Skip to main content

धर्म

नर्मदा परिक्रमा - पुस्तकांची एकत्रित माहिती

लेखक निनाद यांनी सोमवार, 16/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले. मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल. नर्मदा परिक्रमा- इतिहास सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.

पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 12/01/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा. चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय. चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो.

सेवाभावातील मानसिकता

लेखक हरिकथा यांनी मंगळवार, 10/01/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही. एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

लेखक विटेकर यांनी बुधवार, 14/12/2011 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.