खुप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या मंगल मैत्री साधनेत आम्हाला सहभागी केल्याबद्दल धन्यवाद ..
प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.
खरेच ख्युप उच्च विचार आहेत हे .. आवडले एक्दम
आता ध्यान फक्त हॉलमध्ये गादल्यावर बसून नव्हते, 'प्रतिक्षण विपश्यना' सुरु करा म्हणून सांगितले होते. मधून मधून 'अरेच्चा!' सुरूच होते. अचानक नवर्याची आठवण होऊन खूप गलबलून आले. बिच्चारा! येताना त्याला खूप चिडवून चिडवून आनंद घेतला होता, 'मी १० दिवस तुझा पसारा आवरण्यापासून सुटका करून घेतेय! तुझे तू बघ काय ते.' त्याचा गरीब झालेला चेहरा आठवून खूप वाईट वाटले. मनाशी ठरवले, की घर कितीही भयानक अवस्थेत आले तरी रागवायचे नाही. ३ दिवस लागले तरी चालतील. गपचूप आवरायचे. पसारा करून ठेवणे हा त्याचा धर्म, नीटनेटकेपणाची हौस हा माझा. त्यात भांडायचे काय? १० दिवसात निदान इतका तरी बदल करावा मी स्वत:मध्ये. 'परधर्म सहिष्णुता' बाळगायला घरापासून तरी सुरुवात होऊदे.
बापरे, एवढा फरक??????????????
बायकोला पाठवावे का तिकडे? ;-)
पण, पसार्याच्या बाबतीत आमच्याकडे उलटे आहे...म्हणजे मग मीच जावे का तिकडे? :-)
लेख सगळेच खूप छान लिहिलेत!
आत्ताच सर्व भाग वाचुन काढले.
मला खरोखर विश्वास बसत नाही की एवढा फरक असु शकतो आणि 'ध्यान' केल्याने तो जाणवु शकतो.
एवढा सुंदर अनुभव शेअर केल्याबद्दल खरोखर धन्यवाद.
लिखाण सुम्दर आहेच, पण ज्या विषयाला तुम्ही स्पर्श केला आहे ते अप्रतिम आहे.
आभारी आहे ...
- छोटा डॉन
>>इतक्या 'गंभीर' प्रतिक्रियेबद्दल आश्चर्ययुक्त आभार!
:)
सर्व श्रेय तुमच्या लिखाणाचे.
नाही तर आम्ही म्हणजे .... असो !
जोक्स अपार्ट, लेख मात्र खरोखर आवडला आणि ह्या 'ध्याना'बद्दल आकर्षण वाढले ( किंवा सुरु झाले ) हे खरे.
- छोटा डॉन
तुमचा विपश्यनेचा अनुभव सुंदर मांडलात.
ते लोकही चांगलं वागतात, चांगली शिकवण देतात.
फक्त मुंबईला जाता-येता इगतपुरी स्टेशनवर दिसणारा
"धम्मगिरी के लिये यहां उतरिये" हा बोर्ड मात्र मला डोळ्यात सलतो.
नाशिकला हिंदूंचा ब्रह्मगिरी तर विपश्यना वाल्यांचा इगतपुरीला धम्मगिरी!
म्हणजे विपश्यनावाल्यांकडंही कशा ना कशाशी तरी स्पर्धा करण्याची खुमखुमी आहेच.
मग लोकांना फुकट अहिंसा, करूणेचे पाठ शिकवत सुटण्याच्या प्रकाराला मार्केटींगचा वास येतो.
ते केंद्रपण ईगतपुरीलाच का? तर थेट रेल्वेलाईन वर आहे - कमावत्या, मुंबई, पुण्याच्या धकाधकीला त्रासलेल्या, हिस्ल्टेशनला जाणार्या लोकांना काहीतरी प्युअर्ली सेन्शुअल गोष्टींच्या मार्केटींगखाली सहज धम्मगिरीवर डायव्हर्ट करता येते.
म्हणजे डिमांड आणि सप्लाय इथेही आहेच.
कसला धम्म न कसलं काय.
नवल कशाचं तर पैसे मागत नाहीत याचं - आपोआप लोकांच्या खिशातून पैसे काढण्याची कला हातात असताना मागणी वगैरे करण्याची गरज पडत नाही.
आता एक किस्सा:
कालपर्वा इगतपुरीच्याच स्टेशनवर नाष्टा वगैरेसाठी रेल्वे थांबली. तुडूंब गर्दी. डब्याच्या गॅंग वे मध्येही सुटकेस, पोती, सामान लावलेले. पाय ठेवायला जागा नाही. तेवढ्यात एक येडागबाळा, घाम-धूळ-मातीनं कपडे काळेकुट्ट झालेला एक काळाढुस्स पोरगा हातात खुरटा झाडू घेऊन त्या डब्यात शिरला. तो डबा झाडून घ्यायचा आणि डबा स्वच्छ झाल्यावर लोकांसमोर हात पसरायचा. पण त्या डब्यात झाडायला जागाच शिल्लक नव्हती. तो वेडा पोरगा पण असा खुद्दकन हसला डब्यातून बाहेर पडताना की मी पण पंधरा मिनीटे हसत होतो.
असेच धम्मगिरीवाले. आपल्या आतली झाडपूस करून "देने वाले का भी भला, ना देने वाले का भी भला" म्हणणारे.
पण एक वेगळा अनुभव असतो. बरा असतो चेंज म्हणून.
अभिप्रायाबद्दल आभार.
मला वाटते, अगदी नवीन लोकांसाठी स्टेशनातच बोर्ड लावणे आवश्यक आहे.
मला वाटते, या खटकणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले.
विपश्यना करणारी असोत वा नसोत, सगळीच 'शिकणारी' माणसे अहेत, कुठेतरी कुणीतरी चुकणारच.
त्यासाठी आपण संपूर्ण प्रयोगाकडे पाठ कशाला फिरवायची? आपल्याला हवे ते शिकून घ्यायचे.
लेखमाला आवडली.
आपल्या अनुभवात आम्हालाही सामिल करून घेतलेत्......गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे!
मी एकदा उल्लेख केल्याप्रमाणे केलेल्या शिबिरात सगळ्यांना आपले म्हणण्याचा कार्यक्रम होता.
त्यात सगळ्या अनोळखी पार्टीसिपंटसकडे जाउन 'मी आपली आहे आपण माझे आहात' असे डोळ्यात पाहून म्हणावयाचे होते. सगळ्यांनाच भयंकर अवघडलेपण होते.
श्री श्री श्री रविशंकर का?
आमच्या कॉलेजातल्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीमध्ये त्यांचा एक कोर्स (बहुतेक आर्ट ऑफ लिव्हिंग असावा) होता. तो झाल्यावर असेच सगळेजण म्हणायचे एकमेकांना. ते आठवले.
होय, असेलही. आता आठवत नाही. पण माझ्या आईबाबांनी रवीशंकरांचा हा कोर्स केला होता.
ते सांगताना आई भयंकर चिडली होती कारण बाबा दुसर्या बायकांना 'मी आपला आहे.....' वगैरे म्हणत होते.;)
माऊ,
सर्वप्रथम इतकी छान लेखमाला उतरवल्याबद्दल अभिनंदन. :)
खुपच सुरेख लिहिलं आहे. कोठेही ज्ञानदानाचा वगैरे अभिनिवेश न आणता. शिवाय, ह्या आणि अश्या विषयांमधली क्लिष्टताही अगदी सोपी सहज करुन मांडली आहेस, ते तर प्रचंड आवडलं. अगदी 'हसत खेळत शिका' प्रकारचं अनुभवकथन जमलंय हे. फार आवडलं.
बाकी, विपश्यनेबद्दल बर्याच लोकांकडून ऐकून होतो आजवर. पण च्यायला, ते अज्जिबात बोलायचं म्हणून नाही हा पहिलाच नियम पाहिला की आमचा उत्साह बारगळलाच. पण असे छान अनुभव येणार असतील तर एकदा का होईना प्रयत्न करायला हवाच असं मात्र नक्की वाटतंय.
अवांतरः ह्याच लेखमालेत कुठेतरी ज्योती-त्राटकाचा उल्लेख आलेला आहे. माझं सांगण आहे, बाबांनो, नका करु तो प्रकार. च्यायला, आपला आपल्यावर नसतो ताबा! कुठेतरी वाचून ऐकून तो प्रकार केला काही महिने आणि मग 'आपली नजर लय ड्येंजार झालीए आता' असं काहीतरी लै भारी वाटायला लागलं. मग चाळे सुरु होतात..समोर दिसेल त्याच्याकडं डोळ्यात रोखूनच काय पहायचं, मित्रांसोबत नेत्रयुध्दंच काय खेळत बसायचं...त्या रोखून पाहण्याच्या भानगडीत चार-सहा इंटरव्ह्यूमध्ये आम्ही इंटर्व्ह्यू घेणार्याला इतकं अस्वस्थ करुन टाकलं, की त्यानं बिचार्यानं इमानेइतबारे आम्हाला 'रिजेक्ट' शिक्का मारुन हाकललं. :)
धमालराव,
तुम्ही त्राटक दृष्टीनं पाहुनही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट?
असं होणं नाही.
अहो मी चारच दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो - त्राटक दृष्टीनं पाहिलं त्या इंटरव्ह्यूवाल्याकडं !
त्यानं इंटरव्ह्यू क्यान्सल केला नी मला थेट जॉईन व्हायला सांगितलं. ;-)
ऑफर लेटरवर लिहीलेला पगार पाहिला (त्राटक दृष्टीनं).
तो मला पटला नाही.
नोकरी क्यान्सल!
च्यायला, आपला आपल्यावर नसतो ताबा! कुठेतरी वाचून ऐकून तो प्रकार केला काही महिने आणि मग 'आपली नजर लय ड्येंजार झालीए आता' असं काहीतरी लै भारी वाटायला लागलं. मग चाळे सुरु होतात.
दादानुं, हे वाचायला इसरलात जनु?
माऊंनी खुप छान लेखमाला लिहिलीये. त्यावर मलातरी खुसपटं काढण्यात मजा नाही वाटत द्येवा.. खरडवही आहेच की आपली..या गफ्फा हाणू..कसं?
शाळेत असताना दहावीत विपश्यनाच्या हैद्राबाद केंद्राला नेलेलं २ आठवड्यासाठी.... त्याची आठ्वण झाली..थोडा फार झाला फायदा त्याचा दहावीत...पण आम्ही जन्मजात आळशी या क्याट्यागरीतले असल्याने फॉलोअप केला नाही.. :)
सगळे भाग वाचले..प्रिच (preach - योग्य मराठी शब्द ?) न केल्याने वाचायला मजा आली !
कोणताही विचार मनात येऊ न देता तसंच बसणे आम्हाला स्वतःसाठी धोकादायक वाटते. त्यामुळे अशा गोष्टींपासून जरा लांब आहे !
विपश्यना ची अतिशय खुसखुशीत भाषेत छान ओळख करून दिलीस माऊ. विपश्यना असो किंवा महर्षी महेश योगी आणि ऋषि प्रभाकर तसंच श्री श्री रवीशंकर सगळ्यांच्या ध्यान पद्धतीत थोडा थोडा फरक आहे, पण सगळ्यांचं मूळ आणि परिणाम एकच आहे.
लेख मालिका खूप आवडली. श्रीमति किरण बेदी यानी तिहार तुरुंगातील कैद्याना विपश्यना चं प्रशिक्षण दिलं होतं आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले होते असं वाचलंय.
मी आता पर्यंत जे काहि वाचलं/ऐकलं विपश्यनेबद्दल, त्यापेक्षा तुमचे अनुभव खुपच वेगळे आहेत. मला वाटायचं कि विपश्यनेनी मनुष्य एक पाषाणाची ध्यानमूर्ती बनतो... पण तुम्ही तर आनंद सोहळा लिहीलात. एकदा अनुभव घ्यायलाच हवा आता.
धन्यवाद.
अर्धवटराव
धमाल मुलगा ने म्हटल्याप्रमाणे 'कोठेही ज्ञानदानाचा वगैरे अभिनिवेश न आणता. शिवाय, ह्या आणि अश्या विषयांमधली क्लिष्टताही अगदी सोपी सहज करुन मांडली आहेस, ते तर प्रचंड आवडलं. अगदी 'हसत खेळत शिका' प्रकारचं अनुभवकथन जमलंय हे. फार आवडलं.'
तुमच्या लेखनावरून विपश्यना व ध्यान म्हणजे एकंदरीत मनातला विचारांचा पसारा आवरण्याचं ट्रेनिंग वाटलं. दैनंदिन जीवनातल्या रुटिनांप्रमाणे कोंदट विचारांची रुटिनं होतात. ती मोडून काढून, वाईट फेकून देऊन पुन्हा नव्याने स्वच्छ सुरूवात करण्याची पद्धत वाटली. तशी मोकळी अवस्था तुम्ही अनुभवलेली दिसते. या शिक्षणाचा प्रभाव किती दिवस टिकतो, की संपूर्ण क्रांती होऊन कायमस्वरूपी बदल होतो, तो सामान्य जीवनात कसा जाणवतो याविषयी जरूर लिहा.
माउ हे बर केलस सांगितलस ते. हा म्हणजे अतिशय उच्च कोटीचा फरक वाटतो मला.
सुन्दर अनुभव. विचार करत बसली असतीस की कस ज्ञानामृत पाजाव तर नसत जमल बघ पण हसत खेळत असे मस्त घोट दिले आहेस की बस्स.
बाकी घरची कथा पन आवडली असती वाचायला. म्हणजे याच लकबीत आणखी एक लेख होउन गेला असता. काय ? काय म्हणते?
मस्त लिहिले आहेस माऊ.
सगळेच भाग आवडले. हे वाचून मलाही अशाप्रकारचे शिबिर अनुभवावे असे वाटू लागले आहे.
माहिती नाही कधी वेळ येईल ती.
लेखमाला मस्त जमली आहे. :)
सुंदर अनुभव मांडला आहे. मांडणी आणि स्वगत आवडले. ध्यान म्हणजे खरे तर एक स्वगतच असते. फक्त जमायला हवे. मला तासभर ध्यानात एखादा क्षण मिळतो तोच मन पळते.
आपला पुढचा प्रवासही वाचायला आवडेल.
१० दिवस सुट्टी देणार नाही
मग बुट्टी मारायची!
गावी कुणालातरी आजारी पाडायचे.
नाहीतर त्यांना सांगा, की 'तिहारमधल्या कैद्यांसाठी त्यांना सुधारायला एक शिबीर घेतात, मलापण आवर्जून जायला सांगितलय आमच्या डॉक्टरनी'.
'तिहारमधल्या कैद्यांसाठी त्यांना सुधारायला एक शिबीर घेतात, मलापण आवर्जून जायला सांगितलय आमच्या डॉक्टरनी'.
हॅ हॅ हॅ. आमची अवस्था कैद्यांसारखीच आहे. फक्त आम्ही सरळमार्गी कैदी आहोत. :)
असंही मास्तरला अधुनमधुन संशय येतच असणार आहे की मला मानसिक शांतीसाठी वैद्यकीय उपचारांची गरज आहे ;). वर्थ अ ट्राय. :)
माऊ गं माऊ.. मस्त लिहिलंयस. माझ्याच आठवणी वाचल्यासारखं वाटलं अगदी :) पुनःप्रत्यय की कायसेसे म्हणतात ते.
प्रतिक्षण विपश्यनेच्या सरावाने पुष्कळसे बदल झालेले मी अनुभवलेत. आणि तुला जाणवलं तसं विपश्यनेमुळे इतर साधनामार्गांचंही स्थान, महत्त्व पटून गेलं. अमूक एक मार्गच योग्य, बाकी सगळं चूक असा आग्रह धरणारं कोणी दिसलं की त्यातला फोलपणा जाणवू लागला.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ते कसे हे शिकवणारी ही विपश्यना जरूर करावी..
इतकी कठीण गोष्ट इतक्या खुसखुशीत शैलीत सागीतलीत !
'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'.
'भवतु सब्ब मंगल'. हे सत्य जर सगळ्यांना समजले तर पृथ्वीवर स्वर्गच उतरेल.
प्रतिक्रिया
आभार.
खुप छान पद्धतीने तुम्ही
झकासच .......................
हा भाग खूप सुरेख जमलाय. मस्त
असेच म्हणतो.
मस्त
धन्यवाद.
पॅगोडा. इगतपुरी विपश्यना केंद्र.
आता ध्यान फक्त हॉलमध्ये
धन्यवाद.
सुंदर लेखमाला!
छान !
खणखणीत ...
आभारी!
असो.
खूप सुंदर झाली आहे लेखमाला.
लेखमाला खूप आवडली. धन्यवाद!
तुमचा विपश्यनेचा अनुभव सुंदर
धन्यवाद.
लेखमाला आवडली. आपल्या अनुभवात
श्री श्री श्री रविशंकर
होय, असेलही. आता आठवत नाही.
हाहाहा
लेख छानच!
त्राटक दृष्टीनं पाहुनही इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट?
अल्-त्राटक..
हांग्गा आस्स! दम खा जरा.
शाळेत असताना दहावीत
सगळे भाग वाचले..प्रिच (preach
खुसखुशीत ओळख
अप्रतीम !!
लेखमाला आवडली. हा कोर्स करून
छान लेखमाला
सहमत
लेखमाला आवडली असुन आम्ही आमचा
वेगळा..
नवर्या बद्दल कणव?
मस्त लिहिले आहेस माऊ. सगळेच
सुंदर
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
सगळे भाग वाचले. खुप आवडले.
मृत्युन्जय
सुट्टी
'तिहारमधल्या कैद्यांसाठी
शब्दाची छान ओळख झाली.
छान लेखमाला.
पुन्हा वाचताना तेवढीच मजा
माऊ गं माऊ.. मस्त लिहिलंयस.
सुरेख !
'जितके लामा, तितके धर्म'. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा 'धर्म' वेगळा. जे जे करून माणसाला अधिक 'माणुसकी' सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा 'खरा धर्म'. आणी ज्या आनंदात 'कुणालाही' बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो 'खरा आनंद'. 'भवतु सब्ब मंगल'.हे सत्य जर सगळ्यांना समजले तर पृथ्वीवर स्वर्गच उतरेल.मस्त लिहिलंयस !!