नमस्कार वाचकहो,
संकेतस्थळावर वावरता वावरता आमची अनेक मंडळींशी मैत्री झाली, विचार जुळले. मतांचे आदान प्रदान झाले. यांतून मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. या समितीची काही ठोस उद्दिष्टे असावीत ती इतरांपर्यंत पोहोचावीत असा मनोदय ठेवून हे लिखाण होत आहे.
मराठी माणसाला गप्पा-गोष्टी करण्यात जेवढा रस आहे तेवढा रस पेकाट मोडून कामं करण्यात नसावा. नाही हो, म्हणजे असता तर काम-धाम सोडून मंडळी नानाविध विषयांवर जीव तोडून प्रतिसाद न देती.