Skip to main content

गझल

दुसरा कुणीच नाही....

लेखक जयवी यांनी रविवार, 22/03/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही माणूस माणसाचा झाला कधीच नाही गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही शमले तसेच सारे देहातले निखारे वणव्यास पावसाची नड भासलीच नाही काळोख तुंबलेला दाही दिशात सारा सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मैफल

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 16/03/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजमधली अत्यंत हुशार, उत्साही, लाघवी आणि नंतर "श्रीमंत पतीची राणी "झालेली एक मैत्रिण अचानक एका लग्नात भेटली. त्यावेळी तिच्या भाग्याचा हेवा करणार्‍या सगळ्याच मैत्रिणींची तिच मनोगत ऐकल्यावर जी अवस्था झाली, तिच वर्णन करण कठीण होत. तरीही या गझलेत तिच्या भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मांडण्याच कारण इतकच, की सगळीच दु:ख आपली नसतात, पण ती आपली कधी होतील, याचा नेम नाही. त्यात व.पुं. च्या भदेप्रमाणे आम्ही लोकांची मानसिक दुखणी उसनी घेण्यात तत्पर!
Taxonomy upgrade extras

तू

लेखक जयवी यांनी सोमवार, 16/03/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे स्वप्न माझ्याच स्वप्नात होते तसे सोबतीच्या करारात होते नको ना अता त्या निशेची प्रतिक्षा तुझ्या मुक्त केसातही रात होते पुन्हा जाग आली सुन्या मैफ़लीला तुझे दाद देणे अकस्मात होते नसावे नशीबात घायाळ होणे तुझे तीर सारे पहार्‍यात होते निशेला न ऐसेच वैराग्य आले तुझे चांदणे ऐन बहरात होते जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

भूल

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 07/03/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पांघरायला विस्मरणांची झूल नको आता! आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले, मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो, पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो (मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता) सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता, उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता! मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता
Taxonomy upgrade extras

रंग मेन्दीचा

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 03/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
रंग मेन्दीचा रंग मेन्दीचा हातावरती अजून खुलतो कधी कधी शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी हिरमुसलेली रातराणी ही कधी अचानक मोहरते निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन झरती फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी तृप्त मनाच्या नभी अचानक दाटून येई मळभ कसे? अवचित हळ्वा भास तुझा का अजून छळतो कधी कधी? क्रान्ति

करार

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 02/03/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
करार माझे कधी तुझ्याशी काही करार होते तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली काळोख पान्गताना उघडेच दार होते हातून सावलीचा निसटून हात गेला, आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते

रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 25/02/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
'रानवेड्या पाखराशी भेट झाली त्या कळीची' ह्या सुवर्णमयी ह्यांच्या सुंदर गझलेने आमच्या मनात जुन्या 'भेटीगाठींच्या' वेदनादायक आठवणींचे काहूर पुन्हा जागवले ते असे, रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी का हव्याशा वाटणार्‍या पोरटीला टाळले मी फक्त असते तीच सोबत हेच होते मानले मी .................................................... फोन नंबर दे म्हणालो मी तिलाही पाहता.. मग- भेटण्याचे , रातच्याला.. मनसुबे रे बांधले मी रंगलेल्या कबुतरांची गाठ पडली त्या वळूशी अन् कुल्यांना पाय लावुन धावण्याचे..

श्रावण शृंगार (गझल)

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 17/02/2009 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग कै. सुरेश भटांचे अजरामर गीत. मध्यंतरी बोलता बोलता ह्या गीताचा विषय निघाला. तेव्हापासून हे गीत, वृत्ताचे नियम वगैरे मनात रेंगाळत राहिले. शेवटी एकदाची ही गझल कागदावर उतरली. ही गझल लिहायला सुरूवात केल्यावर खऱ्या अर्थाने अनुभवलं की भटसाहेबांनी किती नजाकतीची कलाकुसर अगदी सोपी वाटावी अशी लिहून दाखवली आहे ! ही गझल म्हणजे माझी आदरांजली, भटसाहेबांना आणि त्यांच्या लेखणीला. ------------------------------------------------------------------------------- धूप छाव खेळ सांजवेळ श्रावणात आज सांजवेळ आणि गात्र गात्र यौवनात आज….

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?