साम दाम दंड भेद

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
26 Sep 2016 - 10:23 am

साम दाम दंड भेद

आमच्या घामाला दाम नाही
हे रामा, आता जगण्यात राम नाही

किती हि कष्ट केले तरी
कनवटीला छदाम नाही
नियतीला पण काही ना वाटे
परिस्थितीशी साम नाही

अहोरात्र धडपडतो पण
वेदनेला बाम नाही
भरल्या गोकुळात भरकटतो
भेटत अजून श्याम नाही

गतजन्मीच्या कर्माचा दंड हा
ह्यात काही भेद नाही
जगण्याशिवाय तरी आता
या जगात दुसरे काम नाही

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

अनाठाई

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
25 Sep 2016 - 7:00 pm

निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली
कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली

अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो
दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो

बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे
आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने

उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा
चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा

विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड
जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड

तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी
ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

कविता माझीसांत्वनाहे ठिकाणकविता

स्वप्न मनाचे

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
25 Sep 2016 - 10:41 am

असंख्य स्वप्ने मनी उद्याची
पंख जरी हे इवले इवले,
ध्येय गाठण्या आतुरलेले
हृदयाचे पाऊल कोवळे..

तरूणपणाची चढता झालर
मुक्त मनाला बसे ना आवर,
स्वप्न कुठे अन मार्ग कुठे
उगाच अंगी नसती पावर..

तिशी उलटता भरते अंगण
गळ्यात पडते नसते बंधन,
सांभाळताना नाती गोती
करी स्वप्नांना दुरून वंदन..

वर्षा मागुन वर्षही सरते,
स्वप्नांची ती यादच उरते,
मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे
पुन्हा नव्याने मनात भरते..

कविता माझीकविता

मक्केतील उठाव १

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
25 Sep 2016 - 2:00 am

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला. त्याचे परिणाम सगळ्या जगावर झाले. तेव्हापासून अमेरिकेत एक वाक्प्रचार बनला आहे अमुक देशाचे ९/११. जसे २६/११ चा मुंबईवरील हल्ला हा भारताचे ९/११, स्पेनमध्ये माद्रिद येथे रेल्वे गाड्यांमध्ये अनेक स्फोट होऊन शेकडो लोक मेले त्याला स्पेनचे ९/११ म्हटले जाते. हाच नियम लावला तर मक्केतील १९७९ साली झालेला उठाव ह्याला सौदी अरेबियाचे ९/११ म्हणता येईल. ह्या घटनेने सौदी राजघराणे मुळापासून हादरले. बंडखोरांचा क्रूरपणे बिमोड केलाच. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी आपली धोरणे पूर्णपणे बदलली.

इतिहासमाहिती