सोहळा

लेखनविषय:

 जाई बरसुनी मेघ
 करी धरेशी सलगी
 धरा येता मोहोरुनी
 विरे मेघ तो बैरागी

आसुसल्या धरणीशी
 गाठ पडता जळाची
 बीज अंकुरुनी येई
 कुस चिरीत आईची

 हात जोडुनिया कोंब
 सांगे भूमीचे मार्दव
 जरा थांब क्षणभर
 करी मेघाला आर्जव

 वीण बांधुनी भुईशी
 करी लवलव पाते
 नवलाईचे हे बंध
 झाले नव्हत्याचे होते

युग प्रवाहीणी

लेखनविषय:
युग प्रवाहीणी -+-*-+- समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय, या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव अथवा एखादा शांत, एकांत आश्रम... विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी स्मरणात असे

एक संध्याकाळ कवितेची…..

लेखनविषय:
लेखनप्रकार
कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं.

मन राधा राधा होते...

सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण.. मिटताना डोळे माझे कुशीत मजला घेतो, रोज मला उठवाया पाऊस होउनी येतो.. घनघोर बरसतो वेडा दिवस असो वा रात्र, रुजवात सुखांची नवथर भिजवुनी सारी गात्रं.. (ही राधा खास रातराणीसाठी....:))

कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल तरीही प्रश्न शिल्लक रहातो सगळे नोकर चाकर व्यवस्था असून कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ? प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ? केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? . . . . . . * अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्

क्षमा प्रार्थना

लेखनविषय:
काव्यरस
https://www.misalpav.com/node/47149#new शाम भागवत सरांचा हा धागा वाचून मनात काही विचार आले ते शब्दबध्द केले आहेत. त्या धाग्यावर हे टाकले तर कदाचित विषयांतर होईल असे वाटल्याने वेगळा धागा काढत आहे. जसे सुचले तसे लिहिल्याने कदाचित हे वाचताना विस्कळीत वाटेल, तसे वाटले तर तो माझ्या आकलनाचा दोष समजून वाचकांनी मला क्षमा करावी व भावार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.

वारी नाही ...

लेखनविषय:
वारी नाही बारी नाही दिसणार हरी नाही विठ्ठला रे तुझ्या विना दुसरा कैवारी नाही साल भर खपायचे वावरात झिजायचे एका दर्शनाने देवा दु:ख सारे जिरायचे पावसाच्या सरी माथी पाया खाली घाट वाट लाख लाख तूच सवे मैल गेले पटापट आला गाव गेला गाव खाणे पिणे तमा नाही मुखी नाव चित्ती रूप बाकी काही जमा नाही पाहताच शांत झाली काळजाची घालमेल दिसे रूप असे डोळा आनंदच खोल खोल काय पाप झाले देवा नाही आता परवणी घर झाले बंदीशाळा डोळ्या मध्ये जमा पाणी घोर किती जीवा मा‍झ्या नाही येणे माहेराला विनवणी हीच माये तूच यावे भेटायाला

स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे स्वच्‍छ एकटेच तळे विसावले चांदण्यात. - शंकर रामाणी शंकर रामाणी यांची ही फक्‍त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता. स्वच्‍छ - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ. एकटेच - एकांत. समाधी लागलेले. चिंतन. तळे - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त. विसावले - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात. चांदण्यात - शीतलता. सौहार्दता. कवितेत तळे आहे. तलाव नाही.

कोविड-कोविड गोविंद गोविंद

लेखनविषय:
काव्यरस
आली एकादशी ग्रासे जरी कोविड मुखी तरी गोविंद वारकरी हाती ग्लोव्हज् मुखी मास्क एकची टास्क नाचूरंगी सॅनीटाझर ची उधळण वैष्णवां ना ताप डोळ्यांपुढे बाप पांडूरंग कसले हे वर्ष यंदा नाही वारी तूच देवा तारी भक्तजना एकमेका आता नाही लोटांगणे उभी घटींगणे पोलीस ते युगे चार मास राबताती अथक सफाई मदतनीस डाॅक्टर,नर्स,पोलीस रात्रंदिस तुझ्यात पांडूरंग म्हणोनी वारकरी पोलीस पाय धरी होत धन्य

सकाळी सकाळी

लेखनविषय:
कभिन्न काळा मेघ भरून आला बरसून गेला सकाळी सकाळी चहाच्या कपावर वाफेचा मनोरा तरी थंड आहे जरासा बुडाशी किती गर्द वाटे धुके दाटलेले दिसते न काही सकाळी सकाळी जरी खोल जावे मनाच्या तळाशी तरी आठवांचा न सुटे येरझारा एकांत निष्ठुर अश्या दूरदेशी उभा खिडकीपाशी सकाळी सकाळी निष्पर्ण झाडे स्तब्ध गोठलेली जणू शोक करती ती पाने गळाली दिसले उभे दूर कुणी पाठमोरे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे भरून यावे कुणी आठवावे पुन्हा ते नव्याने
Subscribe to कविता