अस्फुट

लेखनविषय:
काव्यरस
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते

अनुष्टुप छंद - सोपा करून सांगायचा प्रयत्न

लेखनविषय:
जशी मराठीमध्ये ओवी, हिंदीमध्ये दोहा, तसा संस्कृतमध्ये अनुष्टुप छंद मला खूप लवचिक आणि सार्वत्रिक वाटतो. अनुष्टुप संस्कृतमध्येच नव्हे तर मराठीमध्ये लिहिण्यासाठीही खूप सोयीचा आहे. सगळ्यांच्या ओळखीची भीमरूपी वापरून हा सोपा छंद स्पष्ट करायचा हा प्रयत्न. लघु गुरु यांची तोंडओळख आपल्याला असेलच असं मानून पुढचं लिखाण आहे. परंपरेनुसार अशी त्याची लक्षणे दिल्यामुळे तो विनाकारण अवघड वाटतो- श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पंचमम्। द्विचतुष्पादयोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययोः॥ ह्याचा आकृतिबंध सोपा करून दिला तर असा दिसेल.

विराणी- गझल

लेखनविषय:
गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं. गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर.

पाखरांचे बोल

लेखनविषय:
काव्यरस
झाडीत उठले पाखरांचे बोल वारा पेरतो हिरव्या सुरांची ओल पूर्व काठावर पाझरती सोनेरी कण मुठीतला प्रकाश उधळीत आले लाल किरण उतरली ऊन्हे नभाची उघडीत दारे पिकात पसरलेल्या दवांचे झाले हिरे धुक्यांच्या पुसून ओळी वृक्ष घेती आकार खोप्यांतून उडाले चिमण्यांचे थवे चुकार नवे रूप फुलवीत आली धरणी हवेत झेपावले पक्षी मुखात घेऊन गाणी

झोका

लेखनविषय:

उंच उंच झोका जाई 
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई 
जीव काळजात ॥१॥

शैशवात वाटे येई 
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस 
कळे तो आभास ॥२॥

घेत झेप याैवनात 
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत 
गगनास जोडी ॥३॥

कुरकुर ही कड्यांची 
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली 
लय पश्चिमेशी ॥४॥

त्रिकालातुनी विहार 
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥

आषाढाच्या एक दिनी

लेखनविषय:
आषाढाच्या एक दिनी... कुंद,सावळ्या वातावरणी आषाढाच्या एक दिनी हिरवा डोंगर झाकून जाई पाऊसभरल्या मेघांनी स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे लोकालयीही तीच स्तब्धता वाराही जणू रुसून बसला मनात भरवूनी उदासीनता अशात कुठुनी चुकार बगळा कापत जाई मेघांना भेदरलेली चिमणी बसली मिटून अपुल्या पंखांना असाच काही काळ लोटला अन् डोलू लागले वृक्षलता वा-यासंगे जणू मिळाली वर्षागमनाची वार्ता झरझर,सरसर पडू लागल्या धवल शुभ्र पाऊसधारा उदासलेल्या चराचरावर हो चैतन्याचा शिडकावा

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

लेखनविषय:
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन

घाव.....गजलेमधून

काव्यरस
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही. खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....

नजर..

लेखनविषय:
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९

तुझी वाट

लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या वाटेवर उभा मी एकाकी डोळे मुके होऊन झाली नजर बोलकी चोरपावलाने हळूच तू येऊन जा पाखरांचे उदास सूर घेऊन जा जाग्या झाल्या भोवती रानसावल्या आकाशवाटा ढगांना बिलगून बसल्या जीवघेणी ओढ तुझी प्राणात दाटली क्षितीजावर उभी राहीली मावळतीची सावली पापण्यांच्या पंखात अश्रूंचे घन भरले प्रितीची आग ह्रदयात ठेऊन गेले
Subscribe to कविता