आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.
प्रतिक्रिया
20 Jul 2022 - 3:02 pm | अप्पा जोगळेकर
जर निर्णय झालाच नसेल तर कोर्ट प्रि एम्प्टीव निर्णय घेउ शक्त नाहि. ते फक्त निवाडा देउ शकते. बहुधा म्हणूनच निर्णय झाला नसावा.
20 Jul 2022 - 2:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>एक गोष्ट कळत नाहीये. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अशा अपात्रतेचा निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो.
तो निर्णय उपाध्याक्षांंनी घेतला आहे.
-दिलीप बिरुटे
20 Jul 2022 - 1:58 pm | कंजूस
होय. पण योग्य वेळी योग्य पावले उचलली गेली नाहीत आणि विरोधकांचे फावले.
20 Jul 2022 - 2:11 pm | चौकस२१२
जर पक्ष अंतर्गत लोकशाही असती तर संसदीय पक्ष अंतर्गत निवडणूक घेऊन हा प्रशन तात्काळ सोडवू शकतो
मग त्याला बाहेरील राजकीय पक्षाचा / त्यानच्या सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असो कि नसो ( बहुतेकदा संसदीय सभासद आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यां
बरोबर सल्लामसलत करीत असतील आणि पाठिंबा नसला तरी जर हि निवडणूक पुकारली तर पुढे राजकीय पक्ष आणि जनता नाराज होऊ शकते हा धोका असतो हे मान्य
हा धोका शिंदे गटाने पत्करला आहे पुढे दिसेल काय होईल ते !
हे सत्य सगळॆ कडे दिसतंय मग भारत असो / ऑस्ट्रेलिया असो कि युनायटेड किंग्डम
पण अनके लोक हेच लक्षात घेत नाहीत ... उगाचच न्यायालय वैगरे गोंधळ का होतो !
20 Jul 2022 - 2:27 pm | शाम भागवत
ठाकरे हा ब्रँड आहे. शिवसेनेबरोबर तो पाहिजेच.
उद्धव किंवा राज कोणितरी पाहिजेच आणि कोणितरी एक असणारच आहे.
जोपर्यंत राज आपले पत्ते उघडे करणार नाहीत तोपर्यंत उद्धव आमचे नेते हे पालूपद चालूच ठेवायला लागणार असे दिसते.
"जैसे थे" हीच स्थिती ब-याच काळ चालू राहणार असे दिसते आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पुढील हालचाली आता सुरू होतील. उद्धव गटांच्या सर्व हालचाली या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांच्या हालचालींना चांगलीच खीळ बसणार असे दिसतंय.
आता पक्ष पातळीवर शिंदे गट जोरात हालचाली सुरू करतील तर राज साहेब मनसेच्या नावाखाली जोरदार भेटीगाठी सुरू करतील असं दिसतंय. मग कधीतरी मोठा धमाका उडू शकेल.
शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल. त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते.
आता थोडी गंमत म्हणून लिहीतो आहे.
फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील. पवार साहेब असे पर्यंत महाराष्ट्रात फडणवीस असायलाच पाहिजेत असं मोदी-शहा यांना वाटत असल्यास तेही शिवसेना शिल्लक रहावी याच मताचे असणार. :)
20 Jul 2022 - 6:14 pm | चौकस२१२
शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते.
हो तसेच .. सेनेचे मुळ समर्थक एकदम सम्पने शक्य नाहि ..
20 Jul 2022 - 6:19 pm | कानडाऊ योगेशु
+१.
जसे जहर को जहर काटता है किंवा लोहे लो लोहा काटता है किंवा मराठीत काट्याने काटा काढणे..ह्यातील काहीही एक वाक्र्पचार घ्या व तो सेनेसाठी लागु पडतो.
कॉंग्रेस त्यातल्या त्यात काकांची काँग्रेस ला शह देण्यासाठी शिवसेनाच हवी. पण गेल्या दोन वर्षातल्या राजकारण पाहता सेना काकांच्या पूर्ण कह्यात गेली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या बंड केलेल्या नेत्यात अस्वस्थता पसरणे साहजिकच होते. बीजेपीशीच संघर्ष करायचा तर अगोदर दोन पारंपारिक पक्ष आहेत जे स्वतःची व्होटबँक सांभाळून आहेत त्यात तिथे शिवसेनेने शिरायचे ठरवले असे म्हटले तरी आपल्या ताटातील हिस्स्सा हे पक्ष वेळ येताच थोडेच देणार आहेत. ही गोष्ट मा. उध्द्ववजींना का समजली नाही हे कोडेच आहे. शिवसेना व भाजप एकमेकांना पूरक पक्ष आहेत.कितीही मतभेद असतील तर दोन्हीही एकत्र लढण्यातच दोघांचे हित होते.
शिवसेनेला आपल्या खुंट्याला बांधण्याचा प्रयत्न काकाही करतच होते कि.
20 Jul 2022 - 7:46 pm | श्रीगुरुजी
शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही.
मुळात सेनेकडे ९० लाख मते कधीही नव्हती. यातील बरीचशी मते भाजप समर्थकांची आहेत.
तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल.
मुर्खासारखे बरळणारे बढाईखोर म्हणजे आग नाही.
त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते.
हीच गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर महाराष्ट्रातून भाजप कायमस्वरूपी संपेल.
फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील.
सेनेला अखेरची घरघर लागली आहे. आता फडणवीस तर सोडाच मोदी शहा सुद्धा सेनेला वाचवू शकणार नाहीत.
20 Jul 2022 - 2:33 pm | श्रीगुरुजी
सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या १६ आमदारांची बाजू काहिशी दुर्बल वाटते. आम्ही पक्ष सोडला नसून अजून मूळ पक्षातच आहोत हा दावा अजूनही असेल तर मग या आमदारांनी पक्षप्रमुख ठाकरेंचे आदेश का पाळले नाहीत, त्यांनी बोलविलेल्या बैठकीस का उपस्थित राहिले नाहीत, गटनेता निवडणे हा पक्षप्रमुखाचा घटनादत्त अधिकार असूनही ठाकरेंनी बदललेल्या गटनेत्याचे आदेश न पाळता व स्वत:कडे अधिकार नसतानाही स्वत:हून वेगळा गटनेता कसा निवडला या मुद्द्यांवर या आमदारांची बाजू दुबळी आहे. १ ऑगस्ट किंवा त्यानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा न्यायालय या १६ जणांना (ज्यात शिंदे सुद्धा आहेत) अपात्र जाहीर करण्याची जास्त शक्यता आहे. अर्थात तसे झाले तर शिंद्यांना राजीनामा द्यावाच लागेल, उर्वरीत आमदारांची चलबिचल होऊन त्यातील काही जण मूळ सेनेत परत जाऊ शकतात. ते टाळण्यासाठी मंत्रीमंढळात स्थान देऊन त्यांना लालूच दाखविली जाऊ शकते जेणेकरून शिंद्यांनतर नवीन मंत्रीमंढळ स्थापन झाले तर त्यात आपण असू असा त्यांना विश्वास वाटेल. जर नवीन मुख्यमंत्री येणे अवघड असेल तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट आणतील.
बाकी नवीन मुख्यमंत्री निवडणे, बहुमतासाठी अधिवेशन बोलविणे, नवीन सभापतींची निवडणूक घेणे हे निर्णय नक्कीच घटनेला धरून आहेत.
20 Jul 2022 - 2:46 pm | शाम भागवत
अपात्रतेचा अधिकार कोर्टाला नाही. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. सुप्रीम कोर्ट एवढाच निर्णय देईल की विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावरच मग त्याच्या वैधतेबाबतचा निर्णय कोर्टाकडे मागता येईल.
उपध्यक्षांनी फक्त नोटीस बजावलेली आहे. त्यांनी कोणालाही अपात्र ठरवलेले नाही. यास्तव नोटीसीवरची कार्यवाही करण्यास कोर्ट मंजूरी देईल असे वाटते. अर्थातच आता विधानसभा अध्यक्ष अस्तित्वात असल्याने उपाध्यक्षांना निर्णयप्रक्रियेत कोणतेच स्थान नसेल.
थोडक्यात छापा पडला तरी शिंदेगट जि़कणार. काटा पडला तर उद्धव गट हरणार अशी स्थिती आहे.
पण विधानसभेने पात्र अपात्र यासंबंधात कोणताच निर्णय घेतलेला नसताना कोर्ट स्वतःहूनच हा अधिकार आपल्याकडे घेईल असे कोणाला वाटत असल्यास मात्र गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे घडायला काही हरकत नसावी.
20 Jul 2022 - 2:59 pm | श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर नोंदवलेलं निरीक्षण महत्वाचं आहे. हरिश साळवे यांनी वेळ वाढून मागितल्यानंतर न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. महत्वाचं म्हणजे, अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाच निर्णय घेणार आहे. न्यायालयाने विधानसभेतील कामकाजातील सर्व कागदपत्रं सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला असून पुढील सुनावणीत सादर करावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
म्हणजे - (१) अपात्रतेसंबंधी फक्त सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेणार. नवीन सभापतींना याविषयी निर्णय घेता येणार नाही.
(२) आहे ती परिस्थिती कायम ठेवायची असल्याने सभापतींना अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेता येणार नाही. कदाचित मंत्रीमंंडळ विस्तार सुद्धा करता येणार नाही.
(३) सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय न घेता हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवेल असे वाटते. तसे झाले तर निकाल खूप लांबणीवर पडेल व त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊ शकते.
20 Jul 2022 - 6:22 pm | चौकस२१२
अपात्रतेचा अधिकार कोर्टाला नाही. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो.
आणि अध्यक्षसाची निवडणूक उद्धव गट जिंकू शकले नाहीत हे सत्य आहे
असो मूळची अनैसर्गिक युती होती + राष्ट्रवादीने सगळं कारभार चालवला ... म्हणून हे सगळे झाले .. नुसते पैसे घेऊन एवढेआमदार असा निर्णय घेतील एवढा धोका घेतील अ से वाटत नाही
"गद्दार" आमदारांर्नी आता अनेक मुलाखती दिलैया आहेत त्यात त्यांनी बरीच नाराजी कशी होती त्या बद्दल भाष्य केले आहे ते जरूर ऐकावे
अर्थात ते होनार नाही त्याउलट - गद्दार/ गौहाती ला गेलेले ते मुडदे / या आणि कामाठी पुर्यात बसा (गौहाती ला गेले ल्यात ४ महिला होत्या हे माहिती असून सुद्धा )/ विधानभवनाची वाट वारली वरून जाते असली पातळी दाखवणारी विधाने सर्रास केली गेली ...
20 Jul 2022 - 2:53 pm | शाम भागवत
गटनेता म्हणून कोणाला मान्यता द्यावयाची हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. तो निर्णय शिंदे गटाच्या बाजूने घेतल्यावर मग त्याविरूध्द कोर्टात जाता येईल. मला वाटते अशा प्रकारे कोर्टकचे-या चालू राहतील. सर्व दाव्यांचे कोर्टाचे निकाल येईपर्यंत विधानसभेची मुदत संपून नव्याने निवडणुका होऊन नवीन विधान सभा अस्तित्वातही आलेली असेल. :))
बोम्मई केसमधे तर दोन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या होत्या. :)))
20 Jul 2022 - 3:06 pm | अप्पा जोगळेकर
गटनेता बदलणे हे पक्श प्रमुखाच्या मनमानीवर अवलंबून आहे का? २/३ मेजॉरिटी लागत नाही का
20 Jul 2022 - 3:17 pm | श्रीगुरुजी
नाही
20 Jul 2022 - 3:16 pm | श्रीगुरुजी
अपात्रता किंवा इतर काही विषयात अंतिम अधिकार सभापतींना असले तरी हे अधिकार absolute किंवा सार्वभौम नाहीत हे न्यायालयाने पूर्वी काही प्रकरणात दाखवून देऊन सभापतींचे निर्णय रद्द केले आहेत.
१९८० च्या दशकात आंध्र विधानसभेच्या सभापतींनी इनाडू दैनिकाचे संपादक रामोजी राव यांना एका हक्कभंग प्रकरणात शिक्षा देण्यासाठी विधानसभेत उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध रामोजी रावांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी सांगितले की सभापतींच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयास नाही व पुन्हा एकदा रामोजी रावांना विधानसभेत उपस्थित राहण्याचा आदेश दिला. रामोजी रावांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणली. शेवटी सभापतींना माघार घ्यावी लागली होती.
अगदी अलिकडचे प्रकरण म्हणजे मागील वर्षी पीठासीन अधिकारी भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यातच रद्द करून सभापतीपेक्षा आपलाच अधिकार सर्वोच्च आहे हे दाखवून दिले.
20 Jul 2022 - 3:25 pm | अमरेंद्र बाहुबली
कर्नाटकच्या राज्यपालांनी बहुमत नसताना येदीयुरप्पांना शपथ दिली होती. न्यायालयाने दणका देऊन ती रद्द करून बहुमत घ्यायला लावले होते व भाजपेयी/राज्यपाल तोंडावर आपटले होते. मग घोडेबाजार, फोडाफोडी करून कर्नाटकात सत्ता आणावी लागली.
महाराष्ट्राच्याही कोश्यारीनी बहुमत नसताना फडणवीस व अजितदादा ह्याना शपथ दिली होती. मग शिवसेना कोर्टात गेली व कोर्टाने आवाजी मतदानानाने बहुमत सिध्द करायला लावले. लगेचच फडणवीसांनी राजीनामा दिला, कोश्यारी व फडणवीस दोन्हीही तोंडावर आपटले. कोश्यारींचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं, जळफळाटामुळे शपथ घेताना मंत्र्यांना त्रास देत होते. काज्यापाल कसा नसावा ह्याचं ऊत्तम ऊदाहरन म्हणजे कोश्यारी.
20 Jul 2022 - 6:24 pm | चौकस२१२
१९८० च्या दशकात आंध्र विधानसभेच्या सभापतींनी इनाडू दैनिकाचे संपादक रामोजी राव
रामोजी राव हे संसदेचे सभासद होते का? तसे नसेल तर संसद अशी सक्ती वेस्टमिनिस्टर पद्धती मध्ये करू शकत नाही मुळात
20 Jul 2022 - 7:54 pm | श्रीगुरुजी
ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. आंंध्र विधानसभेत एकदा प्रचंड गोंधळ, मारामाऱ्या, फेकाफेकी झाल्यानंतर त्यांनी आपल्या वृत्तपत्रात "जेष्ठांचा गोंधळ" या शीर्षकाचा अत्यंत कठोर टीका करणारा खरमरीत अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे सर्व विधीमंडळ सदस्य अत्यंत संतापले होते व रामोजी रावांना विधीमंडळात आणून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी सभापतींकडे केली होती.
हेच ते प्रकरण -
https://www.indiatoday.in/magazine/society-the-arts/media/story/19840430...
20 Jul 2022 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली
पक्षांतरबंदी कायदा महाकडक हवा. देशात लोकशाही नी पक्षात हुकूमशाही ही हवीच. पक्ष वाढवायला बाळासाहेबांसारख्या माणसाने कष्ट घ्यायचे. अंगावर केसेस घ्यायच्या. रिक्षावाला, भाजीवाले, पानटपरीवाले ह्याना मोठं करायचं नी नंतर ह्यांनीच ऊलटून पक्षावर दावा ठोकायचा. ज्या फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून शिंदे बसलेत त्यांचे वडील आमदार नी काकू मंत्री होत्या, ते घराणेशाहीतून आलेत, शिंदेंचं काय होतं? कुणी मोठं केले? सेनेनेच ना? आज त्याच सेनेवर ऊलटताना त्याना थोडं काहीतरी वाटायल हवं होतं. असे अनेक शिंदे सेना भविष्यात निर्माण करेल ही प्रक्रीया निरंतर चालू राहील. भाजपात तुम्ही श्रीमंत किंवा घराणेशीहीतील राजकीय पार्श्वभूमीचे नसाल तर तुम्हाला काहीही मिळनार नाही.
20 Jul 2022 - 3:22 pm | श्रीगुरुजी
हे संपूर्ण प्रकरण भाजपवर बुमरॅंग होण्याची शक्यता आहे हे मी पूर्वीच लिहिले होते व आता तसे होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. तसे झाले तर भाजपचे पुन्हा एकदा नाक कापले जाईल. या प्रकरणाचा काहीही निकाल लागला तरी शिवसेना तर संपल्यातच जमा आहे. एवढी गुंतागुंत करण्याऐवजी भाजपने निवडणुकीसाठी जास्तीत जास्त सव्वादोन वर्षे वाट पहायला हवी होती.
20 Jul 2022 - 3:29 pm | अमरेंद्र बाहुबली
शिवसेना मविआतच राहीली नी मुंबई बागातील जास्त जागा पदरात पाडून घेतल्या तर ४०+ आमदार जिंकतीलच. कोल्हापूर, औरंगाबाद अश्या भागातील अनेक ामदार फक्त सेनेनूळेच आहेत. तिथे स्थानीक नेत्याला कुणीही विचारत नाही, असे लोक पुन्हा सठाकरेंची माफी मागून सेनेत शिरतील. ऊदा. दादा भूसे, भूमरे, संजय शिरसाठ. नाही आले तर ते पडतीलच. सोना निवडूण आणू शकली नाही तरी ह्या लोकांना पाडायची ताकद राखून आहे.
20 Jul 2022 - 6:20 pm | यश राज
अबा
ही सोना कोण म्हणायची ? अशी काय ताकद आहे हिच्याकडे ??
20 Jul 2022 - 3:27 pm | श्रीगुरुजी
प्रचारात दिलेली आश्वासने न पाळणे, निवडणूकपूर्व केलेली युती तोडणे, निकालानंतर विरोधात लढलेल्यांशी हातमिळवणी करणे, निकालानंतर एक किंवा सर्वच्या सर्व सदस्यांनी पक्ष बदलणे याविषयात अत्यंत कडक कायदे आणण्याची नितांत गरज आहे. असे करणाऱ्यांना जन्मभर निवडणूक लढण्यास बंदी व फौजदारी शिक्षा हवी.
20 Jul 2022 - 3:33 pm | श्रीगुरुजी
एखाद्या नेत्याने सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतरच तिला/त्याला मुख्यमंत्री/पंतप्रधान पदाची शपथ देण्यात यावी, जेणेकरून शपथ घेतल्यापासून बहुमत सिद्ध करेपर्यंतच्या काळात कोणताही निर्णय घेता येणार नाही.
निवडणुकीत पराभव झालेल्यांना पुन्हा निवडून येईपर्यंत मंत्रीपद देता येणार नाही.
आमदार/खासदार नसलेल्यांना मंत्री करून ६ महिन्यात निवडून आणण्याच्या अटीऐवजी निवडून आल्यानंतरच मंत्री करावे.
20 Jul 2022 - 3:31 pm | अप्पा जोगळेकर
जर निर्णयच घेतला नसेल तर तो योग्य किन्वा अयोग्य हे कसे ठरवतात? सभापती ने कोणता निर्णय कधी घ्यायचा हे कोर्ट कसे ठरवेल? आणि गट्नेता बद्लला हे निर्णय ठाकरेनी राज्यपालांना कळवणे आवश्यक नव्हते का?
20 Jul 2022 - 3:37 pm | श्रीगुरुजी
अपात्रतेसंबंधी खटल्याच्या निकालापूर्वीच सभापती निर्णय घेऊ शकतील हे लक्षात आल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.
गटनेत्याचा निर्णय फक्त सभापतीला कळविणे बंधनकारक आहे व त्यावर मान्यतेची अधिकृत मोहर सभापती उठवितो. अर्थात तो हा निर्णय अमान्य करूच शकत नाही.
20 Jul 2022 - 8:05 pm | सुबोध खरे
अपात्रतेसंबंधी खटल्याच्या निकालापूर्वीच सभापती निर्णय घेऊ शकतील हे लक्षात आल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.
नाही
सर्वोच्च न्यायालयाला असा अधिकार नाही. उद्या कुणाला प्रतोद नेमायचे किंवा गटनेता नेमायचे याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे नाहीत
सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे याचा अर्थ स्टेट्स को ( status quo) म्हणजे वादी प्रतिवादी न्यायालयात येण्याअगोदरची स्थिती जशी होती तशीच ठेवणे.
१ऑगस्ट ला काहीही होणार नाही. हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटना पीठाकडे दिले जाईल. ज्यात अनेक मूलभूत गोष्टींचा उहापोह केला जाईल.
उदा. घटनेत लिहिलेले आहे कि २/३ आमदारांना वेगळे व्हायचे असेल तर त्यानं कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल. उद्या समजा भाजप च्या २०२ खासदारांना मोदींविरुद्ध जायचे असेल तर त्यांना केवळ एक खासदार असलेल्या Viduthalai Chiruthaigal Katchi सारख्या पक्षात( ज्याचे नावही आपल्यापैकी कुणी ऐकलेले नसेल) विलीन व्हावे लागेल. हे हास्यास्पद( absurd) आहे. कारण हे नैसर्गिक न्यायाच्या मूलतत्वाच्या विरोधात जाईल.( principles of natural justice)
असे घटनाकाराना नक्कीच अध्याहृत नव्हते. प्रत्येक गोष्ट घटनेत लिहिलेली नसते त्यामुळे घटनाकारांनी घटनादुरुस्तीचा पर्याय ठेवला आहे. तसेच न्यायालयाला घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु सदनाच्या पटलावर होणाऱ्या गोष्टींवर न्यायालयाचे नियंत्रण ठेवलेले नाही. लोकशाहीच्या चार स्तंभाना बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलेले आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करू नये असेही लिहिलेले आहे.
यामुळेच उद्या श्री शिंदे यांच्या गटाला संपूर्ण अपात्र ठरवणे न्यायालयाला खूप कठीण जाणार आहे. यास्तवच हे प्रकरण ५ किंवा ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाईल आणि दोन तीन वर्षे याबाबत सर्व चर्चा संदर्भ तपासले जातील आणि पक्षांतर बंदी कायद्याचा संपूर्ण अर्थ लावला जाईल असे मला वाटते. एस आर बोम्मई निवाड्यात असेच झाले होते.
20 Jul 2022 - 8:14 pm | श्रीगुरुजी
अपात्रतेसंबंधी नवीन सभापतींना केव्हाही निर्णय घ्यायचा घटनादत्त अधिकार आहे व ते घाईघाईने तो अधिकार वापरून त्या १६ आमदारांना पात्र ठरवून या खटल्यात एक नवीन उपकथानक निर्माण करून एक प्रकारची कुंठितावस्था निर्माण करू शकतील हे न्यायाधीशांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच त्यांनी सभापतींना या विषयावर निर्णय घेण्यापासून रोखले आहे.
21 Jul 2022 - 10:22 am | सुबोध खरे
मुळात विधानसभेच्या नियमाप्रमाणे अपात्र ठरवण्यासाठी कारणे दाखवा नोटिशीमध्ये सात दिवसांचा वेळ द्यावा लागतो. येथे श्री झिरवळ यांनी केवळ ४८ तास वेळ दिला होता. यात १६ आमदारांना अपात्र ठरवून बाकीच्यांना व्हीप लावून अपात्र ठरवण्याचा डाव होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे देऊन श्री झिरवळ यांची पंचाईत केली.
यानंतर अविश्वास ठराव मांडण्यासाठी राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच विधानसभेचे अधिवेशन बोलवायला हवे असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला गेला होता पंरंतु महाधिवक्ता यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना हे स्पष्ट केले कि अल्पमतात आलेले सरकार/ मंत्रिमंडळ कधीच असे अधिवेशन बोलावण्याचा सल्ला राज्यपालांना देणार नाही. शिवाय राज्यपाल याना घटनेच्या अधीन राहून स्वतःचे निर्णय घेता येतात. त्यामुले सरकार अल्पमतात आले आहे अशी खात्री झाल्यास राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावू शकतात आणि यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक नाही.
यामुळे न्यायालयात असे अधिवेशन घेण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे हा मुद्दा सुद्धा निकालात निघाला.
याशिवाय श्री झिरवळ यांच्या विरुद्ध अविश्वासाची नोटीस पाठवलेली असताना त्यांना अपात्रतेची निर्णय घेता येणार नाही असाही मुद्दा मांडला गेला परंतु श्री झिरवळ यांनी हि नोटीस कोणत्याही आमदारांच्या अधिकृत इ मेल वरून आलेली नसल्याने त्यावर कार्यवाही करता येणार नाही असा पवित्रा घेतला.
परंतु हि इ मेल एका आमदारांच्या वकिलाच्या अधिकृत इ मेल यावरून आलेली आहे त्यामुळे ती अधिकृत ठरेल कि नाही हे प्रकरण पण न्यायालयाच्या विचाराधीन आहे.
राहिली गोष्ट-- राज्यपाल आणि स्पीकर (प्रतोद) हा नि:पक्षपाती असावा हा संकेत आहे. परंतु तसे बऱ्याच वेळेस असत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर न्यायालयाचे किती निर्बंध असतील हाही एक महत्त्वाचा मुद्दा या खटल्यात विचाराधीन असेल.
परंतु एस आर बोम्मई वि भारतीय गणराज्य या केस मध्ये ९ न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने बहुमत किंवा अल्पमत हे केवळ सदनातच ठरवले जाईल आणि त्यावर न्यायालयाचा अधिक्षेप असू शकत नाही असे स्पष्ट लिहिलेले आहे.
गटनेता, प्रतोद आणि राज्य पाल यांच्या कार्यकक्षे बद्दल या खटल्यात संपूर्ण विचार होण्याची अपेक्षा आहे.
शिवाय
अशी स्थिती येऊ शकेल कि एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा वयामुळे पक्षाध्यक्ष पद दिलेले आहे परंतु सर्वच्या सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध असतील तरी त्यांच्याच तालावर लोकनियुक्त प्रतिनिधीना नाचावे लागते आहे. असे असेल तर हि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. याचाही संपूर्ण विचार या खटल्यात करावा लागणार आहे.
त्यामुळे असे दोन तृतीयांश किंवा अधिक सांसद जर वेगळे होऊ इच्छित असतील तर त्यांचा वेगळा गट होईल कि त्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता देता येईल हाही एक मुद्दा विचाराधीन राहील.
हे सगळे मुद्दे घटनापीठाकडून तपासून त्यावर चर्चा आणि कायद्यातील तरतुदी पाहून निकाल येईपर्यंत दोन तीन वर्षे तर नक्कीच पण कदाचित अजून पाच वर्षे सुद्धा जातील त्यामुळे शिंदे सरकार बहुधा आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे मला वाटते.
अर्थात श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असल्याने आता खटला त्यांच्या बाजूने गेला तरी मविआ चे सरकार परत येणे शक्य नाही.
एकतर हे सरकार पुढची अडीच वर्षे काम पाहिल अन्यथा फेरनिवडणूका घेतल्या जातील.
यामुळे म वि आ चे नुकसान झाले ते झालेच आहे. शिवसेना दुभंगली आहे. याचा बराचसा फायदा भाजप आणि थोडा फार राष्टवादीला होऊ शकेल.
परंतु केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून परत सत्तेत येण्याची शक्यता फारच कमी आहे.
आणि "उरलेल्या" शिवसेनेने परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करण्याचा मूर्खपणा केला तर श्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सोडून त्यांच्याबरोबर कोणीही राहणार नाही.
त्यामुळे केवळ स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी श्री उद्धव ठाकरे यांनी हि असंगत महा विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे असे मला वाटते.
21 Jul 2022 - 10:42 am | अमरेंद्र बाहुबली
अशी स्थिती येऊ शकेल कि एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा वयामुळे पक्षाध्यक्ष पद दिलेले आहे परंतु सर्वच्या सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध असतील तरी त्यांच्याच तालावर लोकनियुक्त प्रतिनिधीना नाचावे लागते आहे. असे असेल तर हि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. याचाही संपूर्ण विचार या खटल्यात करावा लागणार आहे.
ते कसे ब्वा? ठाकरे पक्षातील घटनेप्रमाणे निवडूण आले आहेत. फक्त आमदार मिहणजे पक्ष नसतो. ज्यांना पटत नसेल त्यानी सोडून पळून जावे. ह्यात लोकशाहाची थट्टा वगैरे शब्द वापरणे हास्यास्पद आहे.बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता मविआतच राहण्याचा शहाणपणा दाखवावा, भाजपेयी ईडी, राज्यपाल, सीबीआय अश्या सर्व पाळलेल्या संस्था ऊध्दव ठाकरेंवर सोडतील पण ठाकरेंना ठाम राहून आघाडी बरोबरच थांबावे, सत्ता मविआचीच येईल नग नंतर बदलाही घेता येईल.
21 Jul 2022 - 11:52 am | शाम भागवत
असंच व्हावं अशी इच्छा आहे.
देव करो व त्यांना अशीच बुध्दी देव देवो.
_/\_
21 Jul 2022 - 11:55 am | सुबोध खरे
देव करो व त्यांना अशीच बुध्दी देव देवो.
म्हणजे मग श्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढेच त्यांच्याबरोबर राहतील
21 Jul 2022 - 12:36 pm | सुबोध खरे
संपादित.
व्यक्तिगत टिपणी टाळावी. व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद आढळल्यास कारवाई केली जाईल.
21 Jul 2022 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली
संपादित.
व्यक्तिगत टिपणी टाळावी. व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद आढळल्यास कारवाई केली जाईल.
21 Jul 2022 - 1:36 pm | श्रीगुरुजी
सेनेला २०१९ मध्ये भाजपने १२४ इतक्या प्रचंड जागा देऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता. आता सेना फुटली नसती तरी पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने सेनेला जास्तीत जास्त १०० जागा दिल्या असत्या.
आता पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा मविआ एकत्र लढली तरी सेनेला फार तर ६० जागा लढवायला मिळतील. उर्वरीत २२८ जागा राष्ट्रवादी व कॉंग्रेस स्वत:ला घेतील. अश्या परिस्थितीत सेना ६० पैकी २०-२५ जागा जिंंकू शकेल.
जर सेना हट्ट करून स्वबळावर लढली तर सेनेला फार तर १० जागा मिळतील.
मविआबरोबर किंवा स्वबळावर असो, सेना आत महाराष्ट्रात अदखलनीय झाली आहे व हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. सेनेचा प्रवास शेकाप, जनता दल, डावे पक्ष, लाल निशाण गट अश्या पक्षांच्या पायवाटेने सुरू झाला आहे व हा एकेरी मार्ग आहे.
21 Jul 2022 - 4:44 pm | शाम भागवत
शिंदे + राज ठाकरे यांची नवीन शिवसेना अस्तित्वात येईल. उद्धव यांची शिवसेना संपून जाईल.
:))))))))
21 Jul 2022 - 5:09 pm | श्रीगुरुजी
शिंदे + राज ठाकरे म्हणजे शिंदे + शून्य.
शिंदे राजसारख्या अत्यंत चंचल, अस्तित्वहीन व अविश्वासू व्यक्तीशी हातमिळवणी करण्याची शक्यता शून्य.
पण फडणवीस राजशी हातमिळवणी करण्याची योजना करू शकतात कारण त्यांना ठाकरे आडनावाच्या व्यक्तीसमोर वाकण्याचे प्रचंड ऑब्सेशन आहे.
21 Jul 2022 - 5:15 pm | शाम भागवत
:)))
21 Jul 2022 - 5:16 pm | कानडाऊ योगेशु
राज ठाकरे आरंभशूर आहेत. दोन्ही ठाकरे बंधु हस्तिदंती मनोर्यात बसुन काही घोषणा देणे म्हणजे नेतृत्व करणे असे समजतात. मनसे ला सुरवातीला जितका प्रतिसाद मिळाला होता तो राज ठाकरेंनी आपल्या कर्माने घालवला. तेच तिकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल सारख्या चतुर नेत्याने आपला अजुन लोकप्रिय केले. दोन्ही बंधुंना भाकरी फिरवण्याची इच्छाच नाही. शिवसेनेने संजय राऊत सारख्याला त्यासाठी नेमले आहे आणि त्याने फक्त धूर करुन टाकलाय. शिंदे जरी राज ठाकरेंसोबत गेले तरी काही दिवसांनंतर मनसेची जी अवस्था आहे तशीच त्यांचीही अवस्था होऊन जाईल.
21 Jul 2022 - 5:43 pm | श्रीगुरुजी
काहीही. राज ठाकरे आता प्रगल्भ झालेत, त्यांनी जे मुद्दे पुढे आणलेत त्याला देशात प्रचंड पाठिंबा मिळतोय, ते अगदी अचूक पावले टाकताहेत, ते पुढील निवडणुकीत चमत्कार करून दाखविणार (२०१९ च्या निवडणुकीआधीच हे भाकीत केले होते) असे भाऊ तोरसेकरांसारखे राजकीय विश्लेषक अनेक वर्षांपासून सांगताहेत. येथील काही विश्लेषक अगदी हेच सांगताहेत. एकदा राज ठाकरे मैदानात उतरू देत. मग पहा बाकी पक्ष कसे अस्तित्वहीन होतात ते.
21 Jul 2022 - 5:46 pm | शाम भागवत
:))
21 Jul 2022 - 10:47 am | क्लिंटन
त्यातही १६ आमदारांना अपात्र ठरवायची मागणी पक्षांतरबंदी कायद्यात बसते का? हे १६ आमदार उध्दव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते त्यानंतर त्यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा ही मागणी केली गेली. आमदारांनी पक्षादेश (व्हिप) चे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायदा लागेल हे समजू शकतो पण विधानसभेच्या सभागृहात कोणतेच मतदान होणार नव्हते/ व्हायचे नव्हते अशावेळी व्हिप यायचा काही संबंधच नाही. पक्षांतरबंदी कायदा हा सभागृहाबाहेर काय चालते त्याला लागू पडतो का? एक टोकाचे उदाहरण म्हणजे समजा उध्दव ठाकरेंनी असा आदेश काढला असता की मातोश्रीवर येऊन माझे पाय चेपलेच पाहिजेत तर त्या आदेशाचे उल्लंघन करणार्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा येऊ शकला असता का? म्हणजे सभागृहाबाहेर आमदारांनी काय करावे याविषयी पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अॅबसोल्यूट असतो का? सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाप्रमाणे पक्षविरोधी कारवाया केल्या तरी त्याला पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा येऊ शकतो. आता पक्षाध्यक्षाने बोलावलेल्या बैठकीला न जाणे ही त्या व्याख्येप्रमाणे पक्षविरोधी कारवाई ठरते का?
याविषयी एक फेसबुक पोस्ट बघितली. उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन बहुमूल्य संधी व्यर्थ दवडली. ३० जूनला त्यांनी विधानसभेला सामोरे जायला हवे होते आणि विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला हवे होते. त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करावे हा व्हिप त्यांच्या बाजूला काढता आला असता आणि मग एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांची गोची झाली असती कारण एकीकडे आपण शिवसेनेतच आहोत आणि उध्दव ठाकरे हेच आमचे नेते आहेत याचा घोषा शिंदे गटाचे आमदार करत होते. कारण त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ती पक्षविरोधी कारवाई ठरायची भिती होती. तसे व्हायला नको म्हणून कुठेही ठाकरेंवर टीका होणार नाही याची काळजी सगळे आमदार घेत होते. पण विधानसभेत मतदानाची वेळ आली असती तर त्यांना व्हिपचे उल्लंघन करता आले नसते. किंवा त्यांनी ते उल्लंघन केल्यास सभागृहाचे सदस्यत्व जायची भिती होती. पण स्वतः ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला आणि ती वेळच येऊ दिली नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्याचा उद्देशही तोच होता असे दिसते.
21 Jul 2022 - 11:17 am | कानडाऊ योगेशु
अश्या राजकिय खाचाखोचा मा.उध्द्वजींना माहीत असण्याची शक्यता फार कमी वाटते. आतापर्यंत तर काकांच्या सल्ल्यानेच सरकार चालले होते आणि काकांनी वेळ येताच बहुदा नरो वा कुंजरोवा असा पवित्रा घेतला असावा.
21 Jul 2022 - 11:38 am | सुबोध खरे
अश्या राजकिय खाचाखोचा मा.उध्द्वजींना माहीत असण्याची शक्यता फार कमी वाटते.
कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्या सारखे नानावलेले वकील त्यांच्या बाजूने उभे आहेत. तेंव्हा काकांच्या य: कश्चित सल्ल्याची त्यांना गरज नाही.
मुळात उद्धव ठाकरे हे अल्पमतात आलेले आहेत हे शेम्बड्या पोरालाही समजते आहे.
केवळ पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून लफडी कुलंगडी करत आपले सरकार टिकवण्याचा आणि आता आपला पक्ष टिकवण्याचा हा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे.
अध्यादेश ( व्हीप) नसेल आणि गुप्त मतदान असते तर म वि आ अजून मोठ्या फरकाने पडली असती हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.
Can it be argued that someone who doesn't even have 15-20 MLAs supporting him should be brought back? Saying that a CM has lost the majority in the House isn't voluntarily giving up membership. Raising your voice within your party without supporting some other party isn't defection. Membership in a party isn't an oath of silence,” Salve argued adding that the Supreme Court can't assume the role of a tribunal to decide disqualification petitions. “The larger-than-life arguments on democracy in peril etc doesn't square up when a CM has been overthrown by his own party members,” Salve said.
CJI NV Ramana said some issues including removal of Schedule 3 on split and whether a minority within a legislature party can disqualify the majority are some of the issues that will require a decision.
तेंव्हा हि लोकशाहीची पायमल्ली आहे आणि घटनेचे उल्लंघन आहे सारखी मोठी मोठी विधाने येथे गैरलागू आहेत.
21 Jul 2022 - 5:26 pm | कानडाऊ योगेशु
मी क्लिंटनसाहेबांनी वर लिहिलेल्या राजीनामा दिला नसता तर ह्या शक्यतेबाबत बोलत होतो. इतका पुढचा विचार करण्याची शिवसेनेची सधयची कुवत दिसत नाही.काकांसोबत होते तो पर्यंत त्यांच्या कलाने चालले पण काकांनी वार्यावर सोडुन दिल्यावर खिशातल्या वाघनखांचे कोथळ्याचे करायचे काय हेच समजेनासे झाले आणि परिणामे स्वतःचाच अंगरखा व अंतर्वस्त्र फाडुन बसलेत.
21 Jul 2022 - 5:53 pm | अमरेंद्र बाहुबली
ऊध्दव ठाकरेंनी टावी वर राजिनामा देऊन जी सहानूभूती मिळवली ती विधानसभेत मिळाली नसती. त्या सहानुभूतीच्या लाटेचा परिणाम म्हणून आज तथाकथात अति अभ्यासू नेतृत्व ऊपमामू बनलंय.
21 Jul 2022 - 11:30 am | सुबोध खरे
त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करावे हा व्हिप त्यांच्या बाजूला काढता आला असता
हे दुधारी शस्त्र होते.
कारण शिंदे गटाने आपला श्री गोगावले हा वेगळा प्रतोद नेमला होता आणि त्यांनी जर सर्व शिवसेना आमदारानी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करा असा अध्यादेश काढला असता ( आणि निकाल शिंदे गटाच्या बाजूने गेला असता) तर बाकी आमदारांनाच अपात्र ठरवले गेले असते आणि त्यामुळे फार मोठी नामुष्की झाली असती.
मुळात अविश्वास ठराव पास झालाच असता. त्यामुळे हाकलले गेलेले मुख्यमंत्री असा त्यांचा लौकिक झाला असता. ( अजून तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री सन्मानाने पायउतार झालेले आहेत) नोकरीचा राजीनामा कडेने आणि नोकरीतून बडतर्फ करणे यातील फरकासारखे आहे
बोम्मई केसच्या निकाल प्रमाणे सदनाच्या आत होणाऱ्या गोष्टींवर न्यायालयाचे नियंत्रण अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे तेल हि गेले आणि तूप हि गेले अशी स्थिती झाली असती.
विधानसभेचे अधिवेशन बोलावू नका असा आदेश देण्याचा किंवा अविश्वासाच्या ठरावाला स्टे देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नाही. केवळ कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे का आणि झालेला निर्णय घटनाबाह्य नाही एवढेच पर्यवेक्षण करण्याचा न्यायालयाला अधिकार आहे असे असंख्य वेळेस अधोरेखित झालेले आहे.
20 Jul 2022 - 3:56 pm | शाम भागवत
शिंदे साहेबांचे भाषण
एकदम छान बोलतात. ऐकत राहवसं वाटतं.
मनमोकळं, दिलखुलास, मनापासून केलेलं
कोणाला टोमणे नाहीत. प्रतित्युर नाहीत. आरडाओरडही नाही.
आपण काय करणार याची दिशाही मिळते.
आपण जे काही केले त्यामागचे हेतू पण स्पष्ट करतात.
_/\_
20 Jul 2022 - 4:03 pm | शाम भागवत
हा माणूस शिवसैनिकांची मानसिकता पूर्णता बदलून टाकेल एवढा प्रभावी आहे. एकदम सकारात्मक मानसिकतेचे शिवसैनिक भविष्यात दिसायला लागले तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्रातील लोकांचं प्रेम या माणसाला नक्की मिळणार.
_/\_
देवेंद्र आता केंद्रात जायला मोकळा.
:)