Thought Experiment No 1
खयालोमे
खयालोमे
“एक” “शून्य” रोबो!
उपोद्घात
Another Universe. Another Time.
फार फार वर्षांपूर्वी- किती वर्षांपूर्वी?- कुणालाच माहित नाही की किती वर्षांपूर्वी- काहीही नव्हते. अवकाश नव्हते आणि काल नव्हता.
ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य.
खरं तर आज शाळेला सुट्टी होती , तरीही गुंड्याला भल्या पहाटे उठवले होते. सुट्टीचा दिवस असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट आज स्वारीचा उत्साह दांडगा होता. कारण आज महाशिवरात्री होती. शंभू महादेव त्याचं आवडतं दैवत आणि उपवासाचा छान छान फराळ खायला मिळणार म्हणून अजून जास्त खुश. गुंडया जसा आंघोळ करुन तयार झाला तसं आईनं हातात बेलान भरलेली पिशवी दिली आणि सांगितलं - "हे बघ गुंड्या ह्यात एकशे आठ बेलाची पानं आहेत. मंदिरात जाऊन महादेवाला वाहून ये. पण तिथं जाऊन बद्द करून पिशवी पिंडीवर उलटी करून रिकामा होऊ नको.
पालखी मंदिरातून निघून जवळपास तीन तास झाले होते. पालखी निघाली ती देखील भर दुपारची. डोक्यापासून नखापर्यंत तो भंडाऱ्यात न्हाला होता. अंगातून निघणाऱ्या घामासोबत ओघळत भंडारा थोडा खाली सरकत होता. अनवाणी पायांना रस्त्यावरचे खडे टोचत होते. पण ती देवाची पालखी, ढोलाच्या तालावर, टाळाच्या चालीवर नामघोषसोबत पुढे सरकत राहिली. मानकरी आलटून पालटून पालखी घेत होते. पालखी पुन्हा एका चौकात येऊन थांबली, तसा देवाच्या नावाचा मोठा जयघोष झाला. ढोलाचा आवाज अजून वाढला, भंडारा आभाळाला भिडला. पुन्हा एकदा त्याला पालखी घ्यायचा मान मिळला.