सोहळा
जाई बरसुनी मेघ
करी धरेशी सलगी
धरा येता मोहोरुनी
विरे मेघ तो बैरागी
आसुसल्या धरणीशी
गाठ पडता जळाची
बीज अंकुरुनी येई
कुस चिरीत आईची
हात जोडुनिया कोंब
सांगे भूमीचे मार्दव
जरा थांब क्षणभर
करी मेघाला आर्जव
वीण बांधुनी भुईशी
करी लवलव पाते
नवलाईचे हे बंध
झाले नव्हत्याचे होते
मिसळपाव