मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रथमस्थानात शुक्राचे फलादेश

धोंडोपंत ·

गुंडोपंत 12/10/2007 - 12:31
लेख आवडला! शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते. पुढील लेखा साठी उत्सुक आहे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट 12/10/2007 - 12:34
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत 12/10/2007 - 15:54
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :)) आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते! शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट 12/10/2007 - 22:26
अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.) पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे. - सर्किट

लेखकाचे मनोगत
''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले. भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला. माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.`` हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे. प्रकाश घाटपांडे

abhijit deshpande 12/10/2007 - 16:44
आपला लेख वाचला. त्यातुन मला पन माझ्या राशि विशयी जानन्याचि इछा आहे. माझि रास व्रुशभ आहे. तर आपन त्याव्इशयी काहि सान्गु शकाल का?

धोंडोपंत 14/10/2007 - 14:23
प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. आपला, (आभारी) धोंडोपंत घाटपांडेसाहेब, आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात. रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो. चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ? दिल हो रौशन तो कोई बात भी है || आपला, (दीप्तिमान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत 09/12/2010 - 05:07
अचानक हा जुना चांगला लेख हाती लागला. वाचायला मजा आली! अजून असे लेख आणि चर्चा याव्यात!

कवितानागेश 09/12/2010 - 10:14
या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत. या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते. प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात. साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ). मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो. मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात. पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.

In reply to by कवितानागेश

गुंडोपंत 09/12/2010 - 10:40
मतांतरे: तुम्ही म्हणता ते खरे आहे. या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.) श्लोक - केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो: मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०|| पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात. त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे. तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.

योगप्रभू 09/12/2010 - 11:34
पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात. एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्‍यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात. शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. (थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो) मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:

In reply to by योगप्रभू

टारझन 09/12/2010 - 11:53
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अ‍ॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ? कॄपया समाधान करावे. बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.

In reply to by टारझन

योगप्रभू 09/12/2010 - 13:15
खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो. टारझन, मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही. जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.

In reply to by योगप्रभू

टारझन 09/12/2010 - 13:35
धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :) समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)

In reply to by योगप्रभू

गुंडोपंत 10/12/2010 - 03:30
मस्त विवेचन केलेत. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.

In reply to by गुंडोपंत

योगप्रभू 10/12/2010 - 11:10
गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे. अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.

In reply to by योगप्रभू

शुचि 09/02/2013 - 04:24
शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
वा! सुरेख योगप्रभू!!! हे अगदी १००% खरे आहे.

कंजूस 03/10/2013 - 17:43
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .

गुंडोपंत 12/10/2007 - 12:31
लेख आवडला! शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते. पुढील लेखा साठी उत्सुक आहे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट 12/10/2007 - 12:34
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत 12/10/2007 - 15:54
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :)) आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते! शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट 12/10/2007 - 22:26
अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.) पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे. - सर्किट

लेखकाचे मनोगत
''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले. भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला. माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.`` हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे. प्रकाश घाटपांडे

abhijit deshpande 12/10/2007 - 16:44
आपला लेख वाचला. त्यातुन मला पन माझ्या राशि विशयी जानन्याचि इछा आहे. माझि रास व्रुशभ आहे. तर आपन त्याव्इशयी काहि सान्गु शकाल का?

धोंडोपंत 14/10/2007 - 14:23
प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. आपला, (आभारी) धोंडोपंत घाटपांडेसाहेब, आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात. रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो. चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ? दिल हो रौशन तो कोई बात भी है || आपला, (दीप्तिमान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत 09/12/2010 - 05:07
अचानक हा जुना चांगला लेख हाती लागला. वाचायला मजा आली! अजून असे लेख आणि चर्चा याव्यात!

कवितानागेश 09/12/2010 - 10:14
या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत. या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते. प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात. साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ). मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो. मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात. पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.

In reply to by कवितानागेश

गुंडोपंत 09/12/2010 - 10:40
मतांतरे: तुम्ही म्हणता ते खरे आहे. या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.) श्लोक - केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो: मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०|| पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात. त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे. तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.

योगप्रभू 09/12/2010 - 11:34
पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात. एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्‍यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात. शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. (थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो) मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:

In reply to by योगप्रभू

टारझन 09/12/2010 - 11:53
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अ‍ॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ? कॄपया समाधान करावे. बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.

In reply to by टारझन

योगप्रभू 09/12/2010 - 13:15
खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो. टारझन, मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही. जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.

In reply to by योगप्रभू

टारझन 09/12/2010 - 13:35
धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :) समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)

In reply to by योगप्रभू

गुंडोपंत 10/12/2010 - 03:30
मस्त विवेचन केलेत. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.

In reply to by गुंडोपंत

योगप्रभू 10/12/2010 - 11:10
गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे. अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.

In reply to by योगप्रभू

शुचि 09/02/2013 - 04:24
शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
वा! सुरेख योगप्रभू!!! हे अगदी १००% खरे आहे.

कंजूस 03/10/2013 - 17:43
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .
लोकहो !! शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे. प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्‍यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते. ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते.

संस्कृत - असंस्कृत

सहज ·

लपले त्यावरी टपले सारे, ओळखीचे चोर गं! कुठल्या लावणी कि काव्य आहे ते आठवत नाही.सविस्तर प्रतिक्रिया नंतर. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन 26/05/2010 - 08:00
जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार?
खल्लास लेखण !!! जबरदस्त सहजराव :) !! - (५० मार्काचा संस्कृत पेपर दिलेला) टारझन

सहजराव ! तुम्ही विषय मस्त मांडलाय, पण आम्हालाही घाटपांडे साहेबांप्रमाणे जरासा वेळ हवाय ! कारण जराशा नाजूक विषयावर लिहायचे असल्यामुळे जरा घाई करत नाही ! बाकी तुमची डेअरींग सभ्य संस्कृतीत बसेल का ? याच विचारात आम्ही सध्या तरी व्यस्त आहोत ! अवांतर ;) बाकी शंकाराचार्यांचे श्लोक अष्टके यांचा संदर्भासाठी योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे ! तुमच्या अभिरुचीची आणि पाहण्याच्या दृष्टीकोणाची दाद दिली पाहिजे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 02/10/2007 - 20:46
लेख फारच आवडला सहजराव! >>>बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे अगदी योग्य आहे. म्हणून बंधन नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी सुखकर होऊ शकतात. विकास

In reply to by विकास

जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. विकास यांचे हे वाक्य अगदी पटलेच. सहज, लेख आणि नाजूक विषयाची मांडणी आवडली. स्वाती

In reply to by विकास

गुंडोपंत 27/05/2010 - 12:08
मस्त लेख आहेच! विषयही रोजचा - पण उघडपणे टाळला जाणारा. :) बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे तर खरेच! असे अजून आणि सातत्याने यायला हवे असे वाटले. आपला गुंडोपंत

'मैत्र' ही किरण यज्ञोपवित यांची एकांकिका ही मिळून सार्‍या जणी च्या वर्धापन दिनाला एकदा पाहिली होत. त्यात हे अंतर्मनातले संवाद सैतानाचे विचार म्हणून प्रतिबिंबित असे दाखवले होते. मनातील द्वंद्व फारच सुंदर दाखवले आहे. सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली 02/10/2007 - 21:16
>> सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. सहमत आहे. लेख चांगला जमला आहे. अवांतर: अशुद्धलेखनाबद्दल सहजराव जाहीर लिहितात म्हणून जाहीरच सांगते. इतरांनी अशुद्धलेखन काढून दाखवले की त्रास होतो तितकाच त्रास अशुद्धलेखन वाचताना होतो. हे सांगताना मीही शुद्धलेखनाची पंडिता नाही, माझ्याही अगणित चुका होतात तरीही शुद्धलेखन तपासून जितके शक्य आहे तितक्या सुधारणा करा असेच सांगेन. फायदा तुमचाच आहे.

चित्रा 02/10/2007 - 21:23
आजचा लेख खरोखरच उत्तम (नुसताच बरा नाही)! काही काही गोष्टी तर अगदी मनातल्या बोलताय असे वाटले. पटकन विचार आले ते लिहीते आहे. (प्रतिसादांना फाटे फुटायला लागले की अजून लिहीन!). पण लेख ज्या मोकळेपणे लिहीला आहे आणि जसा मांडला आहे ते विशेष करून आवडले. उदा: >>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? >>माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. >>खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. >>जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड. अगदी खरे. >>जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? मुलामुलींनी मोकळेपणे वागणे आणि छचोरपणा/सैल वागणे या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याचा तोल सांभाळता आला तर उत्तम, पण प्रत्येकालाच ते जमत नाही. जास्त चिकित्सा करीत नाही , तुम्हीच म्हणालात म्हणून :-). >>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? सामान्य माणसांच्या मर्यादा पडतात. लहान कपडे म्हणजे किती लहान हे सीमारेषेवरचे ठरतील हे कोण सांगणार? त्यापेक्षा अंग झाकून टाकलेले बरे अशा विचारातून हे सर्व आले असावे. अर्थात काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावयाचे स्वातंत्र्य त्याला / तिला हवे - समाजाला काय वाटेल असे विचार करण्याची गरज भासू नये.

`आमच्या शाळेतल्या वाड्यावस्त्यांवरच्या थोराड मुलांना तमाशाचे फार आकर्षण . गावात तमाशे कायम. आमच्या देव गुरुजींना ते आवडायचे नाही. ते म्हणायचे " अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना या बायांची थोबाड बघा. ओकायला येईल. गोरे गोमटे रंग लावलेले असतात तोंडाला. चालले लगे तमाशाला' आकर्षणा बद्दल ते म्हणायचे 'वान्याच्या पोराला भजी खावीशी वाटतात, हॉटेल वाल्याच्या पोराला गुळ खोबरं खावस वाटतं.' पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. सुख सुख म्हणताहे दु:ख ठाकोनी आले , भजन सकळ गेले चित्त दु:श्चित्त झाले (असमर्थ) प्रकाश घाटपांडे

कोलबेर 02/10/2007 - 21:25
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा, बील ओ रायली म्हणाला "हॉल्टर टॉप घालून रात्री न्यू यॉर्क मधून फिरले तर असेच होणार" साधारण दोनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका मुलीवर पोलिसाने बलत्कार केला तर प्रमोद नवलकर म्हणाले होते की "आमच्या काळातील मुली नाही हो अश्या चौपाटीवर फिरायला जायच्या!" प्रमोद नवलकर आणि बिल ओ रायली दोघांनीही आपला हा लेख वाचावा! अवांतर: ' सुचना' मात्र जाम आवडली!

विकास 02/10/2007 - 21:39
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? त्यावरून दोस्ताना सिनेमातील अमिताभचा एक डायलॉग आठवला: बिकीनीत समुद्रावर चालणार्‍या झीनतच्या मागे एक दारूडा शिट्या वाजवत मागे लागतो. ती त्याला (इश्टाईल मधे) पकडून पोलीसचौकीत घेऊन येते आणि इन्स्पेक्टर अमिताभ कडे तक्रार करते. तीच्या कडे पाहात अमिताभ म्हणतो, " इस तरह के कपडे पेहेन्कर अगर आप रस्ते पे घुमने जायेंगी तो लोग सिटीयॉ नही बजायेंगे तो क्या मंदीर की घंटीया बजायेंगे ?" (माझ्या हिंदीबद्दल मराठी प्रमाणेच माफी!) या त्याच्या एका कॉमेंटनंतर झीनत त्या सीनेमात अंगभर वेषातच दाखवली आहे...

धनंजय 02/10/2007 - 22:01
नीट विचार करून उत्तर लिहितो. पण हा विषय प्रौढ सभ्य समाजात शंभर टक्के चालण्यासारखा असावा असे माझे मत आहे. सुसंस्कृत समाजात हे डेअरिंगबाज मुळीच वाटू नये, सामान्य वाटावे. हा विषय चर्चेला काढल्याबद्दल धन्यवाद.

स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्‍याचदा असूयेने) निकाल देत असतो. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्‍या व्हाव्या असे वाटते. पण बर्‍याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्‍याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला तुझ्या उसाला लागलं कोल्हा (कोल्हा) प्रकाश घाटपांडे

राजे 02/10/2007 - 22:54
लेख ही व विषय ही.. काही गोष्टींची मर्यादा व बंधन हे समाजामध्ये वावरताना स्वतः घालून घेणे कधी ही उत्तम, दुसरा कोणी सांगू लागला की ते प्रवचन वाटू लागते, तेव्हा मर्यादा व बंधन जरुरी. " पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. " सहमत. मागे एकदा मनोगत वर अथवा कोठे तरी महाजालावर मी लिहले होते की, सामान्य मानवाने स्त्री ह्या विषयाकडे त्याच वेळी वळावे जेव्हा तुमची, १. तीची इच्छा जाणून घेण्याची कुवत असेल. २. तीची योग्य मागणी पुर्ण करण्याची ताकत असले. ३. ती जेव्हा म्हणेल तेव्हा वेळ देण्याची तयारी असेल. ४. विषयवस्तू कडे पाहण्याची कलात्मक नजर असेल. ५. व तीच्या बद्दल अथवा स्वतः बद्दल अपराधीक बोध नसेल. व सर्वात महत्वाचे खिस्सा तपासून पाहा व मगच तिच्याकडे वळा. काय म्हणता ? बरोबर आहे ना ? राजे (*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर 02/10/2007 - 23:02
सहजराव, अतिशय उत्तम लेख! शिवाय हा लेख आणि याला सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या प्रतिसादावरून मिसळपाव हे एक सशक्त, सुदृढ आणि निरोगी असे संकेतस्थळ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नसून मी मनोमन सुखावलो आहे! सहजराव, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेख यापुढेही यावेत असे वाटते. मिसळपावचे सदस्य ते सहज झेलतील, पचवतील, आणि त्यावर तेवढ्याच तोलामोलाने आपले विचारही मांडतील अशी खात्री वाटते! बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. च्यामारी कसली आल्ये विरक्ती? हे सगळे साले शब्दांचे रचलेले पोकळ मनोरे आहेत. मला सांगा, शंकराचार्य दोन वेळा काहीतरी खातच असतील ना? त्यांनाही भूक लागतच असेल ना? जे काही खात असतील त्याची त्यांना चव तर लागतच असेल ना? मग झालं तर! उगाच कशाला वासना शमवण्याच्या वगैरे गप्पा मारायच्या? ते ब्रह्मचारी होते. अहो परंतु कुठलाही प्राणिमात्र म्हटला की लैंगिक भूक ही नैसर्गिकच गोष्ट आहे. शंकराचार्यांनी भले लग्नकार्य केलं नसेल, बाईपासून ते चार हात दूर असतील. तरीही निसर्ग कुणालाच चुकला नाही. शंकराचार्यांनादेखील स्वप्नदोषाचा विकार होऊन झोपेतल्या झोपेत त्यांचाही निचरा होत असेल/असलाच पाहिजे! मग मारे दिवसभर, ' स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.' या गफ्फा मारायला शंकाराचार्य मोकळे तिच्यायला! :)) असो.. आपला, आदितात्याचार्य!

विसोबा खेचर 02/10/2007 - 23:42
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. हे बाकी सहीच! :) तात्या. -- मिसळपाववर शुद्धलेखनाबद्दलची फाजील चर्चा, मजकूरापेक्षा त्यातील शुद्धलेखनाला असलेले अवास्तव महत्व, भाषेचे-शुद्धलेखनाचे वगैरे जीवघेणे नियम, या गोष्टींना कमितकमी महत्व असेल. मिसळपाव ही सामान्य जनांची उठबस करण्याची टपरी आहे. येणार्‍याने इथं यावं, काय एखाददोन प्लेट खायची ती मिसळ खावी, वर थंडगार ताक प्यावं आणि म्होरच्या वाटंला लागावं! कसं? :)

प्रमोद देव 03/10/2007 - 07:42
अतिशय मुद्देसुद लिखाण! सहजराव तुमच्या नावाप्रमाणेच गंभीर विषय देखिल तुम्ही अतिशय सहजतेने मांडलाय. भविष्यातही असेच विचारप्रवण लेखन आपल्याकडून अपेक्षित आहे.

सहज 03/10/2007 - 08:20
सर्वप्रथम मोकळ्या मनाने लेख स्वीकारल्याबद्दल (व प्रतिसाद दिल्याबद्दल, देणार्‍या) सर्वांचे आभार. अजूनही प्रतिसाद बहूतेक येणार असतील. >>हॉल्टर टॉप घालून ....तर असेच होणार अश्या वेशभूषेने कोणाच्या भावना अनावृत्त झाल्या मान्य पण म्हणून स्व:ता ते उपभोगायचा अजीबात हक्क नसताना लगेच दुसर्‍याच्या मनाविरुद्ध बळजबरी करणे हे त्या व्यक्ति व ( व हे स्पष्टिकरण स्वीकारणार्‍या समाजाच्या ) "असंस्कृत"पणाचे निर्दशक आहे. तसेच ते पुर्णता चूकीचे कारण आहे. त्याच न्यायाने एखादा फळविक्री ठेला /हॉटेल मधे घूसून पैसे न देता, मला छान फळ दिसले, वास चांगला आला. कशाला ठेवलेत उघड्यावर ? वास बंद ठेवायचा. तुमचा दागीना/बंगला/गाडी (चांगला आहे. का इथे बांधलात? का रस्त्यावर आणलीत?) चांगला आहे मी घेतला. बजबजपूरी होईल. मधे वाचले होते की आदिवासी जे कपडेपण घालत नाहीत. त्यांच्यामधे बर्‍याच जमातीत रेप इज अनर्हड ऑफ. >>थोडेफार अंगप्रदर्शन अस आहे की ह्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या / मत असणार आहे. मी दिलेले उदाहरण स्लीव्हलेस कपडा, लिपस्टीक मला वाटते आजच्या जगात तरी ह्या दोन गोष्टीवरून कोणी बायकांना हिणवणार नाही. पण एकेकाळी तसे झाले आहे. आज जी तुम्हाला फारच भडक वेशभूषा वाटेल, एक दोन पिढ्यांनी सहज स्वीकारली असेल. आपण ("संस्कृतीरक्षक" बनायची) एवढी आगपाखड करायची काय गरज आहे. सिनेमा, टीव्ही ते काम चोख करतोय हळूहळू तरुणांचे कपडे असेच असायचे हे लवकरच सर्वमान्य होइलच. >>शुद्धलेखन अहो मला देखील आवडले असते व्याकरण नियम पाळायला पण कित्येक वर्षांनी मराठी लिहीत आहे. त्यामुळे जरा टंकलेखनाच्या चुका पण जोडल्या जातात. जाणूनबुजून चूका करत नाही पण मतिर्ताथ सोडून शुद्धलेखनावर घसरू नका हो. हा आता, तुमच्या विकत घेतलेल्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात अश्या चूका होणे गंभीर पण मुक्त व मुफ्त आंतरजालावर काटेकोर अपेक्षा जरा बंधनकारक वाटते. मग वर म्हणल्याप्रमाणे, बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच! अश्या चुका तुम्ही जरूर मला खरड, व्य. नि. ने कळवा मी त्याचा नक्की पुढच्या लेखनात उपयोग करीन. तुम्ही समजवून दिलेत तर एकदा केलेली चूक शक्यतो परत करणार नाही. तरीही न जमल्यास मात्र क्षमस्व. असो शुद्धलेखनाच्या बाबतीत माझ्या सुचना मजेशीर असतात कि नाही ;-)

तो 03/10/2007 - 11:42
लेख बहकलेला वाटला. वेगळ्याच गल्लीत सुरू होऊन भलत्याच चौकात संपला. पटलेल्या/न पटलेल्या मुद्यांबद्दल सवडीने.

In reply to by तो

सर्किट 03/10/2007 - 11:45
मला सहजरावांचे विचार आवडले. मांडणी सहज सुधारता येईल. पण विचार सुधारणे कठीण. म्हणून त्याच्याशी सहमत असूनही, त्याने अशा क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊ नये, असे वाटते. - सर्किट

तो 03/10/2007 - 13:06
प्रतिसाद आगाऊ, चिकित्सक स्वरूपाचा वाटल्यास नाईलाज आहे. लेखाचा प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून अन्वयार्थ लावला आहे असे त्याला वाटते. लेखात निष्कर्षाप्रत येण्यापुरता विदा नाहे असे त्याला वाटते. >स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. मानवी मनाच्या भावनांची निश्चित क्रमवारी असावी. जसे हताशेत भिती वाटत नाही/ हसू येत नाही. त्यामुळे हसणे/भिती क्षुल्लक गोष्टी व हताशा मुलभूत भावना मानणे अवास्तव आहे. पुन्हा मुद्दा मांसाच्या गोळ्याच्या बाजूने तर नाही वळला? >थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? असे कायदे परदेशातही असावेत. सार्वजनिक ठिकाणे काय कपडे घालावेत हा अपराध असू शकतो. खाजगीत तुम्ही काय करता यात सरकार/समाज लुडबूड करते असे वाटत नाही. >सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. वयोमानानुसार समाधानाच्या व्याख्या बदलत असाव्यात. हे नैसर्गिक असावे. >अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. इथे कुठली 'विशिष्ट निवड' अपेक्षित आहे? किरकोळ निरीक्षणे: >...मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. किंवा तसे वय. कारण पुढे आहेच.. >...हे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. >अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. कधी म्हणाला? इथे संदर्भ वाटला नाही. भरीचे वाक्य असावे. >ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. मुद्दा नाही समजला. नक्की कसा? >स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. इथून पूर्ण नवा लेख सुरू होतो असे त्याचे मत आहे. >शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? वाक्य समजण्यास असमर्थ. बरेच संदर्भ या लेखाबाहेरचे दिसतात. हलके घ्या: >माझ्या 'पहाण्यात' कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. अरेरे.. तुम्ही तुलनेने 'सालस' असाल ;)

यनावाला 03/10/2007 - 14:38
१/श्री. सहज यांच्या या लेखाच्या प्रारंभी 'भज गोवन्दम' मधील जे कडवे आहे ते मी एका प्रतिक्रियेत उद्धृत केले आहे. त्यात काही चुका आहेत. एक संस्कृत रूपही चुकले आहे.पण जो सर्वसाधारण अर्थ दिला आहे तो मूळ कडव्याच्या अर्थाशी प्रामाणिक आहे हे नि:संशय. * २/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. * ३/देहासक्ती ही स्वाभाविक आहे याची आद्यशंकरांना जाणीव होतीच. म्हणून तर त्यांनी " या मोहात पडू नकोस असा उपदेश केला. काम,क्रोधादि विकार नैसर्गिकच अहेत.पण मोक्ष हवा असेल तर त्या विकारांवर संयमाने विजय मिळवायला हवा.त्यासाठी देहासक्ती जायला हवी.मणून "देह म्हणजे रक्त.मांस, चरबी इ.चा पुंज,श्लेष्मा,मल,मूत्र,रोगजंतू यांचे कोठार अशी वर्णने आहेत. तारुण्यात सुंदर दिसणार्‍या देहाचे अपरिहार्य वृद्धत्वात काय होते याचे वर्णन ज्ञानेश्वरीतही आहे. (अ.१३,ओव्या ५५० ते ५८०). * ४/(चौर्‍याऐशी लक्ष योनी, पुनर्जन्म, मोक्ष इ. वर माझा तिळमात्र विश्वास नाही. सद्ध्या रिचर्ड डॉकिन्स (डीएडब्लुकेआय एनएस ) ज्याचा नित्य उदघोष करीत आहे त्या डार्विन उत्क्रांतिवादालाच मी विश्वासार्ह मानतो.) * ५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. .........यनावाला.

In reply to by यनावाला

सहज 03/10/2007 - 15:36
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. "मूढमते किंवा मुमुक्षु साठीच आद्यशंकराचार्यांनी हे रचले" असे नंतर कोणी तरी घुसडले असण्याची / त्यांच्या नावावर खपवण्याची शक्यता आहे का? कारण १५०० वर्षे झाली तरी हे सामान्यांच्या पचनी पडले आहे असे तुम्हाला वाटते ? मी "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे"असे म्हणालो याचे कारण तेच लोक आद्यशंकराचार्यांचे म्हणणे गंभीरतेने घेईल. वेड्यात काढणार नाही अश्या प्रकारच्या व्यक्तिला ते उद्देशून असेल असे मला अजूनही वाटते. ३/ वैषयीक सुखापायी व्यसन, अतिरेक, दुराचार करू नये समजते. संयमाने विजय मिळवायला हवा म्हणजे नक्की काय ? का हि पण सारवासारव/ शाब्दीक बुडबुडे आहे. पण तूला मोक्ष मिळेल मिठाइ खाऊ नको. नैर्सगीक भावना दाबून टाक. अपरिहार्य वृद्धत्व आहे म्हणून तारूण्यात मोह करू नको, हे लॉजीक कधीच मान्य होइल असे वाटत नाही. मानववंश पूढे कसा वाढणार, का तेवढे पुढारलेले विज्ञान होते, आहे? महात्मा गांधीना जसा स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काँग्रेस पक्ष विलीन करावयास हवा होता असे म्हणतात तसे हे मोक्षवादी पार्टीच्या नेत्यांना मानव जात विसर्जीत करायची होती का काय? असो तुम्ही मोक्ष इ. वर तिळमात्र विश्वास नाही म्हणता त्यामूळे जाऊ दे...

In reply to by यनावाला

विकास 03/10/2007 - 18:50
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे. अवांतरः रात्रभर जागून सकाळच्या वेळेस " मॉर्निंग वॉ़क" घेणार्‍या गदीमांना म्युनिसिपॅलीटीचे दिवे सकाळ झाली म्हणून मालवले जात असलेले दिसले आणि "मायाबाजार" या सिनेमातील "विझले रत्नदिप.. आता उठा यदुुनाथ" असे कृष्णावरचे गाणे सुचले. तसाच काहीसा प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत घडला. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by यनावाला

चित्रा 04/10/2007 - 00:25
हे काय होते आहे, की इथल्या काहींना (माझ्यासारख्या संस्कॄत अजिबात येत नाही). सहज यांच्या या कवितेप्रमाणे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लिहीताना कसलाच संदर्भ नसतो आणि रूपांतर किंवा कोणी तरी समजावून सांगेल यावर अवलंबून रहावे लागते. यामुळे संस्कॄत परत एकदा शिकण्याचा विचार करते आहे. पण ते असो. आत्तासाठी म्हणून भज गोविंदमवर बोलण्याआधी ते काय आहे ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषांतरे शोधली. ती मिळाली खालील्प्रमाणे- (तेथील काही कडवी मुद्दाम भाषांतर केलेलीच देत आहे - ज्यांना अधिक वाचायचे आहे ते त्यांनी दुव्यावर जाऊन वाचावे.) भज गोविंदम शोधताना हे एक रूपांतर सापडले. त्यात म्हटल्याप्रमाणे - He may be absorbed in enjoyment of the senses Or in yoga, he may be engrossed In somebody’s company or he may be alone, But if his heart dwells in the divine, then it is he who is blissful, It is he who is blissful, It is he alone who is blissful. पुढे म्हटले आहे - Oh God, protect me from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take me to the other shore. जर शंकराचार्य इतरांना म्हणत असले तर मधूनच "मी " कुठून आले? शंकराचार्यांनी स्वतःसाठीच ही कविता कशावरून रचली नसेल (मनाच्या श्लोकांप्रमाणे) ? "मूढमते" ते स्वतःलाच कशावरून म्हणत नसतील? आपण नंतर ते "श्लोक" करून टाकले - कशावरून त्यांनी ते "लोकांसाठी" रचले होते? अजून पुढे - Dropping sex, anger, greed and attachment, Meditate upon yourself: Who am I? Because fools without self-realization Suffer the anguish of deep hell here. अजूनही काही भाषांतरे मिळाली. भज गोविंदमचे इंग्लिशमध्ये रूपांतर अजून एक

In reply to by चित्रा

धनंजय 04/10/2007 - 01:08
ओशो-भक्ताने तुम्हाला सापडलेल्या दुव्यावर लिहिलेले भाषांतर छान आहे, आध्यात्मिक दृष्टीने विचार करण्यालायक आहे, पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही. म्हणून 'मधूनच "मी " कुठून आले?' असा अभ्यास त्या भाषांतरावरून करता येत नाही. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननीजठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥ पाहि म्हणजे "वाचव" (मला वाचव असे नाही - कोणाला वाचव हे सांगितलेले नाही). पण "मला वाचव" हा अर्थ आजकालच्या भक्ताच्या अध्यात्मासाठी ठीक आहे, एक स्वतंत्र कृती म्हणून तसा विचार करायला काहीच हरकत नाही. पण शंकराच्या मूळ रचनेचे शब्दविश्लेषण म्हणून वापरू नये. मूढमते, भज, वगैरे मध्ये "त्वम्"="तू" अध्याहृत आहे. असे शब्द जवळजवळ प्रत्येक कडव्यात आहेत. पण "का ते कान्ता कस्ते पुत्रः" (कोण तुझी प्रियस्त्री, कोण तुझा पुत्र...) मध्ये ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. असो. पण तुमचा अभ्यास चालू दे! परत सांगायचे : या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 01:29
>>>एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एक तर हा अध्यात्मीक विचार म्हणून ज्याला घेयचा असेल त्याला घेऊदेत अथवा मी आधी वर त्यांची पूर्वपिठीका सांगितली त्या संदर्भातील काव्य समजून घेऊ देत. शंकराचार्यांचा काही सामाजीक/राजकीय प्रभाव भारतवर्षावर पड्ल्याचे ऐकीवात नाही. आध्यात्मिक काही अंशी असेल. त्यांनी काय अथवा इतर कुठल्याही भारतीय/हिंदू संतमहंताने कुणावर दमदाटी केली नाही की काही कर आणि माझेच ऐक. आपल्याकडे अद्वैतवादी शंकराचार्य चालले, द्वैताचा उपयोग करून अद्वैतच जपणारे ज्ञानेश्वर चालले, भारूडातून समाजजागृती करणारे एकनाथ चालले, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकाराम चालले आणि एकीकडे बुद्धी दे रघूनायका म्हणत दुसरीकडे मुर्खाची लक्षणे सांगणारे रामदासपण चालले. पण या सर्व (इतिहासाचार्य राजवाड्यांच्या भाषेत) संताळ्याने काम सोडून हरीहरी करत बसा असे सांगीतल्याचे ऐकीवात नाही की कधी स्वत:चे विचार इतरांवर लादल्याचे एकलेले नाही. म्हणून मुद्दा एव्ह्ढाच, की आपल्या कडे जी काही संशोधनाला ओहटि लागली त्याचे कारण म्हणून केवळ शंकराचार्यांना झोडपणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

धनंजय 04/10/2007 - 01:46
एकट्या शंकराचार्यांना कोण झोडपतो आहे हो. अशा प्रकारचे विचार अनेकांनी सांगितले. पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. "जग मिथ्या आहे, आणि ऐहिक बाबतीत काहीच अर्थ नाही" असे सांगणार्‍यांपैकी त्यांचे भाषामाधुर्य, भाषाप्रभुत्व आणि तर्कमंडन सर्वोत्तम आहे, म्हणून त्या दुसर्‍या चर्चेत हे उदाहरण घेतले. आता त्यांनी दमदाटी केली की नाही याबाबत कथा आता काहीशा दंतकथाच आहेत. मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. (हा भाग शिवलीलामृतात आहे का - नीट आठवत नाही.) माझ्या मते बहुतेक आचार्यांनी खुद्द दमदाटी केली नसावी. पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 02:50
>>>इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते. सहजरावांच्या चर्चेचे मूळ हे शंकराचार्यांवर आधी चालू केलेल्या चर्चेत असल्याने त्याचा संदर्भ मी दिला. म्हणून वरील संदर्भ देत पुढे शंकराचार्य सामान्यांना उद्देशून म्हणले नसावे या अर्थी म्हणाले, म्हणून सुरवात ही एकंदरीत आपल्या संपूर्ण लेखासंदर्भातील वाटली... >>>पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. तेच आमचे म्हणणे आहे. त्यांनी गोड गीतात सांगीतले. नव्हे त्यांनी नुसते काव्य रचले. त्याचे गीत एम एस सुब्बालक्ष्मीमुळे झाले आणि आमच्या सारख्यांना ते भावले. तीच कथा ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाच्या आणि इतरांच्या अभंगांची . त्या संदर्भात इतकेच म्हणणे आधी आंणि आत्त्ताही आहे, की त्यांनी जे काही केले ते पारमार्थीक होते राजकीय अथवा सामाजीक ढवळाढवळ नव्हती. उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही किंवा (तुकोबाच्या बाबतीत) शिवाजीने अफझलखानास कसे मारावे हे ते सांगत बसले नाहीत... >>>मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. दंतकथा असेल नसेल पण, "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. कारण मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता. त्यात दमदाटीचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्यास अर्थातच माहीत असेल पण इतरांसाठी थोडक्यातः मंडनमिश्रांचे गुरू कुमरील भट्टांकडे अद्वैत आणि पूर्वमिमांसा या दोन विचारधारांवरून "डिबेट" करायला तत्कालीन हिंदू प्रथेप्रमाणे शंकराचार्य गेले होते. तेंव्हा कुमरील भट्टांनी मंडनमिश्र त्यांच्याशी वादविवाद करेल असे सांगीतले. त्याची (मंडनमिश्राची) पत्नी ही "रेफरी" झाली. अनेक दिवस झालेल्या चर्चेत शंकराचार्य जिंकले. पण त्यांचा विजय तीने निर्विवाद ठरवला नाही कारण ते ब्रम्हचारी असल्याने त्यांना "कामसुत्राचे" ज्ञान नाही. तेंव्हा पुढची दंतकथा अशी आहे त्यांनी एका मेलेल्या राजामधे कायाप्रवेश करून याविषयाचे ज्ञान करून घेतले. मग परत दोघांचा वाद झाला आणि त्यात मंडनमिश्राने हार मान्य केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. असो. या गोष्टिवरूनपण लक्षात काय येते की त्यांचे पारामार्थीक ज्ञान आणि ज्याला प्रबंध - थिसीस म्हणता येईल त्या वेदांताचा आणि शंकराचार्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आंधळेपणाने कोणी तेंव्हा मान्य केले नव्हते. त्यांना त्याचे सध्याच्या भाषेत "प्रेझेंट" करून वैचारीक वादविवादात यशस्वी करून दाखवावे लागले. त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. >>>पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. त्या साधूंचे कोणी समर्थन करत नाही की भलतासलता मान देत नाही. बर "त्यांचे साधू" असे म्हणताना त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे करताना पाहीले तरी नाही आहे. नाहीतर प्रसिद्धीमाध्यमे काही निवांत बसली नसती....

In reply to by विकास

धनंजय 04/10/2007 - 03:52
ते कधीतरी वाचायचे आहे, पण जरा बॅकबर्नरला टाकले आहे. त्यामुळे लगेच व्यासंगपूर्ण उत्तरे देता येणार नाहीत. > त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. हे बरोबर आहे. > त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे गैरसमजाबद्दल दिलगीर. इथे त्यांच्या पीठाधीशांचा उल्लेख करायचा नव्हता, दहा आखाड्यांतल्या साधूंचा करायचा होता. > "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. या दंतकथेच्या अनेक आवृत्ती आहेत. पैकी एकात मंडनमिश्र सरस्वतीला दारूच्या घड्यात बुडवून तिच्याकडून वेद वदवून घेत पडद्यापाठीमागून शंकराचार्यांशी वाद घालत होता, शंकराचार्यांनी सरस्वतीला पराभूत करून पडदा दूर करून दारुड्या मंडनमिश्राची कानउघडणी केली, अशीही दंतकथा आहे. ही दंतकथा मला मान्य नाही हे वर सांगितलेच आहे, पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. > उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही... इथे तर खरेच शांकरभाष्य वाचावे लागेल मला. पण थोडेफार उल्लेख देतो. त्याविषयी तपशील मात्र कोणी जाणकाराने द्यावेत. ब्रह्मसूत्रांवरील भाष्यात, सांख्य "जड प्रकृती आहेत" म्हणतात, त्याचे उत्तर तशी नाही असे देताना, वैशेषिकांना त्यांचे अणू खरे नाहीत वगैरे सांगताना, शंकराचार्यांना वैज्ञानिक बाबतींबद्दलच बोलायचे होते असे दिसून येते. प्रलयाच्या काळी अणू अमुकतमुक प्रकारे हलू शकणार नाहीत असाही त्या ठिकाणी शंकराचार्यांचा वाद आहे. हे थोडेफार "पृथ्वी गोल आहे की नाही"च्या दिशेने जाते. खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. > तुकोबा तुकोबा हे अद्वैतवादी किंवा संन्यासवादी किंवा इहलोक-असत्य-वादी होते हे मान्य नाही. तुकोबांना सामाजिक स्थितीविषयी मते नव्हती हेही पटत नाही. परत याचे उत्तर कोणी वारकरी पंथातला अभ्यासक माझ्यापेक्षा चांगले देईल.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 04:34
>>>तुम्ही तर मला शांकरभाष्यच वाचायला लावणार! ते कधीतरी वाचायचे आहे, मला आपल्या व्यासंगावर विश्वास आहे, त्यामुळे (वाचून झाल्यावर,) आपले समतोल विचार वाचायला नक्कीच आवडतील. >>>पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. हे मान्य आहे आणि त्यात काही नाविन्य नाही. आपल्यास अमेरिकेतील "ऍकेडेमीक रायव्हलरी" कशी असते ते माहीत असेलच. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कुठेही तसाच राहणार! असे म्हणताना मी काही अशा वागण्याचे समर्थन करत नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. त्यात शंकराचार्यांनी एकीकडे बुद्धाच्या विचारांना अप्रत्यक्ष आव्हान देत एका अर्थी अद्वैतरूपात त्याच पद्धतीचे विचार आणले (कदाचीत फरक असेल तर तो निर्वाणावस्थेत कारण बुद्धाला पुनर्जन्म मान्य नव्हता तर शंकराचार्यांच्या "पुनरपी जननम.." ओळी आपणच वर उल्लेखल्या आहेत. परीणामी त्यांना होणारा विरोध हा प्रस्थापितांचा होता. या संदर्भात मला विवेकानंदांचे शब्द आठवतातः त्यांनी म्हणले होते की कुठल्याही नव्या विचाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते: "sheer indifference, severe opposition and then broad acceptance". जे विचार ह्या तीन तप्पे पार करून राहतात ते दूरगामी राहू शकतात. >>आता जरा खुलासा: खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. हे म्हणायचे माझे कारण होते, की ज्या प्रकारे चर्चने पृथ्वी सपाट आहे ह्या त्यांच्या अंधश्रद्धेचा भडीमार करून २० व्या शतकापर्यंत गॅलीलीओला त्याच्या (पृथ्वी गोल आहे हे म्हणण्याच्या) पापातून मुक्त झाल्याचे मान्य केले नाही तसे काही शंकराचार्यांचे धर्मपिठ वागल्याचे ऐकीवात नाही. अगदी ज्ञानेश्वर भावंडांच्या मुंजीच्या वादात पण शंकराचार्य कधी पडल्याचे ऐकले तरी नाही...जे काही झाले ते पैठणच्या कर्मठांपुरतेच मर्यादीत राहीले. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण आधी म्हणल्याप्रमाणे "नारीस्तनभर..." या मूळ विषयापासून (विषय - हा शब्द कुठल्याही अर्थाने!) दूर जाईल म्हणून येथेच माझा खुलासा थांबवतो!

In reply to by धनंजय

चित्रा 04/10/2007 - 05:44
तुमच्याशी वाद घालायचा नाही, ही चर्चा मूळ मुद्द्यावरून बरीच भरकटते आहे - पण तरी - पाहि म्हणजे "वाचव" भाषांतरात "वाचव" याअर्थी "protect" हा शब्द आला आहे. तुमचे म्हणणे वरील भाषांतर पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही मान्य केले तरी - जर वरच्या भाषांतरातले me काढून टाकले तरी "मला" वाचव असाच अर्थ निघतो. Oh God, protect -- from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take -- to the other shore. शंकराचार्य मधेच "दुसर्‍याला वाचव" ("माफ कर" - येशूप्रमाणे) म्हणत नसावेत! ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एवढ्यावर आपण सहमत आहोत हे पण खूप आहे. मी काही कसली तज्ञ वगैरे नाही, तुटपुंज्या ज्ञानावर उगाच काहीतरी लिहीण्यात अर्थ नाही हे मलाही माहिती आहे. पण तसे कोणाचे ज्ञान इथे पूर्ण आहे? ! माझे मत या सर्वावर एवढेच आहे की गांधीजींच्या विचारांवर न समजून घेता जशी टीका होते, तसाच काहीसा प्रकार शंकराचार्य वगैरेंवरून होत असावा. असेच गीतेचे. एक पुल देशपांडे तुझे आहे.. मध्ये म्हणाले म्हणून कोणी गीता वाचलीच नाही, गीताईसुद्धा नाही. या मोठ्या अधिकारी लोकांचे आपण काही वाचलेले नसते, कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा हे करण्यापेक्षा जे काही भाषांतर आहे ते वाचल्यास निदान भावार्थ तरी कळेल यामुळे ते भाषांतर इथे दिले होते. त्याच्यातले पाठभेद/श्लेष मला कळत नाहीत, पण जसा जमेल तसा अभ्यास तर चालू ठेवायलाच पाहिजे नाही का? तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.

In reply to by चित्रा

धनंजय 04/10/2007 - 12:58
तुमची वृत्ती खरोखर अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्ही ते इंग्रजी भाषांतर सोडून शक्यतोवर एखादे चांगले मराठी भाषांतर (म्हणजे शब्द-शब्द समजावून सांगणारे वगैरे) वापरावे असे वाटते. इंग्रजीच्या काही व्याकरणविषयक लकबी संस्कृताला लागू नाहीत. तुम्ही ज्या खोल रीतीने अभ्यास करत आहात त्या दृष्टीने पाहता त्या दुव्यावरील भावार्थ/भाषांतर खूपच मोघम आहे. त्यात मुळातल्यापेक्षा इतके फरक आहेत, की भाषांतरकर्त्याची स्वतंत्र प्रतिभा त्याच्यात उतरली आहे, असे म्हणता येईल. > हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. शंकरांनी रचलेली अनेक स्तोत्रे महाजालावरती उपलब्ध आहेत. आपल्या इथल्या "तो." सारखे शंकराचार्य स्वतःचा "तू"म्हणून उल्लेख एक वैयक्तिक लकब म्हणून करतात का - हे अभ्यास करण्यासारखे आहे. शिवाय त्यांच्या शिष्यपरंपरेत सांगितलेल्या या स्तोत्राविषयीच्या कथेच्या संदर्भाचाही जरूर विचार करावा. > तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? > मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन. फार उत्तम विचार. या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, की शंकरांनी खूप काही वैचारिक लिहिलेले आहे, ते अजून उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या पाठभेदामुळे त्यांचे विचार चुकीचे कळले असे व्हायची शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांचे अन्य वैचारिक साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यावरून ताळा करून घेता येईल. तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभकामना आहेत. हल्ली आपल्या संस्कृतीतल्या अन्य ग्रंथांकडे माझे अधिक लक्ष वेधले गेले असल्यामुळे शंकरांचे ग्रंथ मी लगेच अभ्यासायला घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जसे अभ्यासातून कळत जाईल, तसे तसे ते तुमच्याकडून वाचायची उत्सुकता आहे.

लिखाळ 03/10/2007 - 23:31
नमस्कार, अश्या विषयांवर खुलेपणाने लेखन आणि चर्चा मराठी संकेतस्थळांवर या पूर्वी झाली नसावी आणि त्यामुळे वैचारिक लेखन आणि वाचन करणारे सदस्य खूष झाले असावेत असा कयास आहे. अश्या (तथाकथित) 'ना़जूक' विषयावर आपण लेखन केलेत हे अभिनंदनीयच. (मागे मनोगतावर कमी कपडे आणि बळजबरी यावर चर्चा झाली होती.) यनावाला म्हणतात त्याप्रमाणे, >>५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. लेख थोडा विस्कळित वाटला. पण विचार चांगलेच आहेत. इस्लामी राजवटीमध्ये स्त्रीयांच्या कपड्यांवर बंधने आली आहेत का? म्हणजे त्यांनी लादलेले नियम म्हणून अथवा त्यांनी पळवून नेवू नये म्हणून. यावर कोणी तज्ञाने खुलासा करावा ही विनंती. संतांनी आणि विद्वानांनी कोणी कसे वागावे यावर केलेली भाष्ये अनेक ठिकाणी दिसतात. सामान्य माणसाने समाजात कसे वागावे आणि रोजचा व्यवहार करीत असताना परमार्थात प्रगती होण्यासाठी काय करावे याबद्दल अनेक गोष्टी दिसतात. खरेतर भारतात सामान्य माणसाने व्यवहारात (संसारात) राहून परमार्थाकडे नजर ठेवून वागावे अशीच संतांची शिकवण दिसते. त्या पुढे जावून जे मुमुक्षु आहेत, ज्यांच्या मनात परमार्थप्राप्तिची ओढ निर्माण झाली आहे त्यांनी कसे वागावे हे सुद्धा दिसते. पुढे सिद्धावस्थेतल्या माणसाचे वागणे कसे असते त्यावर सुद्धा भाष्य दिसते. असे असता आपण जे वाचतो आहोत ते त्या संताने नक्की कोणाला सांगितले आहे ते आपल्याला लागू आहे का? याची शहानिशा करणे आगत्याचे ठरते. अवांतर : 'सूचना' खास आहे :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु 04/10/2007 - 00:59
पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल. हे मात्र लाख बोललात. अगदी खरं आहे हे. लेख छान आहे. विचार करायला लावणारा आहे. - प्राजु.

शिल्पा ब 26/05/2010 - 09:12
लेख आणि चर्चा दोन्ही वाचण्याजोग्या आहेत...मधेच एकदम संस्कृतचे आणि शंकराचार्यांबद्दल शिक्षण झाले :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

लपले त्यावरी टपले सारे, ओळखीचे चोर गं! कुठल्या लावणी कि काव्य आहे ते आठवत नाही.सविस्तर प्रतिक्रिया नंतर. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन 26/05/2010 - 08:00
जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार?
खल्लास लेखण !!! जबरदस्त सहजराव :) !! - (५० मार्काचा संस्कृत पेपर दिलेला) टारझन

सहजराव ! तुम्ही विषय मस्त मांडलाय, पण आम्हालाही घाटपांडे साहेबांप्रमाणे जरासा वेळ हवाय ! कारण जराशा नाजूक विषयावर लिहायचे असल्यामुळे जरा घाई करत नाही ! बाकी तुमची डेअरींग सभ्य संस्कृतीत बसेल का ? याच विचारात आम्ही सध्या तरी व्यस्त आहोत ! अवांतर ;) बाकी शंकाराचार्यांचे श्लोक अष्टके यांचा संदर्भासाठी योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे ! तुमच्या अभिरुचीची आणि पाहण्याच्या दृष्टीकोणाची दाद दिली पाहिजे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 02/10/2007 - 20:46
लेख फारच आवडला सहजराव! >>>बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे अगदी योग्य आहे. म्हणून बंधन नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी सुखकर होऊ शकतात. विकास

In reply to by विकास

जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. विकास यांचे हे वाक्य अगदी पटलेच. सहज, लेख आणि नाजूक विषयाची मांडणी आवडली. स्वाती

In reply to by विकास

गुंडोपंत 27/05/2010 - 12:08
मस्त लेख आहेच! विषयही रोजचा - पण उघडपणे टाळला जाणारा. :) बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे तर खरेच! असे अजून आणि सातत्याने यायला हवे असे वाटले. आपला गुंडोपंत

'मैत्र' ही किरण यज्ञोपवित यांची एकांकिका ही मिळून सार्‍या जणी च्या वर्धापन दिनाला एकदा पाहिली होत. त्यात हे अंतर्मनातले संवाद सैतानाचे विचार म्हणून प्रतिबिंबित असे दाखवले होते. मनातील द्वंद्व फारच सुंदर दाखवले आहे. सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली 02/10/2007 - 21:16
>> सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. सहमत आहे. लेख चांगला जमला आहे. अवांतर: अशुद्धलेखनाबद्दल सहजराव जाहीर लिहितात म्हणून जाहीरच सांगते. इतरांनी अशुद्धलेखन काढून दाखवले की त्रास होतो तितकाच त्रास अशुद्धलेखन वाचताना होतो. हे सांगताना मीही शुद्धलेखनाची पंडिता नाही, माझ्याही अगणित चुका होतात तरीही शुद्धलेखन तपासून जितके शक्य आहे तितक्या सुधारणा करा असेच सांगेन. फायदा तुमचाच आहे.

चित्रा 02/10/2007 - 21:23
आजचा लेख खरोखरच उत्तम (नुसताच बरा नाही)! काही काही गोष्टी तर अगदी मनातल्या बोलताय असे वाटले. पटकन विचार आले ते लिहीते आहे. (प्रतिसादांना फाटे फुटायला लागले की अजून लिहीन!). पण लेख ज्या मोकळेपणे लिहीला आहे आणि जसा मांडला आहे ते विशेष करून आवडले. उदा: >>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? >>माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. >>खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. >>जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड. अगदी खरे. >>जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? मुलामुलींनी मोकळेपणे वागणे आणि छचोरपणा/सैल वागणे या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याचा तोल सांभाळता आला तर उत्तम, पण प्रत्येकालाच ते जमत नाही. जास्त चिकित्सा करीत नाही , तुम्हीच म्हणालात म्हणून :-). >>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? सामान्य माणसांच्या मर्यादा पडतात. लहान कपडे म्हणजे किती लहान हे सीमारेषेवरचे ठरतील हे कोण सांगणार? त्यापेक्षा अंग झाकून टाकलेले बरे अशा विचारातून हे सर्व आले असावे. अर्थात काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावयाचे स्वातंत्र्य त्याला / तिला हवे - समाजाला काय वाटेल असे विचार करण्याची गरज भासू नये.

`आमच्या शाळेतल्या वाड्यावस्त्यांवरच्या थोराड मुलांना तमाशाचे फार आकर्षण . गावात तमाशे कायम. आमच्या देव गुरुजींना ते आवडायचे नाही. ते म्हणायचे " अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना या बायांची थोबाड बघा. ओकायला येईल. गोरे गोमटे रंग लावलेले असतात तोंडाला. चालले लगे तमाशाला' आकर्षणा बद्दल ते म्हणायचे 'वान्याच्या पोराला भजी खावीशी वाटतात, हॉटेल वाल्याच्या पोराला गुळ खोबरं खावस वाटतं.' पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. सुख सुख म्हणताहे दु:ख ठाकोनी आले , भजन सकळ गेले चित्त दु:श्चित्त झाले (असमर्थ) प्रकाश घाटपांडे

कोलबेर 02/10/2007 - 21:25
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा, बील ओ रायली म्हणाला "हॉल्टर टॉप घालून रात्री न्यू यॉर्क मधून फिरले तर असेच होणार" साधारण दोनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका मुलीवर पोलिसाने बलत्कार केला तर प्रमोद नवलकर म्हणाले होते की "आमच्या काळातील मुली नाही हो अश्या चौपाटीवर फिरायला जायच्या!" प्रमोद नवलकर आणि बिल ओ रायली दोघांनीही आपला हा लेख वाचावा! अवांतर: ' सुचना' मात्र जाम आवडली!

विकास 02/10/2007 - 21:39
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? त्यावरून दोस्ताना सिनेमातील अमिताभचा एक डायलॉग आठवला: बिकीनीत समुद्रावर चालणार्‍या झीनतच्या मागे एक दारूडा शिट्या वाजवत मागे लागतो. ती त्याला (इश्टाईल मधे) पकडून पोलीसचौकीत घेऊन येते आणि इन्स्पेक्टर अमिताभ कडे तक्रार करते. तीच्या कडे पाहात अमिताभ म्हणतो, " इस तरह के कपडे पेहेन्कर अगर आप रस्ते पे घुमने जायेंगी तो लोग सिटीयॉ नही बजायेंगे तो क्या मंदीर की घंटीया बजायेंगे ?" (माझ्या हिंदीबद्दल मराठी प्रमाणेच माफी!) या त्याच्या एका कॉमेंटनंतर झीनत त्या सीनेमात अंगभर वेषातच दाखवली आहे...

धनंजय 02/10/2007 - 22:01
नीट विचार करून उत्तर लिहितो. पण हा विषय प्रौढ सभ्य समाजात शंभर टक्के चालण्यासारखा असावा असे माझे मत आहे. सुसंस्कृत समाजात हे डेअरिंगबाज मुळीच वाटू नये, सामान्य वाटावे. हा विषय चर्चेला काढल्याबद्दल धन्यवाद.

स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्‍याचदा असूयेने) निकाल देत असतो. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्‍या व्हाव्या असे वाटते. पण बर्‍याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्‍याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला तुझ्या उसाला लागलं कोल्हा (कोल्हा) प्रकाश घाटपांडे

राजे 02/10/2007 - 22:54
लेख ही व विषय ही.. काही गोष्टींची मर्यादा व बंधन हे समाजामध्ये वावरताना स्वतः घालून घेणे कधी ही उत्तम, दुसरा कोणी सांगू लागला की ते प्रवचन वाटू लागते, तेव्हा मर्यादा व बंधन जरुरी. " पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. " सहमत. मागे एकदा मनोगत वर अथवा कोठे तरी महाजालावर मी लिहले होते की, सामान्य मानवाने स्त्री ह्या विषयाकडे त्याच वेळी वळावे जेव्हा तुमची, १. तीची इच्छा जाणून घेण्याची कुवत असेल. २. तीची योग्य मागणी पुर्ण करण्याची ताकत असले. ३. ती जेव्हा म्हणेल तेव्हा वेळ देण्याची तयारी असेल. ४. विषयवस्तू कडे पाहण्याची कलात्मक नजर असेल. ५. व तीच्या बद्दल अथवा स्वतः बद्दल अपराधीक बोध नसेल. व सर्वात महत्वाचे खिस्सा तपासून पाहा व मगच तिच्याकडे वळा. काय म्हणता ? बरोबर आहे ना ? राजे (*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर 02/10/2007 - 23:02
सहजराव, अतिशय उत्तम लेख! शिवाय हा लेख आणि याला सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या प्रतिसादावरून मिसळपाव हे एक सशक्त, सुदृढ आणि निरोगी असे संकेतस्थळ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नसून मी मनोमन सुखावलो आहे! सहजराव, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेख यापुढेही यावेत असे वाटते. मिसळपावचे सदस्य ते सहज झेलतील, पचवतील, आणि त्यावर तेवढ्याच तोलामोलाने आपले विचारही मांडतील अशी खात्री वाटते! बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. च्यामारी कसली आल्ये विरक्ती? हे सगळे साले शब्दांचे रचलेले पोकळ मनोरे आहेत. मला सांगा, शंकराचार्य दोन वेळा काहीतरी खातच असतील ना? त्यांनाही भूक लागतच असेल ना? जे काही खात असतील त्याची त्यांना चव तर लागतच असेल ना? मग झालं तर! उगाच कशाला वासना शमवण्याच्या वगैरे गप्पा मारायच्या? ते ब्रह्मचारी होते. अहो परंतु कुठलाही प्राणिमात्र म्हटला की लैंगिक भूक ही नैसर्गिकच गोष्ट आहे. शंकराचार्यांनी भले लग्नकार्य केलं नसेल, बाईपासून ते चार हात दूर असतील. तरीही निसर्ग कुणालाच चुकला नाही. शंकराचार्यांनादेखील स्वप्नदोषाचा विकार होऊन झोपेतल्या झोपेत त्यांचाही निचरा होत असेल/असलाच पाहिजे! मग मारे दिवसभर, ' स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.' या गफ्फा मारायला शंकाराचार्य मोकळे तिच्यायला! :)) असो.. आपला, आदितात्याचार्य!

विसोबा खेचर 02/10/2007 - 23:42
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. हे बाकी सहीच! :) तात्या. -- मिसळपाववर शुद्धलेखनाबद्दलची फाजील चर्चा, मजकूरापेक्षा त्यातील शुद्धलेखनाला असलेले अवास्तव महत्व, भाषेचे-शुद्धलेखनाचे वगैरे जीवघेणे नियम, या गोष्टींना कमितकमी महत्व असेल. मिसळपाव ही सामान्य जनांची उठबस करण्याची टपरी आहे. येणार्‍याने इथं यावं, काय एखाददोन प्लेट खायची ती मिसळ खावी, वर थंडगार ताक प्यावं आणि म्होरच्या वाटंला लागावं! कसं? :)

प्रमोद देव 03/10/2007 - 07:42
अतिशय मुद्देसुद लिखाण! सहजराव तुमच्या नावाप्रमाणेच गंभीर विषय देखिल तुम्ही अतिशय सहजतेने मांडलाय. भविष्यातही असेच विचारप्रवण लेखन आपल्याकडून अपेक्षित आहे.

सहज 03/10/2007 - 08:20
सर्वप्रथम मोकळ्या मनाने लेख स्वीकारल्याबद्दल (व प्रतिसाद दिल्याबद्दल, देणार्‍या) सर्वांचे आभार. अजूनही प्रतिसाद बहूतेक येणार असतील. >>हॉल्टर टॉप घालून ....तर असेच होणार अश्या वेशभूषेने कोणाच्या भावना अनावृत्त झाल्या मान्य पण म्हणून स्व:ता ते उपभोगायचा अजीबात हक्क नसताना लगेच दुसर्‍याच्या मनाविरुद्ध बळजबरी करणे हे त्या व्यक्ति व ( व हे स्पष्टिकरण स्वीकारणार्‍या समाजाच्या ) "असंस्कृत"पणाचे निर्दशक आहे. तसेच ते पुर्णता चूकीचे कारण आहे. त्याच न्यायाने एखादा फळविक्री ठेला /हॉटेल मधे घूसून पैसे न देता, मला छान फळ दिसले, वास चांगला आला. कशाला ठेवलेत उघड्यावर ? वास बंद ठेवायचा. तुमचा दागीना/बंगला/गाडी (चांगला आहे. का इथे बांधलात? का रस्त्यावर आणलीत?) चांगला आहे मी घेतला. बजबजपूरी होईल. मधे वाचले होते की आदिवासी जे कपडेपण घालत नाहीत. त्यांच्यामधे बर्‍याच जमातीत रेप इज अनर्हड ऑफ. >>थोडेफार अंगप्रदर्शन अस आहे की ह्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या / मत असणार आहे. मी दिलेले उदाहरण स्लीव्हलेस कपडा, लिपस्टीक मला वाटते आजच्या जगात तरी ह्या दोन गोष्टीवरून कोणी बायकांना हिणवणार नाही. पण एकेकाळी तसे झाले आहे. आज जी तुम्हाला फारच भडक वेशभूषा वाटेल, एक दोन पिढ्यांनी सहज स्वीकारली असेल. आपण ("संस्कृतीरक्षक" बनायची) एवढी आगपाखड करायची काय गरज आहे. सिनेमा, टीव्ही ते काम चोख करतोय हळूहळू तरुणांचे कपडे असेच असायचे हे लवकरच सर्वमान्य होइलच. >>शुद्धलेखन अहो मला देखील आवडले असते व्याकरण नियम पाळायला पण कित्येक वर्षांनी मराठी लिहीत आहे. त्यामुळे जरा टंकलेखनाच्या चुका पण जोडल्या जातात. जाणूनबुजून चूका करत नाही पण मतिर्ताथ सोडून शुद्धलेखनावर घसरू नका हो. हा आता, तुमच्या विकत घेतलेल्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात अश्या चूका होणे गंभीर पण मुक्त व मुफ्त आंतरजालावर काटेकोर अपेक्षा जरा बंधनकारक वाटते. मग वर म्हणल्याप्रमाणे, बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच! अश्या चुका तुम्ही जरूर मला खरड, व्य. नि. ने कळवा मी त्याचा नक्की पुढच्या लेखनात उपयोग करीन. तुम्ही समजवून दिलेत तर एकदा केलेली चूक शक्यतो परत करणार नाही. तरीही न जमल्यास मात्र क्षमस्व. असो शुद्धलेखनाच्या बाबतीत माझ्या सुचना मजेशीर असतात कि नाही ;-)

तो 03/10/2007 - 11:42
लेख बहकलेला वाटला. वेगळ्याच गल्लीत सुरू होऊन भलत्याच चौकात संपला. पटलेल्या/न पटलेल्या मुद्यांबद्दल सवडीने.

In reply to by तो

सर्किट 03/10/2007 - 11:45
मला सहजरावांचे विचार आवडले. मांडणी सहज सुधारता येईल. पण विचार सुधारणे कठीण. म्हणून त्याच्याशी सहमत असूनही, त्याने अशा क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊ नये, असे वाटते. - सर्किट

तो 03/10/2007 - 13:06
प्रतिसाद आगाऊ, चिकित्सक स्वरूपाचा वाटल्यास नाईलाज आहे. लेखाचा प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून अन्वयार्थ लावला आहे असे त्याला वाटते. लेखात निष्कर्षाप्रत येण्यापुरता विदा नाहे असे त्याला वाटते. >स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. मानवी मनाच्या भावनांची निश्चित क्रमवारी असावी. जसे हताशेत भिती वाटत नाही/ हसू येत नाही. त्यामुळे हसणे/भिती क्षुल्लक गोष्टी व हताशा मुलभूत भावना मानणे अवास्तव आहे. पुन्हा मुद्दा मांसाच्या गोळ्याच्या बाजूने तर नाही वळला? >थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? असे कायदे परदेशातही असावेत. सार्वजनिक ठिकाणे काय कपडे घालावेत हा अपराध असू शकतो. खाजगीत तुम्ही काय करता यात सरकार/समाज लुडबूड करते असे वाटत नाही. >सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. वयोमानानुसार समाधानाच्या व्याख्या बदलत असाव्यात. हे नैसर्गिक असावे. >अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. इथे कुठली 'विशिष्ट निवड' अपेक्षित आहे? किरकोळ निरीक्षणे: >...मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. किंवा तसे वय. कारण पुढे आहेच.. >...हे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. >अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. कधी म्हणाला? इथे संदर्भ वाटला नाही. भरीचे वाक्य असावे. >ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. मुद्दा नाही समजला. नक्की कसा? >स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. इथून पूर्ण नवा लेख सुरू होतो असे त्याचे मत आहे. >शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? वाक्य समजण्यास असमर्थ. बरेच संदर्भ या लेखाबाहेरचे दिसतात. हलके घ्या: >माझ्या 'पहाण्यात' कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. अरेरे.. तुम्ही तुलनेने 'सालस' असाल ;)

यनावाला 03/10/2007 - 14:38
१/श्री. सहज यांच्या या लेखाच्या प्रारंभी 'भज गोवन्दम' मधील जे कडवे आहे ते मी एका प्रतिक्रियेत उद्धृत केले आहे. त्यात काही चुका आहेत. एक संस्कृत रूपही चुकले आहे.पण जो सर्वसाधारण अर्थ दिला आहे तो मूळ कडव्याच्या अर्थाशी प्रामाणिक आहे हे नि:संशय. * २/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. * ३/देहासक्ती ही स्वाभाविक आहे याची आद्यशंकरांना जाणीव होतीच. म्हणून तर त्यांनी " या मोहात पडू नकोस असा उपदेश केला. काम,क्रोधादि विकार नैसर्गिकच अहेत.पण मोक्ष हवा असेल तर त्या विकारांवर संयमाने विजय मिळवायला हवा.त्यासाठी देहासक्ती जायला हवी.मणून "देह म्हणजे रक्त.मांस, चरबी इ.चा पुंज,श्लेष्मा,मल,मूत्र,रोगजंतू यांचे कोठार अशी वर्णने आहेत. तारुण्यात सुंदर दिसणार्‍या देहाचे अपरिहार्य वृद्धत्वात काय होते याचे वर्णन ज्ञानेश्वरीतही आहे. (अ.१३,ओव्या ५५० ते ५८०). * ४/(चौर्‍याऐशी लक्ष योनी, पुनर्जन्म, मोक्ष इ. वर माझा तिळमात्र विश्वास नाही. सद्ध्या रिचर्ड डॉकिन्स (डीएडब्लुकेआय एनएस ) ज्याचा नित्य उदघोष करीत आहे त्या डार्विन उत्क्रांतिवादालाच मी विश्वासार्ह मानतो.) * ५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. .........यनावाला.

In reply to by यनावाला

सहज 03/10/2007 - 15:36
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. "मूढमते किंवा मुमुक्षु साठीच आद्यशंकराचार्यांनी हे रचले" असे नंतर कोणी तरी घुसडले असण्याची / त्यांच्या नावावर खपवण्याची शक्यता आहे का? कारण १५०० वर्षे झाली तरी हे सामान्यांच्या पचनी पडले आहे असे तुम्हाला वाटते ? मी "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे"असे म्हणालो याचे कारण तेच लोक आद्यशंकराचार्यांचे म्हणणे गंभीरतेने घेईल. वेड्यात काढणार नाही अश्या प्रकारच्या व्यक्तिला ते उद्देशून असेल असे मला अजूनही वाटते. ३/ वैषयीक सुखापायी व्यसन, अतिरेक, दुराचार करू नये समजते. संयमाने विजय मिळवायला हवा म्हणजे नक्की काय ? का हि पण सारवासारव/ शाब्दीक बुडबुडे आहे. पण तूला मोक्ष मिळेल मिठाइ खाऊ नको. नैर्सगीक भावना दाबून टाक. अपरिहार्य वृद्धत्व आहे म्हणून तारूण्यात मोह करू नको, हे लॉजीक कधीच मान्य होइल असे वाटत नाही. मानववंश पूढे कसा वाढणार, का तेवढे पुढारलेले विज्ञान होते, आहे? महात्मा गांधीना जसा स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काँग्रेस पक्ष विलीन करावयास हवा होता असे म्हणतात तसे हे मोक्षवादी पार्टीच्या नेत्यांना मानव जात विसर्जीत करायची होती का काय? असो तुम्ही मोक्ष इ. वर तिळमात्र विश्वास नाही म्हणता त्यामूळे जाऊ दे...

In reply to by यनावाला

विकास 03/10/2007 - 18:50
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे. अवांतरः रात्रभर जागून सकाळच्या वेळेस " मॉर्निंग वॉ़क" घेणार्‍या गदीमांना म्युनिसिपॅलीटीचे दिवे सकाळ झाली म्हणून मालवले जात असलेले दिसले आणि "मायाबाजार" या सिनेमातील "विझले रत्नदिप.. आता उठा यदुुनाथ" असे कृष्णावरचे गाणे सुचले. तसाच काहीसा प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत घडला. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by यनावाला

चित्रा 04/10/2007 - 00:25
हे काय होते आहे, की इथल्या काहींना (माझ्यासारख्या संस्कॄत अजिबात येत नाही). सहज यांच्या या कवितेप्रमाणे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लिहीताना कसलाच संदर्भ नसतो आणि रूपांतर किंवा कोणी तरी समजावून सांगेल यावर अवलंबून रहावे लागते. यामुळे संस्कॄत परत एकदा शिकण्याचा विचार करते आहे. पण ते असो. आत्तासाठी म्हणून भज गोविंदमवर बोलण्याआधी ते काय आहे ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषांतरे शोधली. ती मिळाली खालील्प्रमाणे- (तेथील काही कडवी मुद्दाम भाषांतर केलेलीच देत आहे - ज्यांना अधिक वाचायचे आहे ते त्यांनी दुव्यावर जाऊन वाचावे.) भज गोविंदम शोधताना हे एक रूपांतर सापडले. त्यात म्हटल्याप्रमाणे - He may be absorbed in enjoyment of the senses Or in yoga, he may be engrossed In somebody’s company or he may be alone, But if his heart dwells in the divine, then it is he who is blissful, It is he who is blissful, It is he alone who is blissful. पुढे म्हटले आहे - Oh God, protect me from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take me to the other shore. जर शंकराचार्य इतरांना म्हणत असले तर मधूनच "मी " कुठून आले? शंकराचार्यांनी स्वतःसाठीच ही कविता कशावरून रचली नसेल (मनाच्या श्लोकांप्रमाणे) ? "मूढमते" ते स्वतःलाच कशावरून म्हणत नसतील? आपण नंतर ते "श्लोक" करून टाकले - कशावरून त्यांनी ते "लोकांसाठी" रचले होते? अजून पुढे - Dropping sex, anger, greed and attachment, Meditate upon yourself: Who am I? Because fools without self-realization Suffer the anguish of deep hell here. अजूनही काही भाषांतरे मिळाली. भज गोविंदमचे इंग्लिशमध्ये रूपांतर अजून एक

In reply to by चित्रा

धनंजय 04/10/2007 - 01:08
ओशो-भक्ताने तुम्हाला सापडलेल्या दुव्यावर लिहिलेले भाषांतर छान आहे, आध्यात्मिक दृष्टीने विचार करण्यालायक आहे, पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही. म्हणून 'मधूनच "मी " कुठून आले?' असा अभ्यास त्या भाषांतरावरून करता येत नाही. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननीजठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥ पाहि म्हणजे "वाचव" (मला वाचव असे नाही - कोणाला वाचव हे सांगितलेले नाही). पण "मला वाचव" हा अर्थ आजकालच्या भक्ताच्या अध्यात्मासाठी ठीक आहे, एक स्वतंत्र कृती म्हणून तसा विचार करायला काहीच हरकत नाही. पण शंकराच्या मूळ रचनेचे शब्दविश्लेषण म्हणून वापरू नये. मूढमते, भज, वगैरे मध्ये "त्वम्"="तू" अध्याहृत आहे. असे शब्द जवळजवळ प्रत्येक कडव्यात आहेत. पण "का ते कान्ता कस्ते पुत्रः" (कोण तुझी प्रियस्त्री, कोण तुझा पुत्र...) मध्ये ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. असो. पण तुमचा अभ्यास चालू दे! परत सांगायचे : या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 01:29
>>>एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एक तर हा अध्यात्मीक विचार म्हणून ज्याला घेयचा असेल त्याला घेऊदेत अथवा मी आधी वर त्यांची पूर्वपिठीका सांगितली त्या संदर्भातील काव्य समजून घेऊ देत. शंकराचार्यांचा काही सामाजीक/राजकीय प्रभाव भारतवर्षावर पड्ल्याचे ऐकीवात नाही. आध्यात्मिक काही अंशी असेल. त्यांनी काय अथवा इतर कुठल्याही भारतीय/हिंदू संतमहंताने कुणावर दमदाटी केली नाही की काही कर आणि माझेच ऐक. आपल्याकडे अद्वैतवादी शंकराचार्य चालले, द्वैताचा उपयोग करून अद्वैतच जपणारे ज्ञानेश्वर चालले, भारूडातून समाजजागृती करणारे एकनाथ चालले, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकाराम चालले आणि एकीकडे बुद्धी दे रघूनायका म्हणत दुसरीकडे मुर्खाची लक्षणे सांगणारे रामदासपण चालले. पण या सर्व (इतिहासाचार्य राजवाड्यांच्या भाषेत) संताळ्याने काम सोडून हरीहरी करत बसा असे सांगीतल्याचे ऐकीवात नाही की कधी स्वत:चे विचार इतरांवर लादल्याचे एकलेले नाही. म्हणून मुद्दा एव्ह्ढाच, की आपल्या कडे जी काही संशोधनाला ओहटि लागली त्याचे कारण म्हणून केवळ शंकराचार्यांना झोडपणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

धनंजय 04/10/2007 - 01:46
एकट्या शंकराचार्यांना कोण झोडपतो आहे हो. अशा प्रकारचे विचार अनेकांनी सांगितले. पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. "जग मिथ्या आहे, आणि ऐहिक बाबतीत काहीच अर्थ नाही" असे सांगणार्‍यांपैकी त्यांचे भाषामाधुर्य, भाषाप्रभुत्व आणि तर्कमंडन सर्वोत्तम आहे, म्हणून त्या दुसर्‍या चर्चेत हे उदाहरण घेतले. आता त्यांनी दमदाटी केली की नाही याबाबत कथा आता काहीशा दंतकथाच आहेत. मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. (हा भाग शिवलीलामृतात आहे का - नीट आठवत नाही.) माझ्या मते बहुतेक आचार्यांनी खुद्द दमदाटी केली नसावी. पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 02:50
>>>इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते. सहजरावांच्या चर्चेचे मूळ हे शंकराचार्यांवर आधी चालू केलेल्या चर्चेत असल्याने त्याचा संदर्भ मी दिला. म्हणून वरील संदर्भ देत पुढे शंकराचार्य सामान्यांना उद्देशून म्हणले नसावे या अर्थी म्हणाले, म्हणून सुरवात ही एकंदरीत आपल्या संपूर्ण लेखासंदर्भातील वाटली... >>>पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. तेच आमचे म्हणणे आहे. त्यांनी गोड गीतात सांगीतले. नव्हे त्यांनी नुसते काव्य रचले. त्याचे गीत एम एस सुब्बालक्ष्मीमुळे झाले आणि आमच्या सारख्यांना ते भावले. तीच कथा ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाच्या आणि इतरांच्या अभंगांची . त्या संदर्भात इतकेच म्हणणे आधी आंणि आत्त्ताही आहे, की त्यांनी जे काही केले ते पारमार्थीक होते राजकीय अथवा सामाजीक ढवळाढवळ नव्हती. उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही किंवा (तुकोबाच्या बाबतीत) शिवाजीने अफझलखानास कसे मारावे हे ते सांगत बसले नाहीत... >>>मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. दंतकथा असेल नसेल पण, "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. कारण मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता. त्यात दमदाटीचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्यास अर्थातच माहीत असेल पण इतरांसाठी थोडक्यातः मंडनमिश्रांचे गुरू कुमरील भट्टांकडे अद्वैत आणि पूर्वमिमांसा या दोन विचारधारांवरून "डिबेट" करायला तत्कालीन हिंदू प्रथेप्रमाणे शंकराचार्य गेले होते. तेंव्हा कुमरील भट्टांनी मंडनमिश्र त्यांच्याशी वादविवाद करेल असे सांगीतले. त्याची (मंडनमिश्राची) पत्नी ही "रेफरी" झाली. अनेक दिवस झालेल्या चर्चेत शंकराचार्य जिंकले. पण त्यांचा विजय तीने निर्विवाद ठरवला नाही कारण ते ब्रम्हचारी असल्याने त्यांना "कामसुत्राचे" ज्ञान नाही. तेंव्हा पुढची दंतकथा अशी आहे त्यांनी एका मेलेल्या राजामधे कायाप्रवेश करून याविषयाचे ज्ञान करून घेतले. मग परत दोघांचा वाद झाला आणि त्यात मंडनमिश्राने हार मान्य केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. असो. या गोष्टिवरूनपण लक्षात काय येते की त्यांचे पारामार्थीक ज्ञान आणि ज्याला प्रबंध - थिसीस म्हणता येईल त्या वेदांताचा आणि शंकराचार्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आंधळेपणाने कोणी तेंव्हा मान्य केले नव्हते. त्यांना त्याचे सध्याच्या भाषेत "प्रेझेंट" करून वैचारीक वादविवादात यशस्वी करून दाखवावे लागले. त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. >>>पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. त्या साधूंचे कोणी समर्थन करत नाही की भलतासलता मान देत नाही. बर "त्यांचे साधू" असे म्हणताना त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे करताना पाहीले तरी नाही आहे. नाहीतर प्रसिद्धीमाध्यमे काही निवांत बसली नसती....

In reply to by विकास

धनंजय 04/10/2007 - 03:52
ते कधीतरी वाचायचे आहे, पण जरा बॅकबर्नरला टाकले आहे. त्यामुळे लगेच व्यासंगपूर्ण उत्तरे देता येणार नाहीत. > त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. हे बरोबर आहे. > त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे गैरसमजाबद्दल दिलगीर. इथे त्यांच्या पीठाधीशांचा उल्लेख करायचा नव्हता, दहा आखाड्यांतल्या साधूंचा करायचा होता. > "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. या दंतकथेच्या अनेक आवृत्ती आहेत. पैकी एकात मंडनमिश्र सरस्वतीला दारूच्या घड्यात बुडवून तिच्याकडून वेद वदवून घेत पडद्यापाठीमागून शंकराचार्यांशी वाद घालत होता, शंकराचार्यांनी सरस्वतीला पराभूत करून पडदा दूर करून दारुड्या मंडनमिश्राची कानउघडणी केली, अशीही दंतकथा आहे. ही दंतकथा मला मान्य नाही हे वर सांगितलेच आहे, पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. > उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही... इथे तर खरेच शांकरभाष्य वाचावे लागेल मला. पण थोडेफार उल्लेख देतो. त्याविषयी तपशील मात्र कोणी जाणकाराने द्यावेत. ब्रह्मसूत्रांवरील भाष्यात, सांख्य "जड प्रकृती आहेत" म्हणतात, त्याचे उत्तर तशी नाही असे देताना, वैशेषिकांना त्यांचे अणू खरे नाहीत वगैरे सांगताना, शंकराचार्यांना वैज्ञानिक बाबतींबद्दलच बोलायचे होते असे दिसून येते. प्रलयाच्या काळी अणू अमुकतमुक प्रकारे हलू शकणार नाहीत असाही त्या ठिकाणी शंकराचार्यांचा वाद आहे. हे थोडेफार "पृथ्वी गोल आहे की नाही"च्या दिशेने जाते. खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. > तुकोबा तुकोबा हे अद्वैतवादी किंवा संन्यासवादी किंवा इहलोक-असत्य-वादी होते हे मान्य नाही. तुकोबांना सामाजिक स्थितीविषयी मते नव्हती हेही पटत नाही. परत याचे उत्तर कोणी वारकरी पंथातला अभ्यासक माझ्यापेक्षा चांगले देईल.

In reply to by धनंजय

विकास 04/10/2007 - 04:34
>>>तुम्ही तर मला शांकरभाष्यच वाचायला लावणार! ते कधीतरी वाचायचे आहे, मला आपल्या व्यासंगावर विश्वास आहे, त्यामुळे (वाचून झाल्यावर,) आपले समतोल विचार वाचायला नक्कीच आवडतील. >>>पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. हे मान्य आहे आणि त्यात काही नाविन्य नाही. आपल्यास अमेरिकेतील "ऍकेडेमीक रायव्हलरी" कशी असते ते माहीत असेलच. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कुठेही तसाच राहणार! असे म्हणताना मी काही अशा वागण्याचे समर्थन करत नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. त्यात शंकराचार्यांनी एकीकडे बुद्धाच्या विचारांना अप्रत्यक्ष आव्हान देत एका अर्थी अद्वैतरूपात त्याच पद्धतीचे विचार आणले (कदाचीत फरक असेल तर तो निर्वाणावस्थेत कारण बुद्धाला पुनर्जन्म मान्य नव्हता तर शंकराचार्यांच्या "पुनरपी जननम.." ओळी आपणच वर उल्लेखल्या आहेत. परीणामी त्यांना होणारा विरोध हा प्रस्थापितांचा होता. या संदर्भात मला विवेकानंदांचे शब्द आठवतातः त्यांनी म्हणले होते की कुठल्याही नव्या विचाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते: "sheer indifference, severe opposition and then broad acceptance". जे विचार ह्या तीन तप्पे पार करून राहतात ते दूरगामी राहू शकतात. >>आता जरा खुलासा: खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. हे म्हणायचे माझे कारण होते, की ज्या प्रकारे चर्चने पृथ्वी सपाट आहे ह्या त्यांच्या अंधश्रद्धेचा भडीमार करून २० व्या शतकापर्यंत गॅलीलीओला त्याच्या (पृथ्वी गोल आहे हे म्हणण्याच्या) पापातून मुक्त झाल्याचे मान्य केले नाही तसे काही शंकराचार्यांचे धर्मपिठ वागल्याचे ऐकीवात नाही. अगदी ज्ञानेश्वर भावंडांच्या मुंजीच्या वादात पण शंकराचार्य कधी पडल्याचे ऐकले तरी नाही...जे काही झाले ते पैठणच्या कर्मठांपुरतेच मर्यादीत राहीले. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण आधी म्हणल्याप्रमाणे "नारीस्तनभर..." या मूळ विषयापासून (विषय - हा शब्द कुठल्याही अर्थाने!) दूर जाईल म्हणून येथेच माझा खुलासा थांबवतो!

In reply to by धनंजय

चित्रा 04/10/2007 - 05:44
तुमच्याशी वाद घालायचा नाही, ही चर्चा मूळ मुद्द्यावरून बरीच भरकटते आहे - पण तरी - पाहि म्हणजे "वाचव" भाषांतरात "वाचव" याअर्थी "protect" हा शब्द आला आहे. तुमचे म्हणणे वरील भाषांतर पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही मान्य केले तरी - जर वरच्या भाषांतरातले me काढून टाकले तरी "मला" वाचव असाच अर्थ निघतो. Oh God, protect -- from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take -- to the other shore. शंकराचार्य मधेच "दुसर्‍याला वाचव" ("माफ कर" - येशूप्रमाणे) म्हणत नसावेत! ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एवढ्यावर आपण सहमत आहोत हे पण खूप आहे. मी काही कसली तज्ञ वगैरे नाही, तुटपुंज्या ज्ञानावर उगाच काहीतरी लिहीण्यात अर्थ नाही हे मलाही माहिती आहे. पण तसे कोणाचे ज्ञान इथे पूर्ण आहे? ! माझे मत या सर्वावर एवढेच आहे की गांधीजींच्या विचारांवर न समजून घेता जशी टीका होते, तसाच काहीसा प्रकार शंकराचार्य वगैरेंवरून होत असावा. असेच गीतेचे. एक पुल देशपांडे तुझे आहे.. मध्ये म्हणाले म्हणून कोणी गीता वाचलीच नाही, गीताईसुद्धा नाही. या मोठ्या अधिकारी लोकांचे आपण काही वाचलेले नसते, कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा हे करण्यापेक्षा जे काही भाषांतर आहे ते वाचल्यास निदान भावार्थ तरी कळेल यामुळे ते भाषांतर इथे दिले होते. त्याच्यातले पाठभेद/श्लेष मला कळत नाहीत, पण जसा जमेल तसा अभ्यास तर चालू ठेवायलाच पाहिजे नाही का? तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.

In reply to by चित्रा

धनंजय 04/10/2007 - 12:58
तुमची वृत्ती खरोखर अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्ही ते इंग्रजी भाषांतर सोडून शक्यतोवर एखादे चांगले मराठी भाषांतर (म्हणजे शब्द-शब्द समजावून सांगणारे वगैरे) वापरावे असे वाटते. इंग्रजीच्या काही व्याकरणविषयक लकबी संस्कृताला लागू नाहीत. तुम्ही ज्या खोल रीतीने अभ्यास करत आहात त्या दृष्टीने पाहता त्या दुव्यावरील भावार्थ/भाषांतर खूपच मोघम आहे. त्यात मुळातल्यापेक्षा इतके फरक आहेत, की भाषांतरकर्त्याची स्वतंत्र प्रतिभा त्याच्यात उतरली आहे, असे म्हणता येईल. > हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. शंकरांनी रचलेली अनेक स्तोत्रे महाजालावरती उपलब्ध आहेत. आपल्या इथल्या "तो." सारखे शंकराचार्य स्वतःचा "तू"म्हणून उल्लेख एक वैयक्तिक लकब म्हणून करतात का - हे अभ्यास करण्यासारखे आहे. शिवाय त्यांच्या शिष्यपरंपरेत सांगितलेल्या या स्तोत्राविषयीच्या कथेच्या संदर्भाचाही जरूर विचार करावा. > तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? > मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन. फार उत्तम विचार. या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, की शंकरांनी खूप काही वैचारिक लिहिलेले आहे, ते अजून उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या पाठभेदामुळे त्यांचे विचार चुकीचे कळले असे व्हायची शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांचे अन्य वैचारिक साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यावरून ताळा करून घेता येईल. तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभकामना आहेत. हल्ली आपल्या संस्कृतीतल्या अन्य ग्रंथांकडे माझे अधिक लक्ष वेधले गेले असल्यामुळे शंकरांचे ग्रंथ मी लगेच अभ्यासायला घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जसे अभ्यासातून कळत जाईल, तसे तसे ते तुमच्याकडून वाचायची उत्सुकता आहे.

लिखाळ 03/10/2007 - 23:31
नमस्कार, अश्या विषयांवर खुलेपणाने लेखन आणि चर्चा मराठी संकेतस्थळांवर या पूर्वी झाली नसावी आणि त्यामुळे वैचारिक लेखन आणि वाचन करणारे सदस्य खूष झाले असावेत असा कयास आहे. अश्या (तथाकथित) 'ना़जूक' विषयावर आपण लेखन केलेत हे अभिनंदनीयच. (मागे मनोगतावर कमी कपडे आणि बळजबरी यावर चर्चा झाली होती.) यनावाला म्हणतात त्याप्रमाणे, >>५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. लेख थोडा विस्कळित वाटला. पण विचार चांगलेच आहेत. इस्लामी राजवटीमध्ये स्त्रीयांच्या कपड्यांवर बंधने आली आहेत का? म्हणजे त्यांनी लादलेले नियम म्हणून अथवा त्यांनी पळवून नेवू नये म्हणून. यावर कोणी तज्ञाने खुलासा करावा ही विनंती. संतांनी आणि विद्वानांनी कोणी कसे वागावे यावर केलेली भाष्ये अनेक ठिकाणी दिसतात. सामान्य माणसाने समाजात कसे वागावे आणि रोजचा व्यवहार करीत असताना परमार्थात प्रगती होण्यासाठी काय करावे याबद्दल अनेक गोष्टी दिसतात. खरेतर भारतात सामान्य माणसाने व्यवहारात (संसारात) राहून परमार्थाकडे नजर ठेवून वागावे अशीच संतांची शिकवण दिसते. त्या पुढे जावून जे मुमुक्षु आहेत, ज्यांच्या मनात परमार्थप्राप्तिची ओढ निर्माण झाली आहे त्यांनी कसे वागावे हे सुद्धा दिसते. पुढे सिद्धावस्थेतल्या माणसाचे वागणे कसे असते त्यावर सुद्धा भाष्य दिसते. असे असता आपण जे वाचतो आहोत ते त्या संताने नक्की कोणाला सांगितले आहे ते आपल्याला लागू आहे का? याची शहानिशा करणे आगत्याचे ठरते. अवांतर : 'सूचना' खास आहे :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु 04/10/2007 - 00:59
पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल. हे मात्र लाख बोललात. अगदी खरं आहे हे. लेख छान आहे. विचार करायला लावणारा आहे. - प्राजु.

शिल्पा ब 26/05/2010 - 09:12
लेख आणि चर्चा दोन्ही वाचण्याजोग्या आहेत...मधेच एकदम संस्कृतचे आणि शंकराचार्यांबद्दल शिक्षण झाले :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. तसेच लेखातील भाषा "फक्त प्रौढांसाठीच" हा इशारा. आक्षेपार्ह वाटणारं असेल तर कृपया येथूनच परत फिरा.) गेल्या काही दिवसात संस्कृत, संस्कृती ह्यावरून काही चर्चा होतीय. प्राचीन भारतात प्रगती, ऐहीकसूख वगैरे वगैरे. अजून एका चर्चेत स्त्रीवाद, समानता, लैंगीकता, विचारस्वातंत्र्य, प्रकटन, मु़क्तभावनाविष्कार वगैरे वगैरे. एका आचार्यांनी सांगीतलेल्या श्लोकावरून सूचलेले अजून एक स्फूट.

चांदोबा

आजानुकर्ण ·

कोलबेर 29/09/2007 - 20:11
>>जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क हा हा सहीच!! मला मात्र लहानपणी ठक ठक सगळ्यात जास्त आवडायचे कारण ते जास्त मराठमोळे वाटायचे..(अजुन ठक ठक येते का?) चांदोबा दाक्षिणात्य आणि चंपक (बहुदा) बरेचसे हिंदी अनुवादित असायचे.

धनंजय 29/09/2007 - 21:20
काय मस्त आठवण करून दिलीत कर्ण! दर महिन्याला आमच्या घरी आईबाबा चांदोबा आणि किशोर एकाच दिवशी विकत घेऊन येत. (म्हणजे दोघा मुलांमध्ये "मी आधी वाचणार" असे भांडण होऊ नये. पण ज्याच्या हाती येत, म्हणजे माझा भाऊ किंवा मी, दोन्ही अंक लंपास करून ठेवत. मग भांडणे होतच. आमचे आईबाबा बालमानसशास्त्राच्या बाबतीत तसे तज्ज्ञ नव्हते असे माझे प्रांजळ मत आहे.) त्या धूमकेतूचे शेवटी काय झाले कोणास ठाऊक...

In reply to by बेसनलाडू

आंघोळीनन्तर ओले केस पिंजारून मी आणि माझा भाऊ एकमेकांना भल्लूक मान्त्रिक म्हणत काठीने खेळत असू... धुमकेतू...

प्राजु 29/09/2007 - 22:12
जाग्या केल्यात आपण. लहानपणी हा चांदोबा तेव्हा अक्षर ओळख नसल्यामुळे मी आजोबांकडून वाचून घ्यायचे. त्यामधील रंगीत चित्रांमुळे मला त्या पुस्तकाबद्दल विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि मग सगळी कामं आटोपून माझे आजोबा मला त्यातील गोष्टी वाचून दाखवायचे.. आज आजोबा हयात नाहीत.. पण या गोड आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत... धन्यवाद. - प्राजु.

प्रियाली 30/09/2007 - 01:05
>>का रे अजून चांदोबा वाचतोस का? असे प्रश्न आणि कोण विचारणार? ;-) चांदोबाची आठवण पुन्हा करून दिल्याबद्दल धन्यवाद. चांदोबा अद्याप निघतो हे ही माहित नव्हते. आमच्या घरात किशोर येई. चांदोबा पिताश्रींना आवडत नसे. काय त्यात जादू बिदूच्या गोष्टी असतात म्हणून ते उडवून लावत. त्यामानाने चंपक आणून देणे त्यांना आवडे. शेजार्‍यांकडे चांदोबा वाचून आम्ही क्षुधाशांती करत असू.

जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.>> मला विरुपाक्ष ची आठवण येते. त्याच्या कानातून बाहेर येणारे केस मनावर कोरले आहेत. आमच्या विभागातील ३०२ जाधवला ( ३०२ कलमाने बायकोच्या खुनाचा गुन्हा ज्यावर दाखल झाला आहे असा तो एक स्टोअरमन) त्याच्या कानातील केसामुळे मी आमच्या वर्तुळात 'विरुपाक्ष' हे नाव पाडले होते. प्रकाश घाटपांडे

चांदोबाची आठवण करुन दिली आणि जून्या आठवणी चाळवायला लागल्या ! कर्णा, चांदोबा ज्याच्या घरात त्यांना जरा प्रतिष्ठीचे वाटायचे, आमच्या घरी मुलांसाठी चांदोबा घेतो ही कधीतरी अभिमानाचीही गोष्ट होती. काहीतरी हटके विषय घेऊन येणार नाही तो कर्ण कसा ! :) असेच वाचायला येऊ दे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 30/09/2007 - 08:36
छान आठवणी आल्या. अर्थात चांदोबा मासिकाबद्दल एवढी माहिती नव्हती. >>चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी असेच. माझ्या एका चुलत आजोबांच्या घरी चांदोबा येई. त्यांच्या लहानशा घरात त्यांनी असंख्य पुस्तके (त्यात जुनी पंचांगे पण असत) ठेवली होती. चांदोबाचे गठ्ठयाने अंक असत. त्यांच्याकडे असलेले खूप जुने म्हणजे माझ्या आत्यांच्या लहानपणचे अंकही मी त्यांच्याकडे गेले की वाचत असे.

विसोबा खेचर 30/09/2007 - 09:11
तेव्हापासून अगदी आवडीने वाचतो आहे. आजही मध्येच अधनंमधनं विकत घेऊन वाचतो.. वा कर्णा, चांदोबाच्या सुखद आठवणी चाळवल्यास त्याबदल तुला चांदोबाचा एक अंक बक्षिस देईन हो! :) आपला, (चांदोबाप्रेमी) तात्या.

आजानुकर्ण 30/09/2007 - 09:47
अरे वा! इतके सगळे चांदोबाप्रेमी पाहून फार आनंद वाटला. लेखाच्या मस्त जेवणानंतर आता माहितीची बडीशेप चावा. चांदोबाची वार्षिक फी आता १५० वरून १८० रुपये केले आहे. आणि त्याबदल्यात ८ रंगीत पाने प्रत्येक अंकात जास्तीची. :)) सप्टेंबरच्या अंकात जगपाल साहू नावाच्या एका वाचकाचे पत्र आले आहे. त्यांच्याकडे १९७५ वर्षापासूनचे चांदोबाचे सगळे अंक आहेत. :) याशिवाय दीपांकर दत्त नावाचे एक वाचक चांदोबाचे गेली ५० वर्षं वाचक आहेत. :)) तात्या, चांदोबाचा अंक घेण्यासाठी पुणे-ठाणे प्रवास गृहीत धरला तर पुण्यात चांदोबा स्वस्त मिळेल ;).

काय मस्त आठवण काढली? चांदोबा,किशोर आणि कुमार माझ्या जास्त आवडीची मासिके होती.त्यामानाने चंपक आणि ठकठक मी विशेष वाचत नसे.किशोर आणि कुमार आमच्या घरी येत असत्,चांदोबा शैलाताई कडे.मी ३रीत असतानाच आईने शैलाताई बेडेकरच्या मनोरंजन वाचनालयात माझे नाव लहान मुलांच्या विभागात घातले होते,आणि तिच्याकडून पुस्तक घेऊन घरी येतानाच वाचत वाचत येत असे, आणि ते कोणीतरी घरी सांगितल्यावर ओरडाही मिळाला होता. शाळेत असताना ९ वीत बहुदा, किशोरच्या दिवाळी अंकात माझा एक लेख प्रसिध्द झाला होता आणि त्याचे मानधन म्हणून २५ रु चा चेक ही मिळाला होता, काय त्याचं अप्रूप तेव्हा वाटलं होतं! आता परत एकदा चांदोबा,किशोर,कुमार चाळली पाहिजेत. स्वाती

प्रमोद देव 30/09/2007 - 14:23
चांदोबा वाचण्यासाठी आम्ही भावंडे देखिल खूप धडपडत असायचो. स्वत: खरेदी करून वाचण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही ती वाचनालयात जाऊनच वाचत असू. नवी-जूनी जी हाताला लागतील ती वाचून काढत असू. तसेच किशोर,कुमार आणि अमृत,विचित्र-विश्व वगैरे मासिकेही वाचत असू. चांदोबातील चित्रे तर खासच असायची. त्यांची रंगसंगती देखिल विलक्षण आकर्षक असायची. मात्र चांदोबा मध्ये एकदा बंद पडल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्यातले आकर्षण कमी झाले. त्याला कारण त्याचा पूर्वीचा रूबाब राहिला नाही असे मला मनापासून वाटते. तसेच आता अमरचित्रकथा आणि अशाच प्रकारचे नवे प्रकार बाजारात आल्यामुळे देखिल चांदोबाचे महत्व कमी झालेय असे वाटते. तरी देखिल चांदोबा ही जून्या पिढीतील लोकांची "मर्मबंधातली ठेव" आहे असे खात्रीने म्हणता येईल.

यनावाला 02/10/2007 - 22:03
मासिकासंबंधीचा श्री. आजानुकर्ण यांचा सचित्र सुंदर लेख आणि त्यावरील अनेक सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला वैषम्य वाटले. सर्वांचा हेवा वाटला. कारण ज्या खेडेगावात माझे लहानपण गेले, तिथल्या शाळेत पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक मला वाचायला मिळाले नाही. शाळेला वाचनालय नव्हतेच. ते असते हे पुण्यात आल्यावर समजले. तोवर चांदोबा वाचायचे दिवस निघून गेले होते. घरी चांदोबा किंवा दुसरे कोणतेच नियतकालिक मागवण्याचा प्रश्नच नव्हता. असो. पुढे थोडे फार वाचले. पण त्या वयात वाचायला मिळाले नाही याची खंत वाटते.(विशेषतः हा लेख वाचून आपण अशा वाचनापासून वंचित राहिलो हे प्रकर्षाने जाणवले.)

देवदत्त 30/10/2007 - 23:13
मस्त वाटले वाचून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद :) विक्रम वेताळ हे तर छानच होते. त्याचबरोबर इतर कथाही छान होत्या. तुम्ही फक्त चांदोबाबद्दल लिहिले आहे परंतु त्याचबरोबर इतरही लिहावेसे वाटते. मी ही लहानपणी चांदोबा, किशोर, चंपक, ठकठक भरपूर वाचायचो. तसेच हिंदीमधील सुमन सौरभ ही. ह्या सर्वांत चांदोबा उठून दिसत असावा त्यातील रंगीत पानांमुळे. आणि चांदोबा हे पुस्तक असे की सर्व वयोगटात कोणीही घेऊन वाचू शकतो. आणखी ही पुस्तके होती बहुधा आता आठवत नाही. सर्व वाचायला मजा यायची. शिवाय डायमंड कॉमिक्स ही भरपूर. आमच्याकडे एवढी पुस्तके झाली होती की ३ मित्रांनी मिळून मग आमच्या कॉलनीत वाचनालयच सुरू केले होते. २ २१/२ वर्षे चालविले ते. :) गेल्या वर्षी बंगळूर मध्ये एका मित्रा सोबत ह्याच पुस्तकांबद्दल चर्चा झाली होती. मग काय लगेच गेलो बुक स्टॉल वर आणि विचारले चांदोबा, चंदामामा आहे का? नव्हते. पण चंपक मिळाले. (ह्या सर्व पुस्तकांच्या शोधात) देवदत्त

देवदत्त 15/05/2008 - 22:47
:) नुकत्याच आलेल्या विपत्रातून चंदामामाच्या संकेतस्थळाचा पत्ता मिळाला. :( इथे सध्या नवीन कथा इंग्रजी, तमिळ व तेलूगू ह्याच भाषेत आहेत :) परंतु जुने अंक ( जुने म्हणजे किती जुने हो ? हिंदी: १९४९ ते १९६१, इंग्रजी: १९५५ ते १९८५ इत्यादी इत्यादी) उपलब्ध आहेत. :( मराठी नाहीत हीच खंत. :) मी सप्टे. १९६१ ची प्रत डाऊनलोड केली आहे. पाहीन वाचून

छोटा डॉन 15/05/2008 - 23:26
आजानुकर्णा, काय आठवण काढलीस रे चांदोबाची , एकदम लहानपण आठवले ... साधारणाता आमचे लहानपण हे "चांदोबा, ठकठक, चाचा चौधरी" वाचण्यात, गोट्या / आंब्याच्या कोया [ उच्चारी कुया ] खेळण्यात, झालच तर आईचा मार खाण्यात गेले ... आईचा मार खायचे मेन कारण असायचे चांदोबा, कारण पुस्तक एक आणि वाचणारे ३ जण, त्यात मोठा मी आणि माझ्या २ लहान बहिणी. मग मी पुस्तक बळकावयाचो आणि बहिणी तक्रार घेऊन आईकडे जायचा व मला मग पडती बाजू घ्याय्ला लागायची. मग ती गेल्याव्र पुन्हा चांदोबावर माझा कब्जा [ सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल की माझी "डॉनगिरी " ही तेव्हापासूनची बरं का ! ] माझा एक आत्तेभाऊ होता, त्याच्याकडे "ठकठक" यायचे. मग २-३ महिन्यात आमची जेव्हा एकमेकाकडे चक्कार व्हायची तेव्हा "चांदोबा आणि ठकठक" ची अदलाबदल हमखास . ... तेव्हा "एका चांदोबामागे २ ठकठक " असा रेट पडायचा ... आजही जर कुठे मिळाले तर वाचायला जरूर आवडेल ... चांदोबाचा व्यवहार करणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मदनबाण 16/05/2008 - 04:45
मलाही चांदोबा वाचायला फार आवडत असे.....विक्रम-वेताळाची गोष्ट तर मला फार आवडत असे..... चंपक आणि ठकठक पण वाचायचो...ठकठक मधील दिपू दी ग्रेट या व्यक्तीरेखेचा मी जबरदस्त पंखा होतो..... (बालपणीच्या रम्य आठवणीत रमलेला) मदनबाण.....

ईश्वरी 16/05/2008 - 00:06
वा, वा मस्त आठवण करून दिलीत. विक्रम वेताळ माझ्याही आवडीची गोष्ट असायची. त्यातल्या त्यात वेताळाचा कूट प्रश्न आणि त्याचे विक्रमाने चतुराईने दिलेले उत्तर हे वाचायला छान वाटायचे. किशोर ही माझ्या खास आवडीचे पुस्तक होते. तुम्ही ते विक्रम वेताळ चे चित्र टाकून लेखाची रंजकता वाढवली आहे. चांदोबाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एक प्रश्नः तमीळ / तेलगू भाषेतील चांदोबाचे नाव काय होते? ईश्वरी

ॐकार 16/05/2008 - 01:41
चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर याचबरोबर अबब हाती, छावा चे अंकही वाचायचो. आम्ही ३-४ मित्र मिळून प्रत्येक जण एकेक अंक विकत घेत असे( म्हणजे आई वडील आणून द्यायचे) आणि मग आम्ही अदलाबदल करून वाचत असू. राजू आणि छोटी खार अजूनही आठवते!

मुक्तसुनीत 16/05/2008 - 01:55
"हे राजा ....या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असूनही .........शकले उडतील !" - पंचतंत्र (कृतप्रणाश , अकृतागम वगैरे शब्द इथे पहिल्यांदा वाचले) -तिळ्या बहिणी चांदोबांच्या अर्कचित्रांची एक शैली होती. सर्व राजे मिशीवाले , ब्राम्हण लांबच लांब शेंडीवाले असायचे ....

विजुभाऊ 16/05/2008 - 13:01
कृतप्रणाश हा शब्द असा नसुन तो लब्धप्रणाश असा आहे. पंच तंत्रापैकी एका तंत्राचे हे नाव आहे. विष्णुशर्मा ने मित्र लाभ , मित्र भेद , काकोलुकीय , लब्धप्रणाश ,( पाचवे नाव आठवत नाही) अशी एकुणपाच तंत्रे लिहीली आहेत. करटक ,हिडींबक , दमनक अशी नावे या प्रकारणात येतात.

कलंत्री 16/05/2008 - 20:20
यनावालांच्या लिखाणात लिहिल्याप्रमाणे आजही खेड्यात वाचनाचे सूख मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या / कुटुंबियांच्या वाढदिवसाला या अंकाची भेट गरिबमुलांना वार्षिक अंकाच्या निमित्त्याने नक्कीच देऊ शकतो. बाकी लेख अप्रतिमच आहे आणि सचित्र असल्यामूळे रंगत काही वेगळीच झाली आहे. मित्रा आजानुकर्णा : असे लेख वर्तमानपत्रात आले पाहिजे.

कोलबेर 29/09/2007 - 20:11
>>जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क हा हा सहीच!! मला मात्र लहानपणी ठक ठक सगळ्यात जास्त आवडायचे कारण ते जास्त मराठमोळे वाटायचे..(अजुन ठक ठक येते का?) चांदोबा दाक्षिणात्य आणि चंपक (बहुदा) बरेचसे हिंदी अनुवादित असायचे.

धनंजय 29/09/2007 - 21:20
काय मस्त आठवण करून दिलीत कर्ण! दर महिन्याला आमच्या घरी आईबाबा चांदोबा आणि किशोर एकाच दिवशी विकत घेऊन येत. (म्हणजे दोघा मुलांमध्ये "मी आधी वाचणार" असे भांडण होऊ नये. पण ज्याच्या हाती येत, म्हणजे माझा भाऊ किंवा मी, दोन्ही अंक लंपास करून ठेवत. मग भांडणे होतच. आमचे आईबाबा बालमानसशास्त्राच्या बाबतीत तसे तज्ज्ञ नव्हते असे माझे प्रांजळ मत आहे.) त्या धूमकेतूचे शेवटी काय झाले कोणास ठाऊक...

In reply to by बेसनलाडू

आंघोळीनन्तर ओले केस पिंजारून मी आणि माझा भाऊ एकमेकांना भल्लूक मान्त्रिक म्हणत काठीने खेळत असू... धुमकेतू...

प्राजु 29/09/2007 - 22:12
जाग्या केल्यात आपण. लहानपणी हा चांदोबा तेव्हा अक्षर ओळख नसल्यामुळे मी आजोबांकडून वाचून घ्यायचे. त्यामधील रंगीत चित्रांमुळे मला त्या पुस्तकाबद्दल विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि मग सगळी कामं आटोपून माझे आजोबा मला त्यातील गोष्टी वाचून दाखवायचे.. आज आजोबा हयात नाहीत.. पण या गोड आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत... धन्यवाद. - प्राजु.

प्रियाली 30/09/2007 - 01:05
>>का रे अजून चांदोबा वाचतोस का? असे प्रश्न आणि कोण विचारणार? ;-) चांदोबाची आठवण पुन्हा करून दिल्याबद्दल धन्यवाद. चांदोबा अद्याप निघतो हे ही माहित नव्हते. आमच्या घरात किशोर येई. चांदोबा पिताश्रींना आवडत नसे. काय त्यात जादू बिदूच्या गोष्टी असतात म्हणून ते उडवून लावत. त्यामानाने चंपक आणून देणे त्यांना आवडे. शेजार्‍यांकडे चांदोबा वाचून आम्ही क्षुधाशांती करत असू.

जयमल्ल, श्वानकर्णी, बिडाली, वीरबाहू, विक्रमार्क अशा नावांमध्ये पुन्हा गुंग होऊन गेलो. चांदोबा उगाचच इतके दिवस बंद केला. परत वाचायला सुरुवात केली पाहिजे.>> मला विरुपाक्ष ची आठवण येते. त्याच्या कानातून बाहेर येणारे केस मनावर कोरले आहेत. आमच्या विभागातील ३०२ जाधवला ( ३०२ कलमाने बायकोच्या खुनाचा गुन्हा ज्यावर दाखल झाला आहे असा तो एक स्टोअरमन) त्याच्या कानातील केसामुळे मी आमच्या वर्तुळात 'विरुपाक्ष' हे नाव पाडले होते. प्रकाश घाटपांडे

चांदोबाची आठवण करुन दिली आणि जून्या आठवणी चाळवायला लागल्या ! कर्णा, चांदोबा ज्याच्या घरात त्यांना जरा प्रतिष्ठीचे वाटायचे, आमच्या घरी मुलांसाठी चांदोबा घेतो ही कधीतरी अभिमानाचीही गोष्ट होती. काहीतरी हटके विषय घेऊन येणार नाही तो कर्ण कसा ! :) असेच वाचायला येऊ दे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 30/09/2007 - 08:36
छान आठवणी आल्या. अर्थात चांदोबा मासिकाबद्दल एवढी माहिती नव्हती. >>चांदोबात २५-३० वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पुन्हा वाचताना ती तितकीच ताजी वाटायची. या कथांचे मराठी अनुवाद कोण करतो देव जाणे. अगदी असेच. माझ्या एका चुलत आजोबांच्या घरी चांदोबा येई. त्यांच्या लहानशा घरात त्यांनी असंख्य पुस्तके (त्यात जुनी पंचांगे पण असत) ठेवली होती. चांदोबाचे गठ्ठयाने अंक असत. त्यांच्याकडे असलेले खूप जुने म्हणजे माझ्या आत्यांच्या लहानपणचे अंकही मी त्यांच्याकडे गेले की वाचत असे.

विसोबा खेचर 30/09/2007 - 09:11
तेव्हापासून अगदी आवडीने वाचतो आहे. आजही मध्येच अधनंमधनं विकत घेऊन वाचतो.. वा कर्णा, चांदोबाच्या सुखद आठवणी चाळवल्यास त्याबदल तुला चांदोबाचा एक अंक बक्षिस देईन हो! :) आपला, (चांदोबाप्रेमी) तात्या.

आजानुकर्ण 30/09/2007 - 09:47
अरे वा! इतके सगळे चांदोबाप्रेमी पाहून फार आनंद वाटला. लेखाच्या मस्त जेवणानंतर आता माहितीची बडीशेप चावा. चांदोबाची वार्षिक फी आता १५० वरून १८० रुपये केले आहे. आणि त्याबदल्यात ८ रंगीत पाने प्रत्येक अंकात जास्तीची. :)) सप्टेंबरच्या अंकात जगपाल साहू नावाच्या एका वाचकाचे पत्र आले आहे. त्यांच्याकडे १९७५ वर्षापासूनचे चांदोबाचे सगळे अंक आहेत. :) याशिवाय दीपांकर दत्त नावाचे एक वाचक चांदोबाचे गेली ५० वर्षं वाचक आहेत. :)) तात्या, चांदोबाचा अंक घेण्यासाठी पुणे-ठाणे प्रवास गृहीत धरला तर पुण्यात चांदोबा स्वस्त मिळेल ;).

काय मस्त आठवण काढली? चांदोबा,किशोर आणि कुमार माझ्या जास्त आवडीची मासिके होती.त्यामानाने चंपक आणि ठकठक मी विशेष वाचत नसे.किशोर आणि कुमार आमच्या घरी येत असत्,चांदोबा शैलाताई कडे.मी ३रीत असतानाच आईने शैलाताई बेडेकरच्या मनोरंजन वाचनालयात माझे नाव लहान मुलांच्या विभागात घातले होते,आणि तिच्याकडून पुस्तक घेऊन घरी येतानाच वाचत वाचत येत असे, आणि ते कोणीतरी घरी सांगितल्यावर ओरडाही मिळाला होता. शाळेत असताना ९ वीत बहुदा, किशोरच्या दिवाळी अंकात माझा एक लेख प्रसिध्द झाला होता आणि त्याचे मानधन म्हणून २५ रु चा चेक ही मिळाला होता, काय त्याचं अप्रूप तेव्हा वाटलं होतं! आता परत एकदा चांदोबा,किशोर,कुमार चाळली पाहिजेत. स्वाती

प्रमोद देव 30/09/2007 - 14:23
चांदोबा वाचण्यासाठी आम्ही भावंडे देखिल खूप धडपडत असायचो. स्वत: खरेदी करून वाचण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही ती वाचनालयात जाऊनच वाचत असू. नवी-जूनी जी हाताला लागतील ती वाचून काढत असू. तसेच किशोर,कुमार आणि अमृत,विचित्र-विश्व वगैरे मासिकेही वाचत असू. चांदोबातील चित्रे तर खासच असायची. त्यांची रंगसंगती देखिल विलक्षण आकर्षक असायची. मात्र चांदोबा मध्ये एकदा बंद पडल्यानंतर पुन्हा जेव्हा सुरु झाला तेव्हापासून त्यातले आकर्षण कमी झाले. त्याला कारण त्याचा पूर्वीचा रूबाब राहिला नाही असे मला मनापासून वाटते. तसेच आता अमरचित्रकथा आणि अशाच प्रकारचे नवे प्रकार बाजारात आल्यामुळे देखिल चांदोबाचे महत्व कमी झालेय असे वाटते. तरी देखिल चांदोबा ही जून्या पिढीतील लोकांची "मर्मबंधातली ठेव" आहे असे खात्रीने म्हणता येईल.

यनावाला 02/10/2007 - 22:03
मासिकासंबंधीचा श्री. आजानुकर्ण यांचा सचित्र सुंदर लेख आणि त्यावरील अनेक सदस्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला वैषम्य वाटले. सर्वांचा हेवा वाटला. कारण ज्या खेडेगावात माझे लहानपण गेले, तिथल्या शाळेत पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक मला वाचायला मिळाले नाही. शाळेला वाचनालय नव्हतेच. ते असते हे पुण्यात आल्यावर समजले. तोवर चांदोबा वाचायचे दिवस निघून गेले होते. घरी चांदोबा किंवा दुसरे कोणतेच नियतकालिक मागवण्याचा प्रश्नच नव्हता. असो. पुढे थोडे फार वाचले. पण त्या वयात वाचायला मिळाले नाही याची खंत वाटते.(विशेषतः हा लेख वाचून आपण अशा वाचनापासून वंचित राहिलो हे प्रकर्षाने जाणवले.)

देवदत्त 30/10/2007 - 23:13
मस्त वाटले वाचून. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद :) विक्रम वेताळ हे तर छानच होते. त्याचबरोबर इतर कथाही छान होत्या. तुम्ही फक्त चांदोबाबद्दल लिहिले आहे परंतु त्याचबरोबर इतरही लिहावेसे वाटते. मी ही लहानपणी चांदोबा, किशोर, चंपक, ठकठक भरपूर वाचायचो. तसेच हिंदीमधील सुमन सौरभ ही. ह्या सर्वांत चांदोबा उठून दिसत असावा त्यातील रंगीत पानांमुळे. आणि चांदोबा हे पुस्तक असे की सर्व वयोगटात कोणीही घेऊन वाचू शकतो. आणखी ही पुस्तके होती बहुधा आता आठवत नाही. सर्व वाचायला मजा यायची. शिवाय डायमंड कॉमिक्स ही भरपूर. आमच्याकडे एवढी पुस्तके झाली होती की ३ मित्रांनी मिळून मग आमच्या कॉलनीत वाचनालयच सुरू केले होते. २ २१/२ वर्षे चालविले ते. :) गेल्या वर्षी बंगळूर मध्ये एका मित्रा सोबत ह्याच पुस्तकांबद्दल चर्चा झाली होती. मग काय लगेच गेलो बुक स्टॉल वर आणि विचारले चांदोबा, चंदामामा आहे का? नव्हते. पण चंपक मिळाले. (ह्या सर्व पुस्तकांच्या शोधात) देवदत्त

देवदत्त 15/05/2008 - 22:47
:) नुकत्याच आलेल्या विपत्रातून चंदामामाच्या संकेतस्थळाचा पत्ता मिळाला. :( इथे सध्या नवीन कथा इंग्रजी, तमिळ व तेलूगू ह्याच भाषेत आहेत :) परंतु जुने अंक ( जुने म्हणजे किती जुने हो ? हिंदी: १९४९ ते १९६१, इंग्रजी: १९५५ ते १९८५ इत्यादी इत्यादी) उपलब्ध आहेत. :( मराठी नाहीत हीच खंत. :) मी सप्टे. १९६१ ची प्रत डाऊनलोड केली आहे. पाहीन वाचून

छोटा डॉन 15/05/2008 - 23:26
आजानुकर्णा, काय आठवण काढलीस रे चांदोबाची , एकदम लहानपण आठवले ... साधारणाता आमचे लहानपण हे "चांदोबा, ठकठक, चाचा चौधरी" वाचण्यात, गोट्या / आंब्याच्या कोया [ उच्चारी कुया ] खेळण्यात, झालच तर आईचा मार खाण्यात गेले ... आईचा मार खायचे मेन कारण असायचे चांदोबा, कारण पुस्तक एक आणि वाचणारे ३ जण, त्यात मोठा मी आणि माझ्या २ लहान बहिणी. मग मी पुस्तक बळकावयाचो आणि बहिणी तक्रार घेऊन आईकडे जायचा व मला मग पडती बाजू घ्याय्ला लागायची. मग ती गेल्याव्र पुन्हा चांदोबावर माझा कब्जा [ सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल की माझी "डॉनगिरी " ही तेव्हापासूनची बरं का ! ] माझा एक आत्तेभाऊ होता, त्याच्याकडे "ठकठक" यायचे. मग २-३ महिन्यात आमची जेव्हा एकमेकाकडे चक्कार व्हायची तेव्हा "चांदोबा आणि ठकठक" ची अदलाबदल हमखास . ... तेव्हा "एका चांदोबामागे २ ठकठक " असा रेट पडायचा ... आजही जर कुठे मिळाले तर वाचायला जरूर आवडेल ... चांदोबाचा व्यवहार करणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मदनबाण 16/05/2008 - 04:45
मलाही चांदोबा वाचायला फार आवडत असे.....विक्रम-वेताळाची गोष्ट तर मला फार आवडत असे..... चंपक आणि ठकठक पण वाचायचो...ठकठक मधील दिपू दी ग्रेट या व्यक्तीरेखेचा मी जबरदस्त पंखा होतो..... (बालपणीच्या रम्य आठवणीत रमलेला) मदनबाण.....

ईश्वरी 16/05/2008 - 00:06
वा, वा मस्त आठवण करून दिलीत. विक्रम वेताळ माझ्याही आवडीची गोष्ट असायची. त्यातल्या त्यात वेताळाचा कूट प्रश्न आणि त्याचे विक्रमाने चतुराईने दिलेले उत्तर हे वाचायला छान वाटायचे. किशोर ही माझ्या खास आवडीचे पुस्तक होते. तुम्ही ते विक्रम वेताळ चे चित्र टाकून लेखाची रंजकता वाढवली आहे. चांदोबाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. एक प्रश्नः तमीळ / तेलगू भाषेतील चांदोबाचे नाव काय होते? ईश्वरी

ॐकार 16/05/2008 - 01:41
चांदोबा, ठकठक, चंपक, किशोर याचबरोबर अबब हाती, छावा चे अंकही वाचायचो. आम्ही ३-४ मित्र मिळून प्रत्येक जण एकेक अंक विकत घेत असे( म्हणजे आई वडील आणून द्यायचे) आणि मग आम्ही अदलाबदल करून वाचत असू. राजू आणि छोटी खार अजूनही आठवते!

मुक्तसुनीत 16/05/2008 - 01:55
"हे राजा ....या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असूनही .........शकले उडतील !" - पंचतंत्र (कृतप्रणाश , अकृतागम वगैरे शब्द इथे पहिल्यांदा वाचले) -तिळ्या बहिणी चांदोबांच्या अर्कचित्रांची एक शैली होती. सर्व राजे मिशीवाले , ब्राम्हण लांबच लांब शेंडीवाले असायचे ....

विजुभाऊ 16/05/2008 - 13:01
कृतप्रणाश हा शब्द असा नसुन तो लब्धप्रणाश असा आहे. पंच तंत्रापैकी एका तंत्राचे हे नाव आहे. विष्णुशर्मा ने मित्र लाभ , मित्र भेद , काकोलुकीय , लब्धप्रणाश ,( पाचवे नाव आठवत नाही) अशी एकुणपाच तंत्रे लिहीली आहेत. करटक ,हिडींबक , दमनक अशी नावे या प्रकारणात येतात.

कलंत्री 16/05/2008 - 20:20
यनावालांच्या लिखाणात लिहिल्याप्रमाणे आजही खेड्यात वाचनाचे सूख मिळत नाही. त्यासाठी आपण आपल्या / कुटुंबियांच्या वाढदिवसाला या अंकाची भेट गरिबमुलांना वार्षिक अंकाच्या निमित्त्याने नक्कीच देऊ शकतो. बाकी लेख अप्रतिमच आहे आणि सचित्र असल्यामूळे रंगत काही वेगळीच झाली आहे. मित्रा आजानुकर्णा : असे लेख वर्तमानपत्रात आले पाहिजे.
काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?

चोचले

सहज ·

प्रियाली 28/09/2007 - 21:39
>> पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी? नसावा. आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. सकाळी उठून बायकोसाठी चहा टाकणारे अनेक असावेत पण तिला टोस्टवर बटरपेक्षा क्रिमचीज आवडते हे आणि असे लक्षात ठेवून रोज ब्रेकफास्ट तिच्या पुढ्यात ठेवणारा नसावा. बरेच पुरुष आनंदाने स्वयंपाक करताना दिसतात, त्यापैकी आपल्या बायकोला आवडते म्हणून मी हा स्वयंपाक करतो म्हणणार्‍यांचे प्रमाण अधिक असते की ती नॉनवेज खात नाही, तिला हे आमच्या पद्धतीचे जमत नाही म्हणून मी हे करतो - असे सांगणारे नवरे अधिक असतात त्याचा मला अंदाज नाही. (या क्याटेगरीत न बसणार्‍या पुरुषांनी मला माफ करा.) त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल? >>Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what! शेवट आवडला. सहजराव, लिहित जा!

आमच्या चर्चाप्रस्तावावरुन इतके सुंदर स्फूट सुचत असेल आणि प्रत्यक्षातही तसे असेल म्हणजे मित्र परिवारात आणि घरीही जर आपल्या हातांनी उत्तम जेवण बनणार असेल( पण नसेलच बनवत तुम्ही, माझा विश्वास आहे,तर आम्ही आमच्या चर्चा प्रस्तावाचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणू !:) खरे तर उभयता मिळून पदार्थ करायला पाहिजेत,  बिघडले तर जवाबदारी ढकलायला आपण मोकळे ! स्फूट झक्कास झालंय  ! येऊ दे आणखी असेच खमंग, आम्ही आहोतच डीशमधे ओतून घ्यायला ! :) आपला किचनकडील प्रवास  पाहून, आम्हीही एक दिवस किचन मधे चिकनची तंगडी शिजवत दिसलो तर आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे झालं !  :)  आपले लेखन दिलसे आवडतेच आम्हाला, सहजराव लिहित राहा ! अवांतर;) शुद्धलेखनाला संकेतस्थळावर घाबरणारे दोनच माणसे, एक तुम्ही आणि एक आम्ही ! आपल्या लेखनाचे शुद्धलेखन तपासणा-यांना देव कधीही क्षमा करणार नाही ! ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव 28/09/2007 - 23:21
सहजराव लेख अतिशय सहज उतरलाय!आवडला. पण बायकोला खरेच मदत करता ना? की हे नुस्ते मनातले विचार आहेत? आणि सौ. ने लेख वाचला तर मात्र खरोखरच काम करायला लागेल. तेव्हा आत्तापासूनच कंबर कसा!

चित्रा 28/09/2007 - 23:50
मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला. :-) बरा लिहीता की लेख तुम्ही! तुमचे वाचून इथे कधीही घरात मदत न केलेल्या पुरुषाने ती केली (खाण्याव्यतिरिक्त) तर खूपच झाले म्हणायचे. लिहीत जा असेच.

राजे 29/09/2007 - 01:16
:-) बस अविवाहीत व्यक्ती इतकाच प्रतिसाद लिहू शकतो. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

सहज 29/09/2007 - 06:29
प्रतीसादाबद्दल सर्वांचे आभार! राजे, कदाचीत तुम्हाला "एकटा" (सिंगल ह्या अर्थी म्हणायचेय) कारण अविवाहीत म्हणजे "लग्नाशिवाय"असा देखील अर्थ होतो आजकाल. :-) --------------------------------------------------------------------------------------------- अजून नवीन कथा लिहावी का धनंजयांसारखे स्व-समीक्षण लिहावे?

बेसनलाडू 29/09/2007 - 07:22
मस्त लेख. खूप आवडला. आमचे वाचनाचे चोचले असेच पुरवत रहा राव! म्हणजे "तुझं वाचन किती, तू बोलतोस किती" असं कुणी पचकलं की आम्ही आमच्या वाचनाचे दुवे देऊ ;) (अधाशी)बेसनलाडू

लेख आवडला, आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. या प्रियाली यांच्या वाक्याशी अगदी स्वानुभवाने सहमत! स्वाती

विकास 30/09/2007 - 19:44
सहजराव, आपला लेख आवडला. अगदी सहजशैलीतील आहे. असेच अजून वाचायची वाट पाहातोय. खरे लगेच उत्तर देयचे होते पण काय करणार, घरात माणसांचा राबता, मग, रांधा-वाढा-उष्टी काढा मधे डोके वर काढायला वेळच मिळाला नाही! :-)

सर्किट 01/10/2007 - 10:21
मी काही वर्षे घरी स्वयंपाक केला. मग लग्न झाले. स्वयंपाकघरातली सर्व रचना बदलली. सगळे कंप्लीटली इल्लॉजिकल झाले. मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला. - सर्किट कपूर

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 01/10/2007 - 11:44
:-) तरी खरय म्हणा त्यांच्या मनासारख / तिकडच्यासारखच तसंच होऊ दिले   की देखील चोचले पूरवले जातात नाही का? शेवटी आम खानेसे मतलब, पेड, गूठली सब कंप्लीटली ....

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 26/05/2010 - 08:03
काण्ट स्टॉप रिप्लाईंग !! वंडरफुल पोस्ट :)
मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं".
=)) =)) सर्किट्याला ऐकुन घ्यावं लागलं ? सर्किटाईन कशी असेल ? जस्ट कॅन इमॅजिन ;) -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 26/05/2010 - 08:36
सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....?
कोण साला रिकामा धागे वर आणुन र्‍हायलाय रे ... ???? अवांतर : लेख डबल डबल आवडला ? =)) -(प्राडाँचा राईट हँड चा आंगठा) ठॉ.ठॉ. ठॉठॉठॉ करुदे

गणपा 26/05/2010 - 16:38
हा हा हा मस्त लेख :) वाचलाच नव्हता. >>सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....? जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद ;)

आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही. जबरदस्त! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

फटू 26/05/2010 - 19:53
अगदी मित्रांशी दिलखुलास गप्पा माराव्यात इतक्या "सहज"तेने लिहिलंय. बायकोचा अनुभव नाही परंतू हल्ली आईला माझ्या जेवणाच्या आणि कपडे धुण्याच्या नखर्‍यांचा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतो. पुर्वी घरी जाताना सॅक आठवडाभर घातलेल्या कपडयांनी भरलेली असायची. आता तसं होत नाही. कपडे इथेच शुक्रवारी धुतले जातात. दिड वर्ष अमेरिकेत भांडी घासण्याच्या अनुभवाने खुप शहाणा झालोय. हेच शहाणपण बायकोच्याही कामी आलं तर अगदी गुणी नवरा मिळाला म्हणून धन्य होईल :P - फटू

अरुंधती 23/06/2010 - 22:03
छान लिहिले आहे! ह्या लेखावरुन स्फूर्ती घेऊन अनेक पतीदेवांना आपल्या सहधर्मचारिणीसोबत स्वयंपाक करण्याची प्रेरणा मिळो व खमंग खाण्याचा खर्‍याखुर्‍या अर्थाने रसास्वाद घ्यायला मिळो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

तुम्हाला सापडलेल्या व आवडलेल्या चमचमीत 'पाककृती' लिहायला विसरू नका. :) या डिशमध्ये घातलेला मसाला गमतीदार आहे. अळूचं फदफदं खाता खाता त्याचा शाही कुर्मा कधी होतो कळत नाही. बाकी जोडीने करायचा 'स्वयं'पाक हे cotradiction in terms नाही का? मात्र पुढच्या वेळी इतकं तरल लिहू नका. साल्मन मधले काटे काढून टाकले, त्याचा रंग बदलला, आणि लोकांनी तो खोबरं म्हणून खाल्ला तर काय उपयोग? प्रतिसाद देणारे बिचारे अळूबद्दल, खोबर्‍याबद्द्ल लिहितात...:)
"आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला.
अरेरे...
त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल?
फारच तेजोभंग होत असेल. थांबतो.

In reply to by राजेश घासकडवी

सहजकाका, झरणी आणि सुरी दोन्ही म्यान केल्या आहेत का? आणि का? (राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती
तुला दोघांनी स्वतंत्रपणे केलेला स्वयंपाक म्हणायचं आहे असं गृहित धरतो...:) उगाच लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मध्यमवर्गीय कल्पनांना तडा जायला नको...

प्रियाली 28/09/2007 - 21:39
>> पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी? नसावा. आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. सकाळी उठून बायकोसाठी चहा टाकणारे अनेक असावेत पण तिला टोस्टवर बटरपेक्षा क्रिमचीज आवडते हे आणि असे लक्षात ठेवून रोज ब्रेकफास्ट तिच्या पुढ्यात ठेवणारा नसावा. बरेच पुरुष आनंदाने स्वयंपाक करताना दिसतात, त्यापैकी आपल्या बायकोला आवडते म्हणून मी हा स्वयंपाक करतो म्हणणार्‍यांचे प्रमाण अधिक असते की ती नॉनवेज खात नाही, तिला हे आमच्या पद्धतीचे जमत नाही म्हणून मी हे करतो - असे सांगणारे नवरे अधिक असतात त्याचा मला अंदाज नाही. (या क्याटेगरीत न बसणार्‍या पुरुषांनी मला माफ करा.) त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल? >>Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what! शेवट आवडला. सहजराव, लिहित जा!

आमच्या चर्चाप्रस्तावावरुन इतके सुंदर स्फूट सुचत असेल आणि प्रत्यक्षातही तसे असेल म्हणजे मित्र परिवारात आणि घरीही जर आपल्या हातांनी उत्तम जेवण बनणार असेल( पण नसेलच बनवत तुम्ही, माझा विश्वास आहे,तर आम्ही आमच्या चर्चा प्रस्तावाचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणू !:) खरे तर उभयता मिळून पदार्थ करायला पाहिजेत,  बिघडले तर जवाबदारी ढकलायला आपण मोकळे ! स्फूट झक्कास झालंय  ! येऊ दे आणखी असेच खमंग, आम्ही आहोतच डीशमधे ओतून घ्यायला ! :) आपला किचनकडील प्रवास  पाहून, आम्हीही एक दिवस किचन मधे चिकनची तंगडी शिजवत दिसलो तर आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे झालं !  :)  आपले लेखन दिलसे आवडतेच आम्हाला, सहजराव लिहित राहा ! अवांतर;) शुद्धलेखनाला संकेतस्थळावर घाबरणारे दोनच माणसे, एक तुम्ही आणि एक आम्ही ! आपल्या लेखनाचे शुद्धलेखन तपासणा-यांना देव कधीही क्षमा करणार नाही ! ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव 28/09/2007 - 23:21
सहजराव लेख अतिशय सहज उतरलाय!आवडला. पण बायकोला खरेच मदत करता ना? की हे नुस्ते मनातले विचार आहेत? आणि सौ. ने लेख वाचला तर मात्र खरोखरच काम करायला लागेल. तेव्हा आत्तापासूनच कंबर कसा!

चित्रा 28/09/2007 - 23:50
मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला. :-) बरा लिहीता की लेख तुम्ही! तुमचे वाचून इथे कधीही घरात मदत न केलेल्या पुरुषाने ती केली (खाण्याव्यतिरिक्त) तर खूपच झाले म्हणायचे. लिहीत जा असेच.

राजे 29/09/2007 - 01:16
:-) बस अविवाहीत व्यक्ती इतकाच प्रतिसाद लिहू शकतो. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

सहज 29/09/2007 - 06:29
प्रतीसादाबद्दल सर्वांचे आभार! राजे, कदाचीत तुम्हाला "एकटा" (सिंगल ह्या अर्थी म्हणायचेय) कारण अविवाहीत म्हणजे "लग्नाशिवाय"असा देखील अर्थ होतो आजकाल. :-) --------------------------------------------------------------------------------------------- अजून नवीन कथा लिहावी का धनंजयांसारखे स्व-समीक्षण लिहावे?

बेसनलाडू 29/09/2007 - 07:22
मस्त लेख. खूप आवडला. आमचे वाचनाचे चोचले असेच पुरवत रहा राव! म्हणजे "तुझं वाचन किती, तू बोलतोस किती" असं कुणी पचकलं की आम्ही आमच्या वाचनाचे दुवे देऊ ;) (अधाशी)बेसनलाडू

लेख आवडला, आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. या प्रियाली यांच्या वाक्याशी अगदी स्वानुभवाने सहमत! स्वाती

विकास 30/09/2007 - 19:44
सहजराव, आपला लेख आवडला. अगदी सहजशैलीतील आहे. असेच अजून वाचायची वाट पाहातोय. खरे लगेच उत्तर देयचे होते पण काय करणार, घरात माणसांचा राबता, मग, रांधा-वाढा-उष्टी काढा मधे डोके वर काढायला वेळच मिळाला नाही! :-)

सर्किट 01/10/2007 - 10:21
मी काही वर्षे घरी स्वयंपाक केला. मग लग्न झाले. स्वयंपाकघरातली सर्व रचना बदलली. सगळे कंप्लीटली इल्लॉजिकल झाले. मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला. - सर्किट कपूर

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 01/10/2007 - 11:44
:-) तरी खरय म्हणा त्यांच्या मनासारख / तिकडच्यासारखच तसंच होऊ दिले   की देखील चोचले पूरवले जातात नाही का? शेवटी आम खानेसे मतलब, पेड, गूठली सब कंप्लीटली ....

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

टारझन 26/05/2010 - 08:03
काण्ट स्टॉप रिप्लाईंग !! वंडरफुल पोस्ट :)
मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं".
=)) =)) सर्किट्याला ऐकुन घ्यावं लागलं ? सर्किटाईन कशी असेल ? जस्ट कॅन इमॅजिन ;) -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 26/05/2010 - 08:36
सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....?
कोण साला रिकामा धागे वर आणुन र्‍हायलाय रे ... ???? अवांतर : लेख डबल डबल आवडला ? =)) -(प्राडाँचा राईट हँड चा आंगठा) ठॉ.ठॉ. ठॉठॉठॉ करुदे

गणपा 26/05/2010 - 16:38
हा हा हा मस्त लेख :) वाचलाच नव्हता. >>सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....? जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद ;)

आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही. जबरदस्त! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

फटू 26/05/2010 - 19:53
अगदी मित्रांशी दिलखुलास गप्पा माराव्यात इतक्या "सहज"तेने लिहिलंय. बायकोचा अनुभव नाही परंतू हल्ली आईला माझ्या जेवणाच्या आणि कपडे धुण्याच्या नखर्‍यांचा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतो. पुर्वी घरी जाताना सॅक आठवडाभर घातलेल्या कपडयांनी भरलेली असायची. आता तसं होत नाही. कपडे इथेच शुक्रवारी धुतले जातात. दिड वर्ष अमेरिकेत भांडी घासण्याच्या अनुभवाने खुप शहाणा झालोय. हेच शहाणपण बायकोच्याही कामी आलं तर अगदी गुणी नवरा मिळाला म्हणून धन्य होईल :P - फटू

अरुंधती 23/06/2010 - 22:03
छान लिहिले आहे! ह्या लेखावरुन स्फूर्ती घेऊन अनेक पतीदेवांना आपल्या सहधर्मचारिणीसोबत स्वयंपाक करण्याची प्रेरणा मिळो व खमंग खाण्याचा खर्‍याखुर्‍या अर्थाने रसास्वाद घ्यायला मिळो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

तुम्हाला सापडलेल्या व आवडलेल्या चमचमीत 'पाककृती' लिहायला विसरू नका. :) या डिशमध्ये घातलेला मसाला गमतीदार आहे. अळूचं फदफदं खाता खाता त्याचा शाही कुर्मा कधी होतो कळत नाही. बाकी जोडीने करायचा 'स्वयं'पाक हे cotradiction in terms नाही का? मात्र पुढच्या वेळी इतकं तरल लिहू नका. साल्मन मधले काटे काढून टाकले, त्याचा रंग बदलला, आणि लोकांनी तो खोबरं म्हणून खाल्ला तर काय उपयोग? प्रतिसाद देणारे बिचारे अळूबद्दल, खोबर्‍याबद्द्ल लिहितात...:)
"आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला.
अरेरे...
त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल?
फारच तेजोभंग होत असेल. थांबतो.

In reply to by राजेश घासकडवी

सहजकाका, झरणी आणि सुरी दोन्ही म्यान केल्या आहेत का? आणि का? (राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती
तुला दोघांनी स्वतंत्रपणे केलेला स्वयंपाक म्हणायचं आहे असं गृहित धरतो...:) उगाच लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मध्यमवर्गीय कल्पनांना तडा जायला नको...
(प्रस्तावना - प्रा.डॉ. बिरूटे सरांनी उपक्रमावर "मराठी साहीत्यातील स्त्रीवाद" चर्चाप्रस्ताव मांडला तो व त्यातील प्रतिसाद वाचून हे स्फूट. वाटल्यास आधी मूळ चर्चा वाचून घ्या. "मध्यमवर्गीय पांढरपेश्या" मनाला अश्लील वाटू न देता "प्रौढांसाठी" लेखन करता येईल का? हा स्वत:ला दिलेला चॅलेन्ज. भावना दुखावल्या असतील तर माफी तसेच हा संवैधानीक इशारापण समजा. आगे आपकी मर्जी. शुध्दलेखन तुमच्या मनासारखे जमले असते तर आम्हालाही आवडले असते, पण तेवढ घ्या सांभाळून.) मित्रपरीवारासाठी लिखाण करताना कशाला हवाय काटेकोरपणा? सांभाळून घेतील, काही कमी जास्त असेल तर सांगतील.

गोडबोले सरांचा परिचय!

विसोबा खेचर ·

वाचक्नवी 07/04/2008 - 20:54
वांगमय (च्यामारी हा शब्द कसा लिहितात कुणास ठाऊक?:) व्हीएए-कॅपिटल जी-एमए-वायए असा .--वाचक्‍नवी धन्यवाद! आपल्या सांगण्याप्रमाणे बदल केलाय! संपादक

तात्या, गोडबोलेसरांचा परीचय करुन दिल्याबद्दल आभारी आहे. गोडबोले सरांचेही स्वागत. त्याचे विविधांगी लेखन वाचायला आवडेल. पुण्याचे पेशवे

आनंदयात्री 08/04/2008 - 11:18
तात्या तुम्ही त्यांना सांगा मिपा वर यायला अन त्यांचे अनुभव ज्ञान आपल्याबरोबर वाटायला. संस्कृत मधला ज्ञानी माणुस, तोफखाना विभागात काम केलेला नक्कीच अनुभव समृद्ध असणार. बाकी "दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व" हे पुस्तक कशाबद्दल आहे ??

केशवराव 08/04/2008 - 18:21
तात्या , एका जुन्या मित्राची मि.पा. वर अशी भेट झाली ; खुप खुप बरे वाटले. हेच गोडबोले सर [अशोकराव ] आर्.सी.एफ.च्या किहीम शाळेवर मुख्याध्यापक होते. आमच्या ग्रुपचे ते एक सदस्य होते. अजुनही पनवेलला भेट - गाठ होते. आमचे एक मित्र श्री. विश्वास भिडे यांचेकडे. भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला हा माणुस; संगीत, वांङ मय, धर्मकारण, रामायण - महाभारत आणि कितीतरी गोष्टींवर सहज बोलायचा ..... बस ऐकत रहावे. ' मोहन रानडे ' वर त्यांनी केलेली कोटी-----' मोह नरा नडे ' अशा आमच्या सरांनी मि.पा. वर लिहीले तर बहारच येईल. वाट पहात आहोत. गोडबोले सरांचा स्नेही....... केशवराव.

वाचक्नवी 07/04/2008 - 20:54
वांगमय (च्यामारी हा शब्द कसा लिहितात कुणास ठाऊक?:) व्हीएए-कॅपिटल जी-एमए-वायए असा .--वाचक्‍नवी धन्यवाद! आपल्या सांगण्याप्रमाणे बदल केलाय! संपादक

तात्या, गोडबोलेसरांचा परीचय करुन दिल्याबद्दल आभारी आहे. गोडबोले सरांचेही स्वागत. त्याचे विविधांगी लेखन वाचायला आवडेल. पुण्याचे पेशवे

आनंदयात्री 08/04/2008 - 11:18
तात्या तुम्ही त्यांना सांगा मिपा वर यायला अन त्यांचे अनुभव ज्ञान आपल्याबरोबर वाटायला. संस्कृत मधला ज्ञानी माणुस, तोफखाना विभागात काम केलेला नक्कीच अनुभव समृद्ध असणार. बाकी "दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व" हे पुस्तक कशाबद्दल आहे ??

केशवराव 08/04/2008 - 18:21
तात्या , एका जुन्या मित्राची मि.पा. वर अशी भेट झाली ; खुप खुप बरे वाटले. हेच गोडबोले सर [अशोकराव ] आर्.सी.एफ.च्या किहीम शाळेवर मुख्याध्यापक होते. आमच्या ग्रुपचे ते एक सदस्य होते. अजुनही पनवेलला भेट - गाठ होते. आमचे एक मित्र श्री. विश्वास भिडे यांचेकडे. भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला हा माणुस; संगीत, वांङ मय, धर्मकारण, रामायण - महाभारत आणि कितीतरी गोष्टींवर सहज बोलायचा ..... बस ऐकत रहावे. ' मोहन रानडे ' वर त्यांनी केलेली कोटी-----' मोह नरा नडे ' अशा आमच्या सरांनी मि.पा. वर लिहीले तर बहारच येईल. वाट पहात आहोत. गोडबोले सरांचा स्नेही....... केशवराव.
राम राम मंडळी, माझे संगीतक्षेत्रातले स्नेही डॉ अशोक गोडबोले हे मिसळपावचे एक सन्माननीय सदस्य आहेत. परंतु 'मिसळपावचे सदस्य' एवढीच त्यांची ओळख मला थोडी अपुरी वाटते. आणि म्हणूनच मी या विद्वान व्यक्तिबद्दल येथे चार शब्द लिहू इच्छितो. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर असामान्य प्रभूत्व, संतसाहित्याचा गाढा अभ्यास, संस्कृतचा प्रकांडपंडित आणि संस्कृत साहित्याचा अतिशय दांडगा व्यासंग, ही गोडबोले सरांची वैशिष्ठ्ये म्हणता येतील. गणित व तत्वज्ञान, वाङ्मय हे सरांचे अतिशय आवडीचे विषय. त्याचप्रमाणे गोडबोले सर मराठी, संस्कृत, व हिंदी भाषेतून काव्यरचनाही अतिशय उत्तम करतात.

चकाट्या - २

ॐकार ·

प्रियाली 27/09/2007 - 23:33
कवितेची गुंफण लाजवाब! >>कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला बिग शिश्टर शिल्पा! >>मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला मुकेश अंबानी! >>येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या शिवडीला येणारे फ्लेमिंगो >>ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या! अनंतचतुर्दशी! सर्व बातम्या म.टा.त होत्या. :-) चकाट्या मस्तच आहेत. अजून येऊ देत.

प्रवासी 30/09/2007 - 11:33
वा ॐकारराव, उपक्रम आवडला. आपला ('वृत्त'प्रेमी) प्रवासी

प्रियाली 27/09/2007 - 23:33
कवितेची गुंफण लाजवाब! >>कुणी अडवले उडावयाला चुंबनमूर्ती ललनेला बिग शिश्टर शिल्पा! >>मुठीत घ्यावे जगास सांगे देशी कुबेर अलबेला मुकेश अंबानी! >>येतील गुलबट पक्षी , खाडीमध्ये झाडे लावू द्या शिवडीला येणारे फ्लेमिंगो >>ऊंच गणपती बुडवा, मिरवा! उत्सव ऐसा चालू द्या! अनंतचतुर्दशी! सर्व बातम्या म.टा.त होत्या. :-) चकाट्या मस्तच आहेत. अजून येऊ देत.

प्रवासी 30/09/2007 - 11:33
वा ॐकारराव, उपक्रम आवडला. आपला ('वृत्त'प्रेमी) प्रवासी
3

घर

सुवर्णमयी ·

राजे 25/09/2007 - 20:20
ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... ऐका हो ऐका..घर हव आहे का? माणसाला माणूस हवा आहे का? (तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच!) क्या बात है, मस्तच. तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! उत्तमच, अशी घरे पाहीली की खरोखर दुख: होते, शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. एकदम समयसूचक कविता. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. खर आहे राजे. माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली 25/09/2007 - 21:48
शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. अगदी!! माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. वाह! कविता मस्तच आहे! आवडली.

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 25/09/2007 - 23:13
साहेब, अश्या ह्या घराच्या भिंती किती कमजोर असतात हे तुम्हाला माझी सफरच्या ८ / ९ भागात लक्षात येईल असे दोन भयानक अनूभव आहेत माझ्या जवळ की आज देखील काळजाचा थरकाप उडतो विचार केला की. ही ग्लोबल मंडळी देश विदेशाच्या वा-या करतात किंवा दिवस रात्र कंपनी मध्ये पैश्यासाठी राबतात पण येथे घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांची काय अबाळ होते हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी खुप मोठा काळ निघून जावा लागतो पण तो पर्यंत त्या भींती ढासळलेल्या असतात. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 25/09/2007 - 23:25
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. भारतात ऑर्कुट सारखी सोशल नेटवर्कस चालणार नाहीत अशी दहावर्षांपूर्वी मित्राशी पैज लावली होती. मी ती हरलो. कारण म्माणसांना ग्लोबल संबंधांचे असलेले आकर्षण. त्यासाठी लोकल संबंधांचा बळी पडतो, हे लक्षात सहसा येत नाही. - सर्किट

धनंजय 25/09/2007 - 21:35
पण हे कविता समजावून सांगणारे कडवे नसते तरीही कविता माझ्यासाठी तितकीच प्रभावी ठरली असती. > ही इथली माणस आहेत > त्या जगाच्या चार कोपऱ्यात... > संगणक मोबाईलने जोडलेली > पण मनान कधीच दूर गेलेली... ही कलाटणी फारच आवडली : > प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे > हवा तो सिक्रेटकोड नाही!

विसोबा खेचर 26/09/2007 - 07:40
लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... वा! छान कविता. वरील दोन कडवी जास्त आवडली.. सोनाली, मिसळपाववर तुझं स्वागत. अजूनही लिही... तात्या.

सहज 26/09/2007 - 08:30
मला हे अस ग्लोबल घर खूपच आवडते. बर्गर एखादे दिवशीचा मेन्यू असेलच पण वरणभात, साजूक तूप, खाराची मिरची, साबूदाणा खिचडी हद्दपार नाही केली हो. खर सांगतो खरीखूरी ढेकर तेव्हाच येते पण मला माझे ग्लोबल घर खूप आवडते. अहो मी एकटाच नाही आलेले सगळेच म्हणतात, रेडीफवर स्वतात विमान टीकीटे वाचले की माझ्या इनबॉक्स इमेल असतो, की पुढच्या महीन्यात काय प्रोग्रम आहे का, नवीन घर घेतलेस एकले. आत योग येणार म्हणुन. सुट्यांच्या मोसमात, दहावी , बारावीच्या आद्ल्या/पुढच्या वर्षी कॉन्फरेन्सच्या वेळी घराचे कौतुक होतेच होते. मला "भिकारी" पेशानी किंवा मनानी नाही हो खरच आलेला आवडत, पण बर्‍याचदा तोही म्हणतो आतून खरच ग्लोबल घर खूपच छान आहे हो. बाकी काळाचा महीमा सिक्रेटकोड लावावा लागतो.( पण गंमत सांगतो, आमच्या दुसर्‍या एक्विपमेंट्स वर फ्री मिळाला हो. लेटेस्ट मॉडेल सिक्रेटकोड २००७ आहे . :-)) संगणक, मोबाइल ने "जोडलीच" ना माणसे? आणी कोणाच्या मनाचे काही सांगता येते काय? जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल" तेव्हा माझ घर परमेश्वराला पण आवडल हे समजत. देवबाप्पा म्हणतो अरे घराच घरपण माणसातच असत. मला माझ ग्लोबलघर खूपच आवडत. -------------------------------------------------------------- सुवर्णमयी आपली कविता आवडली. मनात एकदा स्टॉकटेकींग करता आला बरे वाटले.

In reply to by सहज

सर्किट 26/09/2007 - 10:45
सहजराव, अपल्या प्रतिसादाने काही दालनांची दारे किलकिली केली. विचार शील आहे सध्या. ह्या विषयावर काही समग्र वगैरे लेखन व्हावे. - (ग्लोबल आणि लोकल) सर्किट

रंजन 26/09/2007 - 08:51
तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! जबर्‍या.

प्रमोद देव 26/09/2007 - 08:51
जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल.... ही आपुलकी शाब्दिकच ठीक असते.मात्र प्रत्यक्षात तसे वागायचे जर कुणी ठरवले तर ती आपत्तीच ठरेल हे सांगायला नको.मग अरब आणि उंट असे व्हायचे. उंट आत आणि अरब बाहेर!

In reply to by प्रमोद देव

सर्किट 26/09/2007 - 10:47
प्रमोदकाका, आपले म्हणणे आम्हालातरी अजीबात कळले नाही. उंट आत असला, आणि अरब बाहेर असला तर काय बिघडले ? उलट तसेच हवे. कारण आत आलेला अरब काहीही राडे घालू शकतो. - (बे-अरब) सर्किट

धोंडोपंत 14/10/2007 - 14:41
वा वा सोनालीताई, अप्रतिम कवितेबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. बर्‍याच कालावधीनंतर तुमच्या कवितेला अभिप्राय लिहीण्याची संधी मिळाली. ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. आपला, (आशावादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 16/10/2007 - 01:08
ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. प्रिय धोंड्या, थोडं करेक्शन करतो! मिसळपाव हे 'तात्याचं' नसून आपल्या सर्वांचं आहे आणि आपण सर्वांनी मिळूनच ते मोठं करायचं आहे, नावारुपाला आणायचं आहे! एकटा तात्या काहीच करू शकत नाही याची मला नम्र जाणीव आहे! आपला, ('साथी हाथ बढाना...' या गाण्यावर श्रद्धा असलेला!) तात्या.

राजे 25/09/2007 - 20:20
ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... ऐका हो ऐका..घर हव आहे का? माणसाला माणूस हवा आहे का? (तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच!) क्या बात है, मस्तच. तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! उत्तमच, अशी घरे पाहीली की खरोखर दुख: होते, शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. एकदम समयसूचक कविता. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. खर आहे राजे. माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली 25/09/2007 - 21:48
शेजारी कोण आहे हे सोडाच पण आपली मुले घरी कधी आली व त्यांनी आपला आभ्यास केला की नाही केला ह्या खैर-खबर देखील नसलेली घरे {माणसे} मी पाहत आहे रोज ह्यांचे दुखः आहे की घर आपले घरपण विसरले आहे. अगदी!! माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. वाह! कविता मस्तच आहे! आवडली.

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 25/09/2007 - 23:13
साहेब, अश्या ह्या घराच्या भिंती किती कमजोर असतात हे तुम्हाला माझी सफरच्या ८ / ९ भागात लक्षात येईल असे दोन भयानक अनूभव आहेत माझ्या जवळ की आज देखील काळजाचा थरकाप उडतो विचार केला की. ही ग्लोबल मंडळी देश विदेशाच्या वा-या करतात किंवा दिवस रात्र कंपनी मध्ये पैश्यासाठी राबतात पण येथे घरामध्ये त्यांच्या मुलाबाळांची काय अबाळ होते हे त्यांच्या लक्षात येण्यासाठी खुप मोठा काळ निघून जावा लागतो पण तो पर्यंत त्या भींती ढासळलेल्या असतात. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 25/09/2007 - 23:25
माणसं ग्लोबली जवळ आली पण लोकली लांब गेली. भारतात ऑर्कुट सारखी सोशल नेटवर्कस चालणार नाहीत अशी दहावर्षांपूर्वी मित्राशी पैज लावली होती. मी ती हरलो. कारण म्माणसांना ग्लोबल संबंधांचे असलेले आकर्षण. त्यासाठी लोकल संबंधांचा बळी पडतो, हे लक्षात सहसा येत नाही. - सर्किट

धनंजय 25/09/2007 - 21:35
पण हे कविता समजावून सांगणारे कडवे नसते तरीही कविता माझ्यासाठी तितकीच प्रभावी ठरली असती. > ही इथली माणस आहेत > त्या जगाच्या चार कोपऱ्यात... > संगणक मोबाईलने जोडलेली > पण मनान कधीच दूर गेलेली... ही कलाटणी फारच आवडली : > प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे > हवा तो सिक्रेटकोड नाही!

विसोबा खेचर 26/09/2007 - 07:40
लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ही इथली माणस आहेत त्या जगाच्या चार कोपऱ्यात... संगणक मोबाईलने जोडलेली पण मनान कधीच दूर गेलेली... वा! छान कविता. वरील दोन कडवी जास्त आवडली.. सोनाली, मिसळपाववर तुझं स्वागत. अजूनही लिही... तात्या.

सहज 26/09/2007 - 08:30
मला हे अस ग्लोबल घर खूपच आवडते. बर्गर एखादे दिवशीचा मेन्यू असेलच पण वरणभात, साजूक तूप, खाराची मिरची, साबूदाणा खिचडी हद्दपार नाही केली हो. खर सांगतो खरीखूरी ढेकर तेव्हाच येते पण मला माझे ग्लोबल घर खूप आवडते. अहो मी एकटाच नाही आलेले सगळेच म्हणतात, रेडीफवर स्वतात विमान टीकीटे वाचले की माझ्या इनबॉक्स इमेल असतो, की पुढच्या महीन्यात काय प्रोग्रम आहे का, नवीन घर घेतलेस एकले. आत योग येणार म्हणुन. सुट्यांच्या मोसमात, दहावी , बारावीच्या आद्ल्या/पुढच्या वर्षी कॉन्फरेन्सच्या वेळी घराचे कौतुक होतेच होते. मला "भिकारी" पेशानी किंवा मनानी नाही हो खरच आलेला आवडत, पण बर्‍याचदा तोही म्हणतो आतून खरच ग्लोबल घर खूपच छान आहे हो. बाकी काळाचा महीमा सिक्रेटकोड लावावा लागतो.( पण गंमत सांगतो, आमच्या दुसर्‍या एक्विपमेंट्स वर फ्री मिळाला हो. लेटेस्ट मॉडेल सिक्रेटकोड २००७ आहे . :-)) संगणक, मोबाइल ने "जोडलीच" ना माणसे? आणी कोणाच्या मनाचे काही सांगता येते काय? जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल" तेव्हा माझ घर परमेश्वराला पण आवडल हे समजत. देवबाप्पा म्हणतो अरे घराच घरपण माणसातच असत. मला माझ ग्लोबलघर खूपच आवडत. -------------------------------------------------------------- सुवर्णमयी आपली कविता आवडली. मनात एकदा स्टॉकटेकींग करता आला बरे वाटले.

In reply to by सहज

सर्किट 26/09/2007 - 10:45
सहजराव, अपल्या प्रतिसादाने काही दालनांची दारे किलकिली केली. विचार शील आहे सध्या. ह्या विषयावर काही समग्र वगैरे लेखन व्हावे. - (ग्लोबल आणि लोकल) सर्किट

रंजन 26/09/2007 - 08:51
तशी प्रत्येक घराला लागली आहे एक घर घर कायमचीच! जबर्‍या.

प्रमोद देव 26/09/2007 - 08:51
जाणारी व्यक्ति जेव्हा सांगते की "अगदी आपलेच घर आहे अस वाटल.... ही आपुलकी शाब्दिकच ठीक असते.मात्र प्रत्यक्षात तसे वागायचे जर कुणी ठरवले तर ती आपत्तीच ठरेल हे सांगायला नको.मग अरब आणि उंट असे व्हायचे. उंट आत आणि अरब बाहेर!

In reply to by प्रमोद देव

सर्किट 26/09/2007 - 10:47
प्रमोदकाका, आपले म्हणणे आम्हालातरी अजीबात कळले नाही. उंट आत असला, आणि अरब बाहेर असला तर काय बिघडले ? उलट तसेच हवे. कारण आत आलेला अरब काहीही राडे घालू शकतो. - (बे-अरब) सर्किट

धोंडोपंत 14/10/2007 - 14:41
वा वा सोनालीताई, अप्रतिम कवितेबद्दल सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन. बर्‍याच कालावधीनंतर तुमच्या कवितेला अभिप्राय लिहीण्याची संधी मिळाली. ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. आपला, (आशावादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर 16/10/2007 - 01:08
ह्या तात्याच्या मिसळपावामुळे जुने मित्रमंडळी पुन्हा येथे भेटतील असे मानावयास हरकत नाही. प्रिय धोंड्या, थोडं करेक्शन करतो! मिसळपाव हे 'तात्याचं' नसून आपल्या सर्वांचं आहे आणि आपण सर्वांनी मिळूनच ते मोठं करायचं आहे, नावारुपाला आणायचं आहे! एकटा तात्या काहीच करू शकत नाही याची मला नम्र जाणीव आहे! आपला, ('साथी हाथ बढाना...' या गाण्यावर श्रद्धा असलेला!) तात्या.
घर "या, या ,हे घर तुमचच आहे इथे पाहुण्यांच स्वागतच आहे" अशा पाट्या लावून आता म्हणे जागोजागी घरे आहेत फेंग शुई नि वास्तुशास्त्र पिऊन मोठी घरे उभे आहेत रिमोटकंट्रोलवर चालणारे एक जग त्यामध्ये सज्ज आहे खा अमेरिकन बर्गर फाईन घ्या कधी इटलीयन वाईन जरा चघळा संस्कृतीचे किस्से शोधा आपल्या भाषेचे हिस्से लागला जर आसामचा चहा होईल तयार सेकंदात दहा सीएनएन पहा रवीशंकर ऐका तस हे घर ग्लोबल बर का..... ऐका इथे कशाची उणीव नाही! दारावरच्या भिकाऱ्याला येथे प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे हवा तो सिक्रेटकोड नाही!

इ गप्पा

कौटील्य ·

राजे 23/09/2007 - 18:48
निलकांत शी संपर्क साधा, तोच योग्य व्यक्ती आहे सध्या मराठी महाजाल विश्वामध्ये जो तुम्हाला निसंकोच पणे मदत करेल. राजे (*हेच राज जैन आहेत)

राजे 23/09/2007 - 18:48
निलकांत शी संपर्क साधा, तोच योग्य व्यक्ती आहे सध्या मराठी महाजाल विश्वामध्ये जो तुम्हाला निसंकोच पणे मदत करेल. राजे (*हेच राज जैन आहेत)
मी ओरकुठ सारखे मराठी संकेतस्थळ बनवायचे या उद्देशाने egappa.com हे डोमेन नाव संरक्षित केले होते. काही अपरिहार्य कारणामुळे किंवा कार्यबाहुल्यामुळे मी ते विकसित करु शकत नाही. हे डोमेन नाव वापरुन कुणास काही करावयाचे असल्यास संपर्क साधावा.

एक रात्र..

प्राजु ·

विसोबा खेचर 23/09/2007 - 00:01
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल! धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :) तात्या.

प्राजु 23/09/2007 - 02:13
धन्यवाद तात्या.. पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. - प्राजु.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 23/09/2007 - 07:09
पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:) अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे! तात्या.

सिद्धू 12/12/2008 - 15:22
प्राजु, मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...

आपला अभिजित 12/12/2008 - 23:27
`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो! (अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)

आजानुकर्ण 13/12/2008 - 00:19
कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो. आपला, (गंगू हैबती) आजानुकर्ण

आपला अभिजित 13/12/2008 - 00:35
(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!) एक "धुंद' रात्र सख्या मी होते बावरी बाराची वेळही उलटलेली घड्याळातल्या काट्यावरी भूकभावनेशी खेळ किती खेळावा तरी, काळजाला घोर माझ्या "बाटली' तुझ्या उरी भेदरलेले क्षण सारे ना थाऱ्यावर तुझे नेत्र "गटारा'तूर अंग जाहले, रस्त्यावर असे ना कुत्रं रस्त्यावरची धूळ सारी चुंबून घे अंगावरी एक रात्र सख्या तूही घे लपेटून "कोठडी'!

सोनम 13/12/2008 - 17:41
कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

कविता मस्तच! छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:) अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)

विसोबा खेचर 23/09/2007 - 00:01
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल! धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :) तात्या.

प्राजु 23/09/2007 - 02:13
धन्यवाद तात्या.. पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. - प्राजु.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर 23/09/2007 - 07:09
पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:) अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे! तात्या.

सिद्धू 12/12/2008 - 15:22
प्राजु, मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...

आपला अभिजित 12/12/2008 - 23:27
`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो! (अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)

आजानुकर्ण 13/12/2008 - 00:19
कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो. आपला, (गंगू हैबती) आजानुकर्ण

आपला अभिजित 13/12/2008 - 00:35
(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!) एक "धुंद' रात्र सख्या मी होते बावरी बाराची वेळही उलटलेली घड्याळातल्या काट्यावरी भूकभावनेशी खेळ किती खेळावा तरी, काळजाला घोर माझ्या "बाटली' तुझ्या उरी भेदरलेले क्षण सारे ना थाऱ्यावर तुझे नेत्र "गटारा'तूर अंग जाहले, रस्त्यावर असे ना कुत्रं रस्त्यावरची धूळ सारी चुंबून घे अंगावरी एक रात्र सख्या तूही घे लपेटून "कोठडी'!

सोनम 13/12/2008 - 17:41
कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.

कविता मस्तच! छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:) अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)
मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. एक धुंद रात्र सख्या मी होते बावरी सय तुझी ही दाटलेली या माझ्या अंतरी मूक भावनांचा खेळ किती खेळावा परी काळजातली हुरहूर तुझ्या दाटली माझिया उरी आतुरलेले क्षण सारे साद घालिती तुझे नेत्र प्रणयातूर जाहले मी सर्वत्र तुझेच गात्र धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... - प्राजु.