मराठेशाहीचे अखेरचे सेनापती - बापू गोखले
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नजीक तळेखाजण येथे पिरंदवणे (तळेखाजण वाडी) येथे गोखले घराणे वसले होते. लष्करी पेश्याची कोणतीही परंपरा असण्याची शक्यता नसलेल्या या घराण्यात १७७१ मधे नरहर उर्फ बापू गोखले याचा जन्म झाला. बापुंचे वडील गणेशपंत, चुलते मोरोपंत व लक्ष्मणपंत हे शेतकरीच असावेत. बापूंच्या आई विषयी माहिती मिळत नाही.पितृसहवास बापुना किती लाभला हे ही समजत नाही. मात्र चुलते धोंडोपंत आणि काकू लक्ष्मीबाई यानीच बापुना सांभाळले असावे. बापूंना महादेव (आप्पा) नावाचा एक मोठा भाऊही होता. धोंडोपंत हे विजयदुर्ग सुभ्यास गंगाधर पंत भानू याच्या कडे कामास होते. त्यावेळी विजयदुर्ग परिसरात रामोशी टोळ्या लुटा