नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव?
संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… …
गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते
तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव…
जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली
दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव….
तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती
मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव…
ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे?
ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
प्रतिक्रिया
23 Oct 2015 - 8:44 am | सालस
वा! सुंदर कविता.
23 Oct 2015 - 10:44 am | एक एकटा एकटाच
चांगलीय
23 Oct 2015 - 4:26 pm | चुकलामाकला
धन्यवाद!
23 Oct 2015 - 7:24 pm | पद्मावति
सुंदर कवीता.
23 Oct 2015 - 7:34 pm | शिव कन्या
पोचली कविता.
23 Oct 2015 - 7:34 pm | पैसा
सुंदर कविता! आताच एका लेखावर डोके आपटून आलेय. इथे जरा जिवाला बरं वाटलं.
असल्या कविता कशाला लिहिता ओ? मोदी पप्पू, फेकू. आप्टार्ड, नाहीतर बुवा-बाया. पुणे विरुद्ध बाकी सगळे असं काहीतरी लिहा. मग काय लिहिलंय तेही न बघता ५०० प्रतिसादांची गॅरेंटी.
28 Oct 2015 - 11:22 pm | एकप्रवासी
छान जमुन आलय..............