Skip to main content

धर्म

गोल्डफिश आणि गेस्टाल्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 10/08/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काल या लेखावर गविचा एक सुरेख प्रतिसाद आहे
स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे.

Munich Massacre...

लेखक मोदक यांनी बुधवार, 08/08/2012 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
3

संत तुकाराम व गौतम बुध्द ह्यांवरील पुस्तक खरेदीबद्दल सल्ला.

लेखक pramanik यांनी गुरुवार, 02/08/2012 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
साष्टांग नम्स्कार,,,,,,,,,,,, मला तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत.कींवा एखाद्या लेखकाने अर्थ समजवुन सांगितलेले पण तरीही मुळ अभंग लिहलेले असलेले पुस्तक हवे आहे. येथील पुस्तकप्रेमी जनता एखादे नाव सुचवेल का? मला नेहमीच सुचवलेल्या/प्रख्यात वस्तु आवड्तात कारण त्यामागे अनुभव असतो आणि पुस्तकांच्या खासकरुन धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ते खुप खरे आहे. त्याचप्रमाणे मी गौतम बुध्द ह्यांच्या शिकवणी सांगणारे पुस्तक शोधत आहे. Teachings of the Buddha by Jack Kornfield ह्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.मराठीत एखादे गौतम बुध्दांवरचे चांगले पुस्तक आहे का? आगाउ धन्यवाद.

<पिवून हय क्यु?>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

हर देशीही तू, हर वेशीही तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 31/07/2012 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
हर देशीही तू, हर वेशीही तू रूपात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी खेळांतही तू, मेळांतही तू सागरी उठशी, मेघांतूनी तू पर्जन्य होशी, जल होऊन तू मग निर्झर, ओढा, नदी होशी प्रकार अनेक, जलाशय तू घडला मातीतुनी, अणुरेणू रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू पर्वत कधी, विशाल तरूही तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू तुकड्या सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू
काव्यरस

भक्तीची शक्ती?

लेखक चिगो यांनी मंगळवार, 24/07/2012 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून. ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते.

काल

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/07/2012 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 08/06/2012 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''... काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे। सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥ या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...