जे न देखे रवी...
अक्षय्य तृतीया
घ्या कविता....
सोनार आठवण
करुन देतात,
पेपरमधे पानभर
जाहीराती देतात...
अलीबाबाची गुहा,
सापडल्यासारखे,
दागिन्यांचे फोटोज ।
कंगन हार कर्णफूलं
कंठे तोडे नाणी कलश,
चळत बिस्किटोज ।।
कुणालाच आठवत नाहित ।
घामटलेले खाणकामगार,त्यांचे
कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।।
रोबोटमय जगाने लावला माणसाचा पुर्नशोध
रोबोट्सनी जग जिंकले होते
माणूस इतिहास जमा झाला होता.
पण रोबोट्सना
पोट नव्हते, त्वचा
झाकण्याची गरज नव्हती
आकांक्षा नव्हत्या
त्यांचे अर्थशास्त्र ठप्प झाले
आता पुढे काय असा प्रश्न पडला
जेव्हा त्यांना मिसळपावच्या
अर्काईव्हमध्ये माहितगारची
एक जुनी कविता आढळली
मग त्यांनी पोट असणारे
त्वचा झाकाविशी वाटणारे
एआय रोबोट प्रोफेसर
माणसाला शिकण्यासाठी
शिकवणारा गुरू लागतो
म्हणून मीच बनवला हा
एआय रोबोट प्रोफेसर
अपल्याला शिकवण्यासाठी
यापुढे त्याचे विद्यार्थी
रोबोट असतील ?
आता फक्त काढ दिवस
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस? आता फक्त राहीले काढ दिवस.
लिव अंधभक्ता लिव
लिव अंधभक्ता लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्हंव
काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्हंव
कधी मोदीची आरती लिव
कधी शहाची गाणी लिव
कधी पवारद्वेष लिव
कधी ठाकरेद्वेष लिव
कधी पेंग्विन लिव
कधी संज्या लिव
पण लिवत र्हंव
तरी हरकत नाही
कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का?
अरे संस्कार संस्कार
अरे संस्कार संस्कार
अमेरिकेत आल्यावर
हातात पडती डॉलर
करा त्याचा नीट वापर !!१!!
अरे संस्कार संस्कार
हॉटडॉग बरा म्हणू नये
मेगडॉनल्ड मधे जाऊन
बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!!
अरे संस्कार संस्कार
शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून
तिकडे भारतात करा
त्याचे डिट्टो अनुकरण !!३!!
अरे संस्कार संस्कार
खोटा कधी म्हणू नये
पेय निघून गेले (विडंबन)
प्रेरणा: ते दिवस निघून गेले
टेबलावर प्याले आपटून
आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून
धुंद धुंद होत रिचविण्याचे
ते दिवस निघून गेले.
मित्रांमध्ये पिऊन-पाजवून
विकांताला पार्ट्या करून
तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे
ते दिवस निघून गेले.
मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास
भारताच्या एकात्मतेसाठी
सीमेवर लढणार्या
वीरांना मानवंदना
नेहमीच देत असतो
त्यांचे लढणे
जसे समोर दिसते
कौतुकही समोरून मिळते
लिव बामणां लिव
लिव बामणां लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्हंव
काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्हंव
कधी आठवणी लिव
कधी अनुभव लिव
कधी अनुवाद लिव
कधी भाषांतर लिव
कधी रुपांतर लिव
कधी अवांतर लिव
पण लिवत र्हंव
आई घरात असतां घर,घरासम भासले
क्षीण आवाज ऐकून किती पहारे ठेवावे
आजचा श्रावण पाहून किती चेहरे रंगवावे
आई घरात असतां, घर घरासम भासले
आता मुलांनी,घराचे बहूत विभाग केले
आशेचे खूले गगन अमूचे बाबा होते
आता सगळे स्वप्न हळुवार भंग झाले
सर्व नातीगोती तुकडे तुकडे होऊन विभागली
कुणास ठाउक दुःख्खें किती हिश्शात विभागली
एक नियम नाही हर एका मध्ये
हर रूपांवर दुसरे रूप विभागले
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी
चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र
न जळूं देता सांभाळू तरी कसं
प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो
कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी
नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक
मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे
नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो
जीवनच बोझ असता,पेलवूं कसा
लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा
जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा
तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे
तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे
लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे
हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे
मिराशी
मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी
अदृष्ट
दिशा-कोन ढळले, सावरले,
...अथांग उरले,
रेणुबंध खिळखिळले, जुळले,
...अजोड उरले,
नक्षत्रे विझली, झगमगली,
...ओजस उरले,
चित्रलिपी अडली, उलगडली,
...अव्यक्त उरले,
अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले,
अदृष्ट दिसले.
चला . . कविता लिहू
थोडे तांदूळ ,थोडे गहू
चला . . . कविता लिहू !
शब्द हाताशी, कल्पना मनाशी
जमते का ? .. पाहू !
सुचलेले कागदावरचे, रुचलेले मनातले
अंतऱ यातले ,कळते का ? .. पाहू !
तळातून गाळलेले ,गाळातून तळलेले !
चिडचिड संताप , मनस्तापानी भरलेले
येते का बाहेर ! ? .. . पाहू !
गुढी पाडवा
चैत्राची पालवी,
मरगळ घालवी ।।
कोकीळ कूजन,
श्रीराम पूजन ।।
तारीख रचली,
अयोध्या सजली ।।
मंदिर नवे,
चैतन्य सवे ।।
मंदिर मालकी,
रामाची पालखी ।।
गुढ्या तोरणे,
नयन पारणे ।।
आला मधूमास,
संपला वनवास ।।
- ‹ previous
- 8 of 468
- next ›