मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

शब्द

पाटिल ·
लेखनविषय:
बोलणं जे जिवंत कागदावर त्याचं प्रेत बोलणं जे भाबडं मुक्त कागदावर तेच अडचणीचं बोलणं अधीर ओथंबलेलं कोवळं कागदावर विचारपूर्वक शुष्क निबर बोलणं गरमागरम लालबुंद कागदावर डीप्लोमसीटाईप गुळमुळीत बोलणं, वार्‍यावर विरून जाणारं कागदावरचं, आयुष्यभर पायगुंता होऊन बसणारं बोलणं, अगदी वैयक्तिक, थेट ओंजळभर. कागदावरचं, वाचणाराच्या मूडनुसार हरवणारं गवसणारं. बोलताना जे गाणं, त्याचं कागदावर संदर्भासहीत स्पष्टीकरण. एकेकाळी, बोलणं, प्रपोज करायला घाबरणारं. त्याचकाळी, लिहिणं, चिठ्ठी पाठवायची सोय असणारं. बोलणं, मनस्वी, हळवं, जखडून टाकणारं. कागदावर तेच, तुफान विनोदी रडगाणं. बोलणं, माझ्यासारखं, आधी. लिहिणं

चुकलेली वारी..

मी-दिपाली ·
लेखनविषय:
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे. वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद . या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे.

अनादी .....अनंत.....

Vivekraje ·
लेखनविषय:
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो.. आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो.. त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो.. आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो.. तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो.. दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो.. आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवत

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,

प्राची अश्विनी ·
काव्यरस
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना, आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना, तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन. "अगं, बेल्ट!" मी मग चिडून बेल्ट लावेन. "बोला!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन. गालापाशी नेईन. तू हसशील..म्हणशील, लोक बघतील मी म्हणेन बघुदेत. रहावणार नाहीच मला.. बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन. तुझ्या छातीवर डोक ठेवेन.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे?? तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील.. मी हसून पुन्हा डोकं तुझ्

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

माैन

मी-दिपाली ·
लेखनविषय:
शब्दांचा प्रवास काहीच फर्लांग माैनाचा थांग निरंतर...॥ शब्दांचा अर्थ कळे यथामती माैनाची महती कोणा कळे ॥ शब्दांचे शस्त्र जिव्हारी घाव अंतरीचा ठाव माैन घेई ॥ शब्दांचे धन उजळली आभा माैनाचा गाभा अंधारात ॥ शब्दांचे नाते नांदे जिव्हेसंगे मनासवे रंगे माैन परि ॥

असा भास होतो

मनोज ·
लेखनविषय:
आभास होतो कसा त्रास होतो तू येत आहे असा भास होतो स्मरतो गजरा केसात माळलेला माझा कसा मोगरा श्वास होतो डोळ्यात जादू तिच्या पेरलेली जो पाहतो तो तिचा दास होतो कळायचे मला ती न बोलताही साथी कधी तोच मी खास होतो असे कुणी का इतके आवडावे जो जीवनाचा खरा ध्यास होतो

रूटीनाच्या रेट्यातही

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
रूटीनाच्या रेट्यातही कधी थोडं वेडं व्हावं दवबिंदूत इवल्या ओलं ओलंचिंब व्हावं कानठळी कोलाहली अंतर्नादी गाणं गावं प्रमेयाच्या पंखाखाली व्यत्यासांना विसरावं चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकरावं धीट शून्यानं शतदा अनंताला हाकारावं

अंतर

aanandinee ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर

भावंडं

मायमराठी ·
लेखनविषय:
'निसर्ग' वादळाचे तांडव आणि झाडं यांच्यातलं युद्ध मांडायचा एक छोटासा प्रयत्न... ।। भावंडं ।। उन्हातान्हात राबायची त्यांच्यासमोर वाकायची घामावर पोसतापोसता गडीमाणसं रापायची तुकडा तुकडा ऊन खायची घोट घोट सावली प्यायची सुखदुःख कष्टात मिसळून मजुरीही तरतरुन यायची नावं ठेवली होती त्यांना अर्थबिर्थ नव्हता तरीही कळत होत्या हाका त्यांना प्रेमाSनं 'ओ' म्हणायची छप्पर होऊन छायेत मावली खिशांमधल्या मायेत दिसली अन्न होऊन कायेत मुरली श्वास बनून प्राणांत विरली परवाही पर्वा न करता "निसर्गा"शी झुंजत होती विव्हळत होती कण्हत होती वाकता वाकता मोडत होती सड्यांचे सोहळे संपले ऊर्जेचे उत्सव नुरले चैतन्याचे चेव था