तो एक बिचारा.......
"तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात,
काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला",
इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत.
हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला.
आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा.
शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे.
पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी.
आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला.