‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो

लेखनविषय:
काव्यरस
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....

आमचाही पाउस.....

मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त

राधाबाई

लेखनविषय:
काव्यरस
राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही ! नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई ! अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा ! पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा ! गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका ! वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका ! आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास ! अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस ! मरणासन्न ह

मिपासार

(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

लेखनवैमूढ्य

लेखनविषय:
काव्यरस
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

अनईझी.......!!

लेखनविषय:
काव्यरस
कृष्ण उभा यमुना किनारी होऊनी अनईझी, गोपिका तिकडे मजेत वाट्सप्प वरती बीझी...!! दुध लोणी गायब झाले फास्ट फुडचा जमाना, गोपी खाती नुडल्स भरती बर्गर चा बकाना...!! पुर्वी एकच पेंद्या होता आता सारेच पेंद्या झाले मैदानी खेळ सोडूनी, फेसबुक वरती आले...!! गोधन झाले आऊट डेटेड गोकुळात मॉल आले, गोवर्धन विकला गुण्ठे वारी मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!

आळी मिळी गुप चिळी!

लेखनविषय:
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..

वडा पाव रे........!!!

लेखनविषय:
काव्यरस
ती म्हणे : प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा तो म्हणे : देवा , नविन चॉइस तरी कळावा.....!! ती म्हणे : बरा असतो एकच एक गडी माहीत होऊन गेलेल्या सार्या त्याच्या खोडी .....!! तो म्हणे : चांगली असे अंबाड्या ची भाजी तरीही खावी वाटे कधी तरी कांदाभजी ....!! नाठाळाला वठणी वर आणावयाचा त्रास हरेक जन्मात वाचेल बाई आमचा तो ख़ास....!! ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! जायचे तर जा नाथा नाजुक धागे तोडून हात तिने जोडले डोळे आले भरुन ....!! इथ

मित्रवेडा

कॅंटिनच्या चहाचा उग्र दर्प चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स. थंड चहाने उघडलेली शिव्यांची लाखोली ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स. डोळे बंद करायचे, सारं लख्ख पाहायचं अन तंद्री भंग होता होत नाही पुढ्यातल्या चहा अन कॉम्प्यूटरच्या फाईल्सना मित्रांच्या आठवणींचा कुठलाच रंग येत नाही.
Subscribe to फ्री स्टाइल