मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

पाऊस...

वैभव देशमुख ·
लेखनविषय:
आपल्याच माणसाची बरी नाही टाळाटाळ कोणी मागतो पाऊस त्याला देवू नये जाळ सोड मनातली आढी नको झुराया लावूस माझे डोळे चातकाचे तुझा चेहरा पाऊस... - वैभव देशमुख

तरंग

अवलिया ·
लेखनविषय:
नजरेत नजर मिळवुन सखी बोलायची अन् भलत्या ठिकाणी रेंगाळणारी नजर पाहुन हात मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची... डोळ्यातील गढुळपण कमी होतांना ओठातल्या ओठात हसायची अन् स्मित टिपले नाही म्हणुन रुसायची आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.

माझे मन सुखाच्या मागे धावत असता..

संजयशिवाजीरावगडगे ·
लेखनविषय:
काव्यरस
माझे मन सुखाच्या मागे धावत असता , त्याला सगळे काही मिळाले, पण......? मी मागे वळुन आयुष्याच्या वाटे वर पाहिले असता आज ... पण .......? माझे मन सुखाच्या मागे धावून , आयुष्‍यालाच विटले, आणि तेव्‍हां कुठे त्‍याला, मृगजळच भेटले.........!!! मनापासून जे हवं होतं, ते नाही मिळालं.. अजुन सुद्धा !!

मावळतीला रंग शोधणारा ढग मी...

फ्रॅक्चर बंड्या ·
लेखनविषय:
पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी

जीव तुझा कासावीस ...

वैभव देशमुख ·
लेखनविषय:
तू गं उभी अंगणात माफी मागताना मला एका हातामधी झाडू एक कानापाशी गेला आधी पुंजा गोळा केला पुन्हा पांगून टाकला तुझं अंगण झाडणं असं उन्हाच्या वेळेला हसू फुटलं तरीही हसू दाबलं ओठात गेलो उठून घरात खोट्या रागाच्या भरात दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला... - वैभव देशमुख

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

झुम्बर ·
लेखनविषय:
काव्यरस
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु भंगल्या

चिंधी

स्पंदना ·
लेखनविषय:
चिंधी तू एक चिंधी, मी एक चिंधी, आपण सारे चिंधोट्या . असेच राहू धुळी मध्ये अन, उगाच मारू रेघोट्या | काळ मोकळा; काळ मोकळा, वेळ मोकळा जग ही भासे रिते रिते, अश्याच वेळी; स्वत: स्वत:ला उगाच अपुले मनही भिते | खरे खोटे अन चूक बरोबर, अशी मनाला खंत नको, आणिक व्यथित आठवणींचा उगाच ह्रदया डंख नको | म्हणुनी गड्या; म्हणुनी गड्या होऊनी चिंधी आपण होऊ निराकार , निर्जीव; निष्पाप गोष्टींचाही जगी या वापर अपरंपार | अपर्णा

दुरावा

ऋषिकेश ·
लेखनविषय:
मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा लाटेस भेटणारा किनारा शहारा चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा भ्रमरासाठी नटून बसलेले फूल मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा एकाच खिडकीस न्याहळीत बसता दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा

“ घेतला वसा षंढतेचा ”

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
“ घेतला वसा षंढतेचा ” आपल्याच लेकरांचे रक्त जेव्ह्ना सांडते, मातेचेहि उर तेव्ह्ना आक्रंदतांना फाटते “ सिमेपारचा ” दहशतवाद सोयीची भाषा असे, फोफावतो तो सर्वत्र येथे खंत त्याची आम्हा नसे . पाहतो उध्वस्त घरे, शहरे अन उष्ण रुधीरांचे सडे, तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. पायघड्या पसरुनी अता स्वागत कसाबाचे करा, घेउनी षंढतेचा वसा, लांगुलचालन पाक्यांचे करा. . काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? निरंजन वहाळेकर

धागा धागा अखंड दळूया

केसुरंगा ·
लेखनविषय:
काव्यरस
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले..