूळ खतांमध्ये असणार. Pesticides बद्दल समजू शकतो, पण रासायनिक खते वाईट का?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

स्वधर्म 11/10/2021 - 12:38
रावसाहेब, रासायनिक खतांचे फायदे आहेतच, पण तोटे अधिक आहेत. त्यांचा परिणाम तात्काळ म्हणजे चालू पिकावरच दिसून येतो, त्याउलट जरी कितीही जैविक खते घातली तरी ती तात्काळ त्याच पिकाला मिळतील असे नाही. याचे कारण रासायनिक खते पाण्यात अत्यंत विद्राव्य असतात त्यामुळे अत्यंत वेगाने पीकात शोषली जातात. पण त्याचमुळे बराचसा अंश खोल जमिनीत मुरत जातो, याउलट जैविक खते अधिक वेळ जमिनीच्या वरच्या थरात राहतात व हळूहळू पिकाला मिळत राहतात. परिणामी शेतकर्यांना रासायनिक खतांचा फायदा लगेच दिसून येतो व दूरगामी तोट्याकडे दुर्लक्ष होते. रासायनिक खतांचे तोटे बरेच आहेत, जे राजेश यांनी वर सांगितलेच आहेत. मुख्य तोटा म्हणजे जमिनीचे आणि परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान. पण मी फक्त एक दीर्घकालीन तोटा वानगीदाखल सांगतो. आमच्या शेताच्या आजूबाजूला अनेक शेतकर्यांच्या विहीरी आहेत. पण कोणीही त्यांचे पाणी पिऊ शकत नाही. कुकरमध्ये त्या पाण्यावर डाळ शिजत नाही. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. आता हा तोटा रासायनिक खतांमुळे झाला हे कळत असूनही ते लोक तो विचारात घेत नाहीत, कारण लघुमुदतीचा पीकाच्या उत्पादनवाढीचा फायदा! याचे मूळ कारण म्हणजे लघुकालीन फायद्याचा विचार दीर्घकालीन तोट्यापेक्षा नेहमीच वरचढ ठरतो. ते सर्व समाजात आहेच. आपण नाही का, मुलांना चांगले ज्ञान देणार्या शाळेपेक्षा परिक्षेत अधिक गुण मिळवून देणार्या शाळेत घालत? यावर बरेच लिहीले गेले आहे. तसेच ‘माझा’ फायदा झाला ना, मग परिसरातील इतरांचा तोटा झाला तरी मला काय फरक पडतो, ही स्वार्थी वृत्तीही येथे काम करते. ती कशी याचा तुंम्हीच विचार करा.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 11/10/2021 - 13:04
वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरली, जी जमिनीत खोलवर मुरली आणि विहीरींचे पाणी प्रदूषित झाले. हे अर्धसत्य आहे. बऱ्याच ठिकाणी उसाच्या शेतीसाठी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे आणि अधिक अधिक खोलवर बोअर वेल खणत गेल्यामुळे येणाऱ्या पाण्यात जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे अविद्राव्य क्षार येतात. यामुळे पाणी जास्त जड होते. रासायनिक खते जर ठिबक सिंचनाद्वारे दिली तर आपण म्हणता तसे खताचे विहिरीच्या पाण्यात उतरणे बहुतांश प्रमाणात कमी होते शिवाय खताची बचत होते आणि पिकाला जास्तीत जास्त मात्रा मिळू शकते. केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. आपण आम्ही ऊसच पिकवणार आणि त्याला भारंभार रासायनिक खतेच घालणार हा खतांचा दोष नाही. सुरीशिवाय जीवन अशक्य आहे. तेंव्हा सुरीने हात कापतो किंवा खून होऊ शकतो म्हणून सुरीला दोष देण्यात अर्थ नाही. लक्षात ठेवा-- भारतात हरित क्रांती होण्यासाठी संकरित बियाणे आणि रासायनिक खते हि मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत.(सिंचन, शेतीचे यांत्रिकीकरण आणि कीटकनाशके हे इतर घटक आहेत.) त्याशिवाय भारत उपाशीच राहिला असता. वर्षानुवर्षं पडणारा दुष्काळ आणि उपासमारी हाच भारताचा इतिहास होता हे विसरून चालणार नाही

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 11/10/2021 - 15:36
डॉक्टर साहेब, एखाद्या गोष्टीला ‘अर्धसत्य’ म्हटल्यामुळे तिच्याबाबत संशय तयार होतो. यात निम्मे असत्य आहे का, दिशाभूल केलीय का, अशी शंका निर्माण होते. आता खालील गोष्टीत काय असत्य आहे, यातील काय विज्ञानाशी विसंगत आहे, ते कृपया सप्रमाण दाखवून द्यावे, ही विनंती. रासानिक खते - अत्यंत विद्राव्य असतात - त्यातील अंश जमिनीत झिरपतो - त्यामुळे भूजल प्रदूषित होते कारण सर्व मात्रा काही पीक शोषून घेऊ शकत नाही. जमिनीचे प्रदूषण अनेक मार्गांनी होत आहे आणि आपण मांडलेले ऊस, बेसुमार पाणी हे मुद्दे मला अमान्य नाहीत; पण इथे रासायनिक खतावरच चर्चा चालू होती. रासायनिक खते ही contributing factor च नाहीत, असे आपल्याला म्हणायचे आहे का? >> केवळ रासायनिक खताना दोष देऊन काम चालणार नाही. मी केवळ शब्द बापरलेलाच नाही. उलट रासायनिक खतांचे फायदे आहेतच असेच मी म्हटले होते. शेत ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिसंस्था असून तिच्यात अनेक चल (varialbes) काम करत असतात. आपण जे करतो, त्याच्या परिणाम दिसायला वेळ लागतो. तिचे संतुलन हे एकच एका गोष्टीवर अवलंबून नसते. याची जाणिव आहे. रासायनिक खते ही मी वर सांगितल्याप्रमाणे परिणाम करतात की नाही इतकाच मुद्दा घ्या. हरितक्रांती हा जरा मोठा मुद्दा आहे आणि त्याविषयी मी काहीच टिप्पणी केली नव्हती. कोणतीही गोष्ट सर्वकाळ बरोबर आणि फक्त फायदाच देणारी नसते, पण आपल्या प्रतिसादाच्या शैलीमुळे वाचणार्यांना मूळ मुद्दाच चुकीचा आहे, दिशाभूल करणारा आहे, असे वाटू शकते म्हणून हा खुलासा.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 11/10/2021 - 19:56
अर्धसत्यचा दुसरा भाग मी लिहिलेलाच आहे कि अतिरिक्त पाणी लागणारी पिके (उदा ऊस) लावल्यामुळे बेसुमार पाण्याचा वापर होतो ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत जाते आणि बोअर विहिरी अधिकाधिक खोल होत जातात ज्यामुळे खोल जमिनीतील अतिरिक्त क्षार पाण्यात उतरतात. लक्षात ठेवा-- सर्वात स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे पावसाचे असते ज्यात सर्वात कमी क्षार असतात गंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात येणाऱ्या पुराबरोबर हिमालयातील गाळाची माती (आणि त्यातील खनिजे) सर्वत्र शेतात पसरते म्हणून गंगेच्या मैदानात जमीन अत्यंत सुपीक आहे. आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती यात क्षाराचे प्रमाण सर्वात कमी आहे. रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे.

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म 12/10/2021 - 12:24
आपण ‘अर्धसत्या’मध्ये सत्यच आहे, हे स्पष्ट केले, त्याबद्दल धन्यवाद. रावसाहेब यांनी विचारलेला मूळ प्रश्न: रासायनिक खते वाईट का? हा होता. तसेच आपण म्हटले आहे: >> रासायनिक खते हि बेसुमार प्रमाणात वापरली तर त्याचा अंश पाण्यात उतरेल यात काय संशय? पण हा दोष रासायनिक खतांचा नसून वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा आहे. मला वाटते की जैविक खतांच्या तुलनेत रासायनिक खते ही अत्यंत विद्राव्य असतात, त्यामुळे ती अगदी योग्य प्रमाणात वापरली तरी वर्षानुवर्षे वापरत राहिल्यामुळे दरवर्षी त्यांचा थोडा थोडा अंश हा भूजलात खाली जातच राहतो. परिणामी विहीरींचे पाणी आणि एकूण अनेक वर्षांनी का असेना, पण परिसंस्था प्रदूषित होतेच होते. हा धोका जैविक खतांमध्ये असल्याचे दिसत नाही. कारण ती तेवढी विद्राव्य नसतात आणि दीर्घ कालावधीत पण जास्तीत जास्त भाग पिकांना मिळतो व कमीत कमी भाग भूजलात जातो. गेली शतकानुशतके जैविक खते वापरात असूनही जमिनी शेतीयोग्य राहिल्या आहेत. रासायनिक खते वापरायला हरित क्रांतीनंतर फार अलिकडे सुरूवात झाली. त्यानंतर जो विदा मिळाला आहे त्यानुसार रासायनिक खतांमुळे लगेच नाही तरी काही वर्षांनी तरी जमिनीचे नुकसान हे होणारच असे म्हणायला जागा राहते. म्हणून रासायनिक खते वाईट आणि शक्यतो ती औषधाप्रमाणेच वापरावी असे वाटते. त्यामुळे तुमच्या प्रतिसादातील रासायनिक खते वापरत राहावीत, फक्त प्रमाणात. खतांमध्ये काहीही समस्या नसून सगळा दोष हा शेतकर्यांचा आहे, हा मुद्दा का मान्य करण्यासारखा का नाही हे स्पष्ट झाले असावे. बाकी जमिन प्रदूषणाची इतर कारणे, शेतकरी अन्नदाता नसून अन्न उत्पादक वगैरे गोष्टीबाबत आपले म्हणणे रास्त आहे.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 11/10/2021 - 19:26
डॉक्टर री भाषेत च सांगून बघतो काय नाहीत कदाचित त्यांना आमचा पॉइंट समजेल. डॉक्टर्स व्हिटॅमिन च्या गोळ्या घेण्याचे कधी सुचवतात.आणि कोणाला सुचवतात. ह्याचे जे उत्तर आहे तेच उत्तर रासायनिक खतांची गरज कितपत असते. ह्या प्रश्नाचं आहे. वनस्पती ना योग्य वाढ होण्यासाठी पोषक द्रव्यांची गरज असते काही त्या हवेतून मिळवतात,काही पाण्यातून मिळवतात तर काही जमिनीतून च मिळवतात. जमिनीत एकाधे पोषक द्रव्य कमी असेल तर वनस्पती वाढ योग्य रिती नी होत नाही.तेव्हा ते ओळखून तेच. कमी असणारे पोषक द्रव्य खता मधून दिले जाते. सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. जसे विनाकारण व्हिटॅमिन च्या गोळ्या डॉक्टर नी खूप दिवस घेण्यास सांगितल्या तर रोगी देवाघरी लवकर जाईल तसाच प्रकार आहे हा. खत निर्माण करण्याची कला खूप जुनी आहे. खूप वर्षांपासून माणूस खत वापरत आहे. रासायनिक खत आता आली. दारू पिली की तात्पुरते कसे ताकत आल्या सारखे वाटते energy वाटते. तसाच प्रकार आहे. कंपोस्ट खत,शेन खत,पक्षांच्या विष्टेपासून मिळणारी खते, मलमुत्र अशा अनेक प्रकार च्या खतापासून पिकांस सर्व पोषक द्रव्य मिळतात. पिकांची रोग प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.जमिनीत असणाऱ्या असंख्य bacteria, उपयोगी बुरशी, आणि अनेक सुष्म जीव ह्यांची नीट वाढ होते. रासायनिक खता ने हे सर्व होत नाही. कीटक नाशक सारखी वापरल्या मुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते.जसे माणसाच्या शरीर बाबत घडत तसेच वनस्पती बाबत घडते. गवत किंवा माणूस पिकवत नसलेल्या अनेक वनस्पती जोमात वाढतात.पण माणूस ज्याची शेती करतो त्यांची वाढ jomat होत नाही.त्यांच्या वर च जास्त रोग पडतात. त्यांना खत वैगेरे द्यावी लागतात. का? ह्या वर विचार करा.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 11/10/2021 - 20:06
सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. हा दोष रासायनिक खतांचा नसून शेतकऱ्यांचा आहे. पण कोणी शेतकऱ्यांना काही बोलायचे नाही कारण तो "बळीराजा" आहे आणि स्वतःला "अन्नदाता" म्हणवतो. SOIL HEALTH CARD किंवा मृदा आरोग्य आलेख काय आहे जमीन आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा Soil & Water Testing Laboratoryकाय आहे हे एकदा वाचून पहा. आपल्या जमिनीत आणि पाण्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि कोणती अन्नद्रव्ये अतिरिक्त आहेत याचे विश्लेषण करून कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि कोणत्या तर्हेची खते द्यायची याचा शास्त्रीय अभ्यास आहे. पण शेती तज्ज्ञांना शेतीत काय कळते? त्यांनी कधी हात काळे केले आहेत? असा सूर लावणारे बहुसंख्य शेतकरी सर्वत्र आढळतात ( अगदी मिपावर सुद्धा). बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

Rajesh188 11/10/2021 - 21:32
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही. जेव्हा रासायनिक खत आली तेव्हा ती कशी द्यायचे ह्याचे मार्गदर्शन सरकार नी केले होते. काही खत ही झाडाच्या मुळाशी च चिमुटभर दिली जायची तीच पद्धत होती. हरित क्रांती च्या वेळी सरकार नी उत्तम यंत्रणा राबवल्या होत्या. खरे साहेबाना शेतकऱ्या विषयी प्रचंड तिरस्कार आहे असे त्यांच्या अनेक कॉमेंट मधून दिसून येतो. सर्वसामान्य व्यक्ती आहे हो शेतकरी त्याचा तिरस्कार करू नका.. पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मला तरी वाटत नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा नदी किनारी पावसाळी काळात तीन तीन महिने जमीन पाण्याखाली असते पण ती नापीक झालेली मी तरी अजुन पहिली नाही. लावणीचे भात किती शतके जमिनीत घेतले जाते . लावणीच्या भातच्या शेती मध्ये जमीन पाण्याखाली असते ती नापीक झालेली मी तरी बघितली नाही. उसाला जास्त पाणी लागते त्याची बचत करण्यासाठी ठीपक सिंचन वापरावे ही सूचना योग्य आहे लोक वापरू पण लागली आहेत. खतांचा योग्य वापर,कीटक नाशकांचा योग्य वापर ह्या विषयी सरकारी पातळीवर प्रचार करावा माहिती द्यावी..

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 12/10/2021 - 10:59
आपण डोकं वापरायचाच नाही आणि बेफाट काही तरी बडबड करायची असा पणच घेतलाय का आपण? मी शेतकऱ्यांचा तिरस्कार करतो असे आपले पूर्वग्रहदूषित मत आहे त्याला माझा नाईलाज आहे. शेतकरी हा

अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक

आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.

( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )

पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 12/10/2021 - 11:02
माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.

कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?

Rajesh188 11/10/2021 - 10:13
जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जम‌िनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद््भवलेली समस्या आहे. डिटेल मध्ये सांगायचे झाले तर खूप मोठी पोस्ट होईल.

In reply to by Rajesh188

मला अजूनही कळलं नाही. जमिनीतले NPK सततच्या वापराने नष्ट होतात म्हणून ते बाहेरून (उदाहरणार्थ युरिया) दिले जातात. रासायनिक खते जमिनीला सुपीक बनवतात आणि म्हणून तर पिके भरघोस येतात. "रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात" म्हणजे?

सुरिया 11/10/2021 - 19:23
दाळिंबाचे काही बायप्रॉडक्ट वाले मिळू शकतील का? अनारज्यूस वगैरे वाले. त्यांना दाळिंब कसे दिसते पेक्षा कसे लागते हे महत्त्वाचे असते. काही वर्षापूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलीने दाळिंबाची वाईन तिच्या कॉलेज प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलि होती. पोमोग्रॅनेटा नावाने. त्याचे खूप कौतुक झालेले होते. एका यशस्वी व धनाढ्य दाळींब उत्पादकाने तो प्रोजेक्ट अभ्यासायला मागितला होता पण पुढे काही प्रगती झाली नाही त्याची. त्याची पैसे द्यायची तयारी नव्हती आणि मुलीला फुकट प्रोजेक्ट द्यायचा नव्हता. तसे कूणी उत्पादन करणारे आहेत का बघू शकता.

In reply to by सुरिया

स्वधर्म 12/10/2021 - 12:50
धन्यवाद. आता आंम्ही नाईलाजाने डाळिंबाची बाग काढली आहे. बरेच निर्णय चुकीचे झालेत पण ती शिकण्याची किंमत आहे. सध्या तरी खर्च निघून कुटुंबाला खायला विषमुक्त अन्न मिळावे इतकाच उद्देश आहे. सर्व अन्न नव्हे, तर मुख्य धान्ये, कडधान्ये व तेलबीया, इतकेच आळीपाळीने करायचा विचार आहे. शेती हा धंदा म्हणून फार अवघड गोष्ट आहे, हे समजलेले आहे. मात्र जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे.

टर्मीनेटर 12/10/2021 - 13:06
छोटेखानी लेख आवडला 👍 मी पण गेली तीन-चार वर्षे आवड म्हणून सैन्द्रीय पद्धतीने फळझाडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण १६ पैकी ४ नारळ (प्रताप), एक पेरू (लखनौ) आणि एक पपई (तैवान) सोडली तर आवळा, जांभूळ, बोर, जाम (लाल आणि सफेद), लिंबू आणि डाळिंब ह्यांची) वाढ फार काही समाधान कारक वाटत नाहीये. अर्थात हौस म्हणून वेळ मिळेल तसे तिकडे लक्ष देता येते. पण असमाधानकारक वाढ बघून आता त्यांना रासायनिक खत देण्याचे विचार डोक्यात यायला लागलेत, जे खरतर मला पटत नाहीये.

In reply to by टर्मीनेटर

Rajesh188 12/10/2021 - 13:13
आवळा आणि जांभूळ तर असेच चांगले फुलते आणि फळते पण .तुम्ही कोणत्या जाती निवडल्या आहेत त्याची एकदा समीक्षा करा. माझ्या दारात लिंबाचे झाड आहे खत ,कीटक नाशक ह्यांचा कधीच वापर केला नाही. मदत झाड जोमाने डुलत असते आणि वर्ष भर लिंब असतात. जांभळी ची मोठ मोठी झाड आमच्या गावात आहेत. बाह्य सपोर्ट ची त्यांना बिलकुल गरज नाही. चिंच खूप मोठमोठी झाड आहेत दर वर्षी फुलतात आणि फळतात पण.

In reply to by Rajesh188

टर्मीनेटर 12/10/2021 - 13:51
थोडे दिवस वाट बघा
ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो, नाही काही प्रगती दिसली तर मात्र नाईलाजाने रासायनिक खाते वापरावी लागतील. धन्यवाद.
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.

कूरबूर / (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

सतीश रावले ·

गड्डा झब्बू 19/09/2021 - 23:08
बीड़ी पिके नुक्कड़ पे वेट तेरा किया रे खाली-पीली 18 कप चाय भी तो पिया रे राजा बेटा बनके मैंने जब शराफत दिखाई तूने बोल “हट मवाली” भाव नहीं दिया रे A B C D पढली बहुत, ठंडी आहें भर ली बहुत.... अछी बातें कर ली बहुत, अब करूँगा तेरे साथ.... गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात.... गंदी बात गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात.... टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ.... टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ....

In reply to by सुक्या

बबन ताम्बे 20/09/2021 - 21:12
तेह्यान्नी सुहुरवातिलाच श्प्श्ट केले आहे की, लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवेध, आकलन, अनूभूती सिउव्ह वळणं घेत घेत शेवटी मुख्य उद्दिष्टा पर्यंत पोहोचला . सिउव्हिणिने अनूवेध (अंदाज?) घेतला, सिऊव्हाला आकलन झाले आणि सिउव्ह आणि सिउव्हिण अनूभूतीसाठी उर्जा घालवायला तयार झाले. अ‍ॅनिमल प्लानेट चॅनेलवर दाखवतात कधी कधी. पण तिथे सिउव्हिण अशी सिउव्हावर खेकसत नाही :-)

In reply to by बबन ताम्बे

सुक्या 20/09/2021 - 22:51
ते समधं बैजवार हाय हो ... पर ह्या समद्या अनूवेध, आकलन, अनूभूती मधी हरणाची कार्टी का म्हुन कडमडली बॉ? अजुन एखांदा अँगल हाय का ते बगतोय हो ... ह्या ह्या ह्या ....

In reply to by सुक्या

बबन ताम्बे 21/09/2021 - 08:27
ही लेखकाची कीर्तनकार बुवांसारखी कथा रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी आहे. कथा वास्तव दर्शी आहे. सारसबागेत संध्याकाळी नाही का बरेच सिउव्ह आणि सीउव्हीन आई वडिलांना क्लासला चाललोय सांगून अनुभूतीसाठी अंधारा कोपरा पकडतात. पण काही हरणाची कारटी (इथे त्यांना रिकामटेकडी हरामी कार्टी असे म्हणायचंय) चोरून बघत असतात. असा ते पोवथरचं निरुपण आहे.

सोत्रि 20/09/2021 - 12:40
रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट सीउव्ह व सीउव्हीणीची जोडूनिया गाठ रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट गांजुनिया भारी, कुरबुरीने गांजुनिया भारी, कुरबुरीने पडता रिकामे, उर्जेचे ताट रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट - (अभंग) सोकाजी

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 20/09/2021 - 13:14
🙏 🙏 🙏 लेख वाचुन भण्ण व्हायला झाले होते, हा अभंग वाचुन भरपुर हसलो आणि पुन्हा नॉर्मल झालो 😀 (स्वगतः पैजारबुवांना तगडी स्पर्धा निर्माण होत आहे!)

चौकस२१२ 20/09/2021 - 15:27
हा " मेट्रो गोदळवीन मेयर" चा सिंह का हो... क्षमा करा धागाकर्ते .. तुम्हाला काहीतरी गहन सांगायचं पण खरंच डोक्यवरून जातंय हँ.. लोकांना आपलया म्हणण्याचा फायदा व्हावा वाटत असेल तर जरा सुसूत्रित करून सांगा हो ( दोन वाक्यांचा अर्थ लावताना आमची ३/४ ऊर्जा संपते ... फूस )

Rajesh188 20/09/2021 - 16:17
तुम्हाला नम्र विवेदन आहे तुम्ही मराठी भाषेत नवीन शब्द निर्माण करू नका.

बोलघेवडा 20/09/2021 - 18:12
रावले साहेब वाह!! अभिजात लेखन !! काय ती प्रतिभा! एकेक शब्द म्हणजे अस्सल सोन्याच्या मुशीतून काढला आहे. कालातीत लिखाण!! अजून येऊ देत. तुम्ही थांबू नका, सर!! पुढच्या स्तराची काकुलतेने वाट पाहणारा बोलघेवडा

सुबोध खरे 20/09/2021 - 18:17
हि मरथि भश म्हन्जे दोम्बिवलितिल रस्त्यन्सर्खि अहे खद्दे खद्दे घेते अनि दम्ब्रने एकत्र केले अर्थात हि मराठी भाषा म्हणजे डोंबिवलीतील रस्त्यांसारखी आहे. खड्डे खडे घेतले आणि डांबराने एकत्र बांधले.

Rajesh188 21/09/2021 - 13:16
आता मला समजल तो संवाद सिंह आणि सिंहीण मधला आहे(पण सिंहीण जगात कोठेच आता तरी अस्तित्वात नाही वाघीण असते.सिंहीण अर्वाचीन काळात होती का हा गहन प्रश्न पडला आहे)आहे. स्वतःला खूप च निर्बुद्ध समजतं आहे !!!!!!!!.

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन 21/09/2021 - 14:59
हा लेख पण ऑदभूद आहे :) प्रतिसाद वाचून तर बेक्कार हसलो शामची आई वाला शाम वाट चुकून एनेग्मा पब मधे आला आणि त्याची आई तिकडे येऊन त्याचा कान पकडून फरफटत नेते आहे असे दृष्य डोळ्यापुढे आले :) लैच कॉमेडी लिंक साठी Thanks bro. चे सु गु यांचे सगळे लेख वाचावे म्हणतो :=)

अकिलिज 21/09/2021 - 14:28
यांच्याकडं पहिली वेलांटी आणि उकारच नाहीये. जे काही आहे ते दुसरं. पहील्या लेखाची शंभरी ओलांडेपर्यंत थांबा की. :) सोत्रिंचा अभंग वाचून पोटातून कळ येईपर्यंत हसलो. :):)

चौथा कोनाडा 21/09/2021 - 17:24
ख्या ख्या ख्या या सीउव्ह, सीउव्हीण वरून मला ही धमाल प्राचिन सिहींण आठवली ! चक्क १७२ प्रतिसाद आहेत या सिहींणला !
https://www.misalpav.com/node/19708
प्रतिसाद म्हंजे कल्ला आहे नुसता, फुरसतके टाईममें पढनेका !

सतीश रावले 21/09/2021 - 19:27
गड्डा झब्बू, सूक्या, बबन ताम्बे, सोत्री यान्चे प्रतीसाद वाचून मजा आली. हा आनन्द दील्याबद्दल त्यान्चे खूप खूप आभार प्रकट करतो. . पहील्या वाचनातच आस्वाद घेवून न शकलेले रसीक वाचक ज्यावेळी इतर कोण्या व्यक्तीने काय प्रतीसाद दीला आहे हे वाचून पून्हा नव्याने लेख वाचून नवा प्रतीसाद देतात ते वाचून देखील हसू आले. त्या नव्या प्रतीसादान्मध्ये देखील त्यान्चे जूने रडगाणे कायम असतेच.

गड्डा झब्बू 19/09/2021 - 23:08
बीड़ी पिके नुक्कड़ पे वेट तेरा किया रे खाली-पीली 18 कप चाय भी तो पिया रे राजा बेटा बनके मैंने जब शराफत दिखाई तूने बोल “हट मवाली” भाव नहीं दिया रे A B C D पढली बहुत, ठंडी आहें भर ली बहुत.... अछी बातें कर ली बहुत, अब करूँगा तेरे साथ.... गंदी बात, गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात.... गंदी बात गंदी गंदी गंदी गंदी गंदी बात.... टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ.... टॅ टॅ टॅ....टॅ डॅ डॅ डॅ....

In reply to by सुक्या

बबन ताम्बे 20/09/2021 - 21:12
तेह्यान्नी सुहुरवातिलाच श्प्श्ट केले आहे की, लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवेध, आकलन, अनूभूती सिउव्ह वळणं घेत घेत शेवटी मुख्य उद्दिष्टा पर्यंत पोहोचला . सिउव्हिणिने अनूवेध (अंदाज?) घेतला, सिऊव्हाला आकलन झाले आणि सिउव्ह आणि सिउव्हिण अनूभूतीसाठी उर्जा घालवायला तयार झाले. अ‍ॅनिमल प्लानेट चॅनेलवर दाखवतात कधी कधी. पण तिथे सिउव्हिण अशी सिउव्हावर खेकसत नाही :-)

In reply to by बबन ताम्बे

सुक्या 20/09/2021 - 22:51
ते समधं बैजवार हाय हो ... पर ह्या समद्या अनूवेध, आकलन, अनूभूती मधी हरणाची कार्टी का म्हुन कडमडली बॉ? अजुन एखांदा अँगल हाय का ते बगतोय हो ... ह्या ह्या ह्या ....

In reply to by सुक्या

बबन ताम्बे 21/09/2021 - 08:27
ही लेखकाची कीर्तनकार बुवांसारखी कथा रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी आहे. कथा वास्तव दर्शी आहे. सारसबागेत संध्याकाळी नाही का बरेच सिउव्ह आणि सीउव्हीन आई वडिलांना क्लासला चाललोय सांगून अनुभूतीसाठी अंधारा कोपरा पकडतात. पण काही हरणाची कारटी (इथे त्यांना रिकामटेकडी हरामी कार्टी असे म्हणायचंय) चोरून बघत असतात. असा ते पोवथरचं निरुपण आहे.

सोत्रि 20/09/2021 - 12:40
रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट सीउव्ह व सीउव्हीणीची जोडूनिया गाठ रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट गांजुनिया भारी, कुरबुरीने गांजुनिया भारी, कुरबुरीने पडता रिकामे, उर्जेचे ताट रावले चालती पोवथरची वाट रावले चालती पोवथरची वाट - (अभंग) सोकाजी

In reply to by सोत्रि

टर्मीनेटर 20/09/2021 - 13:14
🙏 🙏 🙏 लेख वाचुन भण्ण व्हायला झाले होते, हा अभंग वाचुन भरपुर हसलो आणि पुन्हा नॉर्मल झालो 😀 (स्वगतः पैजारबुवांना तगडी स्पर्धा निर्माण होत आहे!)

चौकस२१२ 20/09/2021 - 15:27
हा " मेट्रो गोदळवीन मेयर" चा सिंह का हो... क्षमा करा धागाकर्ते .. तुम्हाला काहीतरी गहन सांगायचं पण खरंच डोक्यवरून जातंय हँ.. लोकांना आपलया म्हणण्याचा फायदा व्हावा वाटत असेल तर जरा सुसूत्रित करून सांगा हो ( दोन वाक्यांचा अर्थ लावताना आमची ३/४ ऊर्जा संपते ... फूस )

Rajesh188 20/09/2021 - 16:17
तुम्हाला नम्र विवेदन आहे तुम्ही मराठी भाषेत नवीन शब्द निर्माण करू नका.

बोलघेवडा 20/09/2021 - 18:12
रावले साहेब वाह!! अभिजात लेखन !! काय ती प्रतिभा! एकेक शब्द म्हणजे अस्सल सोन्याच्या मुशीतून काढला आहे. कालातीत लिखाण!! अजून येऊ देत. तुम्ही थांबू नका, सर!! पुढच्या स्तराची काकुलतेने वाट पाहणारा बोलघेवडा

सुबोध खरे 20/09/2021 - 18:17
हि मरथि भश म्हन्जे दोम्बिवलितिल रस्त्यन्सर्खि अहे खद्दे खद्दे घेते अनि दम्ब्रने एकत्र केले अर्थात हि मराठी भाषा म्हणजे डोंबिवलीतील रस्त्यांसारखी आहे. खड्डे खडे घेतले आणि डांबराने एकत्र बांधले.

Rajesh188 21/09/2021 - 13:16
आता मला समजल तो संवाद सिंह आणि सिंहीण मधला आहे(पण सिंहीण जगात कोठेच आता तरी अस्तित्वात नाही वाघीण असते.सिंहीण अर्वाचीन काळात होती का हा गहन प्रश्न पडला आहे)आहे. स्वतःला खूप च निर्बुद्ध समजतं आहे !!!!!!!!.

In reply to by गॉडजिला

रंगीला रतन 21/09/2021 - 14:59
हा लेख पण ऑदभूद आहे :) प्रतिसाद वाचून तर बेक्कार हसलो शामची आई वाला शाम वाट चुकून एनेग्मा पब मधे आला आणि त्याची आई तिकडे येऊन त्याचा कान पकडून फरफटत नेते आहे असे दृष्य डोळ्यापुढे आले :) लैच कॉमेडी लिंक साठी Thanks bro. चे सु गु यांचे सगळे लेख वाचावे म्हणतो :=)

अकिलिज 21/09/2021 - 14:28
यांच्याकडं पहिली वेलांटी आणि उकारच नाहीये. जे काही आहे ते दुसरं. पहील्या लेखाची शंभरी ओलांडेपर्यंत थांबा की. :) सोत्रिंचा अभंग वाचून पोटातून कळ येईपर्यंत हसलो. :):)

चौथा कोनाडा 21/09/2021 - 17:24
ख्या ख्या ख्या या सीउव्ह, सीउव्हीण वरून मला ही धमाल प्राचिन सिहींण आठवली ! चक्क १७२ प्रतिसाद आहेत या सिहींणला !
https://www.misalpav.com/node/19708
प्रतिसाद म्हंजे कल्ला आहे नुसता, फुरसतके टाईममें पढनेका !

सतीश रावले 21/09/2021 - 19:27
गड्डा झब्बू, सूक्या, बबन ताम्बे, सोत्री यान्चे प्रतीसाद वाचून मजा आली. हा आनन्द दील्याबद्दल त्यान्चे खूप खूप आभार प्रकट करतो. . पहील्या वाचनातच आस्वाद घेवून न शकलेले रसीक वाचक ज्यावेळी इतर कोण्या व्यक्तीने काय प्रतीसाद दीला आहे हे वाचून पून्हा नव्याने लेख वाचून नवा प्रतीसाद देतात ते वाचून देखील हसू आले. त्या नव्या प्रतीसादान्मध्ये देखील त्यान्चे जूने रडगाणे कायम असतेच.
2 .. (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती - Mental State of being gracious to act! ..................................................................... [लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवे

विवेक हरवलेलं विश्व

चंद्रकांत ·
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.

काळाचे खेळ

चंद्रकांत ·

गॉडजिला 16/09/2021 - 09:10
असो, आपल्या धाग्याचा परिमाणदर्शी नियोजनाचे संवेदन ज्या वेळी आम्हाला आकाळायला लागेल तिथं नभीच्या नाभीच्या भोवती तारे चमचम करतील याची खात्री आहे...

गॉडजिला 16/09/2021 - 09:10
असो, आपल्या धाग्याचा परिमाणदर्शी नियोजनाचे संवेदन ज्या वेळी आम्हाला आकाळायला लागेल तिथं नभीच्या नाभीच्या भोवती तारे चमचम करतील याची खात्री आहे...
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत.

बातमी : “महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत चंद्रकांत पाटलांचा सवाल

सतीश रावले ·

Rajesh188 14/09/2021 - 23:56
संख्या कोणत्याच राज्यात असली नाही पाहिजे . नाहीतर राज्याराज्यांत असंतोष वाढेल. राज्यघटनेत भारतीय नागरिकांना देशात कुठे जाण्याचा ,राहण्याचा ,उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे राजकीय वाक्य आहे. असे अनिर्बंध स्वतंत्र घटनेने पण दिलेले नाही. स्थलांतरित लोकांची नोंद ठेवणे ,त्यांची माहिती ठेवणे.आणि गरज पडली तर परप्रांतीय लोकांवर राज्यात येण्यास मज्जाव करण्याचा अधिकार पण राज्य घटनेने राज्यांना दिलेला आहे . अनधिकृत पने अतिक्रमणं करून तिथे बांधकाम करून सरकारी जागा हटप करण्याचा अधिकार राज्य घटनेने कोणालाच दिला नाही. तेरी सर्रास मोकळी मैदाने,फूट पथ,सरकारी जागा परप्रांतीय लोकांनी हडप केलेल्या आहेत. ते कायद्यात कसे बसवलं.जाते.

hrkorde 15/09/2021 - 08:15
अतिक्रमण , पाकिटमारी हे गुन्हे तर लोकल लोकही करतात. मूळचे आगरी कोळी सोडले तर मुंबईत सगळेच स्थलांतरित आहेत. सरकारने नोंदणी ठेवावी , पण ती नेमकी कशी ठेवणार ? खाजगी नोकरीत मालक आणि नोकर राजी असतील तर त्यांचे त्यांचे आपोआप जुळते.

स्वतः ठाकरे मुळच्या बिहारी वंशातले ना? त्यांचे राजकारणातील दुकान वर्षानुवर्षे चालू आहे ते शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करत. ते शिवाजी महाराजही सिसोदीया वंशातील म्हणजे मुळच्या राजस्थानातील वंशातले. मानवजातीची सुरवातच आफ्रिकेत झाली ना? म्हणजे आफ्रिका सोडून सगळीकडे स्थलांतरीतच भरले आहेत की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 15/09/2021 - 09:50
आणि सिसोदिया हे आर्य च असणार आणि आर्य हे भारतीय च नाहीत दुसऱ्या देशातून आलेले. इतके पाठी जावून त्यांना पण घुसखोर ठरवता येईल. Interstate migration हा प्रश्न राज्याच्या खराब प्रशासकीय कारभार मुळे निर्माण होतो आणि उत्तर पण तिथेच शोधायचे आहे. ठाकरे कुठले,शिवाजी महाराज कोणत्या वंशाचे होते हे मुद्ध्ये च गौण आहेत. राज्य सरकार ना त्यांच्या भूभागात ,त्या राज्यातील लोकांच्या हितासाठी कोणता ही निर्णय घेण्याचा हक्क असलाच पाहिजे आणि तो आहे पण.

Rajesh188 15/09/2021 - 09:39
बाकी दक्षिणेतील राज्य एका सुरात बोलतात .महाराष्ट्रात राज्य हिताची बाब असली तरी रज्यविरोधी मत व्यक्त करत असतात. चंद्रकांत पाटील,आणि इथले चंद्रसूर्य कुमार ह्यांच्या मता वरून लक्षात येतेच. अगदी यूपी,बिहारी नेते पण चुकीचे असेल तरी एका सुरात राज्याच्या प्रश्न विषयी बोलतात . प्रतेक राज्याची आर्थिक सामाजिक स्थिती वेगळी का आहे? प्रतेक राज्यातील शिक्षण,कायदा सू व्यवस्था ह्याची स्थिती वेगळी का आहे? प्रतेक राज्य वेगवेगळी सरकार चालवत आहेत. प्रतेक राज्य सरकार ची कुवत आणि लायकी वेगवेगळी आहे. सामाजिक स्थिती ,गुन्हेगारी वृत्ती वेगवेगळी आहे.(मुस्लिम अतिरेकी वृत्ती चे असतात हाच नियम इथे पण) गुन्हेगारी वृत्ती ची लोक काही राज्यात जास्त च आहेत त्याला तेथील सामाजिक स्थिती जबाबदार आहे. इथे ठाकरे कुठले. आहेत,आफ्रिकेतून कोणाला हा मुद्धा इथे नाही. उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना त्रास होत आहे .उत्तम राज्यकारभार न करणाऱ्या राज्यांचा बोजा बाकी राज्यांनी का घ्यावा. दिल्ली,मुंबई,पुणे ,नाशिक ह्या शहरांवर ह्या अशा नाकर्त्या राज्यातील लोकांची संख्या वाढत आहे .आणि त्या शहरात त्या मुळे गुन्हेगारी वाढत आहे.उत्तरेतील राज्यात गुन्हेगारी वृत्तीचे लोक जास्त आहेत. हे पोलिस डायरी पहिली तरी माहीत पडेल.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 10:09
महाराष्ट्रातील लोक इतर दक्षिणी राज्यात जाऊनही नोकर्या करतात, अंदमानातपण नोकरीला जातात. अमेठीचा माजी खासदार वायनाडला जातो, गुजरातचा खासदार पुढच्या निवडणुकीत वाराणसीत जातो , त्यांना कुठला कायदा अडवत नाही , बाकी लोकांनी काय घोडे मारले आहे ?

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 10:39
मराठी लोकांचे प्रमाण किती टक्के आहे हे बघा प्रश्न तिथे आहे. महाराष्ट्रात इतर राज्यातील लोकांचे प्रमाण राज्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे हे बघा. फरक लगेच माहीत पडेल आणि मुद्धा काय आहे पण तुमच्या लक्षात येईल. वाढणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या संख्ये मुळे मराठी लोकांना असुरक्षित वाटत आहे. दक्षिणेतील राज्य पण उत्तरेतील लोकांच्या वाढणाऱ्या संख्ये मुळे स्वतःला असुरक्षित समजतं आहेत. हा प्रश्न अजुन इतका गंभीर झाला नाही सोडवण्या सारखा आहे आताच सोडवला पाहिजे. नाही तर गंभीर रूप धारण केल्यावर हातात काहीच राहणार नाही. असे पण भारतीय सत्ताधारी लोकांची खासियत आहे प्रश्न जो पर्यंत चिघळत नाही अतिशय गंभीर रूप धारण करत नाही तो पर्यंत त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे. ठिणग्या दिसल्या तरी पाणी ओतायचे नाही जेव्हा आग गंभीर रूप घेईल तेव्हा अग्निशामक दल स्थापन करण्या विषयी चर्चा करायची.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 13:54
दक्षिणेत महाराष्ट्र चे लोक कमी आहेत , ह्याचा अर्थ तिकडे कमीच गेलेत , असा आहे, पण जर 4 जाऊ शकतात तर 400 ही जाऊ शकतील, पण महाराष्ट्रात शेती वाडी वाडे ह्यांना चिकटलेले लोक भरपूर आहेत , ते मुंबई पुण्यात सुद्धा येत नाहीत, मग चेन्नईला कुठे जाणार ? यूपी बिहारवाले लोक 10000 वर्षांपासून दक्षिणेकडे येत आहेत , अयोध्या सोडून लोक नाशिकला आले, मुंबईत बाण मारून वाळकेशवर निर्माण केले , मग लंकेलाही गेले. गोकुळ मथुरा सोडून लोक गुजरातला द्वारकेत गेले. आता तुम्ही कुणाला अन कसे अडवणार आहात ? युपी बिहार वाले अल्प भु धारक पावसात चार महिने शेती करतात , मग सात आठ महिने मेट्रो शहरात येऊन मोलमजुरी करतात आणि पुन्हा पावसाळ्यात शेतीला निघून जातात , त्यांचे अर्थकारणच तसे आहे. नेपाळचे लोकही असेच करतात. ह्यातले बहुतेक सारे व्यवसाय हे अल्पशिक्षित लोकांचे आहेत.

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 15:04
प्रचंड प्रमाणात उत्तरे मधून महाराष्ट्र किंवा बाकी राज्यात लोक स्थलांतरित येत आहेत त्या मुळे महाराष्ट्र सहित बाकी संबंधित राज्यातील लोकामध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मनसे सारखी आंदोलन बाकी राज्यात पण होत आहेत. दोन वर्षापूर्वी गुजरात मध्ये पण उत्तर भारतीय लोकांविरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते.पंजाब मध्ये झाले होते,आसाम मध्ये झाले होते. तामिळनाडू ,केरळ तर त्यांच्या शी फटकून च असतो हिंदी पासून उत्तरेतील संस्कृती ला पण त्यांचा विरोध असतो. १०००० वर्ष पूर्वी ची उदाहरणे ध्याल तर लोकांचे देव पण बदलतील. नवी मुंबई हे शहर महाराष्ट्र बसवू शकतो तर लहान उत्तम शहर यूपी,बिहार मध्ये केंद्र सरकार स्वतःच्या अधिकारात का निर्माण करत नाही. की संघर्ष तीव्र होण्याची वाट बघितली जात आहे. एक तर लोकसंख्या नुसार लोकसभेत प्रतिनिधी देण्याच्या आपल्या पद्धती मुळे लोकसंख्या नियंत्रण करून उत्तम काम करणारी राज्य नाराज आहेत त्यांच्या चांगल्या कामाची त्यांना कमी प्रतिनिधी मिळून शिक्षा मिळत आहे. केंद्रीय फंड अविकसित राज्य(लायकी नसलेली राज्य सरकार असलेली)ना विकसित राज्य न पेक्षा जास्त दिला जातो. म्हणजे जे काहीच सुधारणा करत नाहीत त्यांना बक्षीस आणि जे चांगले काम करत आहेत त्यांना शिक्षा . असे विकसित राज्य समजतात. त्या मुळे ती नाराज आहेत खुद्द मोदी नी पण मुख्यमंत्री असताना ह्या पद्धतीचा विरोध केला होता. अनियंत्रित migration ha गंभीर मुद्धा आहे. अमेरिका,ऑस्ट्रेलिया मध्ये पण भारतीय लोकांवर हल्ले होतात त्याला हेच कारण कारणीभूत आहे.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 15:11
शहर कुणी मुद्दाम वसवत नाही, मुंबई बंदर आहे, विमानतळ आहे, मध्यवर्ती आहे, पूर्वी कापड व धान्य व्यापार होत होता, म्हणून तसे वसत गेले. आता योगीजी तिकडेही बॉलिवूड उभे करत आहेत म्हणे. मग होईल नवनिर्माण तिकडेही

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 15:17
पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.आंध्र नी हैद्राबाद प्रगत करून दाखवले,कर्नाटक नी बंगलोर ,तमिळ nadu नी चेन्नई. उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.

In reply to by Rajesh188

पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.
डोळे पाणावले. काय काय मोठी कामं केली महाविकास आघाडीने. आम्ही उगीचच समजत होतो की ही शहरे स्वातंत्र्यापूर्वी पण भारतात होती.

In reply to by Rajesh188

उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.
तुम्ही उत्तरेतील गुरगाव, नॉयडा, चंडीगड आणि काही अंशी फरीदाबाद आणि गाझीयाबाद ही शहरे बघितली आहेत का? वाटत नाही. कारण बघितली असतीत तर असे काही लिहिले नसते. मोठ्या शहरांविषयी बोलाल तर दिल्लीतील रस्ते, मेट्रो वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी अधिक चांगले आहे. आज दिल्लीत कुठेही असले तरी एखाद-दीड किलोमीटरपेक्षा लांब मेट्रो स्टेशनसाठी जावे लागत नाही. दिल्लीतील डीटीसी बसची सुविधाही खूप चांगली आहे. मेट्रो आणि डीटीसी बस यामुळे दिल्लीत कुठूनही कुठेही जाणे खूप सोपे आहे. अर्थात उत्तरेतील, विशेषतः दिल्लीच्या लोकांचा स्वभाव (फसवाफसवी, गोड बोलत हातोहात शेंड्या लावणे, जरा काही खुट्ट वाजले तरी हमरातुमरीवर येणे वगैरे) बदलता येणार नाही. त्याविषयी मी बोलतही नाही. माझा मुद्दा तिकडच्या पायाभूत सुविधांविषयीच आहे. तेव्हा उत्तरेत चांगली शहरे नाहीत हा मुद्दाच तथ्याला धरून नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 15/09/2021 - 23:58
तर तुम्ही उल्लेख केलेली सर्व शहर दिल्ली पासून 25 ते 40 km अंतरावर आहेत. दिल्ली ची उपनगर च आहेत ती. ठाणे मुंबई पासून 33 km वर आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे. उत्तरेतील दोन तीन राज्यच थोडी प्रगत आहेत. पंजाब,हरियाणा आणि हिमाचल प्रदेश . ह्या राज्यातील लोक मुंबई ,महाराष्ट्रात विपुल प्रमाणात नाहीत जाडी यूपी,बिहार ची दोन दोन फुटांवर एक व्यक्ती भेटतो तसे. यूपी,बिहार, झारखंड मधून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप प्रचंड आहे. त्या मध्ये महाराष्ट्र हिंदी ला राष्ट्र भाषा समजणारा एकमेव नॉन हिंदी प्रदेश आहे.. त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात. हे असे महाराष्ट्र राज्य ज्या राज्यात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत.सरकारी जागेवर,रस्त्यावर राहण्याची उत्तम सोय आहे,पाणी ,वीज चे कनेक्शन पण दिले जाते. परत काही वर्षात सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट. घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. अशा सर्व सुविधा मिळत असल्यामुळे यूपी,बिहारी महाराष्ट्रात येवून सुखात जगत आहेत उलट हक्कानी. राज्याने निर्माण केलेल्या सोयी सुविधांवर त्या मुळे ताण येत आहे. बकालपणा राज्याला येत आहे. प्रश्न गंभीर आहे. आणि हो मराठी लोक च त्यांचं इथे येवून राहणे हा कसा त्यांचा हक्क आहे ह्याचे प्रवचन पण देतात. इतकी अनुकूल जागा त्यांना पूर्ण भारतात कुठे च मिळणार नाही.

In reply to by Rajesh188

चंडीगड दिल्लीपासून २५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहे? ऐकावे ते नवलच.
दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे.
त्याच न्यायाने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती चांगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे. दिल्लीत जुनी दिल्ली बकाल आहेच पण मग त्याप्रमाणेच मुंबईत बकाल भाग नाहीत का? कुर्ला, कलिना वगैरे ठिकाणच्या किंवा रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्ट्या बघितल्या आहेत का? भायखळ्याचा मुस्तफा बाजार आणि नागपाड्याचा ए.एच.अन्सारी चौक वगैरे भाग बघितले आहेत का? अगदी न्यू यॉर्कच्या मॅनहटनला लाजवतील असेच सुंदर भाग आहेत नाही का ते? मुंबईजवळचे डोंबिवली-कल्याण-बदलापूर वगैरे भाग केम्प्स कॉर्नर किंवा बान्द्रा पश्चिम-खार सारखे थोडीच आहेत? ते काहीही असले तरी मुद्दा हा की दिल्लीत रस्ते, बस, मेट्रो वगैरे पायाभूत सुविधा मुंबईतल्या पेक्षा कितीतरी जास्त चांगल्या आहेत.
त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात.
यातील गर्वाचे या शब्दाचे काय? गर्व से कहो हम हिंदू है मधला गर्व आणि मराठीतील गर्वाचे घर खाली मधला गर्व यात फरक आहे ना? मग तुम्ही स्वतः वापरलेला गर्व हा शब्द मराठीतील आहे की हिंदीतील?

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 16/09/2021 - 19:08
सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट. घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. यात दोष कुणाचा आहे? मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षांनी काय केलं? उगाच दुसऱ्याला दोष कशाला देताय? मराठी कामगार कशी कामं करतात ते पहा आणि भैये कशी कामे करतात तेही पाहून घ्या. कोकणात शेती करायची असली, काजू आंब्याची बाग करायची म्हटली तर स्थानिक माणूस मिळत नाही. आठवड्याला ३ दिवस मनरेगा मध्ये काम करून १००० रुपये मिळतात. ते घेऊन पुढचे ७ दिवस दारू पिऊन पडून राहतात आणि मग परत ३ दिवस काम करायचे. मनरेगा मध्ये वर्षात १०० दिवस रोजगार मिळतोच. मग स्थानिक उद्योजक काय करेल? कोकणात सर्वत्र आंब्याच्या बागेत केवळ नेपाळी लोक दिसतील. माझ्या भावाच्या दोन कारखान्यात आजतागायत गेल्या ३० वर्षात एकही परप्रांतीय माणसाला त्याने कायम नोकरी दिलेली नाही. परंतु स्थानिक माणसांचे अनुभव फारसे उत्साहवर्धक नाहीतच. काम न करता दांड्या मारणे, सतत पैसे उधार मागणे, गौरी गणपती दिवाळी होळीला ४ दिवस सांगून जायचे आणि १५ दिवसांनी उगवायचे, जास्त काम असले तरी ओव्हर टाइमला नकार देणे हे सर्रास करणारी कामगार मंडळी १०० % मराठीच आणि स्थानिक आहेत. कंत्राटदाराचे कामगार भय्ये लोक रात्री ७-८ पर्यंत सहज थांबतात आणि आपले लोक साडे चार पासून आवरायला सुरुवात करतात. केवळ तत्वासाठी अजून तरी भावाने परप्रांतीय घेतलेला नाही. पण कोव्हीड नंतर परिस्थिती तशीच राहील का याची शंका वाटते. बाकी चालू द्या

चौथा कोनाडा 15/09/2021 - 12:39
घटणा सउवीधान लोकान्च्या मीळालेले परस्परावलम्बना आकान्क्शा स्थायीक नीवडणूक वीचार भाशेत वीदर्भाची वीशया वरशान्ची द्न्यानी-वीचारवन्त

निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.

In reply to by चौथा कोनाडा

रंगीला रतन 15/09/2021 - 23:07
निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो. नीबंधातील शूद्हलेखन आवडले हे आवरजून नमूद करू इचहीतो असे म्हणायचे आहे काय तूम्हाला? :) :) :)

Rajesh188 16/09/2021 - 14:23
तर अनेक धाग्यावर स्व तची मत व्यक्त होत नाहीत. मी इथे तीन चार पॉइंट मांडले. 1) मुळ रहिवासी असलेल्या मराठी लोकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची टक्के वरी खूप जास्त आहे . त्या मुळे मराठी लोक असुरक्षित स्वतःला समजत आहेत. आणि अशी स्थिती भविष्यात दक्षिण भारतात पण निर्माण होईल . ह्या वर कोणीच भाध्य केले नाही. २) स्थलांतरित लोकांमुळे स्थानिक संस्कृती धोक्यात येते ..ह्या वर कोणीच मत व्यक्त केले नाही ३) राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यात परप्रांतीय लोकांचे प्रमाण जास्त आहे कारण गुन्हेगारी हाच गुण असलेल्या राज्यातून इथे आले आहेत. ४) राज्याच्या infrastructure वर परप्रांतीय लोकांच्या मुळे ताण येतो ह्या वर कोणीच व्यक्त झाले नाही उत्पादक कंपन्या,मुळे महाराष्ट्रात ची नैसर्गिक संपत्ती प्रदूषित होत आहे . पण काहीच नुकसान न होता रोजगार आणि कर देशाला मिळत आहे. गुन्हेगारी वाढत आहे बकालपणा वाढत आहे. ह्या एक जरी इथे ह्या राज्यावर प्रेम करणारा असेल तर त्यांनी स्वतःचे मत व्यक्त करावे. आता सुधारला नाही तर. पुढची मराठी लोकांची पिढी आताच्या चामडी बचाव लोकांना भर चौकात चप्पल नी मारेल.

In reply to by Rajesh188

hrkorde 16/09/2021 - 18:22
केंद्र सरकार CAA आणणार आहे , PAN झाले , aadhar झाले त्यांचे त्यांना मोजणे जमेना , फक्त इलेक्शननंतर कमी पडणारे आमदार मोजले की त्यांचे पुण्यकर्म संपते. राज्यांनी तरी नेमके काय करायचे ? मूळ महाराष्ट्रातले म्हणजे तरी नेमके कोण ?

In reply to by सुबोध खरे

hrkorde 17/09/2021 - 22:18
देशातील आतील बाहेरील गणना ठेवणे जसे केंद्राला अवघड आहे, तसेच राज्यांना अंतरराज्यीय जनगणना ठेवणे अवघड आहे शंकर पाटलांची माकडाची शिरगणती ही गोष्ट आठवली

In reply to by hrkorde

Rajesh188 18/09/2021 - 10:06
अगदी काही ही चूक न होता तंतोतंत दुसऱ्या राज्यातील लोकांची गणना झालीच पाहिजे .चूक नको व्यायला . अशी अपेक्षा नाही पण पुरेसा दबाव निर्माण करण्यासाठी राज्यात येणाऱ्या लोकांची गणना केली जाईल असा नियम गरजेचा आहे.

कासव 17/09/2021 - 00:07
मागच्या गणपती वेळी मला घरात थोड लाकूड काम करायचं होत. मी आवर्जून मराठी सुतार निवडला. ह्या भाऊने काम सुरू करायला दसरा निवडला. आजी च आजारपण मुलीचं बाळंतपण असली कारण देत. दिवाळी दरम्यान हा पुन्हा गायब काम तर काहीच झालं न्हवत समान मात्र आणून टाकलं होत. शेवटी मी एक बिहारी बघितला ३ दिवसात २ माणसांनी सगळं काम संपवून टाकले. वर कमी पैसे घेतले. आपला भाऊ दिवाळी नंतर उगवला आणि म्हणतो काय साहेब तुमच्या सारख्या लोकान मुळे बाहेरचे येतात. १-२ दिवस उशीर झाला तर अस करू नये. मी परत तुमच्याकडे येणारच नाही. इथे मी ह्या साठी २ महिने वाट पाहिली ती गेली कुठे? ही घटना दापोली मधील आहे पुणे मुंबई ची नाही. सर्वच नाही पण मराठी मुले तोंडात मावा लावून नेत्याच्या मागे फिरण्यात धन्यता मानतात मग बाहेरचे येणारच ना. वर ह्यांचे लॉबिंग दादागिरी पण सहन करा. कोकणातल्या बागा असोत वा पश्चिम महारष्ट्रातील गुळाचे gurhal असो आपली मुले असली काम करायला मागत नाहीत. मग कोकणात पण बिहारी आंबे विकतो आणि आपण हॉटेल मध्ये बिहारी वेटर ला टीप देता देता असले विषय चघळत बसतो

चित्रगुप्त 17/09/2021 - 08:10
रावले साहेब, तुमचे दोन्ही लेख वाचण्याचा प्रयत्न केला. लेखातील आशय काय आहे हा भाग वेगळा ठेऊन सध्या एवढेच सुचवावेसे वाटते की काहीही लिहील्यावर ते लगेच प्रकाशित करण्याची घाई न करता दोन-चार वेळा वाचून, लिखाणातीत सर्व चुका काळजीपूर्वक दूर करून शेवटी अगदी खात्री झाल्यावरच प्रकाशित करण्याची सवय लावून घेणे योग्य ठरेल. कितीही चांगला मजकूर असला तरी अशुद्ध लेखनामुळे चोखंदळ वाचकांचा विरस होत असतो. मिपावर कच्चे लिखाण तात्पुरते साठवून ठेवण्याची सोय नसल्याने लिहीलेला मजकूर ड्राईव्ह वा अन्य ठिकाणी ठेऊन पूर्णत्व आल्यावर पुन्हा मिपावर चोप्य्पस्ते करता येतो. कृपया राग मानू नये. मिपावर सकस, दर्जेदार आणि निर्दोष लिखाण यावे ही सर्वांचीच इच्छा आणि जबाबदारी पण असते, हे लक्षात घेऊन थोडासा प्रयत्न केल्यास ते सहज जमू लागेल.

In reply to by चित्रगुप्त

सतीश रावले 17/09/2021 - 20:45
तूमच्या अथवा इतर कोणाच्याही प्रतीसादाचे मला वायीट वाटण्याचे कारण नाही. तूम्हाला माझा लेख 'पाहून' वायीट वाटले ह्यावर मी काय करू शकतो! लेखातील वीचारान्वर टीका केली असती, चूका दाखवून दील्या असत्या तर त्यावर काम करायला नक्कीच आवडले असते, आवडेल.

In reply to by सतीश रावले

सुक्या 17/09/2021 - 20:55
ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं!! रावले साहेब. तुम्ही राहु द्या. तुम्हाला नाही झेपायचे ते.

गड्डा झब्बू 17/09/2021 - 11:59
मला तुमची स्वाक्षरी मिळेल का? तुमचा सुगम, सुवाच्च लेख वाचुन इथल्या स्वामि१ आणि हस्तर या महान लेखक द्वयींची खुप खुप आठवण आली. आता लेखन थांबवु नका, मी वाचायला आतुर आहे.

Rajesh188 17/09/2021 - 13:37
खरे साहेब आणि कासव जी करू नका. इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत. स्थिती खूप वेगळी आहे . ठरवून उत्तर भारतीय लोकांची संख्या वाढावी आणि व्होट बँक तयार करण्यासाठी ठरवून ,प्लॅन करून हालचाली चालू असतात. मोकळ्या जागा,फूट पथ,,डोंगर ,रस्ते ह्या वर झोपटी बांधून ह्यांची राहण्याची सोय राजकीय पातळीवर केली जाते. पाणी connection, वीज जोडणी राजकीय पक्ष कायद्यात बसत नसले तरी घेवून देतात. अनधिकृत बांधकाम ना राजकीय पातळीवर संरक्षण दिले जाते. महाराष्ट्र वर राजकीय वर्चस्व मिळवण्याची इच्छा देश पातळीवर आहे. आणि राजकीय वर्चस्व मराठी लोकांच्या हातात च राहवे ही काळजी ह्या राज्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या अनेक लोकांना आहे. आणि विरोध ह्याला आहे. गैर मराठी सुतार चांगला काम करतो मराठी करत नाहीत हा वर वर चा विचार झाला तिबेट ताब्यात घेण्यासाठी चिनी लोकांना तिबेट मध्ये वसवले गेले,काश्मीर ताब्यात घेण्यासाठी हिंदू लोकांना तिथे ठरवून स्थायिक करायला हवे हाच विचार 370 हटवण्या मागे आहे. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे त्या वर मराठी लोकांचे वर्चस्व कमी करणे हा देश स्तरावर चा कुटील हेतू आहे. कर्नाटक मध्ये पण सेने, मनसे सारखी कन्नड लोकांची संघटना आहे अशा संघटना गैर राजकीय म्हणून राजकीय पक्ष च स्थापन करतात राज्य हित जपण्यासाठी. सर्वपक्षीय लोकांचा त्याला पाठिंबा असतो. म्हणून तर सेने ल वसंत सेना म्हणत.

In reply to by Rajesh188

रंगीला रतन 17/09/2021 - 13:58
इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत. तुम्ही म्हणताय म्हणजे हे बरोबर च असणार त्याचा प्रतिवाद करणे चूक च.

Rajesh188 17/09/2021 - 13:49
उत्तर भारतीय नेते कृपा,संजय , अब्बु ह्यांना इथे कोणी मोठे केले त्या त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने . कृपा तर गृहमंत्री झाला होता हे घडले फक्त केंद्रीय पातळीवरून राज्य पातळी वरील नेतृत्व व दबाव आणला गेला. आपले ब्रीद च आहे पाहिले भारतीय नंतर मराठी. हे ब्रीद असे आहे. जसे युद्धात सैनिक मेला की त्याला हुतात्मा घोषित करायचे. हुतात्मा म्हणजे काय माणूस मेल्यावर पण परत येतो का?

Rajesh188 17/09/2021 - 13:59
महाराष्ट्र सोडला तर बाकी राज्य अत्यंत सावध असतात.. मुंबई मध्ये गुजराती दुकानातून काही खरेदी केले तर ते बिल गुजराती भाषेत च लिहून देतात. मुंबई मध्ये असे वागत असतील तर गुजरात मध्ये ते कसे वागत असतील. दक्षिण भारत,बंगाल मध्ये येत असेल तरी ते ठरवून हिंदी बोलत नाहीत . मी अनुभव घेतला आहे. फक्त महाराष्ट्रात मराठी समोरचा हे आड नावाने जरी परप्रांतीय वाटला आणि मराठी पण बोलत असेल तरी त्याच्या शी हिंदी मधूनच बोलतात. आ बैल मुझे मार . अशी वृत्ती.

hrkorde 17/09/2021 - 22:51
हिंदू मुस्लिम , मराठी युपी सगळ्या गणना संपल्या की नेरळ कर्जतचे लोक तिथूनच बसुन आल्याने ठाणावाल्याना लोकलमधी बसायला शीट मिळत नाही , म्हणून डब्बानिहाय कर्जतचे किती अन ठाण्याचे किती ह्याची गणना करणे ठाणा व कर्जत नगर पालिकेने मनावर घ्यावे असा धागा काढण्यात यावा

Rajesh188 14/09/2021 - 23:56
संख्या कोणत्याच राज्यात असली नाही पाहिजे . नाहीतर राज्याराज्यांत असंतोष वाढेल. राज्यघटनेत भारतीय नागरिकांना देशात कुठे जाण्याचा ,राहण्याचा ,उद्योग व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे राजकीय वाक्य आहे. असे अनिर्बंध स्वतंत्र घटनेने पण दिलेले नाही. स्थलांतरित लोकांची नोंद ठेवणे ,त्यांची माहिती ठेवणे.आणि गरज पडली तर परप्रांतीय लोकांवर राज्यात येण्यास मज्जाव करण्याचा अधिकार पण राज्य घटनेने राज्यांना दिलेला आहे . अनधिकृत पने अतिक्रमणं करून तिथे बांधकाम करून सरकारी जागा हटप करण्याचा अधिकार राज्य घटनेने कोणालाच दिला नाही. तेरी सर्रास मोकळी मैदाने,फूट पथ,सरकारी जागा परप्रांतीय लोकांनी हडप केलेल्या आहेत. ते कायद्यात कसे बसवलं.जाते.

hrkorde 15/09/2021 - 08:15
अतिक्रमण , पाकिटमारी हे गुन्हे तर लोकल लोकही करतात. मूळचे आगरी कोळी सोडले तर मुंबईत सगळेच स्थलांतरित आहेत. सरकारने नोंदणी ठेवावी , पण ती नेमकी कशी ठेवणार ? खाजगी नोकरीत मालक आणि नोकर राजी असतील तर त्यांचे त्यांचे आपोआप जुळते.

स्वतः ठाकरे मुळच्या बिहारी वंशातले ना? त्यांचे राजकारणातील दुकान वर्षानुवर्षे चालू आहे ते शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करत. ते शिवाजी महाराजही सिसोदीया वंशातील म्हणजे मुळच्या राजस्थानातील वंशातले. मानवजातीची सुरवातच आफ्रिकेत झाली ना? म्हणजे आफ्रिका सोडून सगळीकडे स्थलांतरीतच भरले आहेत की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 15/09/2021 - 09:50
आणि सिसोदिया हे आर्य च असणार आणि आर्य हे भारतीय च नाहीत दुसऱ्या देशातून आलेले. इतके पाठी जावून त्यांना पण घुसखोर ठरवता येईल. Interstate migration हा प्रश्न राज्याच्या खराब प्रशासकीय कारभार मुळे निर्माण होतो आणि उत्तर पण तिथेच शोधायचे आहे. ठाकरे कुठले,शिवाजी महाराज कोणत्या वंशाचे होते हे मुद्ध्ये च गौण आहेत. राज्य सरकार ना त्यांच्या भूभागात ,त्या राज्यातील लोकांच्या हितासाठी कोणता ही निर्णय घेण्याचा हक्क असलाच पाहिजे आणि तो आहे पण.

Rajesh188 15/09/2021 - 09:39
बाकी दक्षिणेतील राज्य एका सुरात बोलतात .महाराष्ट्रात राज्य हिताची बाब असली तरी रज्यविरोधी मत व्यक्त करत असतात. चंद्रकांत पाटील,आणि इथले चंद्रसूर्य कुमार ह्यांच्या मता वरून लक्षात येतेच. अगदी यूपी,बिहारी नेते पण चुकीचे असेल तरी एका सुरात राज्याच्या प्रश्न विषयी बोलतात . प्रतेक राज्याची आर्थिक सामाजिक स्थिती वेगळी का आहे? प्रतेक राज्यातील शिक्षण,कायदा सू व्यवस्था ह्याची स्थिती वेगळी का आहे? प्रतेक राज्य वेगवेगळी सरकार चालवत आहेत. प्रतेक राज्य सरकार ची कुवत आणि लायकी वेगवेगळी आहे. सामाजिक स्थिती ,गुन्हेगारी वृत्ती वेगवेगळी आहे.(मुस्लिम अतिरेकी वृत्ती चे असतात हाच नियम इथे पण) गुन्हेगारी वृत्ती ची लोक काही राज्यात जास्त च आहेत त्याला तेथील सामाजिक स्थिती जबाबदार आहे. इथे ठाकरे कुठले. आहेत,आफ्रिकेतून कोणाला हा मुद्धा इथे नाही. उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना त्रास होत आहे .उत्तम राज्यकारभार न करणाऱ्या राज्यांचा बोजा बाकी राज्यांनी का घ्यावा. दिल्ली,मुंबई,पुणे ,नाशिक ह्या शहरांवर ह्या अशा नाकर्त्या राज्यातील लोकांची संख्या वाढत आहे .आणि त्या शहरात त्या मुळे गुन्हेगारी वाढत आहे.उत्तरेतील राज्यात गुन्हेगारी वृत्तीचे लोक जास्त आहेत. हे पोलिस डायरी पहिली तरी माहीत पडेल.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 10:09
महाराष्ट्रातील लोक इतर दक्षिणी राज्यात जाऊनही नोकर्या करतात, अंदमानातपण नोकरीला जातात. अमेठीचा माजी खासदार वायनाडला जातो, गुजरातचा खासदार पुढच्या निवडणुकीत वाराणसीत जातो , त्यांना कुठला कायदा अडवत नाही , बाकी लोकांनी काय घोडे मारले आहे ?

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 10:39
मराठी लोकांचे प्रमाण किती टक्के आहे हे बघा प्रश्न तिथे आहे. महाराष्ट्रात इतर राज्यातील लोकांचे प्रमाण राज्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे हे बघा. फरक लगेच माहीत पडेल आणि मुद्धा काय आहे पण तुमच्या लक्षात येईल. वाढणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या संख्ये मुळे मराठी लोकांना असुरक्षित वाटत आहे. दक्षिणेतील राज्य पण उत्तरेतील लोकांच्या वाढणाऱ्या संख्ये मुळे स्वतःला असुरक्षित समजतं आहेत. हा प्रश्न अजुन इतका गंभीर झाला नाही सोडवण्या सारखा आहे आताच सोडवला पाहिजे. नाही तर गंभीर रूप धारण केल्यावर हातात काहीच राहणार नाही. असे पण भारतीय सत्ताधारी लोकांची खासियत आहे प्रश्न जो पर्यंत चिघळत नाही अतिशय गंभीर रूप धारण करत नाही तो पर्यंत त्याच्या कडे दुर्लक्ष करायचे. ठिणग्या दिसल्या तरी पाणी ओतायचे नाही जेव्हा आग गंभीर रूप घेईल तेव्हा अग्निशामक दल स्थापन करण्या विषयी चर्चा करायची.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 13:54
दक्षिणेत महाराष्ट्र चे लोक कमी आहेत , ह्याचा अर्थ तिकडे कमीच गेलेत , असा आहे, पण जर 4 जाऊ शकतात तर 400 ही जाऊ शकतील, पण महाराष्ट्रात शेती वाडी वाडे ह्यांना चिकटलेले लोक भरपूर आहेत , ते मुंबई पुण्यात सुद्धा येत नाहीत, मग चेन्नईला कुठे जाणार ? यूपी बिहारवाले लोक 10000 वर्षांपासून दक्षिणेकडे येत आहेत , अयोध्या सोडून लोक नाशिकला आले, मुंबईत बाण मारून वाळकेशवर निर्माण केले , मग लंकेलाही गेले. गोकुळ मथुरा सोडून लोक गुजरातला द्वारकेत गेले. आता तुम्ही कुणाला अन कसे अडवणार आहात ? युपी बिहार वाले अल्प भु धारक पावसात चार महिने शेती करतात , मग सात आठ महिने मेट्रो शहरात येऊन मोलमजुरी करतात आणि पुन्हा पावसाळ्यात शेतीला निघून जातात , त्यांचे अर्थकारणच तसे आहे. नेपाळचे लोकही असेच करतात. ह्यातले बहुतेक सारे व्यवसाय हे अल्पशिक्षित लोकांचे आहेत.

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 15:04
प्रचंड प्रमाणात उत्तरे मधून महाराष्ट्र किंवा बाकी राज्यात लोक स्थलांतरित येत आहेत त्या मुळे महाराष्ट्र सहित बाकी संबंधित राज्यातील लोकामध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून मनसे सारखी आंदोलन बाकी राज्यात पण होत आहेत. दोन वर्षापूर्वी गुजरात मध्ये पण उत्तर भारतीय लोकांविरुद्ध हिंसक आंदोलन झाले होते.पंजाब मध्ये झाले होते,आसाम मध्ये झाले होते. तामिळनाडू ,केरळ तर त्यांच्या शी फटकून च असतो हिंदी पासून उत्तरेतील संस्कृती ला पण त्यांचा विरोध असतो. १०००० वर्ष पूर्वी ची उदाहरणे ध्याल तर लोकांचे देव पण बदलतील. नवी मुंबई हे शहर महाराष्ट्र बसवू शकतो तर लहान उत्तम शहर यूपी,बिहार मध्ये केंद्र सरकार स्वतःच्या अधिकारात का निर्माण करत नाही. की संघर्ष तीव्र होण्याची वाट बघितली जात आहे. एक तर लोकसंख्या नुसार लोकसभेत प्रतिनिधी देण्याच्या आपल्या पद्धती मुळे लोकसंख्या नियंत्रण करून उत्तम काम करणारी राज्य नाराज आहेत त्यांच्या चांगल्या कामाची त्यांना कमी प्रतिनिधी मिळून शिक्षा मिळत आहे. केंद्रीय फंड अविकसित राज्य(लायकी नसलेली राज्य सरकार असलेली)ना विकसित राज्य न पेक्षा जास्त दिला जातो. म्हणजे जे काहीच सुधारणा करत नाहीत त्यांना बक्षीस आणि जे चांगले काम करत आहेत त्यांना शिक्षा . असे विकसित राज्य समजतात. त्या मुळे ती नाराज आहेत खुद्द मोदी नी पण मुख्यमंत्री असताना ह्या पद्धतीचा विरोध केला होता. अनियंत्रित migration ha गंभीर मुद्धा आहे. अमेरिका,ऑस्ट्रेलिया मध्ये पण भारतीय लोकांवर हल्ले होतात त्याला हेच कारण कारणीभूत आहे.

In reply to by Rajesh188

hrkorde 15/09/2021 - 15:11
शहर कुणी मुद्दाम वसवत नाही, मुंबई बंदर आहे, विमानतळ आहे, मध्यवर्ती आहे, पूर्वी कापड व धान्य व्यापार होत होता, म्हणून तसे वसत गेले. आता योगीजी तिकडेही बॉलिवूड उभे करत आहेत म्हणे. मग होईल नवनिर्माण तिकडेही

In reply to by hrkorde

Rajesh188 15/09/2021 - 15:17
पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.आंध्र नी हैद्राबाद प्रगत करून दाखवले,कर्नाटक नी बंगलोर ,तमिळ nadu नी चेन्नई. उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.

In reply to by Rajesh188

पुणे,नागपूर,नाशिक ,औरंगाबाद अनेक उत्तम शहर महारष्ट्र मध्ये आहेत .ती महाराष्ट्र सरकार च्या प्रयत्न मुळे च निर्माण झाली आहेत.
डोळे पाणावले. काय काय मोठी कामं केली महाविकास आघाडीने. आम्ही उगीचच समजत होतो की ही शहरे स्वातंत्र्यापूर्वी पण भारतात होती.

In reply to by Rajesh188

उत्तरेच्या राज्यांना हे का जमत नाही.
तुम्ही उत्तरेतील गुरगाव, नॉयडा, चंडीगड आणि काही अंशी फरीदाबाद आणि गाझीयाबाद ही शहरे बघितली आहेत का? वाटत नाही. कारण बघितली असतीत तर असे काही लिहिले नसते. मोठ्या शहरांविषयी बोलाल तर दिल्लीतील रस्ते, मेट्रो वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी अधिक चांगले आहे. आज दिल्लीत कुठेही असले तरी एखाद-दीड किलोमीटरपेक्षा लांब मेट्रो स्टेशनसाठी जावे लागत नाही. दिल्लीतील डीटीसी बसची सुविधाही खूप चांगली आहे. मेट्रो आणि डीटीसी बस यामुळे दिल्लीत कुठूनही कुठेही जाणे खूप सोपे आहे. अर्थात उत्तरेतील, विशेषतः दिल्लीच्या लोकांचा स्वभाव (फसवाफसवी, गोड बोलत हातोहात शेंड्या लावणे, जरा काही खुट्ट वाजले तरी हमरातुमरीवर येणे वगैरे) बदलता येणार नाही. त्याविषयी मी बोलतही नाही. माझा मुद्दा तिकडच्या पायाभूत सुविधांविषयीच आहे. तेव्हा उत्तरेत चांगली शहरे नाहीत हा मुद्दाच तथ्याला धरून नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 15/09/2021 - 23:58
तर तुम्ही उल्लेख केलेली सर्व शहर दिल्ली पासून 25 ते 40 km अंतरावर आहेत. दिल्ली ची उपनगर च आहेत ती. ठाणे मुंबई पासून 33 km वर आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे. उत्तरेतील दोन तीन राज्यच थोडी प्रगत आहेत. पंजाब,हरियाणा आणि हिमाचल प्रदेश . ह्या राज्यातील लोक मुंबई ,महाराष्ट्रात विपुल प्रमाणात नाहीत जाडी यूपी,बिहार ची दोन दोन फुटांवर एक व्यक्ती भेटतो तसे. यूपी,बिहार, झारखंड मधून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप प्रचंड आहे. त्या मध्ये महाराष्ट्र हिंदी ला राष्ट्र भाषा समजणारा एकमेव नॉन हिंदी प्रदेश आहे.. त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात. हे असे महाराष्ट्र राज्य ज्या राज्यात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत.सरकारी जागेवर,रस्त्यावर राहण्याची उत्तम सोय आहे,पाणी ,वीज चे कनेक्शन पण दिले जाते. परत काही वर्षात सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट. घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. अशा सर्व सुविधा मिळत असल्यामुळे यूपी,बिहारी महाराष्ट्रात येवून सुखात जगत आहेत उलट हक्कानी. राज्याने निर्माण केलेल्या सोयी सुविधांवर त्या मुळे ताण येत आहे. बकालपणा राज्याला येत आहे. प्रश्न गंभीर आहे. आणि हो मराठी लोक च त्यांचं इथे येवून राहणे हा कसा त्यांचा हक्क आहे ह्याचे प्रवचन पण देतात. इतकी अनुकूल जागा त्यांना पूर्ण भारतात कुठे च मिळणार नाही.

In reply to by Rajesh188

चंडीगड दिल्लीपासून २५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहे? ऐकावे ते नवलच.
दिल्ली देशाची राजधानी आहे ती चंगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे .पण जुनी दिल्ली घाणेरडी आहे असे ऐकले आहे.
त्याच न्यायाने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती चांगल्या स्थिती मध्ये असलीच पाहिजे. दिल्लीत जुनी दिल्ली बकाल आहेच पण मग त्याप्रमाणेच मुंबईत बकाल भाग नाहीत का? कुर्ला, कलिना वगैरे ठिकाणच्या किंवा रेल्वेमार्गालगतच्या झोपडपट्ट्या बघितल्या आहेत का? भायखळ्याचा मुस्तफा बाजार आणि नागपाड्याचा ए.एच.अन्सारी चौक वगैरे भाग बघितले आहेत का? अगदी न्यू यॉर्कच्या मॅनहटनला लाजवतील असेच सुंदर भाग आहेत नाही का ते? मुंबईजवळचे डोंबिवली-कल्याण-बदलापूर वगैरे भाग केम्प्स कॉर्नर किंवा बान्द्रा पश्चिम-खार सारखे थोडीच आहेत? ते काहीही असले तरी मुद्दा हा की दिल्लीत रस्ते, बस, मेट्रो वगैरे पायाभूत सुविधा मुंबईतल्या पेक्षा कितीतरी जास्त चांगल्या आहेत.
त्या मराठी लोक मराठी सोडून हिंदी च बोलणे गर्वाचे समजतात.
यातील गर्वाचे या शब्दाचे काय? गर्व से कहो हम हिंदू है मधला गर्व आणि मराठीतील गर्वाचे घर खाली मधला गर्व यात फरक आहे ना? मग तुम्ही स्वतः वापरलेला गर्व हा शब्द मराठीतील आहे की हिंदीतील?

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 16/09/2021 - 19:08
सरकारी जागेवर अतिक्रमणं केलेल्या लोकांना पक्की घर पण सरकार देते ते पण फुकट. घुसखोरांना फुकट घर बांधून देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. यात दोष कुणाचा आहे? मराठी माणसासाठी स्थापन झालेल्या राजकीय पक्षांनी काय केलं? उगाच दुसऱ्याला दोष कशाला देताय? मराठी कामगार कशी कामं करतात ते पहा आणि भैये कशी कामे करतात तेही पाहून घ्या. कोकणात शेती करायची असली, काजू आंब्याची बाग करायची म्हटली तर स्थानिक माणूस मिळत नाही. आठवड्याला ३ दिवस मनरेगा मध्ये काम करून १००० रुपये मिळतात. ते घेऊन पुढचे ७ दिवस दारू पिऊन पडून राहतात आणि मग परत ३ दिवस काम करायचे. मनरेगा मध्ये वर्षात १०० दिवस रोजगार मिळतोच. मग स्थानिक उद्योजक काय करेल? कोकणात सर्वत्र आंब्याच्या बागेत केवळ नेपाळी लोक दिसतील. माझ्या भावाच्या दोन कारखान्यात आजतागायत गेल्या ३० वर्षात एकही परप्रांतीय माणसाला त्याने कायम नोकरी दिलेली नाही. परंतु स्थानिक माणसांचे अनुभव फारसे उत्साहवर्धक नाहीतच. काम न करता दांड्या मारणे, सतत पैसे उधार मागणे, गौरी गणपती दिवाळी होळीला ४ दिवस सांगून जायचे आणि १५ दिवसांनी उगवायचे, जास्त काम असले तरी ओव्हर टाइमला नकार देणे हे सर्रास करणारी कामगार मंडळी १०० % मराठीच आणि स्थानिक आहेत. कंत्राटदाराचे कामगार भय्ये लोक रात्री ७-८ पर्यंत सहज थांबतात आणि आपले लोक साडे चार पासून आवरायला सुरुवात करतात. केवळ तत्वासाठी अजून तरी भावाने परप्रांतीय घेतलेला नाही. पण कोव्हीड नंतर परिस्थिती तशीच राहील का याची शंका वाटते. बाकी चालू द्या

चौथा कोनाडा 15/09/2021 - 12:39
घटणा सउवीधान लोकान्च्या मीळालेले परस्परावलम्बना आकान्क्शा स्थायीक नीवडणूक वीचार भाशेत वीदर्भाची वीशया वरशान्ची द्न्यानी-वीचारवन्त

निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.

In reply to by चौथा कोनाडा

रंगीला रतन 15/09/2021 - 23:07
निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो. नीबंधातील शूद्हलेखन आवडले हे आवरजून नमूद करू इचहीतो असे म्हणायचे आहे काय तूम्हाला? :) :) :)

Rajesh188 16/09/2021 - 14:23
तर अनेक धाग्यावर स्व तची मत व्यक्त होत नाहीत. मी इथे तीन चार पॉइंट मांडले. 1) मुळ रहिवासी असलेल्या मराठी लोकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची टक्के वरी खूप जास्त आहे . त्या मुळे मराठी लोक असुरक्षित स्वतःला समजत आहेत. आणि अशी स्थिती भविष्यात दक्षिण भारतात पण निर्माण होईल . ह्या वर कोणीच भाध्य केले नाही. २) स्थलांतरित लोकांमुळे स्थानिक संस्कृती धोक्यात येते ..ह्या वर कोणीच मत व्यक्त केले नाही ३) राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यात परप्रांतीय लोकांचे प्रमाण जास्त आहे कारण गुन्हेगारी हाच गुण असलेल्या राज्यातून इथे आले आहेत. ४) राज्याच्या infrastructure वर परप्रांतीय लोकांच्या मुळे ताण येतो ह्या वर कोणीच व्यक्त झाले नाही उत्पादक कंपन्या,मुळे महाराष्ट्रात ची नैसर्गिक संपत्ती प्रदूषित होत आहे . पण काहीच नुकसान न होता रोजगार आणि कर देशाला मिळत आहे. गुन्हेगारी वाढत आहे बकालपणा वाढत आहे. ह्या एक जरी इथे ह्या राज्यावर प्रेम करणारा असेल तर त्यांनी स्वतःचे मत व्यक्त करावे. आता सुधारला नाही तर. पुढची मराठी लोकांची पिढी आताच्या चामडी बचाव लोकांना भर चौकात चप्पल नी मारेल.

In reply to by Rajesh188

hrkorde 16/09/2021 - 18:22
केंद्र सरकार CAA आणणार आहे , PAN झाले , aadhar झाले त्यांचे त्यांना मोजणे जमेना , फक्त इलेक्शननंतर कमी पडणारे आमदार मोजले की त्यांचे पुण्यकर्म संपते. राज्यांनी तरी नेमके काय करायचे ? मूळ महाराष्ट्रातले म्हणजे तरी नेमके कोण ?

In reply to by सुबोध खरे

hrkorde 17/09/2021 - 22:18
देशातील आतील बाहेरील गणना ठेवणे जसे केंद्राला अवघड आहे, तसेच राज्यांना अंतरराज्यीय जनगणना ठेवणे अवघड आहे शंकर पाटलांची माकडाची शिरगणती ही गोष्ट आठवली

In reply to by hrkorde

Rajesh188 18/09/2021 - 10:06
अगदी काही ही चूक न होता तंतोतंत दुसऱ्या राज्यातील लोकांची गणना झालीच पाहिजे .चूक नको व्यायला . अशी अपेक्षा नाही पण पुरेसा दबाव निर्माण करण्यासाठी राज्यात येणाऱ्या लोकांची गणना केली जाईल असा नियम गरजेचा आहे.

कासव 17/09/2021 - 00:07
मागच्या गणपती वेळी मला घरात थोड लाकूड काम करायचं होत. मी आवर्जून मराठी सुतार निवडला. ह्या भाऊने काम सुरू करायला दसरा निवडला. आजी च आजारपण मुलीचं बाळंतपण असली कारण देत. दिवाळी दरम्यान हा पुन्हा गायब काम तर काहीच झालं न्हवत समान मात्र आणून टाकलं होत. शेवटी मी एक बिहारी बघितला ३ दिवसात २ माणसांनी सगळं काम संपवून टाकले. वर कमी पैसे घेतले. आपला भाऊ दिवाळी नंतर उगवला आणि म्हणतो काय साहेब तुमच्या सारख्या लोकान मुळे बाहेरचे येतात. १-२ दिवस उशीर झाला तर अस करू नये. मी परत तुमच्याकडे येणारच नाही. इथे मी ह्या साठी २ महिने वाट पाहिली ती गेली कुठे? ही घटना दापोली मधील आहे पुणे मुंबई ची नाही. सर्वच नाही पण मराठी मुले तोंडात मावा लावून नेत्याच्या मागे फिरण्यात धन्यता मानतात मग बाहेरचे येणारच ना. वर ह्यांचे लॉबिंग दादागिरी पण सहन करा. कोकणातल्या बागा असोत वा पश्चिम महारष्ट्रातील गुळाचे gurhal असो आपली मुले असली काम करायला मागत नाहीत. मग कोकणात पण बिहारी आंबे विकतो आणि आपण हॉटेल मध्ये बिहारी वेटर ला टीप देता देता असले विषय चघळत बसतो

चित्रगुप्त 17/09/2021 - 08:10
रावले साहेब, तुमचे दोन्ही लेख वाचण्याचा प्रयत्न केला. लेखातील आशय काय आहे हा भाग वेगळा ठेऊन सध्या एवढेच सुचवावेसे वाटते की काहीही लिहील्यावर ते लगेच प्रकाशित करण्याची घाई न करता दोन-चार वेळा वाचून, लिखाणातीत सर्व चुका काळजीपूर्वक दूर करून शेवटी अगदी खात्री झाल्यावरच प्रकाशित करण्याची सवय लावून घेणे योग्य ठरेल. कितीही चांगला मजकूर असला तरी अशुद्ध लेखनामुळे चोखंदळ वाचकांचा विरस होत असतो. मिपावर कच्चे लिखाण तात्पुरते साठवून ठेवण्याची सोय नसल्याने लिहीलेला मजकूर ड्राईव्ह वा अन्य ठिकाणी ठेऊन पूर्णत्व आल्यावर पुन्हा मिपावर चोप्य्पस्ते करता येतो. कृपया राग मानू नये. मिपावर सकस, दर्जेदार आणि निर्दोष लिखाण यावे ही सर्वांचीच इच्छा आणि जबाबदारी पण असते, हे लक्षात घेऊन थोडासा प्रयत्न केल्यास ते सहज जमू लागेल.

In reply to by चित्रगुप्त

सतीश रावले 17/09/2021 - 20:45
तूमच्या अथवा इतर कोणाच्याही प्रतीसादाचे मला वायीट वाटण्याचे कारण नाही. तूम्हाला माझा लेख 'पाहून' वायीट वाटले ह्यावर मी काय करू शकतो! लेखातील वीचारान्वर टीका केली असती, चूका दाखवून दील्या असत्या तर त्यावर काम करायला नक्कीच आवडले असते, आवडेल.

In reply to by सतीश रावले

सुक्या 17/09/2021 - 20:55
ज्याचं करावं बरं तो म्हणतो माझंच खरं!! रावले साहेब. तुम्ही राहु द्या. तुम्हाला नाही झेपायचे ते.

गड्डा झब्बू 17/09/2021 - 11:59
मला तुमची स्वाक्षरी मिळेल का? तुमचा सुगम, सुवाच्च लेख वाचुन इथल्या स्वामि१ आणि हस्तर या महान लेखक द्वयींची खुप खुप आठवण आली. आता लेखन थांबवु नका, मी वाचायला आतुर आहे.

Rajesh188 17/09/2021 - 13:37
खरे साहेब आणि कासव जी करू नका. इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत. स्थिती खूप वेगळी आहे . ठरवून उत्तर भारतीय लोकांची संख्या वाढावी आणि व्होट बँक तयार करण्यासाठी ठरवून ,प्लॅन करून हालचाली चालू असतात. मोकळ्या जागा,फूट पथ,,डोंगर ,रस्ते ह्या वर झोपटी बांधून ह्यांची राहण्याची सोय राजकीय पातळीवर केली जाते. पाणी connection, वीज जोडणी राजकीय पक्ष कायद्यात बसत नसले तरी घेवून देतात. अनधिकृत बांधकाम ना राजकीय पातळीवर संरक्षण दिले जाते. महाराष्ट्र वर राजकीय वर्चस्व मिळवण्याची इच्छा देश पातळीवर आहे. आणि राजकीय वर्चस्व मराठी लोकांच्या हातात च राहवे ही काळजी ह्या राज्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या अनेक लोकांना आहे. आणि विरोध ह्याला आहे. गैर मराठी सुतार चांगला काम करतो मराठी करत नाहीत हा वर वर चा विचार झाला तिबेट ताब्यात घेण्यासाठी चिनी लोकांना तिबेट मध्ये वसवले गेले,काश्मीर ताब्यात घेण्यासाठी हिंदू लोकांना तिथे ठरवून स्थायिक करायला हवे हाच विचार 370 हटवण्या मागे आहे. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे त्या वर मराठी लोकांचे वर्चस्व कमी करणे हा देश स्तरावर चा कुटील हेतू आहे. कर्नाटक मध्ये पण सेने, मनसे सारखी कन्नड लोकांची संघटना आहे अशा संघटना गैर राजकीय म्हणून राजकीय पक्ष च स्थापन करतात राज्य हित जपण्यासाठी. सर्वपक्षीय लोकांचा त्याला पाठिंबा असतो. म्हणून तर सेने ल वसंत सेना म्हणत.

In reply to by Rajesh188

रंगीला रतन 17/09/2021 - 13:58
इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत. तुम्ही म्हणताय म्हणजे हे बरोबर च असणार त्याचा प्रतिवाद करणे चूक च.

Rajesh188 17/09/2021 - 13:49
उत्तर भारतीय नेते कृपा,संजय , अब्बु ह्यांना इथे कोणी मोठे केले त्या त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने . कृपा तर गृहमंत्री झाला होता हे घडले फक्त केंद्रीय पातळीवरून राज्य पातळी वरील नेतृत्व व दबाव आणला गेला. आपले ब्रीद च आहे पाहिले भारतीय नंतर मराठी. हे ब्रीद असे आहे. जसे युद्धात सैनिक मेला की त्याला हुतात्मा घोषित करायचे. हुतात्मा म्हणजे काय माणूस मेल्यावर पण परत येतो का?

Rajesh188 17/09/2021 - 13:59
महाराष्ट्र सोडला तर बाकी राज्य अत्यंत सावध असतात.. मुंबई मध्ये गुजराती दुकानातून काही खरेदी केले तर ते बिल गुजराती भाषेत च लिहून देतात. मुंबई मध्ये असे वागत असतील तर गुजरात मध्ये ते कसे वागत असतील. दक्षिण भारत,बंगाल मध्ये येत असेल तरी ते ठरवून हिंदी बोलत नाहीत . मी अनुभव घेतला आहे. फक्त महाराष्ट्रात मराठी समोरचा हे आड नावाने जरी परप्रांतीय वाटला आणि मराठी पण बोलत असेल तरी त्याच्या शी हिंदी मधूनच बोलतात. आ बैल मुझे मार . अशी वृत्ती.

hrkorde 17/09/2021 - 22:51
हिंदू मुस्लिम , मराठी युपी सगळ्या गणना संपल्या की नेरळ कर्जतचे लोक तिथूनच बसुन आल्याने ठाणावाल्याना लोकलमधी बसायला शीट मिळत नाही , म्हणून डब्बानिहाय कर्जतचे किती अन ठाण्याचे किती ह्याची गणना करणे ठाणा व कर्जत नगर पालिकेने मनावर घ्यावे असा धागा काढण्यात यावा
एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, ​शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते. . काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात.

आशा भोसले – जीवेत शरद: शतम्

सोत्रि ·

यश राज 08/09/2021 - 11:03
आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही. अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाजीगर 08/09/2021 - 12:06
जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त, 'मदनमस्त हरिणी, मी मदनमस्त हरिणी...' है गाणं ऐकावं. गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !! जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो. धन्यवाद सोत्रि .

In reply to by सुजित जाधव

गोरगावलेकर 08/09/2021 - 22:14
चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी चित्रपट : भामटा लिंक https://youtu.be/qERaAYK58Vo

In reply to by मराठी_माणूस

चौथा कोनाडा 08/09/2021 - 13:02
आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही. ३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी_माणूस 08/09/2021 - 16:01
हा कोण आहे ते माहीत नाही. भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

Bhakti 08/09/2021 - 12:22
आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

हेमंतकुमार 08/09/2021 - 15:06
त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत
+११

मित्रहो 08/09/2021 - 18:57
वाह मस्त खूप मस्त लेख बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात. आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली. यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे. :)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती. बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो. मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या. हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते. काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

रुपी 10/09/2021 - 05:50
छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे. पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच. 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :) आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो.. लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण 10/09/2021 - 12:54
आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ! त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी... आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे. जाईये आप कहाँ जाएंगे... देश-विदेश... कधीही, केंव्हाही माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...

यश राज 08/09/2021 - 11:03
आशाबाईंबद्दल भावना मस्त व्यक्त केल्यात तुम्ही. अस्मादिक पण लता-आशाचे खुप मोठे फॅन. तुम्ही म्हणता त्यप्रमाणे मी सुद्धा 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हीरीरीने भाग घेतलाय. माझ्यामते लताताईंचे पारडे थोडे जड असेल पण त्यामुळे आशाताई कुठे कमी पडल्यात असे वाटत नाही किंवा त्यांच्या गाण्यावर आमचे प्रेम कमी झाले असेल असेही नाही. बाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाजीगर 08/09/2021 - 12:06
जर कधी स्ट्रेस आला असेल, खिन्नतेचे ढग दाटले असतील तर फक्त, 'मदनमस्त हरिणी, मी मदनमस्त हरिणी...' है गाणं ऐकावं. गाण्याच्या सुरवाती आशाजीं नी जे मनमुक्त हसणं दिल आहे ना....बस तिथेच तुम्ही जिंकले जाता !! जगात इतक्या समस्या असतांना कुणी इतकं गोड कसे हसू शकतो या विचारात तुम्ही हरवून जाता, आणि दुनाया ही वाईट जागा नाही या वर तुमचा पुन्हा विश्वास बसतो. धन्यवाद सोत्रि .

In reply to by सुजित जाधव

गोरगावलेकर 08/09/2021 - 22:14
चुकीचा शब्द आहे यु ट्यूबच्या शीर्षकात Madan Mast Karani असं लिहिले आहे त्यांनी चित्रपट : भामटा लिंक https://youtu.be/qERaAYK58Vo

In reply to by मराठी_माणूस

चौथा कोनाडा 08/09/2021 - 13:02
आज संगीतकार टिम बर्गलिंग उर्फ "​​एविसी" याचा ३२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त गुगल०डूडल मुळे आशाताईंना तिथे स्थान मिळालेले नाही. ३ वर्षापुर्वी ​​एविसीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.

In reply to by चौथा कोनाडा

मराठी_माणूस 08/09/2021 - 16:01
हा कोण आहे ते माहीत नाही. भारतासाठी त्यांनी हे करायला हवे होते. पुर्वी त्यांनी असे केले आहे म्हणुन असे वाटले.

Bhakti 08/09/2021 - 12:22
आशाताईंना मी पहिल्यांदा pop गाण्यातून ऐकलं होतं "जानम समजा करो." हरहुन्नरी कलाकार...आशा एक मानवाला वरदान आहे.. समस्त मंगेशकर _/\_

हेमंतकुमार 08/09/2021 - 15:06
त्यांचा आवाज असाच धारदार, बहारदार आणि मधाळ राहो आणि त्या पुढची अनेक वर्षे गात राहोत
+११

मित्रहो 08/09/2021 - 18:57
वाह मस्त खूप मस्त लेख बरीच वर्षे लता मंगेशकर यांची भरपूर गाणी ऐकली आणि एक दिवस अच्छा जी मै हारी गाणे बघितले, त्यातला मधुबालाचा अभिनय आशा भोसले यांचा आवाज वाह क्या बात है. त्यानंतर हिंदीत खास आशा भोसले छापाची खूप गाणी ऐकली म्हणजे आगे भी जाने ना तू वगैरे. पण ओ मेरे सोना रे सोना, पान खायो सैया हमारो गाण प्रचंड आवडले. एक दिवस मराठीत कधी रे येशील तू ऐकले विश्वास बसत नव्हता याच गायिकेने हिंदीतली आहा हा आजा वगैरे गाणी म्हटली आहेत. नंतर मग ऋतु हिरवा, मागे उभा मंगेश, हि वाट दूर जाते अशी कितीतरी गाणी वेड लावतात. आज हे जाणवते की आपण मराठी माणसं भाग्यवाण आहोत लता मंगेशकर यांनी हिंदीत अजरामर केलेली खूप मेलोडी गाणी आपण ऐकली. त्याप्रकारची गाणी आशा भोसले यांना हिंदीत मिळत नव्हती म्हणून त्यांनी वेगळी गाणी हिंदीत गायली तर मराठीत मेलोडी गायली. त्याचमुळे आपल्याला आशा भोसले यांच्या आवाजात सर्व प्रकारची गाणी ऐकता आली. यु ट्युबवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपआपल्या पद्धतीने गायलेले ये नयन डरे डरे गाणे आहे. अप्रतिम विडियो आहे.

आशा भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! लता-आशा ही तुलना लांब ठेवून एकच वेळी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' यांचा आनंद घेता आला याबद्दल विधात्याचे आभार मानायचे. :)

लहानपणापासून तिची गाणी ऐकत आलो आहे. त्या वेळी साधारण रोज एकदातरी ती रेडिओ वर भेटायचीच. पेपर मधे तिच्या बद्दल कधीमधी छापुन यायचे, त्या वरुन तिच्या बद्दल मनात एक कल्पना तयार झाली होती. बहूतेक ज्ञानप्रबोधिनीच्या मदतीसाठी पुण्यात तिचा एक जाहिर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला आवर्जून गेलो होतो, तिथे तिला प्रत्यक्ष पहाता... अनुभवता आले. आणि मी तिच्या अजूनच प्रेमात पडलो. मग आमच्या कडे कॅसेट प्लेयर घेतल्यावर त्याच्या बरोबर ज्या कॅसेट आल्या त्यात भिमसेन जोशींची इंद्रायणी काठी, लताबाईंची ज्ञानेश्वर माउली आणि आशाची चांदणे शिंपित जाशी या होत्या. हळुहळू टिव्ही आला, मग नव नवी चॅनेल आली आणि आता तर काय बटन दाबले की आशाची भेट होते. काळाबरोबर स्वत:ला वेगाने बदलणार्‍या आशाला दिर्घायुष्य लाभो आणि ती आता आहे तशीच हसरी खेळती आनंदी राहो या मन:पूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,

रुपी 10/09/2021 - 05:50
छान लेख! कमी शब्दांतही समर्पकपणे मांडला आहे. पण आशाताईंवर कितीही लिहिले तरी कमीच आहे. एके वर्षी शाळेत आम्ही आशाताईंवर अख्खे हस्तलिखित बनवले होते. तेव्हा पहिल्यांदाच गाणी आणि गायक यांचा मेळ घालायला शिकले. आणि तेव्हापासून दर ८ सप्टेंबरला आशाताई आठवतातच. 'लता ग्रेट की आशा' ह्या वादांमध्ये हि भाग घेण्याची सुरसुरी येऊन बऱ्याच ठिकाणी त्या वादामध्ये भाग घेऊन आशाबाईंची बाजू हिरीरीने मांडण्यात प्रचंड मजा होती, >> अगदी अगदी.. हेही खूप करुन झालंय. :) आशाताईंना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जाता जाता... तुम्ही लिहिलाय तो सुनिधीबरोबरचा शो चा भाग माझाही पाहण्यात आला होता (मी टी व्ही क्वचितच बघते तरी!)..पण तिने प्रतिवाद केला किअंवा अल्लडपणा असा काही वाटला नाही.. मला तरी फक्त तिने ते एखादी खोडसाळपणा केलेली गोष्ट मान्य करावी असे वाटले.. असो.. लेखासाठी धन्यवाद. आज खूप दिवसांनी लॉग इन करुन प्रतिसाद लिहित आहे.

मदनबाण 10/09/2021 - 12:54
आशा ताईंना वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ! त्यांनी इतकी आणि अनेक प्रकारची गाणी गायली आहेत की येणार्‍या कित्येक पिढ्या त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत राहतील. त्यांनी रिमिक्स गाणी देखील गायलेली आहेत. त्यांनी गायलेलं आणि माझं आवडत एक ओरिजिनल आणि एक रिमिक्स गाणं इथं देऊन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

दूर दूर तक मेरी आवाज़ चली आएगी... आशाजींना गाण्यातून संदेश दिला आहे. जाईये आप कहाँ जाएंगे... देश-विदेश... कधीही, केंव्हाही माझ्या आवाजात मी तुम्हाला भेटत राहीन...
आशा भोसले

प्रमादाच्या पथावर

चंद्रकांत ·

गॉडजिला 05/09/2021 - 21:22
फक्त वर्तमान अस्तित्वात आहे भूतकाळ स्मृती आहे भविष्यकाळ अपेक्षा... तूम्ही वर्तमानातच जगता आणि तुमचा मृत्यू देखील वर्तमानात होतो

In reply to by गॉडजिला

भूतकाळ ही आहे आणि भविष्यकाळ ही. You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही. आपल्याला काळ जाणवतो कारण या काळाच्या नळी मधून "आपण" प्रवास करतो. पण या सगळ्या घटना ज्या आपण जगतो त्या काळाच्या पटलावर मांडलेल्या आहेत. भविष्य आता सुद्धा आहे फक्त "आपल्यासाठी" ते अजून realize झालेलं नाही. एखाद्या तटस्थ observer ला हे जाणवेल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 06/09/2021 - 12:36
आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल. (काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 06/09/2021 - 12:36
आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल. (काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

गॉडजिला 06/09/2021 - 13:27
You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही.
जरा गणित मांडुन सांगा बरे काळाच्या टनेलमधे मि कुठे आहे आणि तुम्हि कुठे आहात…(थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटि मला माहित आहे). मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ?

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 07/09/2021 - 05:45
मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ? काय म्हणते तुमचे प्रतिबंधीत न होणारे काळाचे गणीत ? उत्तर सोपं आहे फक्त आणी फक्त वर्तमान काळ :)

In reply to by गॉडजिला

लिहायचा कंटाळा आलाय गोजि साहेब. यावर एक मोठ्ठ उत्तर मी कोरा वर लिहिलं. पण ते छापलं तर मी कोण ते तुम्हाला कळणार. जाऊ दे. तुम्ही म्हणता तसं.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 07/09/2021 - 10:38
ठीक आहे... कोराचे उत्तर इंग्रजीत असेल तर इथे मराठी लिहा तिकडे मराठी असेल तर इकडे इंग्रजीत लिहा मुळात कोरा वाले तुम्हीच हे गोपनीय ठेवूनही तूम्ही उत्तर देऊ शकला असता पणं असो... तूर्तास तूम्ही उत्तर देऊ शकत नाही ही बाब मी मान्य करतो

प्रमादाच्या पथावर मार्गक्रमिताना घूर्णी समरूपतेशी तादात्म्य पावलो, महत्प्रयासाने वाचलेल्या या प्रबंधाचा साक्षेपी अर्थ समजण्यात मी कितपत यशस्वी झालो ते समजत नाहिये कारण अंतगाठेपर्यंत माझी शिरोवेदना उचंबळून उठली आणि नयनदृष्टि समिप चिलमिलिका विहार करु लागल्या. प्रमथित होउन मी धिरोदत्तपणे मी अंतार्यंत पोचलो खरा पण त्यावेळेपर्यंत जाणिवांनी उच्चस्थितिं प्राप्त केली होती. निव्वळ पठ्यमात्र राहून, मुग गिलन करणे शक्य झाले नाही. शेवटी मानसीची वमनेच्छा प्रबळ झाली आणि आम्ही हा प्रतिसादप्रपंच करण्यास उद्युक्त जाहलो. पैजारबुवा,

Bhakti 07/09/2021 - 06:59
७ उतार्यात लिहिलेला काळ आणि आपले प्रमाद !!! मस्तच की ओ! योगायोगाने Thorndike चा प्रयत्न-प्रमाद सिद्धांत वाचत होते, त्यांच्यानुसार प्रमादाच विशाल तळ प्रयत्नाच्या अनेक गोष्टीनी भरलय..त्यातला अचूक प्रयत्न हेरायचा आणि वर्तनात आणून बदल घडवायचा... :) :)

गॉडजिला 05/09/2021 - 21:22
फक्त वर्तमान अस्तित्वात आहे भूतकाळ स्मृती आहे भविष्यकाळ अपेक्षा... तूम्ही वर्तमानातच जगता आणि तुमचा मृत्यू देखील वर्तमानात होतो

In reply to by गॉडजिला

भूतकाळ ही आहे आणि भविष्यकाळ ही. You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही. आपल्याला काळ जाणवतो कारण या काळाच्या नळी मधून "आपण" प्रवास करतो. पण या सगळ्या घटना ज्या आपण जगतो त्या काळाच्या पटलावर मांडलेल्या आहेत. भविष्य आता सुद्धा आहे फक्त "आपल्यासाठी" ते अजून realize झालेलं नाही. एखाद्या तटस्थ observer ला हे जाणवेल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 06/09/2021 - 12:36
आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल. (काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 06/09/2021 - 12:36
आपंण एखादा विस्त्रुत लेख का लिहित नाहि यावर ? विशायही समजेल आणि वाचायलाहि आवडेल. (काळाच्या नळी मधून प्रवास करणारा)-गॉडजिला.

गॉडजिला 06/09/2021 - 13:27
You can go to the slice of time in the past or in the future. गणित त्यासाठी प्रतिबंध करत नाही.
जरा गणित मांडुन सांगा बरे काळाच्या टनेलमधे मि कुठे आहे आणि तुम्हि कुठे आहात…(थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटि मला माहित आहे). मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ?

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 07/09/2021 - 05:45
मुळात गणिताने प्रतिबंध न होण्याजोगा काळच जर बिग बँग नंतर अस्तित्वात आला तर बिग बँग कोणत्या काळि झाला ? काय म्हणते तुमचे प्रतिबंधीत न होणारे काळाचे गणीत ? उत्तर सोपं आहे फक्त आणी फक्त वर्तमान काळ :)

In reply to by गॉडजिला

लिहायचा कंटाळा आलाय गोजि साहेब. यावर एक मोठ्ठ उत्तर मी कोरा वर लिहिलं. पण ते छापलं तर मी कोण ते तुम्हाला कळणार. जाऊ दे. तुम्ही म्हणता तसं.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 07/09/2021 - 10:38
ठीक आहे... कोराचे उत्तर इंग्रजीत असेल तर इथे मराठी लिहा तिकडे मराठी असेल तर इकडे इंग्रजीत लिहा मुळात कोरा वाले तुम्हीच हे गोपनीय ठेवूनही तूम्ही उत्तर देऊ शकला असता पणं असो... तूर्तास तूम्ही उत्तर देऊ शकत नाही ही बाब मी मान्य करतो

प्रमादाच्या पथावर मार्गक्रमिताना घूर्णी समरूपतेशी तादात्म्य पावलो, महत्प्रयासाने वाचलेल्या या प्रबंधाचा साक्षेपी अर्थ समजण्यात मी कितपत यशस्वी झालो ते समजत नाहिये कारण अंतगाठेपर्यंत माझी शिरोवेदना उचंबळून उठली आणि नयनदृष्टि समिप चिलमिलिका विहार करु लागल्या. प्रमथित होउन मी धिरोदत्तपणे मी अंतार्यंत पोचलो खरा पण त्यावेळेपर्यंत जाणिवांनी उच्चस्थितिं प्राप्त केली होती. निव्वळ पठ्यमात्र राहून, मुग गिलन करणे शक्य झाले नाही. शेवटी मानसीची वमनेच्छा प्रबळ झाली आणि आम्ही हा प्रतिसादप्रपंच करण्यास उद्युक्त जाहलो. पैजारबुवा,

Bhakti 07/09/2021 - 06:59
७ उतार्यात लिहिलेला काळ आणि आपले प्रमाद !!! मस्तच की ओ! योगायोगाने Thorndike चा प्रयत्न-प्रमाद सिद्धांत वाचत होते, त्यांच्यानुसार प्रमादाच विशाल तळ प्रयत्नाच्या अनेक गोष्टीनी भरलय..त्यातला अचूक प्रयत्न हेरायचा आणि वर्तनात आणून बदल घडवायचा... :) :)
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.

सद्गुणांचं संचित

चंद्रकांत ·
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच.

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

चंद्रकांत ·
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात.