Skip to main content

हझल

(राहिले रे अजून देश किती)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 13/07/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
राहिले रे अजून देश किती? ट्वीटरावर तुझाच मेस किती! आजची रात्र ब्रिक्स देशांची आज टोप्या किती नि ड्रेस किती ? मी कसे शब्द थोपवू त्यांचे? भाविका! लपवशील फेस किती? ट्वीट माझे विरंगुळा त्यांचा ट्रॉल्सना मी करेन फेस किती? बोलताना कुणीतरी हसले पेटले भक्त ते विशेष किती! हे असे गेम? ही अशी भाषा? मी धरावे अजून वेश किती? रोज त्यांना करून ब्लॉक, सख्या! मी करू पोलिसांत केस किती? -- स्वामी संकेतानंद ९ जुलै, २०१५ ( पळतो आता................)
काव्यरस

(चालवून टाक चीप)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 08/07/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच सावकार आधुनीक, की मती असेल मंद गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद? हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद -- स्कैमी संकेतानंद ;) नवी दिल्ली, ०८ जुलै , २०१५
काव्यरस

आंगणवाडी ते ....

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/06/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

डायरीचे पान

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 17/06/2015 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे दुःख ही जरासे पचले नाही, वेदनेला वाव कुठे जिंकला समर जरी तो, तरी सुखाची हाव कुठे झाली माणसे परागंदा, राहिले मज गाव कुठे रेखले होते तुझे नाव ज्याच्यात, हरवले ते डायरीचे पान कुठे #जिप्सी
काव्यरस

माझेच जगणे खरे.....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2015 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित... नमस्कार मंडळी आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो? ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.
काव्यरस

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

ह्ये वागनं बरं नव्हं

लेखक निराकार गाढव यांनी गुरुवार, 18/09/2014 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
रतीबावर रतीब जिलुबिचा रतीब, कश्श्ये टंकती लई चरबरीत | आवं गुर्र्जेन्ला, किती वो तरास द्येता, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गुर्र्जींनि मैफल गाजिवलि, किती ह्यी ब्येनं लोळिवली पिळ घालूनी दावतो मिश्श्या, घडीघडी त्या मूष्षकलीला आरं साळसूद्दा, कुठून उपाटतो अस्सा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   गावच्या धणा लय शानाच हाय, याड्यांचा जनू की डाकतर हाय, गोंयची इणि नाय आणुभवी, बणून रायली मोटी कवि आरं लांबटांग्या, हाबंग लिवतोस डोंगा, ह्ये वागनं बरं नव्हं ||   समाधीयोग शिक्कीविला, डोस्क्यात तुमच्या नाय रावला अर्धाच इच्चार करतुया, नावाला प्यार दावतुया आरं वटवाघळा, पकडून ठिवतोस गळा, ह्ये वाग

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 07/02/2014 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या तळटीप : नमस्कार हे उघड्या पुन्हा जहाल्या या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा.
काव्यरस

इतकेच मला जाताना...

लेखक चिन्मय खंडागळे यांनी शनिवार, 04/01/2014 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...) इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते सजणाने केली सुटका, नवर्‍याने छळले होते लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या, मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच हसू आले की, दारू देता नवर्‍याला मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...