थापाच मारणारा -

लेखनविषय:
संसार हा सुखाचा दोघात चाललेला पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला त्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा शेतास खाउनीया ज्यानेच घात केला का सापळ्यात आला उपदेशतो सभेला नादात तोच नेता मोहात लालचेला थापाच मारणारा अजुनी सभेत दिसता निवडून तोच येता मतदार भारलेला भजनात आळवीता भावात देव आहे बाजार का न सहता तो भाव वाढलेला

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

लेखनविषय:
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा

..उरला पलाश आता

लेखनविषय:
काव्यरस
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता.. नुसते वळून बघता तुटतात पाश आता.. पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते; घर तेवढे निमाले..उरला पलाश आता.. राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की.. सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता? अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना.. आसेतलेच आर्त.. होते निराश आता.. (विषण्ण) राघव

ते शिंकले तरीही.....!

लेखनविषय:

ते शिंकले तरीही.....!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक - "दीपज्योती २०११"

लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने बनलेला, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे असे आम्ही जाहीर करत आहोत...खालील दुव्यावर तो आपल्याला वाचता येईल. http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html काय आवडलं/नावडलं, काय चुकलं/काय बरोबर आहे, ते नि:संकोचपणे सांगा.

अलविदा मिसळपाव!

लेखनविषय:
लेखनप्रकार
अलविदा, मिसळपाव! या शेवटच्या लेखासह मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. या संस्थळावर मी आलो तो तात्यांच्या आग्रहावरून. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील. पण मला आता इथे बरे वाटत नाहीं म्हणून मी रजा घेत आहे. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच.

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

लेखनविषय:
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

बत्तीस तारखेला

लेखनविषय:
बत्तीस तारखेला


भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
Subscribe to गझल