मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !

मारवा ·

पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik 11/05/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म 12/05/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म 12/05/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा 12/05/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा 12/05/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह 24/05/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti 25/05/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!

पूर्वी ऐसी अक्षरेवर आलेला हा लेख पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. या लेखाचा भाग १ ही इथे प्रकाशित करावा ही श्री. मारवा यांना विनंती

Jayant Naik 11/05/2025 - 09:30
अती उत्तम लेख. पण इतका वर्षाव एकाच लेखात आमच्या अल्प बुद्धीला झेपत नाही. 2/3 भाग करायला हवे होते. एकदा वाचून समजणे कठीण आहे. परत परत वाचणे जरूर आहे.

स्वधर्म 12/05/2025 - 16:55
संत ज्ञानेश्वरांच्या अलौकीक प्रतिभेतून काय काय रत्ने बाहेर येतील ते सांगता येत नाही. पण त्यांचा आस्वाद घेणे प्रत्येकाला जमत नाही. आपल्या या लेखामुळे ज्ञानेश्वरीत नक्की केवढी ज्ञानाची, भाषेची श्रीमंती आहे ते समजले. खूप खूप धन्यवाद.

स्वधर्म 12/05/2025 - 17:06
ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत वापरावा हे अद्भूत आहे! ही एक ओतकामाची प्राचीन पध्दत (५००० वर्षे) आंम्ही इंजिनिअरिंगच्या पहिल्या दुसर्या वर्षी शिकल्याचे आठवते. कदाचित डिप्लोमाला असेल. इनव्हेस्टमेंट कास्टींग किंवा लॉस्ट वॅक्स कास्टींग. पहिल्यांदा आपल्याला हवा तसा आकार मेणाने बनवायचा आणि नंतर तो आतच ठेऊन अगदी बारीक वाळूत त्याचा साचा बनवायचा. नंतर जेंव्हा गरम धातूरस त्यात ओतला जातो तेंव्हा मेण वितळून बाहेर पडते व धातू त्या साच्याचा आकार घेतो. यात मूस/ फर्नेस महत्वाची नाही तर पध्दत महत्वाची. अगदी तंतोतंत (अ‍ॅक्युरेट) ओतकामासाठी ही पध्द्त वापरली जाते अजूनही. https://en.wikipedia.org/wiki/Investment_casting

In reply to by स्वधर्म

मारवा 12/05/2025 - 17:40
तै भुतसृष्टीची पडे टांकसाळ ॥ सातव्या अध्यायात एकामागोमाग तीन श्लोक गीतेचे जे येतात त्याचा अर्थ साधारण असा, की प्रकृती चे दोन प्रकार आहेत अपरा आणि परा. अपरा आठ प्रकारांनी भिन्न आहे पृथ्वी,जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार आणि दुसरी जी परा प्रकृती आहे ती जीवस्वरुप आहे व तिने हे सर्व विश्व धारण केलेले आहे. आणि सर्व जगातील प्राणिमात्र सजीव या दोन प्रकृतीपासुन निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जगाचा आदि-अंत मीच (श्रीकृष्ण) आहे असे वर्णन यात येते, आता हि सुक्ष्म प्रकृती जेव्हा स्थुला ची निर्मीती करते तेव्हाचे वर्णन ज्ञानेश्वर टांकसाळ चे रुपक वापरुन करतात. त्याकाळची टांकसाळ त्यांनी बघितली असेल, गंमत म्हणजे इतकी आध्यात्मिक अमुर्त संकल्पना समजवण्यासाठी टांकसाळ हे एकदम भौतिक व्यावहारीक जगाचे उदाहरण ते छान वापरतात. कुठली नाणे पाडणारी टांकसाळ यांनी बघितली असेल का ? तेव्हाची राजाची की राजाने नेमलेल्या खाजगी होत्या ? यातील चतुर्विधु ठसा समान मुल्याचा व स्तर मात्र भिन्न हे नेमकं कशाच्या संदर्भात आहे कळल नाही. चातुर्वण्यासंबधी असेल अस वाटलं पण समान मुल्य मग म्हटल नसतं एनी आयडिया ? चौर्‍याशी लक्ष योनींसाठी तितके थरा हे तस स्पष्ट आहे. आणि हा शब्द टांक मला अगोदर नाणं असा अर्थ वाटला होता टाका यावरुन असेल अस वाटलं होत, दो टके का आदमी , तेरी दो टके की नौकरी मेरा लाखो का सावन वगैरे पण त्याचा अर्थ ठसा निघाला एक फ़ेमस मराठी आडनाव आहे मुकुंद टांकसाळे का काहीतरी. रुपक जरा कठीण झाल हे माऊलींच्याही लक्षात आलेल दिसतय म्हणुन ते म्हणतात हे रुपक परि असो. सरळ समजुन घे... ते सूक्ष्म प्रकृति कोडें, जै स्थुळाचिया आंगा घडे, तै भूतसृष्टीची पडे, टांकसाळ । चतुर्विधु ठसा, उमटों लागे आपैसा, मोला तरी सरसा, परी थरचि आनान। होती चौर्‍यांशी लक्ष थरा, येरा मिति नेणिजे भांडारा, भरे आदिशून्यांचा गाभारा, नाणेयांसी। ऎसे एकतुके पांचभौतिक, पडती बहुवस टांक, मग तिये समृद्धिचे लेख, प्रकृतीचि धरी । जे आंखूनि नाणें विस्तारी, पाठी तयांची आटणी करी, माजी कर्माकर्माचिया व्यव्हारीं, प्रवर्तु दावी। हे रुपक परि असो, सांगो उघड जैसे परियेसों, तरी नामरुपाचा अतिसो, प्रकृतीच कीजे। आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं, बिंब येथ आन नाहीं, म्हणोनि आदि मध्य अवसान पाहीं, जगासि मी।(अ-७ ओ-२२ ते २८) कोडें- आवडीने, सरसा- सारखा , आनान -निरनिराळ्या, एकतुके - एकसारखे, टांक- ठसे, लेख- गणना ( लेखापाल यावरुनच), अतिसो- विस्तार , अवसान-लय अर्थ- ही सुक्ष्म प्रकृती जेव्हा आवडीने स्थुल महाभुतांच्या अंगांना घडविते, तेव्हा भुतसृष्टीची टांकसाळ सुरु होते. या टांकसाळीतुन निर्माण होणा‍र्‍या प्राणरुपी टाकीचे चार नमुन्यांचे ठसे आपोआप उमटु लागतात. त्यांचे मुल्य समान असले तरी स्तर मात्र भिन्न आहेत. यांचे स्तर चौर्‍यांशी लक्ष आहेत, इतरांची तर गणतीच नाही, अशा असंख्य नाण्यांनी आदिप्रकृतीचा गाभारा खचाखच भरुन जातो. अशा प्रकारे पंचमहाभुतांची सारख्या परिमाणाची इतकी विपुल नाणी पडतात की एकट्या प्रकृतीलाच त्याच्या समृद्धीचा लेखा जोखा ठेवता येतो. मग प्रकृती या जीवरुपी नाण्यांचा कस लावुन , ठसा मारुन विस्तार करते. त्याचीच ती नंतर आटणी करते, मध्यंतरी (माजी) च्या काळात ती त्याच्याद्वारे कर्म-अकर्माचा व्यवहार चालवुन दाखवीते. अर्जुना आता हे रुपक पुरे झाले, आता उघड सोप्या शब्दात सांगतो ते ऎक, हा नाम रुपा चा विवीधतेचा पसारा प्रकृतिच करत असते. आणि ही प्रकृति तर माझ्या ठिकाणी अधिष्ठान रुपाने भासते. यात खोटे काहीच नाही, म्हणुन मीच जगाच्या उत्त्पत्ती- स्थिती- लयाला कारणीभुत आहे.

मारवा 12/05/2025 - 17:50
ऐसी अक्षरे वरील याच वरील लेखाच्या एका प्रतिसादात श्री अरविंद कोल्हटकरांनी ही फार सुंदर रोचक अशी माहिती तेव्हा दिलेली होती. ती इथे मूळ लेखाला समर्पक आणि उपयुक्त आहे म्हणून. इथे देण्याचा मोह आवरत नाहीय. अध्यात्म, योगसाधना अशा विषयांत काहीच गोडी आणि गति नसल्याने त्याबाबत टीकाटिप्पणी करू शकत नाही पण वरील चर्चेतील तीन मुद्द्यांंविषयी थोडे मतप्रदर्शन करू शकतो. प्रथम चकोर पक्षी. चकोर पक्ष्याभोवती संस्कृत वाङ्मयामध्ये प्रचलित दोन संकेत आहेत. त्यातील सुप्रसिद्ध म्हणजे तो चंद्रकिरणांवर जगतो, (कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर - अभिषेकी, जैसे शारदीचिये चंद्रकळें-। माजि अमृतकण कोवळें । ते वेंचिती मने मवाळें । चकोरतलगे॥ ज्ञानेश्वरी १-५६.) आणि अंधार्‍या रात्री चंद्रकिरण समजून फुललेल्या निखार्‍यांना कवळतो. दुसरा म्हणजे विषावर त्याची दृष्टि पडली तर त्याचे डोळे लाल होऊन तो मरून जातो. त्विषं चकोराय सुधां सुराय। कलामपि स्वावयवं हराय। ददज्जयत्येष समस्तमस्य। कल्पद्रुमभ्रातुरथाल्पमेतत्॥ उत्तरनैषधचरित २२.६५ (चंद्र) आपली प्रभा चकोराला, अमृत देवांना आणि आपली अंगभूत कला शंकराला देतो, त्याचा जय असो. अर्थात् हे अपुरेच आहे कारण तो कल्पवृक्षाचाच भाऊ आहे. मृषा निशानाथमह: सुधा वा हरेदसौ वा न जराविनाशौ। पीत्वा कथं नाऽपरथा चकोरा विधोर्मरीचीनजरामरा: स्यु:॥ उत्तरनैषधचरित २२.१०२. चंद्राचे तेज म्हणजे अमृत आहे वा ते जरामरणापासून मुक्ति देते हे खरे नाही. अन्यथा चंद्रकिरण पिऊन चकोर अजरामर का होत नाहीत? स्मितज्योत्स्नाजालं तव वदनचन्द्रस्य पिबतां चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा। अतस्ते शीतांशोरमृतलहरीमाम्लरुचय: पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया॥ सौंदर्यलहरी ६३. तुझ्या मुखचंद्राच्या स्मितरूपी किरणांचे पान करणार्‍या चकोरांच्या मुखांना त्याच्या गोडीमुळे जडत्व आले आणि म्हणून ते चंद्राची किरणे आम्ल मानून प्रतिरात्री कांजीसारखी आनंदाने पितात. दुसरा म्हणजे मुशीतील वितळणारे मेण. मला वाटते की हा उल्लेख धातूचे ओतीव पुतळे करण्याच्या जगभरच्या अनेक संस्कृतींना प्राचीन काळापासून माहीत असलेल्या lost wax casting पद्धतीला अनुसरून आहे. ह्या पद्धतीमध्ये ज्याचा ओतीव पुतळा/प्रतिकृति करायची आहे अशा व्यक्ति/मूळ गोष्टीची मेणामध्ये प्रतिकृति करायची. नंतर तिला कसल्याहि hard plaster ने - उदा चिकण माती, हल्ली प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात - लिंपण करायचे. ते पूर्ण सुकवायचे. सुकल्यानंतर ते मुशीमध्ये भाजायचे म्हणजे आतील मेळ द्रवरूप होते. ते ओतून द्यायचे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत धातूचा रस ओतायचा. तो रस पूर्णपणे थंड होऊन धातु घट्ट झाला की बाहेरचे लिंपण फोडून दूर करायचे म्हणजे धातूमधील ओतीव पुतळा/प्रतिकृति शिल्लक उरते. अखेर टांकसाळ म्हणजे टंकशाला. ह्यावर माझ्याच 'पैसाअडका इत्यादि' ह्या जुन्या लेखातील संदर्भाचा भाग येथे देतो. "टका - १)१६ शिवराई, २)४ पैसे, ३)१ आणा, ४)उत्तर हिंदुस्तानात २ पैसे, ५)गुजरातमध्ये ३ पैसे. (दाते-कर्वे.) तसेच ’घरटका’ घरावर कर, 'लग्नटका’ लग्नावर कर.(मोल्सवर्थ.) उत्तर हिंदुस्तानात दोन पैसे, चांदीचे नाणे.(चतुर्वेदी.) (’अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर आटा टका सेर खाजा’ - अंधेर नगरीत विचित्र राज्य, आटा आणि मिठाई, दोन्हीचा भाव सारखाच - शेराला एक टका. ’सब घोडे बारा टके’ - सगळे घोडे एकाच किमतीचे - बारा टके, one size fits all. सोनटक्का = सोन्याचे नाणे. मूळ संस्कृत ’टङ्क’, ठसा उठवून केलेले नाणे, a punch-marked coin. त्यावरून ’टङ्कशाला’ टांगसाळ. बंगाली भाषेत টাকা टाका हे बोलीभाषेतील रुपयाचे नाव असून बांगलादेशाच्या चलनाचेहि तेच नाव आहे.)"

सस्नेह 24/05/2025 - 19:51
मारवाजी शतश: धन्यवाद या लेखासाठी. काय त्या ज्वलंत उपमा आणि विलक्षण वर्णन ! सवडीने वाचावा असा हा लेख असल्याने वाखू साठवून दमादमाने रसपान करत वाचते आहे. शिवाय एका वाचनात संपूर्ण आकलन होणार नाही सो पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. __/\__

Bhakti 25/05/2025 - 18:46
जैसे शारदिचिये चंद्र कळे। माजि अमृत कण कोवळे। ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे। याचा अर्थ असा की, हा ग्रंथ मी सुद्धा तुम्हासाठी सिद्ध केला आहे यामागे सर्वस्व सद्गुरूंची असीम कृपा असून निश्चितच हा ग्रंथ माझ्या श्रोत्यांना आनंद देणार आहे असा निर्विवाद आशावाद व्यक्त होताना दिसतो. चकोराचे पिल्लू जसे अमृतकण सेवन करते तसे आपण या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा आपण मागील अमृतकल सहज लिलया स्वीकारून आनंदाची परमोच्य सीमा गाठावी. आपण माझ्या अज्ञानाची जाणीव ठेवून या ग्रंथाचा आस्वाद घ्यावा या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे, आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत ते जे नाजूक नाजूक सांगितले आहे ते भगवंताचे प्रेम आहे ते मला कळत नाही म्हणून लहान होऊन सेवन करा, चकोराच्या पिल्लासारखे जे असतील त्यांना ज्ञान कण निश्चितच मिळतील. संदर्भ -ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरीमधील मनाची भूमिका लेखक-प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन खरोखरच ही ओवी खुपच सुंदर अभ्यासपूर्ण आहे.त्यात हे वाचनात आले, म्हणून इथे दिली.अजूनही वाचनात आल्यावर नक्की देईन. बाकी ,नमो ज्ञानेश्वरा-श्री संत ज्ञानेश्वर महाराज वाङमय दर्शन हे पुस्तक आळंदी संस्थानाने नुकतेच माऊलींच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्सर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केले आहे.खुप सुंदर आहे, नक्की वाचा!
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥ ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

Bhakti ·

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.

प्रचेतस 19/04/2025 - 10:23
सुरेख लिहिलंय. किल्ल्यातील सर्वच मंदिरे अतिशय सुंदर आहेत. हल्ली बराचसा जीर्णोद्धार झालेला दिसतोय.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/04/2025 - 12:17
हो,बदल श्री.शिवदूर्ग संवर्धन ही संस्था करीत आहे.पुरातत्व खात्याचेही मंदिराचे संवर्धन सुरू ठेवले आहे.मागच्या वेळी इथे गडपाल होते, त्यांनी चांगली माहिती दिली.पण यावेळी ते नव्हते.
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

विजुभाऊ ·

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.

चित्रगुप्त 17/04/2025 - 20:20
पुस्तक परिचय खूपच आवडला. मलासे वाटते, यातली उदाहरणे जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतील अशी आहेत. आळसे गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥ ३४ दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ दासबोधः दशक ८ समास ६.

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 17/04/2025 - 22:17
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धी निश्चयाची ॥> याचा पडताळा पदोपदी येतो! रामदासस्वामींना त्रिवार दंडवत.

कंजूस 17/04/2025 - 21:52
मी आळशी आहे हे वाटणेच आळशीपणा घालवण्याची सुरूवात असते. पण कुणी स्वतः ला आळशी म्हणून घ्यायला तयार नसतो. इथेच विषय संपतो. दोन चार कामसू व्यक्ती आजुबाजुला असल्याने आळशी माणूस नशिबवान ठरतो. त्यामुळे इतर कामसू लोक त्याचा मत्सर करतात हेवा करतात. पुस्तक परिचय आवडला. आपल्याला आळशीपणा आहे असे वाटते त्यांच्यासाठी उत्तम.

Bhakti 17/04/2025 - 21:55
भरपूर उदाहरणे दिलीत.छान परिचय आहे.साधारणत: सेल्फ हेल्प पुस्तके अधिकतर अनुवादित वाचनात येतात.इथे मराठीत लिहिलेले पुस्तक नक्कीच सुंदर असणार.विषयही उत्तम आहे.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

आळशीपणा घालवू मग बकोट लिस्ट बनवू .बनली तर कितपत प्रत्यक्षात उतरते ते पाहू. प्रतिसाद द्यावासा वाटणे ही आळशीपणा जाण्याची पहिली पायरी. दुसरी, प्रतिसाद टंकाळला. आता दमलो, जरा याच पायरीवर अंमळ विसावतो.

लढा आळशीपणाशी हे पुस्तक माझ्यासारख्या अनेकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं हे या लेखामुळे जाणवलं. संधी मिळताच हे पुस्तक नक्की वाचीन.

वामन देशमुख 26/04/2025 - 05:47
पुस्तक परिचय आवडला. दोस्तारमुळे मी तुमचा पंखा आहेच. हे पुस्तकही वाचेन. पुस्तकाच्या इंग्लिश शीर्षकाप्रमाणेच आळस, कंटाळा, टंकाळा, अती-आराम हे माणसाचे मैत्रीपूर्ण शत्रू आहेत. त्यांच्याशी आपला लढा हा आयुष्यभर न संपणारा आहे. "आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी" असं आमची आजी आम्हाला सांगायची त्याची हा धाग्यामुळे आठवण झाली. --- झैरात: एकेकाळी मिपावर मी आज केलेला व्यायाम...!! असे व्यायामाचे फॅड सुरु होते. त्याचे मी आज केलेला आराम...!! असे आरामाचे समर्थन करणारे विडंबन मी केले होते.
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

Bhakti ·

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)

सोत्रि 17/04/2025 - 06:45
मस्त! ह्या लेखाचं सार खालीलप्रमाणे मांडता येईल.
  1. दुःख (Dukkha) - जीवनात दुःख आहे.
  2. (लेखातील संदर्भः दुःखनिवारणापलीकडे 'सुख' म्हणून काही निराळा पदार्थ नाही.)
  3. दुःखसमुदय (Dukkha Samudaya) - दुःखाचा कारण म्हणजे तृष्णा (पाली - तनहा)
  4. (लेखातील संदर्भः कोणती तरी तृष्णा आधी उत्पन्न होऊन तिच्या पीडेपासून दुःख आणि दुःखाच्या पीडेपासून पुढे सुख उद्‌भवले)
  5. दुःखनिरोध (Dukkha Nirodha) - दुःखाचे निर्मूलन होऊ शकते.
  6. (लेखातील संदर्भः दुःखकारक तेवढीच विशिष्ट आशा, तृष्णा अगर असंतोष सोडून, हा युक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे)
  7. दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे , कर्म करण्याची युक्ती किंवा कौशल्य किंवा 'कर्मयोग हे त्यातलं एक अंग आहे.
  8. (लेखातील संदर्भः कर्म करण्याची जी ही युक्ती किंवा कौशल्य त्यास 'योग' किंवा 'कर्मयोग असे म्हणतात)
- (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 17/04/2025 - 10:37
धन्यवाद सोत्रि ,
दुःखनिरोधमार्ग (Dukkha Nirodha Magga) - दुःखाच्या अंतासाठी अष्टांगिक मार्ग (The Noble Eightfold Path) आहे
हे कधीतरी समजून घेईन.
परम सुखाचा म्हणजेच इंद्रियातीत आत्मनिष्ठ सुखाचा अनुभव एकदा आला म्हणजे पुढे कितीही मोठे दुःख असले तरी त्याने स्थिती हालत नाही [गी. ६.२२), यालाच गीतेत निर्वाणींची शांती नाव आहे
हे चांगलच समजलं आहे :)
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

Bhakti ·

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

द स्टोरीटेलर (सिनेमा)

Bhakti ·

गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/03/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.

गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 10/03/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

शिक्षण आणि विटाळ पाळणे

विवेकपटाईत ·

आग्या१९९० 23/02/2025 - 14:28
कुंकवाचा बाण वर्मी लागल्याने धागा काढला का? असो. शाळेत असताना शाखेत जाणाऱ्या मित्राने विटाळशीणला इंग्रजीत bricklazy म्हणतात असे सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती. का तर म्हणे पाळीच्या काळात विटकरी रंगाच्या स्त्रावामुळे स्त्री आळशी बनते. शिव शिव शिव ! शाखेत असं शिकवले जाते?

मुख्य प्रश्न "विटाळ" निति का अमलात आणली गेली ?.... याचे उत्तर बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा... "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

In reply to by आंद्रे वडापाव

लिंक देत चला हो. शोधुनही सापडला नाही हा विडीओ =)))) सोप्पं आहे नुसतं कॉपी पेस्ट तर करायचं असतं . उदाहरणार्थ हे पहा : https://www.youtube.com/watch?v=s-4fGFGdg-U बाकी तुम्ही म्हणता तो व्हिडीओ पाहिला नसला तरी नुसते टायटल "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं" वाचुन सहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष - पाद्री फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. बापाला बापपण सिद्ध करावं लागतं हे ऐकुन त्यांना काय वाटलं असतं ह्या विषयी फार उत्सुकता वाटली =)))) j

In reply to by प्रसाद गोडबोले

Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष तारा भवाळकर पुरुषसत्ताक समाज, परंपरेच्या ओझ्यावर काय म्हणाल्या? #https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=n43SNKE5cemjvl5p

त्या काळांत, स्त्रीला जास्तीत जास्त आराम आणि पौष्टिक खाणे देणे उत्तम, असे माझे आजोबा ( ते डॉक्टर होते.) म्हणायचे. एरवीही स्त्रीला चौरस आहार मिळाला पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. इतर डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे...

विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।। म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।। देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।। फुकटची वीज हडपणाऱ्या, स्वस्तात दारू पाहिजे असणाऱ्या, फुकट्या दिल्लीकरांना, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची प्रगल्भता कशी कळणार !

अरे भाई कहना क्या चाहते हो ? लेख वाचून काहीच कळाले नाही. आजकाल असेच लेख सर्वत्र वाचनात येतात. म्हणजे चुकीची का होईना पण स्पष्ट बाजू घ्यायची नाही. नेहमी माझ्यासारखे (म्हणजे त्या धर्मराजासारखे) नरो वा कुंजरो वा:
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ओके. मग आताच्या काळाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ? आजच्या काळात विटाळ पाळणे स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम आहे काय ? याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. विटाळशी स्त्री ने कुणाला शिवाशिव केली, तर तिला फार श्रम व्हायचे काय ? केवळ तिला आराम मिळावा म्हणून तिला हाडतूड केली जायची का ?
त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली.
आणि
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ही दोन्ही वाक्ये समानार्थी आहेत काय ?

आग्या१९९० 23/02/2025 - 14:28
कुंकवाचा बाण वर्मी लागल्याने धागा काढला का? असो. शाळेत असताना शाखेत जाणाऱ्या मित्राने विटाळशीणला इंग्रजीत bricklazy म्हणतात असे सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती. का तर म्हणे पाळीच्या काळात विटकरी रंगाच्या स्त्रावामुळे स्त्री आळशी बनते. शिव शिव शिव ! शाखेत असं शिकवले जाते?

मुख्य प्रश्न "विटाळ" निति का अमलात आणली गेली ?.... याचे उत्तर बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा... "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

In reply to by आंद्रे वडापाव

लिंक देत चला हो. शोधुनही सापडला नाही हा विडीओ =)))) सोप्पं आहे नुसतं कॉपी पेस्ट तर करायचं असतं . उदाहरणार्थ हे पहा : https://www.youtube.com/watch?v=s-4fGFGdg-U बाकी तुम्ही म्हणता तो व्हिडीओ पाहिला नसला तरी नुसते टायटल "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं" वाचुन सहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष - पाद्री फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. बापाला बापपण सिद्ध करावं लागतं हे ऐकुन त्यांना काय वाटलं असतं ह्या विषयी फार उत्सुकता वाटली =)))) j

In reply to by प्रसाद गोडबोले

Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष तारा भवाळकर पुरुषसत्ताक समाज, परंपरेच्या ओझ्यावर काय म्हणाल्या? #https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=n43SNKE5cemjvl5p

त्या काळांत, स्त्रीला जास्तीत जास्त आराम आणि पौष्टिक खाणे देणे उत्तम, असे माझे आजोबा ( ते डॉक्टर होते.) म्हणायचे. एरवीही स्त्रीला चौरस आहार मिळाला पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. इतर डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे...

विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।। म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।। देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।। फुकटची वीज हडपणाऱ्या, स्वस्तात दारू पाहिजे असणाऱ्या, फुकट्या दिल्लीकरांना, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची प्रगल्भता कशी कळणार !

अरे भाई कहना क्या चाहते हो ? लेख वाचून काहीच कळाले नाही. आजकाल असेच लेख सर्वत्र वाचनात येतात. म्हणजे चुकीची का होईना पण स्पष्ट बाजू घ्यायची नाही. नेहमी माझ्यासारखे (म्हणजे त्या धर्मराजासारखे) नरो वा कुंजरो वा:
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ओके. मग आताच्या काळाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ? आजच्या काळात विटाळ पाळणे स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम आहे काय ? याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. विटाळशी स्त्री ने कुणाला शिवाशिव केली, तर तिला फार श्रम व्हायचे काय ? केवळ तिला आराम मिळावा म्हणून तिला हाडतूड केली जायची का ?
त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली.
आणि
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ही दोन्ही वाक्ये समानार्थी आहेत काय ?
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.

गीतारहस्य चिंतन -३

Bhakti ·
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.