कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ?

केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? घर पुन्हा एकदा सॅनिटाईज होईल, अमिताभ बरा होईल तरीही प्रश्न शिल्लक रहातो सगळे नोकर चाकर व्यवस्था असून कोरोना अमिताभ पर्यंत कसा पोहोचतो ? प्रत्येक स्पर्शित जागा सॅनिटाईज व्हायला हवी प्रत्येक स्पर्ष सॅनिटाईज असायला हवा प्रत्येक माणूस दूर उभा रहायला हवा प्रत्येकाच्या नाकतोंडावर मास्क असायला हवा कुणितरी कुठेतरी गलथानपणा करतो अन्यथा कोरोना अमिताभपर्यंत कसा पोहोचतो ? केवळ कविता लिहुन वाचून ऐकुन कोरोना पळत नसतो कोरोना अमिताभ बच्चनलाही का छळत असतो ? . . . . . . * अनुषंगिका व्यतरीक्तची आवांतरे, व्

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

लेखनविषय:
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद

मरण

लेखनविषय:
काळाच्या उंबरठ्यावर अस्पृश्य सावली हलते. श्वासांच्या झुळूकेसरशी प्राणज्योत मिणमिणते. साऱ्यांच्या अधरांवरती तुझ्या रूपाची नावे. हा प्रवास अटळ माझा नि मागे पडती गावे. इवल्याशा ज्योतीचा विझून भडका झाला. जो इथवर घेऊन आला तो क्षणात परका झाला. -कौस्तुभ

आणि अश्या वेळी

आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

पाऊसवेळा

लेखनविषय:
अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ

प्राक्तनवेळा

लेखनविषय:
क्षितिजाच्या पुसती रेषा अंधार जसा दरवळतो. काळीज कुणाचे रडते चंद्र कुणाचा विव्हळतो. काळाकडे घ्याव्या मागून त्या हळव्या प्राक्तनवेळा. विस्मृतीस कराव्या अर्पण सुगंधी दुःखांच्या माळा. रंगीत करावे डोळे श्वासांना यावी भरती. उगवून पुन्हा जन्मावे पाऊस पडल्यावरती. -कौस्तुभ

कोण जमूरा कोण मदारी..

लेखनविषय:
काव्यरस
Taxonomy upgrade extras
कोण जमूरा कोण मदारी तीन पायांची शर्यत न्यारी कोण जमूरा कोण मदारी बुद्धिबळाच्या या पटावर इथे नांदते घराणेशाही लोकशाही टांगून खुंटीवर प्रजेस बोलायची चोरी लोण्यावरती ठेवूनि डोळा इमानाच्या खोट्या शपथा सरड्यासंही वाटावा हेवा वजीराची तर बातचं न्यारी हत्ती, घोडे आणि उंटही फिरता वारे चाल बदलती मोह-मायेचे हे पुजारी कसली निष्ठा अन कसली भक्ती प्याद्यांची पण कथा निराळी निसुगपणाची दाट काजळी 'संकटाच्या' तव्यावर देखील शेकती स्वार्थाची पोळी कोरड्या घोषणा भाबडी आशा प्रजा बिचारी केविलवाणी सावळ्यासंही गहिवर येई सावळा गोंधळ दरबारी स्वतःभोवती गिरक्या घेत राजा सांगे प्रजेस कहाणी 'मी', 'माझे', 'पूर्वज माझे'

माझी काळोखाची कविता

लेखनविषय:
काव्यरस
मी न चाहता उगवतीचा येईल त्याला जातो सादर पसरूनि अंगावरती घेतो अंधाराची काळी चादर मोहक तिरिपा उजेडाच्या मृगजळ फसवे तिथेच होई त्याहूनी प्रिय, मजला घेणे बरबटून काळोखाची शाई नवे समर नव्या दिसाचे तयां सोबत आरवतेची हलके घाव देते भरूनि तमात शांती नीरवतेची जर का आहे प्रकाश जीवन नवसृजनाची नांदी काळोख गूढ गहिरे व्योम आणिक अज्ञाताचा प्रवास काळोख - संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)

अस्त

लेखनविषय:
काव्यरस
चार दिसांची चहू चिंतने भ्रमितपणाची बहू लक्षणे विषासम त्या प्रवासातले क्षणिक गोडवे अस्त पावले अनाठाई त्या रूचक चिंता स्वप् नसुखांच्या रजई विणता सूर निराळे गवसण्यापरी तारेवरचा नवा डोंबारी नको म्हणाया धजते ना मन धडगत नाही रीते रीते पण बेधुंदपणाचि सूटली आवड दिनपणाचि जूडली कावड क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा नको जपाया स्वप्नांच्या लाटा अधांतरी क्षितिजाच्या मागे विझून गेले लख्ख पोरगे

नाभिका रे केस वाढले रे, धैर्याने उघड जरा आज सलून रे

लेखनविषय:
केस वाढलेत, कापायचे आहेत परंतु ह्या लॉक डाऊन मुळे नाभिक बंधूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे वैतागून "नाविका रे, वारा वाहे रे" चे विडंबन करायला घेतले.
Subscribe to कविता माझी