मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

शुचि · · जनातलं, मनातलं
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो. इंद्र त्याच्या समस्त देवगणांसमवेत या संहार समयी डोळे मीटतो. परंतु हे सती अशा महासंहार काळी तुझा केवळ तुझा पती (सदाशिव) विहार करतो, क्रीडा करतो. *कवीने पार्वतीच्या सौभाग्याची स्तुती वरील कडव्यात गायली आहे.

वाचन 28428 प्रतिक्रिया 0