.. .अक्षय अविरत निर्मळ

लेखनविषय:
या भल्या पहाटे थोडे मी तुझेच गाणे गावे अन गात्रा मधले कोडे अलगद सुटून जावे ती वीण मखमली मनाची अन श्वास समर्पित व्हावा त्या जगनियंत्यासाठी हा देहच निमित्त व्हावा विरघळून जावे अलगद मी पण माझे नुरावे त्या अक्षय सुखामध्ये मी अवचित भान हरावे ते नकोच लौकिक जगणे अन श्वासही संकोचावा तू माझा अन मी तुझाच हा भोगच अक्षय व्हावा मी भरून पावलो अवघा ही तुझीच मिठी अवखळ मी विरून हलका होतो अक्षय अविरत निर्मळ - बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता

अनोळखी

लेखनविषय:
काव्यरस
अनोळखी पलटून तुला पाहताना मज अनोळखी तू वाटे, ती नजर तुझ्या डोळ्यातील का आपली ना भासे क्षितिजातल्या धुक्यात हरवून गेली वाट, वाटे रिक्त जग सारे सुनसान ही पायवाट ते स्वप्न आपले विरले कसे नि कुठे, का वाढला हा अबोला विश्वास का न उरला चुकलो कुठे ग आपण राहिली प्रीत का अधुरी, स्वप्नातले ते सारे भंगले कसे मनोरे वळणावर मी तु़झ्या त्या पाहे वाट अजूनी तुझी, नि तू सोडुनी गेली अशी जशी नव्हतीच कधी माझी - रवि बदलापुरेकर

'उषःकाल होता होता' : एक शंका

लेखनविषय:
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

भरवू नकात आता...

लेखनविषय:
काव्यरस
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!

काचेपलिकडचं वास्तव!

लेखनविषय:
काव्यरस
मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं । मोहाच्या हट्टापुढे गरजांचं हसं होतं ।। आतमध्ये शिरताच माझ्या साधेपणाचे पाश तुटतात । साऱ्या सुप्त इच्छांना मग शक्यतेचे पंख फुटतात ।। दिपून जातात डोळे, काही दिसेनासं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं...... ।।१।। चोहीकडे दिसतात मला जेव्हा वैभवाचे सडे । आणि लखलखणारी सुखं रोखून बघतात माझ्याकडे ।। कसं सामोरं जावं त्यांना मला खरंच कळत नाही । माझं आणि पाकीटाचं, मत काही केल्या जुळत नाही ।। भर पावसात कोरडं राहावं, माझं अगदी तसं होतं । मॉलमध्ये गेल्यावर माझं हे असं होतं......

तू अशी

लेखनविषय:
मौन माझे तुला एवढे सांगते तू किती बोलते तू किती बोलते मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती फोनची कंपनी त्यावरी चालते वाजले चार रे, दे मला तू चहा मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते उंट तंबू मधे, आणि उघडयात मी या कपाटात तू, वल्कले कोंबते सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते शस्त्र नाही करी, हार नाही तरी येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते वाढले वय तसे, समज ही वाढली रात्र समजून तू, दिवसभर झोपते राग मानू नको, स्वप्न होते तुझे दिवस संपेल हा, का तरी लोळते

तिच मन कधी कळेल का

लेखनविषय:
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? * कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पडून रडते कधी स्वत:च खर करतेस, तर कधी माझं चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? हे कोड कधी उलगडेल का? तिच मन कधी कळेल का

बाबाचं मन!

लेखनविषय:
काव्यरस
एवढस पिल्लू... My bundle of joy हसून म्हणालीस... त्यात तुझे efforts काय? आईने वाढवलं... जन्माला घातलं! तुझं नाव लावून हातात तुझ्या दिलं... आहेस तू... असणारच आहेस! माझं सगळं तर आईच बघते आहे.. घर तू चालवतोस?... तुला चालवायचंच आहे! आपापलं जगणं आपण जगतोच आहे! खरंय पिल्ला... वेळ नाही दिला.. माझं नाव आणि फक्त पैसा दिला! आई सांगत होती तुझं लडिवाळ वागणं तिच्या डोळ्यात दिसत होतं तुझं मोठं होणं! वाटलं होतं तुझ्याशी दोस्ती करीन मन सारं कधीतरी मोकळं करीन पिल्लू जसजसं मोठं झालं आकाश त्याला बोलावू लागलं बेटा आता मीपण थोडा मोठा झालोय दमलो...

नवकवीस्तोत्र

काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

फुंकिले मी प्राण माझे...

लेखनविषय:
काव्यरस
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित
Subscribe to कविता