Skip to main content

शांतरस

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/11/2011 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो शब्दांचे वार झेलूनी शब्दांचेच प्रहार करतो शब्द कधी गळ्यात पडती हार होवूनी खोटे सुखवती स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती नफा नुकसान व्यवहार जेव्हा नजरेसमोर जाणवतो केव्हा शब्द गिळतो शब्द फिरवीतो शब्द जोडतो शब्द पेरतो रूजवूनी त्यांना कागदावर शब्दांचीच शेती करतो शब्दांचा आधार बोलण्याला शब्दच साह्य करी भावनांना शब्द नसता बोलतो निशब्दांना - पाषाणभेद १४/११/२०११
काव्यरस

साई -

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/11/2011 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
सोन्याचा मुकुट हिऱ्यांचा हार सोन्याच्या पादुका रत्नजडित सिंहासन सोन्याचे मखर सर्वांच्या डोळ्यांत ठसले त्या सोनेरी धामधुमीपासून दूर - - - - कोपऱ्यातल्या एका गरीबाच्या मिटलेल्या डोळ्यांतून ओघळणारे ... मोती ... फक्त साईलाच दिसले ; आणि (सोन्यापेक्षा सामान्यांवर माया जडलेले -) साई उदासपणे स्वत:शीच हसले !
काव्यरस

पाणी अन् माती

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 10/11/2011 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कसं असतं ना माती आणि पाणी यांच नातंच निराळ पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर पाणी दिसत नाही अन् मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर माती दिसत नाही . . माणसाचही असंच असतं काहीसं कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते तर कधी डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो अन् मग . . कधी माती, कधी पाणी कधी पाणी, कधी माती (२) मातीत पाणी नसेल तर बीजे रुजत नसतात मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात . अन् पाण्यात माती नसेल तर फक्त मनीप्लांट रुजतो . . . कधीही फुले न येणारा (३) कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर मृदगंध दरवळत नसतो . जमिनीला तडा देणा-या अनेक रणरणत्या दिवसांमधून तापलेल्या म
काव्यरस

शब्द ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/11/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये कधीही ,केव्हाही अचानक ....! तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे त्याना बघावे मनात पसरताना हलके हलके फुलताना शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात तेव्हा ते काळीज कोरून जातात काळजात ते जपून ठेवावे लागतात नाहीतर ते हरवून जातात .... कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द शब्द शब्द झेलून घ्यावा जेव्हा वाटतो शब्द नवा तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे जमले तर गाणे गावे गाता गाता एक होईल एखादी कविता गिरकी घेऊन गाणे गाईल .....!!
काव्यरस

काही दिवसच असे असतात

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 07/11/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसच असे असतात विस्कटलेल्या घरात गोंगाटाच्या घेरात उधाणलेल्या भरात तरीही सुरात आपण म्हणतो दिवसभरात काहीच नाही झाल सरळ त्याला मात्र पडत राहते अशाच अनवट क्षणांची भुरळ आपण त्याला बसवत राहतो वेळापत्रकाच्या चौकटीत त्याला मात्र नसत अडकायचं रोजच्या घोटीव कटकटीत धावत राहतो आपण त्याच्या मागे, हातात ताट आणि बोटात घास घेवून, कातावत तो मात्र पळतो अंगणात अर्ध्या चड्डीत, बरबटलेल्या तोंडाने खट्याळ हसत , वेडावत त्याला असत भिडायचं आभाळाच्या गाण्याला आपल्या मुठीत भरायचं चांदोबाच्या नाण्याला डोळ्या पुढचं धुक आपल्या सरतच नाही निरागस आर्जव त्याचं दिसतच नाही झपाटलेल्या क्षणांनी विणलेला दिवस दिवसभर उनाडू
काव्यरस

आरास रास

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 31/10/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
अथांगास काय हिरे माणके सभोवर कनक रुप्याची आरास रास अंगभर तरी त्यास मोहवे मोर पाचुवांचा सद्गदीत धरा सवे मेघ आळवांचा सकाळी सकाळि मोतियांचे धुके- स्फटिक माळून उभे शिरी तृणांचे तुरे सोनकिरणांतुनी ओघळे इंद्रमाया नि उधळे जगी रंग चित्त झुंझवाया ऋणांचे खळे आगळे वेगळे- स्नेह वाटे परी गोत हे सोवळे आंसवांना नसे दु:ख खारे इथे निर्झराचे पिसे अवखळे खळखळे .................अज्ञात
काव्यरस

अर्पणपत्रिका

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 31/10/2011 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया) शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला जेथे अर्थ प्राप्त झाला अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ जेथून व्युत्पन्न झाला, - - त्या स्वराला अर्पिता मम काव्य ॐ कारा तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी जो धूम्र उत्पन्न झाला, - - त्या धुराला अवकाश जे व्याप्त त्यासही भेदून एकमात्र जो बाण गेला बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल बलाचा उद्गम त्या उद्ग्माला, - - वंदिताना जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा त्याचाहि जो अंतरात्मा तद् भावनेला, - - - - - -
काव्यरस

नातं

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 28/10/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच येतो मी इथे रमणीय तळ्याकाठी इथली खास शांतता अनुभवण्यासाठी विस्तिर्ण काठाचं हे तळं मला नेहमीच वेगवेगळ्या रुपात भासतं काठाच्या दाट शेवाळी पाणवनस्पतीवर सतत चमचमणार्‍या पाण्याच्या रेघा त्यावरून डौलाने चालणारे बगळे मध्येच डुबकी घेणारे पाणपक्षी, बेडूक आंत पाण्याच्या मोठ्या तुकड्यावर अमाप छोटी गुलाबी कमळं असतात त्यावर दिसतात फुलपाखरं, चतुर ह्यांच्या भरार्‍या हे तळ्याचं नेहमीचं रुप पण हिवाळ्यात काही काळ हे बदलतं अचानक एके दिवशी तिथे येतात देशांतरीत पाहुणे गुलाबी, पांढर्‍या रंगाचे कलकलाटांनी तळ्याची अभिजात शांतता भंग करीत. पानथळीजागेवर पानापानातून त्यांची मायेची घरटी वसतात. नवी वीण घालतात. हवी
काव्यरस

मन....

लेखक लीलाधर यांनी गुरुवार, 27/10/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते, लग्नाचे मु॑जीचे केळवण असते, ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मनाचा मनाला नाही लागत मेळ, हीच तर खरी आहे जीवनाची भेळ, कशाला करताय फूकाचा त्रागा..... मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा...... मान्य आहे की मन हे च॑चल असते, तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते.......... म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............
काव्यरस

बागेमधला फेरफटका -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 27/10/2011 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बागेमधली विविध फुले रांगामधुनी कशी बहरती रंग लेऊनी मोहक अंगी वाऱ्यावरती गंध पसरती ! वातावरणी रम्य रंगती मुलामुलींचे ढंग वेगळे कोलांटउड्या मर्कटलीला पळापळीचे खेळ आगळे ! बाबागाडी निवांत फिरते चिवचिवणारी छोटी बाळे विश्वाला सामावून घेती लुकलुकणारे त्यांचे डोळे ! खुषीत नातू आणि आजोबा बागेमध्ये फिरून येती कोण सान नि कोण तो मोठा देहभान विसरून जाती !
काव्यरस