महाभारतातील व्यक्तिचित्रे-४ महारथी कर्ण

शरद's picture
शरद in काथ्याकूट
26 Apr 2012 - 7:37 am
गाभा: 

महारथी कर्ण

महाभारत कोणामुळे घडले ? बरेच जण द्रौपदीचे नाव घेतील पण तो मान जातो कर्णाकडेच. उत्तुंग प्रतिभेच्या भगवान व्यासांनी प्रथम आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्ण व कर्ण यांची व्यक्तिचित्रे उभी केली, त्यांचे गुणावगुण ठरविले व मगच महाभारताची रचना केली. पाच सज्जन पांडव व शंभर दुर्जन कौरव यांच्यातील भांडणाकरिता महाभारताची गरज नव्हती ; जय नावाचा इतिहास त्याला पुरेसा होता. श्रीकृष्ण निर्माण करतांना त्यांनी कृष्णाला दैवी गुण दिले पण द्रौपदीला वस्त्रे पुरवणे, विश्वरूपदर्शन , जयद्रथवध व मृत अभिमन्युपुत्राला जिवित करणे एवढे सोडले तर महाभारतात कृष्ण दैवी चमत्कार दाखवत नाही. तो शूर आहे, अस्त्रज्ञ आहे, नीतीनिपुण आहे, धार्मिक आहे,,, पण सर्वात जास्त महत्वाचे तो फार "लवचिक" आहे. इथे सत्याचा विजय होण्यासाठी कपटाचा वापर करावा लागतो हे त्याला उत्तम माहीत आहे व तसे करण्याचा सल्ला तो देतोही. भीष्म, कर्ण जशी टोकाची भुमिका घेतात तशी घेणे त्याला मंजूर नाही. त्याचे लक्ष "अंतिम साध्या" कडे असते. जरासंधाशी सतरा वेळा युद्ध करूनही तो संपत नाही म्हटल्यावर लोकसंहार टाळण्यासाठी त्याने द्वारकेची वाट धरली व पुढे भीमाकडून द्वंदयुद्धात जरासंधाला मारवले. कर्णाचे रेखाचित्र उभे करतांना व्यासांनी हात सैल सोडला. भरपूर सद्गुण दिले, तसेच दुर्गुणही, अगदी टोकाचे. बरे हे करतांना नियतीचे फासे असे टाकले की तुम्ही त्याच्याकडे नायक म्हणून बघू शकता, खलनायक म्हणूनही !

कौंतेय कर्ण वाढला राधेय म्हणून. अंतापर्यंत तो सूतपुत्र म्हणूनच ओळखला गेला. त्याची खरी ओळख त्याच्या आईला झाली तेव्हा उशीर झाला होता. रूढीचे चटके त्याला लहानपणापासूनच बसले असावेत. असावेत असे म्हणावयाचे कारण तसा उल्लेख महाभारतात सापडत नाही. सूत हे ब्राह्मण-क्षत्रियांएवढे उच्च वर्णाचे नव्हते तरी फार खालचे असेही नव्हते व आर्थिक दृष्ट्या कर्णाचे दिवस कष्टप्रद नक्कीच नसावेत. त्याचे युद्धकलेचे शिक्षण इतर सर्वसामान्य मुलांसारखेच झाले व त्याने आपल्या नैसर्गिक गुणांनी व अपार कष्टाने त्यात प्राविण्य मिळवले. पण ते इतरांच्या नजरेस आलेले दिसत नाही. शिष्यांच्या गुणप्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्याने आपले कौशल्य दाखविले व अर्जुनाला आव्हान दिले तेव्हा त्याला कोणीही ओळखत नाही. ( कुंती ओळखते ते आपला मुलगा म्हणून, चमकदार योद्धा महणून नव्हे)
शक्य आहे की त्याने या क्षणासाठी ते इतरांपासून मुद्दाम दडवून ठेवले होते. कर्णाने अर्जुनाला आव्हान दिल्यावर तो योग्य द्वंद्वी आहे की नाही हा मुद्दा निघतो. दुर्योधन कर्णाला अंग देशाचा राजा घोषित करतो व दोघांची आमरण गाढ मैत्री होते. अर्जुन-कर्ण यांचे युद्ध सुरू होणार तेव्हड्यात अधिरथ सूत तेथे येतो व कर्ण त्याला बाप म्हणून अभिवादन करतो. तो सूतपुत्र आहे हे कळल्यावर युद्ध होतच नाही. हा एक नियतीचा खेळ. जरा वेळ टळली असती तर कर्ण मेलाच असता कारण त्यावेळी अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होते, कर्णाकडे नव्हते. आता आपण प्रथम त्याचे गुणावगुण पाहू.
तो तेजस्वी, स्वकीयांवर प्रेम करणारा, परकीयांचा नाश करणारा, बुद्धिवान,बलवान, कर्तृत्ववान व सुंदर होता. तो जन्मजात कवचकुंडले घेऊनच आला.तो महान अस्त्रसंपन्न होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्र, भार्गवास्त्र, परशुरामाने दिलेले माहेश्वर धनुष्य होते. असामान्य शौर्य, अलौकिक दानप्रियता, सहनशीलता, समयज्ञता, दूरदर्शीपणा, गूणग्राहकता हे त्याचे इतर काही गुण.
त्याचे अवगुणही पराकोटीचे होते. आत्मकेंद्रियता, अहंकार, अमर्याद महत्वाकांक्षा, भांडखोरपणा, मत्सर, विशेषत: अर्जुनाचा व त्यामुळे अर्जुनाच्या गुणग्राहक लोकांबद्दल,( भीष्म, द्रोण,कृप, अश्वत्थामा इ.) तिटकारा हे त्याचे महत्वाचे दोष. स्वत:बद्दल सारखे प्रौढीने बोलणे हे त्याच्या पाचवीला पुजले होते. यामुळे इतरांची समजुत घालत बसणे हे दुर्योधनाचे एक कामच होऊन बसले होते ! या दोषांचा परिपाक म्हणजे त्याच्या मनाचा हलकेपणा. द्युताच्या वेळी हा नीचपणा त्याला नराधम म्हणावे या टोकाला पोचला . हे गुणदोष पुढील माहित्तीत स्पष्ट होतीलच.

अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, ते आपल्याकडे नाही व त्यामुळे तो आपल्यापेक्षा वरचढच राहणार हे ध्यानात घेऊन
कर्णाने द्रोणांकडे जाऊन ते शिकवावयाची विनंती केली. त्याच वेळी अर्जुनाचा पराभव करण्यासाठी ते पाहिजे हेही सांगितले. द्रोणांनी त्याची इच्छा कळल्यावर त्याला ते देण्याचे नाकारले. कारण मात्र दिले की मी फक्त क्षत्रिय व ब्राह्मणालाच ते देतो. भडकलेल्या कर्णाने आता थेट परशुरामांकडेच जावयाचे ठरविले. मात्र इथेही आपली जात आडवी येऊ नये म्हणून त्याने परशुरामांना सांगितले की मी भार्गवगोत्री ब्राह्मण आहे.त्याची सेवावृत्ती, अपार गुरुनिष्ठा, कष्ट करावयाची तयारी पाहून परशुराम प्रसन्न झाले. त्यांनी कर्णाला सर्व अस्त्रे व आपले माहेश्वर धनुष्यही दिले. याच काळात धनुर्विद्येचा सराव करत असतांना कर्णाच्या हातून एका ब्राह्मणाच्या गाईची हत्या झाली. ब्राह्मणाने त्याला शाप दिला की " ज्याच्याशी तू स्पर्धा करत आहेस, त्याच्याशी युद्ध करत असतांना तुझ्या रथाचे चाक पृथ्वी गिळून टाकील व तुझा शत्रु तुझ्या अडचणीचा फायदा घेऊन तुझा शिरच्छेद करील ". एवढ्याने कर्णाचे दुर्दैव संपले नाही. एके दिवशी तो व परशुराम हिंडत असतांना राम थकून जाऊन कर्णाच्या मांडीवर डोके ठेऊन झोपले. तेव्हढ्यात एका किड्याने कर्णाच्या मांडीला दंश केला. गुरुजींची झोप मोडू नये म्हणून कर्णाने किडा हाकलला नाही. किड्याने कर्णाच्या मांडीला भोक पाडले व त्यातून रक्त वाहू लागले. तरीही अपार वेदना सहन करित कर्ण स्तब्धच राहिला. रक्त वहात वहात परशुरामांपर्यंत पोचले व ते जागे झाले. झाला प्रकार पाहून त्यांना संशय आला. ते म्हणाले " ब्राह्मण इतक्या वेदना सहन करणे शक्य नाही, तू कोण आहेस ?" कर्ण म्हणाला " मी सूतपुत्र आहे. पण वेद देणारा गुरु बापच असतो. तुम्ही मला धनुर्वेद दिला म्हणून तुम्ही माझे पिताच आहात. म्हणून मी तुम्हाला मी भार्गवगोत्री ब्राह्मण असल्याचे सांगितले. " परशुराम रागावले पण कर्णाच्या असीम गुरुनिष्ठेने प्रसन्नही झाले. ते म्हणाले " कपटाने मिळवलेले ब्रह्मास्त्र मरणघटकेपर्यंत जवळ राहणे शक्य नाही. तेव्हा अंतिम काळी तू ते विसरशील. पण तोवर तुला त्याचा उपयोग करता येईल." शापित अस्त्रे घेऊन कर्ण परतला.

कलिंग राजाच्या मुलीच्या स्वयंवारात कर्णाने दुर्योधनाकरिता जमलेल्या राजांचा पराभव केला. त्या वेळी त्याने मल्लयुद्धात सम्राट जरासंधाचा पराभव केला. सर्व भारतात कर्णाचे नाव गाजवावयास हा एक विजय पुरेसा होता. राजसूय यज्ञाच्या वेळी भीमाला त्याने करभार देऊन बचाव केला. तो तसे न करता तर यादवांसमवेत भारतातील सर्व राजे युधिष्ठिराबरोबर त्याच्याशी लढावयास आले असते . तो भांडण न उकरता समयसुचकता दाखवितो. तसेच दुर्योधनासाठी केलेया दिग्विजयाच्या वेळी तो यादवांशी सामोपचाराने वागतो. नच तर त्याच वेळी पांडवांवरील अन्यायाने रागावलेल्या यादवांनी त्याला नाहिसे केले असते. ही त्याची राजकीय सुजाणता.

कर्ण आणि अर्जुन
कादंबर्‍या वाचून अशी समजुत होण्याची शक्यता आहे की कर्ण अर्जुनापेक्षा जास्त शूर होता व केवळ कृष्णाच्या सहाय्याने अर्जुनाने कपटाने कर्णाला मारले. साफ चूक. अर्जुन एकाही युद्धात हरलेला नाही.( भगवान शंकरांबरोबरचे युद्ध सोडा, तो एक रडीचा डाव होता. आता तुम्ही टाकलेले प्रत्येक शस्त्र, अस्त्र समोरचा गिळूनच टाकू लागला तर त्याला काय युद्ध म्हणावयाचे ? तरीही अर्जुन धनुष्यही उरले नाही तेव्हा नि:शस्त्र युद्ध, मल्लयुद्ध करू लागला.) कृष्ण नसतांनाही आणि कर्णाकडे कवचकुंडले असतांनाही अर्जुनाने कर्णाला दोन्दा हरवले आहे.
आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई. कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी ब्राह्मण वेषातील अर्जुनाबरोबर झालेली लढाई. कर्णाला माघार घ्यावी लागते. घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो. गोग्रहणाच्यावेळी अर्जुनाशी झालेली लढाई. कर्णाला तीन वेळा माघार घ्यावी लागते. शेवटी संमोहन अस्त्रामुळे बेशुद्ध झाल्यावर उत्तर त्याचेही वस्त्र काढून नेतो. शेवटच्या युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता. दु:शासन वधाच्या वेळी भीम सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला मारून मी त्याचे रक्त पिणार आहे, शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर होता पण तो भीमाला आवरू शकला नाही.तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली. अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी नसतांना तुम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी तुझ्या पुत्राला ठार मारणार आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही. यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. वर दोन उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे अशी कबूली त्याव्या दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म यांनी. तेव्हा त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याने भीम, युधिष्ठिर, नकुल व सहदेव यांना जिंकून जिवंत सोडून दिले आहे. घटोत्कचासारख्या केवळ अजिंक्य राक्षसाला तोच मारू शकला. त्याचे व अर्जुनाचे युद्ध म्हणजे इन्द्र-वृत्राचेच युद्ध असे कृष्ण म्हणतो. या सगळ्याचा अर्थ लावणे थोडे अवघडच वाटते. व्यासांनी गणपतीला कोडी घातली, तसेच वाचकांना घातलेले हे एक कोडे.

दानशूरता
जसा "रामबाण", जशी " भीष्मप्रतिज्ञा " तशी कर्णासारखी " दानशूरता " ! भारतीय इतिहासात दान देणे हा एक रक्तात रुजलेला भाग आहे. सर्वस्व देणारे राजे कितीतरी सापडतील. परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून ती कश्यपाला दान दिली. आणि मग कश्यपाने जेव्हा सांगितले " आता फूट, माझ्या पृथ्वीवर तुला जागा नाही "
तेव्हा निमुटपणे समुद्राला हटवून आपल्या आश्रमापुरती जागा मिळवली. पण नाव झाले ते एका कर्णाचेच.
सकाळी सूर्याची आराधना करतांना येणार्‍या याचकाने काहीही मागितले तरी ते देण्याची कर्णाची प्रतिज्ञा. इन्द्राने याचा फायदा घ्यावयाचे ठरवून त्याची कवचकुंडले मागावयाचे ठरविले. सूर्याला याचा पत्ता लागल्यावर
त्याने रात्री कर्णाच्या स्वप्नात येऊन त्याची कल्पना दिली व इन्द्राला हाकलून दे असे सांगितले. कवचकुंडले दिल्यावर आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असूनही कर्ण सूर्याला सांगतो की "मरण पत्करले, पण मी वचन मोडले ही अपकीर्ती मला मान्य नाही ". शेवटी मिनतवारीने कर्णाने कबूल केले की मी इन्द्राकडे अमोघ शक्ती मागेन. प्राणाची पर्वा न करता दिलेले हे दान एकमेव.

आत्मप्रौढी व भांडकुदळपणा
पहिल्यापासून पराकाष्टेची आत्मकेंद्रियता हा कर्णाचा मोठा दुर्गुण दिसून येतो. त्यामुळे आत्मप्रौढी वाढली. तो कायमच मी किती श्रेष्ठ, अर्जुनाला मी एकटाच संपवून टाकतो, अशा वल्गना करीत असतो. त्यामुळे दुर्योधनाला व सामान्य सैनिकांना तो खरेच तसे करून दाखवेल अशी खात्री वाटत होती. प्रत्यक्षात तसे जरी घडून आले नाही तरी त्याच्या वल्गना चालूच असत. भीष्म-द्रोण-कृप यांना त्याची कल्पना असल्याने ते नेहमीच त्याचा फुगा फोडत. कर्ण त्यांचावर तोंडसुख घेई व दुर्योधनाला निस्तारत बसावयाची पाळी येई. ऐन युद्धाच्यावेळी अशा प्रसंगी अश्वत्थामा इतका भडकला की तो कर्णाला मारावयासच निघाला होता ! भीष्मांनी त्याला अर्धरथी ठरवल्यावर त्याने भीष्म मरेपर्यंत मी लढणारच नाही असे सांगितले व कौरवांचे नुकसानच केले.

समयसुचितपणा
भीष्मपतनानंतर सर्व सैनिक कर्णाला सेनापति हो म्हणत होते व दुर्योधनाचीही तशीच इच्छा होती. पण बरोबरीच्या इतर राजांना ते पटणार नाही व ते मनापासून युद्ध करणार नाहीत याची जाणिव असल्याने कर्णाने द्रोणांना सेनापति करावयास सांगितले. तो म्हणतो " सर्व समान राजांपैकी एकाला सेनापती केले तर असंतोष निर्माण होईल. त्या ऐवजी सर्वांचे गुरु असलेल्या द्रोणाचार्यांना सेनापती करा." नेहमी द्रोणांचा अधिक्षेप करणार्‍या कर्णाने यावेळी योग्य राजकीय खेळी केली.

गुणग्राहकता
भीष्मपतनानंतर कर्ण त्यांना वंदन करावयास गेला व ढसाढसा रडत त्याने शोक व्यक्त केला. अखेरीस त्याने युधिष्ठिराची धर्मप्रियता व अर्जुनाचे युद्धकौशल्यही मान्य केले आहे.

मित्रप्रेम
युद्धाच्या आधी श्रीकृष्णाने त्याला एकांतात तो कुंतीचा पुत्र आहे व तो राज्याचा अधिकारी असून तो सिंहासनावर बसेल व पांडव त्याची सेवा करतील असे सांगितले. पण कर्णाने त्याला स्पष्ट नकार दिला. दुर्योधना्ला सोडून सम्राट होणे त्याने नाकारले. कुंतीला तो म्हणतो, " मला लहानपणीच मारून टाकले असतेस तर बरे झाले असते. आता फार उशीर झाला आहे. " तरीही आईला शेवटी वचन देतो की धर्म, भी, नकुल व सहदेव यांनी मी मारणार नाही, तुझे पाच पुत्र जिवंत राहतील."

मनाचा हीनपणा
द्युतप्रसंगी तो इतका नीचपणे वागतो की चांडाळचौकडीत सर्वात हीन कोण हे ठरवणे कठीण जावे.
दु:शासनाच्या अधमपणाला प्रत्येक वेळी त्याचीच फूस आहे. बटकीशी बोलतांनाही शरम वाटावी असे उद्गार तो काढतो. केवळ या एका प्रसंगामुळे त्याचा करूण शेवटही कमीच झाला असे म्हणावे लागते. "वनात पांडव
असतांना तेरा वर्षे कशास थांबावयाचे ? आताच जाऊन कृष्णाला कळावयाच्या आधीच ते असहाय्य आहेत तोवर त्यांचा निकाल लावून टाकू " असा मनाचा हलकेपणा तो दाखवितो.

कर्णाबद्दल शोक व्यक्त करणार्‍या युधिष्टिराला नारद काय सांगतात ते पाहून इथे थांबू . " राजा, शोक आवर. तुझा भाऊ दुर्दैवी होता. कोणा एका व्यक्तीला (कुंतीला) दोष देण्यात अर्थ नाही. सर्व क्षत्रियांना युद्धात मृत्यु येऊन स्वर्ग मिळावा म्हणूनच दैवाने त्याची योजना केली होती."

शेवटचा अर्जुनावरचा लेख लिहून आपण महाभारतावरील लेखमाला थांबवू.

शरद

प्रतिक्रिया

इरसाल's picture

26 Apr 2012 - 10:10 am | इरसाल

कृपया लेखमाला थांबवु नये ही विनंती.अतिशय छान लिहीत आहात.

इरसाल's picture

26 Apr 2012 - 10:21 am | इरसाल

डआम्हूकाटा

शिल्पा ब's picture

26 Apr 2012 - 10:22 am | शिल्पा ब

परस्परविरोधी विधानं बरीच आहेत. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की तुम्ही चमत्कार, अस्त्र, व्यासांची कल्पनाभरारी काय असु शकते यावर चर्चा कराल, तुमची मते मांडाल. असो.

श्रीरंग's picture

26 Apr 2012 - 10:26 am | श्रीरंग

लेखमाला एवढ्यात थांबवू नका अशी विनंती करतो. महाभारतातील इतर व्यक्तिचित्रांबद्दल तुमचे अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला आवडेल.

मृगनयनी's picture

26 Apr 2012 - 12:16 pm | मृगनयनी

लेखमाला एवढ्यात थांबवू नका अशी विनंती करतो. महाभारतातील इतर व्यक्तिचित्रांबद्दल तुमचे अभ्यासपूर्ण लिखाण वाचायला आवडेल.

सहमत!.. पाच पांडवांबरोबरच गान्धारी, धृतराष्ट्र, द्रोणाचार्यादि कमी फोकस झालेल्या व्यक्तिरेखांबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल!!! :)

महारथी कर्ण म्हणजे - "पंकज धीर" , दुर्योधन म्हणजे "पुनीत इस्सार", द्रौपदी म्हणजे खप्पड गालांची- "रुपा गांगुली".... भीष्म म्हणजे- शक्तिमान- "मुकेशजी खन्ना" ....हे लहानपणापासून आमच्या डोक्यात इतकं ठसलं होतं.. की रामाचे स्मरण करताना डोळ्यांसमोर पहिली प्रतिमा- रामायणातल्या "अरुण गोविल"चीच यायची.. (रिअल लाईफमध्ये तो चेन स्मोकर होता, हे माहित असूनही!!! :))..

आणि "सीता" म्हणलं.. की 'पारखी नजर आणि निरमा सुपर'वाली "दीपिका"च आठवते. (सिरियल चालू असताना...या दीपिकेचे आणि भरता'ची भूमिका करणार्‍या 'सन्जय जोग' चे ऑफ्फ्स्क्रीन अफेअर होते... हे माहित असूनही!!! ;) )

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 10:49 am | मृत्युन्जय

आता आपण कर्णाने लढलेली युद्धे पाहू. शिकावू काळात द्रुपदाबरोबरची लढाई. कौरवांबरोबर कर्णालाही पळून जावे लागले.

यात कर्ण होता हेच मान्य नाही. मूळ महाभारत हे मानले जाते ते याबाबत खुप संदिग्ध आहे. किंबहुना असे म्हणण्यास वाव आहे की या युद्धात कर्णाने भागच घेतला नाही. यात केवळ कौरव आणि पांदव होते.

घोषयात्रेच्यावेळी चित्रसेन गंधर्वा बरोबर झालेली लढाई. चित्रसेनाच्या दैविक अस्त्रांपुढे कर्णाची मानुष अस्त्रे टिकाव धरू शकली नाहीत.( असे दिसते की एकाच अस्त्राचा प्रभाव सारखा नसावा. नाही तर अर्जुन सर्व अस्त्रे पृथ्वीवर माहीत झाली असतांना परत तीच शिकण्यासाठी स्वर्गात गेला नसता.माणसाकडून शिकले ते मानुष अस्त्र, देवाकडून शिकले की तेच दैविक अस्त्र. दैविक अस्त्र जास्त पावरबाज !) कर्ण पळून जातो.

चित्रसेनाला अर्जुनानेही हरवले नाहीच. ती लुटुपुटीची लढाई होती. दोघेही आधी ठरल्याप्रमाणे लढले. चित्रसेन खोटेखोटेच हारला आणि मग दुर्योधनाला सोडवण्याचे श्रेय अर्जुनाने फुकट मिळवले.

शेवटच्या युद्धात कर्ण एकूण सात दिवस लढतो. तेवढ्यात तो सात्यकी, भीम, अभिमन्यु एवढ्यांबरोबरच्या लढायांमध्ये हरतो, इन्द्राने दिलेली वासवी शक्ति नसती तर तो घटोत्कचाबरोबरच्या लढाईत हरल्यातच जमा होता.

हे पण मान्य नाही. कर्ण त्या संपुर्ण लढाईत , जी बर्‍याच भागात विभागली गेली आहे, कारण मधुनच घटोत्कच अलंबुसाशी लढतो मग त्याला मारुन अश्वत्थाम्याकडे वळतो मग त्याला दुसर्‍यावर सोपवुन कर्णाकडे वळातो मग परत कर्णावर इतर जणा धावुन येतात तसे तो परत अश्वत्थाम्याकडे वळतो. त्यानंतर अश्वत्थाम्यावर इतर जण धावुन गेल्यावर आणी अश्वत्थाम्याने देखील त्याला परत फिरण्याचा सल्ला दिल्यावर तो परत कर्णाकडे वळतो. या सर्व प्रकारात तो ३-४ वेळा कर्णाशी लढतो आणि प्रत्येक वेळेस हारतो. कर्णाकडे वासवी शक्ती होती. त्याने ती वापरली. पण त्या व्यतिरिक्तही त्याच्याकडे इतर बरीच अस्त्रे होती ज्यामुळे एकास एक लढाईत तो घटोत्कचाला भारीच होता. पण साईड बिझिनेस म्हणुन अदृश्य होउन ज्या वेगाने घटोत्कच इतर कौरव सेना मारत होता ते बघता कर्णाकडे दूसरा पर्याय नव्हता.

दु:शासन वधाच्या वेळी भीम सर्वांना आव्हान देतो की "या दुष्टाला मारून मी त्याचे रक्त पिणार आहे, शक्य असेल तर याला वाचवा !" कर्ण समोर होता पण तो भीमाला आवरू शकला नाही.

ह्म्म. कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा.

तीच गोष्ट जयद्रथवधाच्या वेळी घडली.

हे खुपच अक्स्मात घडले. सर्व यौद्धे शस्त्रे खाली ठेवुन उतरले असणार. आणि अकस्मात अर्जुनाने पवित्रा बदलुन चितेवरुन जर बाण मारला तर तो रोखणे फारसे कोणाच्या हातात नव्हतेच.

अर्जुनाने कर्णाला सांगितले " मी नसतांना तुम्ही सर्वांनी अभिमन्यूला मारलेत. कर्णा, आज तुझ्यासमोर मी तुझ्या पुत्राला ठार मारणार आहे, शक्य असेल तर त्याला वाचव." कर्ण आपल्या पुत्राला वाचवू शकला नाही.

कर्ण त्यावेळेस इतरांशी लढत होता. वृषसेन स्वत: पराक्रमी होता. अर्जुनाने त्याला मारण्या आधी त्याने भीम. नकुल, सहदेव आणी द्रौपदीच्या पाचही मुलांना सहज हरवले होते आणि अर्जुन मध्ये पडला नसता तर बापाने जीवदान दिलेला नकुल त्या दिवशी वृषसेनाने टिपला असता. त्यामुळे कर्ण थोडाफार नि:शंक असावा.

यावरून कर्णाच्या शौर्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. वर दोन उदाहरणे दिली आहेत. तो अर्जुनाच्या बरोबरीचा योद्धा आहे अशी कबूली त्याव्या दोन कट्टर विरोधकांनी दिली आहे. श्रीकृष्ण व भीष्म यांनी.

युधिष्ठिराने देखील कैकवेळा. शिवाय तुम्ही भार्गव अस्त्राचा प्रयोग विसरलात बहुधा. अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.

५० फक्त's picture

26 Apr 2012 - 11:31 am | ५० फक्त

आयला, मग आजचं राजकारण यापेक्षा काय वेगळं असतं, फरक फक्त अस्त्रांचा अजुन काय, बाकी सगळं तेच, तीच सत्त्ता, त्याव बायका अन तेच पुरुष, मध्ये मध्ये उगाचच आपण काहीतरी आउट ऑफ बॉक्स करतोय अशी भावना होते, असं काही वाचलं की तो भार ओसरतो.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 11:40 am | मृत्युन्जय

हे एकुण काय वाचुन अशी भावना झाली तुमची?

यात कर्ण होता हेच मान्य नाही. मूळ महाभारत हे मानले जाते ते याबाबत खुप संदिग्ध आहे. किंबहुना असे म्हणण्यास वाव आहे की या युद्धात कर्णाने भागच घेतला नाही. यात केवळ कौरव आणि पांडव होते.

बा मृत्युन्जया, तू जे महाभारत संदर्भ म्हणून वापरतोस, जी प्रत मूळ महाभारत म्हणून वापरली जाते त्या किसारी मोहन गांगुली कृत भाषांतरात हा उल्लेख आहे. म्हणजे आपल्या सोयीचे ते घ्यायचे, गैरसोयीचे ते नाही असे काहीसे आहे काय?
to afflict the hostile ranks with greater vigour. And careering over the field of battle like a fiery wheel, king Drupada with his arrows smote Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic princes and numberless warriors, and slaked their thirst for battle.

चित्रसेनाला अर्जुनानेही हरवले नाहीच. ती लुटुपुटीची लढाई होती. दोघेही आधी ठरल्याप्रमाणे लढले. चित्रसेन खोटेखोटेच हारला आणि मग दुर्योधनाला सोडवण्याचे श्रेय अर्जुनाने फुकट मिळवले.

हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई होती हे कशावरून?
ठीक. जरी लुटुपुटीची असली तरी आधी झालेली चित्रसेन आणि कौरवांची तर खरीच होती ना. त्यात कर्णाने पळ काढला हे तरी सत्य ना?

पण त्या व्यतिरिक्तही त्याच्याकडे इतर बरीच अस्त्रे होती ज्यामुळे एकास एक लढाईत तो घटोत्कचाला भारीच होता.

या मुद्द्याशी सहमत.

कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा.

अभिमन्यू वधाच्या वेळी हाच कर्ण त्या सहा महारथ्यांमध्ये सामील होता. दु:शासनवधाच्या वेळचा भीमाचा आवेश पाहूनच तो स्तंभित झाला असावा.

अकस्मात अर्जुनाने पवित्रा बदलुन चितेवरुन जर बाण मारला तर तो रोखणे फारसे कोणाच्या हातात नव्हतेच.

मान्य. अर्जुनाला त्यावेळी रोखणे कुणाला शक्य नव्हतेच पण इतर जण त्यावेळी निशस्त्र असावेत हे विधान जरा धाडसीच आहे. महाभारतात याचा कसलाही उल्लेख नाही.

त्यामुळे कर्ण थोडाफार नि:शंक असावा.

सहमत. पण कर्णाच्या डोळ्यांदेखतच अर्जुनाने वृषसेनाचा वध केला.

युधिष्ठिराने देखील कैकवेळा

सहमत. किंबहुना कर्णाद्वारे पराभूत होउन लज्जित झालेल्या युधिष्ठिराने गांडीव फेकून दे असे त्राग्याने अर्जुनाला म्हटले होते. यावरून दोघांत पेटलेले भांडण कृष्णाने मोठ्या खुबीने सोडवले होते.

अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.

याबद्दल अधिक माहिती देशील काय?

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 1:30 pm | मृत्युन्जय

मित्रा तु लोकांना पॉपकॉर्न घेउन झाडावर चढायला लावणारसे दिसते आहे. एकेका प्रश्नाच्या उत्तरासाठी एक धागा निघेल रे. पण तरीही प्रतिसादातुनच उत्तर देतो. जरा थोडा वेळ दे.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 2:15 pm | मृत्युन्जय

to afflict the hostile ranks with greater vigour. And careering over the field of battle like a fiery wheel, king Drupada with his arrows smote Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic princes and numberless warriors, and slaked their thirst for battle.

बरोबर कर्णाचा उल्लेख आहे. पण हा कर्ण सुतपुत्र, राधेय कर्ण आहे असा कुठे उल्लेख आहे का? इतर सर्व ठिकाणी त्याचा उल्लेख son of Radha किंवा son of Vikartana किंवा suta's son असा येतो. त्यावेळेस या शंकेला जागा उरत नाही की तो "कर्ण" च आहे. पण जेव्हा असा उल्लेख नसतो तेव्हा जरा तपासून पहावे लागते.

का? तर त्याचे कारण असे आहे की महाभारतात ३ कर्ण आहेत. यापैकी वसुषेणाचे नाव कर्ण त्याने त्याची जन्मजात कुंडले इंद्राला दिल्यानंतर पडले. उरलेले २ कोण आहेत हे पाहिल्यास मौज वाटेल. पहिला होता युयुत्सु ज्याचे दूसरे नाव कर्ण होते आणि दूसरा होता धृतराष्ट्रपुत्र कर्ण . धृतराष्ट्र आणि गांधारीचा १८ वा पुत्र. धृतराष्ट्राची १०० मुले खालीलप्रमाणे:

"Vaisampayana said, 'O king, they are as follows: Duryodhana, and
Yuyutsu, and also Duhsasana; Duhsaha and Duhshala, and then Durmukha;
Vivinsati, and Vikarna, Jalasandha, Sulochna, Vinda and Anuvinda,
Durdharsha, Suvahu, Dushpradharshana; Durmarshana, and Dushkarna, and
Karna; Chitra and Vipachitra, Chitraksha, Charuchitra, and Angada,
Durmada, and Dushpradharsha, Vivitsu, Vikata, Sama; Urananabha, and
Padmanabha, Nanda and Upanandaka; Sanapati, Sushena, Kundodara; Mahodara;
Chitravahu, and Chitravarman, Suvarman, Durvirochana; Ayovahu, Mahavahu,
Chitrachapa and Sukundala, Bhimavega, Bhimavala, Valaki, Bhimavikrama,
Ugrayudha, Bhimaeara, Kanakayu, Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra
Somakirti, Anadara; Jarasandha, Dridhasandha, Satyasandha, Sahasravaeh;
Ugrasravas, Ugrasena, and Kshemamurti; Aprajita, Panditaka, Visalaksha,
Duradhara, Dridhahasta, and Suhasta, Vatavega, and Suvarchasa;
Adityaketu, Vahvasin, Nagadatta and Anuyaina; Nishangi, Kuvachi, Dandi,
Dandadhara, Dhanugraha; Ugra, Bhimaratha, Vira, Viravahu, Alolupa;
Abhaya, and Raudrakarman, also he who was Dridharatha; Anadhrishya,

नीट बघता वरील यादीत ९८ च नावे आहेत. २ नावे व्यासांनी गाळली. इतर एके ठिकाणी दिलेली नावे बघा:

Janamejaya said, 'Please recite the names of Dhritarashtra's sons
according to the order of their birth.'
"Vaisampayana said, 'Their names, O king, according to the order of
birth, are Duryodhana, Yuyutsu, Duhsasana, Duhsaha, Duhsala, Jalasandha,
Sama, Saha, Vinda and Anuvinda, Durdharsha, Suvahu, Dushpradharshana,
Durmarshana and Durmukha, Dushkarna, and Karna; Vivinsati and Vikarna,
Sala, Satwa, Sulochana, Chitra and Upachitra, Chitraksha, Charuchitra,
Sarasana, Durmada and Durvigaha, Vivitsu, Vikatanana; Urnanabha and
Sunabha, then Nandaka and Upanandaka; Chitravana, Chitravarman, Suvarman,
Durvimochana; Ayovahu, Mahavahu, Chitranga, Chitrakundala, Bhimavega,
Bhimavala, Balaki, Balavardhana, Ugrayudha; Bhima, Karna, Kanakaya,
Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra, Somakitri, Anudara;
Dridhasandha, Jarasandha, Satyasandha, Sada, Suvak, Ugrasravas, Ugrasena,
Senani, Dushparajaya, Aparajita, Kundasayin, Visalaksha, Duradhara;
Dridhahasta, Suhasta, Vatavega, and Suvarchas; Adityaketu, Vahvashin,
Nagadatta, Agrayayin; Kavachin, Krathana, Kunda, Kundadhara, Dhanurdhara;
the heroes, Ugra and Bhimaratha, Viravahu, Alolupa; Abhaya, and
Raudrakarman, and Dridharatha; Anadhrishya, Kundabhedin, Viravi,
Dhirghalochana Pramatha, and Pramathi and the powerful Dhirgharoma;
Dirghavahu, Mahavahu, Vyudhoru, Kanakadhvaja; Kundasi and Virajas.
Besides these hundred sons, there was a daughter named Duhsala.

यात १०२ नावे आहेत. कारण? कर्णाचे नाव २दा आहे. आता ज्याचे नाव २ दा घेतले तो व्यासांना किती महत्वाचा वाटला असेल बघा. :P

थोडक्यात सांगायचे तर धृतराष्ट्राचा एक मुलगा कर्ण नावाचा होता आणि तो द्रुपदाविरुद्ध निंसंशय लढला असणार.

आता तु दिलेला परिच्छेद बघ रे जरा:

Duryodhana and Vikarna and even the mighty Karna and many other heroic princes

इथे काय म्हटले आहे? दुर्योधन, विकर्ण, कर्ण आणि इतर बरेच राजपुत्र. याचा अर्थ पहिले ३ राजपुत्र होते. कर्ण राजपुत्र होता का?

आता पुढचा परिच्छेद वाचः

And Duryodhana and Karna and the mighty Yuyutsu, and Duhsasana and Vikarna and Jalasandha and Sulochana,--these and many other foremost of Kshatriya princes of great prowess, vied with
one another in becoming the foremost in the attack.

यात फक्त ७ लोकांची नावे दिली आहेत. इतरांची का नाहित? जन्माच्या क्रमांकानुसार ही नावे नाहित. दुर्योधन दु:शासन आणी युयुत्सु समजु शकतो कारण ते तिघे सगळ्यात मोठे. पण मग मधुनच जलासंध आणि सुलोचन का आले? अर्थ सरळ आहे. कौरवांकडुन फक्त हे ७ च जण लढले. इतर ९३ कौरव लढलेच नाहित. दुर्योधनाने त्यांना जमेस धरले नव्हते. जसे पांडवांनी युधिष्ठिराला जमेस धरले नाही आणी त्याला युद्धभूमीपासून दूरच रहायला सांगितले.

बर आता हे वाक्य पहा "these and many other foremost of Kshatriya princes"" these शब्दातुन काय सूचित होते? की पहिले ७ जण राजपुत्र होते. कर्ण राजपुत्र होता का?

आता तु म्हणशील की ७ च जणांची नावे लिहिली आहेत कारण ते ७ जण सर्वात पराक्रमी होते. तर खालचा परिच्छेद वाचः

And amongst those hundred and one, eleven, viz., Duhsasana, Duhsaha, Durmarshana, Vikarna, Chitrasena, Vivinsati, Jaya, Satyavrata, Purumitra, and Yuyutsu by a Vaisya wife, were all Maharathas

जय, सत्यव्रता, पुरुमित्र, दुर्मशणा, चित्रसेन, विविसांती, दःसहा हे सात जण महारथी होते. म्हणजे इतरांपेक्षा अधिक चांगले यौद्धे. नावेच लिहायची तर यांची लिहिली असती. पण ते लढलेच नाहित म्हणुन त्यांची नावे नाहित.

तर थोडक्यात सांगायचे तर त्या युद्धात ज्या लोकांनी भाग घेतला त्यात कर्ण नावाचा एक राजपुत्र होता आणि राधेचा मुलगा राजपुत्र नसल्यामुळे त्या युद्धात तो हारला असे म्हणताच येणार नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे भीष्म आणि द्रोण आयुष्यभर कर्णाला त्याचे दोष दाखवत खिजवत राहिले. त्यात त्यांनी चित्रसेन गंधर्वाकडुन झालेला पराभव त्याला प्रत्येक वेळेस आठवुन दिला. एकदाही त्यांनी द्रुपदाकडुन तो हारला हे सांगितले नाही.

महाभारतात इतर सर्वत्र कर्ण कधी कधी हारला हे सर्व पात्रे सांगत राहतात. द्रुपदाकडुन हारल्याचे मात्र कुठलेच उदाहरण नाही

दिग्विजयादरम्यान कर्णाने द्रुपद, द्रुष्टद्युम्न, सत्यजित, शिखडी, उत्तमौजा, युधामन्यु इत्यादी सर्व महारथी, अतिरथी असताना द्रुपदाला हरवले. तेव्हा तो एकटा होता. मग इतर लोक मदतीला असताना तो द्रुपदाकडुन इतका सहजी कसा हरेल?

स्पा's picture

26 Apr 2012 - 2:26 pm | स्पा

वा मृत्युंजय जियो...

आज आपल्या अमर विश्वास ची आठवण करून दिलीस गड्या...

आता बोला दीक्षित.. अर्र वल्ली काका ;)

हॅहॅहॅ.
बरेच खोदकाम केलेस की रे. :)

व्यासांनी मग mighty karna असे का म्हटले असावे. अजिंक्य, महाशूर ह्या अर्थाने जर हा शब्द घेतला तर तर ह्या धार्तराष्ट्र कर्णाच्या पराक्रमाचा पुढेही फारसा उल्लेख येत नाही.
महाभारत मोठे गहन आहे हेच खरे.

तुझं म्हणणं काही अंशी पटतय. त्यावेळी सर्व कौरव पांडव कुमारवयीन असल्याने वैकर्तन कर्ण त्यात नसूही शकेल. तसाही द्रोणांनी त्याच्या शिष्य म्हणून स्वीकार केला नव्हताच. त्यावेळी तो परशुरामाकडे धनुर्वेद शिकत असेलही.

पण मुळात व्यास 'व्यासांनी मग mighty karna असे का म्हटले असावे'' असे इंग्लिश मध्ये का बोलले असतील का विमानं मिस्साईल , अणु, रेणु, गुणू, चणु या प्रकारे इंग्लीश सुद्धा भारतात प्राचीन काळी अस्तित्वात होती .? जाणकार / भाषांतरकार / भाषांतर्नकार कोणी याचं उत्तर देईल काय.

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 4:52 pm | प्रचेतस

_/\_
आवरा हो ५०. मरतोय मी आता.

गणपा's picture

27 Apr 2012 - 1:27 pm | गणपा

मुजरा स्विकारावा मालक.

:)

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 2:22 pm | मृत्युन्जय

हेही तसेच, ही लुटुपुटीची लढाई होती हे कशावरून?

हे घे. हा चित्रसेन अर्जुनाचा मित्रच होता. त्याला अर्जुनाबद्दल ममत्व होते आणि त्यानेच अर्जुनाला नाच शिकवला जो त्याला नंतर अज्ञातवासात उपयोगी पडला:

After some time, when Arjuna had obtained all the weapons. Indra
addressed him in due time, saying, 'O son of Kunti, learn thou music and
dancing from Chitrasena. Learn the instrumental music that is current
among the celestials and which existeth not in the world of men, for, O
son of Kunti, it will be to thy benefit. And Purandara gave Chitrasena as
a friend unto Arjuna. And the son of Pritha lived happily in peace with
Chitrasena. And Chitrasena instructed Arjuna all the while in music;

दोघे मित्र होते त्यामुळे ते खरेखुरे लढलेच नाहित.

ठीक. जरी लुटुपुटीची असली तरी आधी झालेली चित्रसेन आणि कौरवांची तर खरीच होती ना. त्यात कर्णाने पळ काढला हे तरी सत्य ना?

ऑं ??? हे कधी अमान्य केले मी. हारलाच की तो. त्याने पळ काढला नाही असे मी कुठे लिहिले आहे काय?

दोघे मित्र होते त्यामुळे ते खरेखुरे लढलेच नाहित.

पटत नाही.
कारण लढाईत पांडवांनी बरेच गंधर्व मारले होते.
hen Arjuna whose ire had been provoked, aiming at the angry Gandharvas, prepared to hurl against them his celestial weapons. And in that encounter, the mighty Arjuna, by means of his Agneya weapon, sent ten hundreds of thousands of Gandharvas to the abode of Yama. And that mighty bowman, Bhima, also, that foremost of all warriors in battle, slew, by means of his sharp arrows, Gandharvas by hundreds. And the mighty sons of Madri also, battling with vigour, encountered hundreds of Gandharvas, O king, and slaughtered them all. And as Gandharvas were being thus slaughtered by the mighty warriors with their celestial weapons, they rose up to the skies, taking with them the sons of Dhritarashtra.

लुटुपटूची किंवा मैत्रीपूर्ण लढाई झाली असती तर गंधर्वांची इतकी प्राणहानी झाली नसती.

हारलाच की तो. त्याने पळ काढला नाही असे मी कुठे लिहिले आहे काय?

धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 3:23 pm | मृत्युन्जय

हे वाचः

'O Dhananjaya, without stirring from my own abode I became acquainted with the purpose of the wicked Duryodhana and the wretched Karna in coming hither. The purpose was even this,--knowing that
ye are exiles in the forest and suffering great afflictions as if ye had none to take care of you, himself in prosperity, this wretch entertained the desire of beholding you plunged in adversity and misfortune. They
came hither for mocking you and the illustrious daughter of Drupada. The lord of the celestials also, having ascertained this purpose of theirs, told me, 'Go thou and bring Duryodhana hither in chains along with his counsellors. Dhananjaya also with his brother should always be protected by thee in battle, for he is thy dear friend and disciple.' At these words of the lord of the celestials I came hither speedily.

इंद्राने चित्रसेनाला असे सांगुनच पाठवले होते की त्याने युद्धात पांडवांना नेहमीच मदत करावी आणि त्यांचे रक्षण करावे. ज्या अर्जुनाचे रक्षण करायला पाठवले आहे त्याला मारायची काय बिशाद होती चित्रसेनाची? तो आलाच होता मूळात त्यांना मदत करायला आणी दुर्योधनाला अद्दल घडवायला. तो कशाला त्याच्याशी खरेखुरे युद्ध करेल?

पटत नाही. कारण लढाईत पांडवांनी बरेच गंधर्व मारले होते. लुटुपटूची किंवा मैत्रीपूर्ण लढाई झाली असती तर गंधर्वांची इतकी प्राणहानी झाली नसती

त्यानंतर चित्रसेन युधिष्ठिराच्या सांगण्यावरुन दुर्योधनाला सोडुन देतो आणि परत फिरतो. मग काय लिहिले आहे ते बघः

And the lord of the celestials then, coming to that spot, revived those Gandharvas that had been slain in the encounter with the Kurus, by sprinkling the celestial Amrita over them.

चित्रसेनाला माहितीच होते की कितीही मरोत परत जिवंत होणारच आहेत. तो कशाला त्याची चिंता करेल?

खी खी खी.
हे अमृत म्हणजे एकदम कमालीचे आहे रे.
मेला की कर जीवंत.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 2:31 pm | मृत्युन्जय

अभिमन्यू वधाच्या वेळी हाच कर्ण त्या सहा महारथ्यांमध्ये सामील होता. दु:शासनवधाच्या वेळचा भीमाचा आवेश पाहूनच तो स्तंभित झाला असावा.

असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा संदर्भ समजला नाही.

मान्य. अर्जुनाला त्यावेळी रोखणे कुणाला शक्य नव्हतेच पण इतर जण त्यावेळी निशस्त्र असावेत हे विधान जरा धाडसीच आहे. महाभारतात याचा कसलाही उल्लेख नाही.

मित्रा युद्ध संपले होते की नाही? सर्व जण अर्जुनाच्या वर जाण्याची प्रतिक्षा करत होते. तिथे कशाला कोणी शस्त्रे घेउन उभे राहिल? महाभारतात उल्लेख नाही हे साहजिक आहे. त्यात सगळे यौद्धे रोज शौचाला जायचे असाही उल्लेख नाही आहे. पण म्हणुन ते जायचे नाहित काय रे?

सहमत. पण कर्णाच्या डोळ्यांदेखतच अर्जुनाने वृषसेनाचा वध केला.

सहमत. पणा इथे कर्ण हारलेला नाही आहे. अर्जुनाच्या डोळ्यादेखत दृष्टद्युम्नाने द्रोणांना मारले. त्याने तसे करु नये असे अर्जुनाला वाटत होते. पण हे सगळे निमिषार्धात घडते. त्यात हस्तक्षेप करुन ते रोखण्याचा अवसर कोणाला मिळत नाही. अर्जुनाने काय वृषसेनाला मारताना कर्णाला टाइम प्लीज दिला होता असे वाटते आहे का तुला?

असेल असेल. पण अभिमन्यु वधाचा संदर्भ समजला नाही.

ते तुझ्या ह्म्म. कदाचित मागुन बाण सोडुन भीमाचा हात उडवणे जमण्याइतपत कर्णाचा नेम चांगला नसावा. या प्रतिसादाला उद्देशून आहे.
म्हणजे जो कर्ण अभिमन्यू वधाच्या अधर्मात सामील होता तो भीमाला भ्याडपणे मागून वार करून मारूही शकत होता, पण एकंदरीत भीमाचा आवेश पाहून गळाठून गेलेला असावा.

सर्व जण अर्जुनाच्या वर जाण्याची प्रतिक्षा करत होते. तिथे कशाला कोणी शस्त्रे घेउन उभे राहिल?

सर्व जण रणक्षेत्रात होते. रथी जरी शस्त्रे रथात ठेऊन खाली उतरले असतील तरी पदातींजवळ शस्त्रे असतीलच. शस्त्रत्याग शिबिरात गेल्यावरच होत असावा.

अर्जुनाने काय वृषसेनाला मारताना कर्णाला टाइम प्लीज दिला होता असे वाटते आहे का तुला?

मी कुठे म्हटलय की कर्ण हरला. पण तो वृषसेनाला वाचवू शकला नाही हे खरेच. जरी निमिषार्धात ते घडले असेल तरी अर्जुनाने कर्णाच्या डोळ्यांदेखत त्याचा वध केला ही वस्तुस्थिती कायम राहतेच.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 3:28 pm | मृत्युन्जय

म्हणजे जो कर्ण अभिमन्यू वधाच्या अधर्मात सामील होता तो भीमाला भ्याडपणे मागून वार करून मारूही शकत होता, पण एकंदरीत भीमाचा आवेश पाहून गळाठून गेलेला असावा.

तो अधर्म कसा? एकासमोर अनेक ही उदाहरणे तर बरीच आहेत की.

पण एकुण कर्ण भीमाच्या आवेशाने स्तंभित झाला होता हे मान्य करण्यासारखे.

सर्व जण रणक्षेत्रात होते. रथी जरी शस्त्रे रथात ठेऊन खाली उतरले असतील तरी पदातींजवळ शस्त्रे असतीलच. शस्त्रत्याग शिबिरात गेल्यावरच होत असावा.

कर्ण रथी होता की नाही? पदातींकडे शत्रे असुन काय उपयोग? ते फक्त मरण्यापुरते होते. त्यांच्या शस्त्राचा अर्जुनासमोर काय पाड?

मी कुठे म्हटलय की कर्ण हरला. पण तो वृषसेनाला वाचवू शकला नाही हे खरेच. जरी निमिषार्धात ते घडले असेल तरी अर्जुनाने कर्णाच्या डोळ्यांदेखत त्याचा वध केला ही वस्तुस्थिती कायम राहतेच.

अर्रे कर्णासमोर भीमाने दुर्योधनाचे ३१ भाऊ मारले. ३१. ही वस्तिस्थिती जास्त दारुण आहे मग :)

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 3:49 pm | प्रचेतस

अर्रे कर्णासमोर भीमाने दुर्योधनाचे ३१ भाऊ मारले. ३१. ही वस्तिस्थिती जास्त दारुण आहे मग Smile

पुत्रवधाचं दु:ख जास्त का मित्राच्या भावांच्या वधाचं?
शिवाय मित्राच्या ३१ भावांचा डोळ्यांसमोर वध होत असतानाही हा महान वीर काही करू शकला नाही. कुंतीला वचन दिल्याप्रमाणे अर्जुन सोडून इतर पुत्रांचा वध करणार नाही ते ठीकच, पण गेलाबाजार भीमाचा पराभव करून त्याला पळवून धार्तराष्ट्रांना तरी वाचवू शकला असता हा कर्ण.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 3:56 pm | मृत्युन्जय

मला वाटते इथे नंबर महत्वाचा. एकापाठोपाठ ३१ लोकांना मारले रे त्याने. त्यावेळेस कर्ण भीमाला न मारण्याच्या हेतुन सौम्यपणे लढत होता मात्र भीम पुर्ण ताकदीनिशी लढत होता असा उल्लेख आहे महाभारतात.

कोणाच्या डोळ्यादेखत दुसर्‍याला मारणे यावरुन त्या यौद्धाचा पराजय झाला हा निष्कर्ष नाही काढता येणार (कारण अर्जुनाने आधी त्यच्याशी युद्ध केले आणि मग तो जेव्हा निशस्त्र झाला तेव्हाच कर्णाला आव्हान दिले. त्यात कर्णाल खिजवण्याचाच हेतु जास्त होता. कर्णाला त्याच्या मुलाला वाचवण्याची काही संधी देण्याचा आवेश नव्हता. एका क्षणात बाण मारुन अर्जुनाने ते कामे केले सुद्धा) त्यामुळे वृषसेनाबाबत तसे नाही म्हणता येणार. पण एकापाठोपाठ ३१ यौद्धे मारले जातात तेव्ह असे म्हटले जाउ शकते. अर्थात त्यावेळेस कर्ण भीमाला न मारण्याच्या हेतुन सौम्यपणे लढत होता हा प्रतिवाद त्यालाही आहेच.

५० फक्त's picture

26 Apr 2012 - 4:57 pm | ५० फक्त

पदातींकडे शत्रे असुन काय उपयोग? ते फक्त मरण्यापुरते होते. त्यांच्या शस्त्राचा अर्जुनासमोर काय पाड?

हे म्हणजे मिपावरच्या कोणत्याही कंपु मध्ये नसलेल्या सदस्यांसारखे होते, ते फक्त +१ / -१ करण्यापुरते, तुम्हा दोघांच्या पुढे काय पाड आहे त्यांची, ख्ररं खोटं करायची.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 2:49 pm | मृत्युन्जय

अर्जुनाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि तो चक्क पळून गेला. अर्थात महाभारतात हे मोठ्या खुबीने वेगळ्या भाषेत सांगितले आहे ही गोष्ट वेगळी.

याबद्दल अधिक माहिती देशील काय?

हे वाचः

Bidding the troops stay on the field after having assured them upon his truth and by an oath, the mighty Karna of immeasurable soul fixed on his bow-string the weapon known by the name of Bhargava. From that weapon flowed, O king, millions and millions of keen arrows in that great battle. Entirely shrouded with those blazing and terrible arrows winged with feathers of Kankas and peacocks, the Pandava army could not see anything. Loud wails of woe arose from among the Pancalas, O king, afflicted, in that battle, with the mighty Bhargava weapon. In consequence then of elephants, O king, and steeds, by thousands, and cars, O monarch, and men, falling on all sides, deprived of life, the Earth began to tremble. The vast force of the Pandavas became agitated from one extremity to another. Meanwhile Karna, that scorcher of foes, that foremost of warriors, that tiger among men, while consuming his foes, looked resplendent like a smokeless fire. Thus slaughtered by Karna, the Pancalas and the Cedis began to lose their senses all over the field like elephants during the conflagration in a forest. Those foremost of men, O tiger among men, uttered loud roars like those of the tiger. Loud became the wails of woe, like those of living creatures at the universal dissolution that were uttered by those crying combatants struck with panic and running wildly on all sides, O king, of the field of battle and trembling with fear. Beholding them thus slaughtered, O sire, by the Suta's son, all creatures, even beasts and birds, were filled with fear. The Srinjayas then, thus slaughtered in battle by the Suta's son, repeatedly called upon Arjuna and Vasudeva like the spirits of the dead within Yama's dominions calling upon Yama to
rescue them.

भार्गवास्त्रामुळे संपुर्ण पांडव सेना हतबल झाली होती. हजारोनी सैनिक मरत होते, बेशुद्ध पडत होते. त्यावेळेस अर्जुन सोडुन त्यांना कोणीही वाचवु शकेल असे त्यांना वाटत नव्हते.

Hearing those wails of the troops slaughtered with Karna's shafts, and beholding the terrible bhargava weapon invoked into existence Kunti's son Dhananjaya said unto Vasudeva these words, "Behold, O Krishna
of mighty arms, the prowess of the bhargava weapon! It cannot, by any means, be baffled! Behold the Suta's son also, O Krishna, filled with rage in this great battle and resembling the Destroyer himself, in prowess and employed in achieving such a fierce feat! Urging his steeds incessantly, he is repeatedly casting angry glances upon me! I will never be able to fly away from Karna in battle! The person that is living, may, in battle, meet with either victory or defeat. To the man, however, that is dead, O Hrishikesha, even death is victory. How can defeat be his that is dead?"

पण इथे तर अर्जुन चक्क घाबरलेला आहे. त्याच्याकडे भार्गवास्त्रावर उपाय नाही. कर्ण आपल्याकडे रागाने बघतो आहे यामुळे तर तो अजुनच घाबरलेला आहे. मला युद्धातुन पळूनही जाता येत नाही आहे रे असे तो कृष्णाला अगदी कळवळून सांगतो आहे बघ.

Thus addressed by Partha, Krishna replied unto that foremost of intelligent men and chastiser of foes, these words that were suitable to the occasion, "The royal son of Kunti hath been deeply wounded and
mangled by Karna. Having seen him first and comforted him, thou wilt then, O Partha, slay Karna?" Then Keshava proceeded, desirous of beholding Yudhishthira, thinking that Karna meanwhile, O monarch, would
be overwhelmed with fatigue! Then Dhananjaya, himself desirous of beholding the king afflicted with arrows, quickly proceeded on that car, avoiding the battle, at Keshava's command

कृष्णाने त्याची अवस्था ओळखुन त्याला चक्क रणांगण सोडुन युधिष्ठिराकडे जायला सांगितले. तेवढ्यावेळात कर्ण दमेल मग येउन त्याच्याशी युद्ध कर म्हणुन सांगतो. तेवढ्या वेळात अर्थात भार्गवास्त्र पण करायची तेवढी हानी करुन शांत होइल. उपाय असाही काहिच नाही. इथे मरणार्‍या सैन्याला सोडुन अर्जुन चक्क पळुन गेला. पण कर्ण जेव्हा हारतो तेव्हा तो पळुन जातो. अर्जुन मात्र " युद्ध avoid करतो." आहे की नाही मज्जा. आणि शेवटचे ३ शब्द तर अप्रतिम.

"at Keshava's comman""

म्हणजे कृष्ण म्हट्ला म्हणुन केले. कृष्ण म्हटला शिखंडी आडुन बाण मार. आम्हे मारला. कृष्ण म्हटला सैरभैर झालेल्या निशस्त्र द्रोणाला मारा. आम्ही मारले. कृष्ण म्हटला भूरिश्रव्याचा हात मागुन तोड. आम्ही तोडला. कृष्ण म्हणला निशस्त्र, पदाती, चाक भूमीतुन बाहेर काढायचे म्हणुन युद्ध न करणार्‍या कर्णाला मार म्हणुन आम्ही मारले. कृष्ण म्हणाला पळून जा (सॉरी सॉरी. कर्णाकडे नंतर बघ असे म्हणाला नाही का तो) म्हणून आम्ही बॅटल अव्हॉईड केली. कृष्ण म्हटला की सगळे कसे धर्मानुसार केल्यासारखे वाटते. वाटते म्हणजे तसे ते असतेच.

आता आठवला हा प्रसंग. च्यायला विसरलोच होतो हे.
आता महाभारत परत पहिल्यापासून वाचणे आले.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 10:51 am | मृत्युन्जय

व्यासांनी गणपतीला कोडी घातली, तसेच वाचकांना घातलेले हे एक कोडे.

अतिशय सुंदर विवेचन.

एकुणात लेखच खुप सुंदर आहे. वरती काही गोष्टींवर मी आक्षेप घेतला असला तरी लेख खुपच समतोल आहे याबाबत काही दुमत नाही.

महाभारतावरची लेखमाला दुर्योधन आणि युधिष्ठिराशिवाय कशी काय संपु शकते. तुम्ही असे करुच शकत नाही.

कपिलमुनी's picture

26 Apr 2012 - 11:53 am | कपिलमुनी

आता इतिहासाचे पुर्नलेखन करावे असा धागा / संकल्प माननीय सदस्य परा यांनी केला आहे ...तसाच पुराणांचे पुर्नलेखन करावे ..म्हणजे सत्य सामोरे येइल

प्रचेतस's picture

26 Apr 2012 - 12:33 pm | प्रचेतस

उत्तम व्यक्तीचित्र शरदराव.
व्यासांचे थोरपण एव्हढे की जिथे त्यांनी युधिष्ठिर, भीमार्जुनांचे दुर्गुणही दाखवलेत तिथेच त्यांनी दुर्योधन, कर्णाचे सद्गुणही दाखवलेले आहेत.

मृत्युन्जयाशी सहमत. दुर्योधन, युधिष्ठिराशिवाय ही लेखमाला अपूर्ण आहे. शिवाय सात्यकी, बाल्हिकासारख्या काही वीरांचेही व्यक्तीचित्रण येऊ द्यात.

कपिलमुनी's picture

26 Apr 2012 - 1:42 pm | कपिलमुनी

लेख उत्तम जमला आहे ...ही केवळ सुरुवात आहे असे समजुन लेखन करा ...सुंदर लेख माला आहे ...
एक शंका
व्यासांनी एवढा मोठा कालावधी कव्हर केला आहे ...
तुमचा एवढा अभ्यास आहे म्हणून एक शंका विचारतो ?

या मुख्या पात्रांची वये काय असावीत ??
भिष्म
द्रोण
कुंती
कर्ण
किंवा कृष्ण ..

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार

जरा वेळ टळली असती तर कर्ण मेलाच असता कारण त्यावेळी अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होते, कर्णाकडे नव्हते.

ब्रह्मास्त्राचा उपयोग हा द्वंद्वात फक्त आणि फक्त महारथी अथवा रथी ह्यांच्या विरुद्धच करण्यास परवानगी होती. अशावेळी कर्णावरती अर्जुन हे अस्त्र कसे चालवू शकला असता ?

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 3:50 pm | मृत्युन्जय

दुर्दैवाने तसे नाही आहे. ब्रह्मास्त्राचा उपयोग द्वंद्वात कधीही करता येत असे. भीष्म आणि परशुरामांनीही ते वापरले होते. द्रोणांनी तर ते पदाती सैनिकांविरुद्ध सुद्धा वापरले.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार

दुर्दैवाने तसे नाही आहे. ब्रह्मास्त्राचा उपयोग द्वंद्वात कधीही करता येत असे. भीष्म आणि परशुरामांनीही ते वापरले होते. द्रोणांनी तर ते पदाती सैनिकांविरुद्ध सुद्धा वापरले.

मला शंका आहे. जेंव्हा जेंव्हा हे वापरले गेले तेंव्हा तेंव्हा एकमेकांसमोर असलेले योद्धे हे महारथी किवा अतिरथीच होते. राहिला द्रोणांचा मुद्दा तर त्यांनी जे केले ते अयोग्यच होते.

मृत्युन्जय's picture

28 Apr 2012 - 10:04 am | मृत्युन्जय

एक अजुन गोष्ट भीष्मांनी स्वेतावर ब्रह्मास्त्र वापरले तेव्हा तो पदाती होता आणि त्याच्या हातात धनुष्य देखील नव्हते.

दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाने कर्णावर ब्रह्मास्त्र वापरलेच (शेवटच्या युद्धात. त्याचा कर्णाने बीमोड केला). त्याशिवाय अर्जुनाने रौद्रास्त्र देखील वापरले. ही दोन्ही अस्त्रे त्याने वापरली तेव्हा कर्ण पदाती होता (पण अर्थात नि:शस्त्र नव्हता)

स्पा's picture

26 Apr 2012 - 4:31 pm | स्पा

आपने अभी देखा.. महाभारत मे नक्की काय हुवा

क्यामेरामन मन्या फेणे के साथ मृत्युंजय ओर वल्ली
झि २४ तास
कुरुक्षेत्र .

हम लगातार आपतक इस बारें मे खबर पहुंचाते रहेंगे. इसी सिलसिले में एक जबरदस्त सनसनीखेज खुलासे के लिये देखिये आज रात आठ बजे हमारी स्पेशल रिपोर्ट, "अस्त्र शस्त्र और अंतर्वस्त्र.." सिर्फ "आप तक" पर

आप तक, सबसे व्हेज..

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार

"अस्त्र शस्त्र और अंतर्वस्त्र.." सिर्फ "आप तक" पर

'आज खुलेगा अंतर्वस्त्र सिर्फ आप तक पर ठिक रात ८ बजे'. असे पाहिजे ते.

ह्य ह्य.. पण मग "सबसे व्हेज" हे बिरुद नष्ट होईल की काय... ? ;)

रमताराम's picture

26 Apr 2012 - 7:21 pm | रमताराम

=))
आवरा.

ओ क्यामेरामन तुमारा वायर देवो तो जरा, ओ हमारे साब का धनुष्य का दोरी तुटेला है.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 5:21 pm | मृत्युन्जय

ओ ५० फक्त. जास्त गडबड करु नका हा. ब्रह्मशीर सोडेन तुमच्यावर. आणी मी ब्रह्मचारी नसल्याने मला ते मागेसुद्धा घेता येणार नाही. ;)

अशोक पतिल's picture

26 Apr 2012 - 6:34 pm | अशोक पतिल

शरद व वल्ली , कर्ण व अर्जुनावर जे विवेचन केलेय , ते अगदी ततोंतंत योग्य आहे. अर्जुनाचे एक नाव अजेय असे आहे. तो शेवट पर्यंत अविजीत होता.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार

तो शेवट पर्यंत अविजीत होता.

हे वाक्य उपरोध म्हणून लिहिले आहे का ?
नाही, कारण ह्या अजेय अर्जुनाला साध्या चोरांनी खिंडीत गाठून बदडला की हो. वर लुबाडणूक देखील केली.

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 6:50 pm | मृत्युन्जय

"Arjuna said,

'They called me Dhananjaya because I lived in the midst of wealth, having subjugated all the countries and taking away their treasures.

They called me Vijaya because when I go out to battle with invincible kings, I never return (from the field) without vanquishing them.

I am called Swetavahana because when battling with the foe, white horses decked in golden armour are always yoked unto my car.

They call me Falguna because I was born on the breast of the Himavat on a day when the constellation Uttara Falguna was on the ascendent.

I am named Kiritin from a diadem, resplendent like the sun, having been placed of old on my head by Indra during my encounter with the powerful Danavas.

I am known as Vibhatsu among gods and men, for my never having committed a detestable deed on the battle-field.

And since both of my hands are capable of drawing the Gandiva, I am known as Savyasachin among gods and men.

They call me Arjuna because my complexion is very rare within the four boundaries of the earth and because also my acts are always stainless.

I am known among human beings and celestials by the name of Jishnu, because I am unapproachable and incapable of being kept down, and a tamer of adversaries and son of the slayer of Paka.

And Krishna, my tenth appellation, was given to me by my father out of affection towards his black-skinned boy of great purity.'

नुक्तेच 'वॉर अँड पीस' कादंबरीविषयी असे वाचनात आले, की त्यात ५६० का कितितरी पात्रे आहेत....

महाभारतात तर हजारो असतील. अशी गणती व त्या सर्वांची नावे, असे संशोधन केलेले आहे का कुणाच्या वाचनात ? तसेच त्यापैकी मुख्य (तीही शेकडो असणार) पात्रांचे आपसात काय नाते वा संबंध होते, हे दर्शवणारा चार्ट ?

मृत्युन्जय's picture

26 Apr 2012 - 7:11 pm | मृत्युन्जय

महाभारतात तर हजारो असतील. अशी गणती व त्या सर्वांची नावे, असे संशोधन केलेले आहे का कुणाच्या वाचनात

अशक्य आहे ते. केवळ अशक्य.

हा मुख्य पात्रांची एक वंशावळ नक्की बनवता येइल. किंबहुना आहे. मागच्या धाग्यावर पराने दिली होती एक लिंक. तपासून नाही पाहिलेली पण बरोबर असावी.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2012 - 7:12 pm | परिकथेतील राजकुमार

हा प्रश्न चित्रगुप्तानेच विचारावा ह्याची अंमळ मौज वाटली.

युद्धही प्रवृत्तीच आदिमानवी आहे असं तुम्हा सर्वांना वाटत नाही का?

युद्धानं प्रश्न सुटण्याऐवजी परस्परातली तेढ वाढत जाते आणि पुढच्या पिढीला वारसा म्हणून पूर्वजांच वैर मिळतं. अमानुष संहार आणि निसर्गाची अपरिमित हानी, जी भरून यायला पुढे शतकानुशतकं जातात त्यातून माणूस काय मिळवतो?

युद्ध का झालं? याचं समर्थन करण्यापेक्षा युद्ध हा पर्यायच बाद ठरवला, किमान त्यावर वैचारिक मंथन आणि उहापोह थांबवला तर तो विचार क्षिण होत जाऊन कधी तरी `युद्ध सर्वथा गैर होतं' हे माणसाच्या लक्षात येईल का?

इस्पिक राजा's picture

27 Apr 2012 - 12:52 pm | इस्पिक राजा

बुद्ध आणी महावीरांनी ते कंठ्शोष करुन सांगितले पण त्याचा परिणाम उलटाच झाला. भारतीय समाज युद्धविरोधी झाला पण बाकी जगाचे काय? त्यांनी भारतावर आक्रमण केलेच. आणि मग त्यातुन परत ते चक्र सुरुच राहिले. त्यामुळे हे चर्क सुरुच राहणार आहे. कोणी एका गालावर मारली तर तुम्ही दुसरा पुढे करा हे तत्वज्ञान छान वाटते पण ते प्रत्यक्षात शक्य नाही.

आणि त्याही पेक्षा तुम्ही आणि मी हा फोकस एरिया आहे. माझं मत तुम्हाला पटलं तर आपण दोघं युद्धविरोधी झालो मग असे समविचारी दोनाचे चार आणि मग अनंत होतील.

जर सैन्यात भरती व्हायला सैनिकच नसतील तर युद्ध कशी होतील?

हे विचार तुम्हाला जेथून मिळाले आहेत त्याच माणसाने स्वत:च्या अव‍तीभवती रायफलधारी लोक ठेवले होते.
आता बोला!
विचार नुसते ताणायला ठिक असतात, पण प्रॅक्टीकली माणुस ही हरामखोर जात आहे असे मला माझ्यावरुन वाटते.

आपण काय करतो हे महत्त्वाचंय असं नाही का वाटत?

यकु's picture

27 Apr 2012 - 1:22 pm | यकु

>>>>आपण काय करतो हे महत्त्वाचंय असं नाही का वाटत?
--- कदाचित आपल्या स्वत:वर वेळ येईपर्यंतच हे बरोबर असेल.
तुम्ही रस्त्यावरुन जाताना कुणी तुमचा गळा पकडला आणि प्राणघातक मारठोक करायला सुरुवात केली तर तुम्ही काय कराल?

मी तरी जेवढ्या जोरात प्रतिहल्ला करता येईल तेवढ्या जोरात करील.

इस्पिक राजा's picture

27 Apr 2012 - 1:23 pm | इस्पिक राजा

कुणी तुमचा गळा पकडला आणि

बरोबरच आहे. कोणी एक गळा दाबला तर तुम्ही दूसरा द्या असे म्हणण्याचा चान्स नसतो ना ;)

युद्ध व्यर्थ आहे हा विचार मनात रूजवणं, स्वतःच्या आणि जमेल तितक्या सर्वांच्या.

`भविष्यकालीन किंवा काल्पनिक प्रसंगातून युद्धप्रवृतीला दुजोरा' की `युद्धविराम (या काल्पनिक असला तरी) शांततेची शक्यता निर्माण करू शकणार्‍या विचाराचा अंगीकार आणि प्रसार' असा अप्रोच विधायक ठरेल.

त्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पटला तर तुम्ही अनेक लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकाल

>>>एक सिंपल अंडरस्टँडिंग आहे, जे युद्धशून्य स्थितीतच शक्य आहे
>>>युद्ध व्यर्थ आहे हा विचार मनात रूजवणं, स्वतःच्या आणि जमेल तितक्या सर्वांच्या.
---- मला हा विचार अत्यंत अनावश्‍यक विचार वाटतो. आत्ता युद्धशून्य स्थिती आहे असे मानू (फक्त आपल्या घरचं कुणी काश्मिरमध्‍ये मेलेलं नाही/तिकडे नाही म्हणून ), मग युद्धशून्य स्थितीत युद्ध व्यर्थ आहे असे म्हणत बसण्‍यात काय हशील?

>>>`भविष्यकालीन किंवा काल्पनिक प्रसंगातून युद्धप्रवृतीला दुजोरा' की `युद्धविराम (या काल्पनिक असला तरी) शांततेची शक्यता निर्माण करू शकणार्‍या विचाराचा अंगीकार आणि प्रसार' असा अप्रोच विधायक ठरेल.
---- अहो, जी गोष्‍ट सध्‍या नाहीच तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा?

>>>त्यात तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला पटला तर तुम्ही अनेक लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकाल
---- मी अजाबात पत्रकार नाही, फक्ते कधीकाळी पेपरमध्‍ये भाषांतरकार होतो.

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 3:48 pm | संजय क्षीरसागर

तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा?

युद्धशून्य स्थिती आहे म्हणून विचार करण्याचं स्वास्थ्य आहे आणि...

`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे तिचा निरास `युद्ध व्यर्थ आहे' या बोधातून करता येईल आणि एकदा तो झाला की युद्धाची शक्यता मावळेल.

>>>तिच्याबद्दल कशाला कसल्या अप्रोचचा अंगीकार आणि प्रसार करायचा?
>>>युद्धशून्य स्थिती आहे म्हणून विचार करण्याचं स्वास्थ्य आहे आणि...

--- विचार करण्‍याचं स्वास्थ्य जरुर असेल, पण जी गोष्‍ट या क्षणी नाहीच तिच्याबद्दल, तिच्या निराकरणाच्या दिशेनेही असो, अगदी अचूक विचार करणेदेखील उगाच अस्वस्‍थ असल्याचे लक्षण आहे.

>>>`युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे तिचा निरास `युद्ध व्यर्थ आहे' या बोधातून करता येईल आणि एकदा तो झाला की युद्धाची शक्यता मावळेल.
--- सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने ‍अस्तित्वात नसलेल्या गोष्‍टीबद्दल, त्या गोष्‍टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले आहेत. बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्‍ट आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार!

त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय

>सर्व प्रकारचे 'बोध' हे स्वत:च्या मनाने ‍अस्तित्वात नसलेल्या गोष्‍टीबद्दल, त्या गोष्‍टींची कल्पना करुन बांधलेले पत्त्यांचे बंगले आहेत.

`युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे.

>बोध नावाचं जे काही असेल ती प्रत्येकासाठीच अत्यंत वैयक्तिक गोष्‍ट आहे, ते हस्तांतरणीय, Negotiable Instrument कदापिही नाही, त्यामुळे ना बोधाचा अंगीकार होऊ शकतो, ना प्रसार!

बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो.

वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे

संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्‍या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे..

मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली..

चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना.. ;))

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 6:33 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसादाबद्दल थँक्स!

संजय यांचं म्हणणं पटतंय आणि यकुचेही मुद्दे दुसर्‍या बाजूने विचार केला तर बरोबरच वाटतात. थोडक्यात आमचा बेंबट्या झाला आहे..
मुद्दाम प्रतिसाद अशासाठी की अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स असे काही न होता उचितरित्या उत्तम चर्चा चालली आहे. मुद्दे मांडले खोडले जरुर जाताहेत पण ग्रेसफुली आणि रिस्पेक्टफुली..
चर्चा / वाद कसे चालावेत याचे उत्तम उदाहरण. ( विशेषतः यकु नामक आरडीएक्सचा समावेश असताना..

हॅहॅहॅ थँक्यू हो गवि,

पण आता जे आहे ते सांगतो..

संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्‍या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे.

१. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned ;-)

अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स

2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे; आत्मज्ञान झालेला माणूस व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं मी शिवीगाळ करीत नसेन तर संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो.
3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या 'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्‍यासाठी/ कदाचित पुढे जाऊन म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे.

यावर तुमचा 'गविकाकांचा सल्ला' हवाय ;-)

हॅ हॅ हॅ..

यक्कू तू रे मेल्या कधी पासून कोणाचे सल्ले मानायला लागलास.. तू काय कमी सिद्ध
पुरुष आहेस की काय?

तू आंजा वरचा भटकता मुक्त आत्माच की रे..

तुला कसला सल्ला देणार गविकाका..?

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2012 - 12:25 pm | संजय क्षीरसागर

इथून पुढे काही विषय असेल तर कृपया वेगळी पोस्ट असावी किंवा व्यक्तिगत संपर्क साधावा.

>>>युद्धप्रवण प्रवृती' जी आता, या क्षणी मनात आहे
>>>त्यामुळेच तर युद्ध कथात रस आहे आणि `युद्धस्य कथा रम्य:' म्हटलय

---- :) मला वाटते जगातल्या कुठल्याही गोष्‍टीचा कुठेही संबंध लावणं सहज शक्य आहे, कारण सगळं ओपन एंडेड आहे. त्यामुळे विचार, तर्काला/विचाराला कुठल्याही दिशेने जाण्यास वाव मिळाला म्हणून अर्थवहनाची ती एकच दिशा अस्तित्त्वात आहे असं मी म्हणणार नाही

>>>`युद्धप्रवण प्रवृती' आहे म्हणून तर युद्धाचं समर्थन, घटनांचा उहापोह आणि जमल्यास उदात्तिकरण आहे.
---- महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही, आणि असा अंदाजही मी लावणार नाही.

>>>बोधाचा अर्थ `अंडरस्टँडिंग'किंवा `आकलन' असा आहे. युद्ध व्यर्थ आहे हा बोध कुणालाही होऊ शकतो आणि त्याचा प्रसारही होऊ शकतो.
----- पटत नाही! बुद्ध झाले, महावीर झाले - यांना बरेच मोठे बोध झाले होते म्हणे, आणि त्यांचा प्रसारही त्यांनी केला होता. पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्‍धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला.
त्यामुळं अंडरस्टॅडींग, आकलन, बोध या संकल्पना मला अत्यंत अनाकर्षक वाटतात.

>>>वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही आणि प्रत्येक सूज्ञाला युद्धापेक्षा शांतताच प्रिय आहे
----- :)
सरळसोट ‍दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं तत्त्वज्ञान आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही, कारण तो तसा होऊ शकत नाहीच. त्यामुळं कितीही चांगल्या असल्या तरी उपयुक्तता नसलेल्या (आणि हजारो वर्षांपासून रंगीत तालीम होऊन गेलेल्या) गोष्‍टींचं ओझं अंगीकारणे किंवा प्रसारित करणे अत्यंत रखरखीत गोष्‍ट आहे.

द्विरुक्ती प्रकाटाआ

प्यारे१'s picture

27 Apr 2012 - 1:16 pm | प्यारे१

>>>प्रॅक्टीकली माणुस ही हरामखोर जात आहे असे मला माझ्यावरुन वाटते.

डिट्टो! मिलाओ हाथ! :)

होतात म्हणून संदर्भ तोच ठेऊन इथे प्रतिसाद दिला आहे.

>महाभारतातील युद्धाच्या विषयावर वर चर्चा आहे म्हणून चर्चा करणारे सगळे युद्धाचे समर्थक किंवा उदात्तीकरण करणारे लोक आहेत असं मला वाटत नाही

निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे

>पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला.

यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते

.....वास्तविकात युद्ध ही राजकिय चाल आहे आणि त्यात सामान्य माणूस ओढला जातो. जर सामान्य माणूस युद्धविन्मुख झाला तर सत्ताधार्‍यांकडे सेनाबलच राहणार नाही
>सरळसोट ‍दुनियादारीकडे पाहून मांडलं गेलेलं हे फार सहज सोपं तत्त्वज्ञान आहे, पण त्याचा प्रॅक्टीकली काडीचाही उपयोग होताना दिसत नाही

= जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही.

प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो.

माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.

युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे

युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.

इज इट?

आत्तापर्यंतच्या प्रमुख युद्धांमधे दोन्ही बाजूंच्या सामान्य जनतेपैकी (मासेस / समूह) किती जणांची इच्छा "युद्ध योग्य आहे" ,"युद्ध व्हावं" अशी होती?

युद्ध हा पॉवर गेम आहे आणि पॉवरमधे आलेल्या मूठभरांच्या महत्वाकांक्षेपोटी जन्म घेतो आणि चालतो असं वाटतं.

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 7:15 pm | संजय क्षीरसागर

पॉवरमधे आलेल्या मूठभरांच्या महत्वाकांक्षेपोटी जन्म घेतो आणि चालतो असं वाटतं.

येस, पण तो खेळायला सामान्य लोक लागतात!

आणि मजा म्हणजे ते सर्व युद्धप्रेरित असायला लागतात.. आणि त्यांना उद्युक्त करण्यात राजकारणी माहिर असतात.

युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही किंवा प्रश्न कोणताही असो, युद्धानी त्याची सोडवणूक होणार नाही हे जर समूहानं सर्वथा मान्य केलं तर राजकारणी कसं युद्ध करणार?

>>>>निदान त्यांना युद्धकथेत रस आहे हे उघड आहे
---- वावगे काहीही नाही. युद्धकथेत रस आहे म्हणून खरोखरचं युद्ध करुन पाहु असं कुणी म्हणणार नाही.

>>>>>पण बुद्धाचा जन्मदेश भारतही हजारो वेळा युद्धाला बळी पडला, त्यानंही युद्धे केली आणि बुद्धाची शिकवण ज्या देशात गेली तो जपानसारखा देशही जगातल्या पहिल्या अणुबॉम्बला बळी पडला.
>>>>यानं युद्धाचं समर्थन होत नाही, खरं तर प्रत्येक युद्धाची निष्पत्ती "युद्ध व्यर्थ होतं" हेच दाखवते
---- मुळात युद्धाच्या समर्थनार्थ ‍भूमिका घेऊन मी चर्चा करीत नाहीय. Nothing is new under the sun. युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल, युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल. मग दोन्ही प्रकारच्या घिस्यापिट्‍या कॅसेटी वाजवण्‍यात काय अर्थ?

>>>>जर सामान्य माणसानं साथ दिली नाही तर कोणतीही विचारप्रणाली मूळच धरू शकत नाही.

----- मी सामान्य माणूस आहे आणि बुद्ध, महावीर आणि आता संजय ‍क्षीरसागर यांची 'युद्धे व्यर्थ आहेत' या विचारप्रणालीला युद्धाचे समर्थन न करताही माझ्यात मूळ धरु देत नाहीय! मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे.

>>>>प्रत्येक प्रणालीवर दोन्ही बाजूनं बोलता येईल आणि त्यात व्यक्तिगत हेतू दर्शवता येईल पण शांतता ही एकमेव चिज अशीये की ती सर्वांसाठी विधायक आहे, मग ते सजीव असोत, पर्यावरण असो की पुढची पिढी असो.
----- हे केवळ एक 'इश्वर अल्ला तेरे नाम' टाइप विधान आहे. युद्धांमध्‍ये तोफांचे आवाज चालू असताना आणि सैनिकांच्या शरीरांच्या चिंधड्‍या उडत असतानाही (ही वेगळी गोष्‍ट) तिथे मध्‍येमध्‍ये शांतता असतेच. शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय?

>>>>माझं फक्त एकच सांगणंय की तुम्ही युद्धविन्मुख व्हा आणि इतरांना तो विचार देण्याचा प्रयत्न करा. युद्ध हे सामुहिक द्वंद्व आहे आणि जर समुहाची इच्छा नसेल तर युद्ध अशक्य आहे.
----- ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे.

>>>>युद्धोत्तेजकता हा जसा राजकिय मताप्रणाली जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे तसाच युद्धविन्मुखता हा जागतिक शांततेसाठी केलेला प्रयत्न आहे

----- अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा.

तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय!

>युद्धे व्यर्थ आहेत असंही म्हणता येईल, युद्धे सार्थक ठरली असेही म्हणता येईल.

मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे"

>मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे

प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात.

>शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय?

अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे

>ज्या दिवशी ट्वीन टॉवरवर विमानं धडकली किंवा मुंबईत अतिरेकी घुसले त्या दिवशी अफगणिस्तान मधल्या लोकांची आणि अनुक्रमे पाकिस्तानमधल्या लोकांची सामुहिक युद्धाची इच्छा होती काय? काही युद्धखोर गट असतील, ते मात्र ' तुम्ही युद्धविन्मुख व्हा' हे ऐकून घेऊ शकणार नाहीत, आणि युद्ध शक्य झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे

हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे.

आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल.

>अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा

परवा अर्धवटरावनी स्वतःच्या मुलाचा एक किस्सा लिहीला होता. तो मुलाला खेळवत होता, त्याच्या एका हातात वाघाचं चित्र आणि दुसर्‍या हातात हरिण आहे, वाघ हरणाच्या पाठीमागे लागलाय आणि तो झडप घालणार इतक्यात त्याच्या मुलानी हरणाचं तोंड वाघाकडे वळवलं आणि म्हणाला "पप्पी, पप्पी"!

माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे .

>>>>तुम्ही युद्धाचं समर्थन करत नाही म्हटल्यावर माझा हेतू साध्य झालाय!
------ नाही. युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत' या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे.

>>>>मला युद्धमिमांसेत रस नाही, मला फक्त इतकंच सांगायचंय की "मानवी प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा आदिमानवी पर्याय आहे"
---- एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्‍याची इच्छा आहे?

>>>>मूळ धरु न शकणार्‍या विचारप्रणालींना (युद्धे व्यर्थ आहेत, पण तीच सगळीकडे चालू आहेत) सामान्य माणसाची साथ हवी असणे हे ती विचारसरणीच मूळात अप्रासंगीक असल्याचे लक्षण आहे
>>>>प्रत्यक्ष युद्ध खेळणारे सामन्यजनच असतात.
----- आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ आहेत' हे नुसतं सांगण्‍यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही.

>>>शांततेतच युद्ध होतं. तुम्ही युद्धादरम्यानही असणार्‍या आणि त्या शांततेतच युद्ध सुरु असणार्‍या शांततेला शांतता मानत नाही काय?
>>>>>अजिबात नाही, मी युद्धशून्य शांततेचा पुरस्कर्ता आहे
----- अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्‍या आहे ना पुढेही कधी असेल.

>>>>>हा युद्धाचाच सिलसिला आहे आणि मला तेच सांगायचंय की युद्ध मग ते खुलं असो की छुपं गैर आहे.
----- नुसतं सांगत रहाण्‍यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय? सांगायला काय बरेच लोक बर्‍याच गोष्‍टी सांगत रहातात, पण आपण सांगत असलेल्या या गोष्‍टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्‍यात फेकून द्यायला हवं असं मला वाटतं.

>>>>>आणि परत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की माझा फोकस एरिया तुम्ही आहात, हा तुमच्या-माझ्यातला संवाद आहे. "तुम्ही युद्धविन्मुख व्हा" मग ती लाट हळूहळू पसरत जाईल.

------ मुळात तुमची इथे भेट होण्‍याआधीही मी युद्धावर जाण्‍याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्‍यावरुन युद्धविन्मुख होण्‍याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही.

>>>>>अत्यंत भाबडा, 'हे असं करु नका' एवढंच सांगणं असलेला हा प्रयत्न यशस्वी होवो अशा शुभेच्छा
>>>>>माझा विश्वास तितकाच भाबडा आहे आणि प्रत्येकाला शांतताच हवीये हे मला माहितीये कारण ते त्याच स्वरूप आहे .

------- पुन्हा एकदा शुभेच्छा. :)

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2012 - 9:33 pm | संजय क्षीरसागर

>युद्धे होण्याचं समर्थन करीत नसलो तरी, 'युद्धे व्यर्थ आहेत' या घोषाचीही निरर्थकता मी मला दिसते, त्यामुळंच एवढे प्रतिसाद दिले आहे.

>एवढंच सांगून चालणार नाही, ते लोकांनी ऐकायला आणि मानायला हवं अशी इच्छा आहे की फक्त बोलतच रहाण्‍याची इच्छा आहे?

>आणि ते 'युद्धे व्यर्थ आहेत' असं ते मानत नाहीत, आणि 'युद्धे व्यर्थ आहेत' हे नुसतं सांगण्‍यावेगळा काही उपाय असल्याचं बहुधा तुम्ही मानत नाही.

>अशी युद्धशून्य शांतता ना कधी अस्तित्त्वात होती, ना आता सध्‍या आहे ना पुढेही कधी असेल.

>नुसतं सांगत रहाण्‍यापेक्षा काही वेगळा उपाय तुमच्याकडे आहे काय? सांगायला काय बरेच लोक बर्‍याच गोष्‍टी सांगत रहातात, पण आपण सांगत असलेल्या या गोष्‍टी पूर्वीही सांगून झाल्या आहेत, आणि ही लागू पडणारी उत्तरे नव्हेत हे काळानं दाखवून दिलं आहे, आता नवी उत्तरं शोधावी लागणार आणि जे उत्तर प्रॅक्टीकली लागू पडत नाही ते सरळ कचर्‍यात फेकून द्यायला हवं असं मला वाटतं.

>मुळात तुमची इथे भेट होण्‍याआधीही मी युद्धावर जाण्‍याची शक्यता नव्हतीच. त्यामुळं या संवादातील तुमच्या म्हणण्‍यावरुन युद्धविन्मुख होण्‍याचा प्रश्न नाही. लाट वगैरेबद्दल मी काही सांगू शकत नाही.

>पुन्हा एकदा शुभेच्छा

= इंटरनेटवर मी फक्त सांगू शकतो आणि विचार हा एच्छिक कृत्याचा स्त्रोत आहे हे सर्वज्ञात आहे.

युद्धाला प्रवृत्त करणं असो की युद्धापासून विन्मुख करणं असो शेवटी सर्व संवादावर अवलंबून आहे.

एखादं वक्तव्य आणि रूजवलेली धारणा युद्धाला प्रवृत्त करते तर मग युद्ध व्यर्थ आहे ही धारणाच ते पटलेल्या प्रत्येकाला युद्धविन्मुख करेल हे निर्विवाद आहे.

उत्तरच नसलेल्या प्रश्नांना खरोखर सार्थक, प्रॅक्टीकल उत्तर नाही हे मान्य न करता खूबीने दिलेली बगल आवडली नाही.
उलट युद्धावर जाण्याविषयी मी वर पुरेशा प्रमाणात भूमिका मांडलेली असूनही पुन्हा युद्धाला प्रवृत्त किंवा विन्मुख करण्यात
संवादाचा तकलादू दुवा कायम ठेवण्याच्या इच्छेतून तर तुम्हीही रजनीशांप्रमाणेच (कदाचित त्यांच्या विचारांच्या छायेत तुम्हाला तथाकथित आत्मज्ञान झाल्यामुळे असेल ) फक्त प्राप्त आयुष्यात 'टाईम कंज्युम' करुन मागे गबाळ सोडण्यावरच भर देणार आहात काय असा प्रश्न पडला आहे.
तूर्तास रजा घेतो.
धन्यवाद.

हे मान्य न करता खूबीने दिलेली बगल आवडली नाही.

= युद्ध हे कोणत्याही मानवी प्रश्नाचं उत्तर नाही हे विधानच उत्तर आहे आणि मी सर्व विवाद इथे संपवलेलाय.

अग आई ग!
मुळ विषय सोडुन चर्चा कुठलया कुठ्ठ पोहोचली, मी तर वाचता वाचता कर्ण विसरुनच गेले.
हां तर काय सांगत होते, शरद यांचा लेख परिक्षेच्या पेपरमध्ये कस मुद्देसुद लिहितात तसा झालाय. म्हणजे आवरुन लिहिल्या सारखा. घे मुद्दा , थोडासा विस्तार, अन मग पुर्ण विराम. त्यातला रस आटत चाललाय. नुसत विवेचन, निरस.
वल्ली अन मृत्युंजयांच्या चर्चा विस्ताराने बरीच भर पडते , कारण महाभारत हे फक्त एका व्यक्ती विषयी नाही, तर एका कुटुंबा विषयी आहे. अन त्या कुटुंबातल्या कलहाचे पर्यवसान एका महायुद्धात झालेले आपण पहातो. त्यामुळे अस कोरडे पणान न लिहिता अनुषांगिक लिहिण जास्त संयुक्तिक ठरेल.

कृष्णाचं राजकारण भलतंच लवचिक होतं नै का!!

संजय क्षीरसागर's picture

28 Apr 2012 - 2:04 pm | संजय क्षीरसागर

>संजय क्षीरसागर यांच्याशी कदाचित पुढे होऊ शकणार्‍या चर्चांमध्ये मी तुम्हाला अपरिहार्यपणे नाराज करणार आहे.

= कुणीच नाराज होऊ नये अशी अपेक्षा आहे कारण उद्विग्नतेतून उद्विग्नताच निर्माण होते.

मी लिहीन ती खुली आणि मोकळी चर्चा असू द्या, तो "सहप्रवास" झाला तर सर्वांना उपयोगी आणि आनंदाचा होईल

>१. संजय क्षीरसागर हे आत्मज्ञान झालेले, किमान तसं माझ्या वाचनात आलेले आंतर्जालावरील एकमेव सक्रिय सदस्य आहेत, So I assume there must be something rare about Sanjayji, so I will leave no stone unturned

= मी स्वत:ला कोणत्याही प्रकारे विषेश समजत नाही.

माझं आकलन तुमच्याशी शेअर करून "तुम्ही सत्य आहात" हे सांगण्याचा माझा प्रयत्न राहिल

>अनिष्ट वळणावर जाणारा वाद, गुद्दागुद्दी, व्यक्तिगत ऑफेन्स-डिफेन्स
2. कितीही मर्यादा ओलांडायची नाही म्हटलं तरी संजयजींच्या बाबतीत मात्र अपरिहार्यपणे 'व्यक्तीगत' व्हावं लागणार आहे;
आत्मज्ञान झालेला माणूस व्यक्तिमत्त्वाच्या पार असतो असं म्हणतात त्यामुळं मी शिवीगाळ करीत नसेन तर संजयजींची यासाठी काहीच हरकत नसेल असं मी मानतो.

= सत्य समजलेल्या व्यक्तीनं आपण "केवळ व्यक्ती नाही" हे जाणलेलं असलं तरी रोजच्या जगण्यात त्याला व्यक्ती म्हणूनच जगावं लागतं.

संसारिक आणि शारीरिक विवंचना, वादविवाद, जवाबदार्‍या, नातेसंबंध, मित्रमैत्रिणी हे सर्व काही इतरांसारखच असतं फक्त सत्य गवसल्यानं तो स्वच्छंद जगतो आणि त्याचा मूड लाईट असतो इतकंच

>3. संजयजींचे जालावरील म्हणणे समजावून घेण्यासाठी त्यांच्या 'व्यक्तीत्वासंबंधातील' पैलुंना जाणून घेण्‍यासाठी/ कदाचित पुढे जाऊन म्हणेन की त्याबद्दल माझे अंदाज/निरीक्षणे/ मे बी निष्कर्ष सुद्धा सांगण्याकामी मला 'व्यक्तीत्वा'ला अपरिहार्यपणे स्पर्श करावा लागणार आहे.

= कुणाही सत्याप्रत पोहोचलेल्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा अ‍ॅनॅलिसिस, त्याचं प्रसंगोत्पात वागणं, त्याची शैली, यांचा उहापोह किंवा अनुसरण करून तुम्ही सत्याप्रत पोहोचू शकत नाही; तर त्या व्यक्तीचा निराकाराचा बोध आणि त्यानं त्याचा हरप्रसंगी कौशल्यानं केलेला उपयोग तुम्हाला सत्याची (किंवा स्वत:ची) उकल घडवू शकतो.

असो, हा प्रतिसाद शरदच्या पोस्टशी विसंगत आहे पण तो दुसरीकडे देता येणं शक्य नसल्यानं इथे दिला गेलायं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

सुजित पवार's picture

3 May 2012 - 8:46 pm | सुजित पवार

ईन्द्राने कवच का मागितले?

दुसरे द्युत खेलताना स्वताचि पत्नि पान्द्वनि का पनास लावलि? द्युतात पत्निला लाव्ननारे पाडव काय किवा तिचे वस्त्र हरन करनारे कौरव काय सर्व सार्खेच.