मला आवडलेले संगीतकार :– 3 अनिल बिश्वास
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र
बंगालचे नाव आले की डोळ्यासमोर येतात दोन गोष्टी , एक म्हणजे बंगाली मिठाई आणि रबिन्द्र संगीत. बंगाली माणसाच्या स्वभावातच गोडवा आणि संगीत असते. अशा मातीतून आलेल्या अनेक संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. पण त्यात सर्वप्रथम नाव येते अनिल बिश्वास यांचेच. हिंदी चित्रपटाला रबिन्द्र संगीताची ओळख करून देणारे पहिले संगीतकार असे जर त्यांना म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्यानंतर आलेल्या अनेक संगीतकारांनी त्यांचे अनुकरण करत संगीत सृष्टीवर आपला ठसा उमटवला.
स्वातंत्र्यलढ्यात काही काळ भाग घेऊन सुमारे चार महिने कारावास भोगून जेव्हा अनिल बिश्वास कलकत्यात आले तेव्हा ही त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागलेलाच होता. तो चुकवत असताना त्यांना एका वेश्यावस्तीत चार दिवस लपून राहावे लागले. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी कलकत्त्याला चित्रसृष्टीत प्रवेश करण्यासाठी धडपड सुरु केली. त्यांची आई सुध्दा एक चांगली गायिका होती त्यामुळे संगीताचे बाळकडू त्यांना जन्मापासूनच मिळालेले होते. बंगाली संगीताचा वारसा आणि काहीतरी करून दाखवायचेच ही जिद्द घेऊन ते मुंबईला आले.
इस्टर्न आर्ट सिंडीकेट मध्ये महिना अडीचशे रुपयांची त्यांना नोकरी मिळाली. पण त्यांचा पहिला गाजलेला पिक्चर “धरम की देवी” हा होता. दोन वर्षानी त्यांना सागर मुव्हीटोन ने कामाची संधी दिली. १९४२ साली बॉम्बे टोकीजशी ते जोडले गेले तिथून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जवळपास सत्तर चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. त्यांच्या अतिशय गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने जागीरदार, वतन, एक ही रस्ता, औरत, किस्मत, परदेसी यांचा उल्लेख करता येईल.
हिंदी चित्रपटसंगीतामध्ये प्रयोगशीलतेचा मान पण त्यांनाच जातो. बंगाली, पंजाबी, काश्मिरी, असामी, मराठी, तमिळ लोकसंगीताचा सखोल अभ्यास करून वेळोवेळी त्यांचा आपल्या संगीतात त्यांनी वापर केला. प्रसंगी पाश्चिमात्य संगीताचाही त्यांनी वापर केला. त्यांच्या अनेक गाण्यांवर रबिन्द्र संगीत आणि शास्त्रीय संगीताचा प्रभाव आढळते. त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सौतेला भाई या चित्रपटात शास्त्रीय संगीतावर आधारित दोन सुरेख गाणी बनवली आहेत ती म्हणजे "लागी नाही छुटे" आणि "जा मै तोसे नाही बोलू".
परदेसी चित्रपटात "रिमिझिमी बरसे पानी आज मोरे अंगना" मधला मराठमोळा बाज कानाला जितका सुखावतो. तितकाच "ना दिड दिन तन दे रे ना" मधला शंकराभरणम हा दक्षिण भारतीय राग डोलायला लावतो. आणि "रसिया रे मन बसिया रे" हे तर रबिन्द्र संगीताची छाप असलेले गाणे ही तितकेच सुमधुर आहे. एकाच चित्रपटात लोकसंगीताचे अनेक प्रकार असणारा हा पहिलाच प्रयत्न होता. तसेच राही चित्रपटातील आसामी आणि काश्मिरी लोकसंगीतावर आधारित गाणी लोकांच्या पसंतीला उतरली होती. हमदर्द या चित्रपटातील "रुतु आये रुतु जाये" गाण्यात त्यांनी चार ऋतूचे प्रातिनिधिक चार रागांचा उपयोग केला आहे." दिल जलता है तो जलने दे" म्हणत पार्श्वगायनात प्रवेश करणाऱ्या मुकेशला अनिल बिश्वासांनीच पहिली संधी दिली. वास्तविक हे गाणे ते स्वत गाणार होते. पण त्यांनी ऐनवेळेला मुकेशकडून हे गाणे गाऊन घेतले आणि त्यानंतर मुकेश हे नाव सर्वतोमुखी झाले. "ए दिल मुझे ऐसी जगह ले चल" या गाण्यातून तलत मेहमूद नावाचे मखमली आवाजाचे रत्न त्यांनी पुढे आणले. परदेसी चित्रपटामुळे गाजलेल्या मीना कपूर या नवोदित गायिकेकडून अनिल दा नी खरे तर "मेरे लिये वो गम-ए-इंतजार छोड गये" या त्यांच्या अनोखा प्यार चित्रपटातील गाण्यात गाऊन घेतले. पण प्रत्यक्षात हे गाणे पडद्यावर आले लताबाईंच्या आवाजात. पुढे अनिल बिश्वास यांनी मीना कपूर यांच्याशी लग्न केले. गायिका सुधा मलहोत्राला सुद्धा अनिल बिश्वास यांनी पहिली संधी दिली होती.
दिवस जात होते. चित्रपटसंगीतात एक नवीन पिढी उदयाला येत होती. संगीताचा बाज बदलत चालला होता. हा बदल अनिल बिश्वास यांना रुचला नाही. त्यामुळे त्यांनी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला आणि आपले बस्तान दिल्लीला हलवले. तिथे त्यांनी ऑल इंडिया रेडीओमध्ये काही काळ काम केले. आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यात काही काळ व्यतीत केला. 2003 साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अफसोस अजल ले चली मैखानेसे
बन जायेंगे कुछ देरमे अफसानेसे
हम रिंद-ए-बलानोश गर याद आ जाए
छलका देना थोडीसी पैमानेसे !
मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन
प्रतिक्रिया
छान
हा पण भाग मस्त...
छान लिहिलेय!
छान लिहिताय! एक विनंती आहे या
हे अवांतर आहे तरी पण
अवांतर
प्रचंड सहमत. सज्जाद ला ज्याम
चित्रपटसंगीतात एक नवीन पिढी
हा. हा..
छान
दुरुन डोंगर साजरे
ओडिसी चष्म्यातून बंगाली
अनिल बिश्वास यांचे संगीत आवडते!
सुंदर
लेख आवाडला .
अनिल विश्वास आणि मी ..
छान!