मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

सृष्टीलावण्या ·
लेखनविषय:
दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिला खेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकर यांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्र वाचन सर्वांगीण आहे. दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेक संतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे - १) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे. २) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.

पुस्तक परिचय!

पिवळा डांबिस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रहो, आज एका मराठी कादंबरीच्या विषयी लिहिणार आहे. कादंबरी तशी जुनी आहे पण त्याविषयी कुठे फारसे लिहुन आलेले वाचले नाही. माझ्या एका साहित्यिक मित्राने मला भेट म्हणून दिली होती. "वेगळी आहे, वाच", म्हणाला. म्हटले तर ही एक प्रेमकथा आहे, म्हटले तर एक शोकांतिका! प्रेमकथा म्हटली तरी प्रचलित विवाहसंस्थेत न बसणारी!! विशेष म्हणजे भारताच्या पूर्णपणे बाहेर घडलेली, किंबहुना जगाच्या सगळ्याच किनारयांपासून दूर घडणारी ही कथा. एक विलक्षण पार्श्वभूमी लाभलेली! एका निराळ्याच विश्वात घेऊन जाणारी!! लेखकाची प्रतिभा ज्वलंत आहे आणि शब्दांची निवड अचूक.

मी एक अशिष्टाचारी !

आपला अभिजित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मी तुम्हाला माझीच (राम)कहाणी सांगणार आहे. तुम्हाला कदाचित बोअर होईल, कदाचित अगदीच रुटीन वाटेल. पण माझ्या आयुष्यातली ही एक गंभीर समस्या झाली आहे, एवढं मात्र नक्की. मी आजच्या काळात जगायला अगदी नालायक आहे. हो..."नालायक'च ! "अकार्यक्षम', "अयोग्य', "अपात्र' वगैरे नाही. नालायक म्हणजे नालायक ! ज्याची लायकी नाही, तो. आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जीवनाचं मूल्यच बनलेला, "शिष्टाचार' कशाशी खातात, हे मला माहित नाही. तसं मासे, मटण, खेकडे, चिकन, शेपू-कार्ल्याची भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पैसे, आदी अनेक गोष्टी कशाशी खातात, हे मला माहित नाही. (या यादीत सिगारेट आणि दारूही येते.

गडकर्‍यांचे किस्से.

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से. अत्रे गडकर्‍यांना गुरुस्थानी मानत. आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले. काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?" वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!" ---------------------------------------------------------- नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्‍यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत.

तुकयाची अवली.. .. अवलोकन

प्राजु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, १५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे.. लेखिकेची भूमिका : आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची.

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनप्रकार

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष ·
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

पांढरपेशी कविता

ॐकार ·
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व