मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोगरा सरबत

श्रीयुत संतोष जोशी ·
नमस्कार, साहित्य : पाव किलो मोगर्‍याच्या ताज्या कळ्या, ५ लिटर पाणी , अर्धा किलो साखर , चिमूटभर मीठ. कॄति : मोगर्‍याच्या कळ्या थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे. ५ लिटर पाणी उकळण्यास ठेवा , चांगले उकळले की त्यात साखर घालून अजुन २० मि. उकळवावे. चिमूटभर मीठ घालून पाणी गाळून घ्यावे.पूर्णं थंड झाल्यावर त्यात मोगर्‍याच्या कळ्या घालून झाकण ठेवून २ तास ठेवावे. परत एकदा पाणी ५ मि.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

पुष्कर ·
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, शीर्षक वाचून दचकलात ना? :) पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! :) असो..! एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे.

विरहगान

namdev narkar ·
लेखनविषय:
ढाळु नकोस आसवे, अस्वस्थ नको मज करु समजदार असताना तु, नको असा अविचार करु हि अशिच रित जिवनाची,टिचभर पोटाचि खळ्गी भरन्याचि दुर देशी जावे लागते, यास उपाय काय करु समजदार असताना तु नको असा अविचार करु आस धरुन सुखाचि उध्याच्या, गोड स्वप्नात र॑गुया मनि उ॑च ईमले उभारुन, चल स्वप्न साकारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण, कधी ? केव्हा ?????, नको विचारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये?? भाग २

वरदा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच्या धाग्यावर खूप जास्त प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा सुरु करतेय.

छंदोमयीतील भावनर्तन!

अशोक गोडबोले ·
'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर! आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद.

(ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता )

अमोल केळकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सध्या ११ वी प्रवेशाची सर्वत्र गडबड चालू आहे. त्यावर हे एक विडंबन चालः जगदिश खेबुडकरांचे , बापुजींनी संगीतबध्द केलेले आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातील प्रसिध्द गाणे - 'देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा' ------------------------------------------------------------------------- मार्कांची पुण्याई, वशिल्याचा ठेवा ! ऍडमिशन मिळे आता, डोनेशन घेता !! उभे सर्व रांगेमधुनी अर्ज भरण्यासाठी मनी पालकांच्या का रे भीती भविष्याची ९० टक्के मार्क असुनही घाम का फुटावा !

चिमणं गोष्टी

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चिमणं गोष्टी . चिमणे चिमणे रडू नको! आईचा पदर ओढू नको! सोपवते तुज बाईंच्या हाती, शाळेला कधी टाळू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी, पंख पसरून उडण्या साठी.. भरारी घेताना भिऊ नको! उंच उंच जाण सोडू नको!!! चिमणे चिमणे रडू नको! सुटले घरटे समजू नको! संसारी केली तुझी पाठवणी, कमी स्वत:स लेखू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी! टिपशील दाणे बाळा साठी! शेवटची गं ही बाळे पाठवणी, आता चिमणू राहू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी, चिमणं गोष्टी विसरू नको! चिमणे चिमणे रडू नको, चिव-चिव करण सोडू नको!!! ============================= स्वाती फडणीस........ २००-०६-२००८

ठसे

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ठसे . सुखावलं की हसायचं.. मनोमन फुलायचं! दुखावलं की रडायचं.. आतल्या आत कुढायचं! सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! एक ठसा खोल उमटून, एक नजरेतून गेला सुटून.. एका ठशात पाणी साठून, एक लाटेत गेला वाहून.. मागे वळून पाहताना मग.. तळीच येतात दिसून!! तळ्यां काठच्या सागरी फेणफुले जाती गळून! ========================== स्वाती फडणीस........ ०५-०७-०८

लोकशाहीत कायद्याचं महत्व.

श्रीकृष्ण सामंत ·
"हे पुस्तक मी माझं वाचून झाल्यावर तुम्हाला वाचायला देईन.कदाचित तुमचं वाचून झाल्यावर मला तुम्ही आणखीन काही विचाराल,आणि मला त्यावर बोलायला पण आवडेल." "लोकशाहित कायद्याचे महत्व" अशा शिर्षकाचं एक पुस्तक घेवून प्रो.देसाई आज तळ्यावर आले होते. त्यांचं ते पुस्तक अजून पुर्ण वाचून झालं नव्हतं. मी त्याना म्हणालो. "भाऊसाहेब,पुस्तकाच्या शिर्षकावरून मला दिसतंय सध्या जे जगात "हम करे सो कायदा" चाललं आहे त्यावर तुम्ही कुठेतरी अपसेट झालेले दिसताय." माझं हे बोलणं ऐकून ते म्हणाले, "अगदी बरोबर.हे सगळे जगातले लोकशाही देश आहेत त्या देशात एक तर त्या त्या देशातले लोक तरी, नाहीतर त्या देशाचं सरकार, कायदा मोडून आपलं म