(काही कविता का प्रश्न ?)

चेतन's picture
चेतन in जे न देखे रवी...
28 Nov 2008 - 3:15 pm

रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली.

आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं. सद्यस्थिती पाहता याला वडंबन म्हणता येईल का याबद्दल साशंक आहे असो.

निर्ढावलेला बंडखोर
मुखडा आतंकाचा.
हवातसा हल्ला केल्यावर
हरामखोर हैवान झाला.
हक्काची मुंबई
मारायला मोकळा.
---------------
अल्लाद दाउदमिया आय्एस्आय् चा भामटा.
कराचित लपून पुन्हा पुन्हा
फोफावला लालकाळा
आता,
देशभर तंगडी तंगडी
------------------------
बारीक सारिक स्फोटांनी
देशातले एकेक शहर हादरवून
त्यानी विचारलयं
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
आता गोळ्या झाडल्यावर.
--------------------------------
एकेक वर्ष कोसळत गेलं
लोकलपासून ताजपर्यंत
पत्त्याच्या बंगल्यासारखं.
आबा पुरे झाल्या का
फुटकळ मुलाखती वांझोट्या.?

(अस्वस्थ) चेतन

मुक्तकविडंबनप्रतिक्रिया