'उषःकाल होता होता' : एक शंका

हेमंतकुमार जे न देखे रवी...
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?
वर्गीकरण
लेखनविषय:

4 टिप्पण्या 1,237 दृश्ये

Comments

एस नवीन

गीत आधी लिहिले होते. चित्रपटात ते नंतर घेण्यात आले. अशी उदाहरणे इतरही अनेक कवींच्या कवितांबाबत पहायला मिळतात. उदा. आरती प्रभू, ग्रेस इत्यादी.

गामा पैलवान नवीन

अवांतर : भटसाहेबांच्या 'तरुण आहे रात्र अजुनी' या गीतातही एक अतिरिक्त कडवं आहे. आशाबाईंच्या गाण्यात येत नाही ते. -गा.पै.

हेमंतकुमार नवीन

आभार, एस. ज्यांना हे गीत आवडते त्यांनी ती २ कडवी जरूर वाचावीत.