स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग २)
लेखनविषय (Tags)
आधीच्या भागाची लिंक
स्वराज्याचा लढा आणि पुरंदरचा तिढा ! ( भाग १)
सध्याचा लालमहाल
मुळ लालमहालाचे कल्पनाचित्र
पुणे हे शहाजी राजांच्या राजधानीचे ठिकाण होते.बेंगळूरुवरुन आल्यावर शिवाजी राजे व जिजाउंनी स्वताच्या निवासासाठी लालमहाल नावाचा वाडा बांधून घेतला. या लालमहालाची रुंदी होती साडे सतरा गज म्हणजे साडे बावन्न फुट तर लांबी होती साडे सत्तावीस गज म्हणजेच सव्वा त्र्याएंशी फुट. वाड्याची उंची साडे दहा गज म्हणजे पावणे एकतीस फुट होती. वाड्यामध्ये वाड्यात कारंजे, सदर, पाण्याच्या तीन विहीरी, तळघर हे सर्व बांधले होते.
अर्थात जिजाउसाहेब, शिवाजी राजे आणि दादोजी पुण्यात आले तरी त्यांच्यासमोर डोंगराएवढी आव्हाने होती.सततच्या पडणाऱ्या भयंकर दुष्काळामुळे रयतही त्रस्त झालेली होती. मोगल, आदिलशाही, निजामशाही यांच्या सततच्या लढायांमुळे जहागिरी उद्ध्वस्त झाली होती. लोक परागंदा झाले होते. सन १६३० च्या सुमारास म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीच्या दरबारात आलेले होते. निजामशाहीतही मोठा अंतर्गत कलह वाढलेला होता. शहाजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी निजामशहाच्या बाजूने खानदेशातील मोगलांच्या स्वारीत गुंतलेले होते याच वेळी आदिलशाही फौजांनी पुण्याच्या जहागिरीत घुसून पुणे कसबा उद्ध्वस्त केला.आदिलशाहाच्या आदेशावरुन मुरारजगदेवाने तर पुणे बेचिराख केले होते. शहराचा कोट पाडून टाकला. पुण्यात अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवून एक पहार ठोकली होती आणि त्याला तुटकी चप्पल टांगली होती. जणू गाव बेवसाउ करण्यासाठी हा ईशारा होता.पुण्याचा सर्व वेसा पाडल्या गेल्या.शहाजी राजांचे दोन वाडे या पुण्यनगरीत होते.शहाजी राजांवर राग म्हणून तर हि पुण्यावर धाड पडली होती. सहाजिकच हे वाडे जाळले होते. मुरार जगदेवानी ईथेल राजधानीचे स्थान यवतजवळच्या भुलेश्वर डोंगरावर हलवून तिथे तटबंदी उभारून किल्ला बांधला व नाव दिले "दौलतमंगळ".
सुरवात तर मुळापासून करायची होती. रयतेला धीर देण्यासाठी पहार उपसली गेली आणि जी भुमी गाढवाने नांगरली ती सोन्याचा फाळ लाउन नांगरली गेली. तसेच धार्मिक विधी म्हणुन पांढरीची पुजा केली.
त्यावेळचे पुणे हे छोटेसे गाव होते.शेजारी असलेली मुठा नदी, पलिकडच्या उत्तर तीरावर असलेले भांबुर्डा, दक्षिणेला कात्रज, आंबेगाव परिसर हा तसा मोकळा प्रदेश. फक्त पश्चिमेला कोंढाण्याचा पर्वत, त्यापलीकडे तोरणा राखण करीत होता. मुलुख आदिलशाहीचा असल्याने मोंघलापासून भिती होतीच.दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते.
म्हणून दादोजींनी पुण्याच्या द्क्षिणेला कात्रजच्या डोंगरापलीकडे खेडेबारे या गावी वाडा बांधला. खेडेबारे गाव डोंगराच्या आडोश्याला असल्याने आक्रमणाची चाहुल लागली तरी बचावासाठी पुरेसा वेळ मिळावा हा हेतु होता. ईथे जी गावे वसवली तीला शिवाजी राजांवरुन "शिवापुर", जिजाउसाहेबांवरुन "जिजापुर" अशी नावे दिली. दौलतीचे हवालदार म्हणुन मुदगल नर्हेकर देशपांडे यांना नेमले.आमराई लावली गेली. येथील आंबे वाखाणले जात. या बागेला शहाजी राजांचे नाव देण्यात आले, "शहाबाग". राजांचा मुक्काम काहीकाळ पुण्यात तर काही काळ शिवापुरात असायचा.
स्वराज्यातील पहिले धरण छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या शिवगंगा नदीवर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूरचे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबाचे धरण म्हणतात..
२००५ - २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाचे धरण पुरवते.
छायाचित्रात जांभळी धरण
शिवाजी राजे,जिजाउ यांचा मुक्काम शिवापुराला असायचा याचा एक पुरावा आहे. दादोजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ रोजी विठ्ठल गिरमाजी हवालदार शिरवळ यास लिहीले आहे,"रामजी विठ्ठल देशकुलकर्णी शिरवळ हा पुण्यास येउन सौ मातुश्री जिजाबाई यांच्या समक्ष बोलला कि आपला व तिमाजी पुरुषोत्तम यांच्या वतनाचा निवाडा गोत देउन करावा.त्यावरुन तुम्हास हे पत्र लिहीत आहे.तरी परगण्याचे देशमुख, पाटील व वतनदार यांचे माथा घालून निवाडा गोतन्याय करणे.शिवापुरचे मुक्कामी वाटणीचा मजहर करुन दिला आहे.त्यावर जाउ नये". ( एतिहासिक पत्र सार संग्रह खंड १, पृष्ट १११) या पत्रात लिहीले आहे तेच शिवापुर कसे त्याचा उलगडा पुरंदरे दप्तर ३, पृष्ट १३० यावरील पत्रात सापडतो. हे पत्र सन १६५३ चे आहे. "महाराज साहेबी ( शहाजी राजे) मातुश्री आउसाहेब व तुम्हास ( शिवाजी राजे) खेडेबारीयास दादाजी पंतापाशी पाठविले. ते वेळेस कसबियामध्ये वाणियाचे व बाजे मोहतर्फा कुळे यांची घरे मोडून तो जागा वाडीयासी केला व त्या कुळासाठी शिवापुर पेठ वसवायचा तह केला". यावरुन खेडेबारे हेच शिवापुर होते हे सिध्द होते व शिवापुरचा वाडा बांधण्याच्या आधी शिवाजी राजांचा मुक्काम पुण्यात होता हे हि समजते.
याच वेळी पाषाण गावाजवळून राम नदी वहात होती.या नदीकाठी एक शिवालय होते, त्याचे नाव "सोमेश्वर".मंदिराला दगडी आवार बांधण्यात आले, नदीला घाट बांधला आणि या नवीन परिसरात नवीन पेठ वसवून तीला आउसाहेबांचे नाव देण्यात आले, "जिजापुर".
सध्याचा लालमहाल
मुळ लालमहालाचे कल्पनाचित्र
पुणे हे शहाजी राजांच्या राजधानीचे ठिकाण होते.बेंगळूरुवरुन आल्यावर शिवाजी राजे व जिजाउंनी स्वताच्या निवासासाठी लालमहाल नावाचा वाडा बांधून घेतला. या लालमहालाची रुंदी होती साडे सतरा गज म्हणजे साडे बावन्न फुट तर लांबी होती साडे सत्तावीस गज म्हणजेच सव्वा त्र्याएंशी फुट. वाड्याची उंची साडे दहा गज म्हणजे पावणे एकतीस फुट होती. वाड्यामध्ये वाड्यात कारंजे, सदर, पाण्याच्या तीन विहीरी, तळघर हे सर्व बांधले होते.
अर्थात जिजाउसाहेब, शिवाजी राजे आणि दादोजी पुण्यात आले तरी त्यांच्यासमोर डोंगराएवढी आव्हाने होती.सततच्या पडणाऱ्या भयंकर दुष्काळामुळे रयतही त्रस्त झालेली होती. मोगल, आदिलशाही, निजामशाही यांच्या सततच्या लढायांमुळे जहागिरी उद्ध्वस्त झाली होती. लोक परागंदा झाले होते. सन १६३० च्या सुमारास म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीच्या दरबारात आलेले होते. निजामशाहीतही मोठा अंतर्गत कलह वाढलेला होता. शहाजीराजे सुद्धा शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी निजामशहाच्या बाजूने खानदेशातील मोगलांच्या स्वारीत गुंतलेले होते याच वेळी आदिलशाही फौजांनी पुण्याच्या जहागिरीत घुसून पुणे कसबा उद्ध्वस्त केला.आदिलशाहाच्या आदेशावरुन मुरारजगदेवाने तर पुणे बेचिराख केले होते. शहराचा कोट पाडून टाकला. पुण्यात अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवून एक पहार ठोकली होती आणि त्याला तुटकी चप्पल टांगली होती. जणू गाव बेवसाउ करण्यासाठी हा ईशारा होता.पुण्याचा सर्व वेसा पाडल्या गेल्या.शहाजी राजांचे दोन वाडे या पुण्यनगरीत होते.शहाजी राजांवर राग म्हणून तर हि पुण्यावर धाड पडली होती. सहाजिकच हे वाडे जाळले होते. मुरार जगदेवानी ईथेल राजधानीचे स्थान यवतजवळच्या भुलेश्वर डोंगरावर हलवून तिथे तटबंदी उभारून किल्ला बांधला व नाव दिले "दौलतमंगळ".
सुरवात तर मुळापासून करायची होती. रयतेला धीर देण्यासाठी पहार उपसली गेली आणि जी भुमी गाढवाने नांगरली ती सोन्याचा फाळ लाउन नांगरली गेली. तसेच धार्मिक विधी म्हणुन पांढरीची पुजा केली.
त्यावेळचे पुणे हे छोटेसे गाव होते.शेजारी असलेली मुठा नदी, पलिकडच्या उत्तर तीरावर असलेले भांबुर्डा, दक्षिणेला कात्रज, आंबेगाव परिसर हा तसा मोकळा प्रदेश. फक्त पश्चिमेला कोंढाण्याचा पर्वत, त्यापलीकडे तोरणा राखण करीत होता. मुलुख आदिलशाहीचा असल्याने मोंघलापासून भिती होतीच.दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते.
छायाचित्रात जांभळी धरण
शिवाजी राजे,जिजाउ यांचा मुक्काम शिवापुराला असायचा याचा एक पुरावा आहे. दादोजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ रोजी विठ्ठल गिरमाजी हवालदार शिरवळ यास लिहीले आहे,"रामजी विठ्ठल देशकुलकर्णी शिरवळ हा पुण्यास येउन सौ मातुश्री जिजाबाई यांच्या समक्ष बोलला कि आपला व तिमाजी पुरुषोत्तम यांच्या वतनाचा निवाडा गोत देउन करावा.त्यावरुन तुम्हास हे पत्र लिहीत आहे.तरी परगण्याचे देशमुख, पाटील व वतनदार यांचे माथा घालून निवाडा गोतन्याय करणे.शिवापुरचे मुक्कामी वाटणीचा मजहर करुन दिला आहे.त्यावर जाउ नये". ( एतिहासिक पत्र सार संग्रह खंड १, पृष्ट १११) या पत्रात लिहीले आहे तेच शिवापुर कसे त्याचा उलगडा पुरंदरे दप्तर ३, पृष्ट १३० यावरील पत्रात सापडतो. हे पत्र सन १६५३ चे आहे. "महाराज साहेबी ( शहाजी राजे) मातुश्री आउसाहेब व तुम्हास ( शिवाजी राजे) खेडेबारीयास दादाजी पंतापाशी पाठविले. ते वेळेस कसबियामध्ये वाणियाचे व बाजे मोहतर्फा कुळे यांची घरे मोडून तो जागा वाडीयासी केला व त्या कुळासाठी शिवापुर पेठ वसवायचा तह केला". यावरुन खेडेबारे हेच शिवापुर होते हे सिध्द होते व शिवापुरचा वाडा बांधण्याच्या आधी शिवाजी राजांचा मुक्काम पुण्यात होता हे हि समजते.
याच वेळी पाषाण गावाजवळून राम नदी वहात होती.या नदीकाठी एक शिवालय होते, त्याचे नाव "सोमेश्वर".मंदिराला दगडी आवार बांधण्यात आले, नदीला घाट बांधला आणि या नवीन परिसरात नवीन पेठ वसवून तीला आउसाहेबांचे नाव देण्यात आले, "जिजापुर".
प्रतिक्रिया
वाचतोय.
वाचत आहे....
अत्यंत उत्तम आणि मेहनत घेऊन
+१