मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली

Trump ·

कपिलमुनी 05/09/2022 - 00:31
मेटे , मिस्त्री प्रकरणात ड्रायव्हर ची चूक आहे. केवळ आपल्याकडे भारी गाडी आहे म्हणून कशीही दामटवायची वृत्ती या मृत्यू ना कारणीभूत ठरली आहे. भारतात रस्त्यावर हायवे ला ९० व राज्य मार्गावर ८० चे लिमिट आहे. ते पाळले असते तर खूप कमी धोका असतो.

तर्कवादी 05/09/2022 - 01:02
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विरुद्ध दिशेने जाणारे वाहन अनियंत्रित झाल्याने दुभाजक ओलांडून मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या कारवर धडकले आणि त्या अपघातात श्री अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. म्हणजे यात अभ्यंकर यांच्या वाहनचालकाची (बहुधा ते स्वतः की त्यांचे मित्र वाहन चालवत होते, आता नीट आठवत नाही) कोणतीही चूक नव्हती.

वामन देशमुख 05/09/2022 - 04:56
श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली --- धाग्यातील "जेव्हा कोणी दखलपात्र अपघात होईल तेव्हा ह्या धाग्यात त्याची नोंदी व्हावी." या विचाराशी सहमत.

मनो 05/09/2022 - 06:01
>आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे. आज श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली अर्पण करुन, मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो. असहमत. तुम्ही एक चांगली, लायक व्यक्ती आहात असेच मला वाटते. तुम्ही अशी काय चूक केली आहे की क्षमा मागत आहेत?

मनो 05/09/2022 - 06:07
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे फोटो पाहिले, गाडीची कंडीशन पाहता (गाडीच्या काचासुद्धा शाबूत आहेत)आणि ती सुरक्षितता प्रथम या दृष्टिकोनातून डिझाईन केलेली मर्सिडीज आहे हे लक्षात घेऊन अपघात फक्त मागच्या दोघांनाच जागेवर प्राणघातक ठरला हे पटत नाही. ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून अधिक माहिती मिळेलच, त्यावेळी कळेल. कदाचित मागील दोघांनी सीटबेल्ट लावलेला नसावा असा माझा अंदाज आहे. तो जर लावलेला असता तर ते किरकोळ इजेनिशी नक्की वाचले असते असं वाटतं.

जेम्स वांड 05/09/2022 - 07:41
आता तुम्ही स्वतःच, स्वतः लिहून मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो. असे म्हणताच आहात तर, एक लायक भारतीय म्हणून मी तुमच्यासारख्या नालायक भारतीयाची क्षमायाचना स्वीकार करून श्री सायरस मिस्त्री ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आशा आहे आपले दुःख अंमळ कमी होईल.

शाम भागवत 05/09/2022 - 07:46
सीटबेल्ट लावलेला नसेल तर मानेला बसलेला हिसका सहन होत नाही. साधारणत: बेसावध स्थितीत अचानक ब्रेक दाबला गेल्यास डोके पुढच्या सीटवर जोरात आदळते. हे आदळणे सीटबेल्टमुळे कमी हानीकारक ठरते. मानेचे विकार असल्यास, सीटबेल्ट लावाच असे मी सुचवीन. अगदी २५-३० वेग असतानासुध्दा गाडी अपघाताने अचानक थांबल्यास, मोठा धोका संभवू शकतो.

In reply to by शाम भागवत

जेम्स वांड 05/09/2022 - 07:55
असो, नसो, सीटबेल्ट लावणे हे कम्पल्सरी असेलच पाहिजे, नालायक भारतीय त्यात पण चोरी करतात, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या सीट बेल्ट न लावल्यास सतत बीप साऊंड, इंजिन immobilizer, warning lights असे सगळ्या सुविधा पुरवतात, तरी नालायक भारतीय ते लावत नाहीत, उलट तो साऊंड बंद करायला, बेल्ट ओढून तो अंगावरून न ओढता सीटच्या मागून नेऊन लॉक मध्ये अडकवून कारला पण मामु बनवतात !

जेम्स वांड 05/09/2022 - 08:17
वाचा ही बातमी, सीट बेल्ट नाहीत, ओव्हर स्पीडिंग, ९ मिनिटांत २० किलोमीटर अंतर कापलं. आता काय बोलणार ! १. नालायक भारतीयांच्या यादीत दिवंगत सायरस मिस्त्री पण जोडावेत ? २. का सरकारला शिव्या देऊन, सरकार अकार्यक्षम आहे हे माहिती असून आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणवला गेलेल्या मृत्यूच्या सापळ्यावर आपण जीवावर खेळून असली स्टंट करून नंतर परत सरकार वर आगपाखड करावी ?

In reply to by जेम्स वांड

Trump 05/09/2022 - 21:18
श्री जेम्स वांड, तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. तुम्हाला मी काय म्हटले आहे ते समजले नाही किंवा मी समजुन द्यायला कमी पडतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले. कृपया त्याला राजकीय रंग देऊ नये. -- लहान मुलांना शाळेमध्ये शिकवले जाते, नेहमी नियमांचे पालन करावे, जात भेद पाळु नये, भष्टाचार करु नये इ. इ. पण त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ? आपण किती लोकांना अभिमानाने भारतीय व्यवस्थेबद्दल एक समाज म्हणुन आपण अयशस्वी झालो आहोत.

In reply to by Trump

जेम्स वांड 06/09/2022 - 06:40
अयशस्वी, सामाजिक घटक नालायक का काय म्हणता तसे, मी नाही तसा. तुमच्या मताचा आदर आहेच अर्थात. त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ? मी सांगतो ना, द्वेषमूलक पिंड नसल्यामुळे मी बहुसंख्य गोष्टी अभिमानाने सांगतो पोरांना माझ्या तरी, त्या सांगण्यासाठी मला ओढूनताणून प्रयत्न करावे लागत नाहीत म्हणजेच मी बऱ्यापैकी अभिमानास्पद तत्व पाळतो बुआ.

रस्ते अपघात होतात त्या मधे मनुष्याच्या चुका काय कमी आहेत काय ? ना सीटबेल्ट लावायचे ना स्पीड लिमिट पाळायचे ना लेण ची शिस्त पाळायची अर्थात सरकार म्हणून त्यांची जबाबदारी खूप जास्त आहे की कमीत कमी रोड सुरक्षित बनवून सामान्य पामर लोकाना वापर्णया साठी तयार करावा, मला वाटत चूक सर्वांचीच आहे त्यामुळे तुम्ही उगाच स्वताला नालायक वगैरे म्हणून घेऊ नका

जब होवेगी उमर पुरी जब छुटे हुकूम हुजूरी जम के दूत बडे मजबूत जम से पडा झमेला रे! उड जायेगा हंस अकेला माणूस काहीच करू शकत नाही व परमेश्वर कुणाच्या मृत्यूचे श्रेय घेत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.

चौथा कोनाडा 07/09/2022 - 17:32
मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.
मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?

In reply to by चौथा कोनाडा

Trump 08/09/2022 - 18:19
मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?
तसे म्हणु शकत नाही. १. भारतीयांचा घटनात्मक हक्क फक्त भारतावरच पोचतो. आणि आशिया म्हटले, तर एकादा म्हणु शकतो. आशियाच का, जग का नाही ? २. आशियातील काही देश, सिंगापुर, जपान, दक्षिण कोरीया, तैवान इ. देशामधील वाहतुकव्यवस्थेबद्दल अजुन तरी वाईट ऐकले नाही.

तुर्रमखान 11/09/2022 - 16:12
आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.
दुर्दैवाने सहमत व्हावं लागत आहे. अश्या अपघाताचं खापर वेगावर फोडलं की झालं अशी समजूत आहे. मुळात 'वाहने सावकाश हाका', 'हळू जा' वगैरे रस्त्यावरच्या सुचना शुद्ध मुर्खपणा आहे. हळू म्हणजे किती? ८०, ६०, ५० की १०? स्पीड लिमिट किती रत्यांवर असतो. ते रस्ते त्यापर्यंतच्या वेगाने चालवण्यासारखे असतात का? लेन मार्कींग असतात का? बरं, सिटबेल्ट्साठी तरी साधे नियम आहेत का? जवळ जवळ सगळ्या टॅक्सीत मागचे सिटबेल्ट काढून टाकलेली किंवा (तीन पेक्षा प्रवासी बसत असल्याने त्यांच्या ढुंगणाला टोचू नये म्हणून) सीट कवरने झाकलेली असतात. रिक्षाला सीटबेल्ट का असू नये? हे मला न उलगडलेलं कोडं आहे. (जागतीक नियमानुसार वाहनाचा वेग तीसपेक्षा जास्त असेल तर सीट बेल्ट आवश्यक आहे). प्रत्येक गोष्टीत जबाबदारी नागरिकांवर टाकून मोकळं व्हायचं असं ठरवलेलं आहे. आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर तर त्याला खायला देणार्‍याला जबाबदार धरणार म्हणे. हास्यास्पद आहे हे सगळं.

कपिलमुनी 05/09/2022 - 00:31
मेटे , मिस्त्री प्रकरणात ड्रायव्हर ची चूक आहे. केवळ आपल्याकडे भारी गाडी आहे म्हणून कशीही दामटवायची वृत्ती या मृत्यू ना कारणीभूत ठरली आहे. भारतात रस्त्यावर हायवे ला ९० व राज्य मार्गावर ८० चे लिमिट आहे. ते पाळले असते तर खूप कमी धोका असतो.

तर्कवादी 05/09/2022 - 01:02
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर विरुद्ध दिशेने जाणारे वाहन अनियंत्रित झाल्याने दुभाजक ओलांडून मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्या कारवर धडकले आणि त्या अपघातात श्री अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. म्हणजे यात अभ्यंकर यांच्या वाहनचालकाची (बहुधा ते स्वतः की त्यांचे मित्र वाहन चालवत होते, आता नीट आठवत नाही) कोणतीही चूक नव्हती.

वामन देशमुख 05/09/2022 - 04:56
श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली --- धाग्यातील "जेव्हा कोणी दखलपात्र अपघात होईल तेव्हा ह्या धाग्यात त्याची नोंदी व्हावी." या विचाराशी सहमत.

मनो 05/09/2022 - 06:01
>आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे. आज श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली अर्पण करुन, मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो. असहमत. तुम्ही एक चांगली, लायक व्यक्ती आहात असेच मला वाटते. तुम्ही अशी काय चूक केली आहे की क्षमा मागत आहेत?

मनो 05/09/2022 - 06:07
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे फोटो पाहिले, गाडीची कंडीशन पाहता (गाडीच्या काचासुद्धा शाबूत आहेत)आणि ती सुरक्षितता प्रथम या दृष्टिकोनातून डिझाईन केलेली मर्सिडीज आहे हे लक्षात घेऊन अपघात फक्त मागच्या दोघांनाच जागेवर प्राणघातक ठरला हे पटत नाही. ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून अधिक माहिती मिळेलच, त्यावेळी कळेल. कदाचित मागील दोघांनी सीटबेल्ट लावलेला नसावा असा माझा अंदाज आहे. तो जर लावलेला असता तर ते किरकोळ इजेनिशी नक्की वाचले असते असं वाटतं.

जेम्स वांड 05/09/2022 - 07:41
आता तुम्ही स्वतःच, स्वतः लिहून मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो. असे म्हणताच आहात तर, एक लायक भारतीय म्हणून मी तुमच्यासारख्या नालायक भारतीयाची क्षमायाचना स्वीकार करून श्री सायरस मिस्त्री ह्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आशा आहे आपले दुःख अंमळ कमी होईल.

शाम भागवत 05/09/2022 - 07:46
सीटबेल्ट लावलेला नसेल तर मानेला बसलेला हिसका सहन होत नाही. साधारणत: बेसावध स्थितीत अचानक ब्रेक दाबला गेल्यास डोके पुढच्या सीटवर जोरात आदळते. हे आदळणे सीटबेल्टमुळे कमी हानीकारक ठरते. मानेचे विकार असल्यास, सीटबेल्ट लावाच असे मी सुचवीन. अगदी २५-३० वेग असतानासुध्दा गाडी अपघाताने अचानक थांबल्यास, मोठा धोका संभवू शकतो.

In reply to by शाम भागवत

जेम्स वांड 05/09/2022 - 07:55
असो, नसो, सीटबेल्ट लावणे हे कम्पल्सरी असेलच पाहिजे, नालायक भारतीय त्यात पण चोरी करतात, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या सीट बेल्ट न लावल्यास सतत बीप साऊंड, इंजिन immobilizer, warning lights असे सगळ्या सुविधा पुरवतात, तरी नालायक भारतीय ते लावत नाहीत, उलट तो साऊंड बंद करायला, बेल्ट ओढून तो अंगावरून न ओढता सीटच्या मागून नेऊन लॉक मध्ये अडकवून कारला पण मामु बनवतात !

जेम्स वांड 05/09/2022 - 08:17
वाचा ही बातमी, सीट बेल्ट नाहीत, ओव्हर स्पीडिंग, ९ मिनिटांत २० किलोमीटर अंतर कापलं. आता काय बोलणार ! १. नालायक भारतीयांच्या यादीत दिवंगत सायरस मिस्त्री पण जोडावेत ? २. का सरकारला शिव्या देऊन, सरकार अकार्यक्षम आहे हे माहिती असून आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणवला गेलेल्या मृत्यूच्या सापळ्यावर आपण जीवावर खेळून असली स्टंट करून नंतर परत सरकार वर आगपाखड करावी ?

In reply to by जेम्स वांड

Trump 05/09/2022 - 21:18
श्री जेम्स वांड, तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. तुम्हाला मी काय म्हटले आहे ते समजले नाही किंवा मी समजुन द्यायला कमी पडतो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले. कृपया त्याला राजकीय रंग देऊ नये. -- लहान मुलांना शाळेमध्ये शिकवले जाते, नेहमी नियमांचे पालन करावे, जात भेद पाळु नये, भष्टाचार करु नये इ. इ. पण त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ? आपण किती लोकांना अभिमानाने भारतीय व्यवस्थेबद्दल एक समाज म्हणुन आपण अयशस्वी झालो आहोत.

In reply to by Trump

जेम्स वांड 06/09/2022 - 06:40
अयशस्वी, सामाजिक घटक नालायक का काय म्हणता तसे, मी नाही तसा. तुमच्या मताचा आदर आहेच अर्थात. त्यातील किती गोष्टी मोठे झाल्यावर त्याच मुलांना आत्मविश्वासाने सांगु शकतो ? मी सांगतो ना, द्वेषमूलक पिंड नसल्यामुळे मी बहुसंख्य गोष्टी अभिमानाने सांगतो पोरांना माझ्या तरी, त्या सांगण्यासाठी मला ओढूनताणून प्रयत्न करावे लागत नाहीत म्हणजेच मी बऱ्यापैकी अभिमानास्पद तत्व पाळतो बुआ.

रस्ते अपघात होतात त्या मधे मनुष्याच्या चुका काय कमी आहेत काय ? ना सीटबेल्ट लावायचे ना स्पीड लिमिट पाळायचे ना लेण ची शिस्त पाळायची अर्थात सरकार म्हणून त्यांची जबाबदारी खूप जास्त आहे की कमीत कमी रोड सुरक्षित बनवून सामान्य पामर लोकाना वापर्णया साठी तयार करावा, मला वाटत चूक सर्वांचीच आहे त्यामुळे तुम्ही उगाच स्वताला नालायक वगैरे म्हणून घेऊ नका

जब होवेगी उमर पुरी जब छुटे हुकूम हुजूरी जम के दूत बडे मजबूत जम से पडा झमेला रे! उड जायेगा हंस अकेला माणूस काहीच करू शकत नाही व परमेश्वर कुणाच्या मृत्यूचे श्रेय घेत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली.

चौथा कोनाडा 07/09/2022 - 17:32
मी एक नालायक भारतीय म्हणुन दुसर्‍या भारतीयाची क्षमा मागतो.
मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?

In reply to by चौथा कोनाडा

Trump 08/09/2022 - 18:19
मी " एक नालायक आशियाई " असं म्हणत " दुसर्‍या आशियाईची क्षमा मागतो" असं म्हटलं तर जास्त समर्पक होईल का ?
तसे म्हणु शकत नाही. १. भारतीयांचा घटनात्मक हक्क फक्त भारतावरच पोचतो. आणि आशिया म्हटले, तर एकादा म्हणु शकतो. आशियाच का, जग का नाही ? २. आशियातील काही देश, सिंगापुर, जपान, दक्षिण कोरीया, तैवान इ. देशामधील वाहतुकव्यवस्थेबद्दल अजुन तरी वाईट ऐकले नाही.

तुर्रमखान 11/09/2022 - 16:12
आपण किती नालायक आहोत याची जाणिव होत राहणे महत्वाचे आहे.
दुर्दैवाने सहमत व्हावं लागत आहे. अश्या अपघाताचं खापर वेगावर फोडलं की झालं अशी समजूत आहे. मुळात 'वाहने सावकाश हाका', 'हळू जा' वगैरे रस्त्यावरच्या सुचना शुद्ध मुर्खपणा आहे. हळू म्हणजे किती? ८०, ६०, ५० की १०? स्पीड लिमिट किती रत्यांवर असतो. ते रस्ते त्यापर्यंतच्या वेगाने चालवण्यासारखे असतात का? लेन मार्कींग असतात का? बरं, सिटबेल्ट्साठी तरी साधे नियम आहेत का? जवळ जवळ सगळ्या टॅक्सीत मागचे सिटबेल्ट काढून टाकलेली किंवा (तीन पेक्षा प्रवासी बसत असल्याने त्यांच्या ढुंगणाला टोचू नये म्हणून) सीट कवरने झाकलेली असतात. रिक्षाला सीटबेल्ट का असू नये? हे मला न उलगडलेलं कोडं आहे. (जागतीक नियमानुसार वाहनाचा वेग तीसपेक्षा जास्त असेल तर सीट बेल्ट आवश्यक आहे). प्रत्येक गोष्टीत जबाबदारी नागरिकांवर टाकून मोकळं व्हायचं असं ठरवलेलं आहे. आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर तर त्याला खायला देणार्‍याला जबाबदार धरणार म्हणे. हास्यास्पद आहे हे सगळं.
रस्ते अपघातातील मृतांना श्रध्दांजली. -- आज श्री सायरस मिस्त्री मरण पावले. भारताच्या प्रगतीला हातभार लावणारा कोणीही मनुष्य असा टाळण्याजोग्या अपघातात मृत्यु पावला की भयंकर वेदना होतात. एक माणुस घडवायला ३० - ३५ वर्षे लागतात. अशी उमेदीत माणसे सोडुन गेली की आपले नशीब कसले कपाळकरंटे आणि अजुन किती भोग भारतमातेच्या नशीबात आहेत त्याची जाणीव घ्यायला आपला आवाका कमी पडतो. आपण भारतीय किती नालायक आहोत याची भयंकर सल मनाला लागुन जाते. असली विषण्णता लवकर मनातुन जात नाही. ह्या यादीत श्री विनायक मेटे, श्री वांजळे, श्री भक्ती बर्वे इ. अशी कितीतरी नावे टाकता येतील.

कला - चित्रकला प्रदर्शने

चौथा कोनाडा ·

प्रचेतस 30/08/2022 - 09:03
मस्त. या निमित्ताने पिंपरी चिंचवड ह्या स्वतंत्र अस्मिता असलेल्या पण पुण्यामुळे झाकोळलेल्या शहराची दखल घेतली गेली याचा आनंद झाला. प्रदर्शन तर नक्कीच बघेन मात्र ह्या निमित्ताने चौथा कोनाडा यांनी एक कट्टा आयोजित केल्यास अधिक मिपाकरांना भेटता येईल असे वाटते.

शुभेच्छा आणी चौथा कोनाडा साहेबांचे हार्दिक अभिनंदन . बाकी प्रचेतस ह्यांच्या प्रतिसादाशी बाडीस . प्रदर्शन तर नक्कीच बघेन.

चौथा कोनाडा 02/09/2022 - 18:03
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. "माझा बाप्पा" प्रदर्शनाच्या उद्घटनाची क्षणचित्रे : dpf123ewrm007 आणखी काही फोटोज खालील लिंकमध्ये: https://photos.app.goo.gl/aewRR6HPY3xbmpAx5 या संबंधीचे वृत्त खालील लिंकमध्ये: http://chikhalipimprinews.com/?p=5800

चित्रगुप्त 07/08/2023 - 20:56
गेल्या वर्षभरात आणखी काय काय झाले त्याचा वृत्तांत तसेच आगामी काळात होऊ घातलेले कार्यक्रम, प्रदर्शने वगैरे देत राहून हा धागा चालता ठेवावा ही विनंती.

चौथा कोनाडा 08/08/2023 - 22:20
कळवण्यास आनंद होत आहे की गेल्या वर्षभरात ३० प्रदर्शने झाली. या संबंधीचे वृत्तपत्रातील कात्रण : SB1234rtdvsc स्मृतिरंग ७५ मालिकेतील प्रदर्शनांपैकी २५ प्रदर्शनांसाठी संयोजन सहाय्य आणि प्रदर्शन उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली हे आनंददायक होते. विविध नामवंत कलाकारांशी परिचय आणि त्यांची कला बघता आली हा एक छान योग म्हणायचा. चिन्ह आर्ट न्युज अर्थात चिन्ह या कलाविषयक मासिकाने उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या वेबपेज वर या संबंधी वृत्त दिले : (पुढील लिंक क्लिक करणे) https://chinha.in/features/smrutirang-exhibition-concluded/ फेसबुकवर "स्मृतिरंग ७५" अथवा "संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" असा सर्च केल्यास सर्व पुष्पांचे (सर्व प्रदर्शनांचे ) फोटो, सहभागी कलाकार , प्रमुख पाहुणे ई सह वृत्तांत मिळून जाईल. चित्रगुप्तजी मनापासून धन्यवाद.

चित्रगुप्त 09/08/2023 - 03:09
'चिन्ह' च्या दुव्याबद्दल अनेक आभार. या दुव्यावरील सगळे बघीनच, परंतु विशेषतः प्रभाकर कोलते यांची मुलाखत. माझ्याकडे 'चिन्ह' चे काही विशेषांक होते, परंतु 'आम्ही जातो आमुच्या गावा' मधे लिहील्याप्रमाणे ते सगळे शेवटी कुणाला तरी दिले गेले. असे काही बघितले-वाचले, की आपले वास्तव्य नेहमी पुणे-मुंबई पेक्षा खूप दूरच घडले, याचा थोडासा विषाद वाटतो.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 10/08/2023 - 12:00
'चिन्ह' मध्ये बरेच काही वाचण्यासारखे आहे/ असते. मी जेव्हा २०-३० वर्षांपुर्वी चिन्हचे छापील अंक पाहिले होते तेव्हा प्रचंड आनंदी झालो होतो ! वारली कलेला जगप्रसिद्धी मिळवून देणारे चित्रकार भास्कर कुलकर्णी यांच्या बद्दल प्रथमच चिन्ह मध्ये वाचले होते, मला आठवतेय की त्यांच्या बद्दलचे अनेक सुंदर सुंदर लेख, त्यांच्या स्केचबुकचे फोटो असा बहुमुल्य ऐवज त्यात होता. नंतर अनेक उत्तमोत्तम लेख वाचले ... छापील अंक बंद झाल्यावर चिन्ह ऑनलाईन झाला तेथे ही बरेच वाचले, कोविड१९ पश्चात चिन्हचे " CHINHA Art News च्या यू ट्युब वरील "गच्चीवरील गप्पा, काय चाललंय ? जे जे दिसले ते ते, पॅलेट असे अनेक सुंदर मुलाखती, चर्चा असे कार्यक्रम पहिलेम ऐकले ! चिन्ह मुळे मी बराच श्रीमंत झालोय ! जवळचा ठेवा दुसर्‍या कुणाला देणे हे दु:खदच, पण त्याला ईलाज नसतो ... देऊन टाकल्या की निकडीच्या होऊन बसतात आठवणी वारंवार येत राहतात ! 'चिन्ह'चे जुने छापील अंक कुणाकडे आहेत याची चौकशी श्री सतिश नाईक अधूनमधून करत असतात त्याची आठवण झाली ! पुणे-मुंबई सारख्या कलेच्या सांस्कॄतिक केंद्रापासुन दुर राहायला लागणे याला आपला इलाज नसतो. आज काल ऑनलाईन मुळे बर्‍याच गोष्टी मिळून जातात ! चित्रगुप्त़जी, खुप खुप धन्यवाद !

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 09/08/2023 - 17:53
पिंपरी चिंचवड भागातील चित्ररसिकांसाठी चांगली सोय झाली या दालनामुळे.
अगदी.
मुंबईत जहांगीर हे एक
जहांगीर तर जुने आणि मोठी कलासंकृती, इतिहास असलेली थोर परंपरा असलेली आर्ट गॅलरी आहे ! त्या मानाने चिंचवड येथील बाल्यावस्थेत आहेत !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 09/08/2023 - 19:38
नव्या वाढत्या शहरांत अगोदरच भाव कमी असतांनाच जागा घ्यावी लागते. मग शहर वाढले की ती 'मोक्याची' होते. कॅम्लिन कंपनीच्या माध्यमातून जहांगिरच्या बाहेरचा फुटपाथ नंतर मिळवून थोड्या कलाकारांची सोय झाली.

कंजूस 09/08/2023 - 19:46
पनवेलचं उदाहरण. पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईतील काही कलाकारांनी पनवेलमध्ये मोठ्या जागा विकत घेऊन खाजगी स्टुडिओ थाटले. दूरदृष्टी. मुंबई,पुणे,कोकण तीन ठिकाणी जाण्यासाठी पनवेलमधूनच जावे लागते. पनवेल-नवीन पनवेल- माथेरान रस्ता (म्हणजे इथून माथेरानच्या सनसेट पॉईंटच्या खाली असलेल्या धोधाणी गावात जाता येते.) (इथून वर रोपवे करण्याचा प्रयत्न वनखात्याने बंद पाडला.) रम्य निसर्ग.

चौथा कोनाडा 17/08/2023 - 18:04
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" कला विभाग "स्मृतिरंग ७५" ही प्रदर्शन मालिका आयोजित केली होती. "स्मृतिरंग ७५" या अंतर्गत ३० प्रदर्शने (पुष्पे) पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे भरवण्यात आली होती. प्रदर्शनांना कलाकार आणि रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि प्रदर्शनांची नामवंतांनी वाखाणणी केली !

"स्मृतिरंग ७५" या उपक्रमाचा सांगता समारंभ :

प्रमुख पाहुणे : मा. श्री वासुदेवजी कामत (प्रख्यात चित्रकार आणि राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारती ) दिनांक : रविवार २० ऑगस्ट २०२३ वेळ : सकाळी ९:३० ते दु. १:३० पर्यंत सन्मान सोहळा, मार्गदर्शन, मनोगत इ. स्थळ : झपुर्झा आर्ट म्युझियम, कुडजे ( एनडीए, पी-कॉक बे च्या पुढे, खडकवासला जलाशय परिसर ) पुणे ( पुण्यापासून २५ किमी / दीड तास अंतरावर ) गुगल लोकेशन : https://goo.gl/maps/ZjWPvXtcHyUndzym9 दु. २: ३० ते सं ५:३० पर्यंत नामवंत शिल्पकार, चित्रकार यांची प्रात्यक्षिके होणार आहेत.

सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

PCSBSR75ZAPURZA

चित्रगुप्त 17/08/2023 - 21:09
"स्मृतिरंग ७५" प्रदर्शन मालिका हा उत्तम उपक्रम आहेच, शिवाय इथे अशी माहितीदेत रहाण्याचा उपक्रमही स्तुत्य. अनेक आभार.

चौथा कोनाडा 19/02/2024 - 21:55
मिपाचे दिग्गज कलाकार श्री चित्रगुप्त ( चित्रकार ) यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

सेव्हन आर्टिस्ट फ्रॉम इंदोर

आयोजक : इंदूरचे सप्तर्षि चित्रकार कालावधी : २० फेब्रुवारी २०२४ (मंगळवार) ते २५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) असे ६ दिवस वेळ : दुपारी ४ ते रात्री ८ पर्यन्त स्थळ : अमदावद नी गुफा, नवरंगपुरा, अहमदाबाद. आसपास असणर्‍या मिपाकरांनी (कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासह) आवर्जून भेट द्यावी ! श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन चित्रगुप्त यांची या आधीची पेंटींग्ज पूढील लिंकवर पाहता येतील: १) रिसेंट पेंटिंग्ज २) लँडस्केप्स ३) अ‍ॅब्सट्रॅक्ट / नियर अ‍ॅब्सट्रॅक्ट ४) एन्शियण्ट इंडिया

चित्रगुप्त 20/02/2024 - 12:56
प्रतिसादाबद्दल अनेक आभार. आजपासून प्रदर्शन सुरु आहे. वेळ संध्याकाळी चार ते आठ. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कलाप्रदर्शनांबद्दल एकंदरित माहिती लिहिण्याचा विचार आहे.

प्रचेतस 30/08/2022 - 09:03
मस्त. या निमित्ताने पिंपरी चिंचवड ह्या स्वतंत्र अस्मिता असलेल्या पण पुण्यामुळे झाकोळलेल्या शहराची दखल घेतली गेली याचा आनंद झाला. प्रदर्शन तर नक्कीच बघेन मात्र ह्या निमित्ताने चौथा कोनाडा यांनी एक कट्टा आयोजित केल्यास अधिक मिपाकरांना भेटता येईल असे वाटते.

शुभेच्छा आणी चौथा कोनाडा साहेबांचे हार्दिक अभिनंदन . बाकी प्रचेतस ह्यांच्या प्रतिसादाशी बाडीस . प्रदर्शन तर नक्कीच बघेन.

चौथा कोनाडा 02/09/2022 - 18:03
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन आभार. "माझा बाप्पा" प्रदर्शनाच्या उद्घटनाची क्षणचित्रे : dpf123ewrm007 आणखी काही फोटोज खालील लिंकमध्ये: https://photos.app.goo.gl/aewRR6HPY3xbmpAx5 या संबंधीचे वृत्त खालील लिंकमध्ये: http://chikhalipimprinews.com/?p=5800

चित्रगुप्त 07/08/2023 - 20:56
गेल्या वर्षभरात आणखी काय काय झाले त्याचा वृत्तांत तसेच आगामी काळात होऊ घातलेले कार्यक्रम, प्रदर्शने वगैरे देत राहून हा धागा चालता ठेवावा ही विनंती.

चौथा कोनाडा 08/08/2023 - 22:20
कळवण्यास आनंद होत आहे की गेल्या वर्षभरात ३० प्रदर्शने झाली. या संबंधीचे वृत्तपत्रातील कात्रण : SB1234rtdvsc स्मृतिरंग ७५ मालिकेतील प्रदर्शनांपैकी २५ प्रदर्शनांसाठी संयोजन सहाय्य आणि प्रदर्शन उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन करण्याची संधी मला मिळाली हे आनंददायक होते. विविध नामवंत कलाकारांशी परिचय आणि त्यांची कला बघता आली हा एक छान योग म्हणायचा. चिन्ह आर्ट न्युज अर्थात चिन्ह या कलाविषयक मासिकाने उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या वेबपेज वर या संबंधी वृत्त दिले : (पुढील लिंक क्लिक करणे) https://chinha.in/features/smrutirang-exhibition-concluded/ फेसबुकवर "स्मृतिरंग ७५" अथवा "संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" असा सर्च केल्यास सर्व पुष्पांचे (सर्व प्रदर्शनांचे ) फोटो, सहभागी कलाकार , प्रमुख पाहुणे ई सह वृत्तांत मिळून जाईल. चित्रगुप्तजी मनापासून धन्यवाद.

चित्रगुप्त 09/08/2023 - 03:09
'चिन्ह' च्या दुव्याबद्दल अनेक आभार. या दुव्यावरील सगळे बघीनच, परंतु विशेषतः प्रभाकर कोलते यांची मुलाखत. माझ्याकडे 'चिन्ह' चे काही विशेषांक होते, परंतु 'आम्ही जातो आमुच्या गावा' मधे लिहील्याप्रमाणे ते सगळे शेवटी कुणाला तरी दिले गेले. असे काही बघितले-वाचले, की आपले वास्तव्य नेहमी पुणे-मुंबई पेक्षा खूप दूरच घडले, याचा थोडासा विषाद वाटतो.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 10/08/2023 - 12:00
'चिन्ह' मध्ये बरेच काही वाचण्यासारखे आहे/ असते. मी जेव्हा २०-३० वर्षांपुर्वी चिन्हचे छापील अंक पाहिले होते तेव्हा प्रचंड आनंदी झालो होतो ! वारली कलेला जगप्रसिद्धी मिळवून देणारे चित्रकार भास्कर कुलकर्णी यांच्या बद्दल प्रथमच चिन्ह मध्ये वाचले होते, मला आठवतेय की त्यांच्या बद्दलचे अनेक सुंदर सुंदर लेख, त्यांच्या स्केचबुकचे फोटो असा बहुमुल्य ऐवज त्यात होता. नंतर अनेक उत्तमोत्तम लेख वाचले ... छापील अंक बंद झाल्यावर चिन्ह ऑनलाईन झाला तेथे ही बरेच वाचले, कोविड१९ पश्चात चिन्हचे " CHINHA Art News च्या यू ट्युब वरील "गच्चीवरील गप्पा, काय चाललंय ? जे जे दिसले ते ते, पॅलेट असे अनेक सुंदर मुलाखती, चर्चा असे कार्यक्रम पहिलेम ऐकले ! चिन्ह मुळे मी बराच श्रीमंत झालोय ! जवळचा ठेवा दुसर्‍या कुणाला देणे हे दु:खदच, पण त्याला ईलाज नसतो ... देऊन टाकल्या की निकडीच्या होऊन बसतात आठवणी वारंवार येत राहतात ! 'चिन्ह'चे जुने छापील अंक कुणाकडे आहेत याची चौकशी श्री सतिश नाईक अधूनमधून करत असतात त्याची आठवण झाली ! पुणे-मुंबई सारख्या कलेच्या सांस्कॄतिक केंद्रापासुन दुर राहायला लागणे याला आपला इलाज नसतो. आज काल ऑनलाईन मुळे बर्‍याच गोष्टी मिळून जातात ! चित्रगुप्त़जी, खुप खुप धन्यवाद !

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 09/08/2023 - 17:53
पिंपरी चिंचवड भागातील चित्ररसिकांसाठी चांगली सोय झाली या दालनामुळे.
अगदी.
मुंबईत जहांगीर हे एक
जहांगीर तर जुने आणि मोठी कलासंकृती, इतिहास असलेली थोर परंपरा असलेली आर्ट गॅलरी आहे ! त्या मानाने चिंचवड येथील बाल्यावस्थेत आहेत !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 09/08/2023 - 19:38
नव्या वाढत्या शहरांत अगोदरच भाव कमी असतांनाच जागा घ्यावी लागते. मग शहर वाढले की ती 'मोक्याची' होते. कॅम्लिन कंपनीच्या माध्यमातून जहांगिरच्या बाहेरचा फुटपाथ नंतर मिळवून थोड्या कलाकारांची सोय झाली.

कंजूस 09/08/2023 - 19:46
पनवेलचं उदाहरण. पंचवीस वर्षांपूर्वी मुंबईतील काही कलाकारांनी पनवेलमध्ये मोठ्या जागा विकत घेऊन खाजगी स्टुडिओ थाटले. दूरदृष्टी. मुंबई,पुणे,कोकण तीन ठिकाणी जाण्यासाठी पनवेलमधूनच जावे लागते. पनवेल-नवीन पनवेल- माथेरान रस्ता (म्हणजे इथून माथेरानच्या सनसेट पॉईंटच्या खाली असलेल्या धोधाणी गावात जाता येते.) (इथून वर रोपवे करण्याचा प्रयत्न वनखात्याने बंद पाडला.) रम्य निसर्ग.

चौथा कोनाडा 17/08/2023 - 18:04
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती - पिंपरी चिंचवड" कला विभाग "स्मृतिरंग ७५" ही प्रदर्शन मालिका आयोजित केली होती. "स्मृतिरंग ७५" या अंतर्गत ३० प्रदर्शने (पुष्पे) पी. एन. गाडगीळ कलादालन, चाफेकर चौक, चिंचवडगाव येथे भरवण्यात आली होती. प्रदर्शनांना कलाकार आणि रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि प्रदर्शनांची नामवंतांनी वाखाणणी केली !

"स्मृतिरंग ७५" या उपक्रमाचा सांगता समारंभ :

प्रमुख पाहुणे : मा. श्री वासुदेवजी कामत (प्रख्यात चित्रकार आणि राष्ट्रीय अध्यक्ष, संस्कार भारती ) दिनांक : रविवार २० ऑगस्ट २०२३ वेळ : सकाळी ९:३० ते दु. १:३० पर्यंत सन्मान सोहळा, मार्गदर्शन, मनोगत इ. स्थळ : झपुर्झा आर्ट म्युझियम, कुडजे ( एनडीए, पी-कॉक बे च्या पुढे, खडकवासला जलाशय परिसर ) पुणे ( पुण्यापासून २५ किमी / दीड तास अंतरावर ) गुगल लोकेशन : https://goo.gl/maps/ZjWPvXtcHyUndzym9 दु. २: ३० ते सं ५:३० पर्यंत नामवंत शिल्पकार, चित्रकार यांची प्रात्यक्षिके होणार आहेत.

सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

PCSBSR75ZAPURZA

चित्रगुप्त 17/08/2023 - 21:09
"स्मृतिरंग ७५" प्रदर्शन मालिका हा उत्तम उपक्रम आहेच, शिवाय इथे अशी माहितीदेत रहाण्याचा उपक्रमही स्तुत्य. अनेक आभार.

चौथा कोनाडा 19/02/2024 - 21:55
मिपाचे दिग्गज कलाकार श्री चित्रगुप्त ( चित्रकार ) यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन

सेव्हन आर्टिस्ट फ्रॉम इंदोर

आयोजक : इंदूरचे सप्तर्षि चित्रकार कालावधी : २० फेब्रुवारी २०२४ (मंगळवार) ते २५ फेब्रुवारी २०२४ (रविवार) असे ६ दिवस वेळ : दुपारी ४ ते रात्री ८ पर्यन्त स्थळ : अमदावद नी गुफा, नवरंगपुरा, अहमदाबाद. आसपास असणर्‍या मिपाकरांनी (कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासह) आवर्जून भेट द्यावी ! श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन चित्रगुप्त यांची या आधीची पेंटींग्ज पूढील लिंकवर पाहता येतील: १) रिसेंट पेंटिंग्ज २) लँडस्केप्स ३) अ‍ॅब्सट्रॅक्ट / नियर अ‍ॅब्सट्रॅक्ट ४) एन्शियण्ट इंडिया

चित्रगुप्त 20/02/2024 - 12:56
प्रतिसादाबद्दल अनेक आभार. आजपासून प्रदर्शन सुरु आहे. वेळ संध्याकाळी चार ते आठ. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कलाप्रदर्शनांबद्दल एकंदरित माहिती लिहिण्याचा विचार आहे.
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की ! अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे. सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.

एक किस्सा

निनाद ·

प्रचेतस 26/08/2022 - 06:57
कर पद्धती महाभारत काळापासून भारतात आहेच. शांतिपर्वातील पुढील श्लोक पहा विक्रयक्रयमध्वानं भक्तं च सपरिच्छदम् । योगक्षेमं च संप्रेक्ष्य वणिजा कारयेत्करान् || विकत घेण्याची किंमत, देण्याची किंमत, रस्त्याचा खर्च, नोकरांचा खर्च आणि स्वतःचे योगक्षेम इत्यादी पाहून वाणी (व्यापारी) लोकांवर कर बसवावा. अश्रोत्रियाः सर्व एव सर्वे चानाहिताग्नयः । तान् सर्वान् धार्मिकोराजा बलिविष्टिं च कारयेत्|| जो ब्राह्मण वेद जाणणारा नसेल व अग्नी ठेवणारा नसेल अशा सर्वांपासून धार्मिक राजाने कर आणि वेठ घ्यावी. याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत.

In reply to by प्रचेतस

निनाद 26/08/2022 - 07:54
याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत. यावर कृपया विस्ताराने लेख लिहावा ही आग्रहाची विनंती आहे.

In reply to by निनाद

प्रचेतस 26/08/2022 - 09:21
विस्ताराने लेख लिहिण्यास सवड हवी, यथावकाश लिहिन, तूर्तास जमाखर्चाचा स्पष्ट उल्लेख असलेला एक मासला देतो. कच्चिदायव्यये युक्ताः सर्वे गणकलेखकाः | अनुतिष्ठन्ति पूर्वाह्णे नित्यमायव्ययं तव || हे राजा, आय आणि व्यय लिहिण्यासाठी नेमलेले तुझे गणक आणि लेखनिक प्रतिदिवशी दुपारच्या आधी तुझा जमा खर्च तुला सांगतात ना

मिसळपाव 26/08/2022 - 07:33
" ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" - ऋणाची संकल्पना असणारा हा मूळच्या चार्वाकांच्या श्लोकाचा विपर्यास / विडंबन कुठल्या काळातलं आहे? टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

गवि 26/08/2022 - 07:55
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी? हिशेब म्हणजे संख्येची नोंद तोंडी / लेखी ठेवणे असा म्हणावा तर तो करन्सी / पैसा आस्तित्वात येण्यापूर्वी गायी गुरे, पाळीव पशू, शस्त्रे यांचाही जगभर होत असणार हे समजण्यासाठी पुराव्याची देखील गरज वाटत नाही. डेव्हिल इज इन द डीटेल्स. अ. हवेत काहीतरी उडवले असणार हे स्पष्ट आहे. कारण विमान शब्दाचा उल्लेख आलाय. ब. हवेपेक्षा जड (अधिक घनतेचे) मनुष्य वाहून नेईल असे वाहन एरोडायनामिक आकार (एरोफोईल) वापरुन आणि कण्ट्रोल करुन हवेत उडवले आणि हा सर्व तपशीलही त्या ग्रंथात आहे यात जो तपशिलाचा फरक आहे तत्सम. क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या. मूळ ग्रंथ वास्तव कथा मांडतो की काल्पनिक हा मुद्दा महत्वाचा नाही, त्यात तपशील काय आहे हे मुख्य.. हा भाग अगदी मान्य.

In reply to by गवि

निनाद 26/08/2022 - 08:52
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी? तेव्हा तरी डोक्यात खातेवही, डेबिट VS क्रेडिट्स इतकेच होते. व्याज वगैरे विचार केला तर त्यात अनेक डिटेल्स लक्षात येत जातात हे मात्र खरे. खातेवही ही खरी अकाऊंटिंग मध्ये क्रांतीची ठिणगी म्हणायला हवी. हे सगळे अभ्यास न करता चर्चेत सूचत गेले तशी मांडणी झालेले आहे. खरे तर ईटालिअयन अकाऊंट ला उलट प्रश्न यायला हवा होता की उणे संख्या कधी इटालियन्स ना नक्की कधी समजल्या. पण तेव्हा ते सुचले नाही. क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या. जरूर करा. एक उत्तम संशोधनाचा पेपर तयार होऊ शकेल. आणि एक जागतिक गैर्समज दूर व्हायला मदत होईल.

In reply to by निनाद

गवि 26/08/2022 - 10:05
जरूर करा. एक उत्तम संशोधनाचा पेपर तयार होऊ शकेल. आणि एक जागतिक गैर्समज दूर व्हायला मदत होईल.
सूचना छान आहे पण चुकीच्या मनुष्याला उद्देशून. हे सर्व तपशीलवार करण्यासाठी त्या विषयाबद्दल passion लागते. ती तुमच्यात आहे असे या लेखातून वाटले. काही प्रमाणात प्रचूमधेही आहे. बाकी लेख वाचायला आणि शन्का उत्पन्न करायला, सूचना करायला या विषयातले केवळ थोडे कुतूहल पुरते. तितक्या बळावर अभ्यासपूर्ण मांडणी शक्य नाही.

जेम्स वांड 26/08/2022 - 08:36
मधले काहीच कळत नसल्याने आमचा permanent पास, फक्त नेहमीचे यशस्वी प्रतिसाद न येता सकाळी सकाळी अभ्यासू प्रतिसाद आल्याने आनंद झाला आहे. त्यामुळे पिटातील शीट पकडून नवीन काहीतरी शिकायला सीट धरून मी बसलोय धन्यवाद.

आहो परिस्थिती अशी आहे की, लाखाची बसविली घरी अन दमडीची चकरा मारी! गावचा बळी, परगावचे गाढवं वळी ! फॅशन झालीय. सुदंर विषय,लेखन आणी प्रतीसाद. आणी म्हणूनच मिसळपावने बांधून ठेवलयं.

तिता 26/08/2022 - 09:11
Time reference ठरवणे अवघड आहे. गणपतीने महाभारत लिहिले ….. लिहिण्याची कला भारतात तेव्हापासून होती? क़ाही सन्दर्भ हे खूप नंतरचे आहेत.

In reply to by तिता

शाम भागवत 26/08/2022 - 11:16
महाभारत काल हा २१००० वर्षांपूर्वीचा असं जग्गी वासुदेव म्हणतात बॉ. म्हणे कार्बन डेटिंगच्या पेक्षा जास्त पुढारलेल्या पध्दतीने फ्रेंच का कोणत्यातरी संशोधन टीमने समुद्रात संशोधन करून जगापुढे (????) मांडले. :))

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 26/08/2022 - 11:34
महाभारत काल हा २१००० वर्षांपूर्वीचा असं जग्गी वासुदेव म्हणतात बॉ.
महाभारत काल हा इसवीसन पूर्व २०० ते ५०० च्या आसपासचा समजला पाहिजे. कारण सौतीने आदिपर्वातील अनुक्रमणिका अध्यायात सांगितलेल्या विविध पर्वातील श्लोकांची संख्या महाभारतच्या विविध प्रतींत बर्‍यापैकी समान आहे. हा काळ साधारण इसवीसनपूर्व २०० च्या आसपासचा मानता येतो. सौतीचा काळही तोच समजला पाहिजे, मूळच्या भारतात सर्वाधिक भर याच काळात घातली गेली. गुप्तकाळातही थोडी भर घातली गेली. श्रीकृष्णाला देवत्व दिले गेले ते मुख्यतः या काळात असे मानता यावे पण तुलनेने ही भर कमी आहे. भारतीयुद्धाचा काळ हा इसवीसनपूर्व हा बर्‍याच विद्वानांनी मान्य केला आहे. ग्रहगोलांची, नक्षत्रांची स्थिती, इतर प्राचीन ग्रंथातील उल्लेख, श्लोकांची शैली यानुसार्हे थोड्याबहुत फरकाने निश्चित करता येते मात्र पुरातत्वीय पुराव्यांच्या अभावी हे प्रमाण किंचित लंगडे पडते इतकेच.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 26/08/2022 - 11:43
जग्गी साहेबांची लिंक शोधू का? कार्बन डेटिंगपेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे म्हणे. द्वारकेजवळच्या समुद्रात प्लॅस्टिक कचरा संशोधन का काहीतरी करत असताना अचानक म्हणे द्वारका सापडली. मग ते नमुने युरोपात नेऊन संशोधन केले. वगैरे वगैरे. जग्गी वासुदेव यांच्या मते रामायण तर त्याचेही आधी काही हजार वर्षांपूर्वीचे आहे. असे ते ७०००० वर्षे मागे जातात.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 26/08/2022 - 12:03
:) काही कळेना. बरं. बरीच शास्त्रज्ञ मंडळी हजर असतात. चर्चा परदेशात चाललेल्या असतात. कोणी ऑब्जेक्शनही घेत नाही म्हटल्यावर..... होका? असेल असेल असं म्हणण्याशिवाय दुसरं काही करताही येत नाही. तसंही जग्गी वासुदेव बरोबर असल्याचं सिध्द झालं तरी नुकसान काहीच नसल्याने ऐकत असतो. पण एकंदरीत छान बोलतात.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 26/08/2022 - 15:52
श्रीकृष्ण वासुदेव ह्या स्वरूपातील चक्रधर मुद्रेतील कृष्णाची पहिली झलक कुशाणकालीन नाण्यांवर पाहायला मिळते हे खरे का ? गरुड खांब अन् विष्णू मंदिरं यांच्याबद्दल पण ती गुप्तकाळात उदयाला किंवा नावारूपाला आली म्हणतात ते कितपत खरे ?

In reply to by जेम्स वांड

प्रचेतस 27/08/2022 - 06:19
चक्रधर कृष्णाची प्रतिमा, शिवाय पाशुपत शिव यांची प्रतिमा कुशाण नाण्यांवर आहे हे खरेच मात्र ती पहिली प्रतिमा किंवा कसे याबद्दल निश्चित सांगता येणार नाही इतकेच. मात्र भागवत धर्माचा उदय याच्याही आधी झाला होता ह्याला नाणेघाटातील ख्रिस्तपूर्व २०० चा नागनिकेचा शिलालेख साक्षी आहेच. शिलालेखाच्या सुरुवातीला धर्म, इंद्र, संकर्षण आणि वासुदेव यांना वंदन केले आहे. गुप्तकाळात तर विष्णू मंदिरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे यात काहीच नवल नाही, गुप्त वैष्णवच होते.

In reply to by विजुभाऊ

मुस्लिम आणि ख्रिच्श्रन आक्रमकांनी, वाचनालये जाळून टाकल्याने, बरेचसे लिखीत साहित्य नामशेष झाले ..

एवढा सगळा उपद्व्याप करुन समजा तुम्ही सिध्द केलेच असते की अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे तर लगेच ज्युनियर डाव्याने म्हणले असते की- अकाऊंट्स हे मनुवादी ब्राह्मणी कारस्थान आहे, बामणाचे कसब आहे . बहुजनांच्या शोषणाकरिता सनातन्यांनी केलेली कपट क्लृप्ती आहे. =))))

शाम भागवत 27/08/2022 - 12:48
म्हणू दे हो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून असं काहीबाही ऐकतंच आलोय. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की, हे असं म्हणण्यातला जोर गेल्या ७५ वर्षात कमी होताना दिसतोय की वाढताना दिसतोय? त्याआधारावर पुढे बघायचा प्रयत्न करायचाय. :)

प्रचेतस 26/08/2022 - 06:57
कर पद्धती महाभारत काळापासून भारतात आहेच. शांतिपर्वातील पुढील श्लोक पहा विक्रयक्रयमध्वानं भक्तं च सपरिच्छदम् । योगक्षेमं च संप्रेक्ष्य वणिजा कारयेत्करान् || विकत घेण्याची किंमत, देण्याची किंमत, रस्त्याचा खर्च, नोकरांचा खर्च आणि स्वतःचे योगक्षेम इत्यादी पाहून वाणी (व्यापारी) लोकांवर कर बसवावा. अश्रोत्रियाः सर्व एव सर्वे चानाहिताग्नयः । तान् सर्वान् धार्मिकोराजा बलिविष्टिं च कारयेत्|| जो ब्राह्मण वेद जाणणारा नसेल व अग्नी ठेवणारा नसेल अशा सर्वांपासून धार्मिक राजाने कर आणि वेठ घ्यावी. याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत.

In reply to by प्रचेतस

निनाद 26/08/2022 - 07:54
याशिवाय सभापर्वातील कश्चिदअध्यायात नारद युधिष्ठिर संवादात पगार, कर, अकौंटिंग यांचे बरेच उल्लेख आले आहेत. यावर कृपया विस्ताराने लेख लिहावा ही आग्रहाची विनंती आहे.

In reply to by निनाद

प्रचेतस 26/08/2022 - 09:21
विस्ताराने लेख लिहिण्यास सवड हवी, यथावकाश लिहिन, तूर्तास जमाखर्चाचा स्पष्ट उल्लेख असलेला एक मासला देतो. कच्चिदायव्यये युक्ताः सर्वे गणकलेखकाः | अनुतिष्ठन्ति पूर्वाह्णे नित्यमायव्ययं तव || हे राजा, आय आणि व्यय लिहिण्यासाठी नेमलेले तुझे गणक आणि लेखनिक प्रतिदिवशी दुपारच्या आधी तुझा जमा खर्च तुला सांगतात ना

मिसळपाव 26/08/2022 - 07:33
" ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" - ऋणाची संकल्पना असणारा हा मूळच्या चार्वाकांच्या श्लोकाचा विपर्यास / विडंबन कुठल्या काळातलं आहे? टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

गवि 26/08/2022 - 07:55
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी? हिशेब म्हणजे संख्येची नोंद तोंडी / लेखी ठेवणे असा म्हणावा तर तो करन्सी / पैसा आस्तित्वात येण्यापूर्वी गायी गुरे, पाळीव पशू, शस्त्रे यांचाही जगभर होत असणार हे समजण्यासाठी पुराव्याची देखील गरज वाटत नाही. डेव्हिल इज इन द डीटेल्स. अ. हवेत काहीतरी उडवले असणार हे स्पष्ट आहे. कारण विमान शब्दाचा उल्लेख आलाय. ब. हवेपेक्षा जड (अधिक घनतेचे) मनुष्य वाहून नेईल असे वाहन एरोडायनामिक आकार (एरोफोईल) वापरुन आणि कण्ट्रोल करुन हवेत उडवले आणि हा सर्व तपशीलही त्या ग्रंथात आहे यात जो तपशिलाचा फरक आहे तत्सम. क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या. मूळ ग्रंथ वास्तव कथा मांडतो की काल्पनिक हा मुद्दा महत्वाचा नाही, त्यात तपशील काय आहे हे मुख्य.. हा भाग अगदी मान्य.

In reply to by गवि

निनाद 26/08/2022 - 08:52
अकाउंट्सच्या स्कोपमधे काय काय धरलं आहे? नुसता हिशोब ? नुसती मोजणी? तेव्हा तरी डोक्यात खातेवही, डेबिट VS क्रेडिट्स इतकेच होते. व्याज वगैरे विचार केला तर त्यात अनेक डिटेल्स लक्षात येत जातात हे मात्र खरे. खातेवही ही खरी अकाऊंटिंग मध्ये क्रांतीची ठिणगी म्हणायला हवी. हे सगळे अभ्यास न करता चर्चेत सूचत गेले तशी मांडणी झालेले आहे. खरे तर ईटालिअयन अकाऊंट ला उलट प्रश्न यायला हवा होता की उणे संख्या कधी इटालियन्स ना नक्की कधी समजल्या. पण तेव्हा ते सुचले नाही. क्रेडिट, डेबिट किंवा कर्ज, व्याज अशा संज्ञांची यादी करुन त्यातल्या अमुक संज्ञा या या श्लोकात स्पष्ट मांडल्या आहेत अशी मांडणी निर्विवाद ठरेल. (वल्लीच्या प्रतिसादात जसे आहे तसे). मग असे म्हणता येईल की हो, आपल्याकडे किमान ५०% संकल्पना ज्ञात होत्या. जरूर करा. एक उत्तम संशोधनाचा पेपर तयार होऊ शकेल. आणि एक जागतिक गैर्समज दूर व्हायला मदत होईल.

In reply to by निनाद

गवि 26/08/2022 - 10:05
जरूर करा. एक उत्तम संशोधनाचा पेपर तयार होऊ शकेल. आणि एक जागतिक गैर्समज दूर व्हायला मदत होईल.
सूचना छान आहे पण चुकीच्या मनुष्याला उद्देशून. हे सर्व तपशीलवार करण्यासाठी त्या विषयाबद्दल passion लागते. ती तुमच्यात आहे असे या लेखातून वाटले. काही प्रमाणात प्रचूमधेही आहे. बाकी लेख वाचायला आणि शन्का उत्पन्न करायला, सूचना करायला या विषयातले केवळ थोडे कुतूहल पुरते. तितक्या बळावर अभ्यासपूर्ण मांडणी शक्य नाही.

जेम्स वांड 26/08/2022 - 08:36
मधले काहीच कळत नसल्याने आमचा permanent पास, फक्त नेहमीचे यशस्वी प्रतिसाद न येता सकाळी सकाळी अभ्यासू प्रतिसाद आल्याने आनंद झाला आहे. त्यामुळे पिटातील शीट पकडून नवीन काहीतरी शिकायला सीट धरून मी बसलोय धन्यवाद.

आहो परिस्थिती अशी आहे की, लाखाची बसविली घरी अन दमडीची चकरा मारी! गावचा बळी, परगावचे गाढवं वळी ! फॅशन झालीय. सुदंर विषय,लेखन आणी प्रतीसाद. आणी म्हणूनच मिसळपावने बांधून ठेवलयं.

तिता 26/08/2022 - 09:11
Time reference ठरवणे अवघड आहे. गणपतीने महाभारत लिहिले ….. लिहिण्याची कला भारतात तेव्हापासून होती? क़ाही सन्दर्भ हे खूप नंतरचे आहेत.

In reply to by तिता

शाम भागवत 26/08/2022 - 11:16
महाभारत काल हा २१००० वर्षांपूर्वीचा असं जग्गी वासुदेव म्हणतात बॉ. म्हणे कार्बन डेटिंगच्या पेक्षा जास्त पुढारलेल्या पध्दतीने फ्रेंच का कोणत्यातरी संशोधन टीमने समुद्रात संशोधन करून जगापुढे (????) मांडले. :))

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 26/08/2022 - 11:34
महाभारत काल हा २१००० वर्षांपूर्वीचा असं जग्गी वासुदेव म्हणतात बॉ.
महाभारत काल हा इसवीसन पूर्व २०० ते ५०० च्या आसपासचा समजला पाहिजे. कारण सौतीने आदिपर्वातील अनुक्रमणिका अध्यायात सांगितलेल्या विविध पर्वातील श्लोकांची संख्या महाभारतच्या विविध प्रतींत बर्‍यापैकी समान आहे. हा काळ साधारण इसवीसनपूर्व २०० च्या आसपासचा मानता येतो. सौतीचा काळही तोच समजला पाहिजे, मूळच्या भारतात सर्वाधिक भर याच काळात घातली गेली. गुप्तकाळातही थोडी भर घातली गेली. श्रीकृष्णाला देवत्व दिले गेले ते मुख्यतः या काळात असे मानता यावे पण तुलनेने ही भर कमी आहे. भारतीयुद्धाचा काळ हा इसवीसनपूर्व हा बर्‍याच विद्वानांनी मान्य केला आहे. ग्रहगोलांची, नक्षत्रांची स्थिती, इतर प्राचीन ग्रंथातील उल्लेख, श्लोकांची शैली यानुसार्हे थोड्याबहुत फरकाने निश्चित करता येते मात्र पुरातत्वीय पुराव्यांच्या अभावी हे प्रमाण किंचित लंगडे पडते इतकेच.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 26/08/2022 - 11:43
जग्गी साहेबांची लिंक शोधू का? कार्बन डेटिंगपेक्षा प्रगत तंत्रज्ञान आहे म्हणे. द्वारकेजवळच्या समुद्रात प्लॅस्टिक कचरा संशोधन का काहीतरी करत असताना अचानक म्हणे द्वारका सापडली. मग ते नमुने युरोपात नेऊन संशोधन केले. वगैरे वगैरे. जग्गी वासुदेव यांच्या मते रामायण तर त्याचेही आधी काही हजार वर्षांपूर्वीचे आहे. असे ते ७०००० वर्षे मागे जातात.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 26/08/2022 - 12:03
:) काही कळेना. बरं. बरीच शास्त्रज्ञ मंडळी हजर असतात. चर्चा परदेशात चाललेल्या असतात. कोणी ऑब्जेक्शनही घेत नाही म्हटल्यावर..... होका? असेल असेल असं म्हणण्याशिवाय दुसरं काही करताही येत नाही. तसंही जग्गी वासुदेव बरोबर असल्याचं सिध्द झालं तरी नुकसान काहीच नसल्याने ऐकत असतो. पण एकंदरीत छान बोलतात.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 26/08/2022 - 15:52
श्रीकृष्ण वासुदेव ह्या स्वरूपातील चक्रधर मुद्रेतील कृष्णाची पहिली झलक कुशाणकालीन नाण्यांवर पाहायला मिळते हे खरे का ? गरुड खांब अन् विष्णू मंदिरं यांच्याबद्दल पण ती गुप्तकाळात उदयाला किंवा नावारूपाला आली म्हणतात ते कितपत खरे ?

In reply to by जेम्स वांड

प्रचेतस 27/08/2022 - 06:19
चक्रधर कृष्णाची प्रतिमा, शिवाय पाशुपत शिव यांची प्रतिमा कुशाण नाण्यांवर आहे हे खरेच मात्र ती पहिली प्रतिमा किंवा कसे याबद्दल निश्चित सांगता येणार नाही इतकेच. मात्र भागवत धर्माचा उदय याच्याही आधी झाला होता ह्याला नाणेघाटातील ख्रिस्तपूर्व २०० चा नागनिकेचा शिलालेख साक्षी आहेच. शिलालेखाच्या सुरुवातीला धर्म, इंद्र, संकर्षण आणि वासुदेव यांना वंदन केले आहे. गुप्तकाळात तर विष्णू मंदिरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे यात काहीच नवल नाही, गुप्त वैष्णवच होते.

In reply to by विजुभाऊ

मुस्लिम आणि ख्रिच्श्रन आक्रमकांनी, वाचनालये जाळून टाकल्याने, बरेचसे लिखीत साहित्य नामशेष झाले ..

एवढा सगळा उपद्व्याप करुन समजा तुम्ही सिध्द केलेच असते की अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे तर लगेच ज्युनियर डाव्याने म्हणले असते की- अकाऊंट्स हे मनुवादी ब्राह्मणी कारस्थान आहे, बामणाचे कसब आहे . बहुजनांच्या शोषणाकरिता सनातन्यांनी केलेली कपट क्लृप्ती आहे. =))))

शाम भागवत 27/08/2022 - 12:48
म्हणू दे हो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून असं काहीबाही ऐकतंच आलोय. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की, हे असं म्हणण्यातला जोर गेल्या ७५ वर्षात कमी होताना दिसतोय की वाढताना दिसतोय? त्याआधारावर पुढे बघायचा प्रयत्न करायचाय. :)
एक किस्सा असाच एकदा चर्चेत विषय निघाला तर मी सहज बोलून गेलो चर्चेत अकाऊंटींग ही मूळ भारतीय संकल्पना आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळापासून वापरात आहे. अहो खवळले ना एक जण! कुठल्यातरी कॉलेजात शिकवायचे ते. हाच तो हाच तो संघी बौद्धिक कावा वगैरे बोलायला लागले. आणि भारतीय लोकांना वाईट खोड आहे की जे काही जगात आहे ते भारतीय लोकांनीच शोधले - ते तडतडलेच! मी म्हणालो माझा आणि संघाचा काही संबंध नाही. ते जरा थंड झाल्यावर त्यांच्या एका ज्युनियर डाव्याने विचारले की असे कसे बोलू शकता तुम्ही? अकाऊंटींग हे ईटालियन आहे. आणि त्यांनी ही पद्धती शोधून काढली. आणि याचे पुरावे आहेत.

बिग बुल

लॉरी टांगटूंगकर ·

एकदम समयोचित लेख! राकेश झुनझुनवाला हे नाव मी कधीतरी ऑफिसमधील गप्पात ऐकले आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ गुगलुन बघितला. मग ऑफिसच्या गॉसिपमध्ये "आज राकेश ने ये स्टॉक उठाया" वगैरे ऐकत राहिलो. त्यांचे काही किस्से ऐकण्यात येउ लागले, ट्रेडर विरुद्ध इन्व्हेस्टर वगैरे कल्पना डोक्यात मूळ धरु लागली. थोडक्यात मार्केटकडे जरा लक्षपुर्वक पहायला लागलो. त्याचवेळेला १९९१ वेब सीरीज बघण्यात आली आणि माझ्या नजरेत राकेश झुनझुनवाला एक आयडॉल बनत गेले. राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वेब सीरीज स्कॅम १९९२ असे वाचावे आणि हो!! लेखात राकेश झुनझुनवालांच्या अनुषंगाने शेअर मार्केट्बद्दल सगळे मुद्दे चांगले मांडले आहेत. लेख त्य द्रुष्टीनेही आवडला.

सुबोध खरे 17/08/2022 - 19:13
काही गोष्टी येथे लिहाव्याशा वाटतात. एक म्हणजे माणूस मनस्वी होता. जे आहे ते खुलेपणाने बोलण्याची हिम्मत ठेवणारा होता. मी भरपूर दारू आणि सिगरेट पितो हे खुलेपणाने जसे बोलत तसेच मी भाजपचा सपोर्टर आहे हेही मोकळेपणाने बोलत असत. तिसरी गोष्ट म्हंजे मी बाजारात पैसे लावला पण बाजारात कधी ढवळा ढवळ केली नाही( manipulate) हेही ते स्वच्छपणे सांगतात. याचबरोबर माझ्या बापाकडे पैसा होता भावाकडे बाजारात पत होती त्यामुळे लोकांनाही मला गुंतवायला पैसा दिला हि नशिबाची गोष्ट होती हेही प्रामाणिकपणे सांगत असत. मला वेळेत शिक्षण मिळाले आणि भाग्याने साथ दिली हेही ते स्वच्छपणे बोलत असत. आंबट द्राक्ष असणारे अनेक लोक- एवढा पैसा मिळाला पण ६२ व्या वर्षी शेवटी इथेच सोडून जावे लागले हे परत परत चघळताना दिसतात. अर्थात बाजारात बऱ्याच लोकांना त्यांच्या इतके यश मिळाले नाही म्हणून असणारा मत्सर सुद्धा याला कारणीभूत आहे. कारण केवळ आयुष्यभर सचोटीने सरकारी कारकुनी करणारे दारू सिगरेट सारखी कोणतीही व्यसने न करणारे आमचे स्नेही आणि नातेवाईक सुद्धा साठीच्या आत बाहेर कैलासवासी झालेले मी पाहतो आहे. तसेच लोकांच्या शिव्याशाप घेणारे, भयंकर व्यसने आणि अनके लफडी कुलंगडी करणारे पाताळयंत्री राजकारणी सुद्धा ऐशी पार करून पुढे वाटचाल करताना दिसतात. याला प्राक्तन/ भाग्यच म्हणावे लागेल. जाता जाता - केवळ सवंग गुजराती लोकांच्या द्वेषापायी राकेश झुनझुनवाला याना ( ते गुजराती आहेत समजून) शिव्याशाप देणारे लोकही जालावर आढळतात. पण झुनझुनवाला हे मारवाडी होते गुजराती नव्हे. श्री राकेश झुनझुनवाला याना भावपूर्ण श्रद्धांजली

मित्रहो 17/08/2022 - 21:13
लेख आवडला खूप जोखीम घेऊन गुंतवणुक करणारा माणूस होता. बहुतेक गुंतवणुक कर्जात डुबलेल्या कंपन्यांमधे होती आणि हळूहळू कंपन्या त्यातून बाहेर यायच्या. काही कंपन्यां तितक्या चांगल्या करु शकल्या नाही. पब्लीक सेक्टर बँक, टाटा कंपन्यांमधे गुंतवणूक होती. डॉ. खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत जे आहे ते बिनधास्त बोलणारा माणूस होता. लेखात म्हटल्याप्रमाणे भारत आणि भारताचे उज्वल भविष्य यावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मला आवडलेले काही वाक्ये For country to grow it need two things Skills and Democracy. Growth comes from chaos not from order. श्रद्धांजली बिग बुल

निनाद 18/08/2022 - 09:10
लॉरी टांगटूंगकर यांनी फार सुंदर लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम ची माहिती फार आवडली. समायोचित लेख.

तर्कवादी 18/08/2022 - 16:31
(फेसबुकवरुन साभार) 46 हजार कोटींचा मालक होते... शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस... 1 :- मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता. 2 :- 1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!" 3 :- राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा. 4 :- 46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू? निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती. 5 :- झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा. माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली. ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला. आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!

चौकस२१२ 19/08/2022 - 06:32
झुनझुनवाला हे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोन्ही होते हे माहित नवहते ... त्यांनी कधी पब्लिक फंड उभा केलं होता कि फक्त स्वतःचेच पैसे गुंतव्ययचे / खेळायायचे ?

टर्मीनेटर 20/08/2022 - 13:55
छान माहितीपूर्ण लेख 👍 राकेश झुनझुनवाला ही व्यक्ती माहिती होती पण त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती. राकेश झुनझुनवालांना श्रद्धांजली 🙏

विवेकपटाईत 23/08/2022 - 16:20
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी पैसा कमविता येतो पण तो उपभोग करण्यासाठी शरीर ही दुरुस्त पाहिजे. त्यांना जे उशिरा कळले ते आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.

एकदम समयोचित लेख! राकेश झुनझुनवाला हे नाव मी कधीतरी ऑफिसमधील गप्पात ऐकले आणि मग त्यांचा पोर्टफोलिओ गुगलुन बघितला. मग ऑफिसच्या गॉसिपमध्ये "आज राकेश ने ये स्टॉक उठाया" वगैरे ऐकत राहिलो. त्यांचे काही किस्से ऐकण्यात येउ लागले, ट्रेडर विरुद्ध इन्व्हेस्टर वगैरे कल्पना डोक्यात मूळ धरु लागली. थोडक्यात मार्केटकडे जरा लक्षपुर्वक पहायला लागलो. त्याचवेळेला १९९१ वेब सीरीज बघण्यात आली आणि माझ्या नजरेत राकेश झुनझुनवाला एक आयडॉल बनत गेले. राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वेब सीरीज स्कॅम १९९२ असे वाचावे आणि हो!! लेखात राकेश झुनझुनवालांच्या अनुषंगाने शेअर मार्केट्बद्दल सगळे मुद्दे चांगले मांडले आहेत. लेख त्य द्रुष्टीनेही आवडला.

सुबोध खरे 17/08/2022 - 19:13
काही गोष्टी येथे लिहाव्याशा वाटतात. एक म्हणजे माणूस मनस्वी होता. जे आहे ते खुलेपणाने बोलण्याची हिम्मत ठेवणारा होता. मी भरपूर दारू आणि सिगरेट पितो हे खुलेपणाने जसे बोलत तसेच मी भाजपचा सपोर्टर आहे हेही मोकळेपणाने बोलत असत. तिसरी गोष्ट म्हंजे मी बाजारात पैसे लावला पण बाजारात कधी ढवळा ढवळ केली नाही( manipulate) हेही ते स्वच्छपणे सांगतात. याचबरोबर माझ्या बापाकडे पैसा होता भावाकडे बाजारात पत होती त्यामुळे लोकांनाही मला गुंतवायला पैसा दिला हि नशिबाची गोष्ट होती हेही प्रामाणिकपणे सांगत असत. मला वेळेत शिक्षण मिळाले आणि भाग्याने साथ दिली हेही ते स्वच्छपणे बोलत असत. आंबट द्राक्ष असणारे अनेक लोक- एवढा पैसा मिळाला पण ६२ व्या वर्षी शेवटी इथेच सोडून जावे लागले हे परत परत चघळताना दिसतात. अर्थात बाजारात बऱ्याच लोकांना त्यांच्या इतके यश मिळाले नाही म्हणून असणारा मत्सर सुद्धा याला कारणीभूत आहे. कारण केवळ आयुष्यभर सचोटीने सरकारी कारकुनी करणारे दारू सिगरेट सारखी कोणतीही व्यसने न करणारे आमचे स्नेही आणि नातेवाईक सुद्धा साठीच्या आत बाहेर कैलासवासी झालेले मी पाहतो आहे. तसेच लोकांच्या शिव्याशाप घेणारे, भयंकर व्यसने आणि अनके लफडी कुलंगडी करणारे पाताळयंत्री राजकारणी सुद्धा ऐशी पार करून पुढे वाटचाल करताना दिसतात. याला प्राक्तन/ भाग्यच म्हणावे लागेल. जाता जाता - केवळ सवंग गुजराती लोकांच्या द्वेषापायी राकेश झुनझुनवाला याना ( ते गुजराती आहेत समजून) शिव्याशाप देणारे लोकही जालावर आढळतात. पण झुनझुनवाला हे मारवाडी होते गुजराती नव्हे. श्री राकेश झुनझुनवाला याना भावपूर्ण श्रद्धांजली

मित्रहो 17/08/2022 - 21:13
लेख आवडला खूप जोखीम घेऊन गुंतवणुक करणारा माणूस होता. बहुतेक गुंतवणुक कर्जात डुबलेल्या कंपन्यांमधे होती आणि हळूहळू कंपन्या त्यातून बाहेर यायच्या. काही कंपन्यां तितक्या चांगल्या करु शकल्या नाही. पब्लीक सेक्टर बँक, टाटा कंपन्यांमधे गुंतवणूक होती. डॉ. खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत जे आहे ते बिनधास्त बोलणारा माणूस होता. लेखात म्हटल्याप्रमाणे भारत आणि भारताचे उज्वल भविष्य यावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मला आवडलेले काही वाक्ये For country to grow it need two things Skills and Democracy. Growth comes from chaos not from order. श्रद्धांजली बिग बुल

निनाद 18/08/2022 - 09:10
लॉरी टांगटूंगकर यांनी फार सुंदर लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टर/ शेअर होल्डर अ‍ॅक्टीविझम ची माहिती फार आवडली. समायोचित लेख.

तर्कवादी 18/08/2022 - 16:31
(फेसबुकवरुन साभार) 46 हजार कोटींचा मालक होते... शेअर मार्केट कोळून प्यालेला माणूस... 1 :- मी माशासारखी दारू पितो म्हणायचा. सिगारेटला तर मोजदाद नव्हती. मधुमेह होऊन पाय सुजला आणि खुर्चीवरच आयुष्य जाऊ लागलं तेंव्हा म्हणाला, आयुष्याला शिस्त हवी. व्यायाम करायला हवा होता. 2 :- 1985 ला 5 हजार रुपयांची पहिली गुंतवणूक केली होती.2022 ला एकूण मालमत्ता 46 हजार कोटीवर गेली. याबद्दल कसं वाटतंय म्हणून विचारल्यावर म्हणाला, "कोण मोजत बसलंय संपत्ती? कुणाला दाखवायची आहे बॅलन्स शीट? माझी एक पार्टनर आहे पण तिलाही त्यात इंटरेस्ट नाही. आणि सध्याच्या तुलनेत 15-20 % संपत्ती असती तरी तीच गाडी, तेच घर असतं, तीच व्हिस्की पीत राहिलो असतो!" 3 :- राकेश झुणझूनवाला रिस्क घ्यायला कचरत नव्हता. रिटर्न मिळण्याची एकदा खात्री वाटली की बायकोच्या बांगड्या विकून गुंतवणूक करेन म्हणायचा. 4 :- 46 हजार कोटींचा मालक होता, पण पंतप्रधान मोदींना भेटायला गेला तेंव्हा शर्ट चुरगाळलेला होता. विचारल्यावर म्हणाला,600 रुपये देऊन इस्त्री केली, तरी तो चुरगाळला, मी काय करू? निर्मला सीतारामणला भेटला तेंव्हा पायात फ्लोटर होती. 5 :- झुणझूनवाला बोलायला बेधडक होता. मला मार्केट आणि स्त्रियांमध्ये जास्त रस आहे म्हणायचा. माझी पोरं 25 वर्षांची झालेली बघायची आहेत म्हणायचा, पण 2009 ला जन्मलेली जुळी पोरं अजून 14 च वर्षांची आहेत. मुलगी मात्र 18 वर्षांची आहे. पत्नी रेखा सोबत लग्न 1987 ला झाले, पण मुलं 17 वर्षांनी झाली. ययातिसारखे सारे भोगून झाल्यावर झुणझूनवाला "आयुष्याला शिस्त हवी होती" म्हणत राहिला. आपल्यासाठी हा एक मेसेजच.!!!

चौकस२१२ 19/08/2022 - 06:32
झुनझुनवाला हे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोन्ही होते हे माहित नवहते ... त्यांनी कधी पब्लिक फंड उभा केलं होता कि फक्त स्वतःचेच पैसे गुंतव्ययचे / खेळायायचे ?

टर्मीनेटर 20/08/2022 - 13:55
छान माहितीपूर्ण लेख 👍 राकेश झुनझुनवाला ही व्यक्ती माहिती होती पण त्यांच्याबद्दल विशेष माहिती नव्हती. राकेश झुनझुनवालांना श्रद्धांजली 🙏

विवेकपटाईत 23/08/2022 - 16:20
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी पैसा कमविता येतो पण तो उपभोग करण्यासाठी शरीर ही दुरुस्त पाहिजे. त्यांना जे उशिरा कळले ते आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवले पाहिजे.
वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट, मार्जिन कॉल ते स्कॅम १९९२. जवळपास प्रत्येक सिनेमा आणि टीव्ही सिरिजने शेअर बाजाराला सट्टा बाजार स्वरूपात दाखवलं आहे. हा सट्टा खेळून नुकसान करून ठेवल्याचे एक तरी उदाहरण प्रत्येक घरात असते. या सर्व प्रकारात, बहुतांश ठिकाणी राकेश झुनझुनवाला नाव माहीती असलं तरी कामाबद्दल फार कमी माहीती असते. नाव माहीती असल्याचं कारण म्हणजे बनलेला पैसा. कामाबद्दलची माहीती तशी कमी प्रकाशझोतात असते. बाजारातले काम आणि त्याचे महत्व मेन स्ट्रीम मध्ये फार कमी वेळा दिसते.

अलक १५ ऑगस्ट

मालविका ·

विवेकपटाईत 16/08/2022 - 14:24
दोन्ही मस्त. गल्लीत पतंग ( दिल्लीत १५ ऑगस्ट रक्षाबंधन लोक पतंग उडवितात)विकणारा झेंडे ही विकत होता. मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्यांचीही चिंता करतात. दोन ते तीन हजार रुपये त्याने तीन दिवसात कमविले असतील.

विवेकपटाईत 16/08/2022 - 14:24
दोन्ही मस्त. गल्लीत पतंग ( दिल्लीत १५ ऑगस्ट रक्षाबंधन लोक पतंग उडवितात)विकणारा झेंडे ही विकत होता. मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्यांचीही चिंता करतात. दोन ते तीन हजार रुपये त्याने तीन दिवसात कमविले असतील.
अलक १ नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला.

India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

मार्गी ·

क्लिंटन 13/08/2022 - 12:31
लेख आवडला. पूर्वी मिपावर अशाप्रकारचे लेख येऊन त्यावर उत्तम चर्चा (किंवा खडाजंगी) व्हायची हे हा लेख वाचल्यावर आठवले. काही मुद्दे पटले नाहीत तरीही सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हे समजायला पाहिजे याविषयी पूर्ण सहमती. जानेवारी १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री ताश्कंदला गेले होते तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना तिथे भेटले होते ही एक थिअरी आहे. शास्त्रीजींनी अयुबखानबरोबर करारावर सह्या केल्यानंतर शास्त्री, अयुबखान आणि रशियाचे कोसीजीन यांचा पुढील फोटो प्रसिध्द आहे. त्या फोटोत अयुबखानच्या मागे उभी असलेली व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोसच आहेत अशी ती थिअरी आहे. खखोदेजा. shastriji त्याच थिअरीचा पुढचा भाग म्हणजे शास्त्रीजी ताश्कंदहून भारतात परत येताना सुभाषचंद्र बोसांना बरोबर घेऊन येणार होते म्हणून त्यांचा ताश्कंदमध्येच काटा काढला गेला.

गवि 13/08/2022 - 14:52
ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही.
इन द्याट केस, too many people knew it for it to remain secret. यामुळे ही आणि अशा थियरीज विश्वसनीय राहात नाहीत. सुभाषबाबूंच्या नातेवाईकांनी त्यांचे निधन रुढ थियरीनुसारच झाल्याचे मान्य करुन त्यावर पडदा टाकला आहे. जपान सरकार आणि इतर अनेक प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघात आणि त्यानंतरच्या सुसंगत घटना नोन्दवल्या आहेत. अशा वेळी पुन्हा संशय उत्पन्न करुन त्यांच्या पुढच्या पिढीला मानसिक क्लेश होण्याखेरीज काही होईल असे वाटत नाही.

गवि 13/08/2022 - 15:09
अनेक मृत्युंच्या बाबतीत अशा थियरीज असतात. अमेलिया एरहार्ट, हिटलर, सुभाषचंद्र बोस आणि इतरही असतील. एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.

In reply to by गवि

too many people knew it for it to remain secret.
गवि यांच्या वरील दोन्ही प्रतिसादाशी सहमत. १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतं, ब्रिटिश v तत्कालीन भारतीय नेत्यांमध्ये गुप्त करार झाला होता, हे स्वातंत्र्य मर्यादित काळासाठी असून भारत परत एकदा ब्रिटिशांच्या अधीन होणार आहे - या सर्व वाक्यांना conspiracy theories च्या पलीकडे जास्त घटकाभर मनोरंजन या व्यतिरिक्त जास्त मूल्य नाही. (१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते. तेच नाझी जर्मनी बाबत. यदाकदाचित दुसरे महायुध्द नाझी जर्मनी आणि जपानी साम्राज्य यांनी जिंकले असते आणि त्याला समांतर पद्धतीने नेताजींना आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने ब्रिटिशांविरोधात यश मिळाले असते, तर त्यातून निर्माण होणाऱ्या स्वतंत्र भारताच्या भविष्याचा (जास्त रोमँटिक न होता व्यावहारिक पद्धतीने - pragmatic) विचार करणे रोचक असेल. जसे भारताचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, जर्मनी आणि/किंवा जपानचा सांस्कृतिक , धोरणात्मक प्रभाव (जसा आता ब्रिटिशांचा आहे), इत्यादी.

In reply to by गवि

क्लिंटन 13/08/2022 - 16:27
एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.
अगदी पूर्ण सहमत. पण १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी तैवानमधील त्या बेटावर कोणताही विमान अपघात झाल्याची नोंद नाही हे तैवानच्या सरकारने मुखर्जी आयोगाला कळवले होते. याविषयी अनुज धरांच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. तसे असेल आणि त्यादिवशी विमान अपघात झालाच नसेल तर मग सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हा प्रश्न उभा राहतोच. या सगळ्या वावड्या उठल्या होत्या त्या खर्‍या असतीलच असे म्हणत नाही पण सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी स्पष्टता नसेल तर अशा वावड्या उठणे अपरिहार्य आहे. त्यापेक्षा त्यांचे नक्की काय झाले याचे उत्तर मिळाले तर मग हे सगळे प्रकार बंद होतील. दुसरे म्हणजे मार्ग पटला-नाही पटला तरी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना हा स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा भाग होता हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा महत्वाच्या नेत्याचे पुढे काय झाले हे संशयाचे धुके असणेही बरे नाही.

क्लिंटन 13/08/2022 - 16:16
(१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते.
प्रचंड सहमत. काही मुद्दे पटले नाहीत असे वर प्रतिसादात लिहिले आहे त्याला तोच संदर्भ आहे. पण मागे झाले त्याप्रमाणे धाग्याचा मूळ विषय सोडून भलतीच चर्चा व्हायला लागून धागा हायजॅक होऊ नये म्हणून त्यावर जास्त लिहिले नाही.

जेम्स वांड 14/08/2022 - 07:40
इतरत्र लिहिलं आहे, इथे पण लिहितो. अनुज उत्तम शोध पत्रकार आहे*, हो मी आहे म्हणतो कारण तो विषयाच्या मुळाशी उत्तम जातो. पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल. हे झालं अनुज बद्दल माझं वैयक्तिक मत, आता आपण वळू आपल्या लेखनाकडे. काही मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे:-
स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं.
कदाचित हा शब्द आल्यावर नेताजींना युद्धकैदी केलं असतं, ब्रिटनच्या हवाली केलं असतं वगैरे सगळ्या hypothesis चा उभा केलेला डोलारा पोकळ होऊन थरथरू लागतो. भारत ब्रिटन गुप्त समझोता वगैरे विषय ओके आहे वाचायला पण ते पु ना ओक टाईप पुस्तकांत, माफ करा पण १९३८ हरिपुरा काँग्रेस अधिवेशन आणि १९३९ त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनात हेच शिकवलं आहे आपल्याला, objective thinking and Questioning. मग महातम्याला प्रश्न विचारावे लागले तरी बेहत्तर Happy
जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं.
छोटीशी दुरुस्ती, ते पोलीस नव्हते तर गोरखा रेजिमेंटचे लष्करी जवान होते. जर दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढलेले Cariappa, sam maneckshaw Field Marshal होऊ शकतात, तर सामान्य जवानांना पेन्शन नाकारण्यात काय हशील ?? आझाद हिंद सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक दर्जा बहाल करून इंदिरा गांधींनी पेन्शन पण सुरू केली होती. अजूनही कैक मुद्दे आहेत, आत्ता वेळेअभावी इतकेच, उरलेले परत मांडतो आरामात सवड मिळेल तसे. (सुभाषवादी म्हणून objective ) वांड *अनुजला पार हिंदुस्तान टाईमस् अन् प्री ऑर्कुट याहू ग्रुप काळापासून बघत आलोय, मिशन नेताजींची कार्यक्रमाची सुरुवात अन् अनुजचे त्यात बुडून जाणे हे त्रयस्थपणे बघत आलो आहे सुरुवातीपासून

In reply to by जेम्स वांड

तर्कवादी 16/08/2022 - 18:25
पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल.
लेख वाचून माझेही साधारण हेच मत झाले. पण तरीही महत्वाचा विषय चर्चेत आणल्याबद्दल मार्गी यांचे आभार

मार्गी 14/08/2022 - 13:52
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF11JFm9Rng&utm_source=whatsapp&nd=1 पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी. सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

मार्गी 14/08/2022 - 13:53
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF11JFm9Rng&utm_source=whatsapp&nd=1 पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी. सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

In reply to by मार्गी

गामा पैलवान 14/08/2022 - 18:47
मार्गी, एका ज्वलंत विषयाची ओळख नव्याने करवून दिल्याबद्दल आभार. या भाश्नाच्म अक्षरी रुपांतर कुठे मिळेल काय? ३ तास ऐकणं मुश्कील. शिवाय संदर्भ द्यायची सोय नाही. त्यामुळे मजकूर मिळाल तर बरं होईल. धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 16/08/2022 - 17:34
रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्य सैनीक असेच बेपत्ता झाले. सातार्‍यात त्यांचे चार भिंती हे स्मारक आहे. ठाण्यात देखील एका चौकाला त्यांचे नाव आहे. ते ठाण्याला एका लग्नासाठी आले होते. तेथे ब्रिटीश सैनीकांनी त्यांना पकडण्याचा घात घातला. ते तेथून पळून गेले. त्या नंतर कोणालाच त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

In reply to by विजुभाऊ

सुरिया 16/08/2022 - 17:44
१८५७ चे वर्ष स्वातंत्र्यसमरामुळे गाजू लागले. गोसाव्याच्या वेशात भटकणाऱ्या रंगोबांची गाठ तात्या टोपे ह्यांच्याशी पडली. विचार-विनिमय झाले. त्यानंतर स्वतः धोंडोपंत बाजीराव पेशवे त्यांना बिठूरला घेऊन गेले. स्वातंत्र्यलढ्यासाठी दक्षिणेतले नेतृत्व करण्याचे निश्चित करून रंगोबा परतले. छत्रपतींविषयी आदर असणाऱ्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित केले. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरणी सुरू केली. तसेच त्यांच्या हेरांनी इंग्रजांच्या पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली. मंगल पांडे यांची फाशी (एप्रिल ६ १८५७) व मीरतचा उठाव (मे ७, १८५७) या घटनांमुळे महाराष्ट्रात उठाव करण्यास उत्सुक लोकांना काळाचे वारे ओळखून त्यांनी "कुशल सेनानी योग्य वेळीच आघात करतो वा माघार घेतो" असा सबुरीचा सल्ला दिला. दुर्दैवाने फंदफितुरीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण तिथूनही मोठ्या शिताफीने ते निसटले ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. रंगो बापूजींचे पुतणे यशवंतराव व वामनराव त्यांनीच केलेल्या तयारीप्रमाणे ५०० च्या आसपास मावळे घेऊन उत्तरेकडील उठावात सामील झाले. १८५७ च्या अखेरच्या लढाईत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यलढा मोडून काढल्यावर दक्षिणेतल्या १७ जणांवर खटला भरण्यात आला त्यात रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्यांचे मेव्हणे केशव निळकंठ चित्रे (अण्णा मामा) यांच्यासकट त्या १७ जणांना फाशीची शिक्षा झाली. मृत्यू: कैदेतून निसटल्यावर रंगो बापूजी बैरागी बनले. इ.स. १८७०मध्ये दारव्हा येथे कुपरी नदी (गोकी नदीच्या?)च्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. काही काळ माहूरच्या अरण्यात राहिले. इ.स. १८८५मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला.

मार्गी 17/08/2022 - 15:20
धन्यवाद विजुभाऊ जी आणि सुरिया जी! खूप वेगळी माहिती आपण सांगितलीत. @ गामा पैलवान जी, मग तुम्हांला हे पुस्तक वाचणं जास्त सोपं जाईल. इतकं रंजक आणि फास्ट आहे की थांबवावसं वाटत नाही: https://www.amazon.in/Indias-Biggest-Cover-Up-Anuj-Dhar/dp/9380828691/ref=asc_df_9380828691/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=396986415048&hvpos=&hvnetw=g&hvrand=11053585802950893512&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9062093&hvtargid=pla-406164035713&psc=1&ext_vrnc=hi

नेताजींबद्दल एक प्रकारचे आकर्षण लहानपाणापासुनच वाटत आले आहे. त्यांचे नक्की काय झाले? ह्या प्रष्णाचे उत्तर कधी ना कधी तरी मिळेलच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जेम्स वांड 18/08/2022 - 09:59
नेताजींना त्यांच्या तोडीचे शिष्य म्हणा किंवा कार्यकर्ते मिळाले नाहीत. नेताजी नंतर फक्त वापरले जातायत, आजतागायत.. नेताजींनी स्थापन केलेला फॉरवर्ड ब्लॉक आज एक प्रभावहीन कम्युनिस्ट पक्ष होऊन नेताजी भवन दिल्लीत मर्यादित होऊन बसला आहे. एकेकाळी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरेय्या यांच्यासारख्या आधुनिक भगीरथ माणसाला सोबत घेऊन ज्या माणसाने विज्ञान परिषद घेऊन स्वतंत्र भारत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात कसा प्रगती करेल ह्यावर परिसंवाद घेतले होते त्याचे शिष्य म्हणवणारे आता एकतर कन्स्पिरसी कन्स्पिरसी खेळत बसलेत नेताजींचा उदोउदो करणारे त्यांनी ताठ मानेने गांधी ते पटेल सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले होते त्यांचे तथाकथित शिष्य त्यांनी एकतर फक्त गांधींना प्रश्न विचारले ह्या एकाच कोत्या मनोवृत्तीने नेताजी नेताजी करतात किंवा स्वतः प्रश्न करणाऱ्याच्या मोटीव वर शंका घेतात. नेताजी वारलेत कारण नेताजी ज्यांच्यासाठी लढत ती वृत्तीच गायब आहे, महानायक मध्ये जीवित कृपलानी ह्यांचं एक वाक्य आहे "नेताजींचे समर्थक निद्रिस्त आहेत तेच बरे आहे कारण ते जागे झाले तर नेताजींच्या विचारांवर आधारित एक देशव्यापी संघटना बांधतील" नेताजी जिवंत ठेवायची एकच रीत म्हणजे त्यांचे विचार काया वाचा मने आत्मसात करणे, अगदी त्यांच्यातही शंका असल्या तर बेडर पणे त्या प्रश्न रुपात विचारणे, अन् जमेल तसे त्यावर स्वतः सोल्युशन शोधणे, तोवर नेताजी कायमच मृत राहतील. अगदी विचारांनी सुद्धा.

क्लिंटन 13/08/2022 - 12:31
लेख आवडला. पूर्वी मिपावर अशाप्रकारचे लेख येऊन त्यावर उत्तम चर्चा (किंवा खडाजंगी) व्हायची हे हा लेख वाचल्यावर आठवले. काही मुद्दे पटले नाहीत तरीही सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हे समजायला पाहिजे याविषयी पूर्ण सहमती. जानेवारी १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री ताश्कंदला गेले होते तेव्हा सुभाषचंद्र बोस त्यांना तिथे भेटले होते ही एक थिअरी आहे. शास्त्रीजींनी अयुबखानबरोबर करारावर सह्या केल्यानंतर शास्त्री, अयुबखान आणि रशियाचे कोसीजीन यांचा पुढील फोटो प्रसिध्द आहे. त्या फोटोत अयुबखानच्या मागे उभी असलेली व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोसच आहेत अशी ती थिअरी आहे. खखोदेजा. shastriji त्याच थिअरीचा पुढचा भाग म्हणजे शास्त्रीजी ताश्कंदहून भारतात परत येताना सुभाषचंद्र बोसांना बरोबर घेऊन येणार होते म्हणून त्यांचा ताश्कंदमध्येच काटा काढला गेला.

गवि 13/08/2022 - 14:52
ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही.
इन द्याट केस, too many people knew it for it to remain secret. यामुळे ही आणि अशा थियरीज विश्वसनीय राहात नाहीत. सुभाषबाबूंच्या नातेवाईकांनी त्यांचे निधन रुढ थियरीनुसारच झाल्याचे मान्य करुन त्यावर पडदा टाकला आहे. जपान सरकार आणि इतर अनेक प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघात आणि त्यानंतरच्या सुसंगत घटना नोन्दवल्या आहेत. अशा वेळी पुन्हा संशय उत्पन्न करुन त्यांच्या पुढच्या पिढीला मानसिक क्लेश होण्याखेरीज काही होईल असे वाटत नाही.

गवि 13/08/2022 - 15:09
अनेक मृत्युंच्या बाबतीत अशा थियरीज असतात. अमेलिया एरहार्ट, हिटलर, सुभाषचंद्र बोस आणि इतरही असतील. एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.

In reply to by गवि

too many people knew it for it to remain secret.
गवि यांच्या वरील दोन्ही प्रतिसादाशी सहमत. १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतं, ब्रिटिश v तत्कालीन भारतीय नेत्यांमध्ये गुप्त करार झाला होता, हे स्वातंत्र्य मर्यादित काळासाठी असून भारत परत एकदा ब्रिटिशांच्या अधीन होणार आहे - या सर्व वाक्यांना conspiracy theories च्या पलीकडे जास्त घटकाभर मनोरंजन या व्यतिरिक्त जास्त मूल्य नाही. (१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते. तेच नाझी जर्मनी बाबत. यदाकदाचित दुसरे महायुध्द नाझी जर्मनी आणि जपानी साम्राज्य यांनी जिंकले असते आणि त्याला समांतर पद्धतीने नेताजींना आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने ब्रिटिशांविरोधात यश मिळाले असते, तर त्यातून निर्माण होणाऱ्या स्वतंत्र भारताच्या भविष्याचा (जास्त रोमँटिक न होता व्यावहारिक पद्धतीने - pragmatic) विचार करणे रोचक असेल. जसे भारताचे परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, जर्मनी आणि/किंवा जपानचा सांस्कृतिक , धोरणात्मक प्रभाव (जसा आता ब्रिटिशांचा आहे), इत्यादी.

In reply to by गवि

क्लिंटन 13/08/2022 - 16:27
एक लक्षात घेतलं पाहिजे की सतत आणि सलग कार्यरत असलेली, एखादे मिशन हाती घेतलेली ध्येयासक्त माणसे (मिशन भले की बुरे हा विषय वेगळा) ही अचानक एका रात्रीत किंवा एका अपघातानंतर अचानक कायमचे विजनवासात जाणे आणि अगदी नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत पूर्ण काळ अज्ञात बनून राहणे हे तर्काने पटत नाही. आणि साधू, बैरागी बाबा, संन्यासी अशा रुपात राहणे तर त्याहून न पटण्यासारखे.
अगदी पूर्ण सहमत. पण १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी तैवानमधील त्या बेटावर कोणताही विमान अपघात झाल्याची नोंद नाही हे तैवानच्या सरकारने मुखर्जी आयोगाला कळवले होते. याविषयी अनुज धरांच्या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. तसे असेल आणि त्यादिवशी विमान अपघात झालाच नसेल तर मग सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले हा प्रश्न उभा राहतोच. या सगळ्या वावड्या उठल्या होत्या त्या खर्‍या असतीलच असे म्हणत नाही पण सुभाषचंद्र बोसांचे नक्की काय झाले याविषयी स्पष्टता नसेल तर अशा वावड्या उठणे अपरिहार्य आहे. त्यापेक्षा त्यांचे नक्की काय झाले याचे उत्तर मिळाले तर मग हे सगळे प्रकार बंद होतील. दुसरे म्हणजे मार्ग पटला-नाही पटला तरी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना हा स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचा भाग होता हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा महत्वाच्या नेत्याचे पुढे काय झाले हे संशयाचे धुके असणेही बरे नाही.

क्लिंटन 13/08/2022 - 16:16
(१९३०-४० च्या दशकातील) जपानी साम्राज्याच्या सैन्याच्या तुलनेत अन्याय, शोषण आणि पिळवणूक करणारे ब्रिटिश नक्कीच जास्त सभ्य होते.
प्रचंड सहमत. काही मुद्दे पटले नाहीत असे वर प्रतिसादात लिहिले आहे त्याला तोच संदर्भ आहे. पण मागे झाले त्याप्रमाणे धाग्याचा मूळ विषय सोडून भलतीच चर्चा व्हायला लागून धागा हायजॅक होऊ नये म्हणून त्यावर जास्त लिहिले नाही.

जेम्स वांड 14/08/2022 - 07:40
इतरत्र लिहिलं आहे, इथे पण लिहितो. अनुज उत्तम शोध पत्रकार आहे*, हो मी आहे म्हणतो कारण तो विषयाच्या मुळाशी उत्तम जातो. पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल. हे झालं अनुज बद्दल माझं वैयक्तिक मत, आता आपण वळू आपल्या लेखनाकडे. काही मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे:-
स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं.
कदाचित हा शब्द आल्यावर नेताजींना युद्धकैदी केलं असतं, ब्रिटनच्या हवाली केलं असतं वगैरे सगळ्या hypothesis चा उभा केलेला डोलारा पोकळ होऊन थरथरू लागतो. भारत ब्रिटन गुप्त समझोता वगैरे विषय ओके आहे वाचायला पण ते पु ना ओक टाईप पुस्तकांत, माफ करा पण १९३८ हरिपुरा काँग्रेस अधिवेशन आणि १९३९ त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनात हेच शिकवलं आहे आपल्याला, objective thinking and Questioning. मग महातम्याला प्रश्न विचारावे लागले तरी बेहत्तर Happy
जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं.
छोटीशी दुरुस्ती, ते पोलीस नव्हते तर गोरखा रेजिमेंटचे लष्करी जवान होते. जर दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढलेले Cariappa, sam maneckshaw Field Marshal होऊ शकतात, तर सामान्य जवानांना पेन्शन नाकारण्यात काय हशील ?? आझाद हिंद सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक दर्जा बहाल करून इंदिरा गांधींनी पेन्शन पण सुरू केली होती. अजूनही कैक मुद्दे आहेत, आत्ता वेळेअभावी इतकेच, उरलेले परत मांडतो आरामात सवड मिळेल तसे. (सुभाषवादी म्हणून objective ) वांड *अनुजला पार हिंदुस्तान टाईमस् अन् प्री ऑर्कुट याहू ग्रुप काळापासून बघत आलोय, मिशन नेताजींची कार्यक्रमाची सुरुवात अन् अनुजचे त्यात बुडून जाणे हे त्रयस्थपणे बघत आलो आहे सुरुवातीपासून

In reply to by जेम्स वांड

तर्कवादी 16/08/2022 - 18:25
पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल.
लेख वाचून माझेही साधारण हेच मत झाले. पण तरीही महत्वाचा विषय चर्चेत आणल्याबद्दल मार्गी यांचे आभार

मार्गी 14/08/2022 - 13:52
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF11JFm9Rng&utm_source=whatsapp&nd=1 पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी. सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

मार्गी 14/08/2022 - 13:53
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! वेगवेगळे सर्व अँगल्स, बाजू, मतांचं व भुमिकांचं स्वागत करतो. मी लिहीली तीच भुमिका एकमेव बरोबर आहे, असं मला अजिबातच वाटत नाही. पुस्तक वाचल्यावर व पोडकास्टस ऐकल्यानंतरची प्रतिक्रिया, इतकाच लेखाचा स्कोप होता. अनेक जणांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे, त्यांना विशेष धन्यवाद. माझ्या माहितीमध्ये त्यामुळे भर पडली. ह्या विषयाच्या इतरही बाजू आहेत. मुळात २०१६ मध्ये डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांमध्ये नव्याने समोर आलेले मुद्दे ह्या विषयामध्ये आहेत, ते लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येकाला कशाला योग्य मानायचं, कोणत्या गोष्टी, कोणते स्रोत खरे मानायचे, ह्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहेच. पटणं न पटणं किरकोळ गोष्ट आहे. वेगवेगळे व्यापक मुद्दे विचारात घेता यावेत, इतकंच वाटतं. ज्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना मी सुचवेन की, अनुज धरचं https://open.spotify.com/episode/0orD4XiUYwKk6vIdO5AmaP?si=9RKOxwpZSlerF11JFm9Rng&utm_source=whatsapp&nd=1 पोडकास्ट पूर्ण ऐकून आपली प्रतिक्रिया द्यावी. सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद.

In reply to by मार्गी

गामा पैलवान 14/08/2022 - 18:47
मार्गी, एका ज्वलंत विषयाची ओळख नव्याने करवून दिल्याबद्दल आभार. या भाश्नाच्म अक्षरी रुपांतर कुठे मिळेल काय? ३ तास ऐकणं मुश्कील. शिवाय संदर्भ द्यायची सोय नाही. त्यामुळे मजकूर मिळाल तर बरं होईल. धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.

विजुभाऊ 16/08/2022 - 17:34
रंगो बापूजी गुप्ते हे स्वातंत्र्य सैनीक असेच बेपत्ता झाले. सातार्‍यात त्यांचे चार भिंती हे स्मारक आहे. ठाण्यात देखील एका चौकाला त्यांचे नाव आहे. ते ठाण्याला एका लग्नासाठी आले होते. तेथे ब्रिटीश सैनीकांनी त्यांना पकडण्याचा घात घातला. ते तेथून पळून गेले. त्या नंतर कोणालाच त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

In reply to by विजुभाऊ

सुरिया 16/08/2022 - 17:44
१८५७ चे वर्ष स्वातंत्र्यसमरामुळे गाजू लागले. गोसाव्याच्या वेशात भटकणाऱ्या रंगोबांची गाठ तात्या टोपे ह्यांच्याशी पडली. विचार-विनिमय झाले. त्यानंतर स्वतः धोंडोपंत बाजीराव पेशवे त्यांना बिठूरला घेऊन गेले. स्वातंत्र्यलढ्यासाठी दक्षिणेतले नेतृत्व करण्याचे निश्चित करून रंगोबा परतले. छत्रपतींविषयी आदर असणाऱ्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित केले. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरणी सुरू केली. तसेच त्यांच्या हेरांनी इंग्रजांच्या पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली. मंगल पांडे यांची फाशी (एप्रिल ६ १८५७) व मीरतचा उठाव (मे ७, १८५७) या घटनांमुळे महाराष्ट्रात उठाव करण्यास उत्सुक लोकांना काळाचे वारे ओळखून त्यांनी "कुशल सेनानी योग्य वेळीच आघात करतो वा माघार घेतो" असा सबुरीचा सल्ला दिला. दुर्दैवाने फंदफितुरीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण तिथूनही मोठ्या शिताफीने ते निसटले ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. रंगो बापूजींचे पुतणे यशवंतराव व वामनराव त्यांनीच केलेल्या तयारीप्रमाणे ५०० च्या आसपास मावळे घेऊन उत्तरेकडील उठावात सामील झाले. १८५७ च्या अखेरच्या लढाईत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यलढा मोडून काढल्यावर दक्षिणेतल्या १७ जणांवर खटला भरण्यात आला त्यात रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्यांचे मेव्हणे केशव निळकंठ चित्रे (अण्णा मामा) यांच्यासकट त्या १७ जणांना फाशीची शिक्षा झाली. मृत्यू: कैदेतून निसटल्यावर रंगो बापूजी बैरागी बनले. इ.स. १८७०मध्ये दारव्हा येथे कुपरी नदी (गोकी नदीच्या?)च्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. काही काळ माहूरच्या अरण्यात राहिले. इ.स. १८८५मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला.

मार्गी 17/08/2022 - 15:20
धन्यवाद विजुभाऊ जी आणि सुरिया जी! खूप वेगळी माहिती आपण सांगितलीत. @ गामा पैलवान जी, मग तुम्हांला हे पुस्तक वाचणं जास्त सोपं जाईल. इतकं रंजक आणि फास्ट आहे की थांबवावसं वाटत नाही: https://www.amazon.in/Indias-Biggest-Cover-Up-Anuj-Dhar/dp/9380828691/ref=asc_df_9380828691/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=396986415048&hvpos=&hvnetw=g&hvrand=11053585802950893512&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9062093&hvtargid=pla-406164035713&psc=1&ext_vrnc=hi

नेताजींबद्दल एक प्रकारचे आकर्षण लहानपाणापासुनच वाटत आले आहे. त्यांचे नक्की काय झाले? ह्या प्रष्णाचे उत्तर कधी ना कधी तरी मिळेलच. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जेम्स वांड 18/08/2022 - 09:59
नेताजींना त्यांच्या तोडीचे शिष्य म्हणा किंवा कार्यकर्ते मिळाले नाहीत. नेताजी नंतर फक्त वापरले जातायत, आजतागायत.. नेताजींनी स्थापन केलेला फॉरवर्ड ब्लॉक आज एक प्रभावहीन कम्युनिस्ट पक्ष होऊन नेताजी भवन दिल्लीत मर्यादित होऊन बसला आहे. एकेकाळी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरेय्या यांच्यासारख्या आधुनिक भगीरथ माणसाला सोबत घेऊन ज्या माणसाने विज्ञान परिषद घेऊन स्वतंत्र भारत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात कसा प्रगती करेल ह्यावर परिसंवाद घेतले होते त्याचे शिष्य म्हणवणारे आता एकतर कन्स्पिरसी कन्स्पिरसी खेळत बसलेत नेताजींचा उदोउदो करणारे त्यांनी ताठ मानेने गांधी ते पटेल सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले होते त्यांचे तथाकथित शिष्य त्यांनी एकतर फक्त गांधींना प्रश्न विचारले ह्या एकाच कोत्या मनोवृत्तीने नेताजी नेताजी करतात किंवा स्वतः प्रश्न करणाऱ्याच्या मोटीव वर शंका घेतात. नेताजी वारलेत कारण नेताजी ज्यांच्यासाठी लढत ती वृत्तीच गायब आहे, महानायक मध्ये जीवित कृपलानी ह्यांचं एक वाक्य आहे "नेताजींचे समर्थक निद्रिस्त आहेत तेच बरे आहे कारण ते जागे झाले तर नेताजींच्या विचारांवर आधारित एक देशव्यापी संघटना बांधतील" नेताजी जिवंत ठेवायची एकच रीत म्हणजे त्यांचे विचार काया वाचा मने आत्मसात करणे, अगदी त्यांच्यातही शंका असल्या तर बेडर पणे त्या प्रश्न रुपात विचारणे, अन् जमेल तसे त्यावर स्वतः सोल्युशन शोधणे, तोवर नेताजी कायमच मृत राहतील. अगदी विचारांनी सुद्धा.
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते.

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद ·

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.

पाषाणभेद 11/08/2022 - 13:25
कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा 11/08/2022 - 18:29
मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

In reply to by प्रचेतस

पाषाणभेद 11/08/2022 - 20:38
साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

In reply to by कपिलमुनी

सतिश गावडे 11/08/2022 - 22:30
विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 12/08/2022 - 06:45
आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

In reply to by सतिश गावडे

सोत्रि 12/08/2022 - 14:24
रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुरिया 12/08/2022 - 16:38
असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

स्मरणरंजन : पिरसा

मंदार कात्रे ·

सर टोबी 03/08/2022 - 17:05
बांबूंची घोंगडी वाळत घालण्याची तिकडम कि खाली पेटवलेली शेकोटी असा प्रश्न पडलाय. प्रशस्तीचे प्रतिसाद यायला लागल्यामुळे असा बावळट प्रश्न पडणारे फक्त आपणच आहोत का असा एक दुय्यम प्रश्न पण पडला आहे. शेवटी अज्ञान हे उघड केल्याशिवाय दूर होत नाही म्हणून मग शेवटी हे धाडस केले.

कंजूस 04/08/2022 - 05:40
शाळेत जाणेही कष्टाचे होते तेव्हा. ( हल्ली आया मुलांना स्कूटरवर बसवून 'क्लास'ला सोडतात भुरर तेव्हा पोर मागे फोनमध्ये स्टेटस आणि मेसेज पाहात असते हे पाहून गंमत वाटते.)

जेम्स वांड 04/08/2022 - 06:34
मला कोकणातील रोजच्या जीवनाचा तितकासा अनुभव किंवा आधुनिक पद्धतीने म्हणल्यास एक्सपोजर नाही, अश्या स्मरणरंजन असणाऱ्या लेखांतून ते कळते, लेखन फारच वास्तवदर्शी आहे, स्वतः धो धो पाऊस सुरू असताना पिरश्यासमोर बसल्यासारखे जाणवले इतके उबदार अन् सालस उत्तम लेखन

सतिश गावडे 04/08/2022 - 10:11
माझेही बालपण कोकणात काहीसे असेच गेले. मी तर स्वतःच गुरे राखलीत बरीच वर्षे. तुमच्या वरच्या बाजूच्या जिल्ह्यातील असूनही "पिरसा" असा उल्लेख कधी ऐकला नाही. अगदी तुम्ही उल्लेख केले ते दुसऱ्या नावानेही नाही. बहुतेक रत्नागिरी स्पेशल आहे पिरसा :)

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 04/08/2022 - 11:56
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पिरसा असतोच असतो.. हल्ली हल्ली आता वॉशिंग मशीन आणि एकंदरीत कपड्यांची संख्या वाढल्यामुळे पिरसा अदृश्य झालाय.. पूर्वी कपड्यांचे दोन जोड असायचे, अश्या वेळेस कपडे वळले नाहीत तर उद्या घालणार काय? मग एखाद्या पडवीत, विशेषतः वासराच्या पडवीत विस्तव घातला जायचा. एक प्रकारे तान्ह्या वासरांची शेकोटी, आणि तिथेच वरती दांडी/दोरी बांधून न वाळलेले कपडे वळायला टाकायचे.. शेकोटी पण झाली आणि कपडे पण वाळले. सकाळी चुरचुरीत आणि धुराच्या वासाचे कपडे घालायला छान वाटायचे.. घरात तान्ही बाळंतीण असेल तर ते मुलाचे लंगोट वगैरे वाळवायला पण हा जुगाड हवाच.

In reply to by सतिश गावडे

हो मीदेखील दहावी नंतर कॉलेज सुरु होईपर्यंत ३ महिने गुरे राखली आहेत. स्थान परत्वे नावात बदल होत असेल

छान लिहीलं आहे. काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने. त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

छान लिहीलं आहे. काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने. त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

गामा पैलवान 05/08/2022 - 02:14
मंदार कात्रे, लेख फक्कड जमलाय. वर्णन अगदी समोर घडतंय असं प्रत्ययी आहे. पिरसा हा प्रेस चा अपभ्रंश तर नाही ....? clothes pressing वरनं सहज शंका आली. आ.न., -गा.पै.

सुजित जाधव 09/08/2022 - 18:33
छान लेख... तुमचा लेख वाचून लहानपणी थंडीच्या दिवसांत आम्ही शेकोटी समोर बसून मोठ्या माणसांच्या राजकारणावर आणि गावातील घडामोडींवर रंगलेल्या गप्पा ऐकत बसायचो त्याची आठवण झाली.

सर टोबी 03/08/2022 - 17:05
बांबूंची घोंगडी वाळत घालण्याची तिकडम कि खाली पेटवलेली शेकोटी असा प्रश्न पडलाय. प्रशस्तीचे प्रतिसाद यायला लागल्यामुळे असा बावळट प्रश्न पडणारे फक्त आपणच आहोत का असा एक दुय्यम प्रश्न पण पडला आहे. शेवटी अज्ञान हे उघड केल्याशिवाय दूर होत नाही म्हणून मग शेवटी हे धाडस केले.

कंजूस 04/08/2022 - 05:40
शाळेत जाणेही कष्टाचे होते तेव्हा. ( हल्ली आया मुलांना स्कूटरवर बसवून 'क्लास'ला सोडतात भुरर तेव्हा पोर मागे फोनमध्ये स्टेटस आणि मेसेज पाहात असते हे पाहून गंमत वाटते.)

जेम्स वांड 04/08/2022 - 06:34
मला कोकणातील रोजच्या जीवनाचा तितकासा अनुभव किंवा आधुनिक पद्धतीने म्हणल्यास एक्सपोजर नाही, अश्या स्मरणरंजन असणाऱ्या लेखांतून ते कळते, लेखन फारच वास्तवदर्शी आहे, स्वतः धो धो पाऊस सुरू असताना पिरश्यासमोर बसल्यासारखे जाणवले इतके उबदार अन् सालस उत्तम लेखन

सतिश गावडे 04/08/2022 - 10:11
माझेही बालपण कोकणात काहीसे असेच गेले. मी तर स्वतःच गुरे राखलीत बरीच वर्षे. तुमच्या वरच्या बाजूच्या जिल्ह्यातील असूनही "पिरसा" असा उल्लेख कधी ऐकला नाही. अगदी तुम्ही उल्लेख केले ते दुसऱ्या नावानेही नाही. बहुतेक रत्नागिरी स्पेशल आहे पिरसा :)

In reply to by सतिश गावडे

आनन्दा 04/08/2022 - 11:56
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पिरसा असतोच असतो.. हल्ली हल्ली आता वॉशिंग मशीन आणि एकंदरीत कपड्यांची संख्या वाढल्यामुळे पिरसा अदृश्य झालाय.. पूर्वी कपड्यांचे दोन जोड असायचे, अश्या वेळेस कपडे वळले नाहीत तर उद्या घालणार काय? मग एखाद्या पडवीत, विशेषतः वासराच्या पडवीत विस्तव घातला जायचा. एक प्रकारे तान्ह्या वासरांची शेकोटी, आणि तिथेच वरती दांडी/दोरी बांधून न वाळलेले कपडे वळायला टाकायचे.. शेकोटी पण झाली आणि कपडे पण वाळले. सकाळी चुरचुरीत आणि धुराच्या वासाचे कपडे घालायला छान वाटायचे.. घरात तान्ही बाळंतीण असेल तर ते मुलाचे लंगोट वगैरे वाळवायला पण हा जुगाड हवाच.

In reply to by सतिश गावडे

हो मीदेखील दहावी नंतर कॉलेज सुरु होईपर्यंत ३ महिने गुरे राखली आहेत. स्थान परत्वे नावात बदल होत असेल

छान लिहीलं आहे. काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने. त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

छान लिहीलं आहे. काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने. त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

गामा पैलवान 05/08/2022 - 02:14
मंदार कात्रे, लेख फक्कड जमलाय. वर्णन अगदी समोर घडतंय असं प्रत्ययी आहे. पिरसा हा प्रेस चा अपभ्रंश तर नाही ....? clothes pressing वरनं सहज शंका आली. आ.न., -गा.पै.

सुजित जाधव 09/08/2022 - 18:33
छान लेख... तुमचा लेख वाचून लहानपणी थंडीच्या दिवसांत आम्ही शेकोटी समोर बसून मोठ्या माणसांच्या राजकारणावर आणि गावातील घडामोडींवर रंगलेल्या गप्पा ऐकत बसायचो त्याची आठवण झाली.
पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं... दफ्तरात एका प्लास्टिक पिशवीत सगळी वह्यापुस्तकं सुरक्षित असायची पण कपडे मात्र भिजायचेच... मग तसंच कुडकुडत शाळेत बसावं लागे... पण तसा मी काही एकटाच नव्हतो, सगळीच मुलं कमी अधिक भिजूनच शाळेत आलेली असत...मी रोज अडीच किलोमीटर चालतं शाळेत जायचा पण आमच्या शाळेत काही मुलं रोज आठ ते दहा किमी चालून शाळेत यायची त्यावेळी!

स्मरणरंजन : रेडियो

मंदार कात्रे ·

चौथा कोनाडा 03/08/2022 - 11:47
व्वा, सुंदर लेखन. माझ्या मामाचा व्हॉल्वचा रेडिओ आणि त्याच्याशी केलेल्या खटपटी आठवल्या. नंतर थेट हॉस्टेलला ट्रान्झिस्टर. त्या दशकातले रेडिओ श्रवण म्हणजे आयुष्यातील मोठाठेवा आहे

सौंदाळा 03/08/2022 - 12:07
छान स्मरणरंजन. नातेवाईकांकडे मोठा (वाल्व्ह वाला) रेडिओ होता. अगदी १९९८-९९ पर्यंत पण चालू होता. नंतर संगणक घेतल्यामुळे त्याला जागा करण्यासाठी रेडिओ काढून टाकला. आता मोठे घर घेतल्यावर त्यांना हळहळ वाटते आहे की तो रेडीओ पाहिजे होता. शोपीस म्हणून तरी पाहिजे होता.

Nitin Palkar 03/08/2022 - 13:19
आमच्या घरी १९६९ साली रेडीओ आला. सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणारे 'वंदे मातरम्', सहाच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि नंतरची 'मंगल प्रभात' यांनीच दिवसाची सुरुवात होत असे. आकाशवाणी मुंबई 'ब' केंद्रावरच्या बातम्यांसह अनेक कार्यक्रमांच्या आठवणी अद्याप मनात घोळतायत. काही निवडक कार्यक्रमांचा उल्लेख इथे करावासा वाटतो. सकाळी अकरा आणि संध्याकळी साडेसहाची कामगारसभा, दुपारचे वनिता मंडळ (हा आईचा कार्यक्रम), 'बिनाका गीतमाला' हा कार्यक्रम सुरुवातीला रेडीओ सिलोनवरून सादर होत असे,नंतर तो विविध भारतीवरून सादर होऊ लागला. संगीत सरिता, बेला के फुल, जयमाला, अनुरोध गीत, हवामहल हे विविध भारतीचे कार्यक्रम, मुंबई 'अ' वरील 'Sports Round Up' आणि 'Cricket Commentry', रेडीओ सिलोनवरून सादर होणारे सकाळी साडे सातचे 'पुरानी फिल्मोन्का संगीत' आणि पाठोपाठ आठ वाजता 'आप हि के गीत' हे कार्यक्रम म्हणजे शाळा, कार्यालयात जाणाऱ्यालोकांसाठी घड्याळाचे काम करत. अशाच आठवणीत रमू शकणार्यांसाठी बिनाका गीतमालेचा एक दुवा https://www.youtube.com/watch?v=jHCnQQxfrMU रेडीओच्या वापरासाठी वार्षिक परवाना शुल्क भरावे लागत असे ही सुद्धा एक आठवण.

आमच्या घरी १९६६ मधे रेडिओ आला. दोन मोठे बांबू मधे जाळीदार पट्टीची एरीयल,अन्टेना , जड सहा बाय चारची बॅटरी. एक मोठा कोनाडा ,रेडिओ वर क्रोशीया चे सजावटी कव्हर. दर बुधवार बिनाका गीतमाला ऐकण्यास गल्लीतले लोक जमा व्हायचे. पोस्ट ऑफिस मधे वार्षीक परवाना मीळत आसे. एक आठवण.

आग्या१९९० 03/08/2022 - 14:12
छान लेखन! थोड्याच वेळापूर्वी सिनेमा गल्लीवर तुमचा लेख वाचला. ....इस गीतके गीतकार शकील बदायुनी और संगीतकार जयदेव... हे ऐकताना कधीच ह्या कलाकारांचे चेहरे समोर येत नसत. फार ग्लॅमर नव्हतं त्यांना. योगायोगाने आज ह्या दोघांची जयंती आहे,त्यांना विनम्र अभिवादन.

माझ्या जन्माच्या आधीपासूनच मार्कोनी कंपनीचा रेडिओ घरात होता.खूप वर्ष वापरला. नंतर नंतर त्याला थपडा माराव्या लागत महच तो चालू होई.पण तो कधी विकला काही आठवत नाही. बिनाका गीतमाला,आपली आवड आणि ते महिलांचा कार्यक्रम अजून आठवतोय. तुम्ही त्या आठवणी ताज्या केल्या त्याबद्दल तुमचै मनापासून धन्यवाद. आणि एक आठवण म्हणजे गाणं लागले की त्यातले बोल लिहून घेण्याची धडपड.मला आयतं मिळायचं ते पण ताई लिहून घ्यायची आणि ती आणि तिच्या मैत्रीणींची धडपड असायची सगळे बोल मिळे पर्यंत मग ती एका वहीत सुरेख अक्शरात लिहून ठेवायची. तिला गाण्याची वही असं नांव दिलं होतं. म माझ्याकडे अजून ती वही आहे. ती हातात घेतली की तो रेडिओ आठवतो.

सिरुसेरि 03/08/2022 - 15:59
रेडीओच्या छान आठवणी . आकाशवाणीवरील आपली आवड , आपकी पसंद , चिंतन , श्रुतीका , मुलाखती हे कार्यक्रम लक्षात आहेत . तसेच "हॅलो तरंग" अशा काहिशा नावाचा कार्यक्रम असे . यामधे श्रोते एका ठराविक नंबरवर फोन करुन आपल्या आवडीच्या गाण्याची फर्माईश करत असत . व ते गाणे आपल्याला का आवडते आहे ते निवेद्काला सांगत असत .

माझी आजी आणि आई दोघींचा ट्रांन्झिस्टर लावुनच दिवस सुरु होत असे. स्वयंपाकघरात घड्याळ नसल्याने रेडिओमुळेच वेळ कळे. " वर सांगितलेले सर्व कार्यक्रम एकेक करुन चालु असत. आणि त्याच्या तालावर रोजची कामेही. एक गंमत--"आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा" असा एक प्रकार सकाळी ६.५० ला रेडिओवर सांगत. ती लागली की घरुन निघायचेच नाहितर शाळेत पोचायला उशीर होत असे. कधीकधी रुपरेषा संपली तरी मी घरीच असे. मग मात्र जोरात धूम ठोकायची, नाहीतर शाळेत जन गण मन सुरु आणि उशीर झाल्याबद्दल शिक्षा ठरलेली.

सौंदाळा 03/08/2022 - 19:18
ते एक गीर्वाणवाणीतले गाणे / भजन नेहमी सकाळी लागयचे. आता शब्द आठवत नाहीत. ऑनलाईन कुठे असेल तर कृपया लिंक पाठवा.

गामा पैलवान 06/08/2022 - 17:45
मंदार कात्रे, लहानपणी रेडियोने माझा पावलोव्हचा कुत्रा करून टाकला होता. सकाळी ११ वाजता कामगारांच्या कार्यक्रमाचं संगीत सुरू झालं की अस्मादिकांना भूक लागे. तोडम मोठं झाल्यावर हीच भूक 'मंगलप्रभात' च्या वेळेस उफाळून येई. यथावकाश जवानीत प्रवेश केल्यावर अभियांत्रिकी नामे छळछावणीत नियुक्ती झाली. तेव्हा वसतिगृहात रहात असल्याने 'बेलाके फूल' च्या समयी चायनीज भूक लागे. एकंदरीत रेडियो म्हंटलं की खाद्यजत्रा आठवते. पण एक रत्नं मात्र रेडियोवरंच सापडलं. ते म्हणजे रामदास कामतांनी गायलेलं शिवतांडवस्तोत्र. तूनळीवर इतर प्रकारे गायलेली स्तोत्रं बरीच आहेत. पण रामदास कामत ते रामदास कामतच. असो. स्मृतिरंजन आवडलं. लिहिते असा. आ.न., -गा.पै.

पर्णिका 10/08/2022 - 02:56
'आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.' या आवाजानेच दिवसाची सुरुवात होत असे, हे आठवले. छानच झालंय स्मरणरंजन ! बिनाका गीतमाला, विविधभारती असे कार्यक्रम आजही आठवतात. माझे बाबा अजूनही सकाळच्या बातम्या रेडिओवरच ऐकतात. या आठवणी सदैव सोबत राहतील...! अगदी सहमत

चौथा कोनाडा 03/08/2022 - 11:47
व्वा, सुंदर लेखन. माझ्या मामाचा व्हॉल्वचा रेडिओ आणि त्याच्याशी केलेल्या खटपटी आठवल्या. नंतर थेट हॉस्टेलला ट्रान्झिस्टर. त्या दशकातले रेडिओ श्रवण म्हणजे आयुष्यातील मोठाठेवा आहे

सौंदाळा 03/08/2022 - 12:07
छान स्मरणरंजन. नातेवाईकांकडे मोठा (वाल्व्ह वाला) रेडिओ होता. अगदी १९९८-९९ पर्यंत पण चालू होता. नंतर संगणक घेतल्यामुळे त्याला जागा करण्यासाठी रेडिओ काढून टाकला. आता मोठे घर घेतल्यावर त्यांना हळहळ वाटते आहे की तो रेडीओ पाहिजे होता. शोपीस म्हणून तरी पाहिजे होता.

Nitin Palkar 03/08/2022 - 13:19
आमच्या घरी १९६९ साली रेडीओ आला. सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणारे 'वंदे मातरम्', सहाच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि नंतरची 'मंगल प्रभात' यांनीच दिवसाची सुरुवात होत असे. आकाशवाणी मुंबई 'ब' केंद्रावरच्या बातम्यांसह अनेक कार्यक्रमांच्या आठवणी अद्याप मनात घोळतायत. काही निवडक कार्यक्रमांचा उल्लेख इथे करावासा वाटतो. सकाळी अकरा आणि संध्याकळी साडेसहाची कामगारसभा, दुपारचे वनिता मंडळ (हा आईचा कार्यक्रम), 'बिनाका गीतमाला' हा कार्यक्रम सुरुवातीला रेडीओ सिलोनवरून सादर होत असे,नंतर तो विविध भारतीवरून सादर होऊ लागला. संगीत सरिता, बेला के फुल, जयमाला, अनुरोध गीत, हवामहल हे विविध भारतीचे कार्यक्रम, मुंबई 'अ' वरील 'Sports Round Up' आणि 'Cricket Commentry', रेडीओ सिलोनवरून सादर होणारे सकाळी साडे सातचे 'पुरानी फिल्मोन्का संगीत' आणि पाठोपाठ आठ वाजता 'आप हि के गीत' हे कार्यक्रम म्हणजे शाळा, कार्यालयात जाणाऱ्यालोकांसाठी घड्याळाचे काम करत. अशाच आठवणीत रमू शकणार्यांसाठी बिनाका गीतमालेचा एक दुवा https://www.youtube.com/watch?v=jHCnQQxfrMU रेडीओच्या वापरासाठी वार्षिक परवाना शुल्क भरावे लागत असे ही सुद्धा एक आठवण.

आमच्या घरी १९६६ मधे रेडिओ आला. दोन मोठे बांबू मधे जाळीदार पट्टीची एरीयल,अन्टेना , जड सहा बाय चारची बॅटरी. एक मोठा कोनाडा ,रेडिओ वर क्रोशीया चे सजावटी कव्हर. दर बुधवार बिनाका गीतमाला ऐकण्यास गल्लीतले लोक जमा व्हायचे. पोस्ट ऑफिस मधे वार्षीक परवाना मीळत आसे. एक आठवण.

आग्या१९९० 03/08/2022 - 14:12
छान लेखन! थोड्याच वेळापूर्वी सिनेमा गल्लीवर तुमचा लेख वाचला. ....इस गीतके गीतकार शकील बदायुनी और संगीतकार जयदेव... हे ऐकताना कधीच ह्या कलाकारांचे चेहरे समोर येत नसत. फार ग्लॅमर नव्हतं त्यांना. योगायोगाने आज ह्या दोघांची जयंती आहे,त्यांना विनम्र अभिवादन.

माझ्या जन्माच्या आधीपासूनच मार्कोनी कंपनीचा रेडिओ घरात होता.खूप वर्ष वापरला. नंतर नंतर त्याला थपडा माराव्या लागत महच तो चालू होई.पण तो कधी विकला काही आठवत नाही. बिनाका गीतमाला,आपली आवड आणि ते महिलांचा कार्यक्रम अजून आठवतोय. तुम्ही त्या आठवणी ताज्या केल्या त्याबद्दल तुमचै मनापासून धन्यवाद. आणि एक आठवण म्हणजे गाणं लागले की त्यातले बोल लिहून घेण्याची धडपड.मला आयतं मिळायचं ते पण ताई लिहून घ्यायची आणि ती आणि तिच्या मैत्रीणींची धडपड असायची सगळे बोल मिळे पर्यंत मग ती एका वहीत सुरेख अक्शरात लिहून ठेवायची. तिला गाण्याची वही असं नांव दिलं होतं. म माझ्याकडे अजून ती वही आहे. ती हातात घेतली की तो रेडिओ आठवतो.

सिरुसेरि 03/08/2022 - 15:59
रेडीओच्या छान आठवणी . आकाशवाणीवरील आपली आवड , आपकी पसंद , चिंतन , श्रुतीका , मुलाखती हे कार्यक्रम लक्षात आहेत . तसेच "हॅलो तरंग" अशा काहिशा नावाचा कार्यक्रम असे . यामधे श्रोते एका ठराविक नंबरवर फोन करुन आपल्या आवडीच्या गाण्याची फर्माईश करत असत . व ते गाणे आपल्याला का आवडते आहे ते निवेद्काला सांगत असत .

माझी आजी आणि आई दोघींचा ट्रांन्झिस्टर लावुनच दिवस सुरु होत असे. स्वयंपाकघरात घड्याळ नसल्याने रेडिओमुळेच वेळ कळे. " वर सांगितलेले सर्व कार्यक्रम एकेक करुन चालु असत. आणि त्याच्या तालावर रोजची कामेही. एक गंमत--"आजच्या कार्यक्रमाची रुपरेषा" असा एक प्रकार सकाळी ६.५० ला रेडिओवर सांगत. ती लागली की घरुन निघायचेच नाहितर शाळेत पोचायला उशीर होत असे. कधीकधी रुपरेषा संपली तरी मी घरीच असे. मग मात्र जोरात धूम ठोकायची, नाहीतर शाळेत जन गण मन सुरु आणि उशीर झाल्याबद्दल शिक्षा ठरलेली.

सौंदाळा 03/08/2022 - 19:18
ते एक गीर्वाणवाणीतले गाणे / भजन नेहमी सकाळी लागयचे. आता शब्द आठवत नाहीत. ऑनलाईन कुठे असेल तर कृपया लिंक पाठवा.

गामा पैलवान 06/08/2022 - 17:45
मंदार कात्रे, लहानपणी रेडियोने माझा पावलोव्हचा कुत्रा करून टाकला होता. सकाळी ११ वाजता कामगारांच्या कार्यक्रमाचं संगीत सुरू झालं की अस्मादिकांना भूक लागे. तोडम मोठं झाल्यावर हीच भूक 'मंगलप्रभात' च्या वेळेस उफाळून येई. यथावकाश जवानीत प्रवेश केल्यावर अभियांत्रिकी नामे छळछावणीत नियुक्ती झाली. तेव्हा वसतिगृहात रहात असल्याने 'बेलाके फूल' च्या समयी चायनीज भूक लागे. एकंदरीत रेडियो म्हंटलं की खाद्यजत्रा आठवते. पण एक रत्नं मात्र रेडियोवरंच सापडलं. ते म्हणजे रामदास कामतांनी गायलेलं शिवतांडवस्तोत्र. तूनळीवर इतर प्रकारे गायलेली स्तोत्रं बरीच आहेत. पण रामदास कामत ते रामदास कामतच. असो. स्मृतिरंजन आवडलं. लिहिते असा. आ.न., -गा.पै.

पर्णिका 10/08/2022 - 02:56
'आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.' या आवाजानेच दिवसाची सुरुवात होत असे, हे आठवले. छानच झालंय स्मरणरंजन ! बिनाका गीतमाला, विविधभारती असे कार्यक्रम आजही आठवतात. माझे बाबा अजूनही सकाळच्या बातम्या रेडिओवरच ऐकतात. या आठवणी सदैव सोबत राहतील...! अगदी सहमत
ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविधभारती... रात के ग्यारंह बजने को है, पेश है बेला के फूल... बाबांनी 1981 साली कोल्हापूर वरून रेडियो आणला. तामिळनाडू चा नूरी ब्रँड चा दोन स्पीकर वाला सन्मायका लावलेला लाकडी रेडियो. त्याआधी ग्रामपंचायतीचा volve वाला रेडियो असायचा. रेडियो आला आणि आमची सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सगळं काही रेडियोमय होऊन गेलं. या नवीन रेडियो वर लांब वरची स्टेशन्स सुद्धा चांगली ऐकू यायची. संध्याकाळी धारवाड हुबळी स्टेशन वरची मराठी गाणी, पहाटे मुंबई अ, आणि मग रत्नागिरी वरची भक्तीगीते. रात्री मात्र पर्मनंट विविधभारती... बाबांना नाट्यसंगीत खूप आवडायचं...

कारगिल विजय दिवसाचे निमिताने

मित्रहो ·

श्रीगणेशा 02/08/2022 - 14:50
लेख आवडला! तेव्हासुद्धा दृकश्राव्य प्रसारमाध्यमातून खूप कमी प्रमाणात (आताच्या तुलनेत) युद्ध सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं. किंवा कदाचित त्यावेळी वयाने लहान असल्यामुळे खूप बारकावे वगैरे पाहिल्याचे आता आठवत नाही.

सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. गोपनीयता हा प्रमुख मुद्दा आसल्यामुळे ,Need to know या तत्त्वावर माहीती देण्यात येते. दुसरा मुद्दा हा आहे की ह्या माहितीचा सामान्य जनतेला तसा काहीच फायदा नसतो. सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. अशी अनेक पुस्तके सेवानिवृत्तीनंतर बर्‍याच प्रमाणात लिहीली आहेत व प्रकाशीतही झाली आहेत. आमच्या वेळेस मिलिट्री सायन्स नावाचा एक ऐच्छिक विषय होता. एन सी सी ची मुले तो घेत ,आताचे माहीती नाही. सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सन सतराशे पासुन ते आतापर्यंत अनेक पुस्तके लिहीली आहेत. अंतरजालावर सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यांना रूची आहे ते जरूर वाचतात. सरकार सुद्धा बरेच पेपर्स प्रकाशीत करते. बाकी लेख चांगला आहे.

मित्रहो 03/08/2022 - 14:13
धन्यवाद श्रीगणेशा आणि कर्नलतपस्वी @ कर्नलतपस्वी गोपनीयता पाळून जी माहिती इंटरनेटवर सर्रास उपलब्ध आहे तिच सांगावी. शालेय शिक्षणात नागरीक शास्त्राबरोबर सैन्याच्या रचेनेविषयी माहिती द्यावी असे माझे मत होते अर्थात गोपनीयता पाळून.

क्लिंटन 03/08/2022 - 15:47
लेख आवडला. या निमित्ताने काही गोष्टी लिहितो. १. पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? इथे भारत सरकार लिहित आहे कोणत्या पक्षाचे सरकार याचा संबंध नाही. २००३ मध्ये बेनझीर भुत्तोंनी म्हटले होते की परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी सैन्याचा DGMO असताना त्याने पंतप्रधान बेनझीरकडे कारगील सारखे ऑपरेशन करायचा प्रस्ताव आणला होता. पण तो प्रस्ताव बेनझीरने नाकारला. https://www.rediff.com/news/2003/jun/25pak5.htm आता मुशर्रफ नक्की कोणत्या काळात DGMO होता हे आंतरजालावर तपासले तर तो काळ १९९३ ते १९९५ असा होता. बेनझीर १९९३-१९९६ या काळात पंतप्रधान होती. म्हणजे कालावधीचा मेळ बसत आहे. विकीपीडियावरील कारगील युध्दावरील लेखात अगदी झिया उल हक अध्यक्ष असतानाही असे प्रस्ताव दिले गेले होते असे काही पुस्तकात म्हटले आहे असा उल्लेख आहे. ती पुस्तके अर्थातच मी वाचलेली नाहीत पण झियाचा भारतद्वेष आणि काश्मीर मिळविण्यासाठी टोपॅक म्हणून योजना त्याने सुरू केली होती ते पाहता अगदी झियाच्या काळात म्हणजे १९८८ पूर्वी अशी कोणती तयारी पाकिस्तानने केली असेल हे अगदी असंभवनीय नसावे. आता एक गोष्ट माझ्या आठवणीतून लिहितो. कारगीलमध्ये पाकिस्तान घुसखोरी करायचा प्रयत्न करेल असे आमच्याकडे इनपुट्स आहेत हे १९९१ मध्ये हे सरकारच्या बाजूने कोणीतरी (बहुदा गृहमंत्री शंकरराव चव्हाण) संसदेत म्हणाले होते अशी बातमी आल्याचे पक्के आठवते. कारण त्यानंतरच कारगील हे ठिकाण कुठे आहे हे अ‍ॅटलासमध्ये बघितले होते हे पण आठवते. आणि १९९९ मध्ये जेव्हा खरोखरच कारगीलमध्ये घुसखोरी झाली तेव्हा कारगील हे नाव मला तरी त्या कारणाने अपरिचित नव्हते. याविषयीचा पुरावा विचाराल तर तो माझ्याकडे नाही. आंतरजालावर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींच्या चर्चांचे पी.डी.एफ उपलब्ध आहेत पण त्यातून ही माहिती काढणे जिकरीचे काम आहे, विशेषतः नक्की तारीख आणि हे उल्लेख लोकसभेत होते की राज्यसभेत हे माहिती नसेल तर. शंकरराव चव्हाणांचे ते स्टेटमेंट शोधायला मी अगदी जंग जंग पछाडले आहे असे म्हटले तरी चालेल पण तसे काही उल्लेख मिळाले नाहीत. तसे काही उल्लेख मिळत नाहीत तोपर्यंत त्याविषयी कोणतेही ठोस विधान करता येणार नाही. तरीही १९९१ सोडा- बेनझीर भुत्तोच्या दुसर्‍या कार्यकाळात म्हणजे १९९३-१९९६ या काळात असे काही डाव शिजत असतील तर त्याचा पत्ता भारत सरकारला नव्हता आणि खरोखरच घुसखोरी झाल्यावरच आपल्याला जाग आली? (अवांतरः ९/११ व्हायची शक्यता आहे हे अमेरिकन सरकारला २००१ पूर्वीच माहित होते याविषयीचे सगळे आंतरजालीय पुरावे अमेरिकन सरकारने मिटवले आहेत ना? तसे काही भारतातही झाले असेल का? त्यातही १९९१ मध्ये आंतरजालावर फार काही असायची शक्यता थोडी. तरीही लोकसभा-राज्यसभेच्या मिनिट्समधून पण ते उल्लेख गुपचूप हटविले असतील का? पूर्वीच्या काळी युजनेट म्हणून ग्रुप असायचे. भारताबाहेर, विशेषतः अमेरिकेत असलेल्या भारतीयांचा वावर त्यावर असायचा. त्यावेळचे जुने ग्रुप आंतरजालावर कुठेतरी मिळाले आणि त्यात हा उल्लेख सापडला तर बरे होईल.) २. कारगील युध्दाच्या वेळेस संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी काही बेजबाबदार वक्तव्ये केली होती. कारगील आणि द्रास-तोलोलिंग वगैरे भागात पाकिस्तानी घुसखोर शिरले आहेत हे तोपर्यंत अगदी मिडियालाही १५ मे च्या सुमारासच माहित झाले होते. प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांना सुरवात झाली २६ मे रोजी. त्याच्या ९ दिवस आधी म्हणजे १७ मे रोजी जॉर्ज फर्नांडिसांचे वक्तव्य होते की पाकिस्तानी घुसखोरांना ४८ तासात हाकलून देता येईल. https://www.rediff.com/news/1999/may/17kash.htm . ४८ तास म्हणजे २ दिवस. प्रत्यक्षात युध्द २ महिने चालू होते. ४८ तासात घुसखोरांना हाकलू वगैरे गोष्टी जॉर्ज फर्नांडिस नक्की कोणत्या आधारावर बोलले होते? त्यांनाही परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना नव्हती असे म्हणायचे का? हे संरक्षणमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाला शोभले का? जॉर्ज फर्नांडिसांचे दुसरे वक्तव्य म्हणजे युध्द सुरू झाल्यानंतरचे- जून १९९९ मधील. तेव्हा ते म्हणाले होते की कारगील घुसखोरीची पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि आय.एस.आय ला कल्पना असेलच असे नाही. त्यातून चित्र काय उभे राहिले? तर आपले सैनिक प्राण पणाला लाऊन लढत आहेत आणि आपलेच संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या पंतप्रधानांना क्लीन चीट देत आहेत. नवाझ शरीफना समजा कारगील घुसखोरीविषयी कल्पना नव्हती हे गृहित धरले तरी हे युध्द सुरू असताना जाहीरपणे बोलायची काय गरज होती? तसेही पाकिस्तानात सैन्यच खरे सत्ताधारी असते हे जगजाहीर आहे तेव्हा हे वाक्य जाहीरपणे बोलून पाकिस्तानात फार काही फूट वगैरे पडायचा संबंधच नव्हता कारण तिथे पंतप्रधानाला फार किंमतच नाही. बाकी कारगील आणि आजूबाजूच्या भागात घुसखोरी होत आहे याविषयी फेब्रुवारी-मार्चमध्येच दिल्लीला लष्करी अधिकार्‍यांची पत्रे गेली होती हे त्यावेळेसही आले होते. तरीही त्याविषयी काहीही न करणे ही वाजपेयींच्या सरकारची अक्षम्य चूक होती. वाजपेयी अनेकदा झोपून राहिले आणि जोरदार धक्का बसल्यावर मग खडबडून जागे झाले हे नंतरही झाले होते. त्यातील एक सौम्य उदाहरण म्हणजे आग्रा परिषदेच्या वेळेस मुशर्रफ भारतात आलेला असताना त्याच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात चालू होते आणि त्याचा आपल्या सरकारला पत्ता नव्हता. दुसरे कितीतरी जास्त गंभीर उदाहरण म्हणजे १ ऑक्टोबर २००१ रोजी काश्मीर विधानसभेच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला होता आणि तो काश्मीर विधानसभेवरचाच हल्ला होता. तेव्हा हेच दिल्लीत संसदेवर झाले तर काय होईल हा प्रश्न अनेक सामान्यांनाही पडला असेल. तरीही वाजपेयी सरकार झोपून राहिले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनंतर संसदेवर हल्ला झालाच. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपण त्या महाभयानक प्रसंगातून सुटलो. खरं तर फिजीत झाले त्याप्रमाणे अख्खे मंत्रीमंडळ ओलीस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे वगैरे काहीतरी प्रकारच व्हायचा त्या दिवशी. असो. कारगीलमध्ये सुरवातीला झोपून राहिल्यानंतर झालेल्या युध्दात झालेला विजय (?) म्हणजे वाजपेयींचे खंबीर नेतृत्व वगैरे प्रचार करून १९९९ च्या निवडणुकीत विजय मात्र त्यांनी मिळवला.

Himalayan Blunder by Brig Jon Dalvi अमेझोनवर उपलब्ध आहे. @क्लिंटन पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? काश्मीर वर पाकिस्तान चा डोळा आहे हे सुर्य प्रकाशात इतकेच स्वच्छ आहे. देशाच्या विभाजन पासुन त्याने अनेक प्रयत्न केले व इथून पुढे करतच रहाणार यात मला तरी शंका नाही. बाकी राजकारणात मला शिरायचे नाही.

श्रीगुरुजी 03/08/2022 - 18:11
कारगिल, द्रास इ. ठिकाणे सुमारे १४०००-१८००० फूट उंचीवर आहेत जी बहुतांशी वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादित असतात. विशेषतः हिवाळ्यात तापमान खूप अंश शून्य अंशाखाली असते. बर्फाळ वाऱ्यामुळे तेथे वास्तव करणे जवळपास अशक्य असते. मुख्य म्हणजे जवळपास सर्व रस्ते बर्फाखाली असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक, कोणत्याही वस्तूंचा किंवा औषधांचा किंवा अन्नाचा पुरवठा करण्यासाठी फक्त हेलिकॉप्टर वापरता येते व ते सुद्धा हवामान अनुकूल असेल तर. त्यामुळे १९८५ नंतर केव्हा तरी भारतीय व पाकिस्तानी लष्करात एक अलिखित स्वरूपाचा करार झाला होता. हिवाळ्यात दोन्ही बाजूंचे सैन्य शिखरे रिकामी करून आपापल्या भागात कमी उंचीवर परत जायचे व हिवाळा संपला की परत शिखरांवर जाऊन आपापल्या भागांचे संरक्षण करायचे. हा प्रघात अनेक वर्षे सुरू होता. प्रतिकूल हवामानामुळे आपल्या सैन्याची जीवितहानी टाळणे हा दोन्ही देशांचा उद्देश होता. परंतु १९९९ च्या हिवाळ्यात सुरूवातीला दोन्ही बाजूंचे सैन्य कमी उंचीवर आल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने गुपचूप अत्यंत कडक उन्हाळ्यात आपले सैन्य परत शिखरांवर पाठवून भारतीय हद्दीतील काही शिखरांवर कब्जा केला व त्यातून पुढे कारगिल युद्ध घडले. एकदा युद्ध सुरू झाले की १९४८ प्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका अशांकरवी भारतावर दबाव आणून दोन्ही बाजूच्या सैन्याला आहे तेथेच थांबायला लावायचे जेणेकरून आपण बळकावलेली शिखरे आपल्याच ताब्यात राहतील अशी योजना होती. यासंदर्भात खालील परिच्छेद पहा. Indian posts along the LoC at the mountain peaks were vacated before winter. The Pakistanis did likewise on their side of the Line of Control (LoC). This was an understanding between the two sides due to the inhospitable living conditions at posts 14,000 to 18,000 feet high, with heavy winter snowfall cutting them off from the rest of the world. Most of the roads to these posts were either not motorable or non-existent. Artillery guns - crucial for destroying enemy bunkers high up in the mountains or for accurately firing on enemy troops hiding behind boulders - were inadequate. Surveillance by high-technology equipment such as Unmanned Aerial Vehicles were not there. The Pakistan Army took advantage of these shortcomings, especially the lack of Indian troops during winters, and intruded into Mushkoh, Dras, Kargil, Batalik and Turtuk sub-sectors, between Zojila and Leh. They crossed the LoC and intruded 4-10 km into Indian territory and occupied 130 winter-vacated Indian posts. Pakistan wanted to cut off the highway connecting Srinagar with Leh, thereby cutting off Ladakh and Siachen –– a move India didn’t expect. https://m.economictimes.com/news/defence/kargil-war-what-happened-20-years-ago-and-why-it-may-not-happen-again/articleshow/70371791.cms हे सर्व झाले कारण वाजपेयी झोपलेले होते, भारतीय सैन्य सावध नव्हते वगैरे आरोप माझ्या मते पूर्ण चुकीचे आहेत. १९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 03/08/2022 - 21:46
या सगळ्या गोष्टी मलाही माहित आहेत. त्यावेळी आणि नंतरही भाजपविरोधक जेव्हा जेव्हा कारगील वर प्रश्न उभे करायचे तेव्हा तेव्हा मी पण अशाप्रकारेच बचाव करायचो. तरीही
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
पाकिस्तानने केलेले कोणते करार प्रामाणिकपणे पाळले आहेत? म्हणजे कोणताही करार पाकिस्तान सध्या पाळत असेल तो कधीतरी मोडून विश्वासघात करायच्या उद्देशानेच. हे जनसंघ आणि रा.स्व.संघाची पार्श्वभूमी असलेल्या वाजपेयींना अधिक चांगल्या प्रकारे माहित असल्याने ते अधिक सावध असतील अशी अपेक्षा नक्कीच होती. त्यावेळेस नक्की काय झाले हे आपल्यासारख्याला बाहेर बसून सांगता येणार नाही. कारगीलमध्ये घुसखोरी होत आहे याविषयी अ‍ॅक्शनेबल इनपुट्स लष्कराकडून गेले होते की नाही याविषयी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जातात तेव्हा त्याविषयी काही बोलत नाही. पण वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते. फारूख अब्दुल्लासारख्या हरामखोराला त्यांना उपराष्ट्रपती बनवायचे होते हे वाजपेयींच्या पी.एम.ओ मध्ये असलेल्या अमरजितसिंग दुलातच्या (ज्याने भविष्यात आय.एस.आय च्या माजी प्रमुखाबरोबर संयुक्तपणे पुस्तक लिहिले) Kashmir: The Vajpayee years या पुस्तकात लिहिले आहे. ते कितपत खरे होते याची कल्पना नाही पण मुळात ए.एस.दुलातसारखा माणूस मुद्दामून पी.एम.ओ मध्ये नियुक्त करणे, हुर्रियत कॉन्फरन्सबरोबर बोलणी सुरू करणे वगैरे गोष्टी पाहता वाजपेयींना कारगील युध्दाच्या बाबतीतही benefit of the doubt देता येईल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

निनाद 10/08/2022 - 10:59
वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते.
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते. त्या वेळीच कारगिल वर हल्ल केला म्हणून त्याची शिक्षा पाक ला करायला पहिजे होती. तसेच या युद्धाची किंमत पाक कडून पैशातही वसूल करायला हवी होती. खरं तर ही अजूनही करता येईल.

In reply to by निनाद

सुबोध खरे 10/08/2022 - 12:08
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते तसे असते तर त्यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता अणुस्फोट केले नसते. प्रत्येक वेळेची परिस्थिती काय असते हे आपल्याला सहजासहजी कळत नाही. शिक्षा म्हणजे नक्की काय करायला हवे होते? कारगिल युद्धात पाकिस्तानचे ४०००-५००० सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्यांना साधे सन्मानाने अंत्यसंस्कार उपलब्ध केले गेले नाहीत. यापेक्षा वाईट म्हणजे भारतीय हुतात्मा सैनिकांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी, थोडा फार पैसा आणि मोठ्या प्रमाणावर सन्मान मिळाला. तुलनेत हे पाकिस्तानी सैनिकांना जास्त डाचत राहिले. कारण दोन्ही कडे सैनिक स्वतः च्या देशासाठीच लढत होते. मग त्याचा पाया विश्वासघाताचा आहे कि नाही हा प्रश्न सैनिकांचा नसतो तर राजकारण्यांचा असतो. (उदा श्रीलंकेत सैन्य पाठवणे चूक कि बरोबर हा प्रश्न / लष्कराचा /सैनिकाचा नसून सरकारचा होता ) पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. याशिवाय त्यांच्या लष्कराचे नाक कापले गेले.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 10/08/2022 - 14:00
भारताने हवाई हल्ले सुरू केल्यानंतर युद्ध थांबविण्यासाठी भारतावर दबाव टाकावा ही मागणी करण्यासाठी नवाज शरीफ आधी चीनला व नंतर अमेरिकेला गेले होते. चीनने तटस्थ भूमिका घेतल्याने शरीफ अमेरिकेला जाऊन क्लिंटनना भेटले. परंतु क्लिंटननी अनेकदा वाजपेयींना भेटायला बोलविल्यानंतर, पाकिस्तानने कोणत्याही अटींशिवाय आपले सैनिक मागे घेतल्यानंतरच मी भेटीस येईन असे सांगून अमेरिकेत जाण्यास नकार दिला. Clinton had invited Vajpayee to Washington for a face-to-face meeting with Sharif but the Indian Prime Minister had declined to undertake the visit in view of the then security situation. Clinton had informed Vajpayee after intensive parleys with Sharif in Washington in early July 1999 that he was "holding firm on demanding the withdrawal of Pakistani troops to the Line of Control." Interestingly, according to Riedel''s account, Sharif briefed an angry Clinton on his frantic efforts during that period to engage Vajpayee and get a deal that would allow Pakistan to withdraw with some face saving. म्हणे वाजपेयी नेभळट होते. https://www.google.com/amp/s/www.oneindia.com/amphtml/india/kargil-when-vajpayee-stood-firm-and-got-nawaz-sharif-to-buckle-2757797.html

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन 10/08/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

In reply to by अर्जुन

मित्रहो 11/08/2022 - 10:37
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. सध्या Surprise to Victory वाचायला सुरवात केली आहे. बघू त्यात या अनुषंगाने काही येते का? धन्यवाद अर्जुन

In reply to by मित्रहो

सुबोध खरे 11/08/2022 - 12:03
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. नाही. असं झालं असतं तर सर्वंकष युद्ध झालं असतं. पण तेवढी पातळी वर न्यायची आहे कि नाही याची मानसिक तयारी सरकारची होती का ते माहिती नाही. अर्थात असे युद्ध झाले असते तर ते पाकिस्तानला दुप्पट महाग पडले असते हि वस्तुस्थिती आहे. माझ्या वाचनाप्रमाणे अमेरिकेने श्री वाजपेयी याना सांगितले होते कि तुम्ही वाद वाढवू नका. आम्ही पाकिस्तानला वेसण घालतो. पाकिस्तानने त्यांच्या एफ १६ साठी लांब पल्ल्याच्या ५०० क्षेपणास्त्रांची (AMRAAM) मागणी केली होती ती मागणी अमेरिकेने पूर्ण केली नाही. हि मागणी पुढे अमेरिकेने २००७ मध्ये पूर्ण केली. याच क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या एफ १६ विमानांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे मिग २१ पाडले होते. https://www.researchgate.net/publication/293743162_Pakistan_makes_biggest_ever_AMRAAM_buy यामुळे हे युद्ध कारगिल पुरते मर्यादित राहिले. भारताची जी काही हानी झाली ती सुरुवातीला ( या वेळेपर्यंत) झाली होती. एकदा भारताने वायुदल आणून बॉम्ब वर्षाव सुरु केला त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याला हवेतून आणि जमिनी वरून होणाऱ्या माऱ्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले आणि त्यांच्या सैन्याची बरीच हानी झाली.

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन 10/08/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

मित्रहो 03/08/2022 - 18:57
धन्यवाद श्रीगुरुजी, क्लिंटन @ कर्नलतपस्वी पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद उत्तम चर्चेबद्दल धन्यवाद मला वाटते कुठलीही मोठी घटना घडली की पहिला प्रश्न हाच उपस्थित होतो की गुप्तहेर खात्याला याची माहिती नव्हती का. त्यांनी माहिती पुरवली नाही का. माहिती दिली तर सरकारने काय केले, सैन्यापर्यंत ही माहीती पुरविली का वगैरे. जनरल मलिक नेहमीच त्याचा इन्कार करतात. त्यांच्या पुस्तकाचे नांव सुद्धा Surprise to Victory असे आहे. असे प्रश्न येतात त्याचा खूप ऊहापोह होतो. सरकार दरबारी त्याने काही फरक पडत असेलही तरीही या चर्चातून सामान्यांना फार काही हाती लागत नाही. सर्व एकमेकांना दोष देत असतात. पाकिसत्तानचा काश्मिर डोळा आहे हे कोणीही सांगू शकतो. पाकसैन्य, घुसखोर कारगिल भागातून येऊ शकतात याची कल्पना १९४७ पासून होती. तेंव्हाही त्याभागातून घुसखोरी झाली होती. मुळात काश्मिरच्या भागात घुसखोरी सतत होत असते. सतत घुसखोरांना हुसकावून लावण्यात येते. त्यामुळे घुसखोरी होणार आहे इतकेच इनपुट असेल तर त्यावर किती गांभीर्याने घेतले जाईल ही शंका आहे. एक योजनाबद्ध प्रकारे घुसखोरी होणार आहे. अगदी द्रासपासून टुरटुक पर्यंत एकाच वेळेस घुसखोरी होणार आहे. असे खातरीचे इनपुट होते अशी माहिती मिळत नाही. कदाचित तसे इनपुट असेल किंवा नसेलही. काहींच्या मते ऑक्टोबर १९९८ पासून घुसखोर येत होते. बेनझीर भुट्टो यांनी त्यांना मुशरफ यांनी अशा प्लॅनबद्दल सांगितले होेते आणि भुट्टो यांनी तो प्लॅन नाकारला हे कारगील झाल्यानंतर सांगितले. त्यावर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न आहे. जर खरच तसे झाले असेल तर मात्र भारत सरकारला याची कल्पना असायला हवी होती. तशी कल्पना नसने एक मोठे अपयश आहे. अलिखित करार वगैरे मला नंतर केलेला प्रपोगंडा वाटतो. लिखित कराराचे उल्लंघन झाले असते तर विषय वेगळा असता. आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.

In reply to by मित्रहो

क्लिंटन 03/08/2022 - 22:48
आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.
आणि त्यातही पाकिस्तानसारखा देश केलेले करार (समजा असा करार केला असलाच तर) प्रामाणिकपणे पाळेल ही अपेक्षा करणेच मुळात भाबडेपणाचे नाही का?

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 04/08/2022 - 00:02
हा तसा लिखित करार वगैरे नव्हता. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे युद्ध न करताही दोन्ही बाजूने जीवितहानी होत होती. जरी काही सैनिक जगले तरी ३-४ महिने -३० किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तेथे राहणे, वेगवान बर्फाळ वारा सहन करणे, अन्न किंवा इतर वस्तू केव्हा मिळतील याची कोणतीही शाश्वती नसणे यामुळे सैनिकांच्या मनोधैर्यावर वाईट परीणाम होत होता. हे टाळण्यासाठी दोन्ही देश आपापसात ठरवून आपले सैन्य कमी उंचीवर आणत असत. ही व्यवस्था १० वर्षांहून अधिक काळ विनाव्यत्यय सुरू होती. त्यामुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 04/08/2022 - 09:31
मुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.
असे निर्धास्त राहायलाच मी वाजपेयी झोपून राहिले असे म्हणतो. पाकिस्तानचा एकूण स्वभाव बघता एकीकडे मैत्रीच्या मोठ्या मोठ्या गप्पा करणार आणि दुसरीकडे विश्वासघात करणार हे वेगळे सांगायला हवे का? जनसंघ हिंदुत्वाचे राजकारण करत आला आहे. मग हिंदू समाजातला दोष - शत्रूच्या गोड बोलण्याला फसून गाफिल राहणे हा मुळच्या जनसंघाच्या नेत्यांना माहित नव्हता? या दोषाचा अभ्यास असल्याने ते त्याला बळी पडायला नको होते पण तरीही तेही त्याला बळी पडलेच. ३-४ महिने आधी लाहोर घोषणापत्रावर सही झाली आणि स्वतः वाजपेयी तिथे गेले होते असे वातावरण असेल तर त्यावेळेस अधिक सावध राहायला पाहिजे कारण नेमक्या अशाच वेळी पाकिस्तान विश्वासघात करायची शक्यता जास्त हे पृथ्वीराज चौहानपासून अनेकांचा इतिहास अभ्यासलेल्याला माहित नव्हते का? दक्षिण कोरियाच्या पंतप्रधान्/अध्यक्षांना १९९८ चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले तसे आपल्याला मिळावे असे वाजपेयींना वाटत होते की काय अशी त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द बघता मला तरी वाटते. २००३-०४ मध्ये तर त्यांना अगदी पीस प्रोसेसने झपाटून टाकले होते. पण हे सगळे करताना किती भारतीय नागरीकांचे बळी गेले आणि भारतीय हितसंबंधांना किती धक्का पोचला याचा कोणीतरी हिशेब मांडायलाच हवा.

सुबोध खरे 03/08/2022 - 19:51
माझे दोन शब्द- १) गुप्तहेर खात्याचे अपयश-- प्रत्येक गोष्ट गुप्तहेर खात्याला माहिती असलीच पाहिजे हा नियम १०० % मान्य केला तर हे वाक्य स्वीकृत करायला लागेल. परंतु भारताने दोन्ही अणुस्फोट केले तेंव्हा स्वतःला सर्वशक्तिमान समजणाऱ्या अमेरिकेच्या सी आय ए ला हि माहिती का समजू शकली नाही? याचा विचार केल्यास असे लक्षात येईल कि एखाद्या देशाने काळजीपूर्वक तयारी केल्यास दुसऱ्या देशाच्या गुप्तहेरखात्याला सर्वच माहिती असेल च असे नाही. तेंव्हा लष्करी किंवा नागरी गुप्तहेरखाते काय झोपले होते का असे नाक्यावर गप्पात विचारणारे अनेक असतात. २) जनरल मुशर्र्फ हे लष्करी कार्यवाही खात्याचे महानिदेशक( DGMO) असताना त्यांनी आपले डावपेच बेनझीर भुट्टो यांच्या गळ्यात उतरवायचा प्रयत्न केला परंतु तेंव्हा ते असफल झाले. परंतु आपला हा बेत जेंव्हा ते लष्करप्रमुख झाले तेंव्हा त्यांनी पंतप्रधान श्री नवाझ शरीफ याना न सांगता सिद्धीस नेला. यावर श्री नवाझ शरीफ यांचे उद्गार "मुहाजिर ने ( मुशर्रफ) फंसा दिया" असेच होते. अर्थात पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली आणि नंतर सरकारला सांगितले त्यावर नवाझ शरीफ काहीही करू शकले नसते हि वस्तुस्थिती आहे. ३) जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे. ४) वाजपेयी यांचे धोरण कचखाऊ होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांची भीती वाटत होती. यामुळे त्यांनी भारतीय लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा ओलांडण्यास मनाई केली होती. कदाचित १९९८ मध्ये अणुस्फोट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायांनी टाकलेल्या निर्बंधांनंतर परत असे करण्याची त्यांची तयारी नव्हती का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. यामुळे हे युद्ध लष्कर सुरुवातीला एक हात मागे बांधून लढल्यासारखे लढावे लागत होते. खरं तर वायुसेनेला प्रत्यक्ष पाकिस्तानी हद्दीत घुसण्याची परवानगी सुरुवातीलाच दिली गेली असती तर हे युद्ध नक्कीच निम्म्या वेळात संपले असते. त्या काळात पाकिस्तानकडे दृष्टीच्या टप्प्याबाहेर मारा करणारी क्षेपणास्त्रे (beyond-visual-range) नव्हतीच तर भारताच्या मिग २९ वर Vympel NPO R-77 missile (NATO reporting name: AA-12 Adder) हे ८० ते १०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र होते ज्याची पाकिस्तानी वायुदलाला भयंकर भीति वाटत होती त्यामुळे त्यांच्याकडे असलेली F १६ त्यांनी युद्धात उतरवलीच नव्हती. भारतीय लष्कर एक हात पाठीमागे बांधून लढत होते म्हणून एवढे सैनिक सुरुवातील हुतात्मा झाले. एकदा इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर सुरु झाला तेंव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी लष्कराला भाजून काढले आणि युद्ध संपले. याच इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर करून हवाईदलाच्या बालाकोट या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तेंव्हा नियंत्रणरेषेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची हिम्मत श्री मोदी यांनी दाखवली याबद्दल भारतीय लष्करी तज्ज्ञांना त्यांचे कौतुक वाटते. कारण पाकिस्तान आम्ही अणुबॉम्ब टाकू चा खुळखुळा वाजवत होते त्यांना सज्जड शब्दात तुम्ही अणुबॉम्ब टाकाच आम्ही पाकिस्तान बेचिराख करून टाकू हे ठणकाऊन सांगितले गेले. आणि त्याचे प्रत्यंतर चार दिवसातच दिसूनआले. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी पाकिस्तान वर हल्ला करतील हे संरक्षण मंत्रांना सांगताना पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ थरथर कापत होते असे खुद्द संरक्षण मंत्र्यांनीच संसदेत सांगितले. ५) भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे. कारण संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी हे संसदेत येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवू असतात आणि अक्षरशः हजारो लोक ज्यात पत्रकार, खासदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, संसदेचे कर्मचारी पासून असंख्य भेट देणारे सामान्य नागरिक हे असतात. या सर्वांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा, विशेष सुरक्षा कमांडो शिवाय इतर सशस्त्र केंद्रीय पोलिसांचे अनेक जवान तैनात असतात (SPG and NSG to the Central armed police forces like CRPF and ITBP). पाकिस्तान मध्ये प्रशिक्षित फ़िदायिन दहशतवाद्यांनी केवळ गोंधळ आणि दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हल्ला होता. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण असो

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन 03/08/2022 - 22:12
माझा लष्कराशी कसलाही कधीही संबंध नव्हता आणि मी एक सामान्य नागरीक आहे. इथे लिहित आहे ते त्याच दृष्टीकोनातून लिहित आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ते विधान प्रत्यक्ष युध्द सुरू व्हायच्या आधी केले होते. आणि ते सुध्दा मिडियाशी बोलताना. सैनिकांसमोर बोलताना नाही. अंतिम विजय आपलाच आहे अशाप्रकारची विधाने स्फुरण चढायला केली जातात हे समजू शकतो. पण ४८ तासात घुसखोरांना हाकलू इतकी स्पेसिफिक टाईमलाईन? २ दिवसांचे ८-१५ दिवस झाले तरी समजू शकतो पण त्याहूनही उशीर व्हायला लागला तर आधी वाटली होती त्यापेक्षा परिस्थिती खूप जास्त कठीण आहे असे चित्र उभे राहून त्याचा उलटा परिणाम होत नसेल?
भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे.
निदान त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये म्हटले होते की कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा आकडा त्यामानाने कमी होता तरीही मग अगदी अमेरिकेच्या अध्यक्षांपासून सगळ्यांची युध्द टाळण्यासाठी धावपळ का चालू होती?

In reply to by क्लिंटन

सुबोध खरे 04/08/2022 - 11:14
कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. कमलेश कुमारी यांचे काम स्पृहणीय आहे परंतु इतक्या सर्व राजकारण्यांना झेड वर्गाची सुरक्षा पुरवलेली असते तितके सशस्त्र सैनिक तिथे प्रत्यक्ष तैनात असतातच आणि हे सैनिक काही बुणगे नसतात तर कमांडो असतात त्यामुळे पाच दहशतवादी पूर्ण संसदेचा ताबा घेतील असे कोणी पत्रकार लिहीत असेल तर तो वातानुकूलित खोलीत रामखुर्चीत बसून ज्ञान पाजळणारा पत्रकार आहे एवढेच मी म्हणेन. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? हा मुळात भारताच्या अस्मितेचा प्रश्न होता. लोकशाहीच्या सर्वोच्च इमारतीवर हल्ला हे काही गल्लीतील गुंडगिरीची केस नव्हती किंवा सशस्त्र दरोडा नव्हता. मुळात दहशतवादी हे संसद लष्करी ठाणे अशा घातक लक्ष्यावर कशासाठी हल्ला करतात जेथे त्यांना जीव गमवावा लागेल याची खात्री असते? लष्करी ठाणे किंवा संसद सुरक्षित नाही तर आपली सुरक्षा कोण पाहणार हि भीती जनमानसात पसरवण्यासाठी. तसं पाहायला गेलात तर तिरंगा हा सुद्धा एक कापडच आहे पण त्यासाठी प्राणत्याग करण्यासाठी लोक का तयार होतात? त्यामुळे भारताने आपले लष्कर युदधासाठी तयार केले होते हे याच कारणासाठी.

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन 04/08/2022 - 14:03
१. अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात पुढील उल्लेख आहे- ... along with Mohd. Masood Azhar, Ghazi Baba @ Abu Jehadi @ Abu Saqlain and Tariq Ahmed - all Pak Nationals and proclaimed offenders (P.Os) and along with Mohammad, Haider, Hamja, Raja and Rana (all Pak nationals and deceased terrorists in attack on Parliament of India) and some other unknown persons, hatched up a conspiracy to procure arms and ammunitions and to attack Indian Parliament at New Delhi, when the Parliament was in session and in the process to make hostages or kill Prime Minister and other Central ministers and members of Parliament, Vice President and other VIPs., security personnels, in and around the Parliament House and thereby to wage a war against India and to kill the persons and to commit terrorist attack.... हे अफजलगुरूची केस अपीलात दिल्ली उच्च न्यायालयापुढे गेली त्याच्या निकालपत्रात बघायला मिळेल. https://indiankanoon.org/doc/1031426/ त्यावेळेस हे आरोपपत्र दाखल झाले होते त्यात महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायचा उल्लेख होता हे पक्के बातम्यांमध्ये बघितल्याचे आणि पेपरात वाचल्याचे आठवत होते म्हणून आंतरजालावर शोधाशोध केली तेव्हा हा उल्लेख सापडला. समजा महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायची शक्यताच नसती तर सरकारने अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख का होता हे समजत नाही. २. संसदेला सुरक्षा असते वगैरे सगळे मान्य. पण दहशतवाद्यांच्या पांढर्‍या अ‍ॅम्बॅसॅडरला गृहमंत्रालयाचा स्टीकर बघून आत सोडलेच ना? म्हणजे त्या सुरक्षायंत्रणेत काहीतरी गंभीर त्रुटी असली पाहिजे. त्या गाडीत ३० किलो आर.डी.एक्स होते. https://frontline.thehindu.com/cover-story/article30247100.ece . त्याचा स्फोट का झाला नाही याविषयी अफजलगुरूने आश्चर्य व्यक्त केले होते असे तिहार तुरूंगाचा अधिकारी मनोज द्विवेदी म्हणाला होता. https://www.financialexpress.com/archive/parliament-attack-why-didnt-the-bomb-explode-afzal-guru-wonders/848307/ आता ३० किलो आर.डी.एक्स ने किती मोठा स्फोट होऊ शकेल याची कल्पना नाही. ३. त्या दिवशी उपराष्ट्रपती कृष्णकांत थोडक्यात बचावले असेही न्यूज चॅनेलवर आले होते. तसेच त्या हल्ल्याविषयी बोलताना स्वतः पंतप्रधान वाजपेयींनी दहशतवादी संसदेत घुसण्यात यशस्वी झाले असते तर 'कत्लेआम झाला असता' असे म्हटल्याचेही आठवते. त्याचा व्हिडिओही कुठेतरी मिळेल/ मिळायला हवा. तेव्हा ५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 15/08/2022 - 09:38
५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते
. संसदभवनावरील हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ च्या टाईम्स ऑफ इंडियात आलेली बातमी---Vajpayee may have been the target या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे की दहशतवादी संसदेच्या इमारतीच्या १२ क्रमांकाच्या गेटमधून आत घुसायचा प्रयत्न करत होते. त्या गेटमधून फारच थोडे लोक आत जातात त्यामुळे तिथे तितक्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था नव्हती. तसेच १२ क्रमांकाच्या गेटमधून राज्यसभेत जाता येते. आणि कार्यक्रमाप्रमाणे १३ डिसेंबरला गुरूवार असल्याने पंतप्रधान त्या दिवशी राज्यसभेत असणार होते. या सगळ्या गोष्टींची माहिती दहशतवाद्यांना होती.

अमर विश्वास 03/08/2022 - 21:22
डोमेल ते कारगिल हे कर्नल शशिकांत पित्रे यांचे पुस्तक जरूर वाचा .. नुसते कारगिल युद्धच नाही तर भारत - पाक यांच्या सामरिक संबंधांचा पूर्ण लेखाजोखा मिळेल

अर्जुन 03/08/2022 - 22:42
गुप्तहेर खात्याने मिळवलेल्या माहीतीचा उपयोग करुन जर कोणतीही कारवाई होणार नसेल, तर अशी माहीती मिळवण्यास काय अर्थ राहील? आणि कोण अशी माहीती मिळवण्यासाठी जिवावर उदार होईल? http://www.indiandefencereview.com/news/raw-operations-in-pakistan/ चे अंशत भाषांतर... हा संदर्भ उघडपणे माजी पंतप्रधान इंदर गुजराल यांचा आहे. गुजराल यांनी पाकिस्तानातील संशोधन आणि एडब्ल्यू ऑपरेशन्स सोडून देण्याचे आदेश दिले असे म्हणणे बरोबर नाही. पाकिस्तानात R&AWची दोन कामे होते - गुप्त माहिती गोळा करणं आणि गुप्त कारवाई करणं. तथाकथित गुजराल सिद्धान्तानुसार पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना अशा प्रकारच्या कृतीमूळे मदत होऊ शकते, म्हणून त्यांनी केवळ गुप्त कारवाईसाठीच्या कारवाया बंद करण्याचे आदेश दिले. त्याने गुप्त माहिती गोळा करणं, या बाबत कोणताही आदेश दिला नाही. आपल्या आधी आणि नंतरच्या सर्व पंतप्रधानांप्रमाणे त्यांनाही पाकिस्तानमध्ये गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या चांगल्या क्षमतेचे महत्त्व समजले. त्याने जे बंद करण्याचे आदेश दिले ते पाकिस्तानमधील R&AW च्या केवळ 15 टक्के ऑपरेशन्ससाठी होते. उर्वरित 85 टक्क्यांना त्यांनी पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. गुप्त कारवाईच्या कारवाया बंद करण्याच्या त्याच्या आदेशाच्या विवेकबुद्धीबद्दल गुप्तचर समुदायात वादविवाद झाला. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटले आणि त्यांना समजावून सांगितले की गुप्त कृती क्षमता तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. जर एखाद्या दिवशी सरकारला गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्याची गरज भासली, तर जमिनीवर प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकारी नसतील,. त्यांना असेही सुचवण्यात आले की जर त्यांना या खरोखरच काही करावेसे वाटत असेल तर सध्या गुप्त कारवाई स्थगित करावी, परंतु बंद करू नयेत. पण गूजराल यांना ते मान्य झाले नाही. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले तेव्हा गुप्तचर समुदायाला आशा होती की ते गुजराल यांचा निर्णय रद्द करतील आणि पाकिस्तानमध्ये गुप्त कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश देतील.पण त्यांना आश्चर्य वाटले की, वाजपेयींनीही गुजराल यांच्याप्रमाणेच R&AW ने पाकिस्तानमधील गुप्तचर माहिती गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि गुप्त कारवाया टाळाव्यात अशीच इच्छा व्यक्त केली. गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्यास वाजपेयींच्या अनिच्छेने निराश झालेल्या काही सेवा अधिकाऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्याशी माझी[[ बी. रमण, कॅबिनेट सचिव] भेट घडवून आणली. मी त्यांची नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना पाकिस्तानमध्ये आमच्या गुप्त कारवाईचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी माझे [ बी. रमण, कॅबिनेट सचिव] म्हणणे ऐकले आणि ते म्हणाले: “मला आधीच खात्री पटली आहे. तुम्ही मला पटवून देण्याची गरज नाही. पण पंतप्रधान (वाजपेयी) वेगळा विचार करतात. त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे". आणि तो विषय संपला.

In reply to by अर्जुन

शाम भागवत 05/08/2022 - 12:45
मला वाटते भारतीय गुप्तहेरांची खूप मोठी हानी मोरारजी देसाई यांनी केली. त्यावेळेस आपले खूप चांगले डीप अ‍ॅसेटस नष्ट झाले. ते खूप मोठे खच्चीकरण होते. त्यानंतर गुजराल यांनी त्यावर आणखी एक मुलामा चढवला. असो.

Bhakti 03/08/2022 - 23:05
असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते
. होय युद्ध म्हणजे काय हे कारगिल पासूनच समजले. खुपचं चांगले मुद्दे मांडले आहेत.

Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik. It covers failures,neglect,wrong policies and bad decisions ect. हे पुस्तक गुगल पिडीएफ ड्राइव्ह वर उपलब्ध आहे. लेखकाने खुप अभ्यास करून आपली मते मांडली आहेत. माझे मत.इतरांचे वेगळे असु शकते. हे पुस्तक तत्कालीन नेतृत्व आणी परीस्थीती बदूदलची कल्पना देते. वाचल्यास सर्व परीस्थीती समजुन घेण्यासाठी मदत होईल. कॉपीराईट निर्बंधामुळे जास्त उहापोह करत नाही. इच्छुकांनी वाचावे व आपले मत बनवावे. १९४७,१९६२ या पाठीमागची कारणे लक्षात येतील. कारगिल हे भारत पाकिस्तान मधील अनेक युद्धा मधील एक आहे. त्याचे मुळ कारण सुद्धा समजुन येईल. मी एवढेच म्हणेन, सेना,गुप्तचर व अन्य सरकारी यंत्रणा आपले कार्य पुर्ण क्षमतेनुसार करतच आसतात,परंतू नेतृत्व त्याचा कसा उपयोग करते यावर खुप काही निर्भर असते. तत्त्कालीन नेतृत्व व त्याची विचारधारा याचा पगडा, पकड या यंत्रणावर असते व त्यानुसार देशाचा कारभार चालतो. यात दुमत नसावे. इथे नेहरूंसारख्या सक्षम नेतृत्वाबद्दल न बोलता जर इतिहासाचा आढावा घेतला तर वादविवाद टाळता येईल. The Himalyan Blunder ,हे पुस्तक सुद्धा गुगल वर उपलब्ध आहे. @भक्ती बरोबर मी सहमत आहे. पण हा वादाचा मुद्दा आहे कारण राजकीय हितसंबंध,अहित यात दडलेले आहे. काही इतिहासकारांनी,अभ्यासकांनी परखड मते मांडली आहेत ती शोधून काढून वाचावी लागतात हा दैवदुर्विलास मला तरी वाटतो. शेवटी इतीहास जेते लिहीतात. इतिहासातील चुका मान्य कराव्यात पण कुणा व्यक्ती विषेशला दोष देण्यात अर्थ नाही कारण तत्कालीन परीस्थीतीत घेतलेले निर्णय चुक की बरोबर हे इतीहासच ठरवतो.

जेम्स वांड 04/08/2022 - 09:34
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
इथं मित्रदेश एकमेकांची गुप्तहेर संस्था एक्सपोज करायला अन् मित्रदेशाच्या अंतर्गत रहस्यांचा गौफ्यस्फोट करायला वापरतात हे जगजाहीर असताना संशयाचे कारण नव्हते, ते पण पाकिस्तान बाबतीत म्हणणे म्हणजे धैर्याची कमालच झाली

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 04/08/2022 - 09:52
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे कारण भावनेच्या भरात येऊन निष्कारण प्राणहानी टाळता यावी असा हेतू आहे. हा करार किंवा समझौता आजतागायत पाळला गेला आहे यामुळेच गाल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकी या हातघाईच्या आणि समोरासमोर होत्या. युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात मग जो करार पाकिस्तान आणि भारतात १० वर्षापेक्षा जास्त पाळला गेला त्याबद्दल संशय घेण्याचे सकृतदर्शनी तरी कारण नव्हते. जनरल मुशर्रफ यांनी सरळ सरळ विश्वासघात केला आणि हे संकेत पाळले नाहीत हि गोष्ट वेगळी आहे.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 04/08/2022 - 10:13
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे
xxxxx
युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते. इतकेच काय युद्ध काळात जरी एखाद वकीलातीचा कर्मचारी हेरगिरी करताना पकडला गेला तरी त्याला युद्धबंदी म्हणून वागवले जाऊ शकत नाही, तर त्याला पर्सना नॉन ग्राटा म्हणून २४ ते ४८ तासात देश सोडून जायला सांगतात थंडीच्या मोसमात वर बसायचे नाही हा अलिखित करार होता त्यामुळे मुहाजिर ने फांसा दिया, नवाज मुशर्रफ बेनझीर वगैरे त्यांचे अंतर्गत काहीही असो अन् असेल तरीही भारतीय गुप्तचर संस्थांनी किंवा लष्कराने त्या अलिखित नियमामुळे पाकिस्तानवर संशय घेण्याचे कारण नाही हे विधान मुळातच हास्यास्पद आहे माझ्यासाठी.

In reply to by जेम्स वांड

क्लिंटन 04/08/2022 - 10:57
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते.
तरीही मे १९९२ मध्ये राजेश मित्तल म्हणून कराचीतील भारतीय दुतावासातील अधिकार्‍याला मारहाण झाली होती. या राजेश मित्तलना पाकिस्तानने हेरगिरीत सामील असल्याच्या आरोपावरून देश सोडायला सांगितले होते पण त्यापूर्वी त्यांना मारहाण केली होती आणि इलेक्ट्रीक शॉक वगैरे दिले होते. तेव्हाही नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हात वर केले होते आणि आमच्या कोणत्याही सरकारी यंत्रणेने ते केले नाही (म्हणजेच ते 'नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स' नी केले) असे म्हटले होते. हे नॉन स्टेट अ‍ॅक्टर्सचं खटलं अगदी १९४७ मधील काश्मीरवरच्या पहिल्या हल्ल्यापासून कसाबपर्यंत अव्याहत चालू आहे. राजेश मित्तल दिल्लीत आल्यानंतर थेट एम्समध्ये दाखल झाले होते. त्यावेळी पेपरात आलेला एक फोटो होता तो मला अजूनही आठवतो. राजेश मित्तल या नावाचा गुगल सर्च केल्यावर त्यावेळी पेपरात बघितलेला तो फोटो मिळालाही. * https://www.timescontent.com/syndication-photos/reprint/news/489483/rajesh-mittal-diplomat-indian-hospi.html बाकी जिनीव्हा की अन्य कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे युध्दबंद्यांनाही कशी वर्तणुक द्यावी याचे नियम ठरवलेले आहेत. आपल्या सौरभ कालिया आणि त्याच्याबरोबरच्या इतर ५ सैनिकांना पाकिस्तानने त्या कायद्याप्रमाणे वागवले होते का? असे कोणतेही कायदे आणि करार पाकिस्तान मानेल आणि त्यांचे प्रामाणिकपणे पालन करेल ही अपेक्षा ठेवणेच भाबडेपणाचे आणि चुकीचे आहे. * : राजेश मित्तलचा हा फोटो मिळाला त्याप्रमाणे कधीतरी १९९१ मध्ये शंकरराव चव्हाणांनी केलेले स्टेटमेंटही आंतरजालावर मिळावे म्हणून मी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. ते स्टेटमेंट मला का हवे आहे? कारण जर १९९१ मध्ये कारगीलमध्ये काही गडबड व्हायची शक्यता आहे असे इनपुट्स सरकारकडे असतील तर त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी कारगीलचे स्थान लक्षात घेता त्या ठिकाणच्या संरक्षणासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. कारगील गेले तर श्रीनगर-लेह महामार्ग गेला. म्हणजे लडाख आणि सियाचीनची सुरक्षा धोक्यात येईल त्यामुळे कारगील हे खूप महत्वाचे ठिकाण आहे.जशी अणुभट्टीची सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे आणि तो कॉमन सेन्स आहे तसेच कारगील या ठिकाणाविषयीही म्हणता येईल- जर सरकारला ते १९९१ मध्येच माहित असेल तर. अणुभट्टीवर हल्ला करणार असे स्पेसिफिक गुप्तचर इनपुट आले तरच तिथे सुरक्षा ठेऊ हे म्हणणे जसे चुकीचे ठरेल तसेच कारगील प्रकरणी 'आम्हाला माहितच नव्हते' हा बचावही त्या केसमध्ये कुचकामी ठरेल.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 04/08/2022 - 10:19
१९७१ नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सैनिकी चकमक झाली नव्हती. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामान असल्याने दोन्ही देशांनी ठरवून हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्याचे ठरविले होते व दोन्ही देश १३-१४ वर्षे त्याचे पालन करीत होते. अश्या परिस्थितीत सावध राहणे म्हणजे हिवाळ्यात सुद्धा शिखरांवर सैन्य ठेवणे किंवा सातत्याने शिखरांवर लक्ष ठेवणे (हे अर्थातच सैनिक शिखरांवर पाठवून). जर वाजपेयी झोपले असतील तर लष्कर सुद्धा झोपेत होते असे म्हणता येईल का? पाकिस्तान विश्वासघात करून गुपचूप शिखरे काबीज करू शकतो व त्यामुळे हिवाळ्यात सैन्य मागे आणू नये असे लष्कराने वाजपेयी किंवा आधीच्या पंतप्रधानांना सांगितल्याचे वाचनात नाही. हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्यास लष्कराचा विरोध असल्याचेही वाचनात नाही. हिवाळ्यात सैन्य मागे घेणे हा पंतप्रधान पातळीचा निर्णय असू शकतो, परंतु सीमेवर कशी गस्त घालायची हा निर्णय लष्कराचाच असतो. त्यात पंतप्रधानांचा हस्तक्षेप नसतो. जर शिखरांवर अधूनमधून लक्ष ठेवणे आवश्यक आहे असे लष्कराला वाटले असेल, तर लष्कर पंतप्रधानांच्या परवानगीविना काही सैनिक अधूनमधून शिखरांवर पाठवून लक्ष ठेवू शकत होते. परंतु लष्कराला सुद्धा ते करण्याची गरज वाटली नसावी. निदान मी तरी वाजपेयी झोपले होते असा ठाम निष्कर्ष न काढता संशयाचा फायदा वाजपेयींना देईन.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड 04/08/2022 - 10:30
माझ्या वाचनात नाही ! अहो गुप्तचर खात्याच्या reports बद्दल बोलतोय न आपण ? ते कसे कोणाच्या वाचनात येणार ? अन् आले नाहीत म्हणून आगाऊ चेतावणी नव्हती म्हणायला स्कोप आहे असे म्हणत असाल तर कायच बोला, पंतप्रधानाला रोज कित्येक confidential reporting होतं त्यामुळे ते तुमच्या वाचनात नाही म्हणून तुम्ही पंतप्रधानाला संशयाचा फायदा द्या म्हणलं तर अजबच म्हणावं लागेल ते !

In reply to by जेम्स वांड

श्रीगुरुजी 04/08/2022 - 13:29
तेच म्हणतोय. गुप्तचर खात्याने असा अहवाल दिला होता की नाही, हेच सर्वसामान्यांना माहिती नाही. अश्या परिस्थितीत, गुप्तचर खात्याने अहवाल देऊनही वाजपेयी झोपले होते या ठाम निष्कर्षाला आधार काय? त्यामुळे जोपर्यंत काहीतरी ठाम माहिती बाहेर येत नाही, तोपर्यंत, निदान मी तरी, वाजपेयी झोपले होत असा अंतिम निष्कर्ष काढणार नाही. ज्यांना असा निष्कर्ष काढायचा आहे त्यांनी तसा तो काढावा.

जेम्स वांड 04/08/2022 - 10:03
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, जनरल मलिक, लेफ्टनंट जनरल पित्रे वगैरे अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्यावर पुस्तके लिहायला मनाई नसते अगदी सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, त्यांच्यावर परिसंवाद होतात, रायसीना डायलॉग सारखे posh सोहळे सुद्धा होतात, पॅनल डिस्कस होतात टीव्ही वर, इंटेलचे काय आहे तसे ?? ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 04/08/2022 - 12:18
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, लष्करी गुप्तहेर खात्याच्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांना मी भेटलेलो आहे किंवा ते माझे रुग्ण होते. त्यामुळे अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा मी त्यांच्या कडून ऐकलेल्या आहेत त्यामुळे कदाचित या लोकांच्या कार्यपद्धतीची थोडीशी तोंडओळख मला झालेली आहे असे मला वाटते. विक्रांतवर मी वैद्यकीय विभागाचा प्रमुख अधिकारी होतो त्यामुळे रोज येणारे बिनतारी संदेशांची फाईल (अत्यंत गुप्त सोडले तर) माझ्या माहिती साठी माझ्याकडे येत असे. विक्रांत वरील एक नौदल अधिकारी काश्मिरी होता तेंव्हा तो सुटीवर गेला कि त्याच्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली असे काही विचित्र संदेश पाहून माझ्या लक्षात आले हते पण त्याचा अर्थ मला समजला नव्हता. शीख सैनिक सुटीवर गेल्यावर ते दहशतवादी संघटनेशी संलग्न आहेत का याचाही तपास लष्करी गुप्तहेर संघटने कडून तेंव्हा होत असे. अनेक रुग्ण या खात्यात काम करणारे माझ्या संपर्कात आलेले होते उदा. एकाला मूल होत नसल्यामुळे तो आपल्या पत्नीसह माझ्याकडे दर महिना follicular monitoring साठी येत असे. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना दारूचे व्यसन लागलेला नौसैनिक माझा रुग्ण होता. याचे काम सध्या कपड्यात राहून चेम्बूर, देवनार, गोवंडीच्या जवळ असणाऱ्या टिनपाट बार मध्ये बसून खबरी काढणे अशी होती. तेथे त्यांना हिशेबाच्या बाहेर( unaccounted) पैसे दिले जात असत. ज्यात आपण वडिलोपार्जित श्रीमंत असून दिलदार आहोत असा बनाव करून संशयास्पद लोकांना फुकट दारू पाजून त्यांच्याशी मैत्री करणे आणि माहिती काढणे हे त्याचे काम होते. दुर्दैवाने हे काम करत असताना त्यालाच दारूचे व्यसन लागले आणि मग नौदलाने त्याला व्यसनमुक्तीसाठी आमच्या केंद्राकडे पाठवले होते. मुंबई पोलिसांबद्दल त्याने अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या मला सांगितल्या होत्या. त्यात एक गमतीची गोष्ट म्हणजे तेथे त्याला त्याच्यासारखाच एक दिलदार दारुड्या भेटला आणि एक आठवड्याने दोघांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते तेंव्हा याला लक्षात आले कि हा माणूस मुंबई सी आय डी मधील एक कॉन्स्टेबल होता आणि त्याचे काम असेच खबरी काढणे होते. अर्थात यानंतर त्यांनी "एकमेकांना" दारू पाजणे बंद केले मी लष्कराविरुद्ध न्यायालयात खटला केला तेंव्हा माझ्याविरुद्ध पण एक गोपनीय फाईल गुप्तहेर खात्यात उघडलेली होती आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मी कुठे जातो मेस मध्ये किती दारू पितो माझी बायको मला केंव्हा भेटायला येते इ सर्व गोष्टीची नोंद त्यात केली जात असे. हे लष्करी गुप्तहेर खात्यात अधिकारी असलेल्या माझ्या मित्रानेच माझ्याकडे कबुल केले होते. त्यांच्या पत्नीचा गंभीर आजाराचे मी पूर्वी निदान करून उपचाराला बहुमूल्य मदत केली होती. रक्षा लेख नियंत्रक (CDA) मध्ये मी टाकलेले क्लेम सुद्धा परत तपासले गेले होते हे तेथील एका रुग्णाने मला सांगितले होते. तेंव्हा गुप्तहेर खाते कसे काम करते याची निदान त्रोटक माहिती/ तोंडओळख तरी मला झाली होती.

In reply to by जेम्स वांड

@जेम्सभाऊ गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, सहमत आहे. असले रिपोर्ट फक्त काहीच मुख्य व्यक्तींना माहीती असल्यामुळे बाकीच्यांच्या मनात शंका निर्माण होते. अगदी त्या व्यक्तीच्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्या मधे सुद्धा. भारतीय कार्यालयीन गोपनीय कायदा हा सर्वांना लागू असतो व याचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, अशा विषयावर पुस्तक, लेख,भाष्य करताना संबंधित विभागाकडून परवानगी अनिवार्य असते. ते बरोबरच आहे. गुप्तचर इतके हुषार असतात की ते "त वरून ताकभात सहज ओळखतात". ऐंशीच्या दशकात किवा त्या आगोदर सिमारेषे लगत कार्यरत सैनीकांची खाजगी पत्रे randomly scrutinize व्हायची. एक छोटी पण खरी गोष्ट, तरूण धर्मशिक्षक, नवीनच लग्न झालेले व उच्चतुगंता सीमेलगत कार्यरत होते. विरहअग्नी मधे जळणाऱ्या त्याने प्रेमाने आपल्या नवविवाहित पत्नीला रोमॅन्टिक पत्र लिहीले,शब्द काही असे होते, "आकाशातून शुभ्र धवल फुले धरणीवर पडत आहेत.तुझ्या उबदार आठवणी हृदयांजवळ असतांना या शिशीराची काय हिम्मत ", and words to that effect. मुख्यालयातून सुचनावजा ताकीदपत्र आले. जे सर्वानी कळाले व बिच्चारे "धर्मशिक्षक". ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत. पार्लमेंटवर हल्ला करत असताना लाईट गेली व अतिरेक्यांना मिळणार्‍या सुचना बंद झाल्या त्यामुळे हडबडी मधे काही चुकीची पाऊले उचलली गेली. तेच मुबंई हल्लयामधे होटल ताज बद्दल त्यांना सर्व माहीती होती असे दूरदर्शनवर ऐकल्याचे आठवते.

In reply to by कर्नलतपस्वी

जेम्स वांड 05/08/2022 - 10:10
हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत.
ते अंधारात असतात ह्याचा अर्थ गुप्तचर हे कायम गुप्ततेच्या वेष्टनात काम करत असतात, न त्यांचे काम एखाद ॲक्टअन्वये गवर्न होते न त्यांचे स्पेशल चार्टर असते, त्यांचं नेमकं काम मला नाही वाटत त्यांच्या कुटुंबियांना पण ठाऊक असते, अश्या प्रकारे अंधारात म्हणत होतो मी सर.

In reply to by जेम्स वांड

मित्रहो 05/08/2022 - 11:56
ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी
अति गोपनीयता कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच. त्यामुळे खूप गैरसमज पसरलेले असतात. काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते.

In reply to by मित्रहो

जेम्स वांड 05/08/2022 - 13:37
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल, त्यांची बजेट्स, खर्च, जमा, काम, मिळालेले रीजल्ट इत्यादींची सदनात चर्चा व्हावी लागेल मुख्य म्हणजे जसे आयटीबीपी , बीएसएफ इत्यादींना त्यांच्या ॲक्ट आहेत तश्या आणाव्या लागतील आयबी अन् रॉ साठी. हे कुठल्याच सत्ताधारी पक्षाला नकोय.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/08/2022 - 19:45
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल. लोकसभा किंवा राज्यसभेचे सगळेच खासदार खरोखरच या लायकीचे आहेत का असा एक फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. रॉ संघटनेने काहूताच्या अणुकेंद्रात भगीरथ प्रयत्नाने उभी केलेली हेरांची साखळी श्री मोरारजी देसाई यांच्या आगाऊ वाचाळतेने नष्ट झाली. यात भारताचे ८-१० हेर नाही चिरा नाही पणती स्थितीत धारातीर्थी पडले आणि त्यांचा कोणताही मागमूस कुणाला लागला नाही. ( कारण असे आमचे हेर आहेत/होते हे भारत सरकार किंवा रॉ मान्य करु शकत नाही आणि मान्य केले तरी पाकिस्तानात त्यांना देहदंडच मिळाला असता ) आणि श्री मोरारजी देसाई यांच्या केसालाही धक्का लागला नाही. श्री गुजराल यांच्या नीतीमुळे काय झाले तेही आपण वाचले आहे. MAN POWER IS EXPENDABLE हे वाक्य मी संरक्षण खात्याच्या उपसचिवाकडून चक्षुर्वैसत्यं ऐकलेले आहे. तेंव्हा दिल्लीत बसून फाईली फिरवणाऱ्या माणसांची अशा जीवावर उदार होणाऱ्या माणसांबद्दल काय विचारसरणी आहे ते आपण समजून घ्या. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षण मंत्रालयातील दोन वरिष्ठ बाबूंना सियाचेन येथे प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती बघून या असा हुकूम काढला होता हे आपल्याला आठवत असेल. https://www.dnaindia.com/india/report-livid-over-procurement-delay-fernandes-once-sent-two-def-ministry-babus-to-siachen-2713482 तेंव्हा काही गोष्टी या गुलदस्त्यात असलेल्याच उत्तम. माओइस्ट चळवळींना आपल्याकडचे वाममार्गी उघडपणे किंवा छुप्या रीतीने पाठिंबा देतात त्यासाठी त्यांना चीनकडून मदत मिळते हे उघड असूनही आपण काही करू शकत नाही. चीनने डोकलाम किंवा गाल्वान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला त्या बद्दल साधे निषेधाचे उद्गार या लोकांनी काढले नाहीत. https://thewire.in/diplomacy/india-china-doklam-cpim https://www.freepressjournal.in/india/chinas-chairman-is-our-chairman-why-china-will-forever-hau तर असे लोक या संघटनांचे काम शत्रूला पुरवणार नाहीत याची कोणती खात्री देता येईल. (किंबहुना हे लोक हि माहिती १०० % शत्रूला पुरवतात हे सरकारला आणि लष्कराला माहिती आहे). साधी गोष्ट लक्षात घ्या एखादा हेर ( पोलीस किंवा लष्करी) दाऊदच्या माणसाबरोबर संपर्क किंवा मैत्री ठेवून आहे हि माहिती आपण कायद्याच्या कक्षेत कशी बसवणार? उलट ते उघड झाले तर प्रचलित कायद्यानुसार त्याच्या वर टाडा/ यु ए पी ए कायद्यानुसार खटला भरावा लागेल. तेंव्हा अशा असमतोल युद्धाचे नियम सामान्य कायदे/ नियमात बसवता येत नाहीत आणि तसे न बसावे हेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शहाणपणाचे ठरेल.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी 05/08/2022 - 20:07
काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते. ३० वर्षांनतर सीआयए किंवा इतर गोपनीय अहवाल सार्वजनिक करण्याचा अमेरिकेत कायदा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड 06/08/2022 - 02:06
तसा कायदा आहे पण त्यातही बहुतेक रिपोर्ट हे फुल्या फुल्यांच्या नक्षिने सजलेले किंवा मध्ये मध्ये परिच्छेदचे परिच्छेद काळे करूनच प्रकाशित होतात.

मित्रहो 04/08/2022 - 14:58
वाह खूप सुंदर चर्चा सुरु आहे. बरीच नवीन माहिती येत आहे. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद डॉ. सुबोध खरे, जेम्स वांड भाऊ, Bhakti, अर्जुन, अमर विश्वास, मुवि लेख वाचण्यापेक्षा सरळ प्रतिसाद वाचावे इतकी छान चर्चा सुरु आहे. खूप माहितीपूर्ण, अभ्यासक प्रतिसाद आहे. या उत्तम चर्चेसाठी श्रीगुरुजी, डॉ. सुबोध खरे, कर्नल तपस्वी आणि क्लिंटन यांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांमुळे ज्ञानात भर पडत आहे. नवीन पुस्तकाची नावे डोमेल ते कारगील - शशीकांत पित्रे (धन्यवाद अमर विश्वास) Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik (धन्यवाद कर्नल तपस्वी) @अर्जुन - इंद्रकुमार गुजराल यांनी गुप्तहेर संस्थेच्या बाबतीत केलेला बदल माहित नव्हता. आज तुमच्या प्रतिसादामुळे त्याची माहीती मिळाली. खूप धन्यवाद @सुबोध खरे - लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा पार करण्याची मनाई केली होती. त्याला आतंरराष्ट्रीय दबाव हे कारण असू शकते. ९/११ नंतर बदलले जग, सुधारलेली भारताची आर्थिक स्थिती यामुळे परिस्थिती बदलली. पूर्वी भारतात होणाऱ्या अतिरेकी कारवायांचा निषेध सुद्धा पश्चिमी देश करत नव्हते. विरोधात बोलायला नेहमी तयार होते. MIG29 आणि F16 मधला हा फरक माहित नव्हता. मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते म्हणून त्यांनी वायुदल वापरुन मदत केली नाही. गुप्तहेर संस्थेनी काय माहिती दिली आणि काय नाही याविषयी कधीच ठोस काही हाती लागणार नाही. मुळात लेख लिहण्यामागे तसा उद्देषही नव्हता. लेख लिहिण्यामागे दोन ट्रिगर होते. मे महिन्यात घरचे सिक्किमला गेले होते. नथूला पास जवळील बाबा मंदिरात जाऊन आल्यावर माझ्या मुलाने मला फोन करुन विचारले बाबा तुला माहिती आहे १९६७ मधे भारत चीन वॉर झाले होते. मला खरच माहिती नव्हते. त्यानंतर मी नथूला आणि चोला मधे झालेल्या लढाई विषयी वाचले. गेल्या काही वर्षात युट्युब वगैरे मुळे सियाचीनविषयी माहिती मिळायला लागली आधी कल्पना नव्हती. सैन्याचा हा पराक्रम शिकवला जावा असे मला वाटते. दुसरा ट्रिगर म्हणजे विदेश मंत्री जयशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. We have large force standing at LAC. To make it happen was huge logistical challenge but even our MLAs don't appreciate it. असे काहीतरी होते. काही शब्द इकडे तिकडे असेल. मुळात याची कल्पनाच नसल्याने हे काम इतके सोपे नाही हे समजत नाही. लोकांसमोर सिनेमामधून उभ्या झालेल्या प्रतिमा राहते.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी 04/08/2022 - 15:44
काही वर्षांपूर्वी ६ दिवस सिक्कीमला सहलीसाठी गेलो होतो. गाडीचा चालक स्थानिक सिक्कीमी होता. त्याचा भाऊ भारतीय सैन्यात होता. त्याने सांगितले की मागील काही वर्षांत भारताने सिक्कीममध्ये हजारो बंकर्स बांधले आहेत. ते पर्वतात आहेत. स्थानिक मःडळी त्यांना अन्नपाणी पुरवितात. काही वेळा कडाक्याची थंडी, बर्फ, पाऊस वगैरेमुळे स्थानिकांना बंकरपर्यंत जाता येत नाही. अशावेळी सैनिक बुटात पाणी जमवून ते पितात. चीनचा भविष्यातील हल्ला सिक्कीममधून होणार असल्याचा लष्कराचा अंदाज असल्याने लष्कराने पूर्वतयारी केली आहे. डोकलाममध्ये २०१७ मध्ये अनेक महिने भारत व चीनचे सैन्य कैवळ २०० मीटर अंतरावर एकमेकांसमोर ४-५ महिने उभे होते. डोकलाम हा भूतानचा भाग आहे. येथे कोंबडीच्या डोक्यासारख्या अरूंद भागात ३ देशांच्या सीमा मिळतात. या भागाला चिकन्स नेक असे म्हणतात. भारतात सहज घुसण्यासाठी चीनला डोकलाम हवे आहे. त्यासाठी चीनने डोकलामच्या बदल्यात वेगळा प्रदेश भूतानला देऊ केला होता. परंतु भारताच्या सल्ल्याने हा प्रस्ताव भूतानने मान्य केला नाही. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. भूतानने डोकलाम देण्यास नकार दिल्याने चीनने तातडीने सैन्य पाठवून डोकलाम बळकावण्याची योजना आखली. परंतु भारताने तातडीने डोकलाममध्ये आपले सैन्य पाठवून चीनचे डावपेच उधळून लावले. त्यामुळे चीन संतप्त झाला व युद्धसमान स्थिती निर्माण झाली. भूतान व चीनमधील वादात भारताने पडू नये अशी चीनने धमकी दिली. परंतु भूतानचे संरक्षण भारत करतो व एकदा डोकलाम आणि चिकन्स नेक हे भाग चीनच्या ताब्यात गेले की चीन सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या भागात अगदी सज घुसू शकेल हे ओळखून भारताने डोकलाममध्ये युद्धाची तयारी केली. चीनच्या धमक्या सुरूच होत्या. चीनने भूतानबरोबर साम, दाम, दंड, भेद हे सर्व प्रकार वापरले. परंतु भारत बधला नाही. चीनचा ताठरपणा कमी होत नाही हे पाहून भारताने आपले प्रशिक्षित कमांडो पाठवून गलवानप्रमाणे चिनी सैन्यावर बंदुका न वापरता हल्ला करून १५० चिनी सैनिक मारले. भारताचा एकही सैनिक गेला नाही. त्यामुळे ही बातमी बाहेर आली नाही. ही माहिती अर्थातच त्या चालकाने दिली. यातील सत्यता माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मित्रहो 05/08/2022 - 13:17
धन्यवाद श्रीगुरुजी ही वेगळी माहीती आहे आजपर्यंत तरी डोकलाममधे जिवित हानी झाल्याचे वाचले/ऐकले नव्हते. चीनच्या रस्ता बांधण्यावरुन वाद होता हेच वाचले होते. चुंबी (चंबी) व्हॅली ही भौगोलिक दृष्ट्या डोकेदुखी आहे. येथील शिखरावर भारतीय सैन्य आहे. ट्रायजंक्शनच्या खाली सिलगुडी कॉरीडॉर हा फक्त शंभर किमी आहे. काही ठिकाणी अधिक अरुंद होतो. त्यामुळेच उत्तरपूर्व राज्ये भारताला जोडले गेलेले आहेत. बांगलादेश, भूतान देश भारतासाठी त्याचकारणाने महत्वाचे आहेत.

In reply to by मित्रहो

सुबोध खरे 04/08/2022 - 20:08
मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते पाकिस्तानला सुरुवातीला असे दाखवायचे होते कि हे आमचे सैनिक नसून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिदीन आहेत. आमचा त्यांना फक्त पाठिंबा आहे. परंतु जसे जसे भारतीय हुतात्म्यांना मिळणार मानसन्मान भारताच्या टीव्ही वर दिसू लागला तसा सन्मान त्यांच्या हुतात्मा होणाऱ्या सैनिकांना मिळत नव्हता एवढेच नव्हे तर हे आमचे सैनिक नव्हेतच असा पवित्रा सैन्याने घेतल्याने त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार आणि हुतात्म्यांना मिळणारे मानधनाचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंट मध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. या युद्धाचे वेळेस आंतरराष्ट्रीय समुदायापैकी युरोप आणि अमेरिकेने आपली कोणतीही मदत केलेली नव्हती. अमेरिकेने तर आपले जी पी एस देण्यास नकार दिला होता त्यामुळे आपल्याला क्षेपणास्त्रे डागण्यास फार त्रास झाला होता शेवटी रशियाने आपले ग्लोनास हे तंत्रज्ञान दिले होते. यावेळेस जवळ जवळ निवृत्त होत आलेल्या मिग २५ या विमानांनी परत एकदा ताबारेषेवर उड्डाणे करून पाकिस्तानच्या बंकर्स आणि ठाण्यांची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणी मग त्याचा वापर करून फ्रेंच मिराज विमाने आणि इस्त्रायली स्मार्ट बॉम्ब यांनी पाकिस्तानच्या तोफा आणि बंकर्स ला भाजून काढले आणि युद्ध लवकर समाप्त झाले. https://www.rediff.com/news/special/kargil-how-mig-25-played-a-special-role/20220606.htm#:~:text=While%20researching%20features%20on%20the,strategic%20icy%20heights%20of%20Kargil. आज २० -२२ वर्षांनी भारत आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे त्यामुळे बालाकोट किंवा उडी येथे भारताने नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले केले त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणताही गडबड केली नाही. किंवा रशियाने केलेली मदत लक्षात ठेवून युक्रेनच्या युद्धाबद्दल रशियाविरुद्ध भारताने पवित्र घ्यावा अम्हणून प्रचंड दबाव आणला गेला तरी भारत झुकला नाही याबद्दल ते काहीही करू शकत नाहीत. वनानी दहते वन्हे, सखा भवती मारूत: स एवं दीप नाशाय कृशे कस्यास्ती सौहृदं अर्थात वनाला आग लागली असता ती पसरवण्यासाठी वायू सहाय्य्यभुत होतो परंतु हीच आग दिव्यात छोटी असते तेंव्हा हाच दीप विझवण्याचे काम वायू करतो. जगात अशक्त माणसाचा कोणीही मित्र नसतो

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 05/08/2022 - 13:08
तरी भारत झुकला नाही
यामधे मला वाटते आणखी दोन महत्वाची कारणे असावीत. १. आघाडी सरकारे जाऊन भारतात स्थिर सरकार आले. त्यामुळे आतल्या गोटातल्या बातम्या मिळवणे पूर्वीपेक्षा आता सोपे झालेले नाही. २. चीनला आटोक्यात ठेवायचे असेल तर ते भारताच्या सहभागाशिवाय शक्यच नाही याची खात्रीच युरोप व अमेरिकेला झालेली आहे. त्यामुळे भारत पूर्वीपेक्षा खूपच कणखर भूमिका घेऊ शकत आहे. मुख्य म्हणजे ह्याचे भान मोदींना आहे व ते त्याचा योग्यरितीने लाभ उठवत आहेत. मग काहीजणं त्याला एन आय आर पंतप्रधान म्हणोत.

विवेकपटाईत 05/08/2022 - 09:14
घुसखोरीची माहित निश्चित असेल. पण युद्धासाठी लागणारे साहित्याची कमतरता होती. बोफोर्स होती पण दारू गोळे नव्हते. रस्त्यां अभावी सैनिक साजोसामान पोहचायला ही वेळ लागणार होता. बाकी याकाळात हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.

In reply to by विवेकपटाईत

जेम्स वांड 05/08/2022 - 10:14
हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.
भारतीय लष्कराच्या मेहनतीला आपण कमी करून मांडता आहात काय ?

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/08/2022 - 12:12
नाही हि वस्तुस्थिती आहे. आकडा वर खाली होऊ शकतो. परंतु NLI (नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री) च्या सैनिकांना पाकिस्तान सरकारने वाऱ्यावर सोडून दिले होते याचे कारण तेथे आमचे सैनिक नाहीतच असा पवित्रा पाकिस्तानी लष्कराने घेतला होता. पाकिस्तानी लष्कराने आमचे ४५३ सैनिक शहिद झाले असा दावा केला होता परंतु नवाझ शरीफ यांच्या पक्षाने श्वेतपत्रिका काढली होती त्याप्रमाणे किमान ३ हजार आणि इतर विश्लेषकांच्या मते ४००० पर्यंत सैनिक यात मारले गेले. The former Pakistan Prime Minister, Nawaz Sharif, claimed that more than 4,000 Pakistani troops and officials were killed in the Kargil conflict. The Pakistan Government had consistently denied charges of its involvement in the Kargil War and claimed it to be an operation conducted entirely by the Mujahideen (holy warriors). Several months later it indirectly acknowledged its participation by decorating some of its soldiers who died in the conflict. http://www.hindu.com/thehindu/2003/08/17/stories/2003081702900800.htm

In reply to by जेम्स वांड

विवेकपटाईत 07/08/2022 - 09:18
ही प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी झालेली हानी आहे, त्या बाबत लिहले आहे . तसेही कारगिल मध्ये जीवंत राहणे ही एक प्रकारचे युद्धच आहे. आपल्या सैनिकांना ते रोज लढावे लागते.

मदनबाण 06/08/2022 - 20:35
कारगिल युद्ध या विषयावर एक्स रॉ एजंट एन के सुद यांनी बरेच माहितीपर भाष्य केलेले आहे. ज्यांना या विषयात अधिकचा रस असेल त्यांनी ISRG - Indian Security Research Groupइथे जाऊन ते व्हिडियो शोधुन पहावेत. कारगिल म्हंटलेच की मला प्रचंड दु:ख आणि त्याहुन अधिकचा राग येतो, कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना ज्या यातनामय पद्धतीने ठार केले त्याचा आपण बदला घेतला नाही ! मी त्या दिवशाची वाट पाहत राहणार जेव्हा हा बदला पूर्णत्वास आणला जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga

वामन देशमुख 07/08/2022 - 14:10
थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे.... १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या रघुवंशातील राजे- सेनापती यांपासून ते आधुनिक काळातील नेते - लष्कर प्रमुख या इतिहासाचा सैनिकी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, शालेय शिक्षणाद्वारे तो नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. --- आधुनिक भारतीय सैन्यास बहुदा दीड-दोनशे वर्षांचा युद्धानुभव आहे. त्यावर योग्य ती ग्रंथसंपदा निर्माण व्हायला हवी. --- अवांतर: ब्रिटिश इंडियाच्या फाळणीनंतर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सैन्याचे विभाजन कसे झाले असावे यावर कोणी लेख लिहिल्यास वाचायला आवडेल. (५५ कोटी बद्दल भरपूर वाचण्यात आला आहे पण बाकी मुलकी प्रशासन, लष्करी मनुष्यबळ, इतर संसाधने यांचे विभाजन कसे कसे झाले असावे याची काही रिसोर्सेस आहेत का?)

In reply to by वामन देशमुख

जेम्स वांड 08/08/2022 - 09:02
तुमच्या प्रश्नाला अनुसरून सर्च करता करता खालील फोटो सापडला . हा फोटो कैक दिवस इंटरनेटवर, फाळणी दरम्यान नॅशनल लायब्ररी कोलकाता मधील पुस्तकांची फाळणी ह्या नावाने फिरत होता पण ते खरे नाही हा मूळ फोटो डग्लस डंकन नावाच्या फोटो जर्नलिस्टने १९४७ साली काढलेला असून तो नॅशनल लायब्ररी कोलकाता इथला नसून तत्कालीन इम्पेरियल सेक्रेटरीयाट लायब्ररी (आता सेंट्रल सेक्रेटरीयाट लायब्ररी) नवी दिल्ली इथला आहे, पुस्तकांचे विभाजन करून गेलेली व्यक्ती म्हणजे तत्कालीन ग्रंथपाल कर्मचारी श्री बी एस केशवन हे आहेत.

मित्रहो 15/08/2022 - 15:26
इंटेलिजन्स फेलीव्हर बाबतीत नुकतीच विक्रम सूद (रॉ चे पूर्वीचे प्रमुख) यांची जुनी मुलाखत बघितली https://www.youtube.com/watch?v=hPSSbfsLgio त्यांच्या मते अशा काही घटना झाल्या की गुप्तहेर खात्यावर दोष येतोच. ते चालायचेच. त्यांना आवडले नाही की प्रोफेशनल व्यक्तीने दुसऱ्याबद्दल लिहिणे. त्यांनी नांव घेतले नाही पण रोष जनरल मलिक यांच्या पुस्तकाविषयी असावा. सूद यांच्या मते हिवाळ्यात भारताचे सैनिक उंचावरील जागा सोडून खाली येतात हे पाक सैन्याला माहिती होतेच तर त्याचा फायदा ते घेणार नाही कशावरुन. सैन्याच्या चौक्या दूर दूर होत्या असेही एक कारण घुसखोरीमागे दिले जाते. एक मला पडलेला प्रश्न सर्वेक्षण किंवा पेट्रोलिंगचे काम कोणाचे असते BSF/ITBPचे कि सैन्याचे.

श्रीगणेशा 02/08/2022 - 14:50
लेख आवडला! तेव्हासुद्धा दृकश्राव्य प्रसारमाध्यमातून खूप कमी प्रमाणात (आताच्या तुलनेत) युद्ध सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं. किंवा कदाचित त्यावेळी वयाने लहान असल्यामुळे खूप बारकावे वगैरे पाहिल्याचे आता आठवत नाही.

सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. गोपनीयता हा प्रमुख मुद्दा आसल्यामुळे ,Need to know या तत्त्वावर माहीती देण्यात येते. दुसरा मुद्दा हा आहे की ह्या माहितीचा सामान्य जनतेला तसा काहीच फायदा नसतो. सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. अशी अनेक पुस्तके सेवानिवृत्तीनंतर बर्‍याच प्रमाणात लिहीली आहेत व प्रकाशीतही झाली आहेत. आमच्या वेळेस मिलिट्री सायन्स नावाचा एक ऐच्छिक विषय होता. एन सी सी ची मुले तो घेत ,आताचे माहीती नाही. सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सन सतराशे पासुन ते आतापर्यंत अनेक पुस्तके लिहीली आहेत. अंतरजालावर सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यांना रूची आहे ते जरूर वाचतात. सरकार सुद्धा बरेच पेपर्स प्रकाशीत करते. बाकी लेख चांगला आहे.

मित्रहो 03/08/2022 - 14:13
धन्यवाद श्रीगणेशा आणि कर्नलतपस्वी @ कर्नलतपस्वी गोपनीयता पाळून जी माहिती इंटरनेटवर सर्रास उपलब्ध आहे तिच सांगावी. शालेय शिक्षणात नागरीक शास्त्राबरोबर सैन्याच्या रचेनेविषयी माहिती द्यावी असे माझे मत होते अर्थात गोपनीयता पाळून.

क्लिंटन 03/08/2022 - 15:47
लेख आवडला. या निमित्ताने काही गोष्टी लिहितो. १. पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? इथे भारत सरकार लिहित आहे कोणत्या पक्षाचे सरकार याचा संबंध नाही. २००३ मध्ये बेनझीर भुत्तोंनी म्हटले होते की परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी सैन्याचा DGMO असताना त्याने पंतप्रधान बेनझीरकडे कारगील सारखे ऑपरेशन करायचा प्रस्ताव आणला होता. पण तो प्रस्ताव बेनझीरने नाकारला. https://www.rediff.com/news/2003/jun/25pak5.htm आता मुशर्रफ नक्की कोणत्या काळात DGMO होता हे आंतरजालावर तपासले तर तो काळ १९९३ ते १९९५ असा होता. बेनझीर १९९३-१९९६ या काळात पंतप्रधान होती. म्हणजे कालावधीचा मेळ बसत आहे. विकीपीडियावरील कारगील युध्दावरील लेखात अगदी झिया उल हक अध्यक्ष असतानाही असे प्रस्ताव दिले गेले होते असे काही पुस्तकात म्हटले आहे असा उल्लेख आहे. ती पुस्तके अर्थातच मी वाचलेली नाहीत पण झियाचा भारतद्वेष आणि काश्मीर मिळविण्यासाठी टोपॅक म्हणून योजना त्याने सुरू केली होती ते पाहता अगदी झियाच्या काळात म्हणजे १९८८ पूर्वी अशी कोणती तयारी पाकिस्तानने केली असेल हे अगदी असंभवनीय नसावे. आता एक गोष्ट माझ्या आठवणीतून लिहितो. कारगीलमध्ये पाकिस्तान घुसखोरी करायचा प्रयत्न करेल असे आमच्याकडे इनपुट्स आहेत हे १९९१ मध्ये हे सरकारच्या बाजूने कोणीतरी (बहुदा गृहमंत्री शंकरराव चव्हाण) संसदेत म्हणाले होते अशी बातमी आल्याचे पक्के आठवते. कारण त्यानंतरच कारगील हे ठिकाण कुठे आहे हे अ‍ॅटलासमध्ये बघितले होते हे पण आठवते. आणि १९९९ मध्ये जेव्हा खरोखरच कारगीलमध्ये घुसखोरी झाली तेव्हा कारगील हे नाव मला तरी त्या कारणाने अपरिचित नव्हते. याविषयीचा पुरावा विचाराल तर तो माझ्याकडे नाही. आंतरजालावर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींच्या चर्चांचे पी.डी.एफ उपलब्ध आहेत पण त्यातून ही माहिती काढणे जिकरीचे काम आहे, विशेषतः नक्की तारीख आणि हे उल्लेख लोकसभेत होते की राज्यसभेत हे माहिती नसेल तर. शंकरराव चव्हाणांचे ते स्टेटमेंट शोधायला मी अगदी जंग जंग पछाडले आहे असे म्हटले तरी चालेल पण तसे काही उल्लेख मिळाले नाहीत. तसे काही उल्लेख मिळत नाहीत तोपर्यंत त्याविषयी कोणतेही ठोस विधान करता येणार नाही. तरीही १९९१ सोडा- बेनझीर भुत्तोच्या दुसर्‍या कार्यकाळात म्हणजे १९९३-१९९६ या काळात असे काही डाव शिजत असतील तर त्याचा पत्ता भारत सरकारला नव्हता आणि खरोखरच घुसखोरी झाल्यावरच आपल्याला जाग आली? (अवांतरः ९/११ व्हायची शक्यता आहे हे अमेरिकन सरकारला २००१ पूर्वीच माहित होते याविषयीचे सगळे आंतरजालीय पुरावे अमेरिकन सरकारने मिटवले आहेत ना? तसे काही भारतातही झाले असेल का? त्यातही १९९१ मध्ये आंतरजालावर फार काही असायची शक्यता थोडी. तरीही लोकसभा-राज्यसभेच्या मिनिट्समधून पण ते उल्लेख गुपचूप हटविले असतील का? पूर्वीच्या काळी युजनेट म्हणून ग्रुप असायचे. भारताबाहेर, विशेषतः अमेरिकेत असलेल्या भारतीयांचा वावर त्यावर असायचा. त्यावेळचे जुने ग्रुप आंतरजालावर कुठेतरी मिळाले आणि त्यात हा उल्लेख सापडला तर बरे होईल.) २. कारगील युध्दाच्या वेळेस संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी काही बेजबाबदार वक्तव्ये केली होती. कारगील आणि द्रास-तोलोलिंग वगैरे भागात पाकिस्तानी घुसखोर शिरले आहेत हे तोपर्यंत अगदी मिडियालाही १५ मे च्या सुमारासच माहित झाले होते. प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांना सुरवात झाली २६ मे रोजी. त्याच्या ९ दिवस आधी म्हणजे १७ मे रोजी जॉर्ज फर्नांडिसांचे वक्तव्य होते की पाकिस्तानी घुसखोरांना ४८ तासात हाकलून देता येईल. https://www.rediff.com/news/1999/may/17kash.htm . ४८ तास म्हणजे २ दिवस. प्रत्यक्षात युध्द २ महिने चालू होते. ४८ तासात घुसखोरांना हाकलू वगैरे गोष्टी जॉर्ज फर्नांडिस नक्की कोणत्या आधारावर बोलले होते? त्यांनाही परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना नव्हती असे म्हणायचे का? हे संरक्षणमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाला शोभले का? जॉर्ज फर्नांडिसांचे दुसरे वक्तव्य म्हणजे युध्द सुरू झाल्यानंतरचे- जून १९९९ मधील. तेव्हा ते म्हणाले होते की कारगील घुसखोरीची पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि आय.एस.आय ला कल्पना असेलच असे नाही. त्यातून चित्र काय उभे राहिले? तर आपले सैनिक प्राण पणाला लाऊन लढत आहेत आणि आपलेच संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या पंतप्रधानांना क्लीन चीट देत आहेत. नवाझ शरीफना समजा कारगील घुसखोरीविषयी कल्पना नव्हती हे गृहित धरले तरी हे युध्द सुरू असताना जाहीरपणे बोलायची काय गरज होती? तसेही पाकिस्तानात सैन्यच खरे सत्ताधारी असते हे जगजाहीर आहे तेव्हा हे वाक्य जाहीरपणे बोलून पाकिस्तानात फार काही फूट वगैरे पडायचा संबंधच नव्हता कारण तिथे पंतप्रधानाला फार किंमतच नाही. बाकी कारगील आणि आजूबाजूच्या भागात घुसखोरी होत आहे याविषयी फेब्रुवारी-मार्चमध्येच दिल्लीला लष्करी अधिकार्‍यांची पत्रे गेली होती हे त्यावेळेसही आले होते. तरीही त्याविषयी काहीही न करणे ही वाजपेयींच्या सरकारची अक्षम्य चूक होती. वाजपेयी अनेकदा झोपून राहिले आणि जोरदार धक्का बसल्यावर मग खडबडून जागे झाले हे नंतरही झाले होते. त्यातील एक सौम्य उदाहरण म्हणजे आग्रा परिषदेच्या वेळेस मुशर्रफ भारतात आलेला असताना त्याच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात चालू होते आणि त्याचा आपल्या सरकारला पत्ता नव्हता. दुसरे कितीतरी जास्त गंभीर उदाहरण म्हणजे १ ऑक्टोबर २००१ रोजी काश्मीर विधानसभेच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला होता आणि तो काश्मीर विधानसभेवरचाच हल्ला होता. तेव्हा हेच दिल्लीत संसदेवर झाले तर काय होईल हा प्रश्न अनेक सामान्यांनाही पडला असेल. तरीही वाजपेयी सरकार झोपून राहिले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनंतर संसदेवर हल्ला झालाच. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपण त्या महाभयानक प्रसंगातून सुटलो. खरं तर फिजीत झाले त्याप्रमाणे अख्खे मंत्रीमंडळ ओलीस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे वगैरे काहीतरी प्रकारच व्हायचा त्या दिवशी. असो. कारगीलमध्ये सुरवातीला झोपून राहिल्यानंतर झालेल्या युध्दात झालेला विजय (?) म्हणजे वाजपेयींचे खंबीर नेतृत्व वगैरे प्रचार करून १९९९ च्या निवडणुकीत विजय मात्र त्यांनी मिळवला.

Himalayan Blunder by Brig Jon Dalvi अमेझोनवर उपलब्ध आहे. @क्लिंटन पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? काश्मीर वर पाकिस्तान चा डोळा आहे हे सुर्य प्रकाशात इतकेच स्वच्छ आहे. देशाच्या विभाजन पासुन त्याने अनेक प्रयत्न केले व इथून पुढे करतच रहाणार यात मला तरी शंका नाही. बाकी राजकारणात मला शिरायचे नाही.

श्रीगुरुजी 03/08/2022 - 18:11
कारगिल, द्रास इ. ठिकाणे सुमारे १४०००-१८००० फूट उंचीवर आहेत जी बहुतांशी वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादित असतात. विशेषतः हिवाळ्यात तापमान खूप अंश शून्य अंशाखाली असते. बर्फाळ वाऱ्यामुळे तेथे वास्तव करणे जवळपास अशक्य असते. मुख्य म्हणजे जवळपास सर्व रस्ते बर्फाखाली असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक, कोणत्याही वस्तूंचा किंवा औषधांचा किंवा अन्नाचा पुरवठा करण्यासाठी फक्त हेलिकॉप्टर वापरता येते व ते सुद्धा हवामान अनुकूल असेल तर. त्यामुळे १९८५ नंतर केव्हा तरी भारतीय व पाकिस्तानी लष्करात एक अलिखित स्वरूपाचा करार झाला होता. हिवाळ्यात दोन्ही बाजूंचे सैन्य शिखरे रिकामी करून आपापल्या भागात कमी उंचीवर परत जायचे व हिवाळा संपला की परत शिखरांवर जाऊन आपापल्या भागांचे संरक्षण करायचे. हा प्रघात अनेक वर्षे सुरू होता. प्रतिकूल हवामानामुळे आपल्या सैन्याची जीवितहानी टाळणे हा दोन्ही देशांचा उद्देश होता. परंतु १९९९ च्या हिवाळ्यात सुरूवातीला दोन्ही बाजूंचे सैन्य कमी उंचीवर आल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने गुपचूप अत्यंत कडक उन्हाळ्यात आपले सैन्य परत शिखरांवर पाठवून भारतीय हद्दीतील काही शिखरांवर कब्जा केला व त्यातून पुढे कारगिल युद्ध घडले. एकदा युद्ध सुरू झाले की १९४८ प्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका अशांकरवी भारतावर दबाव आणून दोन्ही बाजूच्या सैन्याला आहे तेथेच थांबायला लावायचे जेणेकरून आपण बळकावलेली शिखरे आपल्याच ताब्यात राहतील अशी योजना होती. यासंदर्भात खालील परिच्छेद पहा. Indian posts along the LoC at the mountain peaks were vacated before winter. The Pakistanis did likewise on their side of the Line of Control (LoC). This was an understanding between the two sides due to the inhospitable living conditions at posts 14,000 to 18,000 feet high, with heavy winter snowfall cutting them off from the rest of the world. Most of the roads to these posts were either not motorable or non-existent. Artillery guns - crucial for destroying enemy bunkers high up in the mountains or for accurately firing on enemy troops hiding behind boulders - were inadequate. Surveillance by high-technology equipment such as Unmanned Aerial Vehicles were not there. The Pakistan Army took advantage of these shortcomings, especially the lack of Indian troops during winters, and intruded into Mushkoh, Dras, Kargil, Batalik and Turtuk sub-sectors, between Zojila and Leh. They crossed the LoC and intruded 4-10 km into Indian territory and occupied 130 winter-vacated Indian posts. Pakistan wanted to cut off the highway connecting Srinagar with Leh, thereby cutting off Ladakh and Siachen –– a move India didn’t expect. https://m.economictimes.com/news/defence/kargil-war-what-happened-20-years-ago-and-why-it-may-not-happen-again/articleshow/70371791.cms हे सर्व झाले कारण वाजपेयी झोपलेले होते, भारतीय सैन्य सावध नव्हते वगैरे आरोप माझ्या मते पूर्ण चुकीचे आहेत. १९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 03/08/2022 - 21:46
या सगळ्या गोष्टी मलाही माहित आहेत. त्यावेळी आणि नंतरही भाजपविरोधक जेव्हा जेव्हा कारगील वर प्रश्न उभे करायचे तेव्हा तेव्हा मी पण अशाप्रकारेच बचाव करायचो. तरीही
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
पाकिस्तानने केलेले कोणते करार प्रामाणिकपणे पाळले आहेत? म्हणजे कोणताही करार पाकिस्तान सध्या पाळत असेल तो कधीतरी मोडून विश्वासघात करायच्या उद्देशानेच. हे जनसंघ आणि रा.स्व.संघाची पार्श्वभूमी असलेल्या वाजपेयींना अधिक चांगल्या प्रकारे माहित असल्याने ते अधिक सावध असतील अशी अपेक्षा नक्कीच होती. त्यावेळेस नक्की काय झाले हे आपल्यासारख्याला बाहेर बसून सांगता येणार नाही. कारगीलमध्ये घुसखोरी होत आहे याविषयी अ‍ॅक्शनेबल इनपुट्स लष्कराकडून गेले होते की नाही याविषयी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जातात तेव्हा त्याविषयी काही बोलत नाही. पण वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते. फारूख अब्दुल्लासारख्या हरामखोराला त्यांना उपराष्ट्रपती बनवायचे होते हे वाजपेयींच्या पी.एम.ओ मध्ये असलेल्या अमरजितसिंग दुलातच्या (ज्याने भविष्यात आय.एस.आय च्या माजी प्रमुखाबरोबर संयुक्तपणे पुस्तक लिहिले) Kashmir: The Vajpayee years या पुस्तकात लिहिले आहे. ते कितपत खरे होते याची कल्पना नाही पण मुळात ए.एस.दुलातसारखा माणूस मुद्दामून पी.एम.ओ मध्ये नियुक्त करणे, हुर्रियत कॉन्फरन्सबरोबर बोलणी सुरू करणे वगैरे गोष्टी पाहता वाजपेयींना कारगील युध्दाच्या बाबतीतही benefit of the doubt देता येईल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

निनाद 10/08/2022 - 10:59
वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते.
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते. त्या वेळीच कारगिल वर हल्ल केला म्हणून त्याची शिक्षा पाक ला करायला पहिजे होती. तसेच या युद्धाची किंमत पाक कडून पैशातही वसूल करायला हवी होती. खरं तर ही अजूनही करता येईल.

In reply to by निनाद

सुबोध खरे 10/08/2022 - 12:08
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते तसे असते तर त्यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता अणुस्फोट केले नसते. प्रत्येक वेळेची परिस्थिती काय असते हे आपल्याला सहजासहजी कळत नाही. शिक्षा म्हणजे नक्की काय करायला हवे होते? कारगिल युद्धात पाकिस्तानचे ४०००-५००० सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्यांना साधे सन्मानाने अंत्यसंस्कार उपलब्ध केले गेले नाहीत. यापेक्षा वाईट म्हणजे भारतीय हुतात्मा सैनिकांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी, थोडा फार पैसा आणि मोठ्या प्रमाणावर सन्मान मिळाला. तुलनेत हे पाकिस्तानी सैनिकांना जास्त डाचत राहिले. कारण दोन्ही कडे सैनिक स्वतः च्या देशासाठीच लढत होते. मग त्याचा पाया विश्वासघाताचा आहे कि नाही हा प्रश्न सैनिकांचा नसतो तर राजकारण्यांचा असतो. (उदा श्रीलंकेत सैन्य पाठवणे चूक कि बरोबर हा प्रश्न / लष्कराचा /सैनिकाचा नसून सरकारचा होता ) पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. याशिवाय त्यांच्या लष्कराचे नाक कापले गेले.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 10/08/2022 - 14:00
भारताने हवाई हल्ले सुरू केल्यानंतर युद्ध थांबविण्यासाठी भारतावर दबाव टाकावा ही मागणी करण्यासाठी नवाज शरीफ आधी चीनला व नंतर अमेरिकेला गेले होते. चीनने तटस्थ भूमिका घेतल्याने शरीफ अमेरिकेला जाऊन क्लिंटनना भेटले. परंतु क्लिंटननी अनेकदा वाजपेयींना भेटायला बोलविल्यानंतर, पाकिस्तानने कोणत्याही अटींशिवाय आपले सैनिक मागे घेतल्यानंतरच मी भेटीस येईन असे सांगून अमेरिकेत जाण्यास नकार दिला. Clinton had invited Vajpayee to Washington for a face-to-face meeting with Sharif but the Indian Prime Minister had declined to undertake the visit in view of the then security situation. Clinton had informed Vajpayee after intensive parleys with Sharif in Washington in early July 1999 that he was "holding firm on demanding the withdrawal of Pakistani troops to the Line of Control." Interestingly, according to Riedel''s account, Sharif briefed an angry Clinton on his frantic efforts during that period to engage Vajpayee and get a deal that would allow Pakistan to withdraw with some face saving. म्हणे वाजपेयी नेभळट होते. https://www.google.com/amp/s/www.oneindia.com/amphtml/india/kargil-when-vajpayee-stood-firm-and-got-nawaz-sharif-to-buckle-2757797.html

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन 10/08/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

In reply to by अर्जुन

मित्रहो 11/08/2022 - 10:37
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. सध्या Surprise to Victory वाचायला सुरवात केली आहे. बघू त्यात या अनुषंगाने काही येते का? धन्यवाद अर्जुन

In reply to by मित्रहो

सुबोध खरे 11/08/2022 - 12:03
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. नाही. असं झालं असतं तर सर्वंकष युद्ध झालं असतं. पण तेवढी पातळी वर न्यायची आहे कि नाही याची मानसिक तयारी सरकारची होती का ते माहिती नाही. अर्थात असे युद्ध झाले असते तर ते पाकिस्तानला दुप्पट महाग पडले असते हि वस्तुस्थिती आहे. माझ्या वाचनाप्रमाणे अमेरिकेने श्री वाजपेयी याना सांगितले होते कि तुम्ही वाद वाढवू नका. आम्ही पाकिस्तानला वेसण घालतो. पाकिस्तानने त्यांच्या एफ १६ साठी लांब पल्ल्याच्या ५०० क्षेपणास्त्रांची (AMRAAM) मागणी केली होती ती मागणी अमेरिकेने पूर्ण केली नाही. हि मागणी पुढे अमेरिकेने २००७ मध्ये पूर्ण केली. याच क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या एफ १६ विमानांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे मिग २१ पाडले होते. https://www.researchgate.net/publication/293743162_Pakistan_makes_biggest_ever_AMRAAM_buy यामुळे हे युद्ध कारगिल पुरते मर्यादित राहिले. भारताची जी काही हानी झाली ती सुरुवातीला ( या वेळेपर्यंत) झाली होती. एकदा भारताने वायुदल आणून बॉम्ब वर्षाव सुरु केला त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याला हवेतून आणि जमिनी वरून होणाऱ्या माऱ्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले आणि त्यांच्या सैन्याची बरीच हानी झाली.

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन 10/08/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

मित्रहो 03/08/2022 - 18:57
धन्यवाद श्रीगुरुजी, क्लिंटन @ कर्नलतपस्वी पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद उत्तम चर्चेबद्दल धन्यवाद मला वाटते कुठलीही मोठी घटना घडली की पहिला प्रश्न हाच उपस्थित होतो की गुप्तहेर खात्याला याची माहिती नव्हती का. त्यांनी माहिती पुरवली नाही का. माहिती दिली तर सरकारने काय केले, सैन्यापर्यंत ही माहीती पुरविली का वगैरे. जनरल मलिक नेहमीच त्याचा इन्कार करतात. त्यांच्या पुस्तकाचे नांव सुद्धा Surprise to Victory असे आहे. असे प्रश्न येतात त्याचा खूप ऊहापोह होतो. सरकार दरबारी त्याने काही फरक पडत असेलही तरीही या चर्चातून सामान्यांना फार काही हाती लागत नाही. सर्व एकमेकांना दोष देत असतात. पाकिसत्तानचा काश्मिर डोळा आहे हे कोणीही सांगू शकतो. पाकसैन्य, घुसखोर कारगिल भागातून येऊ शकतात याची कल्पना १९४७ पासून होती. तेंव्हाही त्याभागातून घुसखोरी झाली होती. मुळात काश्मिरच्या भागात घुसखोरी सतत होत असते. सतत घुसखोरांना हुसकावून लावण्यात येते. त्यामुळे घुसखोरी होणार आहे इतकेच इनपुट असेल तर त्यावर किती गांभीर्याने घेतले जाईल ही शंका आहे. एक योजनाबद्ध प्रकारे घुसखोरी होणार आहे. अगदी द्रासपासून टुरटुक पर्यंत एकाच वेळेस घुसखोरी होणार आहे. असे खातरीचे इनपुट होते अशी माहिती मिळत नाही. कदाचित तसे इनपुट असेल किंवा नसेलही. काहींच्या मते ऑक्टोबर १९९८ पासून घुसखोर येत होते. बेनझीर भुट्टो यांनी त्यांना मुशरफ यांनी अशा प्लॅनबद्दल सांगितले होेते आणि भुट्टो यांनी तो प्लॅन नाकारला हे कारगील झाल्यानंतर सांगितले. त्यावर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न आहे. जर खरच तसे झाले असेल तर मात्र भारत सरकारला याची कल्पना असायला हवी होती. तशी कल्पना नसने एक मोठे अपयश आहे. अलिखित करार वगैरे मला नंतर केलेला प्रपोगंडा वाटतो. लिखित कराराचे उल्लंघन झाले असते तर विषय वेगळा असता. आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.

In reply to by मित्रहो

क्लिंटन 03/08/2022 - 22:48
आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.
आणि त्यातही पाकिस्तानसारखा देश केलेले करार (समजा असा करार केला असलाच तर) प्रामाणिकपणे पाळेल ही अपेक्षा करणेच मुळात भाबडेपणाचे नाही का?

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 04/08/2022 - 00:02
हा तसा लिखित करार वगैरे नव्हता. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे युद्ध न करताही दोन्ही बाजूने जीवितहानी होत होती. जरी काही सैनिक जगले तरी ३-४ महिने -३० किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तेथे राहणे, वेगवान बर्फाळ वारा सहन करणे, अन्न किंवा इतर वस्तू केव्हा मिळतील याची कोणतीही शाश्वती नसणे यामुळे सैनिकांच्या मनोधैर्यावर वाईट परीणाम होत होता. हे टाळण्यासाठी दोन्ही देश आपापसात ठरवून आपले सैन्य कमी उंचीवर आणत असत. ही व्यवस्था १० वर्षांहून अधिक काळ विनाव्यत्यय सुरू होती. त्यामुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 04/08/2022 - 09:31
मुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.
असे निर्धास्त राहायलाच मी वाजपेयी झोपून राहिले असे म्हणतो. पाकिस्तानचा एकूण स्वभाव बघता एकीकडे मैत्रीच्या मोठ्या मोठ्या गप्पा करणार आणि दुसरीकडे विश्वासघात करणार हे वेगळे सांगायला हवे का? जनसंघ हिंदुत्वाचे राजकारण करत आला आहे. मग हिंदू समाजातला दोष - शत्रूच्या गोड बोलण्याला फसून गाफिल राहणे हा मुळच्या जनसंघाच्या नेत्यांना माहित नव्हता? या दोषाचा अभ्यास असल्याने ते त्याला बळी पडायला नको होते पण तरीही तेही त्याला बळी पडलेच. ३-४ महिने आधी लाहोर घोषणापत्रावर सही झाली आणि स्वतः वाजपेयी तिथे गेले होते असे वातावरण असेल तर त्यावेळेस अधिक सावध राहायला पाहिजे कारण नेमक्या अशाच वेळी पाकिस्तान विश्वासघात करायची शक्यता जास्त हे पृथ्वीराज चौहानपासून अनेकांचा इतिहास अभ्यासलेल्याला माहित नव्हते का? दक्षिण कोरियाच्या पंतप्रधान्/अध्यक्षांना १९९८ चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले तसे आपल्याला मिळावे असे वाजपेयींना वाटत होते की काय अशी त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द बघता मला तरी वाटते. २००३-०४ मध्ये तर त्यांना अगदी पीस प्रोसेसने झपाटून टाकले होते. पण हे सगळे करताना किती भारतीय नागरीकांचे बळी गेले आणि भारतीय हितसंबंधांना किती धक्का पोचला याचा कोणीतरी हिशेब मांडायलाच हवा.

सुबोध खरे 03/08/2022 - 19:51
माझे दोन शब्द- १) गुप्तहेर खात्याचे अपयश-- प्रत्येक गोष्ट गुप्तहेर खात्याला माहिती असलीच पाहिजे हा नियम १०० % मान्य केला तर हे वाक्य स्वीकृत करायला लागेल. परंतु भारताने दोन्ही अणुस्फोट केले तेंव्हा स्वतःला सर्वशक्तिमान समजणाऱ्या अमेरिकेच्या सी आय ए ला हि माहिती का समजू शकली नाही? याचा विचार केल्यास असे लक्षात येईल कि एखाद्या देशाने काळजीपूर्वक तयारी केल्यास दुसऱ्या देशाच्या गुप्तहेरखात्याला सर्वच माहिती असेल च असे नाही. तेंव्हा लष्करी किंवा नागरी गुप्तहेरखाते काय झोपले होते का असे नाक्यावर गप्पात विचारणारे अनेक असतात. २) जनरल मुशर्र्फ हे लष्करी कार्यवाही खात्याचे महानिदेशक( DGMO) असताना त्यांनी आपले डावपेच बेनझीर भुट्टो यांच्या गळ्यात उतरवायचा प्रयत्न केला परंतु तेंव्हा ते असफल झाले. परंतु आपला हा बेत जेंव्हा ते लष्करप्रमुख झाले तेंव्हा त्यांनी पंतप्रधान श्री नवाझ शरीफ याना न सांगता सिद्धीस नेला. यावर श्री नवाझ शरीफ यांचे उद्गार "मुहाजिर ने ( मुशर्रफ) फंसा दिया" असेच होते. अर्थात पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली आणि नंतर सरकारला सांगितले त्यावर नवाझ शरीफ काहीही करू शकले नसते हि वस्तुस्थिती आहे. ३) जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे. ४) वाजपेयी यांचे धोरण कचखाऊ होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांची भीती वाटत होती. यामुळे त्यांनी भारतीय लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा ओलांडण्यास मनाई केली होती. कदाचित १९९८ मध्ये अणुस्फोट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायांनी टाकलेल्या निर्बंधांनंतर परत असे करण्याची त्यांची तयारी नव्हती का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. यामुळे हे युद्ध लष्कर सुरुवातीला एक हात मागे बांधून लढल्यासारखे लढावे लागत होते. खरं तर वायुसेनेला प्रत्यक्ष पाकिस्तानी हद्दीत घुसण्याची परवानगी सुरुवातीलाच दिली गेली असती तर हे युद्ध नक्कीच निम्म्या वेळात संपले असते. त्या काळात पाकिस्तानकडे दृष्टीच्या टप्प्याबाहेर मारा करणारी क्षेपणास्त्रे (beyond-visual-range) नव्हतीच तर भारताच्या मिग २९ वर Vympel NPO R-77 missile (NATO reporting name: AA-12 Adder) हे ८० ते १०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र होते ज्याची पाकिस्तानी वायुदलाला भयंकर भीति वाटत होती त्यामुळे त्यांच्याकडे असलेली F १६ त्यांनी युद्धात उतरवलीच नव्हती. भारतीय लष्कर एक हात पाठीमागे बांधून लढत होते म्हणून एवढे सैनिक सुरुवातील हुतात्मा झाले. एकदा इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर सुरु झाला तेंव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी लष्कराला भाजून काढले आणि युद्ध संपले. याच इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर करून हवाईदलाच्या बालाकोट या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तेंव्हा नियंत्रणरेषेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची हिम्मत श्री मोदी यांनी दाखवली याबद्दल भारतीय लष्करी तज्ज्ञांना त्यांचे कौतुक वाटते. कारण पाकिस्तान आम्ही अणुबॉम्ब टाकू चा खुळखुळा वाजवत होते त्यांना सज्जड शब्दात तुम्ही अणुबॉम्ब टाकाच आम्ही पाकिस्तान बेचिराख करून टाकू हे ठणकाऊन सांगितले गेले. आणि त्याचे प्रत्यंतर चार दिवसातच दिसूनआले. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी पाकिस्तान वर हल्ला करतील हे संरक्षण मंत्रांना सांगताना पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ थरथर कापत होते असे खुद्द संरक्षण मंत्र्यांनीच संसदेत सांगितले. ५) भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे. कारण संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी हे संसदेत येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवू असतात आणि अक्षरशः हजारो लोक ज्यात पत्रकार, खासदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, संसदेचे कर्मचारी पासून असंख्य भेट देणारे सामान्य नागरिक हे असतात. या सर्वांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा, विशेष सुरक्षा कमांडो शिवाय इतर सशस्त्र केंद्रीय पोलिसांचे अनेक जवान तैनात असतात (SPG and NSG to the Central armed police forces like CRPF and ITBP). पाकिस्तान मध्ये प्रशिक्षित फ़िदायिन दहशतवाद्यांनी केवळ गोंधळ आणि दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हल्ला होता. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण असो

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन 03/08/2022 - 22:12
माझा लष्कराशी कसलाही कधीही संबंध नव्हता आणि मी एक सामान्य नागरीक आहे. इथे लिहित आहे ते त्याच दृष्टीकोनातून लिहित आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ते विधान प्रत्यक्ष युध्द सुरू व्हायच्या आधी केले होते. आणि ते सुध्दा मिडियाशी बोलताना. सैनिकांसमोर बोलताना नाही. अंतिम विजय आपलाच आहे अशाप्रकारची विधाने स्फुरण चढायला केली जातात हे समजू शकतो. पण ४८ तासात घुसखोरांना हाकलू इतकी स्पेसिफिक टाईमलाईन? २ दिवसांचे ८-१५ दिवस झाले तरी समजू शकतो पण त्याहूनही उशीर व्हायला लागला तर आधी वाटली होती त्यापेक्षा परिस्थिती खूप जास्त कठीण आहे असे चित्र उभे राहून त्याचा उलटा परिणाम होत नसेल?
भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे.
निदान त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये म्हटले होते की कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा आकडा त्यामानाने कमी होता तरीही मग अगदी अमेरिकेच्या अध्यक्षांपासून सगळ्यांची युध्द टाळण्यासाठी धावपळ का चालू होती?

In reply to by क्लिंटन

सुबोध खरे 04/08/2022 - 11:14
कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. कमलेश कुमारी यांचे काम स्पृहणीय आहे परंतु इतक्या सर्व राजकारण्यांना झेड वर्गाची सुरक्षा पुरवलेली असते तितके सशस्त्र सैनिक तिथे प्रत्यक्ष तैनात असतातच आणि हे सैनिक काही बुणगे नसतात तर कमांडो असतात त्यामुळे पाच दहशतवादी पूर्ण संसदेचा ताबा घेतील असे कोणी पत्रकार लिहीत असेल तर तो वातानुकूलित खोलीत रामखुर्चीत बसून ज्ञान पाजळणारा पत्रकार आहे एवढेच मी म्हणेन. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? हा मुळात भारताच्या अस्मितेचा प्रश्न होता. लोकशाहीच्या सर्वोच्च इमारतीवर हल्ला हे काही गल्लीतील गुंडगिरीची केस नव्हती किंवा सशस्त्र दरोडा नव्हता. मुळात दहशतवादी हे संसद लष्करी ठाणे अशा घातक लक्ष्यावर कशासाठी हल्ला करतात जेथे त्यांना जीव गमवावा लागेल याची खात्री असते? लष्करी ठाणे किंवा संसद सुरक्षित नाही तर आपली सुरक्षा कोण पाहणार हि भीती जनमानसात पसरवण्यासाठी. तसं पाहायला गेलात तर तिरंगा हा सुद्धा एक कापडच आहे पण त्यासाठी प्राणत्याग करण्यासाठी लोक का तयार होतात? त्यामुळे भारताने आपले लष्कर युदधासाठी तयार केले होते हे याच कारणासाठी.

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन 04/08/2022 - 14:03
१. अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात पुढील उल्लेख आहे- ... along with Mohd. Masood Azhar, Ghazi Baba @ Abu Jehadi @ Abu Saqlain and Tariq Ahmed - all Pak Nationals and proclaimed offenders (P.Os) and along with Mohammad, Haider, Hamja, Raja and Rana (all Pak nationals and deceased terrorists in attack on Parliament of India) and some other unknown persons, hatched up a conspiracy to procure arms and ammunitions and to attack Indian Parliament at New Delhi, when the Parliament was in session and in the process to make hostages or kill Prime Minister and other Central ministers and members of Parliament, Vice President and other VIPs., security personnels, in and around the Parliament House and thereby to wage a war against India and to kill the persons and to commit terrorist attack.... हे अफजलगुरूची केस अपीलात दिल्ली उच्च न्यायालयापुढे गेली त्याच्या निकालपत्रात बघायला मिळेल. https://indiankanoon.org/doc/1031426/ त्यावेळेस हे आरोपपत्र दाखल झाले होते त्यात महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायचा उल्लेख होता हे पक्के बातम्यांमध्ये बघितल्याचे आणि पेपरात वाचल्याचे आठवत होते म्हणून आंतरजालावर शोधाशोध केली तेव्हा हा उल्लेख सापडला. समजा महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायची शक्यताच नसती तर सरकारने अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख का होता हे समजत नाही. २. संसदेला सुरक्षा असते वगैरे सगळे मान्य. पण दहशतवाद्यांच्या पांढर्‍या अ‍ॅम्बॅसॅडरला गृहमंत्रालयाचा स्टीकर बघून आत सोडलेच ना? म्हणजे त्या सुरक्षायंत्रणेत काहीतरी गंभीर त्रुटी असली पाहिजे. त्या गाडीत ३० किलो आर.डी.एक्स होते. https://frontline.thehindu.com/cover-story/article30247100.ece . त्याचा स्फोट का झाला नाही याविषयी अफजलगुरूने आश्चर्य व्यक्त केले होते असे तिहार तुरूंगाचा अधिकारी मनोज द्विवेदी म्हणाला होता. https://www.financialexpress.com/archive/parliament-attack-why-didnt-the-bomb-explode-afzal-guru-wonders/848307/ आता ३० किलो आर.डी.एक्स ने किती मोठा स्फोट होऊ शकेल याची कल्पना नाही. ३. त्या दिवशी उपराष्ट्रपती कृष्णकांत थोडक्यात बचावले असेही न्यूज चॅनेलवर आले होते. तसेच त्या हल्ल्याविषयी बोलताना स्वतः पंतप्रधान वाजपेयींनी दहशतवादी संसदेत घुसण्यात यशस्वी झाले असते तर 'कत्लेआम झाला असता' असे म्हटल्याचेही आठवते. त्याचा व्हिडिओही कुठेतरी मिळेल/ मिळायला हवा. तेव्हा ५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 15/08/2022 - 09:38
५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते
. संसदभवनावरील हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ च्या टाईम्स ऑफ इंडियात आलेली बातमी---Vajpayee may have been the target या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे की दहशतवादी संसदेच्या इमारतीच्या १२ क्रमांकाच्या गेटमधून आत घुसायचा प्रयत्न करत होते. त्या गेटमधून फारच थोडे लोक आत जातात त्यामुळे तिथे तितक्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था नव्हती. तसेच १२ क्रमांकाच्या गेटमधून राज्यसभेत जाता येते. आणि कार्यक्रमाप्रमाणे १३ डिसेंबरला गुरूवार असल्याने पंतप्रधान त्या दिवशी राज्यसभेत असणार होते. या सगळ्या गोष्टींची माहिती दहशतवाद्यांना होती.

अमर विश्वास 03/08/2022 - 21:22
डोमेल ते कारगिल हे कर्नल शशिकांत पित्रे यांचे पुस्तक जरूर वाचा .. नुसते कारगिल युद्धच नाही तर भारत - पाक यांच्या सामरिक संबंधांचा पूर्ण लेखाजोखा मिळेल

अर्जुन 03/08/2022 - 22:42
गुप्तहेर खात्याने मिळवलेल्या माहीतीचा उपयोग करुन जर कोणतीही कारवाई होणार नसेल, तर अशी माहीती मिळवण्यास काय अर्थ राहील? आणि कोण अशी माहीती मिळवण्यासाठी जिवावर उदार होईल? http://www.indiandefencereview.com/news/raw-operations-in-pakistan/ चे अंशत भाषांतर... हा संदर्भ उघडपणे माजी पंतप्रधान इंदर गुजराल यांचा आहे. गुजराल यांनी पाकिस्तानातील संशोधन आणि एडब्ल्यू ऑपरेशन्स सोडून देण्याचे आदेश दिले असे म्हणणे बरोबर नाही. पाकिस्तानात R&AWची दोन कामे होते - गुप्त माहिती गोळा करणं आणि गुप्त कारवाई करणं. तथाकथित गुजराल सिद्धान्तानुसार पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना अशा प्रकारच्या कृतीमूळे मदत होऊ शकते, म्हणून त्यांनी केवळ गुप्त कारवाईसाठीच्या कारवाया बंद करण्याचे आदेश दिले. त्याने गुप्त माहिती गोळा करणं, या बाबत कोणताही आदेश दिला नाही. आपल्या आधी आणि नंतरच्या सर्व पंतप्रधानांप्रमाणे त्यांनाही पाकिस्तानमध्ये गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या चांगल्या क्षमतेचे महत्त्व समजले. त्याने जे बंद करण्याचे आदेश दिले ते पाकिस्तानमधील R&AW च्या केवळ 15 टक्के ऑपरेशन्ससाठी होते. उर्वरित 85 टक्क्यांना त्यांनी पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. गुप्त कारवाईच्या कारवाया बंद करण्याच्या त्याच्या आदेशाच्या विवेकबुद्धीबद्दल गुप्तचर समुदायात वादविवाद झाला. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटले आणि त्यांना समजावून सांगितले की गुप्त कृती क्षमता तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. जर एखाद्या दिवशी सरकारला गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्याची गरज भासली, तर जमिनीवर प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकारी नसतील,. त्यांना असेही सुचवण्यात आले की जर त्यांना या खरोखरच काही करावेसे वाटत असेल तर सध्या गुप्त कारवाई स्थगित करावी, परंतु बंद करू नयेत. पण गूजराल यांना ते मान्य झाले नाही. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले तेव्हा गुप्तचर समुदायाला आशा होती की ते गुजराल यांचा निर्णय रद्द करतील आणि पाकिस्तानमध्ये गुप्त कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश देतील.पण त्यांना आश्चर्य वाटले की, वाजपेयींनीही गुजराल यांच्याप्रमाणेच R&AW ने पाकिस्तानमधील गुप्तचर माहिती गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि गुप्त कारवाया टाळाव्यात अशीच इच्छा व्यक्त केली. गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्यास वाजपेयींच्या अनिच्छेने निराश झालेल्या काही सेवा अधिकाऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्याशी माझी[[ बी. रमण, कॅबिनेट सचिव] भेट घडवून आणली. मी त्यांची नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना पाकिस्तानमध्ये आमच्या गुप्त कारवाईचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी माझे [ बी. रमण, कॅबिनेट सचिव] म्हणणे ऐकले आणि ते म्हणाले: “मला आधीच खात्री पटली आहे. तुम्ही मला पटवून देण्याची गरज नाही. पण पंतप्रधान (वाजपेयी) वेगळा विचार करतात. त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे". आणि तो विषय संपला.

In reply to by अर्जुन

शाम भागवत 05/08/2022 - 12:45
मला वाटते भारतीय गुप्तहेरांची खूप मोठी हानी मोरारजी देसाई यांनी केली. त्यावेळेस आपले खूप चांगले डीप अ‍ॅसेटस नष्ट झाले. ते खूप मोठे खच्चीकरण होते. त्यानंतर गुजराल यांनी त्यावर आणखी एक मुलामा चढवला. असो.

Bhakti 03/08/2022 - 23:05
असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते
. होय युद्ध म्हणजे काय हे कारगिल पासूनच समजले. खुपचं चांगले मुद्दे मांडले आहेत.

Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik. It covers failures,neglect,wrong policies and bad decisions ect. हे पुस्तक गुगल पिडीएफ ड्राइव्ह वर उपलब्ध आहे. लेखकाने खुप अभ्यास करून आपली मते मांडली आहेत. माझे मत.इतरांचे वेगळे असु शकते. हे पुस्तक तत्कालीन नेतृत्व आणी परीस्थीती बदूदलची कल्पना देते. वाचल्यास सर्व परीस्थीती समजुन घेण्यासाठी मदत होईल. कॉपीराईट निर्बंधामुळे जास्त उहापोह करत नाही. इच्छुकांनी वाचावे व आपले मत बनवावे. १९४७,१९६२ या पाठीमागची कारणे लक्षात येतील. कारगिल हे भारत पाकिस्तान मधील अनेक युद्धा मधील एक आहे. त्याचे मुळ कारण सुद्धा समजुन येईल. मी एवढेच म्हणेन, सेना,गुप्तचर व अन्य सरकारी यंत्रणा आपले कार्य पुर्ण क्षमतेनुसार करतच आसतात,परंतू नेतृत्व त्याचा कसा उपयोग करते यावर खुप काही निर्भर असते. तत्त्कालीन नेतृत्व व त्याची विचारधारा याचा पगडा, पकड या यंत्रणावर असते व त्यानुसार देशाचा कारभार चालतो. यात दुमत नसावे. इथे नेहरूंसारख्या सक्षम नेतृत्वाबद्दल न बोलता जर इतिहासाचा आढावा घेतला तर वादविवाद टाळता येईल. The Himalyan Blunder ,हे पुस्तक सुद्धा गुगल वर उपलब्ध आहे. @भक्ती बरोबर मी सहमत आहे. पण हा वादाचा मुद्दा आहे कारण राजकीय हितसंबंध,अहित यात दडलेले आहे. काही इतिहासकारांनी,अभ्यासकांनी परखड मते मांडली आहेत ती शोधून काढून वाचावी लागतात हा दैवदुर्विलास मला तरी वाटतो. शेवटी इतीहास जेते लिहीतात. इतिहासातील चुका मान्य कराव्यात पण कुणा व्यक्ती विषेशला दोष देण्यात अर्थ नाही कारण तत्कालीन परीस्थीतीत घेतलेले निर्णय चुक की बरोबर हे इतीहासच ठरवतो.

जेम्स वांड 04/08/2022 - 09:34
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
इथं मित्रदेश एकमेकांची गुप्तहेर संस्था एक्सपोज करायला अन् मित्रदेशाच्या अंतर्गत रहस्यांचा गौफ्यस्फोट करायला वापरतात हे जगजाहीर असताना संशयाचे कारण नव्हते, ते पण पाकिस्तान बाबतीत म्हणणे म्हणजे धैर्याची कमालच झाली

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 04/08/2022 - 09:52
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे कारण भावनेच्या भरात येऊन निष्कारण प्राणहानी टाळता यावी असा हेतू आहे. हा करार किंवा समझौता आजतागायत पाळला गेला आहे यामुळेच गाल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकी या हातघाईच्या आणि समोरासमोर होत्या. युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात मग जो करार पाकिस्तान आणि भारतात १० वर्षापेक्षा जास्त पाळला गेला त्याबद्दल संशय घेण्याचे सकृतदर्शनी तरी कारण नव्हते. जनरल मुशर्रफ यांनी सरळ सरळ विश्वासघात केला आणि हे संकेत पाळले नाहीत हि गोष्ट वेगळी आहे.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 04/08/2022 - 10:13
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे
xxxxx
युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते. इतकेच काय युद्ध काळात जरी एखाद वकीलातीचा कर्मचारी हेरगिरी करताना पकडला गेला तरी त्याला युद्धबंदी म्हणून वागवले जाऊ शकत नाही, तर त्याला पर्सना नॉन ग्राटा म्हणून २४ ते ४८ तासात देश सोडून जायला सांगतात थंडीच्या मोसमात वर बसायचे नाही हा अलिखित करार होता त्यामुळे मुहाजिर ने फांसा दिया, नवाज मुशर्रफ बेनझीर वगैरे त्यांचे अंतर्गत काहीही असो अन् असेल तरीही भारतीय गुप्तचर संस्थांनी किंवा लष्कराने त्या अलिखित नियमामुळे पाकिस्तानवर संशय घेण्याचे कारण नाही हे विधान मुळातच हास्यास्पद आहे माझ्यासाठी.

In reply to by जेम्स वांड

क्लिंटन 04/08/2022 - 10:57
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते.
तरीही मे १९९२ मध्ये राजेश मित्तल म्हणून कराचीतील भारतीय दुतावासातील अधिकार्‍याला मारहाण झाली होती. या राजेश मित्तलना पाकिस्तानने हेरगिरीत सामील असल्याच्या आरोपावरून देश सोडायला सांगितले होते पण त्यापूर्वी त्यांना मारहाण केली होती आणि इलेक्ट्रीक शॉक वगैरे दिले होते. तेव्हाही नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हात वर केले होते आणि आमच्या कोणत्याही सरकारी यंत्रणेने ते केले नाही (म्हणजेच ते 'नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स' नी केले) असे म्हटले होते. हे नॉन स्टेट अ‍ॅक्टर्सचं खटलं अगदी १९४७ मधील काश्मीरवरच्या पहिल्या हल्ल्यापासून कसाबपर्यंत अव्याहत चालू आहे. राजेश मित्तल दिल्लीत आल्यानंतर थेट एम्समध्ये दाखल झाले होते. त्यावेळी पेपरात आलेला एक फोटो होता तो मला अजूनही आठवतो. राजेश मित्तल या नावाचा गुगल सर्च केल्यावर त्यावेळी पेपरात बघितलेला तो फोटो मिळालाही. * https://www.timescontent.com/syndication-photos/reprint/news/489483/rajesh-mittal-diplomat-indian-hospi.html बाकी जिनीव्हा की अन्य कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे युध्दबंद्यांनाही कशी वर्तणुक द्यावी याचे नियम ठरवलेले आहेत. आपल्या सौरभ कालिया आणि त्याच्याबरोबरच्या इतर ५ सैनिकांना पाकिस्तानने त्या कायद्याप्रमाणे वागवले होते का? असे कोणतेही कायदे आणि करार पाकिस्तान मानेल आणि त्यांचे प्रामाणिकपणे पालन करेल ही अपेक्षा ठेवणेच भाबडेपणाचे आणि चुकीचे आहे. * : राजेश मित्तलचा हा फोटो मिळाला त्याप्रमाणे कधीतरी १९९१ मध्ये शंकरराव चव्हाणांनी केलेले स्टेटमेंटही आंतरजालावर मिळावे म्हणून मी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. ते स्टेटमेंट मला का हवे आहे? कारण जर १९९१ मध्ये कारगीलमध्ये काही गडबड व्हायची शक्यता आहे असे इनपुट्स सरकारकडे असतील तर त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी कारगीलचे स्थान लक्षात घेता त्या ठिकाणच्या संरक्षणासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. कारगील गेले तर श्रीनगर-लेह महामार्ग गेला. म्हणजे लडाख आणि सियाचीनची सुरक्षा धोक्यात येईल त्यामुळे कारगील हे खूप महत्वाचे ठिकाण आहे.जशी अणुभट्टीची सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे आणि तो कॉमन सेन्स आहे तसेच कारगील या ठिकाणाविषयीही म्हणता येईल- जर सरकारला ते १९९१ मध्येच माहित असेल तर. अणुभट्टीवर हल्ला करणार असे स्पेसिफिक गुप्तचर इनपुट आले तरच तिथे सुरक्षा ठेऊ हे म्हणणे जसे चुकीचे ठरेल तसेच कारगील प्रकरणी 'आम्हाला माहितच नव्हते' हा बचावही त्या केसमध्ये कुचकामी ठरेल.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 04/08/2022 - 10:19
१९७१ नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सैनिकी चकमक झाली नव्हती. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामान असल्याने दोन्ही देशांनी ठरवून हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्याचे ठरविले होते व दोन्ही देश १३-१४ वर्षे त्याचे पालन करीत होते. अश्या परिस्थितीत सावध राहणे म्हणजे हिवाळ्यात सुद्धा शिखरांवर सैन्य ठेवणे किंवा सातत्याने शिखरांवर लक्ष ठेवणे (हे अर्थातच सैनिक शिखरांवर पाठवून). जर वाजपेयी झोपले असतील तर लष्कर सुद्धा झोपेत होते असे म्हणता येईल का? पाकिस्तान विश्वासघात करून गुपचूप शिखरे काबीज करू शकतो व त्यामुळे हिवाळ्यात सैन्य मागे आणू नये असे लष्कराने वाजपेयी किंवा आधीच्या पंतप्रधानांना सांगितल्याचे वाचनात नाही. हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्यास लष्कराचा विरोध असल्याचेही वाचनात नाही. हिवाळ्यात सैन्य मागे घेणे हा पंतप्रधान पातळीचा निर्णय असू शकतो, परंतु सीमेवर कशी गस्त घालायची हा निर्णय लष्कराचाच असतो. त्यात पंतप्रधानांचा हस्तक्षेप नसतो. जर शिखरांवर अधूनमधून लक्ष ठेवणे आवश्यक आहे असे लष्कराला वाटले असेल, तर लष्कर पंतप्रधानांच्या परवानगीविना काही सैनिक अधूनमधून शिखरांवर पाठवून लक्ष ठेवू शकत होते. परंतु लष्कराला सुद्धा ते करण्याची गरज वाटली नसावी. निदान मी तरी वाजपेयी झोपले होते असा ठाम निष्कर्ष न काढता संशयाचा फायदा वाजपेयींना देईन.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड 04/08/2022 - 10:30
माझ्या वाचनात नाही ! अहो गुप्तचर खात्याच्या reports बद्दल बोलतोय न आपण ? ते कसे कोणाच्या वाचनात येणार ? अन् आले नाहीत म्हणून आगाऊ चेतावणी नव्हती म्हणायला स्कोप आहे असे म्हणत असाल तर कायच बोला, पंतप्रधानाला रोज कित्येक confidential reporting होतं त्यामुळे ते तुमच्या वाचनात नाही म्हणून तुम्ही पंतप्रधानाला संशयाचा फायदा द्या म्हणलं तर अजबच म्हणावं लागेल ते !

In reply to by जेम्स वांड

श्रीगुरुजी 04/08/2022 - 13:29
तेच म्हणतोय. गुप्तचर खात्याने असा अहवाल दिला होता की नाही, हेच सर्वसामान्यांना माहिती नाही. अश्या परिस्थितीत, गुप्तचर खात्याने अहवाल देऊनही वाजपेयी झोपले होते या ठाम निष्कर्षाला आधार काय? त्यामुळे जोपर्यंत काहीतरी ठाम माहिती बाहेर येत नाही, तोपर्यंत, निदान मी तरी, वाजपेयी झोपले होत असा अंतिम निष्कर्ष काढणार नाही. ज्यांना असा निष्कर्ष काढायचा आहे त्यांनी तसा तो काढावा.

जेम्स वांड 04/08/2022 - 10:03
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, जनरल मलिक, लेफ्टनंट जनरल पित्रे वगैरे अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्यावर पुस्तके लिहायला मनाई नसते अगदी सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, त्यांच्यावर परिसंवाद होतात, रायसीना डायलॉग सारखे posh सोहळे सुद्धा होतात, पॅनल डिस्कस होतात टीव्ही वर, इंटेलचे काय आहे तसे ?? ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 04/08/2022 - 12:18
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, लष्करी गुप्तहेर खात्याच्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांना मी भेटलेलो आहे किंवा ते माझे रुग्ण होते. त्यामुळे अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा मी त्यांच्या कडून ऐकलेल्या आहेत त्यामुळे कदाचित या लोकांच्या कार्यपद्धतीची थोडीशी तोंडओळख मला झालेली आहे असे मला वाटते. विक्रांतवर मी वैद्यकीय विभागाचा प्रमुख अधिकारी होतो त्यामुळे रोज येणारे बिनतारी संदेशांची फाईल (अत्यंत गुप्त सोडले तर) माझ्या माहिती साठी माझ्याकडे येत असे. विक्रांत वरील एक नौदल अधिकारी काश्मिरी होता तेंव्हा तो सुटीवर गेला कि त्याच्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली असे काही विचित्र संदेश पाहून माझ्या लक्षात आले हते पण त्याचा अर्थ मला समजला नव्हता. शीख सैनिक सुटीवर गेल्यावर ते दहशतवादी संघटनेशी संलग्न आहेत का याचाही तपास लष्करी गुप्तहेर संघटने कडून तेंव्हा होत असे. अनेक रुग्ण या खात्यात काम करणारे माझ्या संपर्कात आलेले होते उदा. एकाला मूल होत नसल्यामुळे तो आपल्या पत्नीसह माझ्याकडे दर महिना follicular monitoring साठी येत असे. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना दारूचे व्यसन लागलेला नौसैनिक माझा रुग्ण होता. याचे काम सध्या कपड्यात राहून चेम्बूर, देवनार, गोवंडीच्या जवळ असणाऱ्या टिनपाट बार मध्ये बसून खबरी काढणे अशी होती. तेथे त्यांना हिशेबाच्या बाहेर( unaccounted) पैसे दिले जात असत. ज्यात आपण वडिलोपार्जित श्रीमंत असून दिलदार आहोत असा बनाव करून संशयास्पद लोकांना फुकट दारू पाजून त्यांच्याशी मैत्री करणे आणि माहिती काढणे हे त्याचे काम होते. दुर्दैवाने हे काम करत असताना त्यालाच दारूचे व्यसन लागले आणि मग नौदलाने त्याला व्यसनमुक्तीसाठी आमच्या केंद्राकडे पाठवले होते. मुंबई पोलिसांबद्दल त्याने अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या मला सांगितल्या होत्या. त्यात एक गमतीची गोष्ट म्हणजे तेथे त्याला त्याच्यासारखाच एक दिलदार दारुड्या भेटला आणि एक आठवड्याने दोघांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते तेंव्हा याला लक्षात आले कि हा माणूस मुंबई सी आय डी मधील एक कॉन्स्टेबल होता आणि त्याचे काम असेच खबरी काढणे होते. अर्थात यानंतर त्यांनी "एकमेकांना" दारू पाजणे बंद केले मी लष्कराविरुद्ध न्यायालयात खटला केला तेंव्हा माझ्याविरुद्ध पण एक गोपनीय फाईल गुप्तहेर खात्यात उघडलेली होती आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मी कुठे जातो मेस मध्ये किती दारू पितो माझी बायको मला केंव्हा भेटायला येते इ सर्व गोष्टीची नोंद त्यात केली जात असे. हे लष्करी गुप्तहेर खात्यात अधिकारी असलेल्या माझ्या मित्रानेच माझ्याकडे कबुल केले होते. त्यांच्या पत्नीचा गंभीर आजाराचे मी पूर्वी निदान करून उपचाराला बहुमूल्य मदत केली होती. रक्षा लेख नियंत्रक (CDA) मध्ये मी टाकलेले क्लेम सुद्धा परत तपासले गेले होते हे तेथील एका रुग्णाने मला सांगितले होते. तेंव्हा गुप्तहेर खाते कसे काम करते याची निदान त्रोटक माहिती/ तोंडओळख तरी मला झाली होती.

In reply to by जेम्स वांड

@जेम्सभाऊ गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, सहमत आहे. असले रिपोर्ट फक्त काहीच मुख्य व्यक्तींना माहीती असल्यामुळे बाकीच्यांच्या मनात शंका निर्माण होते. अगदी त्या व्यक्तीच्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्या मधे सुद्धा. भारतीय कार्यालयीन गोपनीय कायदा हा सर्वांना लागू असतो व याचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, अशा विषयावर पुस्तक, लेख,भाष्य करताना संबंधित विभागाकडून परवानगी अनिवार्य असते. ते बरोबरच आहे. गुप्तचर इतके हुषार असतात की ते "त वरून ताकभात सहज ओळखतात". ऐंशीच्या दशकात किवा त्या आगोदर सिमारेषे लगत कार्यरत सैनीकांची खाजगी पत्रे randomly scrutinize व्हायची. एक छोटी पण खरी गोष्ट, तरूण धर्मशिक्षक, नवीनच लग्न झालेले व उच्चतुगंता सीमेलगत कार्यरत होते. विरहअग्नी मधे जळणाऱ्या त्याने प्रेमाने आपल्या नवविवाहित पत्नीला रोमॅन्टिक पत्र लिहीले,शब्द काही असे होते, "आकाशातून शुभ्र धवल फुले धरणीवर पडत आहेत.तुझ्या उबदार आठवणी हृदयांजवळ असतांना या शिशीराची काय हिम्मत ", and words to that effect. मुख्यालयातून सुचनावजा ताकीदपत्र आले. जे सर्वानी कळाले व बिच्चारे "धर्मशिक्षक". ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत. पार्लमेंटवर हल्ला करत असताना लाईट गेली व अतिरेक्यांना मिळणार्‍या सुचना बंद झाल्या त्यामुळे हडबडी मधे काही चुकीची पाऊले उचलली गेली. तेच मुबंई हल्लयामधे होटल ताज बद्दल त्यांना सर्व माहीती होती असे दूरदर्शनवर ऐकल्याचे आठवते.

In reply to by कर्नलतपस्वी

जेम्स वांड 05/08/2022 - 10:10
हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत.
ते अंधारात असतात ह्याचा अर्थ गुप्तचर हे कायम गुप्ततेच्या वेष्टनात काम करत असतात, न त्यांचे काम एखाद ॲक्टअन्वये गवर्न होते न त्यांचे स्पेशल चार्टर असते, त्यांचं नेमकं काम मला नाही वाटत त्यांच्या कुटुंबियांना पण ठाऊक असते, अश्या प्रकारे अंधारात म्हणत होतो मी सर.

In reply to by जेम्स वांड

मित्रहो 05/08/2022 - 11:56
ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी
अति गोपनीयता कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच. त्यामुळे खूप गैरसमज पसरलेले असतात. काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते.

In reply to by मित्रहो

जेम्स वांड 05/08/2022 - 13:37
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल, त्यांची बजेट्स, खर्च, जमा, काम, मिळालेले रीजल्ट इत्यादींची सदनात चर्चा व्हावी लागेल मुख्य म्हणजे जसे आयटीबीपी , बीएसएफ इत्यादींना त्यांच्या ॲक्ट आहेत तश्या आणाव्या लागतील आयबी अन् रॉ साठी. हे कुठल्याच सत्ताधारी पक्षाला नकोय.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/08/2022 - 19:45
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल. लोकसभा किंवा राज्यसभेचे सगळेच खासदार खरोखरच या लायकीचे आहेत का असा एक फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. रॉ संघटनेने काहूताच्या अणुकेंद्रात भगीरथ प्रयत्नाने उभी केलेली हेरांची साखळी श्री मोरारजी देसाई यांच्या आगाऊ वाचाळतेने नष्ट झाली. यात भारताचे ८-१० हेर नाही चिरा नाही पणती स्थितीत धारातीर्थी पडले आणि त्यांचा कोणताही मागमूस कुणाला लागला नाही. ( कारण असे आमचे हेर आहेत/होते हे भारत सरकार किंवा रॉ मान्य करु शकत नाही आणि मान्य केले तरी पाकिस्तानात त्यांना देहदंडच मिळाला असता ) आणि श्री मोरारजी देसाई यांच्या केसालाही धक्का लागला नाही. श्री गुजराल यांच्या नीतीमुळे काय झाले तेही आपण वाचले आहे. MAN POWER IS EXPENDABLE हे वाक्य मी संरक्षण खात्याच्या उपसचिवाकडून चक्षुर्वैसत्यं ऐकलेले आहे. तेंव्हा दिल्लीत बसून फाईली फिरवणाऱ्या माणसांची अशा जीवावर उदार होणाऱ्या माणसांबद्दल काय विचारसरणी आहे ते आपण समजून घ्या. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षण मंत्रालयातील दोन वरिष्ठ बाबूंना सियाचेन येथे प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती बघून या असा हुकूम काढला होता हे आपल्याला आठवत असेल. https://www.dnaindia.com/india/report-livid-over-procurement-delay-fernandes-once-sent-two-def-ministry-babus-to-siachen-2713482 तेंव्हा काही गोष्टी या गुलदस्त्यात असलेल्याच उत्तम. माओइस्ट चळवळींना आपल्याकडचे वाममार्गी उघडपणे किंवा छुप्या रीतीने पाठिंबा देतात त्यासाठी त्यांना चीनकडून मदत मिळते हे उघड असूनही आपण काही करू शकत नाही. चीनने डोकलाम किंवा गाल्वान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला त्या बद्दल साधे निषेधाचे उद्गार या लोकांनी काढले नाहीत. https://thewire.in/diplomacy/india-china-doklam-cpim https://www.freepressjournal.in/india/chinas-chairman-is-our-chairman-why-china-will-forever-hau तर असे लोक या संघटनांचे काम शत्रूला पुरवणार नाहीत याची कोणती खात्री देता येईल. (किंबहुना हे लोक हि माहिती १०० % शत्रूला पुरवतात हे सरकारला आणि लष्कराला माहिती आहे). साधी गोष्ट लक्षात घ्या एखादा हेर ( पोलीस किंवा लष्करी) दाऊदच्या माणसाबरोबर संपर्क किंवा मैत्री ठेवून आहे हि माहिती आपण कायद्याच्या कक्षेत कशी बसवणार? उलट ते उघड झाले तर प्रचलित कायद्यानुसार त्याच्या वर टाडा/ यु ए पी ए कायद्यानुसार खटला भरावा लागेल. तेंव्हा अशा असमतोल युद्धाचे नियम सामान्य कायदे/ नियमात बसवता येत नाहीत आणि तसे न बसावे हेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शहाणपणाचे ठरेल.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी 05/08/2022 - 20:07
काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते. ३० वर्षांनतर सीआयए किंवा इतर गोपनीय अहवाल सार्वजनिक करण्याचा अमेरिकेत कायदा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड 06/08/2022 - 02:06
तसा कायदा आहे पण त्यातही बहुतेक रिपोर्ट हे फुल्या फुल्यांच्या नक्षिने सजलेले किंवा मध्ये मध्ये परिच्छेदचे परिच्छेद काळे करूनच प्रकाशित होतात.

मित्रहो 04/08/2022 - 14:58
वाह खूप सुंदर चर्चा सुरु आहे. बरीच नवीन माहिती येत आहे. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद डॉ. सुबोध खरे, जेम्स वांड भाऊ, Bhakti, अर्जुन, अमर विश्वास, मुवि लेख वाचण्यापेक्षा सरळ प्रतिसाद वाचावे इतकी छान चर्चा सुरु आहे. खूप माहितीपूर्ण, अभ्यासक प्रतिसाद आहे. या उत्तम चर्चेसाठी श्रीगुरुजी, डॉ. सुबोध खरे, कर्नल तपस्वी आणि क्लिंटन यांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांमुळे ज्ञानात भर पडत आहे. नवीन पुस्तकाची नावे डोमेल ते कारगील - शशीकांत पित्रे (धन्यवाद अमर विश्वास) Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik (धन्यवाद कर्नल तपस्वी) @अर्जुन - इंद्रकुमार गुजराल यांनी गुप्तहेर संस्थेच्या बाबतीत केलेला बदल माहित नव्हता. आज तुमच्या प्रतिसादामुळे त्याची माहीती मिळाली. खूप धन्यवाद @सुबोध खरे - लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा पार करण्याची मनाई केली होती. त्याला आतंरराष्ट्रीय दबाव हे कारण असू शकते. ९/११ नंतर बदलले जग, सुधारलेली भारताची आर्थिक स्थिती यामुळे परिस्थिती बदलली. पूर्वी भारतात होणाऱ्या अतिरेकी कारवायांचा निषेध सुद्धा पश्चिमी देश करत नव्हते. विरोधात बोलायला नेहमी तयार होते. MIG29 आणि F16 मधला हा फरक माहित नव्हता. मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते म्हणून त्यांनी वायुदल वापरुन मदत केली नाही. गुप्तहेर संस्थेनी काय माहिती दिली आणि काय नाही याविषयी कधीच ठोस काही हाती लागणार नाही. मुळात लेख लिहण्यामागे तसा उद्देषही नव्हता. लेख लिहिण्यामागे दोन ट्रिगर होते. मे महिन्यात घरचे सिक्किमला गेले होते. नथूला पास जवळील बाबा मंदिरात जाऊन आल्यावर माझ्या मुलाने मला फोन करुन विचारले बाबा तुला माहिती आहे १९६७ मधे भारत चीन वॉर झाले होते. मला खरच माहिती नव्हते. त्यानंतर मी नथूला आणि चोला मधे झालेल्या लढाई विषयी वाचले. गेल्या काही वर्षात युट्युब वगैरे मुळे सियाचीनविषयी माहिती मिळायला लागली आधी कल्पना नव्हती. सैन्याचा हा पराक्रम शिकवला जावा असे मला वाटते. दुसरा ट्रिगर म्हणजे विदेश मंत्री जयशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. We have large force standing at LAC. To make it happen was huge logistical challenge but even our MLAs don't appreciate it. असे काहीतरी होते. काही शब्द इकडे तिकडे असेल. मुळात याची कल्पनाच नसल्याने हे काम इतके सोपे नाही हे समजत नाही. लोकांसमोर सिनेमामधून उभ्या झालेल्या प्रतिमा राहते.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी 04/08/2022 - 15:44
काही वर्षांपूर्वी ६ दिवस सिक्कीमला सहलीसाठी गेलो होतो. गाडीचा चालक स्थानिक सिक्कीमी होता. त्याचा भाऊ भारतीय सैन्यात होता. त्याने सांगितले की मागील काही वर्षांत भारताने सिक्कीममध्ये हजारो बंकर्स बांधले आहेत. ते पर्वतात आहेत. स्थानिक मःडळी त्यांना अन्नपाणी पुरवितात. काही वेळा कडाक्याची थंडी, बर्फ, पाऊस वगैरेमुळे स्थानिकांना बंकरपर्यंत जाता येत नाही. अशावेळी सैनिक बुटात पाणी जमवून ते पितात. चीनचा भविष्यातील हल्ला सिक्कीममधून होणार असल्याचा लष्कराचा अंदाज असल्याने लष्कराने पूर्वतयारी केली आहे. डोकलाममध्ये २०१७ मध्ये अनेक महिने भारत व चीनचे सैन्य कैवळ २०० मीटर अंतरावर एकमेकांसमोर ४-५ महिने उभे होते. डोकलाम हा भूतानचा भाग आहे. येथे कोंबडीच्या डोक्यासारख्या अरूंद भागात ३ देशांच्या सीमा मिळतात. या भागाला चिकन्स नेक असे म्हणतात. भारतात सहज घुसण्यासाठी चीनला डोकलाम हवे आहे. त्यासाठी चीनने डोकलामच्या बदल्यात वेगळा प्रदेश भूतानला देऊ केला होता. परंतु भारताच्या सल्ल्याने हा प्रस्ताव भूतानने मान्य केला नाही. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. भूतानने डोकलाम देण्यास नकार दिल्याने चीनने तातडीने सैन्य पाठवून डोकलाम बळकावण्याची योजना आखली. परंतु भारताने तातडीने डोकलाममध्ये आपले सैन्य पाठवून चीनचे डावपेच उधळून लावले. त्यामुळे चीन संतप्त झाला व युद्धसमान स्थिती निर्माण झाली. भूतान व चीनमधील वादात भारताने पडू नये अशी चीनने धमकी दिली. परंतु भूतानचे संरक्षण भारत करतो व एकदा डोकलाम आणि चिकन्स नेक हे भाग चीनच्या ताब्यात गेले की चीन सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या भागात अगदी सज घुसू शकेल हे ओळखून भारताने डोकलाममध्ये युद्धाची तयारी केली. चीनच्या धमक्या सुरूच होत्या. चीनने भूतानबरोबर साम, दाम, दंड, भेद हे सर्व प्रकार वापरले. परंतु भारत बधला नाही. चीनचा ताठरपणा कमी होत नाही हे पाहून भारताने आपले प्रशिक्षित कमांडो पाठवून गलवानप्रमाणे चिनी सैन्यावर बंदुका न वापरता हल्ला करून १५० चिनी सैनिक मारले. भारताचा एकही सैनिक गेला नाही. त्यामुळे ही बातमी बाहेर आली नाही. ही माहिती अर्थातच त्या चालकाने दिली. यातील सत्यता माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मित्रहो 05/08/2022 - 13:17
धन्यवाद श्रीगुरुजी ही वेगळी माहीती आहे आजपर्यंत तरी डोकलाममधे जिवित हानी झाल्याचे वाचले/ऐकले नव्हते. चीनच्या रस्ता बांधण्यावरुन वाद होता हेच वाचले होते. चुंबी (चंबी) व्हॅली ही भौगोलिक दृष्ट्या डोकेदुखी आहे. येथील शिखरावर भारतीय सैन्य आहे. ट्रायजंक्शनच्या खाली सिलगुडी कॉरीडॉर हा फक्त शंभर किमी आहे. काही ठिकाणी अधिक अरुंद होतो. त्यामुळेच उत्तरपूर्व राज्ये भारताला जोडले गेलेले आहेत. बांगलादेश, भूतान देश भारतासाठी त्याचकारणाने महत्वाचे आहेत.

In reply to by मित्रहो

सुबोध खरे 04/08/2022 - 20:08
मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते पाकिस्तानला सुरुवातीला असे दाखवायचे होते कि हे आमचे सैनिक नसून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिदीन आहेत. आमचा त्यांना फक्त पाठिंबा आहे. परंतु जसे जसे भारतीय हुतात्म्यांना मिळणार मानसन्मान भारताच्या टीव्ही वर दिसू लागला तसा सन्मान त्यांच्या हुतात्मा होणाऱ्या सैनिकांना मिळत नव्हता एवढेच नव्हे तर हे आमचे सैनिक नव्हेतच असा पवित्रा सैन्याने घेतल्याने त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार आणि हुतात्म्यांना मिळणारे मानधनाचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंट मध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. या युद्धाचे वेळेस आंतरराष्ट्रीय समुदायापैकी युरोप आणि अमेरिकेने आपली कोणतीही मदत केलेली नव्हती. अमेरिकेने तर आपले जी पी एस देण्यास नकार दिला होता त्यामुळे आपल्याला क्षेपणास्त्रे डागण्यास फार त्रास झाला होता शेवटी रशियाने आपले ग्लोनास हे तंत्रज्ञान दिले होते. यावेळेस जवळ जवळ निवृत्त होत आलेल्या मिग २५ या विमानांनी परत एकदा ताबारेषेवर उड्डाणे करून पाकिस्तानच्या बंकर्स आणि ठाण्यांची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणी मग त्याचा वापर करून फ्रेंच मिराज विमाने आणि इस्त्रायली स्मार्ट बॉम्ब यांनी पाकिस्तानच्या तोफा आणि बंकर्स ला भाजून काढले आणि युद्ध लवकर समाप्त झाले. https://www.rediff.com/news/special/kargil-how-mig-25-played-a-special-role/20220606.htm#:~:text=While%20researching%20features%20on%20the,strategic%20icy%20heights%20of%20Kargil. आज २० -२२ वर्षांनी भारत आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे त्यामुळे बालाकोट किंवा उडी येथे भारताने नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले केले त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणताही गडबड केली नाही. किंवा रशियाने केलेली मदत लक्षात ठेवून युक्रेनच्या युद्धाबद्दल रशियाविरुद्ध भारताने पवित्र घ्यावा अम्हणून प्रचंड दबाव आणला गेला तरी भारत झुकला नाही याबद्दल ते काहीही करू शकत नाहीत. वनानी दहते वन्हे, सखा भवती मारूत: स एवं दीप नाशाय कृशे कस्यास्ती सौहृदं अर्थात वनाला आग लागली असता ती पसरवण्यासाठी वायू सहाय्य्यभुत होतो परंतु हीच आग दिव्यात छोटी असते तेंव्हा हाच दीप विझवण्याचे काम वायू करतो. जगात अशक्त माणसाचा कोणीही मित्र नसतो

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 05/08/2022 - 13:08
तरी भारत झुकला नाही
यामधे मला वाटते आणखी दोन महत्वाची कारणे असावीत. १. आघाडी सरकारे जाऊन भारतात स्थिर सरकार आले. त्यामुळे आतल्या गोटातल्या बातम्या मिळवणे पूर्वीपेक्षा आता सोपे झालेले नाही. २. चीनला आटोक्यात ठेवायचे असेल तर ते भारताच्या सहभागाशिवाय शक्यच नाही याची खात्रीच युरोप व अमेरिकेला झालेली आहे. त्यामुळे भारत पूर्वीपेक्षा खूपच कणखर भूमिका घेऊ शकत आहे. मुख्य म्हणजे ह्याचे भान मोदींना आहे व ते त्याचा योग्यरितीने लाभ उठवत आहेत. मग काहीजणं त्याला एन आय आर पंतप्रधान म्हणोत.

विवेकपटाईत 05/08/2022 - 09:14
घुसखोरीची माहित निश्चित असेल. पण युद्धासाठी लागणारे साहित्याची कमतरता होती. बोफोर्स होती पण दारू गोळे नव्हते. रस्त्यां अभावी सैनिक साजोसामान पोहचायला ही वेळ लागणार होता. बाकी याकाळात हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.

In reply to by विवेकपटाईत

जेम्स वांड 05/08/2022 - 10:14
हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.
भारतीय लष्कराच्या मेहनतीला आपण कमी करून मांडता आहात काय ?

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 05/08/2022 - 12:12
नाही हि वस्तुस्थिती आहे. आकडा वर खाली होऊ शकतो. परंतु NLI (नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री) च्या सैनिकांना पाकिस्तान सरकारने वाऱ्यावर सोडून दिले होते याचे कारण तेथे आमचे सैनिक नाहीतच असा पवित्रा पाकिस्तानी लष्कराने घेतला होता. पाकिस्तानी लष्कराने आमचे ४५३ सैनिक शहिद झाले असा दावा केला होता परंतु नवाझ शरीफ यांच्या पक्षाने श्वेतपत्रिका काढली होती त्याप्रमाणे किमान ३ हजार आणि इतर विश्लेषकांच्या मते ४००० पर्यंत सैनिक यात मारले गेले. The former Pakistan Prime Minister, Nawaz Sharif, claimed that more than 4,000 Pakistani troops and officials were killed in the Kargil conflict. The Pakistan Government had consistently denied charges of its involvement in the Kargil War and claimed it to be an operation conducted entirely by the Mujahideen (holy warriors). Several months later it indirectly acknowledged its participation by decorating some of its soldiers who died in the conflict. http://www.hindu.com/thehindu/2003/08/17/stories/2003081702900800.htm

In reply to by जेम्स वांड

विवेकपटाईत 07/08/2022 - 09:18
ही प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी झालेली हानी आहे, त्या बाबत लिहले आहे . तसेही कारगिल मध्ये जीवंत राहणे ही एक प्रकारचे युद्धच आहे. आपल्या सैनिकांना ते रोज लढावे लागते.

मदनबाण 06/08/2022 - 20:35
कारगिल युद्ध या विषयावर एक्स रॉ एजंट एन के सुद यांनी बरेच माहितीपर भाष्य केलेले आहे. ज्यांना या विषयात अधिकचा रस असेल त्यांनी ISRG - Indian Security Research Groupइथे जाऊन ते व्हिडियो शोधुन पहावेत. कारगिल म्हंटलेच की मला प्रचंड दु:ख आणि त्याहुन अधिकचा राग येतो, कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना ज्या यातनामय पद्धतीने ठार केले त्याचा आपण बदला घेतला नाही ! मी त्या दिवशाची वाट पाहत राहणार जेव्हा हा बदला पूर्णत्वास आणला जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga

वामन देशमुख 07/08/2022 - 14:10
थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे.... १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या रघुवंशातील राजे- सेनापती यांपासून ते आधुनिक काळातील नेते - लष्कर प्रमुख या इतिहासाचा सैनिकी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, शालेय शिक्षणाद्वारे तो नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. --- आधुनिक भारतीय सैन्यास बहुदा दीड-दोनशे वर्षांचा युद्धानुभव आहे. त्यावर योग्य ती ग्रंथसंपदा निर्माण व्हायला हवी. --- अवांतर: ब्रिटिश इंडियाच्या फाळणीनंतर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सैन्याचे विभाजन कसे झाले असावे यावर कोणी लेख लिहिल्यास वाचायला आवडेल. (५५ कोटी बद्दल भरपूर वाचण्यात आला आहे पण बाकी मुलकी प्रशासन, लष्करी मनुष्यबळ, इतर संसाधने यांचे विभाजन कसे कसे झाले असावे याची काही रिसोर्सेस आहेत का?)

In reply to by वामन देशमुख

जेम्स वांड 08/08/2022 - 09:02
तुमच्या प्रश्नाला अनुसरून सर्च करता करता खालील फोटो सापडला . हा फोटो कैक दिवस इंटरनेटवर, फाळणी दरम्यान नॅशनल लायब्ररी कोलकाता मधील पुस्तकांची फाळणी ह्या नावाने फिरत होता पण ते खरे नाही हा मूळ फोटो डग्लस डंकन नावाच्या फोटो जर्नलिस्टने १९४७ साली काढलेला असून तो नॅशनल लायब्ररी कोलकाता इथला नसून तत्कालीन इम्पेरियल सेक्रेटरीयाट लायब्ररी (आता सेंट्रल सेक्रेटरीयाट लायब्ररी) नवी दिल्ली इथला आहे, पुस्तकांचे विभाजन करून गेलेली व्यक्ती म्हणजे तत्कालीन ग्रंथपाल कर्मचारी श्री बी एस केशवन हे आहेत.

मित्रहो 15/08/2022 - 15:26
इंटेलिजन्स फेलीव्हर बाबतीत नुकतीच विक्रम सूद (रॉ चे पूर्वीचे प्रमुख) यांची जुनी मुलाखत बघितली https://www.youtube.com/watch?v=hPSSbfsLgio त्यांच्या मते अशा काही घटना झाल्या की गुप्तहेर खात्यावर दोष येतोच. ते चालायचेच. त्यांना आवडले नाही की प्रोफेशनल व्यक्तीने दुसऱ्याबद्दल लिहिणे. त्यांनी नांव घेतले नाही पण रोष जनरल मलिक यांच्या पुस्तकाविषयी असावा. सूद यांच्या मते हिवाळ्यात भारताचे सैनिक उंचावरील जागा सोडून खाली येतात हे पाक सैन्याला माहिती होतेच तर त्याचा फायदा ते घेणार नाही कशावरुन. सैन्याच्या चौक्या दूर दूर होत्या असेही एक कारण घुसखोरीमागे दिले जाते. एक मला पडलेला प्रश्न सर्वेक्षण किंवा पेट्रोलिंगचे काम कोणाचे असते BSF/ITBPचे कि सैन्याचे.
नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती.