मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

ध्यानधारणा ....ज्याची त्याची....

मुक्त विहारि ·
प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ... -------- मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का? माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे... मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा.

'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !

हेमंतकुमार ·
चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

चित्रगुप्त ·
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते.

बस करा वृद्धांचे फालतू लाड

कोंबडी प्रेमी ·
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय . ६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत. वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे. आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये.

मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१

पाषाणभेद ·
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१ आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत. आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता. आजचा दिनांक 07/11/2021, रविवार, हा कट्टा अचानक दोन दिवस आधीच ठरला. सकाळी ठरल्या वेळेत योगेश पुराणिक (yogi900), व सचिन बोरसे (पाषाणभेद) मुंबई नाक्यावर हजर झाले. थोड्याच वेळात जानु - सर्वेशसरांचा फोन आला व तेथे पोहोचले. त्याच दरम्यान डॉ. दातरंगे सरांचा फोन आला. ते पण वेळेत पोहोचले. नेहमीप्रमाणे इतर दोन जणांनी येण्याचे कबूल करूनही ऐनवेळी टप्पा दिला.

विवेकाच्या वाती

चंद्रकांत ·
आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात.

वाडा

प्रसाद गोडबोले ·
जुनाट वाडा, उजाड मंदीर, पडकी कौले ,पडक्या भिंती शिसवी तुळया वाळवीसही सांगत असतील गतश्रीमंती || इथे जाहल्या कित्येक मुंजी कित्येक लग्ने किती सोहळे वाड्यानेही मनसोक्त भोगीले सुखदु:खांचे हे हिंदोळे || कित्येक घरटी इथेच वसली, इथेच फुलली, इथे बहरली कित्येक पाखरांचीही किलबिल ह्या वाड्याने इथे पाहिली || सारी पाखरे मोठ्ठी झाली बघता बघता उडो लागली संवत्सरफल ऐकत ऐकत कित्येक वर्षे सरोनी गेली || फुटलेले नवपंख घेती मग गरुड भरारी हिरव्यादेशी एकाकीपण उमगत जाई रोज नव्याने नवीन दिवशी || आता वाडा असा एकटा सोबत नाही कोणी सोबती मंदिरामध्ये कुणी अनामिक चार दों फुलें वाहुनी जाती || बाकी सारे बेवारस अन कुणीच न

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखनवाला ·
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.