किरणांची पाऊले मिटून
हळूच गेली उन्हे परतून
पाखरांचा सूर
सांजपंखी हुरहुर
राहिली उरी रेंगाळून
निळ्या नभी
ढगांची रांग उभी
तांबूस रंग गेला त्यात भरून
घरट्यात किलबिल
पडे काजळी भूल
दिशा साऱ्या गेला हरवून
रातराणीचा गंध
झाल्या वाटा धुंद
पसरले माथ्यावर चांदण्याचे रान
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2144
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता!
सुरेख
आवडली
सर्वांचे मनापासून आभार