उ ठ तरुणा उठ आता
घडवु या नव भारता
गड्या रे घडउ या नवभारता
ही बघ भारत जननी
का अश्रु तिच्या त्या नयनी..?
ना कळे तुला रे अजुनी..?
का रडते वीरांगिनी...?
निर्लज्जा परी स्वस्थ कसा तू..?
तव मातेचे दुखः जाण तू
अश्रु आईच्या नयनीचे
चल उठ पुसू आता..
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
याद कर भगतसिंगांची तू
आठव राजगुरु
धेय्या साठी आपण आपुल्या
मरु पुन्हा अवतरु
कुठे गेले ते गांधी आणिक
कुठे गेले ते नेहरु....?
हल्लीचे हे नव्हेत नेते
हे तर माथेफिरु
नकोत आम्हा उपदेश
किंवा नकोच कोणी नेता
अखंड भारत धेय्य आमुचे
आम्हा हवी एकता..!
उठ तरुणा उठ आता
घडवू या नवभारता
गड्यारे घडवू या नवभारता.....
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 2:32 pm | प्रथमेश गोखले
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही
2 Nov 2008 - 2:32 pm | प्रथमेश गोखले
तुमची कविता मला तरी आवड्ली. जरा उशिराने वाचली ,या कवितेला चाल लावयला हरकत नाही
30 Dec 2014 - 2:33 pm | प्रसाद गोडबोले
सुरेख कविता :)
30 Dec 2014 - 2:34 pm | सूड
कसं जमतं ब्वॉ लिहायला हे असं !!
30 Dec 2014 - 3:08 pm | सस्नेह
छान आहे .
पण लाल का केलं आहे ?
30 Dec 2014 - 3:11 pm | काळा पहाड
तुम्ही ते मी माझा वाले चंद्रशेखर गोखले नाही ना?
30 Dec 2014 - 3:20 pm | अत्रन्गि पाउस
आं