मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाऱ्यावर जसे पान

चांदणे संदीप ·

चित्रगुप्त 13/06/2022 - 15:17
"कवित्व शब्दसुमनमाळा - अर्थपरिमळ आगळा" असे समथांनी कवित्वाचे वर्णन केलेले आहे, परंतु अलिकडल्या बर्‍याच कवितांमधून 'आगळा अर्थपरिमळ' फारसा प्रचितीस येत नाही. गोग्गोड शब्द-प्रतिमांच्या माळांमधून दोन-तीनदा आरपार जाऊनसुद्धा काही अर्थ हाती लागलेला नाही असे वाटले. 'निजपात्र' म्हणजे 'स्वतःचे पात्र' की 'नीज' हे जणुकाही एक 'पात्र' असून ते रिकामे आहे , असे म्हणायचे आहे, हे पहिल्या ओळीत 'नीज' तर लगेच दुसर्‍या ओळीत 'निज' असे लिहील्याने समजले नाही. तसेच 'पाचू' म्हणजे (पन्ना वा एमरल्ड) रत्न ना? मग 'पाचूचे बन' (वन - अरण्य ?) म्हणजे नेमके काय ? ''शुभ्र सोनसकाळ' म्हणजे काय ? 'हळुवार' 'गोड स्वप्न' 'धुंद गान' 'अबोल मौन' 'सारंगीचे सूर' 'पाचूचे बन' 'सोनसकाळ' 'झळाळता दव'..... वगैरे बुळबुळीत शब्दांवरून घसरत जाताना कविता संपली, तरी नेमके झाले काय हे समजले नाही. एकादे 'अमूर्त' चित्र (मी याला 'केवल चित्र' म्हणतो) त्यात कोणताही'अर्थ' शोधण्याच्या भानगडीत न पडता, उगाचच तर्कवितर्क न करता 'नुस्ते बघायचे' असते, तसे शब्दांच्या घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत अनुभवायची, असे आहे का? मिपावर 'दवणीय' असा एक शब्दप्रयोग रूढ आहे. तशी ही एक दवणीय कविता आहे का ? मज निरोपावे. शेवटी, "रागावू नका गडे" असा गोड हट्ट.

In reply to by चित्रगुप्त

मला वाटले मी खूपच सरळ लिहितो. लिहिण्यामागे तसा हेतूतरी असतो. मला स्वतःला दुर्बोध कविता, गूढकविता, शब्दबंबाळ कविता, मुक्तछंदातल्या कविता किंवा ज्या तालमय, लयदार नाहीत अशा कविता फारशा आवडत नाहीत. असो, तर या कवितेत नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन पाखरांपैकी कोणाही एकाच्या एकट्याने रात्र व्यतीत करताना, विरह असा नाही पण, पुन्हा भेटण्याच्या आधीची ओढ, त्यायोगे रात्री स्वप्नरंजन करीत सकाळपर्यंतचा प्रवास, असं काहीसं चित्रण आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 27/12/2022 - 00:59
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय... तू तो ना आये तेरी, याद सताय ... असा मामला आहे म्हणायचा.

चित्रगुप्त 13/06/2022 - 15:17
"कवित्व शब्दसुमनमाळा - अर्थपरिमळ आगळा" असे समथांनी कवित्वाचे वर्णन केलेले आहे, परंतु अलिकडल्या बर्‍याच कवितांमधून 'आगळा अर्थपरिमळ' फारसा प्रचितीस येत नाही. गोग्गोड शब्द-प्रतिमांच्या माळांमधून दोन-तीनदा आरपार जाऊनसुद्धा काही अर्थ हाती लागलेला नाही असे वाटले. 'निजपात्र' म्हणजे 'स्वतःचे पात्र' की 'नीज' हे जणुकाही एक 'पात्र' असून ते रिकामे आहे , असे म्हणायचे आहे, हे पहिल्या ओळीत 'नीज' तर लगेच दुसर्‍या ओळीत 'निज' असे लिहील्याने समजले नाही. तसेच 'पाचू' म्हणजे (पन्ना वा एमरल्ड) रत्न ना? मग 'पाचूचे बन' (वन - अरण्य ?) म्हणजे नेमके काय ? ''शुभ्र सोनसकाळ' म्हणजे काय ? 'हळुवार' 'गोड स्वप्न' 'धुंद गान' 'अबोल मौन' 'सारंगीचे सूर' 'पाचूचे बन' 'सोनसकाळ' 'झळाळता दव'..... वगैरे बुळबुळीत शब्दांवरून घसरत जाताना कविता संपली, तरी नेमके झाले काय हे समजले नाही. एकादे 'अमूर्त' चित्र (मी याला 'केवल चित्र' म्हणतो) त्यात कोणताही'अर्थ' शोधण्याच्या भानगडीत न पडता, उगाचच तर्कवितर्क न करता 'नुस्ते बघायचे' असते, तसे शब्दांच्या घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत अनुभवायची, असे आहे का? मिपावर 'दवणीय' असा एक शब्दप्रयोग रूढ आहे. तशी ही एक दवणीय कविता आहे का ? मज निरोपावे. शेवटी, "रागावू नका गडे" असा गोड हट्ट.

In reply to by चित्रगुप्त

मला वाटले मी खूपच सरळ लिहितो. लिहिण्यामागे तसा हेतूतरी असतो. मला स्वतःला दुर्बोध कविता, गूढकविता, शब्दबंबाळ कविता, मुक्तछंदातल्या कविता किंवा ज्या तालमय, लयदार नाहीत अशा कविता फारशा आवडत नाहीत. असो, तर या कवितेत नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन पाखरांपैकी कोणाही एकाच्या एकट्याने रात्र व्यतीत करताना, विरह असा नाही पण, पुन्हा भेटण्याच्या आधीची ओढ, त्यायोगे रात्री स्वप्नरंजन करीत सकाळपर्यंतचा प्रवास, असं काहीसं चित्रण आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 27/12/2022 - 00:59
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय... तू तो ना आये तेरी, याद सताय ... असा मामला आहे म्हणायचा.
नीज भरते दिशांत माझे रिते नीजपात्र उतरूनि ये अंगणी जरी हळुवार रात्र रात्र रात्र जागते गोड स्वप्नातूनि धुंद गात राहते अबोल मौनातूनि येती कानी दुरून सूर सारंगीचे छान मन खाई हेलकावे वाऱ्यावर जसे पान पान पान जागते पाचूच्या बनातूनि शुभ्र सोनसकाळी झळाळते दवातूनि - संदीप चांदणे

व्हॅलेंटाईन दिनी

श्रीगणेशा ·
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

कळते जगत जाताना

चांदणे संदीप ·

श्रीगणेशा 01/02/2022 - 21:59
अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना
खूप छान! वाटतं असं कधी कधी, पण शब्दात मांडता येत नाही!

कुणी कुणासाठी थाबंत नाही कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही असेल तोवर मस्त रहायचं नंतर फक्त आठवणींत जगायचं

श्रीगणेशा 01/02/2022 - 21:59
अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना
खूप छान! वाटतं असं कधी कधी, पण शब्दात मांडता येत नाही!

कुणी कुणासाठी थाबंत नाही कुणी कुणाच्या आयुष्याला पुरत नाही आस म्हणाल तर काही अर्थच उरत नाही असेल तोवर मस्त रहायचं नंतर फक्त आठवणींत जगायचं
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

शीर्षक सुचले नाही

चांदणे संदीप ·

"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत पैजारबुवा,

म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल म्हणून म्हणतो चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय राती अर्ध्या राती जागं रहायच नाय

बाजीगर 22/12/2021 - 19:27
कवितेच्या प्रसव वेदना कशी येईल झोप सदना | पोस्ट ली कविता मिसळपाव चला आता येईल झोपेचा गाव | आता स्वप्नांचा डाव मांडणे.. मालवा हो (सं )दीप चांदणे ||

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 23/12/2021 - 14:38
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !

"फिकर नॉट ... हे दिवसही जातील" असे शिर्षक द्या
दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे
अचूक शब्दात भावना मांडल्या आहेत पैजारबुवा,

म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल म्हणून म्हणतो चिंता खंती खुट्टीवर टांगून द्यायाच हाय राती अर्ध्या राती जागं रहायच नाय

बाजीगर 22/12/2021 - 19:27
कवितेच्या प्रसव वेदना कशी येईल झोप सदना | पोस्ट ली कविता मिसळपाव चला आता येईल झोपेचा गाव | आता स्वप्नांचा डाव मांडणे.. मालवा हो (सं )दीप चांदणे ||

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 23/12/2021 - 14:38
ते ठिकाय हो चित्रगुप्त साहेब, पण सल्ला द्यायला आसूसलेल्या आम्हां मिपाकरांच्या हे नाय लक्षात आलं तर ठीक समजा !
झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

मोकळ्या करा पखाली

चांदणे संदीप ·

खूप आधीच ही कविता लिहीली होती. पण प्रकाशित करायला मनच होत नव्हते. का हे असे शब्द मनावर घिरट्या घालून मला लिहायला भाग पाडतात असेही वाटते कधीकधी. अतिशय दु:खद अशी पार्श्वभूमी या कवितेला आहे ही सल आयुष्यभर बोचत राहणार आहे. पण शेवटी, एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हेही न विसरणे तितकेच आवश्यक आहे म्हणून हा कविता प्रकाशनाचा प्रपंच. - सं - दी - प

राघव 03/12/2021 - 19:48
काय बोलणार. भावनांशी सहमत. दुसर्‍या लाटेत काय काय झाले हे वळून बघतांना देखील त्रास होतो, इतके ओळखीतले गेलेत. :-( अवांतरः अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. लिहिते रहा.

In reply to by राघव

अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. >> वा!! याला पण +१ :)

गणेशा 09/12/2021 - 19:28
भारी... ------- दुःख नाही.. खंत नाही.. स्पुर्ती साठी प्रवास असतो केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधील श्वास असतो.. - वि. वा.

खूप आधीच ही कविता लिहीली होती. पण प्रकाशित करायला मनच होत नव्हते. का हे असे शब्द मनावर घिरट्या घालून मला लिहायला भाग पाडतात असेही वाटते कधीकधी. अतिशय दु:खद अशी पार्श्वभूमी या कवितेला आहे ही सल आयुष्यभर बोचत राहणार आहे. पण शेवटी, एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हेही न विसरणे तितकेच आवश्यक आहे म्हणून हा कविता प्रकाशनाचा प्रपंच. - सं - दी - प

राघव 03/12/2021 - 19:48
काय बोलणार. भावनांशी सहमत. दुसर्‍या लाटेत काय काय झाले हे वळून बघतांना देखील त्रास होतो, इतके ओळखीतले गेलेत. :-( अवांतरः अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. लिहिते रहा.

In reply to by राघव

अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. >> वा!! याला पण +१ :)

गणेशा 09/12/2021 - 19:28
भारी... ------- दुःख नाही.. खंत नाही.. स्पुर्ती साठी प्रवास असतो केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधील श्वास असतो.. - वि. वा.
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

तिथे कोणी नि:शब्द

अनन्त्_यात्री ·
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी जसा झेप घेण्यास सरसावतो... ....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी चिदाकाश व्यापून झंकारतो ...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा उगा विरघळावा तसा भासतो .....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम तिथे कोणी नि:शब्द झंकारतो

सांजरंग

चांदणशेला ·
किरणांची पाऊले मिटून हळूच गेली उन्हे परतून पाखरांचा सूर सांजपंखी हुरहुर राहिली उरी रेंगाळून निळ्या नभी ढगांची रांग उभी तांबूस रंग गेला त्यात भरून घरट्यात किलबिल पडे काजळी भूल दिशा साऱ्या गेला हरवून रातराणीचा गंध झाल्या वाटा धुंद पसरले माथ्यावर चांदण्याचे रान

वस्त्र विणताना..

Bhakti ·

Bhakti 13/10/2021 - 07:03
अ काल शांताबाईंचा जन्मदिवस होता.हे त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे.त्यांची ही विणकर अनुवादित कविता वाचत होते.तेव्हा नात्यांची आणि वस्त्रांची गुंफण गाठ न पडता आपल्याला करता येईल का?निदान कवितेतून तरी :) तेव्हा सहज ही कविता स्फुरली. सर्वांचे आभार!

In reply to by Bhakti

दोन तीन दिवसांपूर्वीच "मेहता" मधे चक्कर टाकली तेव्हा त्यांनी केलेला "मेघदूत" चा अनुवाद उचलला. प्रस्तावना तर त्यांनी नेटकी आणि सुरेख लिहिली आहे. त्या म्हणतात "अनुवाद करणे हा माझा छंद आहे, अनुवाद करुन बघणे हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कट पणे रसस्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे". मला संस्कृत फारसे समजत नाही पण अनुवाद वाचता वाचता मी मेघदूताच्या प्रेमात पडतो आहे. रच्याकने :- ही कविता देखिल आवडली, वाचताना शांताबाईंची विणकरच आठवत होती आणि खाली तुम्ही केलेला उल्लेख वाचल्यावर मग खात्रीच पटली. साधी आणि सोपी आहे पण त्यातच त्या कवितेचे सौदर्य सामावलेले आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

Bhakti 13/10/2021 - 09:48
वाह पैजारबुवा सुंदर कथन! शांताबाईंच्या कविता म्हणजे पक्व झाडावरचे कोमल फुले :)

आमचे गाव शांताबाई चे आजोळ, त्यांचा मुलगा आमच्याच गावात रहातो. गुलजार यांनी लिहीलेली कवीता त्यांना खुप आवडली आणि त्यांनी तीचा मराठीत भाषांतर केले, "मी विणकर", मुळ कविता मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ फिर से बाँध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गाँठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे गुलजार

Bhakti 13/10/2021 - 07:03
अ काल शांताबाईंचा जन्मदिवस होता.हे त्यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे.त्यांची ही विणकर अनुवादित कविता वाचत होते.तेव्हा नात्यांची आणि वस्त्रांची गुंफण गाठ न पडता आपल्याला करता येईल का?निदान कवितेतून तरी :) तेव्हा सहज ही कविता स्फुरली. सर्वांचे आभार!

In reply to by Bhakti

दोन तीन दिवसांपूर्वीच "मेहता" मधे चक्कर टाकली तेव्हा त्यांनी केलेला "मेघदूत" चा अनुवाद उचलला. प्रस्तावना तर त्यांनी नेटकी आणि सुरेख लिहिली आहे. त्या म्हणतात "अनुवाद करणे हा माझा छंद आहे, अनुवाद करुन बघणे हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कट पणे रसस्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे". मला संस्कृत फारसे समजत नाही पण अनुवाद वाचता वाचता मी मेघदूताच्या प्रेमात पडतो आहे. रच्याकने :- ही कविता देखिल आवडली, वाचताना शांताबाईंची विणकरच आठवत होती आणि खाली तुम्ही केलेला उल्लेख वाचल्यावर मग खात्रीच पटली. साधी आणि सोपी आहे पण त्यातच त्या कवितेचे सौदर्य सामावलेले आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

Bhakti 13/10/2021 - 09:48
वाह पैजारबुवा सुंदर कथन! शांताबाईंच्या कविता म्हणजे पक्व झाडावरचे कोमल फुले :)

आमचे गाव शांताबाई चे आजोळ, त्यांचा मुलगा आमच्याच गावात रहातो. गुलजार यांनी लिहीलेली कवीता त्यांना खुप आवडली आणि त्यांनी तीचा मराठीत भाषांतर केले, "मी विणकर", मुळ कविता मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ फिर से बाँध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गाँठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे गुलजार
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज! रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद.. अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास.. चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास! वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट.. सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट! -भक्ती

कदाचित...

शिवाजी होळगे ·

ही कविता आहे ? तुम्हाला मार्क्सवाद , कम्युनिझम , समाजवाद , नवअधुनिकतावाद वगैरे तत्सम बाष्कळपणाला विरोध करायचा असेल , तोही साहित्याच्या अन त्यातही विशेष करुन गद्याच्या मार्गाने तर सर्वप्रथम वृत्तबध्द कविता लिहाव्यात असे सुचवतो , त्यातही मुख्यत्वे मात्रावृत्त , अक्षरगणवृत्त नको, अगदीच वृत्त नसेल तर छंदबध्द, अगदीच तेही नसेल तर किमान जाति तरी हवीच ! किमान अभंग स्टाईल अन बेसिक यमक तरी असावेच असावे ! मुक्तछंद हा साहित्याच्या परंपरेतील अभद्राचार आहे. साहित्यक्षेत्रातील मार्कसवाद्यांना सगळ्यात जास्त कशाने त्रास होत असेल तर ते म्हणजे वृत्त-छंदबध्द कवितेने !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुरिया 09/10/2021 - 17:30
मारकस्भाव, गद्य, पद्य आणि मद्य ह्या गोष्टी सोडून सध्य स्थितीत आपण काही हृद्य गोष्टींवर लिहावे अशी लम्र इनंती याटिकानी करत आहे. हृद्य गोष्टींवर लिहिण्याचा आणि बोलण्याचा आपला व्यासंग दांडगा आहे अशे एका लोकल चित्रांगदेकडून नुकतेच वाचनात आले आहे. ;) . धन्यवाद

सुरसंगम 09/10/2021 - 08:04
ही कविता नाही त्याच्या मनातलं स्फुटक आहे. एवढ्या सगळ्या देव देवता असताना हजारो किमी दूरवरून लोक येऊन अत्याचार करून गेले आणि देवांनी काहीच शिक्षा केली नाही. एवढंच नव्हे तर अत्याचार करणाऱ्याला उदंड आयुष्य दिलं आणि भारताच्या नरवीर लोकांना 40 च्या आत वीरमरण दिलं. शिवाजी मिपावर स्वागत.

In reply to by सुरसंगम

आणि आता खिलजी च्या वारसांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. पण भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. नैसर्गिक न्याय?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 09/10/2021 - 12:53
हे निसर्गात नैसर्गीकपणे होत असते. भारतात सोन्याचा धुर निघत होता (?) तेंव्हा पाश्चिमात्य भटक्या निर्वासितांचे आयुष्य जगत होते, आज सुबत्ता तेथे आहे आणी आपण गुलामीच्या मानसिकतेमधे. पाण्यासाठी दाही दिशा व आयुश्यभराची वणवण असणारे पाण्याची वीहीर खोदत होते अन तंत्रज्ञान, विचारसरणी यात विशेष प्रगती नसुनही हाती तेलाच्या विहीरी लागल्या… मिसफिट्स, गुन्हेगार म्हणुन देशाबाहेर हाकललेले अमेरिकेत पोचले तिथेही तोच उद्योग झाला पण प्रचंड सोन्याच्या खाणी व नैसर्गीक साधन समृध्दी त्या खंडात सापडली… उत्तम खगोलीय तथा भुमीतीचे ज्ञान असणारे, पिरॅमीड,ममी बनवणारे धुळीस मिळाले. थोडक्यात तुम्ही तंत्रज्ञान, तत्वज्ञान, इश्वर उपासना यात कितीही प्रगत वा समृध्द असा अथवा नसा… शिफ्ट इन पॉवर बाउंड टु बी हॅपन… अँड इट विल कीप हॅपनींग. माझ्या पुरते विचारले तर इश्वर, त्याची प्रार्थना याचा उगम मनुष्याने कुठेतरी झुकायला शिकावे (आपल्या अहंकाराला झुकायला शिकावे, ज्यातुन कदाचीत त्यापासुन दुर होता येइल) म्हणुन झाला… दुर्दैवाने आज तीच बाब अहंकार उंचावायला मिसयुज होते आहे.

ही कविता आहे ? तुम्हाला मार्क्सवाद , कम्युनिझम , समाजवाद , नवअधुनिकतावाद वगैरे तत्सम बाष्कळपणाला विरोध करायचा असेल , तोही साहित्याच्या अन त्यातही विशेष करुन गद्याच्या मार्गाने तर सर्वप्रथम वृत्तबध्द कविता लिहाव्यात असे सुचवतो , त्यातही मुख्यत्वे मात्रावृत्त , अक्षरगणवृत्त नको, अगदीच वृत्त नसेल तर छंदबध्द, अगदीच तेही नसेल तर किमान जाति तरी हवीच ! किमान अभंग स्टाईल अन बेसिक यमक तरी असावेच असावे ! मुक्तछंद हा साहित्याच्या परंपरेतील अभद्राचार आहे. साहित्यक्षेत्रातील मार्कसवाद्यांना सगळ्यात जास्त कशाने त्रास होत असेल तर ते म्हणजे वृत्त-छंदबध्द कवितेने !

In reply to by प्रसाद गोडबोले

सुरिया 09/10/2021 - 17:30
मारकस्भाव, गद्य, पद्य आणि मद्य ह्या गोष्टी सोडून सध्य स्थितीत आपण काही हृद्य गोष्टींवर लिहावे अशी लम्र इनंती याटिकानी करत आहे. हृद्य गोष्टींवर लिहिण्याचा आणि बोलण्याचा आपला व्यासंग दांडगा आहे अशे एका लोकल चित्रांगदेकडून नुकतेच वाचनात आले आहे. ;) . धन्यवाद

सुरसंगम 09/10/2021 - 08:04
ही कविता नाही त्याच्या मनातलं स्फुटक आहे. एवढ्या सगळ्या देव देवता असताना हजारो किमी दूरवरून लोक येऊन अत्याचार करून गेले आणि देवांनी काहीच शिक्षा केली नाही. एवढंच नव्हे तर अत्याचार करणाऱ्याला उदंड आयुष्य दिलं आणि भारताच्या नरवीर लोकांना 40 च्या आत वीरमरण दिलं. शिवाजी मिपावर स्वागत.

In reply to by सुरसंगम

आणि आता खिलजी च्या वारसांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. पण भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. नैसर्गिक न्याय?

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

गॉडजिला 09/10/2021 - 12:53
हे निसर्गात नैसर्गीकपणे होत असते. भारतात सोन्याचा धुर निघत होता (?) तेंव्हा पाश्चिमात्य भटक्या निर्वासितांचे आयुष्य जगत होते, आज सुबत्ता तेथे आहे आणी आपण गुलामीच्या मानसिकतेमधे. पाण्यासाठी दाही दिशा व आयुश्यभराची वणवण असणारे पाण्याची वीहीर खोदत होते अन तंत्रज्ञान, विचारसरणी यात विशेष प्रगती नसुनही हाती तेलाच्या विहीरी लागल्या… मिसफिट्स, गुन्हेगार म्हणुन देशाबाहेर हाकललेले अमेरिकेत पोचले तिथेही तोच उद्योग झाला पण प्रचंड सोन्याच्या खाणी व नैसर्गीक साधन समृध्दी त्या खंडात सापडली… उत्तम खगोलीय तथा भुमीतीचे ज्ञान असणारे, पिरॅमीड,ममी बनवणारे धुळीस मिळाले. थोडक्यात तुम्ही तंत्रज्ञान, तत्वज्ञान, इश्वर उपासना यात कितीही प्रगत वा समृध्द असा अथवा नसा… शिफ्ट इन पॉवर बाउंड टु बी हॅपन… अँड इट विल कीप हॅपनींग. माझ्या पुरते विचारले तर इश्वर, त्याची प्रार्थना याचा उगम मनुष्याने कुठेतरी झुकायला शिकावे (आपल्या अहंकाराला झुकायला शिकावे, ज्यातुन कदाचीत त्यापासुन दुर होता येइल) म्हणुन झाला… दुर्दैवाने आज तीच बाब अहंकार उंचावायला मिसयुज होते आहे.
... हे षडयंत्र असेल कदाचित??? तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ... कदाचित धर्मभोळी माणसं होती. उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती. ...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता. ...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता. ... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं??? ... चक्रिवादळ. आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी. ... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी... आहो मंदिराचा इतिहास काय पाहता.. सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ... ...

सांज फुले

चांदणशेला ·
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार