मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू...

बडबड गीत

भिंगरी ·
लेखनविषय:
काव्यरस
एक बडबड गीत ............. बरं का ग मंदा काय झालं एकदा, ताई आमची चिरत होती खसाखसा कांदा . कांदा राहिला हातात विळी गेली बोटात विळी वरुन उठली, नाचत सुटली. धक्क्याने मोराम्ब्याची बरणीच फुटली. हाय हाय हाय काचेवरती पाय. काच गेली पायात आता करू तरी काय? बाबा हसले खो खो खो आई हसली खी खी खी ताईला आले रडू आईने दिला लाडू ---------------------------------------- आणि हे 'बेताल बरबाद गीत' ............. बऱ का गं जनता काय झालं एकदा मंत्री आमचे मोडत होते पटापटा कायदा. कायदा राहिला बुकात शिक्षा झाली कोकणात. हाय हाय हाय माझ्या पोराचे काय? पत गेली आता करू तरी काय? पदावरून उठले भांडत सुटले धक्क्

लटके आरोप ताठ मान !!

माहितगार ·
लेखनविषय:
काव्यरस
मच्छरांनो :) ससुलापंत दिसतो कसा ? जजाने कोठडीत ठेवलाय जसा ! ससुल्या गडी करतो कडी, काढीन म्हणतो न्यायाची खोडी ! तुमचं न्यायालय हवं कशाला ? मी चावलो, तो गुन्हेगार झाला ! गुन्हेगाराला चावून, काय गून्हा केला ? प्रसिद्धीत रहायचय पुन्हा त्याला ! तक्रार यांची, त्यांचेच चूक चावल्याने भागते लालसेची भूक ! ससुलाल नाटक करतो छान, लटके आरोप ताठ मान !! :)

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

प्यारे१ ·
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी.

टग्यामहाराज बारामतीकर

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
धरणात पाण्याचे अंमळ दुर्भिक्ष्य नष्ट करु पाहतो मुतोनिया विरोध करती नतद्रष्ट काही पण टग्यामहाराजांची दृष्ट काढा पिऊन 'सोडला' अवघा समुद्र ठेविली का नावे अगस्त्याला? वाहते करी पाणी बुच तोच मारी शिव्या ओव्या मानी तो सारख्या अगस्त्याचा अवतार टग्या बारामतीकर त्याला वंदावे पुन्हा पुन्हा

कंपासपेटी

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
तू मोज त्रिज्या, पण फार आक्रसू नकोस परीघ असं का बघते आहेस आश्चर्याने फिरव की तुझा हात पटापट तुझ्या वहीवर लिहून थांबू नकोस नाहीतर मी राहीन घुटमळत तुझ्यापाशी तो पर्यंत माझ्याही वहीवर उमटत नाहीत तुझी अक्षरे जो पर्यंत चल लवकर मोज व्यास दे उत्तर चटकन् उशीर करू नकोस फार वेळ नाही राहीलाय कारण . . . . . . . . . . . . . . . गधडे, मी कंपासपेटी घरीच विसरलोय.

आयचाघोरसचा सिद्धांत

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना तू माझा म सा वि(कायला) काढलास लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं चौकोनात फिरणार्‍या तुला वर्तुळात त्रिकोण काढून नव्वद अंशातून बगितलं हळूच टँजंट का मारलास मला? मी भेदतच होतो परिघ शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस? शेवटी कितीही वेगात फिरली तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो, (एको)

मी तुझा चंद्र झालो

मंदार दिलीप जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे. म्हणजे काहीच्या काही कविता आहे. त्यामुळे ह्या कवितेला "काहीच्या काही", "फालतू", "बंडल", "दर्जाहीन", "अभिरुचीहीन" यापैकी काहीही समजावे ;) - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - मी तुझा चंद्र झालो.... केव्हा काय विचारतेस? तोंड धुता धुता हळू हळू मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही तेव्हाच...

(कश्या कश्याला मुकलो ते...)

धन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो.. समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन. हाती पाण्याने भरलेला डबा. आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते.. माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले, कश्या कश्याला मुकलो ते...

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला - झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

माहितगार ·
काव्यरस
तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या तळटीप : नमस्कार हे उघड्या पुन्हा जहाल्या या उमाकांत काणेकर लिखीत गीताचे विडंबन आहे. हे विडबंन सुचण्यासाठी पळसाला पाने तीनच या मि.पा.